Skip to main content

प्रतिक्रिया

जालिंदर बाबा : पत्रकार समिक्षक ?

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 29/01/2010 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
जालिंदर बाबा... संचार नावाची विचित्रपट समिक्षणाची मालिका मिपावर पूर्वी वाचत असे... चांगले चित्रपट शोधून शोधून त्यांना (घासुनपुसुन गुळगुळित ) मोहक बनवण्याची कला त्यांना चांगली साधली आहे असे तेव्हा वाटत असे आणि आदर वगैरे वाटत असे...

Pride and Prejudice?

लेखक अमितकुमार यांनी सोमवार, 18/01/2010 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://timesofindia.indiatimes.com/home/sunday-toi/special-report/Pride… Times of india मध्ये नुकत्याच प्रसिद्ध ह्या लेखात लेखकाने बिहारी पणाचा गर्व व्यक्त करून, त्यांचा इतर राज्याच्या विकासात किती महत्व पूर्ण वाट आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला , पण ह्या लेखाला प्रतिकिया देताना वाचकांचा तोल गेला आणि विना कारण मराठीला मध्ये आणण्यात आले. मराठी माणसावर अनेक खालच्या दर्ज्याची टीका केली.

या निर्दय मंत्र्यांचा धिक्कार!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 08/01/2010 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आताच माणुसकीला काळिमा लावणार्‍या या दोन तामिळी मंत्र्याच्या या घृणास्पद वर्तनाविषयी वाचलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून चंदनचोर वीरप्पनला ठार मारणार्‍या सब इन्स्पेक्टर आर वेत्रवेल्ली याला सात स्मगलर्स नी भर रस्त्यात हल्ला करून त्याचे दोन्ही पाय तोडलेले असतांना, पाठोपाठ आपल्या लवाजम्यासहित घटनास्थळी पोहोचलेल्या तामीळनाडूचे आरोग्य मंत्री एम आर के पनीरसेल्वम आणि युवक आणि क्रीडा मंत्री मोइद्दीन खान या दोघांनी कसलीही मदत न केल्याने वेत्रवेली अति रक्तस्त

थांबा आणि पहा-’नटरंग’ ने केलेली क्रांति!

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 08/12/2009 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
सोनाली कुलकर्णीचे हे नृत्य एका महिन्यापुर्वीच झीच्याच एका कार्यक्रमात सादर झाले होते व भान हरपून ते पाहिले. नंतर युट्युबवर पुन्हा-पुन्हा आणि पुन्हा-पुन्हापाहिले- समाधान होतच नाही.

२६ नोव्हेंबर विसरायचा नसेल तर आवर्जून पहावं असं काही

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 26/11/2009 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
भष्टाचाराविरूद्ध महत्वाचे हत्यार ठरू शकणार्‍या माहिती आधिकाराच्या कायद्यानंतर त्याच्या काही यश-कथा वाचल्या, तसंच हेमंत करकरे, विजय साळस्कर आणि अशोक कामटे यांच्या अतिरेक्यांद्वारा हत्येनंतर त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेट विषयीच्या चौकशीला मिळालेलं असं बेजबाबदार उत्तरही वाचनात आलं.

'सामना'चे आभार...

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 19/11/2009 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
सामना या दैनिकाने त्यांच्या फुलोरा या सदरात मिसळपावला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे.. (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.

कातरवेळ

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 16/11/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!!

वारीचं पुण्य!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 14/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजच एका मिपाकराचा फोन आला.. "काय तात्या, कसा आहेस? मीही एक मिपाकर आहे पण फक्त वाचनस्वरुपात." बर्‍यापैकी वयस्कर माणसाचा आवाज वाटत होता.. "बरं. बोला साहेब.." "तात्या तुझ्या मिपाची खरी शोभा काय सांग पाहू?" "मिपावर मनापासून लिहिणारे/वाचणारे मिपाकर!" मी. "च्च.. ते झालंच रे. पण खरी शोभा काय ते सांग ना साल्या!" हा म्हातारा एकदम शिव्यांवर आलेला पाहून मला बरं वाटलं! :) "म्हणजे मिपाचं खरं बलस्थान काय? असं विचारतोय मी. छ्या! साल्या तुझं हे संकेतस्थळ आणि तुलाच ह्याचं उत्तर माहीत नाही?" "हम्म..! येथे लिहिले जाणारे उत्तम लेख, हसीमजाक, कम्पूबाजी वगैरे..!" पुन्हा मी. "च्च.. ते झालंच रे.

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.