मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

पिंपातला उंदीर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज स्वतंत्र भारताला वेगळे वळण देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. लाखो लोक या लोकोत्तर नेत्याला दैवत मानतात. या महापुरुषाला नम्र अभिवादन. गांधीजी नंतर आपल्या इतिहासावर एवढा परिणाम करणारा नेता अजुन दुसरा कुठला नसेल. या महापुरुषाला माझी आदरांजली

वाचने 16721 वाचनखूण प्रतिक्रिया 79

परिकथेतील राजकुमार 14/04/2013 - 16:17
आज खरेतर मिपाच्या मुखपृष्ठावरती त्यांचे चित्र हवे होते.

In reply to by पिंपातला उंदीर

परिकथेतील राजकुमार 18/04/2013 - 12:58
माझा इथला एक मिपाच्या भूतकाळात काय घडले ते सत्य कथन करणारा प्रतिसाद उडाला वाटते. च्यायला ! मिसळप्रेमी चालू असता तर तिकडे जाउन तरी सत्य उजेडात आणले असते. असो..

In reply to by परिकथेतील राजकुमार

आशु जोग 19/04/2013 - 21:38
गदाधारी ** शांत ! तळटीपः ** = परा

मैत्र 14/04/2013 - 18:03
अतिशय बुद्धिमान, प्रचंड अभ्यास / व्यासंग, आभाळाइतकं मोठं काम, आधी सोसलेले प्रचंड हाल आणि अपमान आणि तरीही अतिशय संतुलित विचार. आजच्या आक्रस्ताळी नेत्यांपेक्षा इतक्या वर्षांपूर्वी बाबासाहेब जास्त समतोल होते. धर्मातून बाहेर पडण्याइतके पाऊल उचलूनही कडवट किंवा विखारी नव्हते जे आता सर्वत्र दिसतं आहे. विलक्षण आदर वाटावा अशा मोजक्या नेत्यांपैकी एक.. विनम्र अभिवादन..

वेताळ 14/04/2013 - 18:28
त्यानी जे काही केले किंवा सोसले त्याबरोबर त्याना समर्थ साथ दिली त्या सर्व मान्यवरांच्या बद्दल देखिल आदर आहे. परतुं आजकाल सर्वत्र काय चित्र दिसते त्याबद्दल पण लिहले गेले तर बरे होईल. दलित सवर्ण दरी कमी होण्याएवजी दिवसेंदिवस वाढत आहे ही एक चिंताजनक बाब आहे.बाबासाहेबांच्या नावाने आजकाल जे काही धुडगुस चालु आहे तो घातक आहे.बाकी चालु द्या.

In reply to by वेताळ

राजेश घासकडवी 15/04/2013 - 21:39
दलित सवर्ण दरी कमी होण्याएवजी दिवसेंदिवस वाढत आहे ही एक चिंताजनक बाब आहे.
बाबासाहेबांच्या कार्यानंतरही लोकांची अशी का कल्पना असते कोण जाणे. मी इतरत्र लिहिलेलं इथेही डकवतो. _____ स्वातंत्र्यानंतर सरकारकडून दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. त्यातल्या अनेकांना यश आलं. (विकीपीडियाच्या http://en.wikipedia.org/wiki/Caste_system_in_India या पानावरून खालील अवतरणं घेतलेली आहेत.) उदाहरणार्थ सरकारी नोकऱ्यांमध्ये दलितांना समानता मिळवण्याचे जे प्रयत्न झाले ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत असं म्हणावं लागेल. अर्थातच अजून बराच प्रवास बाकी असला तरी आत्तापर्यंत प्रगती झाली हे नाकारता येत नाही. "By 1995, of all jobs in the Central Government service, 17.2 percent of the jobs were held by Dalits.[17] Of the highest paying, senior most jobs in government agencies and government controlled enterprises, over 10 percent were held by members of the Dalit community, a tenfold increase in 40 years but yet to fill up the 15 percent reserved quota for them." इतकी शतकं नाकारलं गेलेलं शिक्षणही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. अधिकाधिक प्रमाणात तरुण पिढी शिकते आहे. "[between] 1983 and 2000.... The number of dalit children who completed either middle, high or college level education increased three times faster than the national average, and the total number were statistically same for both lower and upper castes." ग्लोबलायझेशननंतर जो पैसा आला तो केवळ विशिष्ट वर्गातच पोचला अशी समजूत असते, पण तो तळापर्यंत पोचताना दिसत आहे. "... a recent authoritative survey revealed striking improvements in living standards of dalits in the last two decades. Television ownership was up from zero to 45 percent; cellphone ownership up from zero to 36 percent; two-wheeler ownership (of motorcycles, scooters, mopeds) up from zero to 12.3 percent; children eating yesterday’s leftovers down from 95.9 percent to 16.2 percent...[...]... Dalits running their own businesses up from 6 percent to 37 percent; and proportion working as agricultural laborers down from 46.1 percent to 20.5 percent. [...]"

