Skip to main content

विचार

वामकुक्षी की जाम कुक्षी?

लेखक Sumant Juvekar यांनी गुरुवार, 27/05/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या दुपारी झोपावे की जागे राहावे हा प्रश्न आम्हाला करोना पर्वात रोज पडत आहे. या निशा सर्व भूतानां तस्याम् जागर्ति संयमी! असे भगवंत गीतेच्या कुठच्याश्या अध्यायात कुठल्या तरी श्लोकात म्हणतात. (येथे त्या अध्यायाचा आणि श्लोकाचा क्रमांक शोधून काढून तो येथे लिहून, आम्हाला भगवद्गीतेचे किती सखोल ज्ञान आहे हे वाचकांना वरवर दाखवून छाप पाडण्याचा मोह होत होता. परंतु आम्ही पडलो कमालीचे विनम्र आणि प्रामाणिक! त्यामुळे तसे केले नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी! लोभ असावा!!) जेव्हा सामान्य भूत मात्रांची रात्र असते (आणि ते झोपलेले असतात) तेव्हा संयमी जागा असतो असा त्याचा भावार्थ आहे.

कोरोनाच्या बातम्यांचा गोळीबार

लेखक chittmanthan.OOO यांनी सोमवार, 24/05/2021 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच बातम्या बघायला टीव्ही लावला तेवढ्यात ब्रेकिंग न्यूज आलीच, पिवळ्या बुरशीचा पहिला पेशंट सापडला. आता बुरशी पण मॅचिंग मधेच यायला लागल्या. काळी झाली पांढरी झाली आज पिवळी सापडली आणि एक 4 नवीन रंगात आली म्हणजे चांगला सप्तरंगी घोडा लागतोय माणसाला. ती काळी बुरशी डोळ्यावर मेंदूवर परिणाम करत्या पांढरी बाकीच 3-4 अवयव धरत्या आधीच कोरोना मूळ लोकांची गांड फाटल्या. सांगायला एक अवयव सुरक्षित नाही.निस्ता गोळीबार झालाय बघा. चॅनेल वाल्यांची तर पार स्पर्धा सुरू असत्या तू मोठा साप सोडतो का मी मोठा साप सोडतो.

कावळ्याची फिर्याद

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 21/05/2021 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
सद्दपरीस्थीतीत एकमेकाची भेट तर होऊ शकत नाही म्हणून अधुन मधून एकमेकाची मोबाईल, टेलिफोन विचारपुस करणे हा अलिखित नियमच झालाय. आजच गावाकडं मावशीला फोन लावला, सर्वसाधारण इकडची तीकडची विचारपुस झाल्यावर विषय करोनाच्या महामारी कडे वळाला. बोलता बोलता मावशी म्हणाली आज आपल्या गावात २१ दशक्रिया विधी आहेत, आमक्या तमक्याचा नंबर आकरावा आहे, दुपारी अडीच ची वेळ मीळाली. हल्ली विधी करण्यासाठी माणसं पण मीळत नाहीत. विषयाला गंभीर वळण लागतय पाहून विषय बदलला, म्हटंल काळजी घ्या वगैरे वगैरे बोलून फोन ठेवला. दुपारचा दिड वाजत होता, सौभाग्यवती म्हणाल्या स्वयंपाक झालाय जेवून घ्या.

श्री अमृतानुभव अध्याय चौथा- ज्ञानाज्ञानभेदकथन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 19/05/2021 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें । नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवीं ॥ ४-१ ॥ जागृती , जागेपणा म्हणजे काय ? झोप नसणे म्हणजेच जागेपणा . निद्रेचा अभाव हीच जागृती ! कित्त्ती सोप्पं आहे हे समजायला . तसेच अज्ञानाचा अभाव हेच ज्ञान ! Absence of delusions is the enlightenment. आता आपण आरशात पहातो तेव्हा आपल्याला आपल्या मुखाचे प्रतिबिंब दिसत असते , मुख दिसत नसते , पण तरीही आपल्याला आपले मुख दिसल्याचा आनंद होत असतो. तसेच ज्ञानाने आपल्याला आपले स्वरुप कळते हे म्हणणे आहे. म्हणजे मुळात आपले स्वरुप इतके शुध्द आहे कि तिथे ज्ञान अज्ञान ही भानगडच नाही.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ६

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 18/05/2021 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी बालपणा पासुन अय्यप्पां चे कार्यक्रम मी पाहत आलो आहे... त्यांची पुजा-अर्चना, उभ्या मांडणीने केलेल्या दिव्यांची आरास आणि समई आणि त्याच्या भवती असलेली फुलांची आरास फारच सुंदर दिसते. पुरुष मंडळी संपूर्ण काळ्या कपड्यात त्यांच्या ठराविक काळात राहतात.

