मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी : सप्टेंबर '१७

तुषार काळभोर ·

प्रसाद_१९८२ 30/08/2017 - 11:25
मुंबईचा सध्याचा महापौर अगदिच मंदबुद्धीचा माणुस आहे असे दिसते. काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने, सर्व मुंबई पाण्याखाली गेली होती. यावर पत्रकारांनी या महापौरांना विचारले की 'पावसाळ्यात मुंबईच्या कोणत्याही भागात पाणी भरणार नाही हा तुमचा दावा आजच्या पावसाने फोल ठरवला आहे' ह्या प्रश्नावर हे महापौर उलट पत्रकारांवरच उखडले की तुम्ही मुंबई बाहेरचे पाण्याचे फुटेज दाखवून शिवसेनेला उगाचच बदनाम करत आहात व मुंबईत आमचे सहाच्या सहा पंपिग स्टेशन आज सुरु आहेत म्हणुन नशिब समजा. नाहितर मुंबईकर जनतेचे ह्याहून वाईट हाल झाले असते.

In reply to by प्रसाद_१९८२

आर्य 30/08/2017 - 12:40
मुंबईचा (सेनेचा) महापौर कायमच बोलका भावला ठरला आहे, त्याचा बोलवता धनी कोण हे सर्व श्रुत आहेच. भ्रष्टाचार, पदाचा-गैरवापर आणि वितंडवाद हा ठरलेलाच, त्यात दुसरे साहेब अधुन मधुन शिळ्याकढीला उत आणतात.

जेम्स वांड 31/08/2017 - 07:13
पैलवानजी, -भारताला 'गस्त घालण्यावर' काहीच आक्षेप नव्हता, आक्षेप होता तो विवादित पट्ट्यात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात - चीन अजून तिथं गस्त घालणार आहेच, त्यात नवाई नाही, पण चीन ने तिथून कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट , अर्थ मूव्हर्स, वगैरे काढून मागे घेतलेत, अर्थात चीन सपाटून नाकावर आपटला आहे. - हे बांधकाम साहित्य, मशिनरी वगैरे मागे घ्यायचं कारण चीन नुसार 'खराब वातावरण' आहे, पुढे त्यांचे अधिकृत वक्तव्य म्हणते की 'वातावरण' साफ झाले तर 'पुढे बांधकाम सुरू ठेवायचा विचार' करता येईल. करूच वगैरे काही बोललेले नाहीत ते अद्याप तरी इतपत माझी माहिती आहे

नोटबंदीनंतर रु. १००० च्या जवळपास ९९% नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. १५.४४ लाख कोटी नोटांपैकी १५.२८ लाख कोटीच्या नोटा परत बँकेत जमा झाल्या आहेत. विरोधक म्हणतात हे अपयश आहे तर जेटली म्हणतात काहींना नोटाबंदी काय हे समजलंच नाही ! एवढ्या मोठ्या डोंगराएवढया मोहिमेचे फलित हे एवढे छोटे ? टेरर फंडींग ला आळा बसलाय, टॅक्स कलेक्शन वाढलेय असे आता मंत्री सांगतात मात्र हे या मोहिमेचे मुख्य उद्देश होते काय ? खरंच मलाही समजत नाहीये !

In reply to by धर्मराजमुटके

पुंबा 31/08/2017 - 10:46
++१११ बहुतांश काळा पैसा परत माघारी येणार नाही असेच उद्दिष्ट्य सांगितले गेले होते ना. आता म्हणतात आम्हाला अपेक्षा होती की सगळा पैसा माघारी येईल म्हणून. आता आलेल्या पैशावर डेटा अ‍ॅनालिसिस करून यातला काळा पैसा हुडकला जाईल असे म्हणत आहेत. पण हा टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा खर्च आहेच ना अजून. पण प्रश्न विचारले की अंगावर धावून येतात भाजपवाले.

जेटली म्हणतात तेच बरोबर आहे. लोकांना नोटाबंदी काय आहे हे समजलं असतं तर नोटाबंदी नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये ह्यांच्या पक्षाला निवडून दिलेच नसते.

अनिंद्य 31/08/2017 - 12:35
@ डोकला / डोकलाम आता पुन्हा पुढच्या वर्षी बर्फ वितळायला सुरवात झाली की एप्रिल-मे मध्ये ह्या नाट्याचा पुढचा अंक सुरु होईल. :-) भारत-चीन या दोन दादा लोकांनी दंड थोपटले आणि नूरा कुस्तीचा प्रयोग केला, त्यात खरा कस लागला तो भूतान ह्या पिटुकल्या राष्ट्राचा. त्यांच्या हुशार विदेश विभागाने नाजूक हातांनी गुंता सोडवण्याचे काम केले आहे - पण तसे कोणीच मान्य करणार नाही. वाद सुरु झाला, म्हणजे ह्यावर्षी जुलै पासून आजवर दिल्लीतील चिनी दूतावासातील डझनावारी अधिकारी, अनेक चिनी विद्वान आणि महनीय व्यक्ती 'पर्यटनासाठी' भूतानमध्ये गेल्या. त्यांनी काय कमी दबाव टाकला असेल? सोबतीला चीनची 'चेकबुक डिप्लोमसी' पण असेलच. पण ह्या देशाचे सरकार चीनला फार न फाटकारताही भारताच्या बाजूने ठाम राहिले. अर्थात हे भारतीय विदेश मंत्रालयाचेही यश आहे. भूतानच्या तिसऱ्या लोकसभेसाठी पुढीलवर्षी मतदान आहे. सध्या भूतान-चीनमध्ये थेट राजनयिक संबंध नाहीत. ते स्थापित व्हावेत अशी 'जनतेची इच्छा' असल्याची कुजबुज सुरु झाली आहे - मतदानावर प्रभाव टाकू शकणारा हा मोठा मुद्दा आहे. तरीही भारत आणि चीनप्रमाणे कोठल्याही स्व-स्तुतीच्या प्रतिक्रिया तेथिल मीडियात नाहीत. माझ्या मते हे तेथील सरकार आणि जनतेच्या परिपक्व्तेचे लक्षण आहे. - अनिंद्य

In reply to by अनिंद्य

अमितदादा 03/09/2017 - 15:24
तुम्ही म्हणताय ते पटतंय. त्याच आशयावरील एक उत्तम लेख वाचला खाली त्याची लिंक देतोय Giving Bhutan its due खालील लेखातील एक वाक्य In Doklam stand-off, the Himalayan kingdom once again came to the rescue of India’s interests, with costs to itself.

In reply to by अमितदादा

अनिंद्य 03/09/2017 - 17:31
@ अमितदादा, ज्या तेनसिंग नावाच्या भूतानी वृत्तपत्राच्या संपादकांनी हे लिहिलंय त्यांनी डोकलाम वादानंतर थिम्पूत घडलेल्या घटना जवळून बघितल्या आहेत ह्याबद्दल मला शंका नाही. म्हणूनच - "खरा कस लागला तो भूतान ह्या पिटुकल्या राष्ट्राचा. त्यांच्या हुशार विदेश विभागाने नाजूक हातांनी गुंता सोडवण्याचे काम केले आहे - पण तसे कोणीच मान्य करणार नाही." असे लिहिले होते.

In reply to by अनिंद्य

जेम्स वांड 03/09/2017 - 15:36
तरीही भारत आणि चीनप्रमाणे कोठल्याही स्व-स्तुतीच्या प्रतिक्रिया तेथिल मीडियात नाहीत. माझ्या मते हे तेथील सरकार आणि जनतेच्या परिपक्व्तेचे लक्षण आहे. माझं मत ह्यावर थोडं वेगळं पडतंय, भारत चीनने जे 'तथाकथित' चेस्ट थांपिंग केलंय, ते नेमकं निर्बुध्द अपरिपक्व चेस्ट थंपिंग होतं का ते हिशेबी 'सॉफ्टपॉवर प्रोजेक्शन' होतं, हे एकदा परत पाहायला हवंय. भूतानला सॉफ्ट पॉवर प्रोजेक्शन करण्याची गरजही नाही अन त्यांना शक्यही नाही, भारत चीनचं वेगळं पडतं....

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 03/09/2017 - 17:43
@ जेम्स वांड, मी अन्यत्र लिहिल्याप्रमाणे स्वतःच्या शेजाऱ्यांशी वाद घालण्याचा चीनला दांडगा अनुभव आहे. पण डोकलामच्या ह्या नूरा कुस्तीत चीनचा रोल आजपर्यंतच्या इतिहासातील वेगळा रोल होता, a little different flavour. म्हणून ही कुस्ती जरा जास्त रंगली :-) आता वाट पुढच्या जत्रेची.

सतिश गावडे 31/08/2017 - 14:07
अगदीच सपक आणि मिळमिळीत धागा. यात कुठेच राजकीय पक्षांची लाल केलेली नाही. याला ताज्या घडामोडीचा धागा का म्हणावे हा प्रश्न आहे. मात्र अजूनही नेहमीचे यशस्वी प्रतिसादकर्ते ही उणीव भरुन काढतील अशी आशा आहे.

In reply to by सतिश गावडे

जेम्स वांड 01/09/2017 - 13:28
फॅक्ट आर स्टबर्न, स्टॅट्स आर मोर प्लायेबल असं हरहुन्नरी मार्क ट्वेन म्हणून गेला होता बुआ, आपल्याला सोयीचा पडेल असा गुंडाळला जाणारा आकड्यांचा पुंजका म्हणजे सांख्यिकी ही सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब होय ह्या सुंदर विषयाची.

संग्राम 31/08/2017 - 16:16
वित्तमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की जुलै मध्ये ६४ टक्के जी एस टी जमा झाला आहे ... http://economictimes.indiatimes.com/small-biz/policy-trends/gst-collections-for-july-exceeded-target-finance-minister-arun-jaitley/articleshow/60289845.cms इथे काही धाग्यांवर प्रतिसादकर्ते त्यांचे जी एस टी बद्द्ल अनुभव सांगणार होते .. पण अजून वाचण्यात आले नाही म्हणून विचारत आहे ...

अभिदेश 31/08/2017 - 20:32
भारताचा ह्या तिमाहीचा GDP growth हा अतिशय निराशाजनक. ह्या वर्षी केवळ ५.७% , तुलनेने मागच्या वर्षी हा ७.९% होता. हा चीनपेक्षाही कमी झालेला आहे. म्हणजेच नुसती हवेतली आश्वासने , कृती शून्य असा प्रकार आहे. रोजगार निर्मिती सुद्धा ठप्प.

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल आज होत आहे. Cabinet reshuffle: 9 new ministers to take oath today. All you need to know about them मंत्रिमंडळ विस्तारात 9 नव्या चेहऱ्यांना संधी : सूत्र या सगळ्या घडामोडींमध्ये एनडीएच्या कुठल्याही मित्रपक्षाला मोदींनी फेरबदलात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे शिवसेना आणि जेडीयूचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. दुसऱ्या एका बातमी नुसार महत्वाच्या संरक्षण खात्यासाठी सुषमा स्वराज, नितीन गडकरी व सुरेश प्रभू यांनी नवे चर्चेत आहेत. सहा जुन्या व अपेक्षित कार्यक्षमता नसलेल्या मंत्र्यांना जावं लागलंय. त्यात पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या कलराज मिश्रा यांचा समावेश आहे. त्यांना बहुतेक कुठेतरी राज्यपाल बनवून पाठवले जाईल. (अवांतर: बरीच राज्यपाल पदे रिक्त आहेत व त्यामुळे त्या राज्यांचा राज्यपालपद दुसऱ्या राज्याच्या राज्यपालांकडे अतिरिक्त दिलेले आहे.) नवे ९ चेहरे हे आपापल्या क्षेत्रातील मातब्बर आहेत शिवाय सर्व जण उच्च शिक्षित आहेत. उच्चशिक्षित असणं हे चांगल्या कामगिरीचं लक्षण नसलं, तरी कमी/अर्ध/अशिक्षित चेहऱ्यांपेक्षा असे लोक मंत्रिमंडळात असणं जास्त चांगलं. पुणे/मुंबई/नागपूरचे माजी पोलीस आयुक्तसत्यपाल सिंग यांचीमंत्रिमंडळात वर्णी लागलीये.

Warned government about cost of demonetisation, former RBI governor Raghuram Rajan says रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी (त्यांचा कार्यकाळ सप्टेंबर'१६ मध्ये संपायच्या सुमारे सहा महिने आधी फेब्रुवारी'१६ मध्ये) केंद्राला इशारा दिला होता की नोटबंदीचे अल्पकालीन तोटे हे दीर्घकालीन फायद्यांपेक्षा खूप जास्त असतील. शिवाय काळ्या पैशाविषयी कारवाई करायचे पर्यायी मार्गही सुचवले होते. केंद्राने रिजर्व बँकेला नोटबंदीविषयी विचारणा केल्यावर, राजन यांनी केंद्राकडे हे मत व्यक्त केले होते. मात्र रिजर्व बँकेतर्फे नोटबंदी प्रक्रियेची आवश्यक ती माहितीसुद्धा केंद्राला देण्यात आली होती.

In reply to by तुषार काळभोर

अमितदादा 03/09/2017 - 14:46
नोटबंदी बाबत लिहण्यासारखं आता काही राहील नाही. रघुराम राजन यांचं ताज वाक्य "Certainly at this point, one cannot in anyway say it has been an economic success" पण अर्थतज्ञाना विचारता कोण म्हणा?

जेम्स वांड 03/09/2017 - 14:05
माझ्यालेखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्मला सीतारामन ह्यांना संरक्षण मंत्रिपद देण्यात आले आहे. मूळच्या तामिळनाडूच्या असणाऱ्या सीतारामन जेएनयू मधून अर्थशास्त्रात पीएचडी असून त्यांनी प्राईजवॉटरहाऊस कूपर्स सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम केलं आहे तसंच त्यांनी बीबीसी वर्ल्ड मध्ये पण काम केलं आहे. त्यांना पुढील कामाकरिता शुभेच्छा.

In reply to by जेम्स वांड

अमितदादा 03/09/2017 - 14:37
निर्मला सीतारामन ह्या अत्यंत हुशार आहेत पण संरक्षण मंत्रालय सारख डेलिकेट मंत्रालय कसे संभाळतायत हे भविष्यात दिसेलच. थोडीशी आश्चर्यकारक निवड. तसेच त्या अर्थशास्त्रात phd नसून व्यापार (कॉमर्स/ट्रेड) ह्या विषयात phd आहेत. पियुष गोयल यांना रेल्वे आणि प्रभू यांना व्यापार/कॉमर्स ही खाती देऊन उचित निवड आहे असे वाटते. बाकी माजी IFS आणि IAS अधिकाऱयांना योग्य ती खाती मिळावी ही अपेक्षा.

In reply to by जेम्स वांड

मराठी_माणूस 04/09/2017 - 11:47
http://www.loksatta.com/kathaaklechya-news/us-pressure-on-indian-patent-law-1163697/ ह्या लेखात लेखीकेने व्यक्त केलेले मत खुप मह्त्वाचे आहे.(शेवटुन दुसरा परीच्छेद)

गामा पैलवान 03/09/2017 - 17:14
अमितदादा, खालील लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद! :-)
In Doklam stand-off, the Himalayan kingdom once again came to the rescue of India’s interests, with costs to itself.
साधारणत: लेख पटला. भूतानचीन सीमांच्या डोकलाम वगळता इतर बाबी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसल्याने भारताने फारसं लक्ष घातलं नाही. या बाबतीत भूतानला हानी सोसावी लागली आहे असा लेखाचा एकंदरीत सूर आहे. तो बरोबरही आहे. मात्र एक गोष्ट इथे ध्यानी घ्यायला हवी. ती म्हणजे भूतानपुढे तिबेटचं लखलखीत चक्ष्वैसत्यं उदाहरण खडं आहे. चिन्यांनी तिबेट वन त्याची जी काही वाट लावली आहे ती भूतानला फारंच ढळढळीतपणे दिसते आहे. त्या वाटेने जायचं नसेल आणि भूतानची स्वत:ची संस्कृती टिकवायची असेल तर भारतासोबत राहणेच हिताचे आहे. यामुळे इतरत्र थोडी झळ सोसावी लागली तरी भूतान भारतास झुकतं माप देण्यास राजी आहे. नेमकी हीच बाब चीनला खटकते आहे. म्हणून की काय चीनने भूतांनी जनतेच्या इच्छेची कुजबूज प्रजोजित केलेली वाटते. अरुणाचलातही भारताबद्दल आत्मीयता याच कारणामुळे आहे. चिन्यांचा कोणालाही अगदी दस्तुरखुद्द चीनच्या नागरिकांनाही भरंवसा वाटंत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारताने जनरल सुंदरजींच्या नेतृत्वाखाली १९८७ साली चीनला जबर मार दिला होता. त्यानंतरच चीनने बोलणी करण्याची भूमिका घेतली. म्हणून जेव्हा चीन राजनैतिक विजय मिळवल्याची बढाई मारतो तेव्हा खरंतर तो भारताच्या रणनीतीचा विजय असतो. आ.न., -गा.पै.

