Skip to main content

अनुभव

मी एकटा आहेच कुठे?, , , , , "खरे सुपरमॅन - आमचे आप्पा" या लेखात नमूद केलेला लेख.

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शुक्रवार, 03/06/2016 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच! अनेक वेळा खूप वैताग येई.

खरे सुपरमॅन - आमचे आप्पा

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी गुरुवार, 02/06/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच माझ्या सासर्‍यांनी (श्री. गजाननराव गोडबोले - आमचे आप्पा) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल. त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्‍या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात तेच फक्त लिहिते. ते एकटे स्वतंत्रपणे राहातात. पण डबा मागवणे वगैरे शॉर्टकट अजिबात नाही. स्वयंपाक करायला आणि झाडलोटीला बाई आहे.

माझी जंगलची सैर

लेखक दिनु गवळी यांनी मंगळवार, 31/05/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
काल घरी काहीच काम नव्हत, म्हणुन म्हटल चला आज जंगलात फिरुन येऊ, सोबत माझा मित्र अमित पण होता. आम्ही बाईक वरुन जंगलात जायला निघालो तसा जंगलात जाणारा रस्ता हा काही एवढा खास नव्हता पण बैलगाड्यांच्या जाण्यायेण्याने बऱ्यापैकी गाढ रस्ता तयार झाला होता. बंधाऱ्याच्या पिचींग वरुन जातांना खाली बघतांना खुप मस्त वाटत होत. बंधाऱ्यात थोडसच पाणी होत . काही मुले त्यात मासे पकडत होते. काही पाण्यात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटत होते., आमच्या गावाकडच्या जंगलात रानातील आंबे खायला खुप मजा येते.

हरवले ते गवसले का? कसे? ८ लक्षाधीशाचा झाला भिक्षाधीश भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 30/05/2016 02:08 या दिवशी प्रकाशित केले.

हरवले ते गवसले का? कसे? ८ लक्षाधीशाचा झाला भिक्षाधीश भाग २

पैसे परत मिळाले की नाही? ते कोणी लाटले?

... आता माझ्यातला कमांडर जागा झाला. कार्डासोबत मिळालेल्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे धडाधड फोन लावले. कार्ड ब्लॉक केले! त्यात सांगितलेल्या प्रमाणे कार्डाचे २ तुकडे करून फोटो पाठवले. कार्ड माझ्या खिशात असताना पैसे खटाखट गेले कसे या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नव्हते! तोवर भाच्याला कल्पना दिली. आम्हाला दुसर्‍या दिवशी सकाळीच ७ दिवसाच्या सहलीला जायचे कॅन्सल न करता त्याला डॉलर्सची व्यवस्था करून पैसे आणायला विनंती केली.

मी, किशोर कुमार आणि कराओके……

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 28/05/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि इतर जगातही प्रथितयश, नामांकित गायक आतापर्यंत अनेक होऊन गेले… अजूनही आहेत….गाण्यात किंवा एकंदरीत सगळ्या प्रकारच्या संगीतातच मनाला उभारी देण्याची प्रचंड ताकद आहे.नैराश्यासारख्या मानसिक अवस्थेत संगीतच मनाला नवी संजीवनी देतं.अनेकांना अनेक प्रकारचे संगीत आवडतं.मला स्वतःला विशेष शास्त्रीय किंवा सुगम संगीत वगैरे प्रकार कळत नाहीत.माझ्या कानाचा ठाव घेणारा एकमेव आवाज म्हणजे किशोर कुमार….कॉलेजमध्ये असल्यापासून जर कोणाची गाणी आवडत असतील तर ती फक्त ह्याच मनुष्याची ….ती आवड अजूनही कायम आहे आणि आयुष्यभर राहील.

बोर न्हाण

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शनिवार, 28/05/2016 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
चार महिन्यांपूर्वी माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी. आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते.

कातरवेळ

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 26/05/2016 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेळ,सूर्यास्तानंतर मिट्ट काळोख होईपर्यंतची ही वेळ, तशी जेमतेम पाऊण एक तासाची. पण ही वेळ कशी जीवघेणी असू शकते ह्याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेत असतो. एकदा सुधागडला गेलो होतो. गडावर जायचा आजचा जो प्रचलित मार्ग आहे तो आहे पाच्छापुराहून. औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर शहेनशहाशी बगावत करून आला होता ते संभाजीराजांचे साह्य घेण्यासाठी तेव्हा राजांनी त्याच्या सोय गडाच्या पायथ्याला असणाऱ्या एका लहानशा वाडीत केली होती. तेव्हापासून अकबराच्या छावणीमुळे ते ओळखलं जाऊ लागलं पाच्छापूर ह्या नावाने. आज ह्या मार्गावर एक भक्कमशी शिडी लावलीय. तेव्हा ती नव्हती. नाडसूरच्या एसटीने उतरलो ते धोडसे गावात.

माझी ज्यूरी ड्युटी - ९

लेखक शेंडेनक्षत्र यांनी मंगळवार, 24/05/2016 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ८ शेवटी दोन्ही वकिलांनी आपापल्या बाजू पुन्हा एकदा मांडल्या. सरकारी वकिलाने असे सांगितले की ह्या महिलेला मारहाण झालेली आहे, जीव घेण्याची धमकी दिली गेली आहे. तिच्यावरील जीवघेण्या आपत्तीमुळे तिच्या जबाबात त्रुटी होत्या पण मानवी मन हे अशा भयंकर घटना विसरायचा प्रयत्न करत असते त्यामुळे तसे घडले. विविध छायाचित्रे आणि डॉक्टरांच्या जबानीवरून हे दिसते आहे ह्या महिलेवर अत्याचार झालेले आहेत. तिला न्याय मिळायलाच हवा. तुम्ही तिला न्याय द्या. आरोपीच्या वकिलाने असे म्हणणे मांडले की आरोपीला विनाकारण गोवले आहे.

नस्त्या उचापती- 2

लेखक अन्नू यांनी मंगळवार, 24/05/2016 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारचा दिवस. संध्याकाळी मी नुकताच बाहेरुन आलो होतो. इतक्यात आईने- ताईचा फोन आल्याची बातमी दिली आणि त्याचबरोबर भाईंदरला जाऊन दोघा मुलांचा रिझल्ट आणण्याची आठवण पुन्हा करुन दिली. ऐकून जरा आनंद वाटला पण त्याचबरोबर थोडासा मुडही ऑफ झाला. आनंद यासाठी कि दोघांचा रिझल्ट एकाच दिवशी नव्हता. दोन वेगवेगळ्या दिवशी होता. म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीसला. कारण भाचा सिनिअरला होता, तर भाची ज्युनिअरला! साहजिकच मला दोन दिवस भाईंदरमध्ये राहावं लागणार होतं.

त्या मंतरलेल्या रात्री होत्या...

लेखक महामाया यांनी शनिवार, 21/05/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
त्या मंतरलेल्या रात्री होत्या... काय सांगता राव...! हो, त्या मंतरलेल्या रात्री होत्या. कारण रात्रभर समोर हालीवुडचा भूतकाळ आपल्या शाही लवाजम्यासह घरातील ड्राइंगरूम मधे थाटामाटात अवतरित होत असे.