वादळ
आज मला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून मनाची सुरु असलेली घालमेल संपली होती एकदाची !!
गेले काही महिने जे आम्ही वेगळे राहत होतो त्याचं फलित आज एका कागदावर काळ्या अक्षरात माझ्याकडे आलं होतं. मला खरच हे हवं होतं का ? त्याने एकदा तरी मला विचारायला हवं होतं. पण तो त्याचा स्वभावच नव्हता. माझ्याही अंगवळणी पडलं होतं सगळं.
मला नक्कीच नको होतं, हे असं अर्ध्यात डाव मोडून जाणं. पण डावच तो !! एकटी मी तरी कसा मांडू शकणार होते ? अन्यथा आत्ताच्या, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, मी त्याची वाट पहात राहिले नसते.
मिसळपाव