Skip to main content

विरंगुळा

मला भावलेली कविता

लेखक mina यांनी बुधवार, 08/10/2008 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
अजूनही निळया जांभळ्या नदीला आंबेवनाची सावली भेट पहिलीवहिली अकल्पित भेट दुरस्थपणाची गर्भरेशमी क्षणाची सौदामिनीच्या बाणाची देवघेव. गुलबक्षीच्या फुलानी गजबजले कुपण वेचू लागला श्रावण मोरपिसे। ओल्या आभाळाच्या खाली इद्रचापाचे तुकडे तुझा करपाश पडे जीवनास. कधी रेताडीचे रस्ते कधी मोहरली बाग कधी प्रासादास आग कर्पुराच्या। सप्तसुरातुनी गेले माझ्या जीवनाचे गीत तुझ्या सारगीची तात साथ झाली. बर्फवाट शिशिराची आता पुढलिया देशी तुझ्या मिठीची असोशी अजूनही. -कवी कुसुमाग्रज
Taxonomy upgrade extras

विनोदी कथा : सळई, साई आणि बाजीगर बीरबल

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 08/10/2008 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: यात कुठल्याही घडलेल्या घटनेवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे. न्यूज चॅनेलवर खाली पट्ट्या सरकत असतात. त्यावर लिहिलेले असते- थोड्याच वेळात आपण बघणार : 'रॉड आणि गॉड' (सळई आणि साई)..... सळई नाही घेवू शकली जीव..... यमाची सळई, साई माघारी पळवी...... एका माणसाच्या डोक्यातून आरपार गेली सळई..... तो मृत्युला पळवी. ( एक प्रतिनिधी- "श्री आक्रमक बातमीदार" हातात माईक घेवून पळतच येतो.

भांगेचे प्रयोग आणि परिणाम

लेखक आगाऊ कार्टा यांनी रविवार, 05/10/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
हा मी जरा वेगळा विषय घेतला आहे. आत्तापर्यंत वाघ, साप, भूत असे गंभीर विषयांवर लिहिले. त्यामुळे सर्वांना भिती वाटू लागली.... भांग सर्वांना माहितच असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा प्रसाद म्हणून घेतली जाते. मी अजून भांग प्यायलेली नाही. पण या भांगेचे झाड असते आणि भांगेची गोळी दुधात उगाळून ते मिश्रण आटवलेल्या दुधात मिसळतात असे मी ऐकले आहे.... ही भांग म्हणे प्यायलाही खूप चांगली लागते. खरे खोटे प्यायलेल्यांना माहित.असो. तर मुख्य विषय असा की ही भांग जर प्रमाणाबाहेर प्यायली तर चढते... आणि चढली की मग बघायलाच नको... पण भांग चढणे आणि दारु चढणे यात फरक आहे.

मिपा कट्टा, पुणे.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी रविवार, 05/10/2008 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
होणार होणार म्हणता म्हणता काल दिनांक ४ ऑक्टोबर २००८ रोजी 'शांग्रीला हॉटेल', पुणे इथे मिपा कट्टा संपन्न झाला. विशेष म्हणजे ह्या कट्ट्याला वरूण राजांनीही आपली उपस्थिती देऊन आम्हा सर्वांना उपकृत केले. अर्थात, रहदारीचा गोंधळ आणि त्यातल्या त्यात पुण्याचा कट्टा म्हंटल्यावर सदस्य वेळेवर पोहोचू शकले नाहीत आणि बापुडवाण्या चेहर्‍याने बसलेल्या आयोजक, श्री. सखाराम्_गटणे ह्यांना सर्व मंडळी जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा मोठा प्रश्न पडला. पण लवकरच त्यांच्या जोडीला मी, अभिज्ञ, मनोबा वगैरेंनी येऊन मिपाच्या सुधारलेल्या दर्जाबद्दल एक उद्बोधक चर्चा आणि विचारांचे आदान प्रदान सुरू केले. प्रत्यक्ष उत्सवमुर्ती श्री.