Skip to main content

विरंगुळा

आणि सावकार स्वर्गात गेला....

लेखक आगाऊ कार्टा यांनी शनिवार, 18/10/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
फार वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक सावकार राहत होता. तो सावकार महाधूर्त, महाचतूर आणि मोठा डांबिस होता (पिवळा डांबिस नव्हे). गावातले लोक तसे गरीबच. त्यामुळे ते अडीनडीला सावकाराकडे पैसे मागायला येत असत. सावकार दामदुप्पटीने व्याज आकारुन पैसे देत असे. त्याची हिशेब करण्याची निराळीच तर्‍हा होती. कितिही पैसे दिले तरी सावकाराचे व्याज काही फिटत नसे. काही जणांनी त्याच्यावर पंचायतीत दावा लावून त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सावकार सगळ्यांचे बारसे जेवलेला होता. त्याच्या हिशेबाच्या वह्या आणि तो हिशेब पाहून भल्याभल्यांच्या मेंदूला झिणझिण्या येत.

जरा `वजन' ठेवा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 18/10/2008 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
सदू आणि दादू जानी दोस्त. कळायला लागलं, तेव्हापासून एका ग्लासातले. गावातले लोक तर त्यांना ढवळ्या-पवळ्याच म्हणायचे. सदू सातवीपर्यंत शिकला होता, तर दादूनं पहिलीनंतर शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं, एवढाच काय तो दोघांमधला फरक. सदू ग्रामपंचायतीत चिकटला, तर दादू मोलमजुरी करून रात्रीच्या दारूची सोय बघू लागला. घरदार वगैरे काही प्रश्न नव्हता; कारण दारूवर पैसे उडवल्यानंतर हाताशी फार काही राहत नव्हतं. सदूची नोकरी बऱ्यापैकी चालली होती. तो आणि त्याच्या चार भिंती, एवढाच संसार. खरं तर चार भिंतीसुद्धा नाहीत. एक ढासळलीच होती. पुढच्या पावसाळ्यात राहील की नाही, याची खात्री नव्हती.

नाट्यसंगीत

लेखक mina यांनी शुक्रवार, 17/10/2008 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
किती सांगुं तुला..... गीत-अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत-अण्णासाहेब किर्लोस्कर स्वर-बालगंधर्व नाटक-संगीत सौभद्र (१८८२) राग-आनंद भैरवी (मूळ संहिता) ताल-धुमाळी मिपाच्या या धोरणानुसार लेखन संपादित केले आहे... आणिबाणीचा शासनकर्ता.
Taxonomy upgrade extras

येस `बॉस'!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 16/10/2008 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या पटांगणाऐवजी एका बंद घरातल्या शाळेत त्या मुलांचा खेळ रंगला होता. खेळाचं नाव होतं - "महाराज म्हणतात...' खेळाचं स्वरूप साधारणपणे असं असतं ः एकानं राज्य घ्यायचं. तो होणार महाराज. मग त्यानं एकेकाला ऑर्डर सोडायच्या - महाराज म्हणतात, पाणी प्या. महाराज म्हणतात, खाली बसा. महाराज म्हणतात अमकं करा अन्‌ तमकं करा...! सगळ्यांनी त्या पाळायच्या जो पाळणार नाही, त्यानं बाहेर जायचं. इथे "महाराज'च्या ऐवजी त्याला "बॉस' म्हणत होते, एवढाच फरक... ही मुलं जरा मोठी होती. कुठल्या कुठल्या भागातून आलेली. काही वांड होती, काही आगाऊ, काही अतिउत्साही, काही खोडकर (नॉटी.). या शाळेत एक आधुनिक बाईसुद्धा होत्या.

भावंडांची गुप्त भाषा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 16/10/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा,आबा,दादा,कमाआते आणि आप्पा ह्या पांच भावंडांची एक गुप्त भाषा होती.लहान असतानाच त्या सर्वानी तयार केली होती.जशी एक "चकारी" भाषा आहे.ही चकारी भाषा बहुतेक सर्वांना माहित असावी. उदा. तुला माहीत आहे का? हे वरील "चकारी"भाषेत म्हटलं जाणार "चलातू चहीतमा चहेआ चका?" मला तू सांगू नकोस "चलाम चतू चंगूसा चकोसन" काल त्याच्या आईला पाहिलं "चलका चच्यात्या चईलाआ चहिलंपा" अशाच प्रकारची पण थोडी वेगळी भाषा होती.आणि ही भाषा त्यानी त्यांच्या आईला आणि वडिल- नानांना- कळू नये आणि आप आपसात खाजगीत बोलायला मिळावं, म्हणून तयार केली होती. एकदा काय झालं अण्णा आणि दादा सावंतवाडीहून वेंगुर्ल्याला आप्पांच्याच"सावंतव

बिघडलिये मान

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 16/10/2008 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
बिघडलिये मान तरुण मुलींसमोर लटलटते वाढलेल्या वयाला नाकाराते हिरवटपणाला कंपवात चांगली साथ देतो असाच एक त्रिवेणीचा प्रयत्न ! कसा वाटला... -- लिखाळ
Taxonomy upgrade extras

(भलताच जाच!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 15/10/2008 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
अज्जुका यांची 'बिघडलीये काच' बघून अचानक आम्हाला कवितेच्या दोन-दोन प्रतिमा दिसायला लागल्या आणि मग दुसरी प्रतिमा टंकण्याखेरीज प्रत्यवाय उरला नाही!

म्हणे कोण मागे आले...

लेखक आगाऊ कार्टा यांनी बुधवार, 15/10/2008 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
जोशी मास्तर हे गावातले एक बुजुर्ग आणि सदा हसतमुख व्यक्तीमत्व. आता मास्तर म्हणायाला ते काही शाळेवर शिक्षक नव्हते काही. ते होते गावातल्या पोस्टात पोस्टमास्तर. हजार बाराशे वस्तीचं ते छोटसं गाव त्यामुळे जवळजवळ प्रत्येकाशी मास्तरांचा नित्यनेमाने संबंध येत असे. कोणालाही चटकन मदत करण्याचा त्यांचा स्वभाव, त्यामुळे गावात त्यांना खूप मान होता. मास्तर नोकरीला लागले ते याच गावात. पत्नी आणि दोन मुले हा त्यांचा संसार. मुले गावातच लहानाची मोठी झाली आणि उत्तम पदवीधर होऊन बाहेर मोठ्या शहरात नोकरीला गेली. दोन चांगल्या सुस्वरुप आणि मुख्य म्हणजे सुस्वभावी मुली बघून मास्तरांनी दोघाही मुलांची लग्ने लावून दिली.

कुणाची गं तू?

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 13/10/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंगावर फाटक्‍या तुटक्‍या कपड्यांनिशी मुंबई स्वर्गाच्या दारात उभी होती. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, वसंत बापट प्रभृतींची भेट तिला घ्यायची होती. चित्रगुप्तानं बऱ्याच रखडंपट्टीनंतर मुंबईला आत प्रवेश दिला. एसेम, अत्रे, बापटांसह संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांसमोर मुंबई जाऊन उभी ठाकली. सगळ्या नेत्यांना थोडंसं आश्‍चर्य वाटलं, पण त्यांना हे फार अनपेक्षित नव्हतं. कधी ना कधी मुंबई आपल्याकडेच गाऱ्हाणं घेऊन येणार, याची त्यांना खात्री होती. मुंबईच्या या अनपेक्षित आगमनानं सगळे नेते किंचित चिंतेत पडले. "गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाही, एवढी दुरवस्था मुंबईची झाली आहे.