Skip to main content

जीवनमान

एका शाळकरी मुलाचा निबंध

लेखक वैदेहीजी यांनी गुरुवार, 13/05/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका प्राथमिक विभागातल्या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याना एक निबंध लिहायला दिलीला असतो. निबंधा चा विषय असतो "देवाने मला काय बनवावे ?" त्यादिवशी घरी निबंधवह्या तपासताना ती एक निबंध वाचते आणि भावूक होवून जाते. तिचे पती आपया बायकोला असे भावूक होऊन रडताना बघतात आणि तिला रडण्याचे कारण विचारतात ती काही न बोलता समोरची वही उचलून दाखवते . ते निंबंध वाचतात जो खालील प्रमाणे असतो " देव बाप्पा ! मला जादूने जर काय बनवणारच असशील तर "टीव्ही" बनव . मला त्याची जागा घ्याची आहे. मला टीव्ही सारखा जीवन हवय. त्याचे माझ्या कुटुंबां मधील जे अढळ पद आहे ते मला हवाय .

डॉक्टरीणबाई

लेखक शिल्पा ब यांनी मंगळवार, 11/05/2010 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारी चर्चा बरीच जोरात आहे म्हणून आठवली आणि लिहिली. मागच्या वर्षी आम्ही भारतात गेलो होतो...माझे आई वडील पनवेलात राहत होते...नवऱ्याचे CBD त ....मी पनवेलात गेले होते २ दिवसासाठी...दुसर्या दिवशी दुपारी माझ्या लेकीची शी धुवायला गेल्यावर माझ्या आईला दिसले कि किंचित लालसर आहे...कदाचित रक्त असेल म्हणून ताबडतोब डॉक्टरकडे जावे...मला काही एवढे विशेष आहे असे वाटले नाही पण आईने खूपच जोर केला म्हणून जवळच्याच क्लिनिक मध्ये जिथे बालरोगतद्न्य असते इथे गेलो...गेल्यावर कळले कि त्या इथे येत नाहीत...मग त्यांच्या क्लिनिक मध्ये गेलो... क्लिनिक मध्ये गेल्यावर थोडा वेळाने बाई आल्या आणि

ज्वालामुखीचे कवन

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 11/05/2010 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
ज्वालामुखीचे कवन नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल.

अरेरे सांबा ;-(

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 11/05/2010 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
शोलेमधील लहानशा पण अत्यंत गाजलेल्या सांबाच्या भूमिकेचे सोने करणारा मॅकमोहन ऊर्फ मोहन माखिजा आज देवाघरी गेला. माझी त्याला श्रद्धांजली. शोलेच्या यशात ह्याचाही खारीचा वाटा होता असे मला वाटते. मला असे आठवते की शोले बनत असताना मॅकमोहनने रमेश सिप्पीकडे तक्रार केली होती की मला अगदीच मामूली रोल दिला आहे. रमेश सिप्पीने त्याची समजूत घातली की रोल छोटा असला तरी तुझे नाव प्रसिद्ध होणार ह्याची खात्री बाळग आणि तसेच झाले. "अरे ओ सांबा" हा डायलॉग तमाम चाहत्यांना तोंडपाठ झाला होता.

निसर्गाचा हिशोब

लेखक अरुंधती यांनी रविवार, 09/05/2010 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज वाळ्याच्या पडद्यांना पाणी घालताना सहज खिडकीतून बाहेर पाहिले. शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झाले होते. खिडकीच्या खाली, वळचणीच्या जागी पारव्याच्या मादीने दोन अंडी घातली होती. म्हणूनच आज सकाळपासून त्यांची खिडकीपाशी लगबग चालली होती तर! एवढे दिवस त्यांना रोज खिडकीपासून हुसकावून लावता लावता मीच जिकिरीला आले होते. त्यांचे ते खर्जातले घुमणे, पंखांची फडफड आणि खिडकीत केलेली घाण ह्यांपेक्षाही मला त्यांना तिथे आपला संसार थाटू द्यायचा नव्हता.

सत्यकथा: भाग्यवान बैल!

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी रविवार, 09/05/2010 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
दि. ९/९/१९९९ रोजी- भगवान सखाराम पाटील रा. देवघर जि. नासिक यांच्या घरी रडारडी चालू होती. जो तो विचारत होता, काय झाले? कोण गेलं? अहो, त्यांचा लाडका सर्जा बैल म्हातारपणामुळे मरण पावला होता. भगवान पाटील यांनी गावोगावी मित्रमंडळी, नातेवाईक व आजूबाजूची ५/१० खेडी यांना बैलाच्या मौतीचे आमंत्रण पाठवले होते व पोळ्याला बैलाचा जसा शृंगार करतात तसा पूर्ण शृंगार मालेगांवहून मागवला. प्रेतयात्रेची जोरदार तयारी झाली. सर्जा बैलाचे प्रेत मोठ्या ट्रकमध्ये सजवून ठेवणात आले. प्रेतयात्रा सेताकडे निघाली तेव्हा जवळपास २५०० - ३००० लोक तेथे जमले.

'चटकदार' कोल्हापुरी चहा...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 08/05/2010 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूर आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे नाते अतूट आहे. महाराजांनी त्या काळात कोल्हापूरच्या डोंगराळ भागात चहा, कॉफी, कोरुड, रेशीम किड्याचेही प्रयोग करुन पाहिले होते, असे म्हणतात.. महाराजांच्या याच जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यातील हुंबवली गावच्या सह्याद्रीच्या पठारावर श्री. टेकवडे नावाच्या एका प्रयोगशील शेतकर्‍याने ४० एकर जमिनीवर चहाचा मळा फुलविला आहे. महाराष्ट्रात चहा होऊ शकत नाही असा टी बोर्डाचा दावा होता. इथे तर चहाचा हिरवागार चहा मळा फुलला आहे, आणि उत्तरेकडील आसाम, दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडूची चहामधील मक्तेदारी टेकवडेंनी मोडून काढली आहे. श्री.

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

हळू हळू...चालव तुझी फटफटी

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 07/05/2010 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू...चालव तुझी फटफटी तुझ्या मागे बसायची वाटत नाही भिती तरीही तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी ||धृ|| घरी न बोलता आले निघून केवळ तूझ्या सांगाव्या वरून कॉलेजला जाते खोटं बोलता घरी संशय न कसला आता मोकळी झाले मी, न पाठी कटकटी ||१|| आता तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी तोंड झाकले रुमालाने रे न चेहेरा दिसे माझा कूणाला बापही जरी आला समोरी तो न ओळखी मला आता घाई कशाला, नको त्या कसल्या लटपटी ||२|| म्हणून तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू चालव तुझी फटफटी आडव्या तिरप्या रस्त्यांनी जावूनी फिरव मला सारे गाव ओळख
काव्यरस