कपिलमुनी 14/04/2013 - 19:36
आमच्या गावात जोर जोरात डीजे लावुन त्यांच्या विचाराचे प्रसारण चालू आहे.. असा महामानव जन्माला आला , याबद्दल हर्ष होउन मुले-माणसे बेफाम होउन नाचत आहेत.. ते आज आपल्यात नाहीत म्हणून दुख: हलके करायला थोडेसे मदिरापान केले आहे ... अशा महामानवाला वंदन करायला त्यांनी सर्व रस्ता बंद होइल याची पूर्ण खात्री करून मिरवणूक काढली आहे .. काही समाजकंटक सहकुटुंब या रस्त्यावरून जात असत त्यांना प्रेमळ समज देण्यात आली आहे .. मनोरंजनासाठी नवनवीन बॉलीवूड गीते लावण्यत आली आहेत .. समग्र बांधव अतिशय आंनदात आजचा दिवस साजरा करत आहेत .. बाकी बाबासाहेबांसारखा व्यासंगी , विद्वान आणी परीवर्तनशील महामानवास विनम्र अभिवादन..

In reply to by पिंपातला उंदीर

मुक्त विहारि 14/04/2013 - 21:30
पण काही लोक पुर्ण रेल्वेलाच वेठीस धरतात त्याचे काय हो? आमचे आरक्षण असून पण माझ्या ८५ वर्षांच्या आजीला चढायला पण नाही मिळाले हो. असो.आनंद आहे.

In reply to by पिंपातला उंदीर

मैत्र 15/04/2013 - 10:15
उदगिरकर.. अवांतर होईल इतक्या चांगल्या धाग्यावर. गणपतीच्या दिवसातला गोंधळही सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. गणरायापुढे शक्य ती सर्व आयटेम गाणी एकदम हिट असतात विशेषतः विसर्जनाला. आता एक तोरण म्हणून भंकस प्रकार सुरु झाला आहे. रस्ता अडवायचा, तुफान स्पिकर्सच्या भिंती आणि वाट्टेल ती गाणी, एकदम गुंडगिरी.. काही पूर्वेतिहास नसताना दंगा घालण्यासाठी तयार केलेला उत्सव .. तोही यातलाच प्रकार. पण हे असलं चुकीचं आहे म्हणून खाली लिहिल्याप्रमाणे रेल्वेमधली दादागिरी योग्य होत नाही. दोन्ही प्रकार सारखेच..

