सॉफ़्ट्वेअर क्षेत्र – मी पाहिले तसे.
भारताने खुले अर्थिक धोरण अवलंबले आणि बोलता बोलता जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहू लागले आणि यात सगळा भारत वाहत गेला. नारायण मुर्ती,अझिझ प्रेमजी यासारख्या वल्लींनी सॉफ़्ट्वेअर उद्योगामधे उल्लेखनिय कामगिरी करून दाखवली.आणि पाश्चात्य देशांना कमी किमतीत सॉफ़्ट्वेअर बनवुन देणारी खाण सापडली. बोलता बोलता सॉफ़्ट्वेअर सेवा क्षेत्रामधे भारत अग्रगण्य बनला.सुरवातीला लोकांची कामे कॉम्पुटर करील व लोकांच्या नोकय्रा धोक्यात येतील असे भाकीत वर्तवण्यात आले. पण त्याच कॉम्पुटरमुळे खूप सारय्रा नोकरय्रा उपलब्ध झाल्या.आणि मागणी तसा पुरवठा या मार्गाने सॉफ़्ट्वेअर इजिंनियर लोकांची एक फ़ळीच तयार झाली.
मिसळपाव
