Skip to main content

विचार

अबोलीच्या निमीत्ताने...

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 19/04/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, अबोली नावाचा नवा विभाग मिपावर सुरू करायचे ठरले. पाडव्याला याची घोषणा झाली. आता एवढ्यात हा विभाग सुरू होईल. अपेक्षेप्रमाणे मिपावर याबाबतीत उलटसुलट चर्चा सुरू झाली. मिपावर काही एक नवीन होतंय तर त्यावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत. काहींना हा विभाग आवडला तर काहींना अजिबात नाही आवडला. काहींनी आपला संबंधच नाही त्यामुळे कोरड्या शुभकामना दिल्यात तर काहींनी विभाग कधी सुरू होतो अशी चौकशीसुध्दा केली. मात्र काही लोकांच्या प्रतिक्रिया जरा मर्यादा सोडलेल्या वाटल्या त्याचे वाईट वाटले. आता त्याचे कारण काय? याच्या खोलात जायला नको. मात्र तरीही काही विचार या निमीत्ताने मांडायचे आहेत.

पुरुष विभाग - धागा क्र. २ --- ह्या बायका अशाच वागतात का हो?

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 19/04/2013 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांनी एक शाळेतला मित्र भेटला.नंतर काही दिवसांनी जवळ-जवळ रोजच गाठ-भेट पडत गेली.एक दिवस म्हणाला, "सध्या भाड्याच्या घरात रहात आहे.स्वतःचे घर घ्यावे अशा विचारात आहे.एक जरा ४-५ लाख कमी पडत आहेत.मदत मिळाली तर बरे पडेल." मी म्हणालो, बघतो, काही सोय होत असेल तर. आता माझे सगळे आर्थिक व्यवहार बायकोच्याच ताब्यात.(हे असे करायचे एक कारण आहे. ते कारण नंतर पुन्हा कधीतरी. एक लेख लिहावा लागेल.) पैसे माझे पण जमा मात्र बायकोच्या खात्यात.(माझ्याच बायकोच्या बरे!! उगाच नसत्या शंका, कुशंका काढत बसू नका.)मग हळूच तिचे पास-बूक बघितले.त्यात ७ लाख होते.

घर पहावे बांधून .. - १

लेखक स्पा यांनी बुधवार, 17/04/2013 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दीने भरून सांडणाऱ्या स्टेशन मधून ती कशीबशी बाहेर पडली, आणि तीच तिलाच हायसं वाटलं. हातातली पिशवी सावरत ती एका कडेला सावलीत उभी राहिली, पिशवीतून पाण्याची बाटली काढून अर्धी संपवल्यावरच तिच्या जीवात जीव आला. रुमालाने चेहरा सारखा करत तिने आईला फोन करून सुखरूप उतरल्याचे सांगितले. पण अजूनही प्रवास संपलेला नव्हता, एक महत्वाचा टप्पा पार पडला एवढेच,प्रचंड गर्दीनेच ती दडपून गेलेली होती, उन्हाळा मी म्हणत होता. उन्हाच्या झळांनी हैराण होऊन तिने ओढणी तोंडावर बांधून घेतली .हातातला पत्ता पाठ झालेला असूनही तिने परत पाहून घेतला, हो चुकामुक नको परत.

ट्यारपी म्हणजे काय गुरूजी?

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 15/04/2013 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
शिष्य़ः प्रणाम गुरुजी गुरूः दीर्घायुषी हो वत्सा. तुझ्या मनात काही प्रश्न आहेत का? शिष्य़ः हो, पण ते आजच्या काळाविषयीचे आहेत. गुरूः हरकत नाही, पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेली बहुतेक मार्गदर्शक तत्वे आजसुध्दा उपयोगी पडतात. शिष्य़ः गुरूजी, मला असं विचारायचंय् की हे ट्यारपी म्हणजे काय असतं? आणि ते वाढवण्यासाठी काय करतात? गुरूः हा थोडा गहन प्रश्न आहे, मला थोडे एकाग्रचित्त होऊन विचार करू दे. ओम् ..... मंगलम् भगवान विष्णू ..... शिष्य़ः गुरूजी. गुरूः आठवलं, ऐक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 14/04/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज स्वतंत्र भारताला वेगळे वळण देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. लाखो लोक या लोकोत्तर नेत्याला दैवत मानतात. या महापुरुषाला नम्र अभिवादन. गांधीजी नंतर आपल्या इतिहासावर एवढा परिणाम करणारा नेता अजुन दुसरा कुठला नसेल. या महापुरुषाला माझी आदरांजली