In reply to by पिंपातला उंदीर

कपिलमुनी 15/04/2013 - 12:19
गणपती उत्सवामधल्या, नवरात्र उत्सवामधल्या अथवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामधल्या अनिष्ट प्रवृत्तीचा मी निषेध करतो ..त्याच तत्वाने आंबेडकर जयंतीच्या मध्ये अनिष्ट प्रवृत्तींवर मी उपहासात्मक लिहिले आहे .. ( सरळ टीका केली तर भावना दुखावतात आणि अ‍ॅट्रोसीटी पण लागतो , गणपतीला ती सोय नाही..असो) आणि गणपती मध्ये नाचणारे महामुर्ख आहेत हे समजते तर त्याचे अनुकरण कशाला? ते नाचतात म्हणून आम्ही पण नाचणार ?? आंबेडकरांना अभिवादन करायच्या अनेक चांगल्या गोष्टी करता येतील..फक्त नवबौद्धच नव्हे तर सकल भारतीयांचा तो उत्सव असावा .. बादवे , या दिवशी ड्राय डे असतो का ? नसल्यास चालू करावा

In reply to by कपिलमुनी

प्रसाद गोडबोले 15/04/2013 - 12:35
या दिवशी ड्राय डे असतो का ? नसल्यास चालू करावा
बाकी सगळे मान्य आहे पण ड्राय डे का बुवा ? म्हणजे एखाद्याच्या जयंतीला ड्रायडे घोषित केल्याने ती व्यक्ति महान ठरते की काय :O (ड्राय डे ला वाढदिवस असणार्‍यांपकी एक शोषित :( )

In reply to by प्रसाद गोडबोले

आशु जोग 15/04/2013 - 12:56
गिरीजाभाऊ >ड्राय डे ला वाढदिवस असणार्‍यांपकी एक शोषित इथे या गोष्टी आणायचे कारण नव्हते. चर्चा आंबेडकर जयंतीच्याविषयी चालू आहे तुमच्या जयंतीची नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

कपिलमुनी 15/04/2013 - 14:07
महान ठरवणे आपल्या हातात नाही. ड्राय डे असेल म्हणून कोणी महान नाही आणि ड्राय डे नसेल म्हणून कोणाची महानता कमी होत नाहीत.. ड्राय डे ला वाढदिवस असल्यामुळे तुम्ही शोषित कसे आहेत ते कळले नाही !

In reply to by कपिलमुनी

प्रसाद गोडबोले 15/04/2013 - 14:55
ड्राय डे असेल म्हणून कोणी महान नाही आणि ड्राय डे नसेल म्हणून कोणाची महानता कमी होत नाहीत..
>> म्हणुनच म्हणतो ड्राय डे चा हट्ट नको... प्यायचीये त्यांना पिवु द्या साहेब :)

In reply to by कपिलमुनी

मृगनयनी 17/04/2013 - 20:20
( सरळ टीका केली तर भावना दुखावतात आणि अ‍ॅट्रोसीटी पण लागतो , गणपतीला ती सोय नाही..असो) आणि गणपती मध्ये नाचणारे महामुर्ख आहेत हे समजते तर त्याचे अनुकरण कशाला? ते नाचतात म्हणून आम्ही पण नाचणार ??
हे आवडलं!!! :)
बादवे , या दिवशी ड्राय डे असतो का ? नसल्यास चालू करावा
=)) =)) =)) हा कोण बरं चालू करू शकेल? आहे का कुणी माईचा लाल ? (किन्वा माईचा 'निळा'?... ;) किन्वा कुणीही पिवळा, हिरवा, जाम्भळा किन्वा मग सॅटिनचा फुलवाला...किन्वा इन्दु-गिरणीच्या जागेसाठी भांडलेला/ भांडणारा कुणीही......)

In reply to by मृगनयनी

अभ्या.. 17/04/2013 - 20:49
अपुर्‍या माहीतीवर अशी चेष्टा नको नैनाताई. :( ड्राय डे होता १४ एप्रिलला. वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केलेला नसतो. पण कलेक्टर नोटीसचा होता (उस्मानाबाद जिल्हा). वर्षात असे ड्राय डे जास्त असतात इलेक्शन, आषाढी वगैरे.

चेतनकुलकर्णी_85 14/04/2013 - 20:26
या महापुरुषाला नम्र अभिवादन.
गांधीजी नंतर आपल्या इतिहासावर एवढा परिणाम करणारा नेता अजुन दुसरा कुठला नसेल.
[स्त्रोत्र : आयबीएन लोकमत सर्वेक्षण काय ?]

