सेनापती - (कथा)
संध्याकाळचे साडेपाच वाजले होते . श्री. रायचंद घाईघाईने मीटींगरुममधुन बाहेर पडले आणी आपल्या केबिनकडे जाउ लागले . दिवसभरातील उरलेली कामे संपवून सहा वाजेपर्यंत घरी निघायचे असा त्यांचा बेत होता . रायचंद हे शहरातील एका नावाजलेल्या जुनीअर कॉलेजमध्ये अॅडमिनीस्ट्रेशन विभागाचे प्रमुख होते . काही वर्षांपासुन कॉलेजमधील नवीन अॅडमिशनसची धुराही तेच सांभाळत होते. कॉलेजच्या संचालकांची त्यांच्यावर विशेष मर्जी असल्यामुळे , कॉलेजचे प्राचार्यसुद्धा त्यांच्याशी दबकुन , नरमाईने वागत असत .
मिसळपाव