Skip to main content

प्रकटन

आय गॉट अ वूमन- रे चार्ल्स

लेखक प्रास यांनी रविवार, 04/12/2011 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रभात मित्रांनो! सकाळी सकाळी आठवण झाली 'रे चार्ल्स'ची. या अमेरिकन गीतकार, संगीतकार आणि गायकाने चांगली ५०-५५ वर्ष संगीत रसिकांवर आपल्या सूरांचं गारुड घातलं. आधी उल्लेख झालेल्या 'ब्लूज' संगीताचाच एक प्रकार असलेला 'सोल' (Soul) संगीत, हे याची खासियत!

चॉकलेट हिरो देव आनंद यांचे निधन.

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 04/12/2011 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच ऑन लाईन म.टा मधे बातमी वाचण्यात आली. सदाबहार देवानंद काळाच्या पडद्याआड सदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते ज्येष्ठ सिनेअभिनेते देवानंद यांचे लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अखेरच्या क्षणी देवानंद यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता.

भोलू गोपाळाची गोष्ट

लेखक हरिकथा यांनी शनिवार, 03/12/2011 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
वृंदावनातल्या श्रुंगारवट या स्थानी नित्यानंदवंशीय श्रीनंदकिशोरदास गोस्वामी यांचा आश्रम आहे. त्यांच्याकडे त्यांच्या गायींच्या देखभालीसाठी भोलू नावाचा एक ब्रजवासी मुलगा राहत होता. भोलू हे काही त्याचं खरं नाव नव्हतं पण लोकं या गुराखी मुलाला भोलूच म्हणायची कारण तो स्वभावाने अतिशय भोळा होता. त्याच्याजवळ फारशी व्यावहारिक चतुराई नव्हतीच पण बुद्धीनेही तो अगदीच सामान्य होता. कुणी त्याला मस्करीतही काही गोष्ट सांगितली तरी तो ती खरी मानायचा. शंकेखोरवृत्ती तर त्याच्याजवळ नावालाही नव्हती.

भीती

लेखक जयनीत यांनी शनिवार, 03/12/2011 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
बंदिस्त पिंज-यात वाघ दुखा:त दिवस कंठीत होता . किती काळ झाला आपल्याला इथे येऊन ? आलो तेव्हा पानगळीचे दिवस होते . त्यानंतर दोनदा पाऊस येऊन गेला , आता तर पुन्हा पावसाचे दिवस येण्याची लक्षणं दिसताहेत . बाप रे ! बराच काळ झाल की आपल्याला . किती सुंदर दिसायचं आपलं रान पावसाच्या दिवसात , हिरवगार ! अन इथे ! इथल्या वृक्षांना रानातल्या वृक्षांची सर कुठून येणार ? त्यांचे बुंधे किती डेरेदार ? किती तरी पक्षी त्यांच्या आंगाखांद्यावर खेळायचे ? अन ती खोडकर माकडं ! किती किती गंम्मत होती त्या रानात .

आजोबांच पेन

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 02/12/2011 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कधी कधी उन्हाळ्यात एक थंड हवेची झुळुक येते, ऊर भरून आपण श्वास घेतो, थंडावा अंगभर पसरतो. श्वास न सोडावासा वाटतो. पण निसर्गाचा नियम.. श्वास सोडावाच लागतो. असंच काहीसं सुख आणी दु:ख. ते यावं आणि जावं हेच कदाचित आयुष्य. :) कॉलेज मधे होतो तेव्हा "मेस"वर जेवायचो. मेसवर एक आजोबा यायचे. खळखळून हसायचे. आम्हाला सामील व्हायचे. वय ८५ आहे असे ते म्हणायचे. दुपारी आणि रात्री भेटायचे. आम्हाला बघून खुप खुश व्हायचे. हसायचे, आमच्याबरोबर विनोद करायचे आणि स्वतःचे तरुणपण आठवून पुन्हा खुश व्हायचे. आजोबा एकदा जेवणानंतर गप्पा मारताना म्हणाले की त्यांच्या वयाचे त्यांच्याबरोबर कुणीच नाही.

|| || माझे गाव माझे बालपण || ||

लेखक विवेकखोत यांनी गुरुवार, 01/12/2011 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
" लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा " काल अचानक गप्पाच्या ओघात लहानपणा विषयी गप्पा निघाल्या आणि मन अचानक गावाकडे चक्कर मारून आले. लहान पणाची मजा काही औरच, ती मजा, ती धमाल, तो बिनधास्त पणा मोठे पणी नाही सापडत हो. प्रत्येक गोष्टी मला आठवतात अजून. आमच्या गावाला पाणी टंचाई खूप मला तर आमच्या नळाला पाणी कधी आले ते पण आठवत नाही. नळाच्या खड्डया चा उपयोग आम्ही लपंडाव खेळायला करत असू , एखादा माणूस सहज गडप होईल असे ते खड्डे असत. मग प्रत्येक मोसमात सगळ्या मित्र मंडळीची स्वारी कुठल्या तरी शेतावर असायची.

सिंदबाद...

लेखक मन यांनी बुधवार, 30/11/2011 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
सिंदबाद... एक वेडा खलाशी.समुद्रावर जातो म्हणून खलाशी म्हणायचं. वृत्ती तीच, भटक्याची,प्रवाशाची. अमुक ठिकाणी "पोचणं" हे त्याचं उद्दिष्टच नसतं. त्याला फक्त तिथं "जाण्यात" मजा असते म्हणून जायचं असतं. हरेक सफरीत काहितरी वेगळं सापडेल म्हणून थेट नौका अथांग समुद्रात फेकणारा तो सिंदबाद. इतर खलाशी "बाप रे वादळ येतय" असं म्हणताना हा "अरे व्वा! वादळ येतय " शिडांच्या जुळजुळवीला अफाट उत्साहाने लागणारा पठ्ठया. वादळातून नाव काढल्यावर "वाचलो", "सुटलो" असे म्हणण्यापेक्षा "कस्ला थरार होता हा." असे म्हणून रोमांचित होणारा व रूढ जगाच्या दृष्टीने गाढव.

वाट !!

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 30/11/2011 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा तश्या अनेक असतात. प्रत्येकाची आपापली वेगळी असते. वाटा फ़ुटतात, वाटा हरवतात, वाट मिळते, वाट सापडते. वाट पाहिली जाते, वाट दावली जाते, अन वाट लावलीही जाते. कधी कधी आपल्याआपण वाट लागतेही. वाटा चोखाळल्या जातात, जोखल्या जातात. वाट वळणाची असते, वाट निसरडी असते, कधी वाटा वेगळ्या होतात, कधी वाट वाकडी करुन येण होत, अन कधी वाकड्या वाटेला जाण ही होत. कुणी आपापल्या वाटेने जात असतो, कुणास वाट दाखविणारा भेटतो, कुणी वाट अडविणारा असतो. कुणी वाट राखतो, कुणी वाट मारी करतो. कधी कधी वाटेला जायच नसत.गप आपापली वाट धरायची असते. वाटेला धरुन चालायच असत. तश्या वाटा तुम्ही आम्ही खुप पाहिलेल्या असतात.