लिओ 04/09/2017 - 20:56
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथेही ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने गेल्या महिन्याभरात ४९ मुलं दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळेच या मुलांचा मृत्यू झाल्याचं तपास अहवालात निष्पन्न झाल्यावर स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. http://www.hindustantimes.com/india-news/49-infants-die-in-up-s-farrukhabad-hospital-probe-blames-lack-of-oxygen-dm-and-senior-doctors-transferred/story-JGNxpubfXzCRnluVVUE79I.html

In reply to by मोदक

जेम्स वांड 07/09/2017 - 09:17
असं मला माझा धर्म शिकवतो, केवळ म्हणूनच गौरी लंकेश ह्यांना श्रद्धांजली असं म्हणून मी गप बसतो ____/\___

पुंबा 06/09/2017 - 11:54
लंकेश यांना आदरांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. एवढ्या लिंका लागूनदेखिल ४ ही केसमधील मारेकर्‍यांचा पत्ता कसा लागत नाही ही मोठी गूढ बाब आहे आणि स्टेट म्हणून भारतासाठी शरमेची बाबसुद्धा..

श्रीगुरुजी 06/09/2017 - 17:45
गौरी लंकेश यांना श्रद्धांजली. त्यांच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर पकडून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. त्यांची हत्या अत्यंत निंदनीय आहे. अशा हत्यांचा व लगेचच त्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरून तपासाची सुई एका विशिष्ट दिशेने वळविण्याचा एक पॅटर्न दिसत आहे. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर सुरवातीला काही मुस्लिमांची चौकशी सुरू होती. एक दिवस पवारांनी सांगितले की "मशिदीत बाँबस्फोट करणारा मुस्लिंम असूच शकत नाही. यामागे मुस्लिम नसून दुसरेच कोणतरी आहेत.". असे सांगून त्यांनी तपासाच्या सुईची दिशा १८० अंशाने वळविली. त्यानंतर काही दिवसांतच साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल श्रीकांत पुरोहित, दयानंद पांडे, असीमानंद इ. १०-११ हिंदूंना बाँबस्फोटासाठी अटक केली. नंतर त्यांना मोक्का लावण्यात येऊन तब्बल ९ वर्षे विनाखटला, विनाआरोपपत्र, विनाजामीन तुरूंगात डांबण्यात आले. मागील ९ वर्षांत त्यांच्याविरूद्ध पुरावा जमविता आलेला नाही. त्यामुळे २-३ महिन्यांपूर्वी साध्वी प्रज्ञासिंहला व काही दिवसांपूर्वी कर्नल पुरोहितांना तब्बल ९ वर्षानंतर जामीनावर सोडण्यात आले. परंतु यामागे वेगळीच योजना होती. बाँबस्फोटासाठी हिंदू संघटनांना जबाबदार धरण्यात आले. त्याचवेळी २६/११ च्या हल्ल्यात कसाब व त्याच्या साथीदारांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात या बाँबस्फोटाचा तपास करणारे हेमंत करकरे शहीद झाले. त्यांच्या मृत्युबद्दलसुद्धा संशय निर्माण करण्यात आला व असे पसरविले गेले की त्यांनी बाँफस्फोटात हिंदू संघटनांना अडकविल्यामुळे हिंदू संघटनांनीच त्यांना मारले. एप्रिल-मे २००९ मध्ये लोकसभेची निवडणुक होती. या निवडणुकीत भाजपला बॅकफुटवर नेण्यासाठी या अटकांचा भरपूर उपयोग करण्यात आला. याचा फायदा काँग्रेसला २००९ मध्ये झाला. काँग्रेसला २००४ च्या तुलनेत लोकसभेत व विधानसभेत जास्त जागा मिळाल्या. आता काँग्रेसला यशाचा एक नवीन फॉर्म्युला सापडला होता. २०१४ मध्ये लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक होती. ऑगस्ट २०१३ मध्ये दाभोळ्करांना मारण्यात आले व त्यांच्या खुनानंतर काही क्षणातच तपासाची सुई पुन्हा एकदा सनातन या हिंदू संघटनेकडे वळविण्यात आली. सुरवातीचे २-३ आठवडे पोलिस या दिशेनुसार सनातनचा तपास करीत होते. त्यामुळे खर्‍या खुन्यांना निसटून जायला, पुरावे नष्ट करायला भरपूर वेळ मिळाला. खुनाच्या स्थळाच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून जे चित्रण मिळाले त्यातून खून करणार्‍या दोघांची चित्रे तयार करण्यात आली. परंतु ते आजतगायत सापडलेले नाहीत. सनातनच्या तपासातून काहीच निष्पन्न न झाल्याने काही महिन्यांनंतर नागोरी व खंडेलवाल या बेकायदा शस्त्रे विक्री करणार्‍यांना खुनाच्या आरोपाखाली पकडण्यात आले. त्यांच्या तपासातूनही काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांना सोडावे लागले. नंतर जवळपास ३ वर्षानंतर सनातनच्या वीरेंद्र तावडेला पकडण्यात आले. तो मागील १५ महिने तुरूंगात आहे. त्याच्याविरूद्धसुद्धा काहीही पुरावा मिळाला नाही. आता विनय पवार व सारंग अकोलकर यांची नावे पुढे आणली आहेत. खुनींची आधी प्रसिद्ध केलेली चित्रे व विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यात काहीही साम्य नाही. एकंदरीत मागील ४ वर्षात खरे खुनी सापडलेले नाहीत. परंतु सनातनला झोडपणे सुरू आहे. दाभोळकरांच्या खुनानंतर जाणूनबुजून तपासाची दिशा भरकटविण्यात आली हे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसने या खुनाचाही वापर २०१४ च्या निवडणुकीवर डोळा ठेवून केला होता. दाभोळकरांच्या खुनामागे एखादी वेगळी थिअरी असू शकते. माझे व्यक्तिगत मत असे आहे की या खुनामागे तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमधील कोणतरी तगडा नेता असावा कारण २००९ प्रमाणे खुनाचे बालंट हिंदुत्ववादी संघटनांवर ढकलून त्याचा फायदा २०१४ च्या निवडणुकीत मिळविण्याचा डाव असण्याची शक्यता आहे. काल गौरी लंकेश यांचा झालेला खून हा याच योजनेचा भाग असावा. अजून ८ महिन्यांनी एप्रिल-मे २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणुक आहे. त्याआधी गुजरात व हिमाचल प्रदेशची निवडणुक आहे. काल हा खून झाल्यावर लगेचच त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरणे सुरू झाले आहे. २००८ व २०१३ मध्ये अगदी असेच झाले होते. कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकार अत्यंत अकार्यक्षम सिद्ध झाले आहे. त्यामुळेच त्यांनी टिपू जयंती साजरी करण्यासारखे कार्यक्रम सुरू करून राज्यात जातीय विष पेरण्याचे काम सुरू केले आहे. मागील १-२ महिन्यांपासून कर्नाटकमध्ये कन्नड विरूद्ध हिंदी हा वाद भडकविला जात आहे. एकंदरीत २०१८ मधील निवडणुक जिंकण्यासाठी लोकांमध्ये फूट पाडणे व लोकभावना भडकावणे अश्या सोप्या युक्त्या सिद्धरामय्याने वापरायला सुरूवात केली आहे. कालच्या खुनाने त्यांना हिंदुत्ववादी संघटनांना झोडपायला नवीन संधी मिळाली आहे. यापूर्वी झालेल्या दाभोळकर, पानसरे व कलबुर्गींच्या खुनातील एकही आरोपी सापडलेला नाही. त्या खुनांमागचे हेतू समजलेले नाहीत. खुनातील शस्त्रे व वाहने सापडलेली नाहीत. तपासात आजवर कोणतीही माहित मिळालेली नसताना अजूनपर्यंत खुनासाठी हिंदू संघटनांना जबाबदार धरणे सुरू आहे. या तिघांनी धर्मचिकित्सा केल्यानेच त्यांना हिंदुत्ववादी संघटनांनी मारले हा निष्कर्ष निधर्मांधांनी केव्हाच काढला आहे आणि तोसुद्धा अजूनपर्यंत कणभरही पुरावा मिळालेला नसताना. माझ्या मते गौरी लंकेश यांच्या खुनामागे २-३ कारणे संभवितात. त्या सातत्याने हिंदू संघटना, भाजप यांच्यावर टीका करीत होत्या. खुनामागे हे एक कारण असू शकते. परंतु भारतात अनेकजण हिंदू संघटना व भाजप यांच्यावर अत्यंत जहरी टीका करतात. त्यातील कोणाचेही खून या संघटनांनी केल्याचे आजवर सिद्ध झालेले नाही. त्यामुळे ही शक्यता अत्यल्प आहे. खुनामागील दुसरे कारण म्हणजे वर नमूद केल्याप्रमाणे निवडणुकीत फायदा मिळविण्यासाठी त्यांचा खून करून त्याचे बालंट हिंदू संघटनांवर ढकलायचे. यामागे कर्नाटकातील सत्ताधारी पक्ष असू शकतो. मागील वर्षी कर्नाटकातील गणपती नावाच्या एका एसीपीच्या आत्महत्येसाठी कर्नाटक सरकारमधील एक मंत्री जॉर्ज व त्याचे दोन मुलगे जबाबदार होते. खुनामागे अजून एक कारण असू शकते. गौरी लंकेश एक टॅब्लॉईड चालवायच्या. त्या भाजप व हिंदू संघटनांवर कठोर टीका करायच्या. केजरीवालांप्रमाणे त्या अनेकांवर बेलगाम आरोप करायच्या. मागील वर्षी भाजपचे खासदार प्रल्हाद जोशी यांच्यावर केलेल्या बेलगाम आरोपांमुळे प्रल्हाद जोशींनी त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता. त्या खटल्याचा निकाल लागून गौरी लंकेश यांना ६ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली होती. सध्या त्या जामीनावर बाहेर होत्या. टॅब्लॉईड चालविणारे काही जण ब्लॅकमेलिंगमध्ये गुंतलेले सापडले आहे. आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून समाजातील प्रभावशाली व्यक्तींविरूद्ध स्टिंग ऑपरेशन किंवा इतर तत्सम साधने वापरून पुरावी गोळा करायचे व पुराव्यांची भीति दाखवून त्या व्यक्तींना ब्लॅकमेल करण्याची काही प्रकरणे पूर्वी उघडकीला आली आहेत. तहलका, कोब्रापोस्ट इ. टॅब्लॉईड्स बदनाम आहेत. गौरी लंकेश सुद्धा अशाच प्रकरणात असल्या तर खुनामागे तेसुद्धा कारण असू शकते. काही काळापूर्वी त्यांचा स्वत:च्या भावाशी प्रेसच्या मालकीवरून वाद झाला होता व भावाने त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिली होती. तसेच त्यांचे नक्षलींशीही संबंध होते. या अंगाने सुद्धा तपास होणे जरूर आहे. एकंदरीत या खुनामागे अनेक कारणे असू शकतात. असे असताना व खुन्यांबद्दल कोणतीही माहिती व पुरावे नसताना खुनानंतर काही वेळातच लगेच त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरणे हे अत्यंत निषेधार्ह आहे.

विशुमित 06/09/2017 - 18:08
१. प्रज्ञा सिंग आणि श्रीकांत पुरोहित फक्त जामिन्यावर सुटले आहेत. दोघांची निर्दोष मुक्तता झालेली नाही आहे. त्यामुळे निकर्षांपर्यंत पोहचण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागेल. २. भले दाभोलकरांची हत्या आघाडी सरकारच्या काळात झाली होती आणि पानसरेंची युती सरकारच्या काळात. आताचे सरकार खरे मारेकरी शोधण्यात कोठे कमी पडत आहेत? ३. गौरी लंकेश: एकंदरीत या खुनामागे अनेक कारणे असू शकतात. असे असताना व खुन्यांबद्दल कोणतीही माहिती व पुरावे नसताना खुनानंतर काही वेळातच लगेच त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरणे हे अत्यंत निषेधार्ह आहे....याबद्दल सहमत.

In reply to by विशुमित

गामा पैलवान 06/09/2017 - 18:49
विशुमित,
दोघांची निर्दोष मुक्तता झालेली नाही आहे.
दोघांवर आरोप कसले आहेत? त्याचीपण चिकित्सा करावी म्हणतो मी. आरोप नसतांना तुरुंगात डांबून ठेवणं कितपत योग्य? आ.न., -गा.पै.

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 06/09/2017 - 20:30
१. नऊ वर्ष झाली तरी अजून आरोपपत्र सुद्धा दाखल करू शकले नाहीत. विना आरोपपत्र अटक करता यावी म्हणून मोक्का लावला. आता मोक्का संघटित गुन्हेगारी साठी बनवलेला कायदा आहे. मालेगाव बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला मानायचा का संघटित गुन्हेगारीचा प्रकार? बोभाटा झाला हिंदू दहशतवादाचा पण ते सिद्ध करण्यासाठी कुठलेच पुरावे सापडले नाहीत, त्यामुळे मोक्का लावावा लागला. मोक्का कायद्याप्रमाणे एकाच गुन्ह्यात सहभाग असेल तर मोक्का लावता येत नाही. म्हणून आधीच्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटाच्या खटल्यात या दोघांचे नाव घुसडले गेले. पण दोन्ही खटल्यात या दोघांविरुद्ध कुठलाच पुरावा अजून गोळा करता आला नाहीये. एक हिंदू साध्वी तथाकथित पुरोगाम्यांच्या रडारवर असू शकते पण आर्मीतला कर्नल का यात गोवण्यात आला असावा? देशांतर्गत दहशतवादी कारवायांची माहिती हल्ले होण्याआधीच काढून ते हल्ले अयशस्वी करण्यात कर्नल पुरोहित यांचा सहभाग होता असं म्हणतात. मग त्यांना टारगेट करण्याचं हे कारण असावं का? दहशतवादी आणि भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांच्या मानवी हक्कांसाठी गळे काढणाऱ्या कोणालाच ९ वर्ष विनापुरावे आणि विना आरोप जेल मध्ये टाकल्या गेलेल्या या दोघांसाठी आवाज उठवावासा वाटलं नाही. याच दुटप्पीपणासाठी ही तथाकथित पुरोगामी जमात मला आवडत नाही. २. तेव्हाची सरकारे कुठे कमी पडली? का त्यांनी तटस्थपणे शोध न घेता उगाच सनातन व इतर हिंदू संस्थांकडे लक्ष वळवलं? कदाचित पुरावे नष्ट करायचे असावेत का? CCTV वर मारेकऱ्यांची छबी सापडून सुद्धा तत्कालीन सरकारला मारेकरी सापडले नाहीत, ना हत्यारे सापडली ना कुठले पुरावे. मग या परिस्थितीत नंतर आलेल्या सरकारने काय करणं अपेक्षित आहे?

सुबोध खरे 06/09/2017 - 20:02
@विशुमित आताचे सरकार खरे मारेकरी शोधण्यात कोठे कमी पडत आहेत? डॉ दाभोळ्करांची हत्या ऑगस्ट २०१३ मध्ये झाली ( महाराष्ट्रात) आणि श्री कलबुर्गी यांची हत्या ऑगस्ट २०१५ मध्ये कर्नाटकात झाली. तरी बरं त्या वेळेस दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे सरकारच होते. मग आताचे सरकार मारेकरी शोधण्यात कमी पडत आहेत हे विचारणे आपला पूर्वग्रह दाखवतो आहे. मग तेथे भाजपचे सरकार असते तर काय म्हणाला असतात?

