रामचंद्र पुरुषोत्तम जोशी
रुढ अर्थाने ही समीक्षा नाही. कारण समीक्षाकाराला चित्रपटाच्या तांत्रिक बाबींचीही माहिती असायला हवी. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून काय वाटले ते मांडण्याचा प्रयत्न करतो..
शक्यतो गोष्ट विस्ताराने न उलगडता लिहिली आहे. त्यामुळे , हे वाचूनही ज्यांना हा चित्रपट बघायचा असेल, त्यांनीही हे वाचायला हरकत नाही.
रामचंद्र पुरुषोत्तम जोशी, नांवाचा चित्रपट आला आहे असे कळल्यावर, तो जरा वेगळा, आशयघन असेल असे वाटले होते. म्हणून बघायला गेलो. रिकामे प्रेक्षागृह पाहून तर, हा नक्कीच अॅवॉर्ड जिंकणारा असावा असे वाटू लागले होते.
चित्रपट सुरु झाला तोच मुळी नरकाच्या दृष्याने!
मिसळपाव
आज बहुचर्चित आणि हाऊसफुल चाललेला दुनियादारी हा सिनेमा बघितला. हा चित्रपट आल्या आल्या बर्याच ब्लॉग्सवर आणि मराठी संस्थळांवर ह्या सिनेमाविषयीच्या उलट सुलट चर्चा वाचल्या होत्या. बर्याच निःसीम सुशि (सुहास शिरवळकर) प्रेमींना हा सिनेमा आवडला नाही आणि त्यांनी त्या विषयी भरभरून लिहिले. सिनेमात बदललेल्या कथा आणि पटकथेबद्दल त्यांनीअसंतोष व्यक्त करण्यासाठी रकानेच्या रकाने लिहिले होते.
मीही निःसीम ‘सुशि-भक्त’. माझी वाचक म्हणून सुरुवात सुशि-साहित्यानेच झाली.
याच वर्षात दादासाहेब फाळके या भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने पुरस्कृत झालेले हिंदी चित्रसृष्टीच्या गतकाळातील "सुप्रसिद्ध" खलनायक तसेच चरीत्रनायक प्राण सिखंड यांचे वृद्धापकाळाने आणि आजारापणाने निधन झाले आहे.
खलनायक पण ग्रेसफूल असू शकतो हे प्राण यांच्या भुमिका बघताना समजते... मधूमती, कश्मीर की कली, आदी अनेक चित्रपटातील त्यांच्या खलनायक असलेल्या भुमिका गाजल्या असल्या तरी त्यापेक्षा कसौटी आणि जंजीर मधली त्यांची दोन गाणीच अधिक आठवत आहेत...