पुनश्च हनीमून
कथा कादंबरी लेखनाची प्रक्रीया नक्की काय असते याबद्दल बरीच मते आहेत. काहींच्या मते लेखन हे माणसाच्या भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील स्वप्ने यांचे बेमालून मिश्रण असते. त्यात वर्तमानदेखील मिसळलेला असतो. लेखक त्याच्या भूतकाळ भवीष्यकाळ आणि वर्तमानकाळापासून वेगळा अलीप्त राहू शकत नाही.
लेखक लिहीताना त्याचे लिखाण जगत असतो.
या लिखाणाच्या प्रवाहाला खीळ बसते ती ;तो त्याच्या लिखाण जगण्यापासून अलीप्त झाल्यावर.
आपण याला रायटर्स ब्लॉक म्हणतो.
रायटर्स ब्लॉक बद्दल यापूर्वी माध्यमातून बरीच चर्चा झालेली आहे.