श्रीगुरुजी 07/09/2017 - 11:14
आजचा विनोद - हिंदुस्थानच्या भररस्त्यावर एका महिला पत्रकाराची हत्या व्हावी हे कसले लक्षण समजायचे? तिचे विचार व भूमिका कदाचित कुणाला पटत नसतील. तिच्या लिखाणाने व भूमिकेने कुणी अस्वस्थ झाले असतील, म्हणून त्या निःशस्त्र महिलेवर अशाप्रकारे निर्घृण हल्ला करणे हे अमानुष आहे. मानवता व देशाच्या इभ्रतीस कलंक लावणारे आहे. हे शौर्य नाही व मर्दानगीचा जयही नाही. - शूर वाघोबा उद्धट ठाकरे हे वाचल्यानंतर का कोणास ठाऊक, पण मलिष्का, पालघरच्या मुली, नगरसेविका घोसाळकर इ. आठविले. http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-attacks-on-bjp-over-gauri-lankesh-murder/articleshow/60401978

सुबोध खरे 07/09/2017 - 11:47
गेल्या तीन वर्षात २३ पत्रकारांची हत्या झाली आहे परंतु केवळ इंग्रजी भाषेत लिहीणार्या डाव्या विचारसरणीच्या पत्रकार गौरी लँकेश यांची हत्या झाल्यावर प्रेस्टिट्यूट्सनी( राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, बरखा दत्त, शेखर गुप्ता आणि वीर संघवी) यांनी ट्विटरवरून "पत्रकारांच्या विचार स्वातंत्र्याची" कोल्हेकुई सुरु केली आहे. केवळ हलकट आणि दांभिक लोक आहेत. कारण बाकी २२ पत्रकार हे भारतीय भाषेत लिखाण करणारे होते आणि ते बुबुडविपुमाधवि( विचारवंत, बुद्धिवादी पुरोगामी इ इ )नव्हते पण ते लोकल गुंडांच्या विरुध्द्व लिहीत होते. त्या सर्व पत्रकारांची हत्येवरील चर्चेला "टी आर पी" मिळणार नव्हता https://twitter.com/aranganathan72?lang=en https://twitter.com/aranganathan72?lang=en

In reply to by गामा पैलवान

वरील तक्त्यामधे महाराष्ट्रातील एकही पत्रकार नाहिये म्हणजे इथले सगळे पत्रकार, निर्भिड, निष्पक्ष, ताटाखालची मांजरे आहेत की इथले गुंड हे पत्रकारांचा आदर ठेवतात ? भाई तु तेरा काम कर मै मेरा ! अवांतर : २०१३ मधे शेखर चे ट्वीटर अकाऊंट नव्हते का ? तिकडे डॅश मारलाय म्हणून विचारले. आणि हे कोणी कोणत्या विषयावर किती ट्वीटस केले हे कसे मोजतात ? म्हणजे काही फॉर्मुला आहे की रोज लक्ष ठेवावे लागते की अमुक बाबाने अमुक विषयावर ट्वीट केले म्हणून ? कुतुहल म्हणून बरखा बाईंच्या ट्वीटर हँडलवर गेलो तर १,१३.००० इतके ट्वीटस दिसतात. केवढी एनर्जी लागत असेल ? शेवटचे ट्वीट कधी केले हे शोधायला स्र्कोल डाऊन करायला गेलो तर हात दुखायला लागला. वरचा तक्ता बनवणार्‍याला मानले पाहिजे. एवढी आकडेवारी तोंडावर फेकून मारायची ते पण असा प्रसंग घडल्यावर लगोलग तर केवढा अभ्यास करावा लागत असेल. की निव्वळ रँडम आकडे पकडून टेबल बनवितात ? मी अडाणीच राहिलो जगापेक्षा असे वाटतेय खरे !

In reply to by धर्मराजमुटके

श्रीगुरुजी 07/09/2017 - 23:31
वरील तक्त्यामधे महाराष्ट्रातील एकही पत्रकार नाहिये २-३ वर्षांपूर्वी मुंबईत पत्रकार जे डे यांचा खून झाला होता. काही पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. हत्यांची अजून काही प्रकरणे सुद्धा असतील.

In reply to by धर्मराजमुटके

रानरेडा 08/09/2017 - 00:04
गुगल नावाची एक साईट आहे हे बहुदा आपल्याला माहित असावे , त्यात बऱ्याच गोष्टी शोधता येतात ... https://twitter.com/search-advanced?lang=en अजूनही बरीच तुका असावीत

अधिक बातमी इथे ! कुणाचा जीव गेला नाही नशिब ! नाहितर पुन्हा नवीन रेल्वेमंत्री शोधावा लागला असता. प्रभुंनी राम बनण्याचा नादात उकाच स्वतःची विकेट टाकली.

अधिक बातमी इथे ! कुणाचा जीव गेला नाही नशिब ! नाहितर पुन्हा नवीन रेल्वेमंत्री शोधावा लागला असता. प्रभुंनी राम बनण्याचा नादात उगाच स्वतःची विकेट टाकली.

तेजस आठवले 08/09/2017 - 17:06
गोरखपूर दुर्घटनेनंतर २/४ दिवस आरडाओरडा झाला आणि प्रकरण फार पुढे ताणले नाही. मोर्चे, मेणबत्ती घेऊन श्रद्धांजली, पुरस्कार वापसी, असहिष्णुतावाढ, अल्पसंख्यांक कसे असुरक्षित आहेत, हुकूमशाही आणि फॅसिस्ट राजवट चालू आहे असा काहीही ओरडा आणि प्रचंड गदारोळ झाला नाही त्यावरून ह्या दुर्दैवी घटनातली मुले नक्कीच एका विशिष्ट धर्माची असावीत. नाहीतर आत्तापर्यंत ...

अमितदादा 09/09/2017 - 16:23
गेल्या काही दिवसात नोटबंदी वर काही लेख वाचनात आले, बहुतांश लेख हे नोटबंदी एक आर्थिक अरिष्ट आहे हे सांगणारेच आहेत (जे माझे सुद्धा मत आहे), त्यातील काही लेखाचा सारांश आणि माझी मते कंसामध्ये . लेख क्रमांक १. Calling black white लेख क्रमांक २. (या लेखाचं वैशिष्ट्य असे कि यामध्ये नोटबंदी चे समर्थक, विरोधक आणि neutral या सगळ्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. ) Demonetisation: now a proven failure? १. ५०० आणि १००० च्या जवळजवळ ९९% नोटा परत आल्या आहेत याचा अर्थ ज्या लोकांच्याकडे काळा पैसा होता व त्यांनी बँकिंग सिस्टिम मध्ये परत आणला आहे. (आता भाजप चे प्रवक्ते असे म्हणतात कि काळा पैसा बँकिंग सिस्टिम मध्ये आला म्हणून तो पांढरा होत नाही IT वाले त्यांची चौकशी करणार आहेत, पण आपण एक गोष्ट लक्ष्यात घयायला हवी कि हेच भाजप चे प्रवक्ते आधी ३ ते ४ लाख कोटी रुपये बँकेत परत येणार नाहीत असे अंदाज वर्तवित होते, आता काय झालं त्या अंदाजच ? हे अपयश नाही का? म्हणजे काळ्या पैशे वाल्यानी सरकारचा पहिला आणि मोठा अडथळा मोडून काढला. बरं आता ह्या IT डिपार्टमेंट कडे ह्या लाखो संशयास्पद लोकांचं चौकशी करण्याचं मनुष्यबळ आहे का ? लाखो केसेस उभ्या करण्याचे आणि सोडवण्याचे अधिकार आणि ताकत आहे का ?) २. बरं RBI ला जवळजवळ १४,००० कोटींचा जास्त खर्च करावा लागला (नवीन नोटा छापणे (४००० कोटी )+ नोटा वितरण ), तसेच बाजारातील कॅश बँकेत आल्यामुळे RBI ती तरलता शोषून घ्यावी लागली आणि त्याच कित्येक हजार कोटींचं व्याज द्यावं लागलं काही कारण नसताना. (याचा आकडा अजून जाहीर व्हायचंय) ३. GDP २ टक्यांनी गडगडला, एका इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत, शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला. याच श्रेय कोणाचं ? ४. अनेक राज्यांनी कृषी क्षेत्रासाठी २ लाख कोटींची कर्जमाफी जाहीर केलीय, यामध्ये नोटबंदी चा थोडाफार हातभार आहेच (संधर्भ: लोकसत्तातील एक लेख बहुदा मंगेश सोमण ) ५. सरकार असे म्हणताय कि ९१ लाख , मोदी म्हणतायत ५६ लाख , तर सरकारचा एक इकॉनॉमिक सर्वे म्हणतोय कि ५.४ लाख नवीन लोक इनकम टॅक्स च्या जाळ्यात आलेत. आता महत्वाचा प्रश्न यातील किती लोक टॅक्स देणार आहेत ? सरकारच्या एका इकॉनॉमिक सर्वे नुसार (लेख क्रमांक १) declared income १०००० करोड म्हणजे यातून जास्तीत जास्त टॅक्स ३००० करोड गोळा होईल. (हि चांगली गोष्ट असली तरी डोंगर पोखरून उंदीर काडल्यासारखी आहे. बरं आता दुसरा प्रश्न नवीन गोळा झालेले टॅक्स payer मध्ये GST मुळे समाविष्ट झालेल्या लोकांचा चा वाटा किती ? ) ६. म्हणजे digitization, cash less economy, आधार कार्ड संलग्नता, लोकांची बँक अकाउंट ह्या गोष्टी होणे अत्यंत महत्वाच्या आहेत पण यासाठी नोटबंदी ची अजिबात आवश्यकता नाही , जगातील अनेक देशांनी ह्या गोष्टी नोटबंदी सारखा निर्णय न घेता केलेला आहे. आता दुसऱ्या लेखातील नोटबंदी च्या समर्थनार्थ मांडलेल्या बाजू ७. बँकेत जमा झालेला ४-५ लाख कोटींचा पैसा हा संशयास्पद आहे, यातील बहुतांश पैसा काळा पैसा म्हणून उघड होणार आहे.(असे झाले तर चांगलंच आहे पण असे होणे खूप अवघड आहे. याच कारण हा प्रचंड पैसा खोटा आहे हे सरकार ला सिध्द करायचं आहे ह्या लोकांना न्हवे, तसेच सरकारचे आकडे हे अंदाज आहेत , proven फॅक्ट नाहीत. आणि सरकारचे जुने अंदाज पाहता माझा यावर विश्वास नाही. ) ८. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना हि काळ्या पैशाबाबत यशस्वी झाली आहे. (परंतु ह्या योजनेचा आणि नोटबंदी चा डायरेक्ट संबंध नाही, आणि मुळात यातून सरकार ला ४००० कोटींचं मिळाले आहेत. मुळात हि योजनाच नोटबंदी¨च्या अगोदर आलीय ) ९. कॅशलेस इकॉनॉमी ला मदत झाली. (यासाठी नोटबंदी करण्याची मुळात गरजच न्हवती असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच नोटबंदी नंतर वाढलेले ऑनलाईन transaction परत एकदा कमी झालेत हि वस्तुस्थिती आहे.) १०. खोट्या नोटा चलनातून बाद झाल्या. (मुळात RBI च्या अवहलानुसार सापडलेल्या काळ्या नोटा ४०-१०० कोटींच्या आसपास आहेत, म्हणजे हे एक प्रकारचं अपयश च) म्हणजे थोडक्यात काय तर तळ्यात जास्त मासे पकडण्यासाठी तळे आठवायची गरज न्हवती, चांगल्या पद्धतीचे जाळे वापरणे किंवा योग्य ठिकाणी मासे मारणे हे यावरचे उपाय होते. भविष्यात जरी नोटबंदीचे फायदे होणार असतील तरी आत्ता झालेले नुकसान खूप आहे ते भविष्यातील फायद्यातून भरून निघणार नाही. जाता जाता, नोटबंदी सारख्या अनेक गोष्टींचा ओव्हरऑल विचार करून मोदी समर्थक किंवा विरोधक असणे, आणि नोटबंदी सारख्या आर्थिक निर्णयाची कारणमिमीनसा करणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.

In reply to by अमितदादा

गामा पैलवान 09/09/2017 - 17:23
अमितदादा, जर नोटाबंदी केली नसती तर आजूनही काळा पैसा खेळताच राहिला असता ना? आजवर जो लपवलेला पैसा होता तो उघड्यावर येऊन नोंदबद्ध झाला आहे. याकडे कोणाचंच लक्ष नाही. शिवाय काळ्या पैशाने फुगलेल्या अर्थव्यवस्थेपेक्षा कृश पण धवल अर्थव्यवस्था जनतेस फायदेशीर नाही का? या प्रश्नात जनतेस हा प्रमुख शब्द आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 09/09/2017 - 23:02
३. GDP २ टक्यांनी गडगडला, एका इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत, शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला. याच श्रेय कोणाचं ? GDP २ टक्क्यांनी गडगडलेला नसून एका तिमाहीकरता १.४ टक्क्यांनी कमी झाला आहे. कोणत्या इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत व शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला?