आशु जोग 14/04/2013 - 20:26
अनुयायांच्या निमित्ताने नेत्याला कमीपणा देऊ नका ! आंबेडकर हे एका समूहाचे नव्हेत सर्वच भारतीय जनतेचे नेते आहेत.

निनाद मुक्काम … 14/04/2013 - 20:40
@ गांधीजी नंतर Shocked शिक्षणापासून ते कार्य , व विचार ,दृष्टीकोन ह्यात बाबासाहेब भारतात अव्वल होते. मुळात त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर फुकाचे उपदेश करण्यापेक्षा प्रत्यक्ष सत्तेत भाग घटना बनविण्यात मदत केली. व कायदा मंत्री ह्या नात्याने देशाची सेवा केली. त्यांच्यात व गांधीजी ह्याच्यात काही मुद्द्यांवरून वैचारिक मतभेद होते असे वाचून आहे. तस्मात ह्या महामानवाला मानाचा मुजरा. ते भारताचे पंतप्रधान असायला हवे होते, तर भारताचे आजचे चित्र वेगळे दिसले असते, केंद्रात अनेक वर्ष सत्तेवर असणाऱ्या पक्षाने त्यांच्या अनुयायांना त्यांच्या नंतर वाटण्याच्या अक्षता लावल्या. ह्या महामानवाच्या पेक्षा लुंग्या सुंग्या लोकांच्या नावाने रस्ते व सरकारी योजना आहेत व त्या नावाप्रमाणे त्या योजनांचे व रस्त्यांचे बारा वाजले आहेत.

नीलकांत 14/04/2013 - 22:05
बाबासाहेबांना विनम्र अभिवादन. उध्दरली कोटी कुळे , भीमा तुझ्या जन्मामुळे.

शिल्पा ब 14/04/2013 - 22:32
आंबेडकरांनी दलितांना लढायला शिकवलं. दुर्दैवाने आजकाल किंबहुना त्यांच्यानंतर त्यांच्या नावाने जे राजकारण सुरु आहे त्यामुळे त्यांच्या अनुयायांना फायदा होत नाही. अजुनही भेदभाव आहेच. समान संधी ऐवजी आरक्षण घातकच. असो. मोठा माणुस..आमचेही विनम्र अभिवादन.

In reply to by मुक्त विहारि

शैलेन्द्र 14/04/2013 - 23:31
मंथनाच असं आहे की लोणी सुट्टे-मोकळे असले तर ते वर येते, नाहीतर नुस्तिच बेरी लागते हाताला.. शिवाय जळकट वासही येतो.. त्यापेक्षा चाललय ते चालुद्या.. आपल्या मंथनाने ** काही फरक पडत नाही..

लोटीया_पठाण 14/04/2013 - 23:39
बाबासाहेबांना विनम्र अभिवादन. आजच्या लोकरंग मधे आम्बेडकर जयंती निमित्त प्रकाशित केलेला नरहर कुरुन्द्करांचा लेख वाचण्यात आला. त्याची लिंक डेट आहे. दलितांनी कोषातून बाहेर पडाव http://www.loksatta.com/lokrang-news/ambedkar-dalits-and-buddhism-97664/

In reply to by लोटीया_पठाण

सुधीर 15/04/2013 - 13:39
१९६९ मध्ये लिहिलेला कुरुंदकरांचा लेख तर खूपच आवडला. त्याचबरोबर राजीव साने यांचा "गल्लत गफलत गहजब" या स्तंभातला हा "अटेनबरोने वगळलेले आंबेडकर" लेखही खूप आवडला.

