चिंतातुराणां न सौख्यं, न मज्जा.
दिवसभराचं पाट्या टाकणं झालं आणि मी ऑफिस बंद करत होतो. तेवढ्यात फोन वाजला.
"दत्ता. . मी मंदार. तू ऑफिसमध्येच आहे कां ?"
मी म्हणालो " हे काय बंद करून निघतोच आहे. कां रे ?"
तुझ्याकडे तासभर वेळ आहे कां ?
हो आहे. कुठे जायचंय कां ?
हो. जरा गप्पा मारंत बसू.
कुठे ?
भोलाकडे. वडा-पाव बर्याच दिवसांत खाल्ला नाही.
च्यायला, नुसता वडापाव ? आणि वडापाव खायला तास कशाला लागतो? मला वाटलं तू 'कवी'मध्ये बसायचं म्हणतोयस.
लेका . . . श्रावण चालू आहे.
नेहमी पिणार्यांना श्रावण. मला नाही.
तरीसुध्दा नको. तू भोलाकडे ये. मी निघतोय लगेच.
मी भोला वडेवाला कडे पोहोचलो.
मिसळपाव
विशाल.