Skip to main content

अनुभव

जामखंडीचे उप्पीट

लेखक पंचम यांनी शनिवार, 19/01/2013 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
शक्यतो मी हिवाळ्याचा रात्रीचा प्रवास टाळतो. त्यात सोलापूर-बेळ्गाव म्हणजे खाच-खळग्यांचा.. पण आमचे काका नुकतेच बेळ्गाव शहरी Shift झाल्याने आणि माझ्या दैवाने एक अत्यंत खडूस प्रजातीचा बॉस मला लाभल्याने हा प्रवास क्रमप्राप्त होता..म्हणतात ना 'जर नशीबच असेल पाजी तर काय करेल काजी?' त्या टिकीट देण्यार्या माणसाला पण काय हुक्की कोणास ठाऊक? त्याने बरोबर विंडोव्ह सीट दिली. बर म्हटल की शेजारील सहप्रवाश्याला विनंती करुन त्याच्या जागेवर बसावे तर त्या सहप्रवाश्याने मी काही बोलायच्या आत पिशवीतून पांघरुन काढले आणि पांढरा झेंडा दाखविला.

आमची पहिली गाडी

लेखक पैसा यांनी मंगळवार, 08/01/2013 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पहिली गाडी झालं असं की घराचे सगळे पैसे देऊन झाले आणि हप्ते पण सुरू झाले. काही दिवसांनी हातात थोडे पैसे खुळखुळायला लागले. तोपर्यंत घरात दोनाचे चार मेंबर्स झाले होते आणि जबाबदार पालकांप्रमाणे स्कूटरवरून दोन मुलांना घेऊन जाणे किती धोक्याचे आहे वगैरे विचार आपोआप डोक्यात यायला लागले. मग मी आणि माझा नवरा याच्या तार्किक शेवटाकडे पोचलो, ते म्हणजे आपल्याला एक चारचाकी गाडी घ्यायला पाहिजे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. नवरा लगेच ड्रायव्हिंग शिकायला ड्रायव्हिंग स्कूलमधे जायला लागला. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझा आधीपासूनच आनंद! एक बारीकशी सनी होती तीही तोपर्यंत गंजून जाऊन विकून झाली होती.

वाघ्या हौश्या (एक आठवण)

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 03/01/2013 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या सकाळी जाग आली नि मी उठून झोपेच्या तंद्रीतच गोठ्यात गेलो. हिरव्या वैरणीचा भारा सोडला नि दोन पेंड्या वाघ्या हौश्या पुढे सोडल्या. नि तिथच जोत्यावर टेकून वाघ्या हौश्याच्या देखण्या डौलदार रुपाकड पाहत बसलो. गेल्या शनिवारीच आण्णांनी चाकणच्या बाजारातून हि देखणी चौषी गोऱ्ही खरेदी केली होती. आख्खा गाव बघाया लोटला होता. आम्ही घरातली पोरं तर येडीच झालो होतो. दोन दिवस शाळला सुदिक दांडी हाणली होती. पर घरची लयच ओरडायला लागली तव्हा शाळेत जायला लागलो. पर मी मात्र सकाळी त्यांना वैरण टाकायचा नेम धरला होता.

मनाला समाधान देणारी घटना (आपले मत अपेक्षीत आहे)

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 20/12/2012 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
हि कथा वाचल्यानंतर आपल्याला काय वाटते हे नक्की सांगावे *************************************************************** तो काळच असा होता कि त्यावेळी माझे मन पूर्णपणे अध्यात्ममय झाले होते. दर वर्षी श्रावणात ग्रंथ वाचण्यासाठी गावात मला बऱ्याच ठिकाणी मागणी असायची. (ऐकाणारांच्या मते ) मी वाचून अर्थ सांगितला कि सगळे समजते. त्यामुळे रात्री दोन ठिकाणी आणि सकाळी एका ठिकाणी ग्रंथ वाचण्यासाठी मी जात असे. याच्यापेक्षा जास्त वेळ मी देऊ शकत नसे. तर त्यावेळी मी पूर्ण अध्यात्म मय झालो होतो. शिवाय पहिल्यापासून माझ्या मनात भक्तीची खूप आवड निर्माण झाली होती.

शासकीय नितीमत्ता

लेखक जानु यांनी मंगळवार, 18/12/2012 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
नितीमत्ता हा विषय तसा बराच चर्चला गेलेला असला तरी काही अनुभव आले की पुन्हा जाग्रुत होतोच. माझेही आज तसेच झाले. आटपाट नगरात एक अधिकारी रुजु झाले. यापुर्वीचा त्यांचा अनुभव व तेथील लोकांच्या माहितीनुसार साहेब अतिशय कडक. शिक्षण आणि आरोग्य हे त्यांचे अति जिव्हा़ळ्याचे विषय आहेत हे त्यांनी आल्या आल्या सांगून टाकले. कारण काय तर तिर्थरुप शिक्षक. मंडळी धास्तावली. मागील अनुभव पाहता अशी सुरुवात ही धोक्याची घंटा. आल्या आल्या साहेबांनी भराभर भेटीचा धडाका सुरु केला. प्राथमिक शब्दाला फारच महत्व मग ती शाळा असो की आरोग्य केंद्र. दोन महिन्यात जवळ जवळ सर्व तालुका पिंजला गेला.