Skip to main content

कथा

"एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 27/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
" एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात, मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं." तसा मी वरचेवर गोव्याला जात येत असतो.एखादा आठवडा राहायचं असल्यास मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंट मधे राहतो.त्यामुळे माझा आजुबाजूच्या लोकांशी परिचय झालेला आहे.त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ख्यालीखुषालीच्या गप्पाही होतात.असंच एकदा त्या होटेल मधल्या एका वेटरशी हलो-हाय झाल्यावर मी त्याला सहजच म्हणालो, "तुला मी इकडे नवीनच पहात आहे." ते ऐकून तो म्हणाला, "होय, मला इकडे येवून दोन तीन महिने झाले.मी पुर्वी मुंबईच्या एका होटेलमधे काम करीत होतो.

आतला आवाज

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 26/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात.

बोंबलेवाडीत चिअरगर्ल्स

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 25/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नाव बोंबलेवाडी असलं, तरी तिथं फारसं काही घडत नसे. विहिरीवरच्या भांडणांखेरीज बाकी शांतताच. म्हणायला गाव आधुनिक होतं, पण ते फक्त सरपंच हणमंतराव वाघमोडेंच्या लेखीच. जी काय आधुनिकता म्हणून होती, ती फक्त हणमंतरावांच्या घरीच. आता ती तिथं असायलाच हवी होती. हणमंतरावांच्या गेल्या तीन-चार पिढ्या राजकारणात होत्या. पणजोबा-आजोबा यांनी तर इंग्रजांच्या काळातही राजकारण गाजवलेले. हणमंतरावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, तर त्यांचे आजोबाच नेहरूंऐवजी पहिले पंतप्रधान व्हायचे खरे. पण "नव्या रक्ताला' वाव देण्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त गरम न होऊ देता ते पद सोडलं.

शालूची शालीनता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 25/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
शालूला तीन बहिणी आणि दोन भाऊ. मला आठवतं गाडीअड्ड्याचे पलिकडे शालू राहायची.त्यांच्या घरी दोन गाई होत्या.त्यांचे दूध विकून शालूची आई आपल्या चिल्लापिल्लांचा संभाळ करायची. शालूच्या वडीलांत काही अर्थच नव्हता.ह्या गृहस्थाने स्वतःच्या चंगळी शिवाय कांही केलंच नाही.सकाळी उठून घरा बाहेर पडल्यावर दुपारच्या पोटातल्या भूकाग्नीला शमवायला घरी यायचे."घडता घडता घडेल ते घडेल" अशा समजूतीत राहून दिवस काढायचे.शालूची आई तर त्यांना पुरी कंटाळून गेली होती.पण करणार काय? "रांदा,वाढा आणि उष्टी काढा"हा त्यावेळचा स्त्रीयांचा आयुष्यक्रम.

प्रेमचि चटणी,प्रेमचि भाकर.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 22/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.” बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख होती.वहिनीच्या माहेरच्या बंगल्याच्या सभोवताली मच्छिमार लोकांची वस्ती होती.घर समुद्राच्या जवळ असल्याने ही अशी मिक्स वसाहत तयार झाली होती. आणखी बरेच बंगले आजुबाजुला होते.पण शेजारच्या झोपडी वजा घरात एक ख्रिश्चन कुटुंब राहत असे.

मौशुमी

लेखक सुचेल तसं यांनी शुक्रवार, 20/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लाइट गेले, त्यामुळे पंखा बंद झाला आणि पंखा बंद करायचं अन मला जाग यायचं स्विच एकच असल्यासारखं मी खाडकन झोपेतनं जागा झालो. खोलीत चांगलाच उजेड दिसला. हात लांब करुन मोबाईलवर किती वाजले ते पाहिलं. ०९:०० अस दिसताच शिSSSSट अस जोरात ओरडुन पांघरुण बेडच्या दुसर्‍या कोपर्‍यात भिरकावुन दिलं. झोपेतनं नुकतच उठल्यावर बहुतेक वेळा आवाज जड असतो. तो इफेक्ट जायच्या आत बॉसला फोन लावला. बर वाटत नाहीये, त्यामुळे ऑफिसला थोडासा उशीरा येईन अस त्याला सांगितलं. लाइट गेल्यामुळे गिझरचा काही उपयोग नाही. त्यामुळे गार पाण्याने पटकन आंघोळ उरकली.

एक छोटीशी सकाळ

लेखक सुचेल तसं यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
झेलम एक मोठी सुटकेस, एक हॅंडबॅग आणि सामानाने तुडुंब भरलेली कॅरीबॅग कशीबशी सावरत बसमधुन उतरली. चरफडत तिने आजुबाजुला पाहिले. पण कुठेही अमरचा पत्ता नव्हता. पुणं जवळ आल्यापासुन ती त्याला सारखा फोन लावत होती. पण हा बाबा फोन उचलेल तर शपथ. निदान दहा वेळा तरी याला सांगितलं होत की मी पाच-साडेपाचपर्यंत येईन पुण्यात . तेव्हा वेळेवर न्यायला ये मला. आधीच तिची झोप नीट झाली नव्हती. तिला बसमधे कधीच नीट झोप लागत नाही. याउलट अमर बस सुरु झाली की लगेच डुलायला(डुलकी घ्यायला)लागतो आणि कंडक्टर यायच्या आत गाढ झोपुन पण जातो.

एक तितली मातकट तपकिरी

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नजर पोहोचते तेथवर रखरखीत वाळवंटी टेकड्या. संतप्त झळांनी आसमंत निर्दयपणे भाजून काढल्या जात आहे. घळीतील अडचणीच्या जागेत असलेल्या भुयारी गुहेत, बाहेरचे पेटलेले उन्ह भोकाभोकांनी आत ठिपकले आहे. गुहेत येताच, अंगावरचे घामाने थबथबलेले राखाडी पिवळे रकटे यासीम ओरबाडून फ़ेकून देतो. त्या छोट्याशा जागेत आधीच, त्याच्या सारखी वीस एक अर्धीउघडी शरीरे जागा मिळेल तिथे पडली आहेत. रोज दुपारचे सुखे मटन चावून झाल्यावर मिळणारी अर्धा तासाची विश्रांती सगळ्यांना खूप मोलाची आहे. उकाडा आणि तहानभूक ह्यांनी आलेली ग्लानी यासीमच्या डोळ्यात उतरून त्याची द्रष्टी जडावली आहे. तशातही, त्याचा उघडा बाहू कुरदणारी मक्खी त्याला दिसते.