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा 10/09/2017 - 00:35

In reply to by अमितदादा

गामा पैलवान 10/09/2017 - 01:55
अमितदादा, तुमचं बरोबर आहे. माझा विश्वास नाहीच बसणार. वरील पहिल्या दुव्याच्या सुरुवातीचं वाक्य आहे :
While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017.
अधिक खोदाईची गरज असतांना मी कसा विश्वास ठेवावा ! आ.न., -गा.पै.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 10/09/2017 - 14:56
पहिल्या लेखानुसार -
The Centre for Monitoring Indian Economy, a think-tank that tracks business and economic data, believes that 1.5 million jobs were lost in January-April 2017, a likely result of demonetisation.
believes that म्हणजे हे त्यांचे गृहितक/समजूत आहे. गृहितक/समजूत सत्य असेलच असे नाही. त्यापुढे असेही वाक्य आहे - This slide is believed to be an after-effect of demonetisation. नंतर त्याच लेखात labour participation rate घसरला असे लिहून एक आलेख दिला आहे. त्या आलेखानुसार नोव्हेंबरपूर्वीच यात मोठी घसरण झाली होती. नंतर नोव्हेंबरमध्ये यात घसरण न होता वाढ झाली व डिसेंबर हा रेट स्थिर होता आणि नंतर जानेवारीनंतर परत घसरला. म्हणजे या चढउताराशी निश्चलीकरणाचा संबंध दिसत नाही. आलेखानंतर लगेचच एक परस्परविरोधी टिप्पणी आहे. Demonetisation’s effect kicked in with a lag, as the period from September-December is a busy season for agrarian India and that could have had kept the employment levels high, explains the report. एकंदरीत या लेखातील निष्कर्षांना कोणताही ठोस आधार दिसत नाही. स्वतःच्या समजूतीनुसार निष्कर्ष काढले आहेत. ______________________________________________________________________________________________ लेख क्रमांक २ - लेखाच्या सुरवातीलाच एक टीप आहे. While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017. याचा सरळ अर्थ असा की या लेखातील निष्कर्ष पुरेशा संशोधनावर आधारीत नाहीत. या लेखातही परस्परविरोधी दावे आहेत. While India’s employed force grew from 401 million in April 2016 to 406.5 million in December 2016, it fell to 405 million in the four-month survey period of January through April 2017. “The workforce (persons greater than 14 years of age) swelled by 9.7 million to 960 million during January-April 2017. But, the number of employed did not grow, it shrank. This implies that the stock of persons to be provided with employment has increased, केवळ ४ महिन्यात १४ वर्षे पूर्ण केलेल्यांची संख्या तब्बल ९७ लाखांनी वाढली यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. कारण याच दराने १२ महिन्यात हीच संख्या जवळपास ३ कोटींनी वाढायला हवी. लोकसंख्या वाढीचा दर थोड्याफार फरकाने प्रतिवर्ष स्थिर धरला तर वरील दाव्यानुसार भारतात २००३ पर्यंत दरवर्षी ३ कोटींहून अधिक बालके जन्म घेत होती आणि एकूण लोकसंख्या व लोकसंख्यावाढीचे अधिकृत आकडे पाहिले तर हा आकडा खूपच अवास्तव वाटतो. पुढे असे लिहिले आहे की The unemployment rate during September-December 2016 was 6.8% (29.6 million unemployed out of a labour force of 436 million). in January-April the rate fell to 4.7% (20 million unemployed out of a labour force of 425 million). म्हणजे जानेवारी-एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या २ कोटी ९६ लाखांवरून कमी होऊन २ कोटींवर आली. एकीकडे म्हणतात की या काळात बेकारी वाढून १५ लाख नोकर्‍या गेल्या आणि दुसरीकडे लिहितात की बेकारी ९६ लाखांनी कमी झाली. Note that the 9.6 million fall in the unemployed count is close to the addition to the workforce. This is like saying that almost the entire new workforce of January-April 2017 did not offer themselves for employment. This is odd. Is this a seasonal phenomenon? म्हणजे असे का झाले हे यांना माहिती नाही. म्हणूनच यामागे निश्चलीकरण आहे असा निष्कर्ष काढला असावा. The second issue is that the India’s employed labour force went up during the September-December 2016 period – demonetisation occurred on November 8, 2016. आता म्हणतात की सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ या काळात काम असणार्‍यांची संख्या वाढली. यांच्या आधीच्या निष्कर्षानुसार ही संख्या ८ नोव्हेंबरनंतर कमी व्हायला हवी. परंतु या वाक्यानुसार ही संख्या वाढलेली दिसते. परंतु जानेवारीनंतर काम करणार्‍यांची संख्या का कमी झाली यामागचे कारणही त्यांनीच दिले आहे. “September-December is a busy season as the kharif crop is harvested during this period and most festivals fall during these months. 2016 was a good kharif crop and this could have kept employment levels high. January-April is a relatively lean season. Further, demonetisation could have had its full impact during these months while its impact during September-December was partial,” he notes. _____________________________________________________________________ तिसरा लेख - या लेखाचे शीर्षकातील अवास्तव आकडे वाचूनच (३५% नोकर्‍या गेल्या, महसूलात ५०% घट) त्यातील भंपकपणा लक्षात आला. निश्चलीकरणामुळे उद्योगधंद्यांवर इतका मोठा वाईट परीणाम झाला असेल तर डिसेंबर २०१६ मध्ये केद्रीय सीमाशुल्क संकलन, अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष करसंकलन यात मोठ्या प्रमाणात वाढ कशी झाली असती. डिसेंबर २०१५ च्या तुलनेत डिसेंबर २०१६ मध्ये केंद्रीय सीमाशुल्क संकलनात ३१.६% व अप्रत्यक्ष करात १२.८% इतकी वाढ झाली. संपूर्ण वर्षाचा विचार केला तर २०१६-१७ या वर्षात केंद्रीय सीमाशुल्क संकलनात ३३.९%, सेवाकर संकलनात २०.२%, प्रत्यक्ष कर संकलनात १४.२% व अप्रत्यक्ष कर संकलनात २२% वाढ झाली आहे. जर निश्चलीकरणामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात फटका बसला असेल तर इतक्या प्रमाणात वाढ कशी झाली असती? http://www.livemint.com/Politics/cH5gNYLvx0V4wjPxPsbRzK/Govt-exceeds-201617-tax-collection-target-collects-Rs1710.html मी इंडियन एक्सप्रेसमध्ये डिसेंबर २०-२१ तारखेच्या आसपास एक वृत्तांत वाचला होता. नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये २०१५ च्या तुलनेत वाहन खरेदीत घट झाली असे त्यात लिहिले होते. त्यात जवळपास २० कंपन्यांची आकडेवारी दिली होती. त्या आकडेवारीनुसार २० पैकी फक्त ६ कंपन्यांच्या खपात घट झाली होती. उर्वरीत १४ कंपन्यांच्या खपात वाढ झाली होती. म्हणजेच वृत्तांताचे शीर्षक फसवे होते. त्यामागे अजून एक कारण होते जे त्यांनी लक्षात घेतले नव्हते. भारतात वाहने, ग्राहकोपयोगी वस्तू साधारणपणे मुहूर्तावर घेतल्या जातात. गुढी पाडवा, दसरा, दिवाळी पाडवा अशा सणांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. २०१५ मध्ये दसरा ऑक्टोबरमध्ये व दिवाळी नोव्हेंबर मध्ये होती. त्यामुळे त्यावर्षीच्या खपाचे आकडे दोन महिन्यात विभागले गेले. २०१६ मध्ये दोन्ही सण ऑक्टोबरमध्येच आले होते. त्यामुळे २०१६ ची त्या काळातील विक्री ऑक्टोबरमध्येच झाली. साहजिकच नोव्हेंबरमध्ये तुलनेने कमी खरेदी झाली व नोव्हेंबर २०१६ चे आकडे २०१५ च्या तुलनेत कमी दिसले. हा मुद्दा वृत्तांत लिहिताना लक्षात घेतलेला नव्हता.

In reply to by अमितदादा

चिनार 11/09/2017 - 14:22
कृपया खालील शंकेचे निरसन करावे... एका आकडेवारीनुसार नोटबंदी आधी साधारण सतरा लाख कोटी रुपये पाचशे आणि हजाराच्या स्वरूपात होते. (काही लोक हा आकडा पंधरा लाख कोटी आहे असं सांगतात). तुमचं नाही-माझं नाही, आपण सोळा लाख कोटी पकडू. हे सर्व रक्कम ८ नोव्हेंबरला बाद झाली. पण सरकारने नवीन पाचशे आणि दोन हजाराच्या स्वरूपात फक्त बारा लाख कोटी बाजारात आणले असं सांगण्यात येते. हे जर खरे असेल तर, बँकेत कितीही पैसा वापस आला तरी चार लाख कोटींचे चलन सरळ सरळ बाद झाले असं म्हणता येऊ शकतं का? या चार लाख कोटींपैकी अर्धा जरी काळा पैसा असेल तरी चांगलेच नाही का ?

गामा पैलवान 09/09/2017 - 19:00
मेल्या म्हशीला मणभर दूध : http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/my-friend-and-f... तर अर्धमेल्या म्हशीला वीस शेरांपर्यंत न्यायला हरकत नाही : http://www.lokmat.com/national/security-protection-sonia-gandhis-securit... -गा.पै.

एस 09/09/2017 - 19:53
माजी पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी ठपका ठेवला आहे. हे चांगले झाले. आधीचे पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खरोखरच चांगली पावले उचलली होती. परंतु त्यांचा हा पवित्रा खुपणाऱ्या लॉबीने दबाव आणून त्यांची उचलबांगडी करवली होती. त्यांच्यानंतर आलेल्या नटराजन यांनी तर भ्रष्टाचाराचा धडाका लावला होता अशी कुजबूज बरीच ऐकू येत होती. त्यांना त्याचे योग्य फळ मिळेल अशी आशा.

In reply to by एस

arunjoshi123 11/09/2017 - 17:01
पतिकेंद्रित आयुष्य जगत असल्यामुळे स्त्रीवादी लोकांचा स्वाती यांस विरोध असेल काय? =================== स्त्रीचं आयुष्य पतीशी केंद्रित नसावं असा स्त्रीवादी सुर अनेकदा ऐकला आहे. स्वाती महाडिक यांनी पतीचे काम पुढे चालू ठेवणे, इ इ आपल्या प्रेरणेचे स्रोत सांगीतले आहेत.

तेजस आठवले 09/09/2017 - 20:13
१. ५०० आणि १००० च्या जवळजवळ ९९% नोटा परत आल्या आहेत याचा अर्थ ज्या लोकांच्याकडे काळा पैसा होता व त्यांनी बँकिंग सिस्टिम मध्ये परत आणला आहे. (आता भाजप चे प्रवक्ते असे म्हणतात कि काळा पैसा बँकिंग सिस्टिम मध्ये आला म्हणून तो पांढरा होत नाही IT वाले त्यांची चौकशी करणार आहेत, पण आपण एक गोष्ट लक्ष्यात घयायला हवी कि हेच भाजप चे प्रवक्ते आधी ३ ते ४ लाख कोटी रुपये बँकेत परत येणार नाहीत असे अंदाज वर्तवित होते, आता काय झालं त्या अंदाजच ? हे अपयश नाही का? म्हणजे काळ्या पैशे वाल्यानी सरकारचा पहिला आणि मोठा अडथळा मोडून काढला.
पण हा अंदाज जर चुकला तर त्यात वाईट काय आहे ? अंदाज चुकला हे अपयश कसे ? दडवून ठेवलेला काळा पैसा उजेडात आला, परत बँकेत जमा झाला आणि जर सगळ्याच लोकांना वापरायला मिळाला तर त्यात चुकीचे काय आहे? आणि राहिलेल्या १% नोटा जर परत सिस्टिम मध्ये आल्या नाहीयेत ह्याचा अर्थ ज्यांनी काळा पैसा रोखीत ठेवलेला होता ते पकडले जाण्याच्या भीतीने तो बाहेर काढत नाहीयेत आणि त्यावर त्यांनी पाणी सोडले आहे असा होऊ शकत नाही का ? अजून एक महत्वाची गोष्ट, बनावट नोटा ज्याकोणाकडे असतील(कळत/नकळत) ते त्या बँकेत भरायला जाणारच नाहीत / गेले तर पकडले जातील की नाही? त्यामुळे नोटाबंदीमुळे ज्या ५००/१००० च्या नोटा बनावट होत्या त्या आता अवैध झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा गैरवापर आता होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती नाही का ?
बरं आता ह्या IT डिपार्टमेंट कडे ह्या लाखो संशयास्पद लोकांचं चौकशी करण्याचं मनुष्यबळ आहे का ? लाखो केसेस उभ्या करण्याचे आणि सोडवण्याचे अधिकार आणि ताकत आहे का ?)
हा एक वेगळा मुद्दा आहे. मनुष्यबळ असणे/ नसणे, ते कुशल/अकुशल असणे ह्याचा नोटाबंदीशी काहीही संबंध नाही. तश्यापण भारतात सगळ्याच क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही. पोलीस आणि न्यायालये अपुरी आहेत म्हणून काय गुन्हेच दाखल करू नयेत की काय? लागतील तेव्हा लागतील निकाल.
६. म्हणजे digitization, cash less economy, आधार कार्ड संलग्नता, लोकांची बँक अकाउंट ह्या गोष्टी होणे अत्यंत महत्वाच्या आहेत पण यासाठी नोटबंदी ची अजिबात आवश्यकता नाही , जगातील अनेक देशांनी ह्या गोष्टी नोटबंदी सारखा निर्णय न घेता केलेला आहे.
भारतात रोख रकमेचे प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यामुळे रोख स्वरूपात पैसा कुठे कुठे फिरतो हे शोधून काढणे अवघड आहे. आपल्याकडे काही महाभाग असेही आहेत त्यांच्या नावावर २ पेक्षा जास्त पॅनकार्ड आहेत आणि त्यांनी त्या नावे व्यवहार केले आहेत. ह्याशिवाय बेनामी संपत्ती आहेच की. मेलेल्या व्यक्तीच्या नवे वर्षानुवर्षे पेन्शन जमा होत असल्याच्या केसेस आहेतच की.घरगुती वापराचे गॅस सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी वापरले जायचे की नाही? त्यामुळे आता गॅस बुक करताना पण KYC सक्तीची झाली.कुठून तरी सुरुवात व्हायलाच हवी की नाही?
७. बँकेत जमा झालेला ४-५ लाख कोटींचा पैसा हा संशयास्पद आहे, यातील बहुतांश पैसा काळा पैसा म्हणून उघड होणार आहे.(असे झाले तर चांगलंच आहे पण असे होणे खूप अवघड आहे. याच कारण हा प्रचंड पैसा खोटा आहे हे सरकार ला सिध्द करायचं आहे ह्या लोकांना न्हवे,
हे कसे काय बुआ ? माझ्या अकाउंट मध्ये भरलेला पैसा कुठून आला ते सरकार मलाच विचारणार ना? मी वैध स्रोत दाखवू शकलो नाही तर तो पैसा काळा पैसाच की. माझ्या जवळच्या नात्यातला एक माणूस वाहने खरेदी विक्री क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांच्या शोरूम मध्ये १५-१५ लाख कॅश देऊन गाड्या विकत घेणारी माणसे येत असत. (आता येतात की नाही ते माहित नाही). नोटबंदी आणि इतर उपायांमुळे आता अश्या स्वरूपाचे व्यवहार होण्याचे प्रमाण कमी होईल की नाही तुम्हीच सांगा. ज्यांच्या कडे काळे पैसे आहेत त्यांनी ते रोखीत न ठेवता मालमत्ता,जमीन, उद्योग, कंपन्या, सोने इ. स्वरूपात दडवून ठेवलेले आहेत त्यामुळे ही नोटबंदी फेल गेली असे म्हणणार्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्यांना बेहिशोबी संपत्ती निर्माण करायचीच आहे ते त्यासाठी काहीही करतील.भ्रष्टाचार करणारा कसाही करू शकेल.पैशांची लाच देता/घेता येत नसेल तर धान्य देईल, सोने देईल, गुपचूप एखादे दुसरे काम करून दिले जाईल. ह्या लोकांना संपत्ती इतकी प्रिय असते कि त्यासाठी पोटच्या अपत्यांचाही ही लोक व्यवहार करतील. पण म्हणून काहीच प्रयत्न करू नयेत का ?
भविष्यात जरी नोटबंदीचे फायदे होणार असतील तरी आत्ता झालेले नुकसान खूप आहे ते भविष्यातील फायद्यातून भरून निघणार नाही.
हे जरा समजावून सांगा.माझ्या मते कोणीच ह्याचे सर्वाना पटेल असे उत्तर देऊ शकत नाही.

In reply to by तेजस आठवले

सुबोध खरे 09/09/2017 - 20:40
असं कसं? असं कसं? एकदा ठरलंय ना डिमॉनेटायझेशन फेल गेलंय? मग परत परत शिळ्या कढीला ऊत का आणताय? एक फायदा नक्की झालाय यामुळे. सामान्य लोकांना जी डी पी, रोकडरहित अर्थव्यवस्था, आपली गंगाजळी इ बद्दल थोडं फार ज्ञानही झालं. एवढंच नव्हे तर बरेच "असामान्य" लोक एकदम अर्थतज्ज्ञ झाले आहेत आणि डिमॉनेटायझेशन फेल का झालं याबाबत माझं आणि रघुरामन राजन किंवा डॉ मनमोहन सिंह / अमर्त्य सेन यांचे एकमत कसं आहे याबद्दल व्याख्यानेही देऊ लागले आहेत.

