Skip to main content

शुभेच्छा

आपल्या लाडक्या सचिन ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

लेखक मोगली यांनी रविवार, 24/04/2011 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांचा लाडका लिटील मास्टर सचिन तेंडुलकर आज आपल्या वयाच्या ३८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. क्रिकेटच्या विश्वातील या तेजस्वी सुर्याला त्याच्या या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा...त्याच्या या प्रकाशाने क्रिकेट विश्व उजळुन निघु दे आणि त्याच्या कीर्तीचा झेंडा अखंड फडकत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. (शुभेच्छूक) मोगली

श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 18/04/2011 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
रामनवमीनंतर येते ती हनुमान जयंती. चैत्र पौर्णिमा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रीयं बुद्धीवतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणंप्रपद्ये॥ बोलो बजरंगबलि की जय। पवनपुत्र हनुमान की जय।

जय श्रीराम...!!!

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभू रामचंद्र की जय! रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले. सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे. रघुकुलवीर श्रीराम आपल्या कृपेने समस्त लोकांचे सर्वार्थाने कल्याण करोत हीच प्रार्थना. श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम।

श्री. सुधीर काळे यांचे अभीनंदन

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 10/04/2011 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लागला. सुधीर काळे मिपावर जागतीक घडामोडींचा आढावा नेहमीच घेत असतात. त्यांचा "मित्रराष्ट्र म्हणून कशी आहे अमेरिका"" हा लेख दि.३ एप्रीलच्या सकाळच्या "सप्तरंग" पुरवणीत छापुन आला आहे. तो लेख येथे वाचा.

तुमचं आमचं सेम नसतं - भाग ९.५

लेखक वपाडाव यांनी बुधवार, 06/04/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : आधीच्या ९ भागांचा या भागाशी काही-एक संबंध नाही. मी ,स्पा वेग्रे उपटसुंभ्या लोकांनी ५० फक्त यांच्या लग्नाची पत्रिका छापायचे/वाटायचे ठरवले.. त्यासाठी ही छापलेली पत्रिका अन चेष्टा... ही प्रत्येक मिपाकर मंडळीपर्यंत पोचवुन त्या दांपत्याला शुभाशिर्वाद मिळावेत म्हणुन हा छोटासा प्रयत्न ... दिल्लगी आहे दिल्लगीतच घ्यावे ही सर्व रसिक जणांना विनंती.
. . . .II श्री अष्टविनायक प्रसन्न II आमच्या येथे श्री संपादक मंडळ कृपेने, . ...

(यांना विसरुन कसे चालेल ? )

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 05/04/2011 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा?

सचिनला भारतरत्न द्यायला हवी

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 03/04/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र (मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे) मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे. त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच.

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 02/04/2011 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन! आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले! - (अतिशय आनंदी) इंट्या.:)

पारंपारिक प्रतिस्पर्धी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 30/03/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्‍या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.

अंतर ठेवा...

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 29/03/2011 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे सदस्यगण हो, कृपया मला एक सांगावे. मला काही सदस्यांकडून सांगण्यात आले आहे की मी लिखाणात अंतर ठेवावे. मी मिपावर टाकलेल्या माझ्या लिखाणांमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवतोच. माझे हे लेखन आधीपासूनच तयार आहे. म्हणूनच मी ते इतक्या लवकर मिपावर टाकतोय. जर खरोखरच तुम्हाला जर माझ्या लिखाणात अंतर हवे असेल तर किती ते सांगावे ही विनंती. धन्यवाद विन्या. (मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्‍या सदस्यांना क्षमस्व. ;) मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)