Skip to main content

प्रकटन

सरस्वती पूजन

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 26/01/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.

उत्तर भारतात वसंतपंचमी साजरी केली जाते. आपण शाळांतून तोच सण सरस्वती पूजन म्हणून साजरा करतो. यंदा २४ जानेवारीस वसंतपंचमी होती. खरे तर हा सुगीचा सण सर्वच भारतात आनंदाने साजरा केला जातो. विवेक पटाईत ह्यांच्या लेखात केवळ वसंतपंचमीचाच उल्लेख आहे. मात्र सुगी साजरी करण्याचे मार्ग अनेक आहेत! चला तर ह्या सुगीच्या बहारीचे आपणही स्वागत करू या!

गप्पा

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 23/01/2015 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज्जी हे बघ मिकी काय म्हणतो आहे! काय म्हणतोय? पोळ्यांची कणीक मळता मळता तिने स्वैपांकघरातून ओरडून विचारले. टीवी लाव म्हणतो आहे। तेला कार्टून बगायचे आहे. मिकीला की तुला? नाय, मिकीला! चल गप्पिष्ट कुठला. असा आजीचा काहीना काही संवाद दिवाणखान्यात एकटाच खेळणा-या दीपशी स्वैपांकघरातून तार स्वरात ओरडून सुरू होता. ओरडून घसा दुखला तशी भराभरा हातातले काम संपवून ती दिवाणखान्यात आली. आज्जी, हे बग, मी डंपर, डिगर सगळे बाहेर काढले. आज्जी हा मानूसला आत बसव नां ए आज्जी फ़ायर ईंजीन वी वौ वी वौ अस कां करतं? अरे त्याला लवकर जायच असत ना, म्हणून लोकांना रस्त्यातून बाजूला करायला आवाज करतं वी वौ वी वौ ....

देवस्थाने आणि भटजी....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 23/01/2015 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.

भंगार परिक्षणाचे परिक्षण

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 19/01/2015 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
हे असले काही खरडण्याची आमची सोय व्हावी म्हणून मिपा व्यवस्थापनाला अशी जाहीर विनंती करण्यात येत आहे की 'वाचलेले भिकार काही' नावाचे सदर सुरू करावे. मागणी समाप्त. आता उंदरीला ५० पिल्ले झाली, त्यातली ४ भुंकली, १० रेकली आणि २० खोकली तर त्याला गाढव बिचारे काय करणार? आणि चुकून दिलीच मांजरीने अंडी तर काय आता सुपरमॅनचं देऊळ बांधू की डिंकाचे लाडू करू? नाही जमत... कितीही प्रयत्न केला तरी 'पाहावे मनाचे' ह्या सायटीवरील 'लोकमान्य' सिनेमाच्या परिक्षणाइतके असंबद्ध, भिकार आणि गचाळ लिहिणे नाही जमत.

बूमरँग

लेखक मंदार कात्रे यांनी सोमवार, 19/01/2015 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
शैलेश कडे आज सत्यनारायणची पूजा होती. वडिलांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते. म्हणून मी तीर्थ प्रसादाला गेलो होतो. प्रसाद घेऊन थोडावेळ गप्पा मारीत बसलो होतो. शैलेश चे वडील म्हणाले , आता पोरगा चांगला लाइन ला लागलाय . आता त्याच्यासाठी मुली शोधायला हव्यात . मी होय म्हणालो. शैलेश नुकताच दुबई वरुन परतला होता ,त्यामुळे सगळे आनंदात होते. शैलेश , आमच्या गावातील एक जिगरबाज होतकरू तरुण . गावाची दहीहंडी फोडण्यात दरवर्षी हाच पुढे असायचा .

मी आणि ते

लेखक स्पा यांनी बुधवार, 14/01/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
"ते" असतातच तुमच्या आजूबाजूला, लहानपणी माहित नसतं, हळू हळू मोठे होत जातो तसे त्यांची व्याप्ती लक्षात यायला लागते,तरीही तसा त्यांचा त्रास नसतो तुमचे शिक्षण पूर्ण होते,मग तुम्हाला नोकरी लागते.वय तिशी कडे झुकायला लागले कि तुमच्याच घरातले घात करतात, आणि त्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतात.मग कधीही दिवसा ढवळ्या रात्री अपरात्री ते तुम्हाला दर्शन द्य्याला लागतात,तुम्हाला त्यांच्यात ओढायचा त्यांचा बेत असतो,जणू तेच त्यांचे जीवितकार्य असते.साम दाम दंड भेद सगळे मार्ग अवलंबिले जातात.या मध्ये काही मध्यस्त आणि तुमचे नातेवाईक सुद्धा असतात,कुठूनही ते तुम्हाला शोधू शकतात,लपायचा काहीच चान्स नाही अस्मादिक हि याला क

पूर्वेच्या समुद्रात-४

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 12/01/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात-४ बेयपूर या ठाण्याकडून आम्ही निघालो आणि कोचीकडे कूच केले. समुद्र खवळलेला होताच. पण रोज मरे त्याला कोण रडे या न्यायाने सर्व जण त्याकडे दुर्लक्ष करत होते. हे म्हणजे एखादे आक्रस्ताळे दुसर्याचे मुल रडून तुम्हाला त्रास देत असेल तरी तुम्ही काहीही करू शकत नाही तेंव्हा त्याकडे दुर्लक्ष करायला शिकता तसे. काही काळाने कोचीचे बंदर दिसू लागले. तेथे समुद्र कायमच अतिशय खवळलेला असतो. तेंव्हा त्या डचमळणार्या समुद्रातून कोचीच्या संथ पाणी असलेल्या कालव्यात (बैक वाटर) शिरली तेंव्हा जोराच्या पावसात आपली गाडी एकदम बोगद्यात शिरते तेंव्हा कसे एकदम आवाज बंद होऊन शांत वाटते तसे वाटू लागले.

एक गोपनिय कट्टा.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 11/01/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मिपाचे लोक कुठे गप्पा मारत बसतील याची काय ग्यारंटी नै. असेच रमत गमत काही मंडळी वेरुळला येऊन गेली. मलाही काही मिपाकरांना भेटायला नेहमी आवडतं. धन्या आणि वल्ली हे माझे मित्रच पण या निमित्ताने मला अतृप्त आत्मा यांना आणि प्रगोला भेटायला मिळालं.

कार्टून्स आणि कॉमिक्स

लेखक पिंपातला उंदीर यांनी शुक्रवार, 09/01/2015 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला .

निसर्ग, शेती आणि शेतकरी

लेखक स्वधर्म यांनी गुरुवार, 08/01/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच मिपावर उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं हा लेख वाचला. त्यावर भरपूर प्रतिक्रीयाही आल्या. त्यानिमित्ताने मनात आलेले काही विचार... शेतकरी हा एक अत्यंत अन्यायग्रस्त घटक अाहे अशी हाकाटी नेहमी एेकू येते़़. त्यात बर्याच प्रमाणात तथ्य आहेही. पण शेतकर्‍यांकडे परिक्षणाच्या दृष्टीने पाहिले तर बर्याच गोष्टी आश्चर्यकारकरित्या आपल्या समोर येतात. शेतकरी हे पूर्वी आपले व आपल्या कुटुंबाचे पोट प्रथम भरून मगच उरलेल्या उत्पन्नाची विक्री करायचे.