In reply to by तेजस आठवले

अमितदादा 09/09/2017 - 21:19
पण हा अंदाज जर चुकला तर त्यात वाईट काय आहे ? अंदाज चुकला हे अपयश कसे ? दडवून ठेवलेला काळा पैसा उजेडात आला, परत बँकेत जमा झाला आणि जर सगळ्याच लोकांना वापरायला मिळाला तर त्यात चुकीचे काय आहे? आणि राहिलेल्या १% नोटा जर परत सिस्टिम मध्ये आल्या नाहीयेत ह्याचा अर्थ ज्यांनी काळा पैसा रोखीत ठेवलेला होता ते पकडले जाण्याच्या भीतीने तो बाहेर काढत नाहीयेत आणि त्यावर त्यांनी पाणी सोडले आहे असा होऊ शकत नाही का ?
मुळात मूळ प्रतिसादात एक गोष्ट लिहायची राहून गेली, कि ३-४ लाख कोटींचा काळा पैसा कॅश मध्ये आहे हे आधीच गृहीतक आणि आता तो पैसा बँकेत आला आहे हे दोन्ही गृहीतक (काळा पैसा बँकेत आला हे सत्य आहे परंतु त्याचा आकडा किती हे विवादित आहे ) आकड्याबाबत चुकीची आहेत, याबाबत सरकार ची किंवा RBI ची कोणतीही आकडेवारी उपलब्द नाही . लेख क्रमांक एक किंवा दोन वाचा त्यात लिहलंय कि काळा पैसा कॅश च्या स्वरूपात फक्त १०-१५ % आहे काळ धन हे जमीन, स्थावर मालमत्ता आणि सोने ह्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात आहे (हे आपल्यालाही माहित आहे ), त्यामुळे काळा पक्षाच्या स्वरूपातील लढाईसाठी जालीम उपाय म्हणून नोटबंदी आणली गेली तो मूळ उद्देशच चुकीच्या आकड्यावर अवलंबून होता. लक्ष्यात घ्या काळा पैसा बँकेत येणारच नाही हे गृहीतक होत ज्याच्यावर हा निर्णय घेतला होता, जर हे गृहीतक /अंदाज मोठ्या प्रमाणात चुकला तर हा निर्णय अयशस्वी ना. आता बँकेत आलेला काळा पैसा आम्ही शोधून काढू हे नंतरच शहाणपण आहे हे लक्ष्यात घ्या.
हे जरा समजावून सांगा.माझ्या मते कोणीच ह्याचे सर्वाना पटेल असे उत्तर देऊ शकत नाही.
हे वाक्य लिहंण्यामागचा उद्देश. समजा सरकार ने बँकेत जमा झालेला सगळा काळा पैसा जप्त केला (हे तुम्हाला आणि आम्हाला भविष्यात दिसूनच येईल) तरीही जेवढा फायदा सरकार ला होईल त्यापेक्षा जास्त तोटा आता झाला आहे, वेस्ट manhours, गेलेल्या नोकऱ्या, घटलेली GDP, शेती आणि असंघटित क्षेत्राची झालेली हानी.
अजून एक महत्वाची गोष्ट, बनावट नोटा ज्याकोणाकडे असतील(कळत/नकळत) ते त्या बँकेत भरायला जाणारच नाहीत / गेले तर पकडले जातील की नाही? त्यामुळे नोटाबंदीमुळे ज्या ५००/१००० च्या नोटा बनावट होत्या त्या आता अवैध झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा गैरवापर आता होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती नाही का ?
Fake notes amounting to Rs28 crore recovered till September: Kiren Rijiju चुकीचा समज. लोकांनी खोट्या नोटा छापून घरात ठेवलेल्या काय ? सरकार ने स्वतः सांगितलेलं कि खोट्या नोटा अर्थव्यवस्थेत फिरतायत. तसेच सामान्य लोकांना सुद्धा माहिती न्हाई कि नोटा खोट्या आहेत कि खऱ्या, त्या बँकेत आल्यानंतर च त्याची बहुतांश लोकांना खबर लागते कि नोटा खोट्या आहेत म्हणून. बरं वर दिलेली बातमी वाचा नोटबंदीच्या आधीची आहे, दरवर्षी ५० करोड हि न्हवत खोट्या नोटांचं प्रमाण. मग खोट्या नोटा निकालात काढणं कसं असू शकत नोटबंदी सारख्या क्लिष्ट आणि तापदायी प्रक्रियेचं उद्दिष्ट ? काश्मीर मधले हल्ले थांबले काय ?
भारतात रोख रकमेचे प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यामुळे रोख स्वरूपात पैसा कुठे कुठे फिरतो हे शोधून काढणे अवघड आहे. आपल्याकडे काही महाभाग असेही आहेत त्यांच्या नावावर २ पेक्षा जास्त पॅनकार्ड आहेत आणि त्यांनी त्या नावे व्यवहार केले आहेत. ह्याशिवाय बेनामी संपत्ती आहेच की. मेलेल्या व्यक्तीच्या नवे वर्षानुवर्षे पेन्शन जमा होत असल्याच्या केसेस आहेतच की.घरगुती वापराचे गॅस सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी वापरले जायचे की नाही? त्यामुळे आता गॅस बुक करताना पण KYC सक्तीची झाली.कुठून तरी सुरुवात व्हायलाच हवी की नाही?
हेच सांगतोय ह्या कारणासाठी नोटबंदी करायची आवश्यकता नाही. तुम्हाला यासाठी नोटबंदी हवी होती काय ?
माझ्या जवळच्या नात्यातला एक माणूस वाहने खरेदी विक्री क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांच्या शोरूम मध्ये १५-१५ लाख कॅश देऊन गाड्या विकत घेणारी माणसे येत असत. (आता येतात की नाही ते माहित नाही). नोटबंदी आणि इतर उपायांमुळे आता अश्या स्वरूपाचे व्यवहार होण्याचे प्रमाण कमी होईल की नाही तुम्हीच सांगा
अत्यंत नगण्य प्रमाणात कमी होईल. एक उदाहरण आता कर्नाटक मध्ये एका काँग्रेस च्या आमदारावर IT विभागाने छापे टाकून २०-४० कोटी काळे रुपये रोख पकडले, म्हणजे थोडक्यात काय ह्या आमदाराने त्याचा काळा पैसा बदलून नवीन नोटा मध्ये साठवला होता ना, मग का नाही हा सापडला आधी ? का हा राज्यसभेच्या निवडणुकी वेळीच सापडला ? भविष्यात तुम्हाला आणि आम्हाला दिसेलच कि किती काळा पैसा बाहेर आला ते.
ज्यांच्या कडे काळे पैसे आहेत त्यांनी ते रोखीत न ठेवता मालमत्ता,जमीन, उद्योग, कंपन्या, सोने इ. स्वरूपात दडवून ठेवलेले आहेत त्यामुळे ही नोटबंदी फेल गेली असे म्हणणार्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्यांना बेहिशोबी संपत्ती निर्माण करायचीच आहे ते त्यासाठी काहीही करतील.
अगदी अगदी आमचं सुद्धा हेच म्हणणं आहे. कि नोटबंदी हा काळ्या धनावरचा जालीम उपाय म्हणून सामान्य लोकांवर लादणारयांना एव्हडी गोष्ट लक्ष्यात अली नाही कि यातून काळे धन बाहेर निघेल याची कोणतीही गॅरंटी नाही पंरतु अर्थव्यवस्थेस किंवा प्रामाणिक लोकांना आपण फार मोठं नुकसान पोहचवू शकतो म्हणून. @गामा पैलवान अर्थव्यवस्थेतील साधे तत्व आहे कि निर्णय असा घ्यावा कि ज्याने फायदा होईल. इथे होणारे फायदे आणि तोटे यांचे गणित काढल्यास अर्थव्यवस्थेस झालेलं मोठं नुकसान दिसून येईल.

In reply to by अमितदादा

arunjoshi123 11/09/2017 - 18:08
लक्ष्यात घ्या काळा पैसा बँकेत येणारच नाही हे गृहीतक होत ज्याच्यावर हा निर्णय घेतला होता, जर हे गृहीतक /अंदाज मोठ्या प्रमाणात चुकला तर हा निर्णय अयशस्वी ना.
अंदाज चुकला हे १००% बरोबर आहे. याबद्दल खाली* मात्र निर्णय चुकला हे कसं? साध्य काय होतं? काळा पैसा नष्ट करणे. ते साध्य झालं का? तर हो. ============================================ सरकारचा अंदाज चुकला आणि वाईड मार्जिनने चुकला. लोकांना "झाकल्या मुठितली प्रतिष्ठा" आणि पैसा यांतील काय अधिक प्रिय असेल याबद्दलचा सरकारचा अंदाज चुकला. http://economictimes.indiatimes.com/wealth/tax/demonetisation-row-penalties-prosecution-that-tax-department-can-slap-on-black-money-holders/articleshow/55349571.cms इथे पाहता येईल कि आयकराबाबत पेनाल्टी कराच्या अर्धी असेल. म्हणजे १०० रु मधून एरवी ० रु द्यावे लागतात (काळापैसा), कायद्याने ३३ द्यावे लागतात, आणि नोटबंदीच्या इमर्जन्सीमुळे ५० द्यावे लागतात. मग उरलेल्या ५० वर पाणि का फेरायचं? त्याला एकच कारण असू शकतं ते म्हणजे पब्लिकली प्रतिष्ठा न जाणे. त्याची फार चाड नसेल तर प्रश्न येत नाही. ========================= आज भारताचं सबंध सिविल इंजिनिअरिंग क्षेत्र (सरकारी) ठप्प आहे. का? "तुम्ही" अगोदर व्हॅट नाही भरायचे? मिनिमम वेज नाही द्यायचे? इन्कम टॅक्स नाही द्यायचे? मग फरक काय आहे? याचं उत्तर असं आहे कि काळा पैसा वापरून चालवत असलेला धंदा पांढरा पैसा करून तसाच चालवता येत नाही. त्याची सगळी गणितं गडगडतात. वेफर थिन मार्जिन्स आणि ह्यूज बार्गेनिंग असतं त्याकरिता पण.

In reply to by तेजस आठवले

अमितदादा 09/09/2017 - 21:28
आणि राहिलेल्या १% नोटा जर परत सिस्टिम मध्ये आल्या नाहीयेत ह्याचा अर्थ ज्यांनी काळा पैसा रोखीत ठेवलेला होता ते पकडले जाण्याच्या भीतीने तो बाहेर काढत नाहीयेत आणि त्यावर त्यांनी पाणी सोडले आहे असा होऊ शकत नाही का ?
हे बरोबर नाहीये. उरलेली १ % सगळी लोक काळे पैसेवाली नाहीत, अनेक परदेशी भारतीय लोक ज्यांना २५ हजारपर्यंतची रक्कम कायदेशीर रित्या भारताबाहेर नेता येते त्यांना पैसा बदलता आला नाही (भारतात आल्यावर टॅक्सी हॉटेल इत्यादी साठी उपयोगी पडते) , अनेक दुर्गम भागात राहणारी लोक त्यांना पैसा बदलता आला नाही, नेपाळ आणि भूतान मध्ये असणारा भारतीय पैसा बदला गेला नाही (जालावर याची पूर्ण माहिती आहे ).

In reply to by अमितदादा

ट्रेड मार्क 09/09/2017 - 22:07
सगळ्यात एक मुद्दा सोयीस्करपणे विसरला जातोय की फक्त नोटबंदी हे एकच पाऊल सगळ्या समस्या सोडवणार नाहीये हे सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं. हे बाकी अनेक पावलांपैकी एक पाऊल आहे. तसंही नोटबंदी "असफल" व्हावी म्हणून प्रयत्न करणारे लोक सफल व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या लोकांपेक्षा बरेच जास्त होते आणि आहेत. स्वतःच्या थोड्या फायद्यासाठी किती लोकांनी काळाबाजारवाल्यांच्या नोटा लायनीत परत परत उभं राहून बदलून दिल्या? काही बँकेतल्या लोकांनी आणि काही सीए मंडळींनी या लोकांना कशी मदत केली? हे होऊ नये म्हणून तिथेच असणाऱ्या इतर लोकांनी काय केलं? जिथे लोकांचीच सुधारायची इच्छा नाहीये किंवा इच्छा असून "मी कशाला प्रयत्न करू, करेल दुसरं कोणीतरी" अशी वृत्ती असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी काही होणार नाही. नोटबंदीमुळे काही उद्योग बंद कसे पडले हे मात्र मला कळलं नाही. ते कायदेशीर उद्योग नव्हते का? जर कायदेशीर होते तर त्यांची बँकेत खाती नव्हती का? बँकांनी खाती उघडायला नकार दिला होता का? जरी तिथे काम करणाऱ्या लोकांची खाती आधी नव्हती म्हणलं तरी नंतर उघडायला काय अडचण होती? व्यवहार करीन तर रोखीनेच नाहीतर करणार नाही असे काही तत्व होते का?

In reply to by ट्रेड मार्क

तेजस आठवले 09/09/2017 - 22:20
हो. मी पण माझ्या प्रतिसादात असेच सांगायचं प्रयत्न करतोय की कुठून तरी सुरवात केली गेली आहे. पावत्या द्यायचा आग्रह मी पण पूर्वी धरत नसे पण आता शक्यतो सगळीकडे पावती मागतो. व्यापारी लोक सुद्धा पावत्या द्यायला काकु करत असत किंवा सरळ नकार देत असत. नोटाच दुर्मिळ झाल्यावर सगळ्यांनाच पांढरे व्यवहार करणे भाग पडतंय. मी सुद्धा पूर्वी ज्या गोष्टी रोखीने करत असे त्या आता रोखीने करत नाही (वीज/फोन ची बिले भरणे, ऑनलाईन गॅस बुक करणे इ.)

In reply to by ट्रेड मार्क

अमितदादा 09/09/2017 - 22:28
नोटबंदीमुळे काही उद्योग बंद कसे पडले हे मात्र मला कळलं नाही. ते कायदेशीर उद्योग नव्हते का? जर कायदेशीर होते तर त्यांची बँकेत खाती नव्हती का? बँकांनी खाती उघडायला नकार दिला होता का? जरी तिथे काम करणाऱ्या लोकांची खाती आधी नव्हती म्हणलं तरी नंतर उघडायला काय अडचण होती? व्यवहार करीन तर रोखीनेच नाहीतर करणार नाही असे काही तत्व होते का?
ट्रेडमार्क साहेब आपल्यास माहित असेलच कि ग्रामीण भागात शेती व्यवहार हे ९०%टक्के रोखीत च होतात ते. जेंव्हा अर्थव्यवस्थेतील पैसा काढून घेण्यात आला त्याचा शेतीच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला, कोणताही दुष्काळ नसताना शेत मालाचे भाव कसे पडले हे काही तज्ज्ञांनी दाखवून दिल आहे, यातूनच पुढं शेती कर्ज माफीला बळ मिळालं. कन्स्ट्रक्शन तसेच इतर असंघटित क्षेत्र जे पूर्ण रोखीवर अवलंबून होत ते एकाचवेळी ठप्प झाले (मी जालावरच्या अनेक बातम्या काडून इथे चिटकवू शकतो). व्यवहार हे रोखीने कमी व्हायला हवे मान्य परंतु हा बदल एका क्षणात नाही घडू शकत आणि असे करायला गेल्यास मोठा तोटा होऊ शकतो, जे इथे दिसून येते.
जिथे लोकांचीच सुधारायची इच्छा नाहीये किंवा इच्छा असून "मी कशाला प्रयत्न करू, करेल दुसरं कोणीतरी" अशी वृत्ती असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी काही होणार नाही.
याबाबत दुमत नाही, म्हणूनच कोणताही निर्णय घेताना प्रामाणिक लोकांना नुकसान होणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे, जर प्रामाणिक लोकांचं नुकसान होणार असेल आणि अप्रामाणिक लोकांना काही होणार नसेल किंवा कमी प्रमाणात नुकसान होणार असेल तर हे चुकीचे आहे.
सगळ्यात एक मुद्दा सोयीस्करपणे विसरला जातोय की फक्त नोटबंदी हे एकच पाऊल सगळ्या समस्या सोडवणार नाहीये हे सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं.
सरकारचा टोन आत्ता बदलाय, हे चूक समजल्यानंतर च शहाणपण आहे. मोदींची जुनी भाषणं पहा ते म्हणाले होते मला ५० दिवस द्या आणि मी चुकलो कि मला हवी ती शिक्षा द्या. त्यावेळी सरकारने हा निर्णय "हर एक दुःख एक हि दवा " म्हणून प्रेसेंट केलेला. हा निर्णय घेतला तेंव्हा मला हि वाटलं होत कि काही तरी क्रांतिकारी बदल घडेल परंतु हळूहळू यातील फोलपणा लक्ष्यात आला. मी काही तज्ञ् नाही, परंतु आता आलेल्या आकडेवारी नुसार आणि तज्ज्ञांच्या लेखानुसार माझे मत बदलले आहे, खरी वस्तूथिती दिसत आहे. नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही, माझे असे म्हणणे आहे कि जे फायदे सांगितले जातायत त्यासाठी नोटबंदी करायची आवश्यकता न्हवती आणि नोटबंदीचे मूळ उद्देश असफल झालेत.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 09/09/2017 - 22:58
कोणताही दुष्काळ नसताना शेत मालाचे भाव कसे पडले हे काही तज्ज्ञांनी दाखवून दिल आहे याच्याशी नोटाबंदीचा संबंध नाही. भूतकाळात नोटाबंदी नसतानाही व दुष्काळही नसताना अनेकदा भाव पडलेले आहेत. भाव कमीजास्त होण्याचा संबंध फक्त मागणी व पुरवठा यांच्याशीच असतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला की भाव पडतातच.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा 09/09/2017 - 23:22
भाव कमीजास्त होण्याचा संबंध फक्त मागणी व पुरवठा यांच्याशीच असतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला की भाव पडतातच.
अगदी बरोबर. मुळात नोटबंदी च्या काळात बाजारातील पैसा काढून घेतल्यामुळे ग्राहकांना आपल्या दैनंदिन गरजावरती नियंत्रण आणावं लागलं विशेतः रोखीने होणाऱ्या व्यहवारावरती, व्यापाऱ्यांनी आपली खरेदी थंडावली यातून कृत्रिमरीत्या मागणी कमी झाली पुरवठा मात्र तेवढाच राहिला यातून भाव पडले. विदर्भात व्यापाऱ्यांनी बहुतेक कापूस हमीभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्याची उदाहराणे आहेत. माझ्या कुटुंबास आलेला अनुभव: नोटबंदीच्या काळात सोयाबीन विकण्यास काढलेलं होत, व्यापाऱ्यांनी भाव पडून सांगितला, कारण बाजारात पैसेच नाहीत. आमच्या कुटुंबाने विकले नाही हि गोष्ट वेगळी परंतु फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना पर्याय न्हवता. बरं नोटबंदी चा परिणाम नाही तर गेल्यावर्षी दुष्काळ न पडता विविध राज्यातील शेतकरी एकाचवेळी कर्जमाफी साठी का मागे लागलेत? त्यांच्यातील सुप्त मागणीला कशामुळे बळ मिळाले. मला सध्या नोटबंदी आणि शेतमालाच्या घसरलेल्या किंमती यावर आकडेवारी सहित प्रसिद्ध झालेला इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता मधील लेख सापडत नाही सापडल्यास चिटकवतो इथे. तोपर्यंत कुणाला सापडल्यास कृपया इथे चिटकवावा.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 09/09/2017 - 23:29
मुळात नोटबंदी च्या काळात बाजारातील पैसा काढून घेतल्यामुळे ग्राहकांना आपल्या दैनंदिन गरजावरती नियंत्रण आणावं लागलं विशेतः रोखीने होणाऱ्या व्यहवारावरती म्हणजे नोटाबंदीच्या काळात लोकांनी खाणंपिणं कमी केलं होतं आणि ते अर्धपोटी रहात होते?

