मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विचार

वार्तालाप : (३) नमस्कार करण्याचे फायदे

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात: नमस्कारास वेचावें नलगे नमस्कारास कष्टावें नलगे नमस्कारास कांहींच नलगे उपकरण सामग्री. (४/६/२२) आपल्या देशात आज ही खेडे गावांत रस्त्यातून येता जाता अनोळखी माणसाला ही लोक स्मित करून ,राम-राम, जय रामजी की म्हणतात नमस्कार करतात. आपण ही आई, वडील, गुरुजन आणि वरिष्ठांना नमस्कार करतो. पण समर्थ म्हणतात लहान मोठे अनोळखी सर्वांनाच नमस्कार केल्याने आपले काहीच जात नाही. ज्या गोष्टीसाठी पै ही लागत नाही ती करण्यात कंजूषी कारायची गरज नाही.

आजीचे बोल--फार अनमोल!!

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी!! माझी आजी(आईची आई) कोकणातील देवरुखजवळच्या एका खेड्यातली होती. तिच्या लहानपणीच तिची आई वारली आणि सगळ्या भावंडात आजी मोठी असल्याने लहान वयातच तिच्यावर स्वयंपाक करण्यापासुन, सगळी घरकामे ,भावंडांचे करणे वगैरे जबाबदारी आली. वडील शाळामास्तर होते, त्यांनी मुलांना चांगले शिकवले, पण मुलींना त्या मानाने कमी शिकवले, कदाचित तो काळच तसा होता(१९२०-३०). पुढे आजी लग्न झाल्यावर ठाण्याला रहायला आली, पण २ मुली झाल्यावर वयाच्या ३० व्या वर्षी तिचा नवरा जलोदराने गेला.( म्हणजे काय नक्की माहित नाही).

ही माहीती कशी शोधावी?

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपण कधी कधी एक प्रकारची माहीती शोधत असतो. जसे की मला तांदुळ विकत घ्यायचे आहेत.म्हणुन तांदुळ विकणारे कोण हे शोधायला गेलो कि लगेच मिळतात जे तांदुळ सप्लाय करतात. पाहीजे तेवढ्या प्रमाणात तांदुळ विकत घेता येतात. ह्यांना आपण सप्लायर बोलुया. हे स्त्रोत आहेत 'सप्लाय' चे. ह्यांचा शोध घेणे काही कठीण नाही. एक मागितले की दहा मिळतात. पण जेव्हा कधी आपण तांदुळ विकायचे आहेत, म्हणुन तांदुळ विकत घेणा-यांचा शोध घेतो. तेव्हा ते मिळत नाहीत. आता शोधयचे आहेत जे तांदुळ विकत घेणारे म्हणजे बायर्स आहेत. ह्यांना आपण 'बायर्स' बोलुया. हे स्त्रोत आहेत 'डीमांड' चे. ह्यांचा शोध घेणे कठीण आहे.

स्थलांतरण - आताचे आणि पूर्वीचे

शेखर काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना उपयोजक यांनी काही दिवसांपूर्वी भारताच्या तुलनेत हा लेख लिहून विचाराला बरीच चालना दिली. त्यावर प्रतिक्रियांचा आणि विचारांचा बराच उहापोह झाला. सगळ्याच प्रतिक्रिया चांगल्या आहेतच. सगळ्यांनीच आपल्या मनातील विचार मांडले. माझे विचार जरा वेगळे आहेत. आपण सगळेच आपापल्या परीने आपले जीवन, जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला हवे ते काम, आवडणारे काम करण्याचा विचार करतो आणि अर्थार्जनाचाही विचार बराच वरचा असतो. स्थलांतरण स्थलांतरण किंवा इमिग्रेशन हे आजच होते आहे का?

