Skip to main content

लेख

बेधुंद (भाग २ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी सोमवार, 15/02/2016 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षला ने त्याचा हात झटकला , आपले डोळ्यावर आलेले केस बाजूला करत ती बोलली - 'नको ना नितेश , प्लीज …. जसा हर्षला ने त्याचा हात झटकला , तस नितेशच मनही त्याला झटके देऊ लागले , अन त्या झटक्याने त्याला २ महिन्यापूर्वीची त्याची आयुष्याला कलाटणी देणारी घटनेत अडकवले . अन तो काही क्षणासाठी स्तब्ध झाला . साधारण दोन महिन्यापूर्वी : जवळपास एक वर्ष 'चोरून' सुरु असलेल 'त्याच अन हर्षला'च प्रेम प्रकरण आता 'जगजाहीर' झालं होत . काही गोष्टी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी लपत नाहीत !

प्रेम !!! ???

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 15/02/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण! आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो. मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. तसे सरधोपट कथानक! किशोरवयीन फ्लोरेन्तिनो फार्मिनाच्या प्रेमात पडतो. बिचारा गरीब असतो.पण त्याचे प्रेम भारी असते.

जंटलमन्स गेम - ९ - किम ह्यूज.. द गोल्डन बॉय

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 14/02/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटच्या खेळात वैयक्तिक कौशल्याला महत्वं असलं तरी अखेर क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे असं नेहमी म्हटलं जातं. अनेकदा वैयक्तीक कामगिरीपेक्षाही संघातील सर्वांची मिळून कामगिरी कशी होते यावर मॅचच्या जयापराजयाचं पारडं झुकत असतं. अर्थात यालाही अपवाद आहेतच! चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे १९७५ च्या वर्ल्डकपमधली 'गॅरी गिल्मोर मॅच' म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सेमी-फायनल! एखादा खेळाडू एकहाती मॅच कशी जिंकतो याचं हे उत्कृष्टं उदाहरण! आणखीन एक उदाहरण म्हणजे १९८३ च्या वर्ल्डकपमधली भारत-झिंबाब्वे मॅच आणि त्यातली कपिलदेवची १७५ रन्सची इनिंग्ज!

दिल से सलूट....

लेखक dipak bhutekar यांनी रविवार, 14/02/2016 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

राशोमोन (भाग - ३) भिक्षू

लेखक Anand More यांनी रविवार, 14/02/2016 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ ------------------ Mandar Kale's Response तुम्ही 'हरण्याऐवजी' ,'गमावणे' हा शब्द सुचवला आणि माझ्या मनातले विचार अजून स्पष्ट होण्यास मदत झाली म्हणून जे लेखन मी काल संपवले होते त्याचा अजून एक धागा लिहावासा वाटला.

रुग्णालयांशी संलग्न दुकानातून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही -------

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 13/02/2016 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे सात वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यात आमचा नातू चि. इशान याला व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप आला. पुढे ते इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहोचले व त्यामुळे तो अत्यवस्थ झाला. ताबडतोब त्याला सह्याद्री हॉस्पिटल मध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्याला ADEM नावाचा दुर्मिळ रोग झाला आहे ,असे मेंदूविकाराचे तज्ञ डॉ. दिवटे यांनी निदान केले. त्यावर एकमेव इलाज म्हणून Iviglob या आयात केलेल्या औषधाची इंजेक्शन्स रोज तीन वेळा याप्रमाणे पाच दिवस देण्यात आली. तो ९ जानेवारी ते १३ फ़ेब्रुवारी या मुदतीत सह्याद्री हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात होता. औषधोपचार लागू पडून तो बरा झाला याबद्दल आम्ही हॉस्पिटलचे मनापासून आभारी आहोत.

राशोमोन (भाग - २) चित्रपट

लेखक Anand More यांनी शनिवार, 13/02/2016 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ---------------------- मी चित्रपट पाहणार नव्हतो. आणि न पाहताच जर त्यावर काही लिहिले असते तर माझ्या मतावर तुमच्या मताची दाट छाया पडली असती किंवा माझे मत परप्रकाशित राहिले असते. याचा अर्थ असा नव्हे की मला जाणवलेला चित्रपटाचा अर्थ तुम्हाला जाणवलेल्या अर्थाच्या पूर्ण विरुद्ध आहे.

राशोमोन (भाग - १) प्रास्ताविक

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 12/02/2016 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
ही लेखमाला वाटली, तरी प्रत्यक्षात ३ आणि ४ ऑक्टोबर २०१५ रोजी मंदार काळे ऊर्फ रमताराम आणि माझी फेसबुकवर जे साद प्रतिसाद झाले त्यांची तीन भागातील मालिका आहे. यातील संदर्भ समजून घ्यायचा असेल तर रमतारामांची मिपावर पूर्वी प्रसिद्ध झालेली राशोमोनवरची जंगलवाटांवरचे कवडसे ही आठ भागांची लेखमाला वाचायला हवी. संदर्भ सोडून वाचल्यास कदाचित फक्त पहिला भाग थोडा कठीण जाईल पण किंचित प्रयत्नाने दुसरा आणि तिसरा भाग मात्र समजू शकेल.

सेपकू भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/02/2016 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
अस्वीकरण : या कथेमधे पुढे जे सेपकूचे वर्णन आले आहे ते सर्वांनाच भावेल असे नाही. किंबहुना कमकुवत मनाच्या वाचकांनी ते वाचू नये अथवा वाचल्यास आपल्या जबाबदारीवर वाचावे. या कथेच्या मूळ लेखकाने जपानमधील मला माहीत असलेली शेवटची सेपकू केली. त्याने हे वर्णन केलेले असल्यामुळे ते वास्तववादी असण्याची शक्यता जास्त आहे. या लेखकाच्या तीन कथा मी लिहिणार आहे. त्यातील दुसरी त्याचीच कथा असेल.

सेपकू भाग -१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 11/02/2016 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
सेपकू : अस्वीकरण : या कथेमधे पुढे जे सेपकूचे वर्णन आले आहे ते सर्वांनाच भावेल असे नाही. किंबहुना कमकुवत मनाच्या वाचकांनी ते वाचू नये अथवा वाचल्यास आपल्या जबाबदारीवर वाचावे. या कथेच्या मूळ लेखकाने जपानमधील मला माहीत असलेली शेवटची सेपकू केली. त्याने हे वर्णन केलेले असल्यामुळे ते वास्तववादी असण्याची शक्यता जास्त आहे. या लेखकाच्या तीन कथा मी लिहिणार आहे. त्यातील दुसरी त्याचीच कथा असेल.