Skip to main content

विरंगुळा

चित्रपटांची व सिरियल्सची गमतीदार शिर्षके!!!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 17/03/2010 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
(यात कुणालाही, कशालाही दुखावण्याचा हेतू नाही. फक्त मनोरंजन आणि विनोदनिर्मितीसाठी मी हे लिहिले आहे.) आपल्या मराठी चित्रपटांचे पूर्वी सासू-सून-नणंद-भावजय-कुंकू याप्रकारचेच कथानक असायचे. नावेही तशीच असायची. मला तशी काही नावे सुचत आहेत. आणि जर हिंदी चित्रपटांप्रमाणे काही नावांच्या पुढे अर्थदर्शक शब्द किंवा वाक्य टाकले तर कशी गंमत येईल ते मी खाली देत आहे.

माझी हॉस्पीटल भरती

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 17/03/2010 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मला अचानक भोवळ आली. कदाचित बजेट सेशन लाईव्ह पाहील्यामुळे असेल किंवा राहुल महाजन च स्वयंवर (त्याच स्वयंवर आणि त्याच्या भावी वधूचा स्वयंवध) पाहील्यामूळे असेल. पण आली खरी. सौ ने घाबरून लगेच फॅमीली डॉक्टरला फोन केला आणि सरळ हास्पीटलचा रस्ता धरला. तळमजल्यावरच्या दोन वॉर्डबॉयनी विड्या फुंकून झाल्यावर " पेशंट कोणाय?" अशी पॄच्छा केली. त्यांचीही चुक नाही म्हणा. कारण मी तसा थोडासा (बरचसा इती सौ) गुटगुटीत आहे खरा. सौ ने माझ्याकडे अंगुली निर्देश केल्यावर त्या दोघांनी सरळ 'कबड्डी कबड्डी' करत माझी गचांडी धरली आणि स्ट्रेचरवर मला उताणा केला.

संतू..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 15/03/2010 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
"आत्त्या.. मी काय कराय णाई..! भांडी आपोआप खाली पडल्यात.." हे असलं बोलणं म्हणजे नक्कीच संतू. कराय णाई, बगाय णाई, दिसाय णाई.. अशी क्रियापदांची धिरडी हा संतूच करू जाणे.. संतू!! खरं नाव चंद्रकांत ढवणे(ढवने). याची मोठी बहीण माझ्या मामाकडे कामाला होती. मामाकडेच लहानपणापासून राहिलेली तिथेच वाढलेली. आमचं बिर्‍हाड जेव्हा इचलकरंजीहून कोल्हापूरला हललं तेव्हा माझ्या आईच्या मागे लागून हीने याला आमच्यासोबत कोल्हापूरला पाठवून दिला. "तुमच्या घरी कामाल राहुदे.. तिथे काहीतरी शिकेल आणि र्‍हाईल.." असं म्हणून तिने त्याला आमच्यासोबत पाठवून दिलं.

प्राचीन साहित्यातील वसंतोत्सव

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 15/03/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरु, फुललेले पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकिळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून! कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच! होळी, वसंतपंचमी व शिवरात्री हे तिन्ही उत्सव ह्याच काळात येतात. आपले पूर्वज हा वसंत ऋतूचा उत्सव कसा साजरा करायचे ह्याचीही अतिशय रोचक वर्णने प्राचीन साहित्यात वाचायला मिळतात. पौराणिक कथांच्या अनुसारे वसंत हा कामदेवाचा पुत्र!

खतरनाक पीजे

लेखक नाम्या झंगाट यांनी सोमवार, 15/03/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर....... एक विरंगुळा म्हणून काही खतरनाक पीजे ...... १. प्यार म्हणजे काय................????? २. रवीवार सोमवार पेक्षा जास्त strong का? ३. असे काय की जे राम करु शकतो पण रावण नाही आणि रावण करु शकतो पण राम नाही??? ४. "क्युं की सास भी कभी बहु थी"मधील "बा" का मरत नाही..... आजसाठी इतकेच...बाकी उद्या.................. : : : : : : : : : : : : : : : : : : : : : : उत्तर :- १. काही मित्र बार मधे बसलेले असतात आणि दुस-या मित्राला म्हणतात.... .................................................. पि....यार ....!

जरा डोकं चालवा

लेखक सुनिल पाटकर यांनी रविवार, 14/03/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
डोकं चालवा अमर,अकबर,अँन्थनी हे तीन मित्र जंगल भटकंतीसाठी निघाले.अमरच्या आईने तिघांसाठी वाटेत खाण्याकरीता लाडू दिले. लाडू खातेवेळी त्याचे तीन समान भाग करून खा अशी स्पष्ट ताकीदही तीने सर्वांना दिली. अमर,अकबर,अँन्थनी जंगल भटकंती करत करत एका झाडाच्या सावलीत थांबले. गप्पा मारता मारता त्यांना झोप लागली.अमरला झोपेतून जाग आली तेव्हा त्याला खूप भूक लागली होती.त्यांने लाडूचा डबा उघडला .डबा उघडतांना त्याला आईचे शब्द आठवले ‘तीन समान भाग करून खा ‘ त्याने डब्यातील लाडवांचे तीन समान भाग केले.आपला वाटा खाऊन टाकला.

या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन...

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 13/03/2010 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन...
नाडीग्रंथांतील अदभूतता मला सागराच्या धीरगंभीर अथांगपणाच्या, हिमालयाच्या उत्तुंगतेच्या, अमरनाथ गुहेतील रात्रीच्या काळोख्याच्या, खोल दरीत आणखी पुढे जाऊन डोकावताना थरारण्याच्या इंद्रधनुच्या अदृष्य रंगबहाराच्या अनुभूतीप्रमाणे खुणावते.
मालकंसाची लकेर हवेत विरते आहे. संतूरवर शिवरंजनी शहारे आणणारे तरंग धुंद करतेय. बासरीच्या मधुर स्वरांनी वसंत बहारला आहे.

अढळपद

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शुक्रवार, 12/03/2010 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
************* अढळपद ************ 'अहो, जरा माझी धापेची गोळी आणि पाणी देता काय?' हाक ऐकू आली आणि शांताबाई तंद्रीतून जाग्या झाल्या. 'आले, हं' त्या म्हणाल्या आणि लगबगीने सावरून उठून बसल्या. नाकाच्या शेंड्यापर्यंत ओघळलेला चश्मा त्यानी व्यवस्थीत डोळ्यावर सरकवला. मांडीवरचं पुस्तक त्यानी बाजूला ठेवलं. पाणी आणि गोळी घेऊन त्या शामरावांच्या जवळ गेल्या. आलेली खोकल्याची उबळ तशीच दाबून शामरावानी गोळी घेतली. धापेचा पंप तोंडात धरून त्याचे दोन स्प्रे घेतले. थोडं बरं वाटताच हाश हुश करत ते म्हणाले, ' काय करत होता आत?' 'गोष्टी वाचत बसले होते. रात्री सायली जेवणापूर्वी गोष्टीचा हट्ट धरणारच.