Skip to main content

अनुभव

गारांचा पाऊस

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 03/06/2010 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बऱ्याच काळानंतर मी गारांचा पाऊस अनुभवला. खूप मस्त वाटले. विजांचा कडकडाट, जोरदार वारे वगैरे वातावरण निर्मिती तर अगोदरच झाली होती. आभाळातून सपसप काही थेंब वानगीदाखल बरसूनही झाले होते. मग अचानक पुन्हा एकदा एक जोरदार वावटळ आली. सगळीकडे नुसती धूळच धूळ! कोंदलेल्या आभाळाकडे एक कटाक्ष टाकत मी खिडक्यांवरचे वाळ्याचे पडदे वर गुंडाळू लागले. पण वाऱ्याला कुठे चैन पडत होते! त्या पाचेक मिनिटांत त्याने भरपूर खोडसाळपणा करून मला पार त्रस्त करून सोडले! कधी डोळ्यांमध्ये धूळ उडवून, कधी खिडक्यांच्या तावदानांना हीव भरल्यागत थडथडा आपटवून तर कधी आपल्या द्रुतगतीवर वाळ्याच्या पडद्यांना जोरदार हेलकावे देऊन!

कविता होताना!

लेखक नीधप यांनी गुरुवार, 03/06/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
"कविता येत्ये, बाहेर काढ तिला" मैत्रिणीने फर्मान सोडलं. मला कविता होतेय आणि मलाच माहीत नाही हे कसं काय घडलं बुवा आणि हिला कुठून समजलं हे? खरंतर खूप खूप दिवस वाट बघत होते काहीतरी बरं लिहिलं जाईल हातून याची पण 'क्रिएटिव्हिटीच्या भुताला' शिव्या घालण्यापलिकडे काही घडत नव्हतं... मग मैत्रिणीने कोडंच घातलं... "परवापासून बघत्ये; नुस्त्याच ओळी ओळी.... कधी पूर्ण होणार कवितेची रांगोळी?" असं आहे होय.. अतीव कंटाळलेल्या घामट आणि सरभरीत अवस्थेत फेबुवर माझा संचार चालू होता. अचानक काहीतरी चुकीच्या टिचक्या पडल्या बहुतेक आणि सगळं काही एकाखाली एक दिसायला लागलं. जामच वैतागले.

नाईलच्या देशात - ४ : स्फिंक्स

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 02/06/2010 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हाना सावल्या पायात येऊ लागल्या होत्या. आम्ही निघायचे ठरवले. समोरुन एक उंटांचा काफीला आम्हाला वळसा घालुन गेला. आम्ही वाळवंटातुन पावले उचलत गाडीत येउन बसलो. गाडी रस्त्याला लागली. आलो त्याच मार्गाने आम्ही परत निघालो होतो. फरक इतकाच की येताना खुफुच्या पिरॅमिड्सच्या अगदी समोरुन आलो होतो, जाताना मधून म्हणजे खुफु आणि खाफ्रे यांच्या मधोमधच्या रस्त्याने जाणार होतो.

नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तेच...

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 30/05/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. :-) ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत. तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच.

प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 30/05/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव
वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत.
विविध प्रकाशकांच्या कहाण्या व लेखकांची व्यथा वाचून मी खरोखर सुदैवी असे म्हणायला हवे.

बालपण...

लेखक मानस् यांनी शुक्रवार, 28/05/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण... दिवाळी चे दिवस … आम्ही सारे आजीच्या घरी सुट्टी साठी आलेले.सारे काके, आत्या वगैरे… दिवाळी म्हणजे फटाके, नवे कपडे, आणि मुख्य म्हणजे सगळ्या चुलत-आते भावंडाना भेटून खेळणे मस्ती करणे. दिवाळी ची रात्र. थंडीचे दिवस.आजीचे घर म्हणजे जुना प्रचंड मोठा वाडा होता… मोठ-मोठे तीन चौक, १५-२० पोरांना पळापळी खेळता येईल एवढे पटांगण होता एकेक चौक म्हणजे!! त्याच्या भोवती ओवर्या आणि मग खोल्या… सहा खोल्यांचे घर आजीचे होते… समोरच्या प्रचंड चौकात एका बाजूला केळीचे एक बेट असल्या सारखे… म्हातारी रखमाबाई तिथे भांडी घासत असे. दिवसभर दंगा करून आम्ही पोरे दामून जात असू.

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

तर्पणाची छाया

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 28/05/2010 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
तर्पणाची छाया
दि. ४ मार्च २०१० "प्रथम पत्नीला स्मरून रामेश्वरच्याकिनाऱ्यावर तर्पण कर" अशी आज्ञा नाडी महर्षींनी केली त्याप्रमाणे मी ३४ वर्षानंतर सौ.छायाला तर्पण करायला मी रामेश्वरमच्या तटावरील समुद्रात सुर्याकडे हात जोडून उभा होतो. तेंव्हा एक वाक्य. क्षणात तरळून गेले. "छाया मी तुझ्या मृत्यूला नकळत का होईना जबाबदार आहे. त्यासाठी तू मला माफ कर. मला माझ्या जबाबदारीच्या त्या बोचणीतून सोडव." डोळ्यातून अश्रु टपकले.

घरोघरी तीच………..

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 27/05/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्याच्याच घरोघरी घडणारे नेहमीचे प्रसंग ! फक्त शब्दांत व्यक्त केलेत ! अश्या लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. कदाचित रटाळहि वाटेल. तरीही लिहिण्याचे धारिष्ट केले घरोघरी तीच……….. मी ऑफिसला निघालेलो. आधीच उशीर झालेला त्यामुळे मी गडबडीत. ती बाल्कनीत उभी पण माझ्या डोक्यांत फक्त ऑफिस.आणि ऑफिस.. मी गाडीला किक मारतो अन घाईने निघून पण जातो. ऑफिसांत आल्याआल्या तिचा फोन "जाताना म्याझ्याकडे पहिले पण नाही मी आपली टाटा करीत बसली वेड्यासारखी ! आजकाल तुझे प्रेम कोरडे झाले आहे माझ्यावरचे ” . ती मला लाडात विचारते " आज काय आहे ? " " कुठे काय बुवा ! दारारोजचेच रुटीन आणि काय असणार !

कोकणा मधिल नविन रस्ते

लेखक केदार बर्वे यांनी गुरुवार, 27/05/2010 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो/मैत्रीणीनो, नुकताच माझ्या एका मित्राच्या लग्ना मुळे रत्नागिरी येथे जाण्याचा योग आला, त्या निमित्ताने गणपतिपुळे येथे जाण्याचा योग आला, नुकत्याच झालेल्या सागरी रस्त्याने गणपतिपुळे हे ठिकाण आरे वारे मार्गे फक्त १५ कि.मी वर आहे. अनेक ठिकाणी असे खाडी वर पुल झाल्या मुळे कोकणातील अनेक ठीकाणे जवळ आली आहेत, आपल्याला सुधा असे काही माहित असल्यास लिहा.