Skip to main content

कथा

एका बापाचा जन्म

लेखक चंद्र.शेखर यांनी शनिवार, 15/06/2019 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा आयडी घेतल्यावर प्रथमच लिखाण पोस्ट करतोय. लिहायला नुकतीच सुरुवात केली आहे, सुचना/मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच उपयोगी ठरेल) “मने, काय पसारा केलायसं एवढा ?” ऑफिस मधून घरी आल्या आल्या फरशीवर पडलेली खेळणी, चित्रकलेचे पेपर, रंग आणि कागदाचे असंख्य कपटे बघून नेहमीप्रमाणे माझा पारा चढला. मनू मला दाखवण्यासाठी म्हणून तिने चितारलेलं चित्र घेवून माझ्याकडे येत होती, ती माझा चेहरा बघून तिथेच थबकली. चेहरा पडला तिचा, मग मी सुद्धा ओशाळलो अनं जवळ घेतलं तिला.

दोसतार - २१

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 12/06/2019 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/44307
मी काय काय बोलत होतो आणि आई ते ऐकत होती. त्यावेळी माझ्या पेक्षा माझा चेहेराच कदाचित जास्त बोलत असावा. कारण आईचे माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या चेहेर्‍याकडेच जास्त लक्ष्य होते. सोमवारी सहलीला जायचे या विचारांनीच माझ्या चेहेर्‍यावर काहितरी मजेदार रंगीत रांगोळी उमटत असावी. माझ्यासारखीच ,आई पण त्या नक्षीत हरवून गेली.
यवतेश्वर म्हणजे धगांचा डोंगर. पाटणला असताना पाऊस खूप असायचा. कधीतरी कोयनानगरला गेलो तर जंगली जयगड चा डोंगर ढगात झाकलेला दिसायचा पण त्या ढगात कधी गेलो नव्हतो.

धूपगंध (५)

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 09/06/2019 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://misalpav.com/node/44648
डोळ्यातल्या पाण्यामुळे आबांना समोरचे धूसर दिसू लागले. समोरचे काही आता पहायचे नव्हतेच मुळी. त्याची गरजही नव्हती. डोळ्यासमोर वेगळेच जग होते. ते जग पहायला या जगातली दृष्टी गरजेची नव्हती. आठवणी अशा एकट्या कधीच येत नाहीत. एक आली की तीचा पदर धरून दुसरी येतेच.
या भरजरी आठवणींचा पदर धरून सोबत काही गमती जमतीही आल्या. मानसकन्येचा प्रयोग होता. खानदेशात बहुधा रावेर ला असावा. मध्यंतराला चहावाला पोर्‍या कुणासाठीतरी विड्या घेवून आला. साने मॅनेजरना ते अजिबात आवडायचं नाही.

'तेरी केहॆके लुंगा'

लेखक वरुण मोहिते यांनी शनिवार, 08/06/2019 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
अन्वीता.. अन्वीता..अन्वीता '' हा बोलो वरुण'' अन्वीता आप मुझे बोहोत अच्छी लगती हो. ''अच्छे तो सभी होते है"बोलून ही चालायला लागली. परत दुसऱ्या दिवशी तेच मी वर्क शॉप मधून पळत बाहेर आणि ही मला टाळायला. आता मी मनावर घेतले होते. इज्जतीचा सवाल होता. अन्वीता झारखंड ची. ती आणि तिची एक खास मैत्रीण सोमाणी दिल्ली ची कॅम्पस मधल्या सर्वात सुंदर मुली.पण आय टी ला होत्या दोघी. सोमाणी ला आसनसोल च्या एका व्यापारी घरातील मुलाने पटवले होते. अन्वीता मला आवडायची . अन्वीता कुमारी नावातच प्रेम होते. .. त्यात प्रथम आणि द्वितीय वर्षाचा मी अध्यक्ष ( प्रेसिडेंट) मुलांचा सपोर्ट खूप . तृतीय वर्षा आधी जी एस बनता येत नाही.

आशा आणि निराशा .

लेखक Jayant Naik यांनी शनिवार, 08/06/2019 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आशा आणि निराशा . लेखक . ( असे म्हणतात कि लेखक वेगवेगळ्या पद्धतीने तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असतो . म्हणजे त्याला भेटलेली माणसे ,त्याने अनुभवलेले प्रसंग ..त्या वेळी त्याच्या मनात उमटलेल्या भावना तो वेगवेगळ्या कथेत मांडत असतो,सांगत असतो. मी शिकत असताना एका आजोबा आणि त्यांची बायको ..माई . यांच्या बंगल्यात अभ्यास करण्यासाठी खोली घेऊन रहात होतो. . ते दोघेच रहात. त्यांची जगण्यासाठी चाललेली निरर्थक धडपड मला पावलोपावली दिसत होती. मनाला उभारी नव्हती ..शरीर साथ देत नव्हते . पण जगणे संपत नव्हते.