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 09/09/2017 - 23:33
बरं नोटबंदी चा परिणाम नाही तर गेल्यावर्षी दुष्काळ न पडता विविध राज्यातील शेतकरी एकाचवेळी कर्जमाफी साठी का मागे लागलेत? त्यांच्यातील सुप्त मागणीला कशामुळे बळ मिळाले. शेतकरी कायमच कर्जमाफी मागतात व पुढेही मागत राहतील. कर्जमाफीच्या मागणीचा व नोटाबंदीचा संबंध नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा 09/09/2017 - 23:47
The crops of wrath वरील लेख वाचा मग नोटबंदी चा शेती मालाच्या भावाशी असलेला संबंध कळेल. अजून एक चांगला लेख आहे तो सापडल्यास देतो इथे. मुळात ग्राहकांनी नियंत्रण आणणे याचा अर्थ ते अर्धपोटी होते असे होत नाही आणि मी बोललेलो नाही, तुम्ही उगाच काहीही conclusion काढू नका ते तुम्हाला शोभत नाही, चर्चेत रस नसेल तर बाजूला व्हा. नोटबंदी मुळे कापड व्यवसायास तोटा झाला हे सर्वश्रुत आहे कारण कमी झालेली मागणी म्हणून लोक काय उघडी राहत होती का ? शेतकरी कर्जमाफीची मागणी दरवर्षी करत नाही, बर समजा जरी केली तर शासन ते मान्य करत नाही मग का अनेक राज्य सरकारांनी मागण्या मान्य केल्या कोणतीही आपत्ती नसताना याच कारण त्यांना माहित होत कि शेतकऱयांना फटका बसलेला आहे ते भलेही ते मान्य न करोत.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 10/09/2017 - 15:21
नोटबंदीच्या काळात ग्राहकांनी नियंत्रण आणले याचा अर्थ नक्की काय होतो? कोणताही ग्राहक अन्नधान्यावरील खर्च कमी करणार नाही. तशीच वेळ आली तर वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. वस्तूंची खरेदी पुढे ढकलेल. या वस्तूंच्या विक्रीत घट झाल्यास त्याचा परीणाम शेतकर्‍यांवर कसा होईल कारण शेतकर्‍यांची उत्पादने वेगळी आहेत. वरील संपूर्ण लेखात टोमॅटो, कांदे, बटाटे इ. चे भाव कमी झाले याचा उहापोह आहे व त्याचा संबंध निश्चलीकरणाशी जोडला आहे. या उत्पादनांच्या २०१६ मधील भावाची तुलना २०१५ मधील भावाशी केली आहे. परंतु मागणी-पुरवठा या तत्वावरच भावात चढउतार होते याचा लेखकाने उल्लेख केलेला नाही. २ वेगवेगळ्या वर्षातील किंमतीची तुलना करताना दोन्ही वर्षातील भाव, मागणी व पुरवठा या तिन्हीची आकडेवारी दिली तरच ती तुलना वस्तुनिष्ठ होते. या दोन वर्षात वरील उत्पादनांचे एकूण उत्पादन किती झाले याची आकडेवारी दिलीच नाही. ती दिली असती तर नक्कीच लक्षात आले असते की २०१५ च्य तुलनेत २०१६ मध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने आपोआपच भाव घसरले. याबाबतीत तूर व इतर डाळींचे उदाहरण बोलके आहे. २०१५ मध्ये दुष्काळामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाल्यामुळे पुरवठा कमी होऊन भाव खूप वाढले होते. परंतु २०१६ मध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डाळींच्या भावात घट झाली. हेच तत्व भाजीपाला, फळे किंवा इतर कोणत्याही उत्पादनाला लागू होते. धान्य वगळता बराचसा शेतमाल नाशवंत असल्याने हे त्यात हे चढउतार खूपच मोठे असतात. बाकी कर्जमाफीचं म्हणाल तर शेतकरी कायमच कर्जमाफी मागतात, परंतु सत्ताधारी दरवर्षी ही मागणी मान्य न करता राजकीय सोय बघूनच तो निर्णय घेतात. हे निर्णय फक्त राजकीयच असतात. शेतकर्‍यांना फटका बसला आहे, दुष्काळ इ. कारणे त्यासाठी विचारात घेतली जात नाहीत. २००८ ची कर्जमाफी २००९ ची निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून झाली होती. २०१७ मधील उ. प्र. मधील कर्जमाफीमागे विधानसभा निवडणुक हे कारण होते. उत्तर प्रदेशात भाजपला सत्ता मिळाल्याने व सत्ता मिळाल्यावर तिथे लगेचच कर्जमाफीचा निर्णय केल्याने, महाराष्ट्राला कर्जमाफी नाकारण्यासाठी कोणतेही सबळ कारण उरले नव्हते. त्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. निश्चलीकरणामुळे शेतकर्‍यांना फटका बसला आणि म्हणून कर्जमाफी केली हा दावा असत्य आहे. उत्तर प्रदेशाने कर्जमाफी केली नसती तर ती महाराष्ट्रातही झाली नसती.

In reply to by अमितदादा

पिजा 11/09/2017 - 19:56
श्रीगुरुजी म्हणतात तसं तुम्ही शेअर केलेल्या हरीश दामोदरण यांच्या लेखात मागच्या वर्षीच्या उत्पादनाचे आकडे नाहीत. ते ह्या लेखात मिळतील. लेख वाचल्यास हेच दिसून येतं की भाव हे उत्पादन वाढ आणि आयातीवर जे निर्बंध घालण्यात सरकारने दाखवलेली अनास्था यामुळे घसरले, त्यात नोटबंदीचा फारसा हात नाही. पण सरकारी अनास्था हाच मोठा गंभीर मुद्दा आहे (तो यावर्षी सरकारने करेक्ट केल्याच्या बातम्या आहेत). आधीच भाव गडगडलेले त्यात नोटबंदीमुळे व्यवहार ठप्प, त्यामुळे खरंतर लोक वैतागलेले होते. तो वैताग यावर्षी online विमा आणि कर्जमाफीचे अर्ज भरताना अजून वाढलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा 10/09/2017 - 01:36
Modi’s DeMo Gambit Failed: Costs Exceed Gains And Farm Anger Is The Final Piece Of Evidence गुरुजी स्वराज ह्या मासिकामध्ये आलेला आणखी एक लेख वाचा हि विनंती आणि नंतर आपले मत बनवा. पूर्ण लेख नसेल वाचायचा तर खालील मुद्दे वाचा. त्या लेखातील काही मुद्दे १. It is time for a mea culpa on demonetisation. This writer has been largely positive on the medium-to-long-term benefits of notebandi, as opposed to its short-term downsides, including a fall in gross domestic product (GDP) growth rates for one or two quarters. Now, and especially after the farmer agitations for loan waivers, I believe that the negative side of the ledger on demonetisation (DeMo) is larger than the positive. It has failed. २. The bottom line on DeMo, seven months after Modi announced that he was withdrawing the legal tender status of Rs 500 and Rs 1,000 notes from 8 November, is that the costs are outweighing the benefits. And the rising demand for fiscally ruinous farm loan waivers surely has a direct link to DeMo. Maybe loan waivers would have happened anyway in the run-up to 2019, but it is equally clear that DeMo has emptied many mandis of cash, and the demand for ready harvested crops has collapsed in many parts of the country, as Harish Damodaran notes in his column in The Indian Express. ३. Even if we assume that only half the waivers are directly due to the DeMo impact, we are talking of a tripling of the figure first put out by CMIE – at the very least, with most costs yet to show up. This means the DeMo damage could be in the region of Rs 3.5-4 lakh crore at the minimum. Since the wildest estimate of gains from black money not coming back to the banking system do not exceed this latest ballpark estimate of loss, it is clear why DeMo has failed its cost-benefits test.

In reply to by अमितदादा

arunjoshi123 11/09/2017 - 18:19
ग्रामीण भागात शेती व्यवहार हे ९०%टक्के रोखीत च होतात.
जन धन खातं खोलावं नि व्यवहार रोखीत टाळावेत. शेतकरी झाले म्हणून काय झालं? त्यांना देखिल झटका देणं आवश्यक आहे.

In reply to by अमितदादा

ट्रेड मार्क 12/09/2017 - 02:21
ग्रामीण भागात शेती व्यवहार हे ९०%टक्के रोखीत च होतात जनधन खात्यांचा आग्रह धरून आता बराच काळ लोटला. सरकारने प्रयत्न करून आणि सोय उपलब्ध करून देऊनसुद्धा जर त्याचा फायदा लोक घेऊ शकत नसतील तर काय करावे? त्यापुढे जाऊनही, नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, प्रत्येक अडचणीत स्वतःची तुंबडी भरून घ्यायची वृत्ती कधी जाणार? शेतकऱ्यांचे बँक खाते नाही हे एकवेळ मानले तरी दलालांचे पण नव्हते? मला फारशी कल्पना नाही पण छोटे शेतकरी रोजच्या रोज असा किती हजारांचा माल विकतात? दलालांनी ही संधी समजून शेतकऱ्यांना नाडलेच ना? हा निर्णय घेतला तेंव्हा मला हि वाटलं होत कि काही तरी क्रांतिकारी बदल घडेल परंतु हळूहळू यातील फोलपणा लक्ष्यात आला. खरंच हे खेदाने म्हणावं लागतंय की नोटबंदी "सफल" व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्यांपेक्षा ती "असफल" कशी होईल हे बघणारे बरेच जास्त होते/ आहेत. असफल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये मुद्दामून करणारे होते तसेच अनावधानाने किंवा स्वतःच्या तात्कालिक फायद्यासाठी करणारे लोकही होते. साध्या १० लोकांच्या प्रोजेक्टमध्ये अगदी १ जरी मेम्बर प्रोजेक्ट सफल होऊ नये यासाठी प्रयत्न करणारा असेल आणि २/३ लोक चुकार असतील तर प्रोजेक्ट फेल होतो. इथे तर जवळपास १ कोटी लोकांचा प्रोजेक्ट होता. बदल घडवून आणायला सगळ्यांचा सपोर्ट आवश्यक असतो जो कदाचित कमी पडला. परंतु आता आलेल्या आकडेवारी नुसार आणि तज्ज्ञांच्या लेखानुसार माझे मत बदलले आहे आकडेवारीचं म्हणाल तर ती दोन्ही प्रकारे दाखवता येते. तज्ज्ञांचं म्हणाल तर नोटबंदी सफल आणि असफल दोन्ही म्हणणारे तज्ज्ञ आहेत. नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही, माझे असे म्हणणे आहे कि जे फायदे सांगितले जातायत त्यासाठी नोटबंदी करायची आवश्यकता न्हवती नोटबंदी कशी चांगल्या पद्धतीने राबवता आली असती याचा प्लॅन काही मिपाकर जानेवारी २०१७ च्या आधी देणार होते, तो काही अजून मिळाला नाही. तुम्ही पण सांगा काय उपाय करता आले असते ते. आणि हो जे सांगाल ते सर्वच्या सर्व लोकांना फायद्याचे आणि फुलप्रूफ असावे. म्हणजे एक प्लॅन द्यायचा, जो इतका फुलप्रूफ असेल की ज्याने फक्त सर्वच्या सर्व अप्रामाणिक भारतीयांना तास झाला पाहिजे पण एकाही प्रामाणिक भारतीयास त्रास व्हायला नको. तसेच प्लॅन/ नियम एकदा केले की परत बदलता येणार नाहीत. बोला कधी देताय.

In reply to by ट्रेड मार्क

नोटबंदी कशी चांगल्या पद्धतीने राबवता आली असती याचा प्लॅन काही मिपाकर जानेवारी २०१७ च्या आधी देणार होते, तो काही अजून मिळाला नाही. प्लॅन दिला होता की.

In reply to by ट्रेड मार्क

arunjoshi123 11/09/2017 - 17:32
नोटबंदीमुळे काही उद्योग बंद कसे पडले हे मात्र मला कळलं नाही.
सरकार असं उघड म्हणू शकत नाही, पण हे उद्योग बंद पाडणे हे एक उद्दिष्ट आहेच. ======================== असंघटित क्षेत्रनोटबंदिमुळं बंद पडलं असं म्हणणारे ते बंद पडायचा मेकॅनिझम्/कारण सांगत नाहित. नोटबंदीच्या दरम्यान जे व्यवसायाचे नुकसान झाले त्याच्या दशपट व्यवसायाच्या तेजिमंदिच्या लाटा ते नेहमी पाहत असतात. नेमके एका बार्कुश्या लाटेने कसे बंद पडले? बरं डिमांड तिथल्या तिथं आहे. मंजे बंद जरी पडले तरी पुन्हा दुसरे उभे राहिले पाहिजे होते.

In reply to by अमितदादा

arunjoshi123 11/09/2017 - 17:20
अमितदादा, भारतात काळा पैसा नव्हताच वाटतं. भारतीय लोकांना केवळ न्यूनगंड असावा कि आपले देशवासी अप्रामाणिक आहेत, भ्रष्ट आहेत आणि सगळं स्वच्छ चालत असावं. एन आर आय, नेपाळ आणि भूतानमधले पैसे धरून १००% पैसे पांढरे आहेत. कदाचित आर बी आय चे रेकॉर्ड्स (सरकारी असल्याने) चूक असावेत आणि लोकांकडे याच्यावर चार पैसे पांढरेच निघावेत. किंबहुना मला वाटतं ते तथाकथित काळे पैसे सरकारकडेच असावेत. उगाच लोकांवर शंका. पहा ना, चलनाचे आपण चार भाग करू - आर बी आय, बॅकिंग सिस्टिम, सरकार आणि लोक. यातले तिन भाग तर सिस्टिमचेच आहेत.

In reply to by तेजस आठवले

भंकस बाबा 10/09/2017 - 09:49
बनावट नोटा सिस्टीममध्ये आल्या नाहीत, हास्यस्पद बनावट नोटा बनवणं हे काय रॉकेट सायन्स आहे? दोन हजारच्या बनावट नोटा बाजारात फिरत आहेत, इतकी बेमालूम नक्कल आहे की सुशिक्षित माणूस फसेल, अगदी अशक्य आहे नक्कल मारणे हे ठोठो बोंबलून सांगत होते

In reply to by भंकस बाबा

arunjoshi123 11/09/2017 - 17:37
एकिकडे १. जुन्या बनावट नोटा सिस्टिममधून गेल्या नाहीत सिस्तिममधून नोटबंदीमुळे - कारण त्या नव्हत्याच, खूप कमी होत्या. बनवायला खूप वेळ होता तरी दुसरीकडे २. नव्या प्रचंड प्रमाणात बनावट नोटा बाजारात आहेत, सुशिक्षितांनाही फसवत. काही महिन्यांत. आणि तिसरीकडे ३. नोटबंदी फेल गेली आहे (या फ्रंटवर)

तेजस आठवले 09/09/2017 - 22:22
जिथे लोकांचीच सुधारायची इच्छा नाहीये किंवा इच्छा असून "मी कशाला प्रयत्न करू, करेल दुसरं कोणीतरी" अशी वृत्ती असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी काही होणार नाही.
हे सत्य आहे. बऱ्याच गोष्टी इथेच अडतात.

