ओस का मोती

लेखनविषय:
लेखनप्रकार
अरे तुझी पहीली भजी अजून संपली नाही? आईने गरमागरम कांदाभजीचा दुसरा घाना काढून माझ्या प्लेट मध्ये टाकताना प्रश्न केला. मी प्लेट फ्रिजवर ठेवून कांदाभजीचा एकच तुकडा खाऊन भजांमध्ये बोट फिरवत होतो. अरे कसला विचार करतोय ? तब्येत ठीक आहे ना? आईने विचारले. अगं आई अमिषा सोडून गेली. आई एकदम गोंधळून गेली. हातातील झारा ताटात ठेवला आणि गॅस बंद केला. काय झालं नेमके तुमच्यात सोडून जाण्यासारखे? रविवारचा दिवस, फोर्टमध्ये थोडीफार भटकंती करून स्टेशनवर आलो. रात्रीचे नऊ साडेनऊ झाले असतील, ठाणे लोकल बरीच रिकामी होती. मी ज्या डब्यात चढलो त्यात जेमतेम दहा बारा प्रवासी असतील. मी दारात उभा होतो.

"राहुल द्रविड- The Unsung Hero Of Indian cricket"

लेखनविषय:
लेखनप्रकार
कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यापासून नेहमी त्याच्या वाट्याला साईड हिरोचीच भूमिका आली. त्याने कसोटी पदार्पणात क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ९५ धावा काढल्या पण दुर्दैवाने सौरव गांगुलीची पण ती डेब्यू (debut) मॅच होती आणि गांगुली ने त्या सामन्यात १३१ धावा केल्या... 2001 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ दिवस मैदानावर तग धरून त्याने ३५३ चेंडूत १८० धावा केल्या पण दुर्दैवाने त्याच सामन्यात व्ही. व्ही. एस लक्षमणने २८१ धावा काढल्या.. १९९९ च्या विश्वचषकात त्याने १२९ चेंडूत १४५ धावा काढल्या हीपण खेळी कुणाच्या लक्षात राहिली नाही कारण त्या सामन्यात गांगुलीने १८३ धावा काढल्या होत्या.

पुस्तक परिचय: मनात -- भाग १

लेखनविषय:
लेखनप्रकार
----
अभियांत्रिकीमधे करियर असूनही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात रुची जपणारे, किंवा इतर विषयात नाक खुपसणारे, खोऱ्याने सापडतील. अभियंत्यांचा तो अवगुण म्हणावा लागेल, किंवा तार्किक आणि तांत्रिक निश्चिततेचा कंटाळा.

ध्यान- लाखमोलाचं लक्ष!

लेखनविषय:
लेखनप्रकार
IMA- परभणीद्वारे ध्यान सत्र सर्वांना नमस्कार. परभणीमध्ये इंडियन मेडीकल असोशिएशन अर्थात् 'आयएमएच्या' वतीने ध्यान सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ते सत्र घेतानाचा अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. मला हे सत्र घेण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आयएमए परभणी व डॉ. अनील दिवाण सर, डॉ. जी. एम. चांडक सर, आयएमए परभणीचे अध्यक्ष डॉ. अनील कान्हे सर, श्री. कारेगांवकर सर व सर्वांना धन्यवाद. त्याबरोबर ह्या आयोजनामध्ये अनेक प्रकारे सोबत असलेल्या निरामय परिवाराचेही धन्यवाद.

युट्युबर्सना किती पैसे मिळतात?

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरांनो, नुकत्याच प्रकाशित झालेल्या माझ्या "नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||" आणि मिपाकर धर्मराजमुटके ह्यांच्या "काय बोलावं सुचेना !" ह्या दोन धाग्यांवर, युट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडीओं पासून ते तयार करणाऱ्या क्रिएटर्सना/चॅनल्सना किती उत्पन्न मिळते ह्याबद्दल आलेले काही प्रतिसाद वाचल्यावर एका प्रतिसादाला उत्तर देण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला होता, पण विषयाची व्याप्ती थोडी मोठी आहे त्यामुळे थोडक्यात उत्तर देणे शक्य नसल्याने स्वतंत्र लेख

नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||

लेखनविषय:
काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री.

प्रथम नागरिकाचा दिमाखदार शपथविधी

लेखनप्रकार
Presidential Buggy नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.

राष्ट्रपतींचे डबे

Presidential Saloon भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता.

वह्या पुस्तके

जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते. आजकाल सरकारी शाळातच सरकारी पुस्तके मिळत असतात. त्यामुळे शालेय सामाना मिळणार्‍या दुकानांत पुस्तकांची विक्री सोडून वह्या व इतर गोष्टी विकायला ठेवतात. नाही म्हटले तरी इंग्रजी शाळांतील मुलांना मात्र पुस्तके दुकानातूनच खरेदी करावी लागतात.

आपण सगळेच अश्वत्थामे

लेखनविषय:
लिहीण्याचा उद्देश जे उत्कटतेने वाटते ते लिहावे.चुक,बरोबर,चांगले वाईट हे वाचणाऱ्यांनी ठरवावे. युगांत(इरावती कर्वे),मृत्युंजय, युगंधर आणी आता अश्वत्थामा ही पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने वाटली,ती म्हणजे महाभारतातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्माची फळे भोगून मुक्त झाली. प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर व दुसर्‍यांच्या लेखी चुक होता,अश्वत्थामा सुद्धा. अश्वत्थाम्याचे चिरंजीवीत्वाचे वरदान ऐवढे शापित निघेल हा विचार कदाचित नियतीने सुद्धा केला नसावा. म्हणूनच अश्वत्थाम्या नंतर तीने (नियतीने) कुणालाच हे वरदान दिले नसावे. अश्वत्थामा शेवटचा चिरंजीव. अश्वत्थामा आपल्या कर्माची फळे भोगतोय.
Subscribe to लेख