In reply to by श्रीरंग_जोशी

मालोजीराव 15/04/2013 - 14:10
babasaheb-shahu बाबासाहेब आंबेडकर "barrister" झाल्यावर, शाहू महाराज मुंबईतील डबक चाळीत बाबासाहेबांना भेटायला जातात.शाहू महाराज डबक चाळीत येताच बाबासाहेबांचे सहकारी बाहेर थांबलेले असतात.शाहू महाराज त्या सहकाऱ्याला म्हणतात कि, जा आणि बाबासाहेबांना सांग कि मी भेटायला आलोय.तेवढ्यात बाबासाहेब घराबाहेर येतात, आणि बघतात तर काय साक्षात शाहू महाराज मला भेटायला माझ्या घरी आलेत.एक राजा माझ्या घरी मला भेटायला आला याचे बाबासाहेबांना नवल वाटते आणि बाबासाहेब म्हणतात कि, तुम्ही राजे आहात, तुम्ही छत्रपती आहात.तुम्ही जर मला सांगितले असते तर मीच कोल्हापूरला आलो असतो. तुम्ही येण्याची तसदी का घेतली.तेवढ्यात शाहू महाराज म्हणतात.आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे, परंपरेचे राजे तर कुणालाही होता येत. पण ज्ञानाचे राजे कुणालाही होता येत नाही. तुम्ही ज्ञानाचे राजे आहात. आणि, तुम्ही "barrister" झाला आहात. म्हणून तुमची उद्या रथातून मिरवणूक काढणार आहोत. तुम्ही कोल्हापूरला या आणि मग इतिहास असा घडतो कि एक राजा एक अस्पृश्य "barrister" झाला म्हणून रथातून मिरवणूक काढतो आणि त्यांचा सन्मान करतो. - फेसबुक साभार

In reply to by मालोजीराव

पिंपातला उंदीर 15/04/2013 - 14:15
शाहू महाराज याना मानाचा मुजरा. द्रष्टा राजा मोठा माणूस. बाबासाहेब आंबेडकर याना कायमच त्यानी पाठिंबा दिला

In reply to by पिंपातला उंदीर

मैत्र 15/04/2013 - 17:01
शाहू महाराजांना अशा खंबीर समर्थनासाठी.. आणि इतक्या विनम्रतेसाठी कारण तेव्हा तर ते गादीवर असलेले राजे होते. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी आंबेडकरांचे उच्च शिक्षण आणि परदेशातील बहुतेक सर्व शिक्षणाच्या खर्चाची सोय केली होती.. जेव्हा अस्पृश्यांना शिकूच दिलं जात नव्हतं आणि खुद्द आंबेडकरांना काही वर्षापूर्वी लहान वयात गाडीतून उतरवून दिलं गेलं होतं तेव्हा स्वतःच्याच लोकांचा रोष पत्करुन सयाजीरावांनी सर्वतोपरी मदत केली (संदर्भ: लोकद्रष्टा नेता : सयाजीराव गायकवाड)

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास 17/04/2013 - 19:33
कोलंबिया विद्यापिठात देखील आता आंबेडकरांच्या नावाने Chair in constitutional law असे अध्यासन तयार केले आहे.
माझ्या मते आंबेडकरी चळवळीचं सर्वात मोठे कर्तुत्व म्हणजे त्या काळात एवढी मोठी सामाजीक क्रांती त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता घडवली. जगभरात कृष्णवंशीयांच्या लढ्यामध्ये झालेला रक्तपात पाहता त्या काळात हे फार मोठे यश होते. अन्यथा दलितांच्या मनातील पिढ्यान्-पिढ्यांचा क्षोभ आणि त्या काळची सामाजीक स्थिती पाहता भारतात यादवी माजायला वेळ लागला नसता. अर्थात हे श्रेय जेवढे आंबेडकरी चळवळीचे तेवढेच त्यावेळच्या सवर्ण समाजाचे. सध्याच्या खळ्ळ्-खट्याक संस्कृतीमध्ये ही गोष्ट जास्त उठून दिसते.

निनाद मुक्काम … 15/04/2013 - 15:56
@ एवढी मोठी सामाजीक क्रांती त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता घडवली. हा खरा नी एकमेव द्रष्टा महात्मा

In reply to by चेतनकुलकर्णी_85

पिंपातला उंदीर 15/04/2013 - 19:29
ओपन मधल्या लोकाणी केलेला भ्रष्टाचार कमी आणि आरक्षण मिळालेल्या लोकाणी केलेला भ्रष्टाचार कमी हे सीध्ध करणारा कुठला विदा आहे का तुमच्याकडे? का असेच हवेतले विधान?

