आठवणींची पन्नाशी : सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय

लेखनविषय:
लेखनप्रकार
यंदा म्हणजेच 2025मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही ठळक घटनांना पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने अनेक माध्यमांतून त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. अशा त्या सन १९७५च्या काही निवडक घटनांच्या रोचक तर काहींच्या दुःखद आठवणींचे इथे संकलन करतो. अनेक घटनांची जंत्री करण्याऐवजी काही निवडक घटनांवर प्रकाशझोत टाकलेला आहे. यातील काही घटनांच्या संदर्भात मजेदार किश्शांचाही लेखात समावेश केला आहे. त्यात वाचकांनाही प्रतिसादातून भर घालता येईल.

लघुसहल : क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय स्मारक

लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच्या तारांगण सोसायटीतल्या उत्साही युवकांनी .. अर्थातच तारांगण ज्येष्ठ नागरिक चमूनं अचानक ठरवलं की क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय स्मारक आपल्या पासून जवळच आहे पण अजून भेट द्यायचा योग आला नाही हे काय बरं नाही. स्मारकाचे उदघाटन तर एप्रिल महिन्यातच झाले .... तीन महिने झाले तरी नाही पाहिलं हे योग्य आहे का हे तुम्हीच सांगा. जगदीश अंकल लैच पेटले अन जाहीर करून टाकले " उद्या दुपारी दोन वा. सोसायटीच्या बाहेरच्या बस स्टॉप वर मी उभा राहणार... ज्यांना कुणाला स्मारक बघायचंय त्यांनी तिथं उपस्थित राहावे." म्हणून लगेच व्हाट्सअप ग्रुपवर यादी करायलाही घेतली. ५ - ७ जण जमले सुद्धा म्हणे.

इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना

लेखनविषय:
समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर? आमचा कार्यक्रम संस्मरणीय असण्याचं हे कारण होतं. त्याला खास उपस्थिती होती. नाही तर ‘स्वातंत्र्यदिन’ या विषयावर कार्यक्रम करणं यात आता नवलाई राहिली नाहीये. अगदी तो परदेशात साजरा झाला तरी त्यात विशेष असं काही वाटत नाही आजकाल. पण हे स्थळ अनोळखी होतं. उर्वरित जगाला (म्हणजे आम्ही उपस्थित आणि ‘यम टी.व्ही.’ दर्शकांव्यतिरिक्त कुणाला) हे कळणार नव्हतं. असे उपक्रम कुठे योजले जातात ते आता सांगणं आवश्यक आहे. आमच्याकडे तीन महादरवाजे आहेत. एकावर ‘स्वर्ग’ असं लिहिलंय. दुसऱ्यावर ‘नरक’.

हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे

लेखनप्रकार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर मराठी-हिंदी वाद रंगवत खळ-खट्याक नाट्य चालु असल्याचे बातम्यांच्या हेडलाईन्स मधून दिसते. त्या बातम्या असोत का मिपावरील संबंधीत धागा असो मी उघडण्याचे कष्ट यावेळी अद्याप तरी घेतले नाहीत. चार सहा नगरसेवकांना निवडून आणण्या पलिकडे अशा चहाच्या पेल्यातल्या वादळा पलिकडे मराठी लोकांमध्ये गांभीर्य किती आणि तोंड देखले पणा किती ह्या बद्दल कमी बोलावे तेवढेच बरे. असो. असो माझं टोपणनाव माहितगार, योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करण्याचा प्रयास करावा हे माझे काम.

HAL HF-24 मरूत

लेखनविषय:
लेखनप्रकार
उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी १९६१ रोजी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या HAL HF-24 मरूत विमानाने यशस्वी उड्डाण केले होते. याच प्रसंगाचे औचित्य साधून त्याची माहिती द्यायचा प्रयत्न . स्वांतत्र्यपूर्व काळात भारताची औद्योगिक प्रगती फारच कमी होती. कच्चा माल परदेशी नेउन विकणे , तिकडे प्रक्रिया करणे या धोरणामुळे उद्योग क्षमता नष्ट झाली होती. त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था , उद्योगांची साखळी व्यवस्था अस्तित्वात नव्हती. स्वातंत्र्यानंतर स्वाव्लंबनाचे धोरण आणण्याचा प्रयत्न केला गेला.

युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष

लेखनविषय:
लेखनप्रकार
धागा लेख प्रेर्ना आपले पटाईत सर हे खरं आहे की युरो-अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर आपले आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध साध्य करण्यासाठी नव-आर्थिक वसाहतवादाचे प्रारूप राबवले. आपले हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी असंख्य देशांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रचंड हस्तक्षेप केला आहे आणि तो आजही चालू आहे.

तियानानमेन चौरस्ता: 4 जून 1989 पासून काय शिकणार

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज सकाळी उद्यानात भ्रमंती करताना मला एका निवृत अधिकार्‍याने ने 4 जूनला तियानानमेन चौरस्त्यावर जमलेल्या लोकशाही समर्थकांवर चीन ने जी कठोर कार्रवाई केली होती, त्यावर माझे मत विचारले. मी त्याला उलट प्रश्न केला, जर चीन ने तेंव्हा कठोर कार्रवाई केली नसती तर, आज चीन आर्थिक आणि सैनिक दृष्टीने शक्तिशाली झाला असता का? चीनच्या लोकतंत्र समर्थकांना अमेरिका आणि यूरोपियन देशांची फूस होती. त्यांच्या उद्देश्य चीनचे केंद्रीय नेतृत्व कमकुवत करून जमले तर चीनचे तुकडे करण्याचा होता. पण चीनच्या कम्यूनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी स्वतचे निजी स्वार्थ विसरून देश हितासाठी कठोर कार्रवाई केली.

वारी !!!

में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.
Subscribe to इतिहास