Skip to main content

प्रवास

सफर---काम्पुंग तेपी सुंगाइची (आता फोटोसह बघता येईल!)

लेखक वैशाली हसमनीस यांनी गुरुवार, 31/07/2008 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
मलेशिया हा नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्त लाभलेला एक देश! जगभरातले लोक येथे पर्यटनस्थ्ळ म्हणून येतात. हा सर्व भाग सदाहरित वृक्षराजीने नटलेला.

मिसळ

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 15/07/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो. misal

बदल तर घडतोय...

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 14/07/2008 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
टीक-टॉक टीक-टॉक टीक-टॉक ठांग! लोलक, जागच्या जागी फिरतोय! लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट ठक्काक! मानव, जागच्या जागीच चालतोय! ठांग!. ठांग!!.. ठांग!!!... तरी ..बदल तर घडतोय... मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं! अखंड, अविरत... अथक!! बदल तर घडतोच आहे... क्षणा क्षणाला..कणा कणाने, वाढणार्‍या एव्हरेस्ट प्रमाणे! क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने, वितळणार्‍या हिमाद्री प्रमाणे! एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे, दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे! एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे... पुढे.. मागे.. जिथल्या तिथे! जिथल्या तिथे.. मागे..

नटवर (लोकल गोष्टी-१)

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 12/07/2008 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
नटवर . लोकल मधला २ क्लासच्या डबा तुमच्या पैकी बर्‍याच जणांना परिचित असेल. सेकंड क्लास आणि तो ही लेडीज सेकंड क्लास म्हणजे ...गडबड- गोंधळ, भांडण बाचाबाची, सड्या-डागांची चौकशी व घर, नवरा, मुलं यांच्याशी जोडलेली गार्‍हाणी. त्यात मधून फिरणारे फेरी वाले आणि गोंधळामुळे बावचळून गेलेल्या लहान मुलांची चिरचिर, :D या सगळ्याला छेदणारी एक हास्याची लकेर हे त्याचं वरवर दिसणार रूप, पण या वातावरणात आपला प्रवेश झाला की मग आपल्याला त्यांतील आणखीनं पात्रे कळू लागतात. त्यांच्या भूमिका पाहताना सगळ्या गर्दी गोंगाटाचा विसर पडतो, निदान मला तरी!. ट्रेन मध्ये शिरल्यावर एक दोन मिनटांतच माझी भूमिका सुरू होते.

राजमुंद्री --एक नयनरम्य ठिकाण

लेखक वैशाली हसमनीस यांनी शुक्रवार, 20/06/2008 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
राजमुंद्री--एक नयनरम्य ठिकाण आपल्या भारतात अनेक पाहण्यासारखी स्थळे आहेत.त्यातील हे एक आहे.आंध्र प्रदेशात एन्.एच.५ ह्या महामार्गापासून जवळच आहे.गोदावरी नदीच्या कांठावर वसलेले अत्यंत देखणे असे हे गाव.जिल्हा-पूर्व गो दावरीं. नाशिकपासून निघालेल्या गोदावरीचे पात्र येथे इतके भव्य होते की जणू समुद्रच!