Skip to main content

हे ठिकाण

MISALPAV CHAT

लेखक मंगेशपावसकर यांनी गुरुवार, 11/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मागील काही दिवस मला लेखकांशी व्यक्तिगत बोलायचे आहे असे त्यांचा प्रतिक्रियेमध्ये दर्शवले असता, चुकीचा समज करून घेण्यात आला. मला वाटत मिपा वरही ऑर्कुट प्रमाणे गप्पा करण्याची सोय असावी. कारण त्यामुळे लेखकाच्या लेखनाबद्दल आणखी जाणून घेता येते. त्याचा व्यक्तिमत्वाचा कानोसा घेता येतो. त्याची विचारसरणी कळते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तो लेख त्याच व्यक्ती ने लिहिला आहे कि नाही याची देखील प्रचीती येते, ह्याने नवोदित लेखकांना मदतच होईल असे मला तरी वाटते. जर वाचक सहमत असतील तर नक्कीच प्रतिक्रिया द्याव्यात.

वादाचा रबर..............

लेखक मंगेशपावसकर यांनी मंगळवार, 09/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वाचकांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वादाचा रबर हा ओढल्याने बळावतो ही नक्कीच खरी गोष्ट आहे. वाचकांचा आधारामुळे व काल सकाळी तात्यांबरोबर झालेल्या सामंजस्यपूर्ण वार्तालापामुळे हा चिघळलेला वाद संपुष्टात आला आहे. मी माझे काव्य,व्यंग तसेच प्रसंग लेखन या पुढेही मिपावरच समर्पित करणार आहे. अनेक गोष्टी बद्दल सल्लामसलत करत असताना दस्तुरखुद्द तात्यासाहेबांनी लेखन करा वाचा व प्रतिक्रिया देत रहा व संपर्कात राहा असे प्रेमाने सांगितले, अगदी मित्रासारखे अर्थात त्यांचा दैनंदिन कारभाराची मला जाणीव होतीच.

(नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग)

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 08/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग मागील लेखनात वाचकांस आधीच अवगत केल्याप्रमाणे आपल्या महान देशातल्या रस्त्यांवर रहदारी सुरळीत चालवण्याच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे. मी गाडी चालवत असताना माझ्या पुढच्या गाडीला हिरवा सिग्नल होता व तिला तसेच पुढे जाऊ देण्यात आले. मात्र मी तिथपर्यंत पोचताच दुष्ट सिग्नल लाल झाला. मी या माझ्याविरुद्धच्या कूटनीतीला न जुमानता तसाच पुढे गेलो तर पोलिसांनी मला पकडले व दंड केला. या अत्याचाराबद्दल मी रस्तोरस्ती बोंब ठोकल्याबद्दल काही नागरिकांनीही त्यांचे कान किटल्याची तक्रार केली.

हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा इथं, नायतर आग्रह नाही...

लेखक मंगेशपावसकर यांनी रविवार, 07/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लेखन आपल्या मित्रांना व खोलवाचकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मिसळपाव हे अतिशय सुंदर जाल आहे. पण मला वाटत कि काही माणस आपल्या संपादकीय अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत. नव्या लेखकांना काही चांगले शिकवून शहाणे करण्यापेक्षा त्यांचा बुडत्याचा पाय आणखी खोलात ढकलला जातोय. वर अरेरावी ची भाषा हि वापरली जात आहे. मी माझ्या मागील संपादित केलेल्या लेखनाचे एडीट केल्याचे कारण विचारले असता मला सरळ " हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा इथं, नायतर आग्रह नाही... तात्या." असे बजावण्यात आले. हि यांची भाषा !!

मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो................एवढंच

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 06/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या , माझा लेख वैयक्तिक टीका करत असेल तर कृपया फक्त त्यांचे नाव काढून टाकले असते तर बरे झाले असते, मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो. कधी कुणाचे अंधानुकरण करत नाही माझ्या लेखांवर माझे नाव घेऊन टीका करणार्यांवर तुम्ही काय कारवाई कराल ते मला जाणून घ्यायचे आहे असो मला माहित नव्हते कि मिपा वर नवीन व जुन्या खाते धारकांवर भेद-भाव केला जातो. आपले जाल म्हणून आपणास तटस्थ मानत आलो. घोर निराशा झाली या पुढे असली वादंगीत सदरे मिपावर आढळणार नाहीत याची खात्री बाळगावी. मंगेश पावसकर

समर्थांना पत्र

लेखक नाद्खुळा यांनी शुक्रवार, 05/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ओम नमो गजानना | आणि समर्था तुम्ही सुद्धा || ऐकुनी घ्या भगवंता | या पाप्या चे बोल || करू कशी सुरवात | नं कळे मला मनात || ना शिरता अति खोलात | करितो दहा श्लोकी शेवट || ऐकिला का ऐसा देश | सर्व धर्मांचा चालतो पाश || अभिमानाचा नाही लवलेश | लाज वाटते सांगाया || (समर्थांना हे सांगण्यास मला लाज वाटते..