गामा पैलवान 09/09/2017 - 23:28
अमितदादा,
इथे होणारे फायदे आणि तोटे यांचे गणित काढल्यास अर्थव्यवस्थेस झालेलं मोठं नुकसान दिसून येईल.
शेतकऱ्यांचं नुकसान झालंय असं एकवेळ म्हणता येईल. पण पूर्ण अर्थव्यवस्थाच ठप्प झालीये असं नाही म्हणवंत. आ.न., -गा.पै.

बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, दुर्देवाने सरकारला हयात अपयश आल्याने नोटाबंदी नंतर झालेले अनुषंगिक फायद्याचेच ढोल पिटले जात आहेत. ह्यातील बरेचसे फायदे कायमस्वरूपी नाहीत (उदा: करसंकलन) किंवा नोटाबंदी न करताही ते करता आले असते. २००० हजाराच्या बनावट नोटा छापायचा उद्योग सुरू झाला आहे. भ्रष्टाचार बंद झालेला नाही, काळा पैसा निर्मिती परत चालू झाली आहे. आता राहिला प्रश्न दहशतवादाचा तो ही नष्ट झालेला नाही,मग नोटाबंदी यशस्वी झाली असं कसं म्हणता येईल? नोटाबंदी दरम्यान सामान्य जनतेची काहीही चूक नसताना आर्थिक नुकसान झाले, व अद्याप होत आहे. राज्यातील १२ जि.म.बँका अद्याप खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे देऊ शकत नाही. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळू शकत नाही. नोटाबंदी नंतर १० महिन्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. दीर्घकालीन तोटेही समोर आले पाहिजेत.

In reply to by मार्मिक गोडसे

मामाजी 10/09/2017 - 08:56
"२००० हजाराच्या बनावट नोटा छापायचा उद्योग सुरू झाला आहे. भ्रष्टाचार बंद झालेला नाही, काळा पैसा निर्मिती परत चालू झाली आहे. आता राहिला प्रश्न दहशतवादाचा तो ही नष्ट झालेला नाही,मग नोटाबंदी यशस्वी झाली असं कसं म्हणता येईल?" मी स्वच्छ धूतलेले कपडे वापरले ते परत मळले. माझी कपडे धूवायची मेहेनत अयशस्वी झाली? मी घरातले पंखे पुसले त्यावर परत धूळ जमा झाली. माझी धूळ पुसायची मेहनत अयशस्वी झाली? मी घासलेली भांडी वापरली ती परत खरकटी झाली. माझी भांडी घासायची मेहनत अयशस्वी झाली? चार पाच वर्षां पूर्वी मी घराला रंग लावला तो खराब झाला. माझा रंग लावण्यावर केलेला खर्च वाया गेला?

In reply to by मामाजी

चुकीची तुलना असली तरी नोटाबंदी हा जालीम इलाज नाही हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद! आता पुन्हा मळलेले कपडे, भांडी कधी धुणार?

In reply to by मामाजी

भंकस बाबा 10/09/2017 - 09:54
स्वच्छ धुवून कपडे वापरले, ते मळले, मेहनत बेकार झाली . अहो साहेब धुवायचा खर्च कपड्यापेक्षा जास्त झाला, आयला गिरा तो भी टांग उपर!

In reply to by भंकस बाबा

मामाजी 11/09/2017 - 07:20
भंकस बाबा, धन्यवाद प्रथम मी स्पष्ट शब्दात सांगतो की मी नोटाबंदि चा पूर्ण समर्थक आहे व माझ्या दृष्टीकोनातून ही चाल यशस्वी झालेली आहे. माझ्या मते “गिरा तो भी टांग उपर ही” ही अवस्था आपल्या सारख्यांची झाली आहे. नोटाबंदि यशस्वी झाली हे सत्य स्वीकाराता येत नसल्याने वेगवेगळे तर्क देउन ही अयशस्वी कशी झाली आहे हे सिद्ध करण्याची सध्या चढाओढ सुरू आहे. “अहो साहेब धुवायचा खर्च कपड्यापेक्षा जास्त झाला” ह्या वाक्यातून आपल्याला काय सूचित करायचे आहे ते मला समजले नाही. तेंव्हा कृपा करून थोड विस्तारानी समजाउन द्यावे ही आपणास विनंती. धन्यवाद.

????? विद्यार्थ्यांनो, पर्यावरणपूरक गणेश विसर्जनात सहभागी होऊ नका, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा पुण्यातील उच्च शिक्षण विभाग हिंदू जनजागृती समितीच्या सांगण्यावरुन काम करते काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पर्यावरणपूरक गणपती विसर्जनात सहभागी न होण्याचा फतवा काढल्याचं उघड झालं आहे. महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी असे आदेश उच्च शिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सोबत शिक्षण विभागाने महाविद्यालयांना मार्गदर्शनासाठी हिंदू जनजागृती समितीचं पत्रही जोडलं आहे.

In reply to by तुषार काळभोर

पैसा 10/09/2017 - 09:42
द ग्रेट मुंबई युनिव्हर्सिटीच्या एम ए सोशलॉजि पेपरमध्ये 72 मुलांना शून्य मार्क दिलेत. 80% मुले नापास डिक्लेअर केलीत. शेवट या विषयाचे मुलांचे पेपर गहाळ झाल्याचे कबुल केले म्हणे.

In reply to by जेम्स वांड

विशुमित 11/09/2017 - 16:31
दुसऱ्यांनी कोणी लिहण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा कृपया तुम्हाला "त्या" प्रकरणाबद्दल काय वाटले ते लिहा. ---------- समाज माध्यमामध्ये वावरताना एक समजले आहे की अशा गोष्टींची दखल घेतली तर खोलेंसारख्या कोत्या मनाच्या उच्चशिक्षित जातीवादी लोकांना नको तितके महत्त्व दिल्यासारखे होते. वरून ब्रिगेडी म्हणून शिक्का सुद्धा बसतो. दुटप्पी, फुरोगामी, सराजमशाही असेही सहज संबोधले जाते. पण होते काय की "आपला तो बाबा" असे वाटायला वाव मिळतो. प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाने प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असा बिलकुल अट्टाहास नाही आहे. अशी कोणाची सक्ती मी सुद्धा कधी मान्य करणार नाही. असो..!! ----------- समाजामध्ये अजून ही अशी मध्ययुगीन विचारसरणी असणारे लोक आहेत हे खूप कमी लोक मान्य करतात. विरोध व्यक्ति/जातीसाक्षेप नसून विचारसरणीला आहे. उदाहरण माझ्या घरातील देतो(सत्य कथन आहे). माझी सखी चुलत बहीण आणि तिचे संपूर्ण कुटुंब सनातन संस्थेचे पाईक आहेत. आमच्या भावजींनी तर चांगली अधिकारी दर्जाची सरकारी नोकरी धर्मकारणासाठी सोडून दिली आहे. मध्यंतरी पंढरपूर मधील पुजारी बदल्याप्रकरणी आणि परीक्षा घेऊन प्रशिक्षित ब्राह्मणेत्तर पुजारी नेमल्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया खूप बोलकी होती. 'पांडुरंगाची पूजा ही ब्राह्मणानेच केली पाहिजे. ब्राह्मणेत्तर पुजाऱ्यांकडून सोवळे पाळल्या न गेल्यामुळे पांडुरंग बाटला आहे' असे तिचे मत होते. वरून मला सल्ला पण देण्यात आला की दर्शन घेण्यासाठी जाऊ नकोस कारण तुला त्या दर्शनातून कोणतीच अध्यात्मिक अनुभूती मिळणार नाही. ---------- खोले बाईंच्या धार्मिक श्रद्धे बाबत मला आदर आहे पण त्यांनी प्रकरण एवढे ताणायची गरज नव्हती. आपला धर्म घराच्या भिंती आड झाकून, प्रश्न सोडवला असता तर बरे झाले असते. त्यामुळे असा विचार करणारे इतर बरेच जण नाहक जनतेसमोर आले. त्यात घर काम करण्यासाठी ब्राह्मण उरलेत तरी किती म्हणा. त्यांना एवढे समजायला हवे होते. हवामान खात्याचा अनुभव कामी येईला पाहिजे होता. जाऊ द्यात.. ---------

या धाग्यावरील प्रतिसाद वाचून एक लक्षात येते काँग्रेसच्या सत्ताकाळात अतिरेकी भ्रष्टाचार, सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आपल्या अल्पसंख्यांक व्होट बँकेचे लांगुलचालन इत्यांदीमुळे एका टोकाला गेलेला लंबक भाजपा समर्थक (यांना त्यांचे विरोधक भक्त म्हणतात) "आपल्या" सरकारचे समर्थन करताना दुसर्‍या टोकाला नेत आहेत. आधीच्या सरकारांनी समाजातील एका विशिष्ट घटकाची कायम उपेक्षा केल्याने तो समाज घटक आता "आपल्या" सरकारचे हिरिरीने समर्थन करत आहे.

In reply to by भंकस बाबा

जेम्स वांड 10/09/2017 - 13:00
हिंदूंना साईडलाईन केलं, हे जरी मला बऱ्यापैकी मान्य असलं तरी त्याकरता दुसरे टोक गाठणे मला मंजूर नाही. सत्य स्थिर असावं, त्यांचं सत्य भडकपणे रंगवलेलं खोटं होतं म्हणून आम्हीही तितकाच भडकपणा करणार हे मला तू गाढवाची लीद खाल्लीस तर मी हत्तीची खाणार पण खाणार लीदच इतकं विचित्र वाटतं

In reply to by भंकस बाबा

गामा पैलवान 10/09/2017 - 13:20
भंकस बाबा,
तटस्थ वृत्तीने राजकारणाकडे बघतो, पण आता जर आवाज नाही केला तर डोक्यावर मिरे वाटतील
वरील विधानात दोन गंभीर त्रुटी आहेत. १. उत्तरार्ध : आता आवाज केला नाही तर डोक्यावर मिरे वाटतील म्हणजे नक्की काय? काँग्रेस डोक्यावर मिरे वाटंत होती तेव्हा तुम्ही काय करंत होतात? आवाज तरी उठवलात का? आम्हांस (म्हणजे मोदीभक्तांना बरंका) ऐकू आला नाही. अंगी ताकद नसतांना नुसता आवाज केल्याने मिरे वाटणे थांबणार आहे, हे स्वप्नरंजनच नव्हे काय? ही एक गंभीर त्रुटी आहे. १. पूर्वार्ध : पण हिच्यापेक्षाही गंभीर त्रुटी विधानाच्या पूर्वार्धात आहे. तुम्ही तटस्थ वृत्तीने राजकारणाकडे बघंत आहात. ही तटस्थता हळूहळू संपुष्टात येते हे याकडे तुमचं लक्ष आहे का? मोदी ही धृवीकारक शक्ती आहे, हे तुम्हांस जाणवलं आहे का? दोनपैकी कुठल्यातरी एका कंपूत दाखल व्हावं लागेल अशी परिस्थिती उत्पन्न होते आहे. तुमच्या मूळ तटस्थ भूमिकेस हरताळ फसला जाण्याची शक्यता उत्तरोत्तर वाढंत आहे. Ignorence is NOT strength. तेव्हा सावधान. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भंकस बाबा 10/09/2017 - 14:11
काँग्रेस सरकार असताना आम्ही सामान्यजन हेच गृहीत धरून चाललो होतो की असेच चालणार, आपण मतदानाने परिस्थिती बदलू, नवीन आलेले सरकार नक्कीच काहीतरी चांगले करेल. पण आता आलेले सरकार कट्टर हिंदुत्ववादी आहे, कट्टरता कुठेही वाईटच! नशीब आपले की होणारे रेल्वे अपघात , हॉस्पिटलमध्ये बालमृत्यू हे काँग्रेसप्रणित आहे असे हे बोलत नाही , अगदी छत्तीस गुण जुळवून शेजाऱ्यांपाजाऱ्याकडे चोकशी करून लग्न जमवावे आणि बायको गुण उधळणारी निघावी तर अपेक्षाभंग होणारच

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

arunjoshi123 11/09/2017 - 18:40
तुम्ही समर्थक इ इ कोणाचेही असा. त्यात काही विशेष नाही. पण विधान करताना, खास करून निगेटिव विधान करताना, इतरांची मते प्रभावित करताना मोघमपणा नको. =================
आधीच्या सरकारांनी समाजातील एका विशिष्ट घटकाची कायम उपेक्षा केल्याने तो समाज घटक आता "आपल्या" सरकारचे हिरिरीने समर्थन करत आहे.
आधीचं सरकार सेक्यूलर होतं. असले फालतू प्रकार करायचं नाही.

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

ट्रेड मार्क 12/09/2017 - 01:39
काँग्रेसच्या सत्ताकाळात अतिरेकी भ्रष्टाचार, सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आपल्या अल्पसंख्यांक व्होट बँकेचे लांगुलचालन इत्यांदीमुळे एका टोकाला गेलेला लंबक भाजपा समर्थक (यांना त्यांचे विरोधक भक्त म्हणतात) "आपल्या" सरकारचे समर्थन करताना दुसर्या टोकाला नेत आहेत. तुम्ही जे काँग्रेसच्या काळाच्या विरुद्ध टोक म्हणताय ते म्हणजे संपुष्टात आलेला भ्रष्टाचार, अल्पसंख्यांक व्होट बँकेचे लांगुलचालन आता होत नाही हेच ना? आता यावर म्हणाल की अजूनही कनिष्ठ सरकारी कर्मचारी, पोलीस ई भ्रष्टाचार करतात. तर तो आपल्याच मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात जसे २जी, कोळसा, संरक्षण सामग्री आणि इतर हजारो लाखो कोटींचे घोटाळे झाले तसे गेल्या ३ वर्षात झाले का? काही लोक नोटबंदी हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याची बोंब ठोकतात पण तो घोटाळा कसा म्हणायचा? सगळे पैसे बँकेत जमा झाले ना? सत्ताधारी पक्षातील लोकांनी आधीच पैसे बदलून घेतल्याचा पण आरोप झाला, पण पुरावा सापडत नाही. बँकांची एनपीए झालेली कर्ज माफ करण्यावरून आरोप होतात पण कर्ज एनपीए काही ३ वर्षात झालेली नाहीत. ही कर्ज आधीच कधीतरी वाटली गेली होती. जी वसूल करण्यासाठी जगातले महान अर्थशात्रज्ञ भारताचे पंतप्रधान असूनही आणि सगळ्यांचे लाडके रघुराम राजन आरबीआयचे गव्हर्नर असूनही काही करू शकले नाहीत. ती एनपीए write-off केली म्हणजेच माफ करून टाकली असा चुकीचा समज सामान्य जनतेचा कोणी करून दिला? अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याचं म्हणाल तर काँग्रेसने त्यांना पण उल्लू बनवलंय. कुठल्या मुस्लिमांची काँग्रेसच्या काळात भरभराट झाली किंवा सुधारणा झाली ते सांगा. तोंडी तीन तलाक सारख्या प्रथा अगदी कट्टर मुस्लिम असलेल्या देशात सुद्धा नाहीत त्या आपल्या देशात रुजू करून घेण्यासाठी राजीव गांधींनी कायदा बदलला. स्त्रियांचं सबलीकरण करणार म्हणून डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेसने अल्पसंख्यांक महिलांना आयुष्यभर त्रास सहन करायला लागेल याची कायदेशीर व्यवस्था करून ठेवली. त्यातून मुक्तता करायला "मुस्लिमविरोधी" आणि "कट्टर हिंदू" अशी बिरुदावली मिळालेल्या मोदींना प्रयत्न करायला लागले आणि ते यशस्वीसुद्धा झाले. काँग्रेस सत्तेवर असताना बऱ्याच धार्मिक दंगली झाल्या. २००२ च्या एका दंगलीवरून मोदींना एवढं धारेवर धरलं गेलं, पण त्यावेळेला ते नुकतेच सत्तेवर आले होते आणि नंतर १२ वर्षात एकही धार्मिक दंगल झाली नाही हे मात्र सोयीस्करपणे विसरलं जातं. त्यामुळे लंबक जितका तिकडे गेला होता तितका तो इकडे येणारच पण ते टेम्पररी असेल. हिंदू मुळातच एवढे क्रूर आणि दुसऱ्या धर्मातील लोकांच्या कत्तली उगाचच कराव्या या वृत्तीचे नाहीत. मुसलमानांनी कट्टरपणा सोडला आणि हिंदूंच्या कुरापती काढणं बंद केलं तर हिंदू स्वतःहून आपला कट्टरपणा दाखवायला जाणार नाहीत. हिंदू दहशतवाद ही उगाच पसरवलेली अफवा होती, पण अजूनही काही सामान्य (राजकारणी नसलेल्या) हिंदूंचाच त्यावर विश्वास आहे असं वाटतंय. हिंदूंना राहण्यासाठी भारत हाच एक हक्काचा देश आहे, त्यामुळे हिंदूंनी एकत्र येण्यात/ असण्यात काहीच चुकीचं नाहीये. हिंदू असण्याचा अभिमान बाळगायला हवा कारण आपला धर्म प्रार्थना पद्धतीवरून आणि कुठला देव मानता यावरून त्यांच्या कत्तली कराव्या हे सांगत नाही. कट्टर हिंदू फार फार तर रोज मंदिरात जाईल, ३ वेळा पूजा करेल. पण आमच्या धर्मात सांगितलंय म्हणून मशिदी पाडा, मुस्लिमांना मारा आणि मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार करा हे करणार नाही. पण जर मुस्लिम, त्यांच्या धर्मात सांगितलंय म्हणून, हिंदूंना त्रास द्यायला लागले तर हिंदूंनी का शांत बसावं? आणि प्रॉब्लेम असा आहे की हिंदूंनी प्रतिकार करायला सुरुवात केली की आपल्यातलेच "सेक्युलर" मुस्लिमांनी केलेल्या कुरापती विसरून कट्टर हिंदू कसे धोकादायक आहेत हे सांगत फिरतात.

