अनुभव
भाग ५ अंधारछाया प्रकरण ४ - मी हिला धरतो. आता हित मटनाचं जेवान बिवान देतो म्हनत्यात. तू फक्त सोड तिला. मी बघतो तिच्याकडं. बघ कसा बकाबका खातो ते.’
अंधारछाया
चार मंगला गेले चार रात्री काही माझा डोळ्याला डोळा नाही. ह्यांनी सांगितलं, ही बेबी अशी कड्याकाढून बाहेर जाते म्हणून. मी हबकलेच. हे रात्री जागे झाले म्हणून बरं. गेली असती पुढे चालत एकटी तर शोधायची कुठे तिला ? आधीच ही नवीन गावात. रस्ते माहित नाहीत. काही म्हणता काही होऊन बसलं असतं बरं. मी यांना सांगितलं, ‘आधी सगळ्या दारांना कुलुपं घाला रात्रीची. मगच मला झोप येईल.’ हे म्हणाले मला, ‘विचार तिला काय होतय झोपल्यावर म्हणून. पण ती म्हणते, ’काही नाही मी झोपते छान. इथे आल्यापासून झोप छान लागतेय ’. मला पुढे काही सुचेना विचाराव कसं ते.फेंगशुई,कासव आणि चिरंजीव
D mart मध्ये खरेदी करत असताना चिरंजीवांची भुणभुण सुरू होती. त्याला एक काचेचे पारदर्शक रंगाचे कासव आवडले होते. ते त्याला खेळायला हवे होते. मी पाहिले, त्या ठिकाणी फेंगशुईच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या. त्यातच ते कासवपण होते. मी नाक मुरडूनच तिथून पुढे निघून गेले. माझा अश्या गोष्टींवर विश्वास नाही मात्र नवरोबांचा आहे. घरी आल्यावर सामान भरून ठेवताना पाहते तो काय! चक्क ते कासव सामानाच्या पिशवीत दिसले. मग लक्षात आले,हा उद्योग चिरंजीव आणि त्याच्या पप्पांचा आहे. दोघांनी मला नकळत खरेदी करून ते घरी आणले होते.
मग दोन दिवस ते कासव कुठे ठेवायचे यावर बापलेकांत वाद सुरू होता.
भाग ४ अंधारछाया प्रकरण ३ - ‘बेबी, बेबी’, कुठे निघालीस रात्रीची? ती हात वर करून म्हणाली, ‘ते काय, ते बोलावतायत मला. मी जाऊन येते!’
अंधारछाया
तीन बेबी स्वारगेटवर सुभाष, श्रीकांता आले होते पोहोचवायला. सुभाषच्या ऑफिसातले होते कोणी. त्यांच्या सोबतीने बसले मी सातच्या मिरज गाडीत. सुभाषला काळजी फार, ‘बेबी, पुस्तक घेतलीस का? काल आणलेली साडी ब्लाऊझ घेतलास का? दुपारच्या जेवणाचा डबा घेतलास ना? श्रीकांताला गाडी सुटायला निघता निघता केळी आणायला पिटाळलंन! ऑफिसच्या माणसाला सारखं सांगत होता, ‘प्रथमच जातेय एकटी. नीट लक्ष असू दे.’ मला तर हसूच येत होतं त्याच्या काळजीचं. जरा घाबरट आहे आमचा सुभा. एसटी चालता चालता केळी हातात पडली. हात हालवत दोघे दिसेनासे झाले. गाडी मेन रोडवर आली.मुंगूसाची गोष्ट
।। मुंगूसाची गोष्ट ।।
' गोष्ट ' हा शब्द ऐकल्यावर कान टवकारले जात नाहीत; नीट सरसावून बसत नाही; भुवया आभाळापर्यंत उंचावून उत्सुकता चेहऱ्यावरून सांडत नाही; आपण ज्यांच्याशी गप्पा छाटत होतो त्यांनाच गप्प करत "जरा ऐकू दे रे." असं म्हणत नाही, आहे का असं कोणी? दुसऱ्याही प्रकारचे मनुष्य असतातंच. म्हणजे " हा मला काय अक्कल शिकवणार? ", " हा कुठली गोष्ट सांगणार ते मला माहितेय.", "मला माहीत नाहीत अशा गोष्टीच नाहीत." अर्थात ही वाक्ताडनं मनातल्या मनातंच हो.
अंधारछाया भाग ३ प्रकरण २ - अहो थर्डक्लासातच पाहून ठरवलत होय मी नापास म्हणून? फर्स्टात नंबर असणार माझा.’
