मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विचार

'मी'पणाच्या वर्तुळाभोवती

चंद्रकांत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत.

गुरुजींचे पालकांना पत्र

भम्पक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय पालक, सगळीच मुलं पुढे जाऊन डॉकटर, इंजिनिअर बनत नाहीत.प्रत्येकाच्या वकुबाने प्रत्येक जण तसा बनतो.आणि हो डॉकटर,इंजिनिअर बनणे हे काही यशस्वीतेचा मापदंड नाही.कळेल पुढे पोरांना.पण त्यांना चांगला माणूस घडवूया आपण.आम्ही तर आहोतच,परंतु तो तुमचे अनुकरण करणार आहे त्यामुळे तुम्ही सावध असा.या चार भिंतीत आम्ही जगाचे शिक्षण देऊच त्याला,परंतु तुमचा सहभाग हा त्यात सिंहाचा वाटा असेल. हा समाज प्रत्येक घटकाचा बनलेला आहे, प्रत्येक घटक हा त्याच्या उपयुक्तते प्रमाणे महत्वाचा आहे.म्हणजे अगदी खालच्या पातळीवरचाही मनुष्य तेवढाच महत्वाचा आहे जेवढा वरिष्ठ पातळी वरचा.आपण हे त्याला बिंबवूया.म्हणजे तो प्रत्येकाचा आदर

कूरबूर / (भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर

सतीश रावले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
2 .. (भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर - कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती - Mental State of being gracious to act! ..................................................................... [लेखाचं उद्दीश्ट: अवलोकन: वीवीध वळणं घेत मूख्य उद्दीश्टा पर्यन्त पोहचणार्‍या ऊर्जेची तर्‍हा टप्पे : अनूवे

विवेक हरवलेलं विश्व

चंद्रकांत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर. रंग येथून तेथून सगळीकडे सारखे असले, तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या असतात.

हायवे-रनवे

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाईदलाची विमाने उतरवता यावीत या दृष्टीने देशाच्या विविध भागांमधील राष्ट्रीय महामार्ग घडवले जात आहेत. त्यामध्ये महामार्गांचा काही भाग हवाईदलाच्या गरजांनुसार विकसित करून त्याचा वापर धावपट्टीप्रमाणे करण्यात येत आहे. राजस्थानातील बाडमेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 925 ए वरील सत्ता आणि गंधव या गावांदरम्यानच्या 3 किलोमीटरच्या पट्ट्यात विकसित करण्यात आलेल्या महामार्गावरील धावपट्टीचे 9 सप्टेंबर 2021 ला उद्घाटन झाले.

(भाग पहीला) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर

सतीश रावले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(भाग पहीला) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर - Mental State of being gracious to act! ............................................................................ मराठी भाशेत Gratitude ह्या शब्दाचा अर्थ कृतद्न्यता व Gracious ह्या शब्दाचा अर्थ दयाळू, कृपाळू असा परम्परेने शीकवीला जात असतो. हे दोनही मराठी भाशेतील अर्थ हे एका याचक मनोवृत्तीतून जन्मलेल्या समजूतीतून आकळलेले आहेत. कारण, इन्ग्रजी भाशेत Gratitude हा शब्द एक Great Attitude म्हणजे ‘जाणीवेचा वरचा थर’ व्यक्त करण्यासाठी आहे.

काळाचे खेळ

चंद्रकांत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो. त्याचे काही कंगोरे असतात, काही कोपरे. त्याच्या असण्यानसण्याला काही आयाम असतात. काही अर्थ असतात, तसे अनर्थही. विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने दरीत झेपावणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत.

बातमी : “महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का?” परप्रांतीयांबाबत चंद्रकांत पाटलांचा सवाल

सतीश रावले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एखाद्या देशाची घटणा, सउवीधान म्हणजे त्या देशातील लोकान्च्या अनूभवातून मीळालेले, बूद्धीच्या आकलानाद्वारे फळधारणा झालेले, ​शब्दरूपातून प्रकट झालेले, ठरावीक काळातील शहाणपण असते. . काळ जसा पूढे सरकत नवनवे अनूभव देत जातो तसतसे मानवी अनूभव बदलत जात असतात.

सण आणि आपण

नीलकंठ देशमुख ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गौरी/ महालक्ष्मी चा सण येताहेत.. महाराष्ट्रात याचे फार महत्त्व.स्त्रीयांसाठी विशेष. हा एक प्रकारचा कुलाचार, कुलधर्म. तीन दिवसाचा. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरी/महालक्ष्मी चे आगमन व प्रतिष्ठापना असते.दुसरेदिवशी मुख्य पूजा व महा नैवेद्य .तिसरे व शेवटचे दिवशी निर्गमन. पुन्हा पुढील वर्षी येण्यासाठी. भारतीय संस्कृती मधे बहुतेक सणामागील हेतू मानवाचे निसर्गाशी असलेले नाते दृढ व्हावे,त्याची कृपा सदैव आपल्या वर राहावी,'त्याच्या' प्रति कृतज्ञता व्यक्त करावी हाच आहे असे म्हटले जाते.