In reply to by पिंपातला उंदीर

चेतनकुलकर्णी_85 15/04/2013 - 20:29
लायकी नसताना भरती केलेल्या लोकांमुळे अनेक सरकारी संस्था चे हाल माहित आहेच…. तरी मिलीटरी मध्ये आरक्षण असते का हो ?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

पिंपातला उंदीर 15/04/2013 - 20:31
ओपन केटेगरी मधून भरती झालेले सगळेच लोक आती लायक होते हे तुमचे म्हणणे आहे का? म्हणून म्हणतो काहीतरी आधार असणारी विधान करा. वैयक्तिक जातीयवादी मत नकोत

आशु जोग 15/04/2013 - 23:31
इथे काही लोक आरक्षण, अनुयायांनी लावलेले डीजे, मदिरापान असे विषय काढून आपली नाराजी या ना त्या प्रकारे दाखवून देत आहेत. इथे मदिरापानाचे पन्नास धागे येऊन गेले तेव्हा कुठे होतात. --- अशाप्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बाबासाहेबांना नावे ठेवणारे लोक अगदीच सामान्य असतात. - एक निरीक्षण (या फोरमवर अप्रत्यक्षच. प्रत्यक्ष हिम्मतच नसते)

In reply to by आशु जोग

अर्धवटराव 15/04/2013 - 23:53
बाबासाहेब = दलीत उद्धार = आरक्षण = सवर्णांविषयी पक्षपात... असा काहिसा गोंधळ होतो पब्लीकचा. बाबासाहेब प्रत्यक्ष काय होते, तर ते एक तत्व होते... त्यांनी स्वत: जगुन, जागवुन परखलेले तत्व.. "गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करुन द्या म्हणजे तो बंड करुन उठेल" आपल्या असामान्य बुद्धीमत्तेने आणि तेव्हढ्याच असामान्य सह्रुदयतेने त्यांनी या तत्वाचा पाठपुरावा केला. दॅट्स व्हाय हि इज नॉट अ महात्मा... हि इज महामानव. अर्धवटराव

In reply to by आशु जोग

कपिलमुनी 17/04/2013 - 13:42
वैयक्तीक दॄष्ट्या मदिरापान योग्य की अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवायचे असते .. कायद्याने घालून दिलेली वयोमर्यादा पूर्ण केली की मदिरापानाचा निर्णय तो व्यक्ती घेउ शकतो.. डीजे, मदिरापान यांच्या विषयी नाराजी आहेच की !! पण ती व्यक्ती किंवा समूहा बद्दल नसून प्रवृत्तींबद्दल आहे .. असे केल्याने त्या दिवसाच्या पावित्र्याला , त्या नेत्यांच्या विचारांना बाधा येते..गणपती उत्सव असो कि आंबेडकर जयंती .. बाकी या फोरम वर बाबासाहेबांना कोणी नावे ठेवली ( प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष) सरळ सरळ नावे घेउन विरोध करा ना !!

चेतनकुलकर्णी_85 17/04/2013 - 19:19
"गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करुन द्या म्हणजे तो बंड करुन उठेल"
मग झाली का गुलामी व गरिबी दूर ह्या गेल्या साठ वर्षात तुमच्या आरक्षणाच्या देणगीने?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

अर्धवटराव 17/04/2013 - 20:52
तर आरक्षणाच्या परिणामाने गुलामी आणि गरिबी कुठवर कमि झाली ते तुम्हालाच दिसेल. अर्धवटराव

आशु जोग 17/04/2013 - 20:56
> समान संधी ऐवजी आरक्षण घातकच. असो महिलांना शिक्षणात, नोकरीत आणि बसमधे, लोकल ट्रेनमधे आरक्षण दिले जाते त्याबद्दल काय म्हणणे आहे ?