Skip to main content

माहिती

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 28/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे. मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले :) म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते.

साडेतीन शहाणे

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 22/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आपण नेहमी साडेतीन शहाण्यांबद्दल ऐकतो. कोण होते हे साडेतीन शहाणे? माझ्या कुवतीनुसार याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला. हे साडेतीन शहाणे म्हणजे पेशवाईच्या काळातील जिवा, सखा, विठा, नाना. १. सखा : सखारामबापू बोकील - पेशव्यांचे कारभारी - थोरल्या माधवरावांचे प्रथम कारभारी पण राघोबादादांचे खास २. जिवा: जिवाजीपंत चोरघडे - नागपूरकर भोसल्यांचे कारभारी ३. विठा: विठ्ठल सुंदर - हैद्राबादच्या निजामाचा वजीर ४. नाना: नाना फडणवीस/फडणीस - पेशव्यांचा कारभारी यातील नाना फडणवीस प्रकृतीने अगदीच क्षीण असल्याने प्रत्यक्ष युध्दात भाग घेत नसत. त्याने कधीही तलवार गाजवली नाही.

विजय तेंडुलकर लेखन कार्यशाळा...

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 19/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
२००५ च्या डिसेंबरात पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फ़े नाट्य लेखन कार्यशाळा होणार असे जाहीर झाले आणि स्वत: तेंडुलकर त्यात निवडक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असे जेव्हा कळले तेव्हा आपले स्क्रिप्ट तरी पाठवून देऊ, पुढचे पुढे बघू, या विचाराने एक एकांकिका पाठवून दिली आणि विसरून गेलो ... मे २००६ मध्ये लेखन कार्यशाळेसाठी माझी निवड झाल्याचे कळले. चार दिवस तेंडुलकरांचे मार्गदर्शन लाभणार या कल्पनेनेच एकदम तरंगल्यासारखे वाटत होते... या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सुमारे ८० संहिता आल्या होत्या आणि त्यामधून १६ लेखकांची निवड झाली होती... २० मे ते २४ मे २००६...

नाणेपुराण

लेखक देवदत्त यांनी रविवार, 11/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले. नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे नाणे. ५० पैशाच्या नाण्यासारखेच वाटणारे.

आनंदयात्रिकाला सलाम आणि प्रबोधनकर्त्याला दंडवत

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 01/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचा 'महाराष्ट्रभूषण' हा खिताब देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राला भूषणभूत आहेत हे सर्वांना माहीतच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर नेहमी प्रसिध्दीच्या झोतात असल्यामुळे त्यांचे नांव सर्व मराठीभाषिकाच्या चांगल्या परिचयाचे आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत गेली चौसष्ठ वर्षे अव्याहतपणे चालवले आहे.

वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 29/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश असे आहेत:- १)रवि - दिनांक १४/०५/२००८ रोजी दुपारी ०३ वाजून ३३ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. २) शुक्र- दिनांक २०/०५/२००८ रोजी सकाळी ०६ वाजून ४४ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. वरील राशीप्रवेशाच्या वेळा या मुंबई अक्षांश-रेखांशानुसार आहेत. आपला, (गणकभास्कर) धोंडोपंत

बासूदांचे 'अनुभव'

लेखक भोचक यांनी सोमवार, 28/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच. फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते.

एका उपक्रमाची ओळख

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 24/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीच्या हितसंवर्धनासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पातळींवर काम करतांना दिसत आहेत. कुणी संस्था काढतं, तर कुणी व्यक्तीगत पातळीवर काम करतं. आपापल्या कार्यक्षेत्रात काम करतांना सोबतच हे मराठीचं काम करणारे हे लोक. कुणाकडूनही कसलीच अपेक्षा न ठेवता मौन साधकासारखे यांचे काम आहे. अश्या लोकांपैकी काही लोकांना एक त्यांच्या कामाची दखल घेतल्याची जाणीव करून देण्यासाठी मराठीसाठी काम करणारे जेष्ठ कार्यकर्ते श्री द्वारकानाथ कलंत्री यांनी अश्या लोकांना मानपत्र देण्याचे ठरवले. मानपत्र सोबतच इतरही अश्याच वेगवेगळ्या उपक्रमी लोकांची माहिती देण्यात आलेली आहे. जेणे करून अश्या लोकांची माहिती समाजाला व्हावी.

कॅलिडोस्कोप...

लेखक स्वाती राजेश यांनी गुरुवार, 24/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
विजभाऊंनी धमालच्या लग्नाची तयारी सुरू केली. त्यातील एक एक पात्रे डोळ्यासमोरून तरळून गेली. इथे मिसळपाव वर काही सदस्यच एकमेकांना प्रत्यक्ष ओळखतात. पण काही नुसतीच कल्पना करतात. कोण कसा असेल? त्याच्या लिखाणावरून, दिलेल्या प्रतिक्रीयेवरून आपण त्याची प्रतिमा डोळ्यासमोर आणतो. त्यातील एक गंमत म्हणजे त्यांची मि.पा. वर असलेली नावे. काय एक-एक भन्नाट आहेत. त्यावरून सुद्धा मनात एक त्याची छबी उमटते...कि हा असा असेल, ही अशी असेल.... तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल ना? मग लिहा ना? कृपया, कुणालाही दुखवण्याचा हेतु नाही.