Skip to main content

भाषा

बसचा प्रवचा, वैद्य सी.के. राजगुरू, मूळव्याध, वाक्यरचना वगैरे वगैरे..! :)

लेखक कॉमन मॅन यांनी शुक्रवार, 30/12/2011 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच शहरी बसने प्रवास करत होतो. बसच्या आतल्या बाजूने ज्या जाहिराती लावलेल्या असतात त्यापैकी एका जाहिरातीकडे आमचं लक्ष गेंलं. जाहिरातीतलं एक शीर्षकवजा वाक्य होतं - 'निष्णात वैद्य राजगुरू यांच्या मूळव्याधीसारख्या आजारावर उपाय उपलब्ध..' हे वाक्य वाचल्यावर आमचा थोडा घोटाळाच झाला. वाक्यरचना थोडी चुकीची वाटली. कारण ते वाक्य आम्ही असं वाचलं - 'निष्णात वैद्य सी. के. राजगुरू यांच्या मूळव्याधीसारख्या आजारावर उपाय..' म्हणजे खुद्द वैद्यबुवांनाच मूळव्याध झाली आहे आणि या जाहिरात्रीद्वारे कुणी आम्हाला त्यांच्या मूळव्यधीवर उपाय करण्याचे आवाहन करत आहे किंवा कसे?

मुला मुलींची नावे

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 18/12/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्‍यांचा ? अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही.

भाषण

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/12/2011 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली. भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर - येथे जरूर ऐका...

येळकोट येळकोट जय मल्हार!!

लेखक यकु यांनी मंगळवार, 06/12/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवडे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय. खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.

जालरंग प्रकाशनातर्फे आवाहन

लेखक पैसा यांनी बुधवार, 30/11/2011 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
(जालरंग प्रकाशनातर्फे हिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.) दिवाळी अंकानंतर आता आपल्याला वेध लागलेत हिवाळी अंकाचे. आपल्या जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष आहे. ह्या अंकासाठी आपले उत्तमोतम साहित्य पाठवावे असे आम्ही आपणास आवाहन करत आहोत... साहित्य कोणते असावे? साहित्याला विषयाचे/प्रकाराचे कोणतेही बंधन नाही ... राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/विनोदी/प्रवासवर्णन/चरित्र/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन/इत्यादि कोणत्याही विषयावरील लेखन चालेल..

क्रांतीतै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 28/11/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 25/11/2011 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी मराठी.नेटवर नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात, त्यातील एक लेखन स्पर्धा. मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि लेखन स्पर्धेत भाग घेऊन भाषा समृद्धीच्या प्रयत्नात आपला वाटा उचलावा ही विनंती. स्पर्धा १० डिसेंबर २०११ सकाळी १० वा.