मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

‎निर्गुणी भजने‬ (भाग १)

Anand More ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला गाण्यातलं फार कळत नाही. रागांची नावं वगैरे तर अजिबातच नाही. शाळेत संगीताच्या तासाला मी दाणी बाईंचा फार आवडता विद्यार्थी असावा. कारण रागाची नावे, त्यांची लक्षणगीते, ते कधी म्हणावेत याचे संकेत, या किंवा अश्या सारख्या सर्व प्रश्नांना तोंडी परीक्षेत मी केवळ एकच उत्तर देत असे, 'आठवत नाही'. त्यामुळे माझी तोंडी परीक्षा लवकर आटपायची आणि लेखी पेपर तर माझ्या पुढे बसलेल्या मुलाचा तपासला की माझे मार्क आपोआप ठरायचे. त्यामुळे बाईंच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षण मी वाचवले आहेत याची मला खात्री आहे. पण माझ्या मते मी उत्तम कानसेन आहे. सूर मला मोहात पाडतात.

चंदेरी : मियाजींचा घरी जेवणाचा किस्सा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या वर्षी चंदेरीला गेलो होतो. दुपारच्या वेळी किल्याच्या भिंतीवर पत्रावळ ठेऊन जेवत असताना, खाली दूरवर पसरलेल्या चंदेरी नगरावर नजर केली. दूर कुठून ढोल ताश्यांचा आवाज येत होता, कुठली तरी मिरवणूक निघत होती. आपल्या मेहुणीला विचारल्यास कळले, आज रामापीरची जयंती आहे. रामापीरची शोभायात्रा निघत असेल. हिंदू- मुसलमान दोन्ही धर्माचे लोक रामा पीरला मानतात. हिंद-मुसलमान, सर्वजातीय लोक या शोभा यात्रेत भाग घेतात. चंदेरीची दुकाने हि आज बंद असतात. सकाळी जेवण बरोबर घेऊन अशोकनगरहून का निघालो होतो ते हि कळले.

कहे कबीरा (२)- सुनता है गुरु ग्यानी !!

मनमेघ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुनता है गुरु ग्यानी । गगन में आवाज हो रही झीनी झीनी । नभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात. आणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात.. सुनता है गुरु ग्यानी? गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना? बघ तर तुला काय सांगतो हा आवाज? ज्या ढगांचा हा आवाज आहे त्यांच्या पलीकडे पाणी आहे. आणि त्या बिंदूच्या आधीही 'नाद' ऐकू येतो. साधनेत सर्वप्रथम 'अनहत नाद' च ऐकू येतो आणि मग बिंदू दिसतात.

दारावर भाजी महाग का?- स्पष्टीकरण भाजीवाल्याचे

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे. तसे म्हणाल तर आठवड्यातून २-३ दिवस घराच्या १-२ किमी परिसरात कुठला ना कुठला साप्ताहिक बाजार हा लागतोच. पण नेहमीच अश्या बाजारांंत जाणे जमत नाही. आठवड्यातून एक-दोनदा तरी आमची सौ. दारावर भाजी विकत घेते. भाजीवाला जवळपास राहणारा आहे. हा भाजीवाला दररोज ठेल्यावर भाजी सजवून संध्याकाळी ५ ते रात्री ९-१० पर्यंत भाजी विकण्यासाठी उत्तम नगरच्या गल्ली बोळ्यात फिरतो. साधारणत: हा हिवाळ्याच्या दिवसांत २०० किलो आणि उन्हाळ्यात १५० किलो भाजी विकतो. पावसाळ्यात याहून कमी. गेल्या आठवड्यात ४ दिवसांच्या सुट्ट्या होत्या, घरीच होतो. सौ.

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी

शरद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी भारतात स्त्रीयांवर अन्याय क्ररण्याची परंपरा अतिप्राचीन काळापासून आहे. सीता व द्रौपदी यांचे उदाहरण सर्वांना माहीत असते. पण त्या पूर्वीही पार वेदकाळातही हे चालूच होते. बृहदारण्यकातली गोष्ट घ्या. गार्गी ही विद्वान ब्रह्मचारिणी. ऋषीमंडळात चालणार्‍या वादविवादात हिरीरीने भाग घेणारी. पण बिचारीवर एकदा दुर्धर प्रसंग ओढवलाच. याज्ञवल्काबरोबरच्या एका चर्चेत ती प्रश्न विचारत होती व याज्ञवल्क उत्तरे देत होता. तीचा शेवटचा प्रश्न होता "ब्रह्म कशात सामावते ?’ शिघ्रकोपी याज्ञवल्काने तिला दरडावले "गार्गी, अतिप्रश्न विचारू नकोस.

कहे कबीरा (१) - हीरना समझ बूझ बन चरना-

मनमेघ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हीरना समझ बूझ बन चरना ।। कुणी तरी अमुक व्यक्ती चूक करणार आहे आणि ती चूक त्याच्या जिवावरच बेतणार आहे हे दुसऱ्या कुणा तमुक व्यक्तीला समजलं तर ती तमुक व्यक्ती अमुक व्यक्तीला सावध करेल. ती चूक करु नकोस म्हणून सांगेल. अमुक आणि तमुक जर खूप जवळचे असतील तर ज्या तळमळीने हे सावध करण्याचं काम होईल तीच तळमळ कबीरांची आहे आणि हे भजन गाणाऱ्या कुमारांचीही. कुमारांनी सुरुवातीचं 'हीरना'च असं काही म्हटलंय की ऐकताना ते आपल्यालाच उद्देशून आहे असं वाटतं. हरीण हा चंचल प्राणी आहे. एका जागी फार न थांबता हरीण जंगलात विहार करीत राहते. त्या जंगलात कुठे काय आहे याची त्याला जाणीव नाही.

साथ : एक आकलन

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साथ : एक आकलन - डॉ. सुधीर रा. देवरे साथ हा रस्त्यावरचा दीप क्षीण तेजात तेवतो एकटा भीषण काळोखात - तिष्ठते कुणि तरी समोरच्या खिडकीत ; केव्हढी तयाची सोबत आणिक साथ. - इंदिरा संत साथ! श्रीमती इंदिरा संत यांची ही कविता. फक्‍त आठ ओळींची आणि दोन कडव्यांची आहे. या कवितेतला प्रत्येक शब्द महत्वाचा असून कविता आस्वादण्यापूर्वी तिच्या शब्दांचा – म्हणजेच तिचा भाषिक पसारा पाहू : हा - कोणताही दीप नव्हे. विशिष्ट दीप.

संदीप खरे

अनुप देशमुख ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खर तर संदीप(एकेरी उल्लेखाबद्दल क्षमस्व पण संदीपला सर किंवा अहो म्हणण म्हणजे तो खूप लांब गेल्यासारखा वाटतो) तर संदीप माझ्या फार पूर्वीपासून ओळखीचा... म्हणजे माझ्या कॉलेज पासून फक्त ऐकलेला, तेव्हा नुकतेच मनात पालवी फुटण्याचे वय. आणि त्यातच संदिपच पहील गाण कानावर पडल ते म्हणजे सरीवर सर्.... नुकताच पाऊस पडून गेलेला..मला वाटत कोणीही शहाणा माणूस ते गाणं ऐकल्यावर त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही...तेव्हाच वाटल “कुछ तो बात है इस दिवाने कि बातो मे” ...अक्षरशः दीवाना केल त्याच्या शब्दांनी...

मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते. अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे. पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात.

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

चांदणे संदीप ·
"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच! कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर! रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता. भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे?