Skip to main content

कथा

निशब्द - भाग १

लेखक सँडी यांनी बुधवार, 27/05/2009 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक प्रयत्न. तो: अगं मी सहज काढला होता चिमटा. ती: सहज? रात्रभर हात दुखलाय माझा! तो: बरंsss! सॉरी बाई! ती: का छ्ळतोस? तो: छ्ळतो? ती: .... तो: चल कॉफी पिऊ... ती: नको. तो: (हात धरुन) चल, तुला बरं वाटेल.. ती: (डोळे मिटलेले).... तो: काय झालं?

निसर्ग म्हणजेच मुक्ति देणारा,निवारण करणारा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 26/05/2009 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी जेव्हा मी वेंगुर्ल्याला भेट दिली तेव्हा कोळी वाड्यातल्या माझ्या जुन्या मित्रांना निक्षून भेटण्याचं ठरवलं होतं.समुद्रामार्गे बाहेरून आलेला व्यापार्‍यांचा माल मांडवीवर उतरवतात.ही मांडवी म्हणजे समुद्राला मिळणारी खाडीच असते.बरेचसे कोळीवाडे ह्या मांडवीच्या परिसरात विखुरलेले आहेत. फास्कू फर्नांडीस आणि पावलू फर्नांडीस हे दोघे भाऊ माझे जुने दोस्त आहेत.फास्कू आता इंग्लंडला स्थाईक झाला आहे असं मला कुणीतरी सांगतलं होतं.निदान पावलू भेटेल ह्या आशेने कोळीवाड्यात आज गेलो होतो.सकाळची वेळ होती.त्याच्या घरी गेल्यावर मला कळलं,पावलू आणि इतर कोळी समुद्र किनार्‍यावर गेले असून रापण ओढून दुपारच्या बाजारासाठ

आयुष्यात येणार्‍या धूसरपणाला मी मानते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 24/05/2009 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक गंमतच झाली.ईंगळ्यांची यमी आमच्या घरी बसायला आली होती.तशी यमी मला लहानच. आमच्या बालपणात कोकणात मृगनक्षत्रात पावसाच्या पहिल्या सरीत बाहेर अंगणात जाऊन पावसात न्हाऊन घ्यायची आमच्यात चढाओढ असायची. "सर्वांत प्रथम तू सुरवात करायचीस होना यमे?" असा मी प्रश्न केल्यावर यमी म्हणाली, "हो एकदा मला आठवतं माझ्या अंगात एक ताप होता.ते ढगांचं गडगडणं,विजांचं चमकणं, पाहून मला अंथरूणात पडून रहायला कसंसंच वाटत होतं.मी बाबांचा डोळा चुकवून सर्वांच्या अगोदर अंगणात आले होते." "हो मला आठवतं त्यावेळी तुझ्या बाबांनी तुला बाहेर येऊन फरफटत घरात नेलं होतं.तू रडत होतीस.

जनावरांच्या सानिध्यात मिळणारी शांती.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 22/05/2009 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
"ते २००६ साल होतं.मी निवृत्त झालो होतो.निवृत्ती नंतर वेळ कसा घालवायचा हा माझ्या पुढे आलेला मोठा प्रश्न होता.हा प्रश्न मला एक आव्हान होतं.तशी आता पर्यंतच्या जीवनात मी अनेक आव्हानं स्विकारली आणि त्यातून बाहेर पण पडलो.पण हे आव्हान जरा जबरी होतं. मला हवी तशी आणि मला जरूरी आहे तशी एकही गोष्ट लक्षात येत नव्हती.मुंबईला माझ्या घरात बसून सतत चिंता करण्यापलिकडे काही जमत नव्हतं.मला वाटायचं की अशी चिंता करीतच माझं आयुष्य संपणार की काय?

जुन्यात जूनं अलौकिक औषध.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 20/05/2009 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच फार्मसूटीकल डिग्री घेऊन नोकरीला लागलेला माझा भाचा मला आपल्या नोकरीचा अनुभव सांगत होता. मी त्याला म्हणालो, "अनेक रोगावरची औषधं घ्यायला तुझ्या फार्मसीत लोक येत असतील.पण तुला विशेष वाटलेलं औषध कुठलं की ज्याने तुला कुतूहल वाटत असेल?" मला म्हणाला, "तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला.इतर अनेक औषधं घ्यायला लोक येतात.पण जे लोक उदासिनता कमी होण्यासाठी-Anti-Depressant- औषधं घ्यायला येतात जसं Prozac किंवा Xanax सारखी औषधं घेऊन जातात त्यांच मला जास्त कुतूहल वाटतं. तुम्हाला माहितच आहे की आत्ताच मी एक नवीन जॉब घेतला.एका फार्मसीत मी कामाला लागलो.मला हा माझा जॉब आवडतो आणि मी नियमीत जॉबवर जातो.

बाबल्या मोचेमाडकर आणि आरती प्रभू

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 18/05/2009 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच वर्षानी मी माझ्या आजोळी म्हणजे कोकणात आजगांवला जायला निघालो होतो. आजगांवला वेंगुर्ल्याच्या मार्गाने जाताना वाटेत शिरोडं लागतं.गोव्यात पण ह्याच नावाचं एक गांव आहे.ह्या शिरोड्या गावात वि.स.खांडेकर-प्रसिद्ध सिद्धहस्त लेखक, ज्ञानपीठ अवार्डचे मानकरी-राहत असायचे.वाटेत त्यांच घर लागतं.ह्या भागात येणारे टूरिस्ट वि.सं.च घर बघायला येतात. लांबून त्यांच्या घराला नमस्कार पण करतात.