परदेशस्थ भारतीय

पराग१२२६३ ·
लोगो इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

समर्थ रामदास: श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जय जय रघुवीर समर्थ (श्री समर्थ सेवा मंडळाद्वारा संचालित श्री सार्थ दासबोधाचे निरूपण कार्यक्रमात, देशभरात श्री दासबोधाचे निरुपणाचे कार्यक्र्म सुरू आहे. जानेवारी 2023 महिन्यात दिल्ली केंद्राला पाच रविवारी हा कार्यक्र्म सादर कारण्याचा मान मिळाला. पहिल्या रविवारी मला श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण करण्याचे दायित्व मिळाले. दिल्ली केंद्राचे दायित्व निर्वाह करणार्‍या डॉक्टर मंगला कवठेकर यांच्या मार्गदर्शनाची मोलाची मदत झाली. हा कार्यक्र्म 1 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 4 ते 5 ऑन लाइन झाला. पुढील कार्यक्रम ही रविवारी याच वेळी होतील). श्री समर्थ व्यवस्थापन या विषयाचे आद्य गुरु होते.

संस्कार

ज्ञाना ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
संस्कार म्हणजे काय? मूल संस्कारी आहे म्हणजे मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्या वेळोवेळी पाया पडणे, चांगला अभ्यास व देवधर्म या सवयी तिला किंवा त्याला आहेत असं म्हणायचे. हल्लीच्या काळात हे निकष थोडे वेगळे आणी कालानुसार आधुनिक असतील पण गर्भितार्थ तोच. एखाद्या व्यसनाधीन वा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर वाईट संस्कार झाले आहेत असं मानलं जातं. खरं तर संस्कार हे दुसरे तिसरं काही नसून लहानपणी तुमच्या मन:पटलावर कोरल्या गेलेल्या आठवणी असतात.

गळ्याशपथ.

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जगात असा एकही माणूस नसेल की ज्यानं आयुष्यात कधी शपथ घेतली नाही. आपलं म्हणणं खरं असो वा खोटं ते निक्षून, ठासून सांगण्यासाठी लोक शपथ घेतात. कोर्टात धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेतात आणि खरं किंवा खोटं बोलतात. काहीजण खोटी साक्ष देण्याचा पैसे घेऊन धंदाही करतात. प्रत्यक्षात गुन्हा घडताना पाहिल्याचं शपथेवर सांगतात. माॅडर्न मुलं "शपथ" न म्हणता "आय स्वेयर"म्हणतील पण शपथ घेतीलच. तर खेडवळ माणूस "आईच्यान सांगतो" असं म्हणत शपथ घेईल. लहानपणी आम्ही वर्गातल्या आणि खेळातल्या मुली खूप शपथा घ्यायचो. पहिली "गळ्याची शपथ". तीवर विश्वास बसला नाही तर "देवाची शपथ", मग "रक्ताची शपथ".

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना ✪ कृतज्ञता! ✪ निसर्ग तीर्थयात्रा ✪ तयारी व नियोजन ✪ भारत विकास संगम आणि इतर अनेक संस्था ✪ वेंगुर्ला राईड- सागरा प्राण तळमळला! ✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे! ✪ निसर्गाने प्रत्येकाला क्षमता दिली आहे ✪ कुडाळ आणि कराची! सर्वांना नमस्कार. मानसिक आरोग्य जागरूकतेसंदर्भात संवाद हा विषय घेऊन महाराष्ट्रातल्या कुडाळवरून गोवा- बेळगांव- बागलकोट- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर असा साधारण १४५० किलोमीटरचा १८ दिवसांचा सायकल प्रवास नुकताच केला. वाटेमध्ये खूप सुंदर अनुभव मिळाले.

काही विस्कळीत जुन्या नोंदी

जिन्क्स ·
लेखनप्रकार
Mandir माझ्या लहानपणीच्या घरा/अंगणाबद्दलच्या काही आठवणी. १. अंगणाच्या नैऋत्येला सूर्यास्तेकडे झुकलेला मोठा गुलमोहर होता. एवढे देखणे झाड पुढे आयुष्यात कधी पाहिले नाही. पूर्ण वाढीचा हा गुलमोहर एका सतेज कांतीच्या रुबाबदार पुरुषासारखा वाटायचा. ऐन रखरखलेल्या उन्हाळ्यात जेंव्हा इतर झाडे कोमेजून जायची तेंव्हा हा गुलमोहर तांबडी फुलें अंगावर फुलवून रुबाबात उभा असायचा. हा म्हशींच्या गोठ्याच्या मागे होता म्हणून रोजच्या वावरात तो दिसत नसे.