Skip to main content

सद्भावना

अ‍ॅटिट्यूड वाला मुण्डा!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 05/11/2022 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान. २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना. ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरताना - हर्षा भोगलेंच्या शब्दांत सांगायचं तर "Somebody needed to TAKE ON McGrath" आणि ती जबाबदारी एका विक्रमादित्याने घेतली.

सकाळ प्रकाशन - ललित लेखन - एका खेळियाने

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 22/09/2022 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रहो, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे बहुतांशी मिपावर लिहिल्या गेलेल्या "एका खेळियाने" ह्या लेखमालिकेला सकाळ प्रकाशनातर्फे आयोजित लेखनस्पर्धेत सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. एका खेळियाने, क्रीडायुद्धस्य कथा आणि खासियत खेळियाची ह्या सदरांतर्गत लिहिलेले काही निवडक लेख सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित करण्यात येतील. या लिखाणामागे मिपाकरांच्या प्रतिसादाचा आणि प्रेमाचा मोठा वाटा आहे. हे आभारप्रदर्शन नाहीच. आपल्याच लोकांना "धन्यवाद" काय म्हणायचं? पण इतकं जरूर म्हणेन की तुम्ही लोकं आहात म्हणून लिहिण्यात मजा आहे.

मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सोलो सायकलिंग

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/09/2022 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
4 राज्ये, 1500 किमी- २० दिवस- सिंधूदुर्ग- गोवा- बेळगांवी- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर नमस्कार. आपण ठीक आहात अशी आशा करतो. सध्याच्या काळात मानसिक आरोग्य, हा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. अनेकदा आपण बघतो की, लोक अतिशय क्षुल्लक कारणाने आत्महत्या करताना दिसतात (वस्तुत: कोणतंही मोठं सांगितलं जाणारं कारण हे एवढी मोठी गोष्ट करण्यासाठी नेहमीच किरकोळ असतं). कोरोना आणि आर्थिक संकटाच्या काळानंतर मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिक आरोग्य ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत. त्यामुळे हा विषय आपण सर्वांचा आहे.

अधुनिक तीर्थक्षेत्रे....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 12/08/2022 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
राजगुरुनगर ते हुसैनीवाला...... "मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि, मैं ‘इश्क’ भी लिखना चाहूं तो ‘इंकलाब’ लिखा जाता है..." - हुतात्मा भगतसिंग २३ मार्च १९३१ ला भगतसिंग, राजगुरू आणी सुखदेव यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी दिली.ही बातमी रत्नागिरी येथे स्थानबद्ध आसलेल्या स्वातंत्र्यवीरांना दुसरे दिवशी कळाली.निर्माण झालेल्या मनःक्षोभातून खालील कविता त्यांनी लिहीली आणी देशप्रेमी तरूणांनी गुपचूप कठंस्थ करून रत्नागिरीत प्रभातफेरी काढली आणी सारे नगर देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून सोडले होते. "हा भगतसिंग, हाय हा                    

चिंता नक्को, हम हइ इद्दर!!"

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 31/05/2022 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
"चिंता नक्को. हम हइ इद्दर!" अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:। पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः।। - कालिदास (कुमारसम्भव १/१) आजवर बघितलेला हिमालय हा कुठेतरी काव्यात वाचलेला, सिनेमांमधून पाहिलेला, अद्भुतरम्य तरीही सुंदर. निळ्या नभाला शोभायमान करणार्‍या पांढर्‍याशुभ्र सानुंचा.

प्रिय सचिन

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 24/04/2022 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय सचिन, पुन्हा तो दिवस - पुन्हा तीच भावना. आता तर त्या भावनेला शब्दांचीही गरज वाटत नाही. तू निवृत्त होऊन ९ वर्षं झाली. आम्हीही थोडे (वयानी) मोठे झालो, वयानुरूप थोडीबहुत परिपक्वता, व्यावहारिकता आली. जे दिसतंय त्यापलिकडे बघायची नजर आली. तू खेळत असताना असलेली आमची क्रिकेट बघण्यातली बेहोषी आता कमी झाली. परिस्थिती बदलली, जग बदललं तसं क्रिकेटही अर्थातच बदललं. आम्ही अजूनही क्रिकेटवेडे आहोतच. आताही शुभमन गिलच्या शैलीवर, पंतच्या बेफिकीरीवर, डेवॉल्ड ब्रेविसच्या चौफेर फटक्यांच्या रेंजवर, शाहीन आफ्रिदीच्या वेगावर फिदा आहोतच. स्मृती मनधाना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मासारख्या मुलींबद्दलही कौतुक आहेच.

