मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

खंडाळ्याच्या घाटाची १६० वर्षे

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
खंडाळा स्टेशन मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.

बदललेला स्वभाव.

Deepak Pawar ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(काल्पनिक...!) सकाळी जाग आली ती मिक्सरच्या आवाजाने. आज रविवार सुट्टीचा दिवस ठरवलेलं चांगली झोप काढावी. पण निवांतपणे झोपून देईल ती बायको कसली. प्रेत्येक सुट्टीच्या दिवशी कशा ना कशाच्या आवाजानेच झोप मोड होते. कधी भांड्याचा आवाज, कधी कपडे धुण्याचा आवाज, तर कधी आणखी कशाचा आणि काहीच नसलं तर मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्याच्या आवाजानं.

लोकभ्रम- गूढचिकित्सामंडळ

प्रकाश घाटपांडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला माझ्या ज्योतिषछंद जोपासताना एक वाईट सवय आहे. एखाद्या संदर्भ वा माहिती साठी त्याच्या मागे हात धूवुन लागण्याची. तसे ही अनुत्तरीत प्रश्न मला अस्वस्थ करतात त्यामुळॆ मी त्या प्रश्नांच्या मागे लागतो. . तेव्हा मी मुंबईला नोकरीला होतो. मी पॅंटच्या मागच्या खिशात एक छोटी डायरी ठेवत असे. त्यात मी माहिती, संदर्भ असे संकीर्ण टिप्पण ठेवत असे.ग्रंथालयात गेलो वा एखाद्या भाषणाला गेलो व तिथे काही दुर्मिळ माहिती मिळाली की मी ती डायरीत लिहित असे. अगदी आता आता पर्यंत ती सवय होती. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जुने ग्रंथ चाळताना एकदा मला रा.ज.

प्याद्याचा डाव

शेखर काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्याद्याला कधी कधी कळत नाही की त्याचे चलन त्याला हलवणाऱ्या हातांकडून होत असते. त्या खेळातले नियम, चाली त्या हातांकडून ठरवले जातात. हा प्यादा राजा व्हायच्या मार्गावर पुढे सरकत होता. कधी सरळ, कधी तिरका. एक शेवटचे घर उरले होते त्याला राजा होण्यासाठी. तेव्हढ्यात, हातांमागच्या डोक्यांमध्ये काही दृष्टिक्षेप झाले, काही खाणाखुणा झाल्या आणि प्याद्याचे त्या पटावरील आयुष्य संपले. त्याने आपला लॅपटॉप बंद केला - तो इथेच ठेऊन जायचे होते, गेल्याच महिन्यात बढती मिळाल्या निमित्तच्या पार्टीसाठी घेतलेला कोट/जॅकेट, खुर्चीच्या पाठीवरून उचलला, झटकून हातावर टाकला.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

पराग१२२६३ ·
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

पुस्तक परिचय: बनगरवाडी - लेखक: व्यंकटेश माडगुळकर

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला कल्पना आहे बहुतांश मिपाकरांनी हे पुस्तक आधीच वाचलं असेल. ज्यांनी ते वाचलेलं आहे त्यांच्या आठवणींना उजाळा व ज्यांनी वाचलं नाहीये त्यांना या पुस्तकाबद्दल माहिती मिळावी यासाठी हा परिचय लिहीत आहे. काही दिवसांपूर्वी मी ही कादंबरी वाचली..लेखक व्यंकटेश माडगुळकर यांची मी वाचलेली ही पहिलीच कादंबरी होती. आणि पहिलीच कादंबरी वाचून मी लेखकाच्या प्रेमात पडलो.. मी आत्तापर्यंत वाचलेल्या कादंबऱ्यांपेक्षा ही एक वेगळ्या धाटणीची कादंबरी आहे असं मला जाणवलं.. या सगळ्यामुळे या कादंबरीबद्दल लिहायचा मोह मला आवरता आला नाही. व्यंकटेश माडगुळकर यांनी १९५५ साली लिहलेली ही कादंबरी आहे.