माय मराठी

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 04/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राने दुसर्यांसाठी दार कायम उघडून दिली उपद्रवी लोण्ध्यानी मराठी मातीच बिघडून गेली धोतर लेन्ग्याची लाज वाटते आज मराठी माणसाला बर्गर चाच वास येतोय मराठमोळ्या कणसाला मराठी मातीतच खेळायचं असं म्हणत बसलो इथच सांगतो मित्रानो आपलं गणित फसलं अटके पार लावलेला झेंडा जरा आठवा टाच मारून याच मातीतून मराठी, गल्ली गल्लीत पोचवा शिवाजी राजे भोसले (चित्रपट) पाहून ३ तास का होईना मन पेटलं मराठी माणूस जागा झाल्याच क्षणभर तरी वाटलं कल्चर बदललं ,लावणी संपली ,पोवाद्याचाही पॉप झाला मराठीच्या मर्म वरती परसंस्कृतीचा आघात झाला द्या पुन्हा गर्जना SS , तोच मर्द मराठी ललकार दरी खोर्याच्या महाभूमिचे स्वप्

बघता बघता

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 04/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता दिवस सरतात ,लहानाचे मोठे होतो जीवनाच्या वाटेवर मग सुंदर एक क्षण येतो नवे पर्व ,नवी नाती सगळा नवं नवं असतं कुणीतरी अश्यावेळी सोबत हवं हवं असतं क्षितीजामागे सांजवेळी जग अगदी छान दिसतं स्वप्नातल्या राज्यात मग दोघांचं गाव दिसतं सूर मग जुळून येतात, स्वप्नवत होतो आभास हृदयाला दोघांच्या पुरतो एकच श्वास एका प्लेट मध्ये मग भेळ पुरी तिखट असतानाही गोड लागते ती जवळ असताना ,पाण्याविनाच तहान भागते ती च्या ती मध्ये मग माझ्यातला मी असतो तिच्यातल्या तिला पाहताना, माझा मीच हरवून बसतो
काव्यरस

' जाळीदार पान '

लेखक साईली यांनी बुधवार, 03/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार ज्योत पेटावी तश्या आठवणी हळुवार उजळू लागतात. आणि या उजळणाय्रा आठवणीत लाकडाचे शांतपणे पहुडलेले बाक उभे राहतात. सगळे कसे शिस्तंबद्ध लयीत मांडलेले असतात. आणि अचानक ते भरून जातात चिवचिवाट करणाय्रा पिल्लांनी. मग गोंगाटावर नियंत्रण करायला एक पट्टी वर्गात येते. साहजीकच ही पट्टी एकटी नसते. सर कींवा बाईरुपी माणसाच्या हातात ही पट्टी असते. या शिस्तीचा तेव्हा राग येत असे. पण शिस्तीला जिवनात फार महत्त्व आहे हे फार उशीरा ध्यानात येत. पद्धत चुकिची असेल कदाचित पण हेतू मात्र एकच शिस्तिचा. जन गण मन आणि भारत माझा देश आहे हे आपल्याशी तेव्हाच जुळले जातात.

राजमाची

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 03/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी २७ ला रात्री राजमाचीला जायचे ठरले व आम्ही चौघे रात्री १०.३० च्या लोकल ट्रेनने ११.४५ ला लोनावळ्यात उतरलो. तिथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आलो. पुण्याच्या दिशेने काही अंतर पुढेच एक पेट्रोल पंप लागतो. तिथून डावीकडे वळून गुरुकुल मागे टाकून आम्ही तुंगार्ली गावात आलो. तिथून पुढे दृतगती महामार्गाच्या खालून जात आम्ही डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. साधारण ४० मिनिटात रेल्वे स्टेशनपासून इथवर येता येते. डोंगर चढून आम्ही तुंगार्ली धरणाची भिंत उजवीकडे ठेवत पांगोळली गावात पोहोचलो. गाव संपताच एक घळ सुरु व्हायची. तो उतार संपला की थेट राजमाचीच मुख्य रस्ता लागायचा.