मी पौंगसावस्थेत असतांना काही कारणांमुळे माझे शिक्षणातून लक्ष उडाले.बरीच वर्षे अशी वाया गेली.पण वाचन मात्र सोडले न्हवते.त्याच सुमारास एक कथा वाचनात आली.
एका ऋषी कडे एक शिष्य असतो.त्या शिष्याला पण माझ्यासारखाच शिक्षणात रस न्हवता.एक दिवस तो ऋषीचे घर आणि शिक्षण, ह्या दोघांना रामराम करतो आणि परत आपल्या गावी जायला निघतो.वाटेत तहान लागल्यामुळे, तो एका विहिरीपाशी पाणी प्यायला जातो.तेंव्हा त्याला दिसते की, सतत दोरी घासल्या मुळे तिथल्या एका दगडाला चीर पडली आहे.त्याच क्षणी त्याला जाणवते, की एखादे ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवून, ते ध्येय गाठायचा प्रयत्न केला की, आज नाही तर उद्या, ते ध्येय साध्य होतेच.
तो पर