धूपगंध ( ४)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 08/06/2019 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://misalpav.com/node/44537
भांडे पुन्हा लोट्यावर ठेवताना त्याचा किंचीत आवाज झाला. आबांना तो आवाज नाटकाच्या घंटेसारखा वाटला. त्या आवाजासरशी डोळ्यात एक अनामीक चमक आली. ययाती- देवयानी मधील ययातीचा शर्मिष्टेसोबतचा प्रेमालाप ऐकु यायला लागला.
हे प्रिये तुझ्या मुखारविंदाला कमलनयांनी शोभा येते की मग भाळावरच्या कुंकुम तिलकाने पूर्व दिशेला प्रभा फाकते? इंद्रधनुची उपमा मी तुझ्या कमानदार रसशीत ओठांना देवू की मग त्या बाकदार भुवईला?

माझा निबंध

लेखक सर टोबी यांनी शुक्रवार, 24/05/2019 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: जी. ए. कुलकर्णी यांची एक गोष्ट, बहुदा माझीही मोट असे काही तरी नाव असावे. एक शहरात राहणाऱ्या, स्वतंत्र विचारसरणीच्या मुलाला शाळेत निबंध लिहावा लागतो तोही त्याने न अनुभवलेल्या जीवनासंबंधी. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आसपास एक गोष्ट हमखास पाहायला मिळते ती म्हणजे गहिवराचे कढ आणून लिहिलेल्या सुट्ट्यांच्या आठवणी. या वर्णनांमध्ये मामाच्या गावाला जरा विशेष स्थान असते.

राधाची कैद

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 23/05/2019 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
राधाची कैद. एखाद्या कथेची सुरुवात कशी होईल हे बऱ्याच लेखकांना सांगता येत नाही . आणि त्याचा शेवट तर जवळजवळ त्या कथेतील पात्रांच्याच हातात असतो .म्हणजे जन्म आपल्या हातात नाही . मरण आपल्या हातात नाही ...फक्त या दोन्ही मधील जगणे आपल्या हातात असते.तसेच काहीतरी .. कथा आपोआप सुरु झालेली असते . लेखकाने कथेचा मध्य तेवढा लिहायचा . आणि पात्रांनी कथेचा शेवट केला की तो लिहून लेखकाने आपले नाव तेवढे खाली जोडायचे . विक्रम राजे.( अर्थात हे माझे खरे नाव नाही . या कथेतील गावाचे आणि पात्रांची नावे पण खरी नाहीत .प्रसंग मात्र खरे आहेत . ) मी टीवी वरच्या मालिकांच्या कथा लिहितो .

आंबा नावाचे झाड

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 19/05/2019 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
पातेल्यातले आंबे आईने माझ्याकडे सरकवले आणि " घे काढून .." असा आदेश दिला. हातातले काम सोडले आणि एक एक आंबा पिळून काढू लागलो. दुध, वेलदोडे टाकून झाले आणि शेवटी साखर टाकायची म्हणून ती शोधायला लागलो. आईला विचारावे तर तिचे उत्तर असणार "तिथे आहे. " "तिथे कुठे? " असा प्रतिप्रश्न केला तर "तिथे स्टिलच्या गोल डब्यात " असे उत्तर मिळणार. शेवटी समोरच्या अगणित डब्यातून मलाच पाहिजे ते शोधावे लागते. तो अनुभव पाठीशी असल्याने मी एकटाच साखर शोधू लागलो. त्यावेळी मात्र आईच्या कामात लुडबूड होऊ लागली. माझ्याकडे एक तिरपी नजर टाकली आणि बोलली ," साखर हवीए? अरे एवढा गोड आंबा आणि त्यात अजून साखर? जाड होशील की अजून !

नन्दिनीची डायरी - निर्णय

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 14/05/2019 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
नन्दिनीची डायरी - निर्णय वेटिंग रूममध्ये ती एकटीच बसली होती. "एला" मी हलक्या आवाजात हाक मारली. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. पंचविशीच्या आसपास, अतिशय रेखीव चेहरा, पिंगट डोळे, केस मात्र कोरडे, फिस्कारलेले, काळजी न घेतले गेल्यासारखे. आणि चेहर्यावर मलूल असा भाव. मला पाहून कसनुसं हसू तिच्या चेहर्यावर उमटलं पण ते वरवरचं होतं. माझ्या मागोमाग ती आत आली. समोरच्या सोफ्यावर बसली. नजर जमिनीवर लावून ठेवलेली. सुरुवातीच्या औपचारिक गप्पा चालू झाल्या. एला तिच्या पार्टनरसोबत राहत होती. हा देश आता लिव्ह इन रिलेशनशिप बरोबर की चूक या वादाच्या पुष्कळ पुढे गेला आहे.