अंधार छाया
दोन दादा स्वामींची मात्र कमाल आहे. माझ्यासाठी स्वामींनी नातू शेठना शब्द टाकला! म्हणाले , ‘ शेठ, या जनार्दनला चांगलासा धंदा द्या बरं. सचोटीचा व चार पैसे मिळवणारा हवा. इथे इस्लामपुरात आल्यापासून माझ्या माहितीचा आहे हा. विश्वासू आणि सरळ मनाचा आहे. सध्या त्याला काही धंदा हवा आहे. मी त्याला ओळखतो. माझी दीक्षा घेतलीयाय त्याने. त्याला धंदा देणे तुमचे काम.’ शेठ काही बोलले नाहीत. पण नाही ही म्हणाले नाहीत. नंतर खाली डॉक्टरांच्याकडे चौकशी केली. दुसऱ्या दिवशी मला भेटायला सांगितले. पुढे मी भेटलो. त्यांच्या सोबत माधवनगरला आलो.भाग २ - अंधारछाया धारावाहिक कादंबरी - प्रकरण १
कथानकात पुढे येणाऱ्या व्यक्तींचा परिचय
शशी – लेखक. दादा – शशी चे वडील, जनार्दन. त्यांचा माधवनगरला होलसेल कापडाचा व्यापार होता. मंगला – शशीची आई, आजोळकडूनची शांता, ती वडिलांना काका व तिच्या सावत्र आईला काकू म्हणे. बेबी - शशीची मावशी, मंगलाची सावत्र बहीण, सुभाष - एसटीत क्लार्क होता व श्रीकांत – शिकत होता. हे शशीचे सावत्र मामा. मधू – शशीच्या आईचे आजोळचे आडनाव - पर्वते, मामेभाऊ, काका – बाळकोबा गोखले, शशीच्या आईचे वडील, काकू – शशीच्या आईची सावत्र आई, आजी – शशीच्या वडिलांची काकू, लता - शशीची धाकटी बहीण, स्वामी – प्रज्ञानानंद सरस्वती – शशीच्या वडिलांचे, दादांचे अध्यात्मिक गुरू, डॉ.
प्रवास एक अनुभव
निशा , उषा , आसिफा आणि जया चार बाल मैत्रिणींचा ग्रुप सगळ्या जवळ- जवळ पंचेचाळीशीच्या आसपास असतील . सगळ्या आपल्या आयुष्यात बऱ्यापैकी स्थिर झाल्या होत्या . सगळ्यांची मूल मोठी झालेली त्यातल्या काही तर चक्क आज्या सुध्दा झालेल्या . आता संसाराच्या जबाबदारीतून जरा मोकळ्या झाल्या होत्या .मग दर वर्षी ठरवून कुठ तरी फिरायला जात असत .या वेळेस ही असाच बेत ठरला होता .
चौघी रेल्वे हायस्कूलमध्ये शिकलेल्या त्या काळाच्या म्हणजेच 1983 -84 च्या प्रथेप्रमाणे कोणाचं सातवीत तर कोणाचं आठवीत , तर कोणाचं नववी तर दहावीत लग्न झालेले .
सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)
सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)
मला आंघोळ फार आवडते. अगदी आवडच आहे म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहाणपणी मी बळजबरी पाण्याच्या लहान टबात बसत असे असे घरचे सांगतात. ते माझ्या अगदीच लहाणपणी असावे. शालेय वयातदेखील मी अगदी थंडीतही सकाळी आंघोळ करूनच शाळेत जात असे. आंघोळीच्या बाबतीतला चटपटीतपणा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. गरम असू दे किंवा गार असू दे, कोणतेही पाणी मला आंघोळीसाठी अन शरीराला मानवते. गरम पाण्यासाठी आता अनेक सोई झालेल्या आहेत.
भाग १ अंधारछाया धारावाहिक कादंबरी - प्रस्तावना
प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी सत्यघटनांवर आधारित कादंबरी
एक अभिप्राय...
आत्मनिवेदनातून फुलत जाणारी कथा वस्तू, बोली भाषेतील वाक्य रचना, सर्व पात्रे रोजच्या घसटीतील असल्या सारखी आहेत. लेखन ‘जसे घडले तसे’ या स्वरूपात आहे. त्यात अतिशयोक्ती वा वातावरण निर्मितीसाठी रंगवून केलेले वर्णन नाही.
योग्य गुरूच्या मार्गदर्शनामुळे चिकाटी, दृढ श्रद्धेच्या जोरावर आसुरी शक्तींशी समर्थपणे लढा देता येतो व विजय मिळवता येतो.
मिसळपाव