अनुभव
रसूल अल्लाह आणि तो
रसूल अल्लाह या बंदिशीचा जालावरील धागा मिळविण्यासाठी चर्चा टाकाली होती. ही बंदिश मिळेल का नाही ही शंकाच होती. ती मिळाली. त्यासाठी हुप्प्याचे विशेष आभार!
या बंदिशीने मला खूप पूर्वीपासून वेड लावले आहे. या विषयावर असंख्य मिपाकरांचे प्रतिसाद मिळाले. त्यावरून रसूल अल्लाह बंदिशीवर लोक किती प्रेम करतात, हेच दिसून आले. त्यामुळे मला या संबंधीचा एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो आहे. हा किस्सा मी फारसा कुणाला सांगितलेला नाही....
एकदा रात्रपाळीचे काम उरकून आम्ही तिघेजण (त्यातील एक मिपाकर आहेत.) आत्म"शांती' करण्यास बसलो होतो. अर्थातच हॉटेलमध्ये. आमची संगीतावर चर्चा सुरू झाली.
याद्या
2360
बाली
नुकताच सुट्ट्यांमध्ये बालीला जायचा योग आला. तसं पुलंचं पुर्वरंग वाचल्यापासून बाली कायम डोक्यात घर करुन होतंच पण शेवटी योग यावा लागतो. यावेळी मात्र महाजालावरून विमान आणि हॉटेल बुकिंग करूनच टाकलं आणि सहकुटुंब बालीला जाउन आलो. या ट्रीपचा हा सचित्र वृत्तांत.
देनपसार विमानतळावर उतरण्यापुर्वी विमानातून दिसणारा हा अगुंग पर्वत. हा एक निद्रीस्त ज्वालामुखी आहे. १९६३-६४ साली याचा उद्रेक झाला होता.
रामायणावरील सुप्रसिद्ध केचक नृत्यनाटिका.
याद्या
11821
अर्धा कप चहा
अर्धा कप चहा
चहा पिणं हा तसा प्रत्येकाचा आवडता शौक .मी तसा सतत फिरत असल्यामुळे कुठेनंकुठे अर्धा कप चहा आमचा होतचं असतो.अगदी ए.सी. रुमअमध्ये बसून नाहीतर चहाच्या टपरीवर चक्क उभं राहून.वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या चवीचे चहा मी रिचवला आहे.
सरकारी कार्यालयात कामानिमित्त नेहमीच फेर्या होत असतात,असाच एकदा कार्यालयात चहा मागविण्यात आला.चहा घेऊन येणारा ‘पोर्या‘ असेल १०-१२ वर्षाचा!
याद्या
2366
गौराई आली माझ्या घरा...
गौराई कोणाच्या पावलाने आली? 'गौराई सोन्याच्या पावलांनी आली..". गौराई कोणाच्या पावलांनी आली? "गौराई मोतियाच्या पावलांनी आली.." अशा गजरात, चांदीच्या ताटात गौराईचे आमच्या घरात आगमन झाले. गौराई घरी येणार म्हणून आम्ही आरास केली होती. घरात करंज्या/पापड्या करून ठेवले होते. दारात सुबक रांगोळी काढली होती, दाराला तोरण लावलं होतं. दारात लक्ष्मीची पावलं हळदी-कुंकवाने काढली होती. अमेरिकेत घरात सगळीकडे कार्पेट असल्यामुळे घरात मात्र पावलं काढता आली नाहीत.
कुळाचाराप्रमाणे चांदीच्या ताटातून गौरीचे मुखवटे घेऊन सौ. घरात आली. दारात हळदी-कुंकू/अक्षता वाहून ओवाळलं. दुधाने पाद्यपुजा केली, भाकर-तुकडा ओवाळून टाकला.
याद्या
10443
माझे जगावेगळे छंद-२
एका रविवारी माझ्या साप पकडण्याची सुरुवात होणार हे एकदाचे ठरले आणि मग त्या रविवार पासून दर रविवारी खूप छानआणि खुंपच वेगेळे म्हणजे जे मला वाटत होते त्यापेक्षा वेगेळे अनुभव आले त्यातलेच मी काही मी तुम्हाला सागणार आहे पहिल्याच दिवशी मी गेले होते तेव्हा मला सापाचा स्पर्श कल्पनेतच होता कारण याआधी मी कधीही सापाला हात लावला नव्हता. पहिल्या दिवशी सगळ्याच लोकांनी लीम्बुतीम्बुची (पक्षी:माझी) मनसोक्त मजा केली. हे कोण नवीन ?? साप पकडायला शिकायचंय का??
याद्या
16658
राजजींच्या 'रोखठोकनाम्या'ची 'ब्ल्यू प्रिंट'
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली.
याद्या
12792
अलीकडचे "चिडके बिब्बे" ऑस्ट्रेलियन खेळाडू
हे माझे पहिले-वहिले लेखन आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे!
================================================
क्रिकेटची गोडी मला लागली १९६० पासून. त्यावेळी इंग्लंडचे कप्तान होते लेन हटन व नंतर पीटर मे, ऑस्ट्रेलियाचे होते हॅसेट् व रिची बेनो, पाकिस्तानचा करदार, वेस्ट इंडीजचे वॉरेल वगैरे. भारताचे कप्तान सारखे बदलायचे, कधी पॉली उम्रीगर, कधी बुधी रामचंद कधी अमरनाथ वगैरे. आपण क्वचितच जिंकत असू, त्यामुळे भारताच्या विजयाची अशी मनात जिद्द वाटायची नाहीं, पण ऍशेस् सीरीजकडे मात्र खूप लक्ष असायचं. इंग्लंडने आपल्यावर राज्य केलं म्हणून असेल, पण ऍशेस् सीरीजबाबत ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकावी असे मनोमनी वाटायचे.
याद्या
2316
नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो
प्रिय वाचक,
अंनिसवाले पळपुटे आहेत असे आपणास वाटत असेल तर आपण वर्तमानपत्रातून वाचा फोडा. एक सल्ला.
अहो, मी कशाला वर्तमानपत्रांकडे धाव घेऊ, जे लाखो रुपयांचे वर्तमानपत्रातून जाहीर आव्हान देतात त्यांची कशी केविलवाणी अवस्था होते ते आपण नुसते एक पत्रातून वाचलेत. अदितीबाईंना तर हे लिखाण अत्यंत जहरी वाटले.
अंनिसवाले याहीपेक्षा अत्यंत हीन शब्दात नाडीग्रंथांवर व अनुषंगाने माझ्यावर व अन्य नाडी ग्रंथप्रेमींवर टीका टिप्पणी करतात. याची अदितींना कल्पना नाही. त्यांची एकएक पत्रे व लेख आपण वाचावेत.
आपण माझ्या चिकाटीचे कौतुक केलेत, ठीक आहे.
याद्या
7107
मिसळपाव