हसरे चेहरे

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 15/04/2022 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनात कितीतरी लोक येतात,जातात.काही आठवणीत रहातात काहींचे विस्मरण होते.काहीच बोटावर मोजण्याइतपत व्यक्ती की ज्या चटका लावून जातात.त्यातील काही खुपच महत्वाच्या तर काही अगदीच नगण्य. माणसाच्या स्वभावावर बरेच काही अवलंबून आसते.आशीच आमच्या सोसायटीतील कचरा उचलणारी बाई.कधीच गैरहजर नाही.दुर्मुखलेला,केविलवाणा चेहरा स्वताच्या गरिबीचे रडगाणे कधीच नाही. वेळ ठरलेली,अशिक्षित,एकदाच घंटी वाजवणार,दार उघडताच सुहास्य मुद्रेने "गुडमॉर्निंग "'जरूर म्हणणार.

आप मुझे अच्छे लगने लगे-२

लेखक पाटिल यांनी रविवार, 12/12/2021 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१: https://www.misalpav.com/node/49462 (पुढे चालू)... 'भाभी,असं कसं विसरून जाऊ सपनाला? माझा दिल दुखतो. मला आत्ताच सपनाला जाऊन भेटलं पाहिजे' रोहित-निशिगंधाभाभीचा होस्टेलच्या गेटवर संवाद चाललाय. ह्यावर भाभीचं म्हणणं असं पडतं की, 'तू सुरक्षित रहावास ह्या भूमिकेतूनच सपनाने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे..! ह्यामध्ये माझा काही विशेष रोल नाही. मी फक्त हा निरोप सांगण्याचं कर्तव्य करत आहे..! याउप्परही तुला तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती करायची असेल तर तू स्वतंत्र आहेस..!

'चौरा' : विज्ञाननिष्ठ, चिकित्सक, बहुरंगी ‘राजा’माणूस !

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 21/11/2021 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
चौरा व माझा मिपा परिचय उण्यापुऱ्या चार वर्षांचा. आमची प्रत्यक्ष भेट फक्त एकदाच. तरीसुद्धा मिपावरील प्रतिसादांमधून या राजाने जो मैत्रीचा पूल आमच्यादरम्यान उभारला तो अविस्मरणीयच. म्हणूनच चित्रगुप्त यांच्या धाग्यावर निव्वळ चार ओळींची आदरांजली लिहून माझे समाधान झालेले नाही. किंबहुना मी तेवढेच करून थांबणे हा चौकटराजांवरील अन्याय असेल. काल त्यांच्या निधनाची दुःखद बातमी वाचल्यापासून अगदी ‘आतून’ बरेच काही मनाच्या पृष्ठभागावर येत आहे. त्यांच्यावर अजून काहीतरी मनापासून लिहीले पाहिजे ही ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही.

तिसरी घंटा

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 30/10/2021 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपण रोजचं वर्तमानपत्र वाचायला शेवटच्या पानापासून सुरुवात करणारी लोकं. आजकाल पहिल्या पानावर असतात त्या माणसाला मनुष्य "प्राणी" का म्हणतात याचा प्रत्यय देणार्‍या बातम्या. पण शेवटच्या पानावर असतात त्या माणसाच्या विजिगीषु वृत्तीच्या, अपार कष्टांच्या, लढवय्या बाण्याच्या गोष्टी. आणि त्यानंतरचं - शेवटून दुसरं किंवा तिसरं पान म्हणजे समाजाच्या सृजनाचं, कलात्मकतेचं, संवेदनशीलतेचं दर्पण - नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जाहिरातींचं पान. कितीतरी महिन्यांनी - जवळपास पावणेदोन वर्षांनंतर ते पान पुन्हा रंगीबेरंगी जाहिरातींनी भरायला लागलं आहे.