Skip to main content

लेख

कसा जपावा मराठी बाणा?

लेखक शंकर पु. देव यांनी शनिवार, 14/05/2011 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सरकारची मराठीबद्दलची असणारी आस्था किती बेगडी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. विरोधकांनी मराठीचा मुद्दा उचलून धरुन राजकारण सुरु केले की सत्तेतील राज्यकर्त्यांना मराठीचे प्रेम वाटू लागते. आम्हालाही मराठीबद्दल किती तळमळ आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यकर्ते करतात. पण कुठे ना कुठे नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी सरकाअचे हे पुतना मावशीचे प्रेम उघडे पडते व सरकार तोंडघशी पडते. सांस्कृतिक संचनालय हे किती सुसंस्कारीत आहे हे लपून राहिलेले नाही. म्हणूनच पारितोषिकांचे नामांकने जाहिर करताना नेहमीप्रमाणे सरकारी गोंधळ घातला गेला.

तुला काय व्हायला आवडेल?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 12/05/2011 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला काय व्हायला अवडेल?"हा प्रश्न आपल्याला बालवाडीपासुन अनेकदा विचारला जातो.फक्त जे आपल्याला व्हायला अवडेल,तसं आपण होणं ईतरांना कधिच रुचत नाहि,हे नंतरहुन दिसुन येत.म्हणजे वरपांगि या प्रश्नाचं स्वरुप,हे आपलि आवड जाणवुन घेणारं वाटलं,तरी अंर्तयामि कारभार निराळाचा असतो.कसा?..तर हा संवाद पहा--पात्र क्रमांक-१)बालाक.पात्र क्रमांक-२)पालक... पालाक:- बबन्या,खरं खरं संग हं,तुला काय व्हायला अवडेल?

सदाबहार नाना

लेखक निनाद यांनी बुधवार, 04/05/2011 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्यातच विकीवरच्या माहितीत भर घालून त्याचा लेख केला, तो येथे देत आहे. अधिक माहिती इतर सदस्य देतीलच त्यानुसार विकीवरचा लेखातही भर घालता येईल. ---- जगदीश खेबूडकर (जन्म १० मे इ.स. १९३२ - मृत्यू ७९व्या वर्षी, ३ मे २०११ रोजी) हे मराठी ज्येष्ठ गीतकार होते. जगदीश खेबूडकर यांना नाना असेही संबोधले जात असे. त्यांचा जन्म कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, (की हळदी?) या गावी झाला.

जंक फूड चं घातक जाळं

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 30/04/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी मी माझ्या मैत्रिणी बरोबर जवळच्या मॉल मधे खरीदी करायला गेले होते. सोबत तिचा ३ वर्षाचा मुलगा- रोहन पण होता. मॉल च्या दारातच एक मोठा विदुषक होता जो सर्व मुलांना फुगे देत त्यांच्या 'फास्ट फूड' रेस्टॉरन्ट मधे यायचा आग्रह करत होता. ते बघताच रोहन 'मम्मा फ्राईज' 'मम्मा बर्गर' 'मम्मा आईस्क्रीम' अश्या बऱ्याच विनवण्या व मग हट्ट करू लागला. तिथून त्याला कसं बसं समजावून पुढे निघालो तर तो 'कुकीझ' म्हणून ओरडला. आई तशीच पुढे निघून जातीये हे लक्षात येताच, त्याने तिथेच फतकल मारून चांगलाच गोंधळ घातला. शेवटी वैतागून माझी मैत्रीण त्याला फूड कोर्ट मधे घेऊन गेली आणि त्याचे हट्ट पुरव्ल्यावरच तो शांत झाला.

सावरकर आणि समाजकारण - पु.ल. देशपांडे

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 24/04/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
--------------------------------------------------------------------- 'सावरकरांच्या जिवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती' --------------------------------------------------------------------- नुकताच किसन शिंदे यांनी पु.ल.देशपांडे यांच्या एका भाषणाचा संदर्भ दिला होता. ते भाषण वाचताना आणि त्यातील स्वा.सावरकरांच्या उल्लेखाने त्यांच्याच अजून एका सुंदर भाषणाची आठवण जागी झाले. स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीला, २६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातील मैदानात पु.ल.देशपांडे यांनी भाषण केले होते.

जलालाबादच्या रणसंग्रामातील हुतात्म्यांचा ८१ वा स्मृतिदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 24/04/2011 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक२२ एप्रिल. चितगांव शस्त्रागार विजयाच्या जलालाबादपर्वातील हुतात्म्यांचा ८१ वा स्मृतिदिन. स्वातंत्र्यसंग्रामाच्या सशस्त्र क्रांतिपर्वात ’चितगांव’ घटना ही एक असामान्यच आहे, इतिहासातील ते एक सोनेरी पान आहे. १९१६ साली आयरिश क्रांतिकारकांनी सशस्त्र लढा उभारला आणि डब्लिन जिंकुन घेत तब्बल सात दिवस ताब्यात ठेवलं या घट्नेपासून स्फूर्ति घेत एका सामान्यातल्या असामान्य माणसाने म्हणजे मास्टरदा उर्फ मास्टर सूर्यसेन यांनी सशस्त्र संघटना स्थापन केली - भारतिय प्रजासत्ताक सेना - म्हणजेच उत्तरेतील ’हिं.स.प्र.से’चा पूर्वेतला अवतार.

तुम्ही बी घडाना ....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 22/04/2011 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूरशी एक घट्ट छान भावनिक नातं आहे. मामाच्या गावाशी असावं तसंच. त्यामुळे पुढे आयुष्यभर वेळोवेळी चघळाव्या अशा लहानपणीच्या अनेक आठवणींचे भले मोठे गाठोडे आहे. एकटे असताना प्रवासात, तासंतास मित्राची, कस्टमरची वाट बघताना किंवा नुसतेच रिकामे असताना जवळ असणा-या समृद्ध अडगळीतुन कधीतरी असे एखादे गाठोडे अचानक बाहेर येतं. मग गाठोड्यातल्या एकएक आठवणींशी गप्पा मारायला, आता थोड्या वेगळ्या संदर्भातून बघायला धमाल येते. कोल्हापुरच्या महलक्ष्मी मंदिराच्या म्हंजे अंबाबाईच्या देवळातल्या आठवणींचाच एक भला मोठा संच आहे.