Skip to main content

प्रकटन

सुनिता

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 22/01/2013 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
ही १९८७ च्या हिवाळ्यातील गोष्ट आहे.हि १०० % सत्य घटना चक्षुरवै सत्यं आहे मी कमांड हॉस्पिटल पुणे मधल्या अति दक्षता विभागात २४ तासाच्या आपत्कालीन कामाला(emergency) होतो. साधारण रात्री ११ वाजता बाह्य रुग्ण विभागातून(casualty) एक बेशुद्ध रुग्णाला थेट अतिदक्षता विभागात आणले.त्याच कोणताही आगापिछा माहित नव्हता. वय साधारण २३-२४ असेल .अंगावर पँट शर्ट आणि स्वेटर.

नानाचा अग्रलेख.....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 20/01/2013 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
लैट्स.....!, कॅमेरा.......!!! अक्षन .....!!!!!! फाट्ट .......!!!!!!!! ......याच्या पुढे काय करायचं आणि काय पोपटायचं हे सगळं सांगितलेलं असतं. तोंड रंगविलेल्या बाहुल्यांनी जमेल तितकं पोपटायचं. फार मोठे संवाद नसतात. पाठांतर झेपायला नको ? दोन चार दोन चार वाक्यंच. तुकड्या तुकड्यांनी पोपटायचं. "....एक साला मच्छर आदमीको..हिजडा बना देता है......वेग्रे वेग्रे !! थोडेफार जे काही कपडे अंगावर चढविले असतील ते संभाळत डायरेक्टरने उठ म्हटलं की उठायचं. बस म्हटलं की बसायचं. रड म्हटलं की ग्लीसरीन ओतुन घ्यायचं आणि पड म्हटलं की दरी डोंगरात सुद्धा स्पंजच्या गादीवर अलगद पडायचं. हे कर, करायचं. ते कर करायचं.

पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ...

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 19/01/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त... आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल. अहो, अध्यात्म म्हणजे आत्म्याचा ८४ लक्ष योनीतून होणारा प्रवास, आणि सरतेशेवटी लाभणारा मोक्ष. या सर्वांचा लेखा-जोखा ठेवणारे तर आम्हीच ना!...पण आता या सर्व उचापतींचा हिशेब लिहून लिहून आमचं कंबरडं पार मोडलय. निवृत्त होऊन या केंव्हा या कटकटीतून मुक्त होतोय, असं झालंय... ... बघा, की आम्ही अनंत काळापासून आमचं काम इमाने-इतबारे करत आलो. पूर्वी इतर पशुपक्षी खूप असले, तरी मनुष्यप्राणी फारच कमी होते. दिवसभर शिकार वा शेतीची कामं करून सूर्य मावळताच झोपून जायचे. त्यामुळे उचापती कमी, हिशेब ठेवणं सोपं.

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 18/01/2013 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मन्नूस, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, पत्र लिहिण्यास उशीर झाल्या बद्दल क्षमस्व. आज मी मुद्दाम प्रयत्न करून तुला मोठे आणि सविस्तर पत्र लिहित आहे, कारण इथल्या नवीन शाळेतल्या मॅडम ज्यांना इथे बाई म्हणतात त्या नेहमी मला माझ्या गचाळ हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाच्या चुकांसाठी खूप रागावातात. इतक्या मोठया शहरातून आलास तरीही तुझं लेखन इतकं अशुद्ध आणि अक्षर इतकं खराब कसं असं त्या नेहमी म्हणतात. पण त्यांना माझे निबंध मात्र खुप आवडतात, ते त्या सगळ्या वर्गांमधे वाचुनही दाखवतात. त्या माझे नाव आंतर शालेय निबंध स्पर्धेत पाठवणार आहेत, आणि माझा नंबर जिल्ह्यातुन पहिला आलाच पाहिजे असे त्या म्हणाल्या.

जेम्स बाँडचं पडद्यावरचं अर्धशतक..

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 18/01/2013 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
१८८० साली पहिल्या मोशन कॅमेर्‍याचा शोध लागल्यापासून जगात कित्येक सिनेमे बनले असतील. विविध विषय, माणसं, प्रेम, भय, युद्ध, विनोद प्रत्येक क्षेत्रात सगळ्या भाषांमध्ये हजारो सिनेमे आले, त्यांनी आपापल्या काळात लोकांवर अधिराज्य सुद्धा केलं असेल. पण एक काल्पनिक कॅरॅक्टर, जे फक्त कादंबरी रुपाने अस्तित्वात होतं, त्याने मात्र सिनेमात आल्यापासून गेली ५० वर्षे लोकांच्या मनावर अक्षरशः मोहिनी घातलीये, तो म्हणजे जेम्स बाँड. जेम्स बाँडचा जन्मदाता इयान फ्लेमींगला कधी स्व्प्नातसुद्धा वाटलं नसेल आपलं कारटं इतकं प्रसिद्ध होईल. आपली पहिली कथा लिहिताना त्याच्या मनात जेम्सबद्दल काही वेगळीच मतं होती.

मनातलं जनात आणलंय

लेखक तळेकर यांनी सोमवार, 14/01/2013 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता "महामानव" आयुष्यभर त्याने संत साहित्याचा अभ्यास केला. प्रचार केला. खास करून व्यभिचार आणि भ्रष्ट आचाराला वीरोध केला. व्यभिचारींची "मदत" घेण्यास नकार दिला. त्यांच्या आचरणाने शिकवणीने आम्ही सारे भारुन गेलो.

अनुत्पादक काम

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 14/01/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी डिसेंबर १९८८ साली ओखा येथे नौदलाच्या आय एन एस द्वारका या स्थावर तळ (BASE) वर डॉक्टर म्हणून गेलो होता. त्यावेळी ओख्याला रेल्वे व नौदल सोडून काहीच नव्हते.नौदलाच्या मेस मध्ये राहत होतो. तेथे पाणी पूर्ण खारट होते.(मचूळ नव्हे अलिबाग नागाव रेवदंडा इथे मिळते तसे मचूळ नव्हे ). चहा किंवा कॉफी सुद्धा खारट होत असे. पहिले १० दिवस मी शीत पेयांवर काढली.(नमकीन चहा हा तिबेट किंवा लडाख मध्ये मिळतो ज्यात याकचे लोणी घालतात).

सौदी संस्कृती

लेखक आशु जोग यांनी रविवार, 13/01/2013 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल माणूस एकमेकापासून दुरावत चालला आहे. आपल्या शेजार्‍यासाठी आपण कितीसे करतो. पण शेकडो मैलवर राहणारी सौदी अरेबियातील काही महान माणसे आपल्या प्रेमाची छाया केवळ आपल्या देशापुरतीच मर्यदित न ठेवता आपल्या प्रेमाची पाखर भारतीयांवरही घालत आहेत. हे कार्य अव्याहतपणे गेली काही वर्षे मुंबई, दिल्ली, हैद्राबाद इथे सुरू आहे. सौदी अरेबियन लोकांच्या विशाल हृदयामुळे येथल्या अनेक जणांना केवळ प्रेमच नव्हे तर पैसासुद्धा मिळाला आहे. मात्र एवढे सारे करूनही या कामाची जाहीरात होणार नाही याचीदेखील काळजी घेतली जाते.