अनसंग हीरो

लेखक पिंपातला उंदीर यांनी शनिवार, 13/04/2013 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने मागची २ दशक जागतिक क्रिकेट वर वर्चस्व गाजवल. प्रचंड गुणवत्ता, Never say die attitude, आणि मिळालेले कुशल कर्णधार यामुळे ऑस्ट्रेलिया ने इतर टीम्स ना तोंड वर काढण्याची संधी कधी दिलीच नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया चे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आणि त्यांची जागा घेणारे नवीन खेळाडू तितके चांगले नसल्याने त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळायाला लागला. परवा त्यांचा वेगवान गोलंदाज शॉन टेट म्हणाला की गिलेस्पी, हेडन, वॉर्न ह्यानी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या गळतीची अनेक विश्लेषण वाचली.

अलि अँड द बॉल: कुंपणाआडचं आभाळ

लेखक रमताराम यांनी शुक्रवार, 12/04/2013 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांचा फुटबॉलचा खेळ रंगात आला आहे. प्रचंड कोलाहल, आरडाओरड्याने त्यांनी आसमंत दणाणून सोडला आहे. कॅमेराही त्यांच्या मधे धावणार्‍या त्या चेंडूचा पाठलाग करू पाहतो, पण जमत नाही त्याला. इतक्यात एक बदामी डोळ्याचा खट्याळ पोरगा तो चेंडू उचलून धूम ठोकतो. उरलेली सारी मुले त्याच्या मागे लागतात. पण तो फार दूर जाऊ शकत नाही, एक भक्कम कुंपण त्याच्या वाटेत उभे आहे. त्या कुंपणाला पाठ लावून तो चेंडू नेण्यासाठी आलेल्या त्या मुलांना चिडवतो आहे. ते ही सगळे मिळून त्याच्यावर धावून जातात नि चेंडू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताहेत.

सैर भैर २

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 11/04/2013 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
१९९० सालची गोष्ट असेल. मी नौदलाच्या कुलाब्याच्या अश्विनी रुग्णालयात मनोविकार विभागात विभाग प्रमुख कर्नल पेठे यांच्या बरोबर बसलो होतो. त्यांनी पुढच्या रुग्णाला बोलावले. पुढचा रुग्ण एक वरिष्ठ कर्नल आपल्या पत्नीसमवेत आत आला. कर्नल साहेब ४५ ते ५० च्या मध्ये होते आणि ते गणवेशात होते.ते कुलाब्याच्या थळ सेनेच्या महाराष्ट्र गुजरात आणि गोवा विभागाच्या मुख्यालयात कामाला होते. त्यांची अंगकाठी सडपातळ आणी चालण्यात रुबाब होता. पत्नी साधारण ४० च्या आसपास होत्या.टापटीप आणि छान पोशाख केलेल्या. मी विचारात पडलो कि यात रुग्ण कोण? पेठे सरानी पत्नीला विचारले कि काय म्हणताय आणि साहेब काय म्हणताहेत?

तारे तोडण्याची स्पर्धा

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 09/04/2013 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्‍या नेत्याने तारे तोडले . एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन ! तळटीप : १) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा २) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे. ३) जे वा

राग दरबारी

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 09/04/2013 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल पुस्तकं वाचताना मला माझ्यात झालेला एक बदल जाणवतो. पूर्वी 'कोणतं पुस्तक छान आहे, आवडलं आहे?' या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं. जे पुस्तक वाचताना भूक, झोप, इतर व्यवधानं यांचा पूर्ण विसर पडतो; जे पुस्तक एकदा हातात घेतलं की शेवट होईपर्यंत हातातून सोडवत नाही; दुर्दैवाने ते बाजूला ठेवायची वेळ आलीच तर संधी मिळताक्षणी ते जिथं सोडलं होतं तिथून पुढे चालू केलं जातं - ते चांगलं पुस्तक! पण आजकाल माझं मत बदललं आहे. अनेक चांगली पुस्तकं वाचताना हा बदल जाणवतो. 'राग दरबारी' ही श्रीलाल शुक्ल यांची कादंबरी वाचताना हे पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आलं माझ्या.