कौतुकाची थाप!

लेखक ॠचा यांनी सोमवार, 17/05/2021 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
आपण करत असलेल्या कामाचे किंवा जोपासत असलेल्या छंदाचे जर कुणी थोडेसे जरी कौतुक केले तरी किती छान वाटते नाही!! एकदम एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला आणि आपल्यात देखील निर्माण होते!! आपल्याला कामाच्या ठिकाणी देखील बढती/पगारवाढ/बोनस यांपैकी कुठल्या ना कुठल्या स्वरुपात आपल्याला कौतुकाची थाप किती हवीशी वाटते किनही... तसंच आपण घरात, कलाकुसरीच्या एखाद्या गोष्टीत जे काही करतो त्यासाठी देखील ती कौतुकाची थाप तितकीच महत्वाची असते, नाही का!!

मन आणि मांस

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 15/05/2021 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मनाला मांस असते का? आपल्या सगळ्याच अवयवांत मग अगदी मेंदूपासून ते पायाच्या करंगळी पर्यंत मांस असते. आणि मन, ते कशाचे बनलेले असावे? कुठे पडला, ठेच लागली, वार झाला की माणूस जखमी होतो. थोडक्यात आपल्या मांसाला धक्का लागतो. कधी एखादा लचकाही तुटतो. पुढे जखम भरते म्हणजे गमावलेले किंवा बिघडलेले मांस पूर्ववत होते. जखमा मनालाही होतात असं ऐकलंय मी. अनुभवलं सुद्धा! मग तेव्हा कोणत्या मांसाला धक्का लागतो आणि मन जखमी होते? जखमी व्हायचं असेल तर मांस असणे आवश्यक आहे. म्हणजेच मनाला मांस आहे. आपल्यात नाही एवढेच. आपल्या प्रियजनांच्या जखमांनी आपल्या ही मनाला वेदना का व्हाव्यात?

तर...

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 11/05/2021 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
मळभ हटले की सूर्य सापडतोच असं नाही. तोवर रात्रही झालेली असू शकते. प्रकाश वाट्याला आला की तो मनाप्रमाणे नसतो उधळायचा. आपलं मन म्हणजे खोल गुहा- उभी की आडवी ते नाही माहीत. कदाचित दोन्हींच मिश्रण असावं. त्यामुळेच तर कधी खूप खोलात गेल्यासारखं वाटतं तर कधी खूप मागे. कुठून आणायचा मग इतका सारा प्रकाश, स्वत:चं मन पादाक्रांत करायला? बरं गुहेचं हे भारी असतं नाही- बाहेरून कितीही आग लागू देत, आतला अंधार अचल, अविरत आणि जवळपास अजिंक्य! म्हणून सूर्य माथ्यावर असला की डोक्यात अंधारात चाचपडायचं बळ आणि अनुभव दोन्ही गोळा करावा. ज्यांनी वचन दिलं नाही त्यांना गृहीत का धरावं? उद्या पृथ्वी फिरलीच नाही तर...

फॅक्टर इन्व्हेस्टिंग ... गुंतवणुकीचा एक वेगळा मार्ग

लेखक अमर विश्वास यांनी शनिवार, 08/05/2021 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो ... म्युच्युअल फंडावर लिहिताना मला १२ वर्षांचा अनुभव होता. फॅक्टर इन्व्हेस्टिंग ही माझ्यासाठी सुरुवात आहे. त्यामुळे हे "संकल्पना" (Concept) य स्वरूपात आहे. मिपा वरच्या तज्ञ आणि अनुभवी लोकांचे प्रतिसाद मला या स्ट्रॅटेजी मध्ये मदत करतील म्हणूनच हा लेखनप्रपंच _____________________________________________________________________________________________________________________________ सुरुवात ......

प्रेमचंदचे फाटके जोडे (व्यंग्य): हरिशंकर परसाई

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 06/05/2021 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire प्रेमचंदचे फाटके जोडे प्रेमचंदचे एक चित्र माझ्यासमोर आहे. म्हणजे एक छायाचित्र. त्यांनी पत्नीसमवेत आपले छायाचित्र काढलेले दिसतंय. डोक्यावर जाड्याभरड्या कापडाची टोपी, अंगावर एक कुडता आहे आणि खाली धोतर.