लेखकविशाल चंदालेयांनी शुक्रवार, 06/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी,
सध्या दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय. मराठवाड्यात तर फार विदारक परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील मैलोनमैल पायपीट करावी लागतेय. यावर काही करावं म्हणून ग्राम स्वराज्य अभियान टीम
चे दुष्काळावर आणि एकंदरीतच जल/मृदा संधारणावर कामे करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गेल्या दोन ते अडीच वर्ष्यापासून लोकसहभागातून बोरवंड, परभणी येथे काम सुरु आहे.
ग्राम स्वराज्य अभियान टीमने गावकऱ्यांना ग्रामसभेचं महत्त्व पटवून देऊन सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला चांगलंच यश मिळालं. आता गावात दर महिन्याला ग्रामसभा होते आणि गावासाठीचा प्रत्येक निर्णय हा ग्रामसभेत घेतला जातो.
लेखकअभिजीत अवलियायांनी गुरुवार, 05/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व प्रथम मी चुकीच्या जागी लेख टाकत आहे त्याबद्दल क्षमस्व.
एक अतिशय महत्वाची माहिती हवी आहे.
आज अचानक हापिसातून अमेरिकेला जाशील का जून मध्ये अशी विचारणा झाली आहे. pittsburg ला जायचे आहे ५ महिन्यासाठी. तर काही माहिती हवी आहे.
१) pittsburg मध्ये ५ महिन्यासाठी भाड्याने घर मिळते का? का युके सारखा ६ महिन्याचा नियम आहे.
तसेच माझ्याकडे सोशल सिक्यूरीटी नंबर नसल्याने गेल्या गेल्या घर मिळेल का? त्याच्याशिवाय तिथे पानही हलत नाही असे ऐकले आहे.
२) family साठी (मी, पत्नी आणी मुलगा) 2bhk घेणे नियमाप्रमाणे बंधनकारक आहे का?
लेखकवेल्लाभटयांनी शुक्रवार, 29/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2016/04/wablewadi-school-visit-inspirational.h…
ज्या शाळेतून मुलांचा पाय निघता निघत नाही, त्या शाळेला भेट दिल्यावर आमचेही पाय तिथून निघत नव्हते. वाबळेवाडीच्या शाळेबद्दल इंटरनेटवर वाचल्यापासून ती शाळा बघण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. एका नकोनकोशा वाटणा-या शाळेतून एका हव्याहव्याशा शाळेत झालेलं तिचं रुपांतर आम्हाला बघायचं होतं. तिथली नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती समजून घ्यायची होती. तिथल्या मुलांशी, त्यांना घडवणा-या शिक्षकांशी आम्हाला बोलायचं होतं.
लेखकमार्मिक गोडसेयांनी सोमवार, 25/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामींच्या भेटीची वाट पहाणार्या लोकांच्या नजरा सँडल्सचा टॉक टॉक असा आवाज करत दरबारात प्रवेश करणार्या अँजेलिना जोलिकडे वळल्या. स्वामींची अपॉइंटमेंट घेतल्यामूळे तीला स्वामींच्या भेटीसाठी थेट प्रवेश मिळाला. चेहरा वाचन, हस्तरेषा व कुंडलीवरून अचूक भविष्य सांगण्याच्या कौशल्यामूळे त्यांना देश विदेशात यशस्वी जोतिष विशारद म्हणून ओळखले जाते. स्वामींची किर्ती ऐकून जोली आपले भविष्य जाणण्यासाठी वाराणसीत आली होती.
सँडल्स बाहेर काढून जोलि पांढर्याशुभ्र गादीवर मांडी घालून स्वामींसमोर बसली, भारतीय पद्धतीने जोलिने स्वामींना नमस्कार केल्यावर स्वामींच्या चेहर्यावरील तेजात अजुनच भर पडली.
लेखकपुणे मुंग्रापंयांनी सोमवार, 25/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जे खातो ते ‘तेच’ आहे का, असा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही, म्हणजे बटाटेवडा मागितला आणि मका पॅटीस समोर आले, तर ओळखतोच की पटकन! किंवा तेलपोळीला कुणी पुरणपोळी म्हणू लागले तर त्याला वेडयातच काढू की नाही?