शलभ 10/09/2017 - 15:08
अमितदादा ह्यांच्या मतांशी सहमत..सुरुवातीला नॉटबंदीचा फायदा होईल असा वाटलं होतं, पण आता जो डेटा समोर आलाय त्यात फायद्यांपेक्षा तोटे जास्त आहेत असं दिसतं आहे. अजून पुढे कदाचित फायदे जास्त झालेत असा डेटा समोर येऊ शकतो. पण आताचे अमितदादा यांचे विश्लेषण बरोबर वाटत आहे. उगाच फक्त समर्थन करायच्या नादात जे समोर दिसतंय ते नाकारण्यात अर्थ नाही.

थिटे मास्तर 10/09/2017 - 21:29
लोकसत्तातल्या मधु कांबळेंची बातमि तर वाचली. आपले मत वाचायला आवडेल ह्या बातमि संदर्भात. वैदिक ब्राह्मण समाजाला म्हणजे नेमका कुठला समाज ?

थिटे मास्तर 10/09/2017 - 21:47
आणि हि ऐक फक्त जात आहे हिंदु धर्मात. वैदिक ब्राह्मण समाज / अवैदिक ब्राम्हण समाज ह्याविषयी प्लस ह्यांना कधिपासुन आणि का अल्पसंख्याक असल्याचि भावना आलिय हे ऐकायला / वाचायला आवडेल.

अमितदादा 10/09/2017 - 22:26
@शलभ जी
उगाच फक्त समर्थन करायच्या नादात जे समोर दिसतंय ते नाकारण्यात अर्थ नाही.
अगदी बरोबर. लोक आर्थिक निर्णयाचं राजकीय समर्थन करतायत त्यामुळं हा घोळ होतोय, त्यापेक्षा लोकांनी आर्थिक निर्णयाचं आर्थिक विवेचन करून समर्थन किंवा विरोध करावा ते हि पुढे असलेला डेटा पाहून. @श्री गुरुजी आता तुमचा अभ्यासू प्रतिसाद आला त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आता.
While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017. याचा सरळ अर्थ असा की या लेखातील निष्कर्ष पुरेशा संशोधनावर आधारीत नाहीत.
याचा अर्थ असा हि होतो कि आमच्या संशोधनास बळकटी मिळण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे, त्याचवेळी आमचं संशोधन योग्य कारण न देता फेटाळता येणार नाही.
एकंदरीत या लेखातील निष्कर्षांना कोणताही ठोस आधार दिसत नाही. स्वतःच्या समजूतीनुसार निष्कर्ष काढले आहेत. काही दावे परस्परविरोधी आहेत
मला अजिबात असे वाटत नाही, मुळात गोंधळ टाळण्यासाठी आपण दोन्ही लेखात दिलेली मूळ लिंक किंवा मूळ संशोधन पाहू मूळ संशोधन १. These are all-India household surveys over a sample size of 161,167 households that included 519,285 adults. २. We estimated the employed force at 401 million then. This grew to 403 million during May-August 2016 and then to 406.5 million in September-December 2016. Then, it fell to 405 million. (साध्य सिम्पल भाषेत १५ लाख जॉब गेले कुठही गोंधळ नाही कि परस्परविरोधाभास नाही )
म्हणजे जानेवारी-एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या २ कोटी ९६ लाखांवरून कमी होऊन २ कोटींवर आली. एकीकडे म्हणतात की या काळात बेकारी वाढून १५ लाख नोकर्‍या गेल्या आणि दुसरीकडे लिहितात की बेकारी ९६ लाखांनी कमी झाली.
याच उत्तर खाली तुम्हाला गणित समजत अशी आशा करतो. While the number of employed persons has dropped, the unemployment rate has also fallen. This is odd and it merits an explanation. The unemployment rate is the ratio of the unemployed to the labour force where the labour force is the sum of the employed and the unemployed. While the number of persons employed fell by 1.5 million, the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. As a result, the labour force fell by 11 million. This substantial fall in the denominator is responsible for the fall in the unemployment rate. वरील लेखातील पहिली आकृती पहा तुम्हाला लेबर पार्टीसिपेशन फोर्स nov -april पर्यंत कमी झालेला दिसेल हा आहे नोटबंदीचा परिणाम. मूळ संशोधन लेखात कुठेही विरोधाभास नाही, असला तर तो आहे समजवून न घेणाऱयांच्या मनात. आता शेती कर्ज माफी संधर्भात तुमचं जे मत आहे त्याच्याशी मी सहमत नाही, मुळात नोटबंदी हे शेती कर्ज माफी साठी एकमेव कारण नाही तर एक catalist आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात काही लगेच निवडणूक न्हवती परंतु तरीही राज्य सरकारे झुकली आणि कर्जमाफी दिली, याला अनेक कारणाबरोबर नोटबंदी जबाबदार आहे हे आपण नाकारू शकत नाही.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 11/09/2017 - 14:56
While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017. याचा सरळ अर्थ असा की या लेखातील निष्कर्ष पुरेशा संशोधनावर आधारीत नाहीत. याचा अर्थ असा हि होतो कि आमच्या संशोधनास बळकटी मिळण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे, त्याचवेळी आमचं संशोधन योग्य कारण न देता फेटाळता येणार नाही. याचा असाही अर्थ होऊ शकतो की आमच्या संशोधनास बळकटी मिळण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे आणि ते केलं तर आमचं संशोधन फेटाळता सुद्धा येऊ शकतं. वरील वाक्यातून आपण आपल्याला हवा तसा अर्थ काढू शकतो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या संस्थेने ज्या संशोधनावर व आकडेवारीवर आपले निष्कर्ष काढले आहेत ते संशोधन व आकडेवारी पुरेशी नाही व त्यामुळे आता या क्षणी अपुर्‍या संशोधनावर आणि आकडेवारीवर कोणताही ठाम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. याच उत्तर खाली तुम्हाला गणित समजत अशी आशा करतो. While the number of employed persons has dropped, the unemployment rate has also fallen. This is odd and it merits an explanation. The unemployment rate is the ratio of the unemployed to the labour force where the labour force is the sum of the employed and the unemployed. While the number of persons employed fell by 1.5 million, the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. As a result, the labour force fell by 11 million. This substantial fall in the denominator is responsible for the fall in the unemployment rate. वरील लेखातील पहिली आकृती पहा तुम्हाला लेबर पार्टीसिपेशन फोर्स nov -april पर्यंत कमी झालेला दिसेल हा आहे नोटबंदीचा परिणाम. मूळ संशोधन लेखात कुठेही विरोधाभास नाही, असला तर तो आहे समजवून न घेणाऱयांच्या मनात. एखादे गुणोत्तर किंवा टक्केवारी योग्य चित्र उभे करू शकत नाही. उदाहरणार्थ एखादा फलंदाज एका डावात ५ धावांवर बाद झाला व दुसर्‍या डावात त्याने १० धावा केल्या तर निव्वळ गुणोत्तर किंवा टक्केवारीचा विचार केला तर असे म्हणता येईल की दुसर्‍या डावात त्याने प्रचंड प्रगती केली असून पहिल्या डावाच्या तुलनेत दुप्पट धावा केल्या आणि त्यावर समाधान मानता येईल. परंतु प्रत्यक्ष धावांचा आकडा पाहिला तर दोन्ही डावात तो अपयशी ठरलेला आहे हे दिसून येईल. म्हणजेच कोणत्याही गोष्टीवर निष्कर्ष काढण्याआधी गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा प्रत्यक्ष आकडे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. वरील उदाहरणात तसेच आहे. गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा बेकारीचे प्रत्यक्ष आकडे पाहिले तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या ९६ लाखांनी कमी झाली असे वृत्तांतात लिहिले आहे. आता कसेही गुणोत्तर मांडले किंवा टक्केवारीची तुलना केली तरी बेकारांची संख्या ९६ लाखांनी घटलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही आणि त्यामुळेच या काळात ३५% लोकांनी नोकर्‍या गमाविल्या अशासारखे निष्कर्ष अविश्वसनीय वाटतात. त्याला अजून एक आधार म्हणजे २०१६-१७ या वर्षात झालेले करसंकलन. केंद्रीय सीमाशुल्क, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, सेवा कर अशा सर्व करांच्या संकलनामध्ये या वर्षात मोठी वाढ झाली आहे. जर भारतात या वर्षात ३५% लोकांनी नोकर्‍या गमाविलेल्या असतील व कंपन्यांच्या महसूलात ५०% घट झाली असेल तर करसंकलनात मोठ्या प्रमाणात घट व्हायला हवी. त्यामुळे या वृत्तांतात दिलेल्या आकड्यांवर विश्वास ठेवणे अवघड आहे कारण वृत्तांतातील आकडे व निष्कर्ष प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी विसंगत आहेत. या संस्थेन अंदाजे १,६१,००० कुटुंबांचे सर्वेक्षण करून आपले निष्कर्ष काढले असे लिहिले आहे. भारतात २६ कोटींपेक्षा अधिक कुटुंबे आहेत. त्यापैकी जेमतेम १,६१,००० कुटुंबे म्हणजे हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या जेमतेम ०.०६% लोकसंख्येचे (म्हणजेच प्रत्येक ५००० नागरिकांमागे ३ नागरिक) सर्वेक्षण केलेले आहे. हे सॅम्पल खूपच कमी आहे आणि त्यामुळेच यांचे निष्कर्ष चुकलेले दिसतात. आता शेती कर्ज माफी संधर्भात तुमचं जे मत आहे त्याच्याशी मी सहमत नाही, मुळात नोटबंदी हे शेती कर्ज माफी साठी एकमेव कारण नाही तर एक catalist आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात काही लगेच निवडणूक न्हवती परंतु तरीही राज्य सरकारे झुकली आणि कर्जमाफी दिली, याला अनेक कारणाबरोबर नोटबंदी जबाबदार आहे हे आपण नाकारू शकत नाही. महाराष्ट्रात लगेच निवडणुक नसली तरी उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी जाहीर केल्यामुळे महाराष्ट्राला कर्जमाफी नाकारता आली नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे फडणविसांनी खूपच कठोर निकष लावून कमीतकमी शेतकर्‍यांना थोडीशी कर्जमाफी मिळेल अशी योजना आणली आहे. कर्नाटकमध्ये कर्जमाफी दिली आहे का नाही हे मला माहिती नाही. परंतु अजून ६ महिन्यांनी कर्नाटक विधानसभेची निवडणुक आहे. जर तिथे कर्जमाफी दिली तर त्यासाठी निवडणुक हे एकमेव कारण असेल. तामिळनाडूत अजून कर्जमाफी दिलेली नाही. ३-४ महिन्यांपूर्वी तिथल्या शेतकर्‍यांनी दिल्लीत बरेच दिवस आंदोलन केले होते. बर्‍याच दिवसानंतर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत शेतकर्‍यांची भेट घेऊन काहीतरी थातुरमातुर आश्वासन दिल्यावर शेतकर्‍यांनी आंदोलन थांबविले. परंतु तिथे कर्जमाफीचा निर्णय झाल्याचे ऐकिवात नाही. एकंदरीत कर्जमाफीसाठी नोटबंदी, शेतकर्‍यांची हलाखीची स्थिती इ. कारणे जबाबदार नसून निवडणुक किंवा राजकीय अपरिहार्यता हेच कारण त्यामागे असते. अन्यथा भारतातील यच्चयावत सर्व राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती.

थिटे मास्तर 10/09/2017 - 22:36
लोक आर्थिक निर्णयाचं राजकीय समर्थन करतायत त्यामुळं हा घोळ होतोय, त्यापेक्षा लोकांनी आर्थिक निर्णयाचं आर्थिक विवेचन करून समर्थन किंवा विरोध करावा आर्थिक विवेचन... लोक ( सामान्य माणुस ).... बाकि चालुद्या.

थिटे मास्तर 10/09/2017 - 22:52
आर्थिक विवेचन... लोक ( सामान्य माणुस )....अच्छो अच्छो के पल्ले नहि पडा सर सामान्य माणसाला काय समजणार. आताशा लोक ( सामान्य माणुस ) मते देतो तेंव्हा त्याला हे समजायला लागल आहे कि what is optimism? ते लोक ( सामान्य माणुस ) ज्या गाडित बसलेत ति गाडि कोणि डोळस माणुस आंधळा बनुन ऐका अश्या व्यक्तिच्या ईशार्यावर चालवतोय कि ज्याला मुळात गाडि काय आहे हेच माहित नाहि. आणि आता ति गाडि अशि व्यक्ति चालवतेय ज्याने सगळ्या भारतिय गाड्या चालवल्यात आणि आता लेफ्ट हँड ड्रिव्हन अँटोमँटिक हातात आलिय. बाळबोध उदाहरण आहे आय नो.

थिटे मास्तर 10/09/2017 - 23:01
तुम्हाला नाहि कळाल्यास आमच्या बौध्दिकात प्रॉब्लेम आहे हे आम्हि लोकांनी (सामान्य लोक ) पहिलेहि त्यांना जिंकवुन मान्य केलच आहे. तुम्हि विवेचन चालु ठेवावे. लोक ( अतिसामान्य) घंटा ( देवळाचा किंवा चर्च कुठलाहि... नाहि चिदंबरम मस्जिद मध्ये घंटा नसते )

श्रीगुरुजी 12/09/2017 - 11:07
राहुलजी दोन आठवड्यांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. Rahul Gandhi is on his two-week visit to the US during which he will interact with global thinkers and political leaders, and address overseas Indians as part of an outreach initiative by his party. In his first engagement, Gandhi today addressed students of the prestigious University of California, Berkeley on India at 70: Reflections on the Path Forward, in which he will offer his reflections on contemporary India and the path forward for the world's largest democracy. राहुवजींचे हे भाषण एक सुखद धक्का होता. या अवघड विषयावरील त्यांचे अभ्यासू विचार ऐकल्यानंतर भारताचे भवितव्य या बुद्धिमान, दूरदर्शी युवा नेत्याच्या हातात सुखरूप राहील याची खात्री पटली. "७० वर्षानंतरचा भारत - वर्तमान व भवितव्य" या महत्त्वाच्या विषयावरील राहुलजींच्या या अभ्यासू व मुद्देसूद भाषणाचा सारांश - नोटाबंदी, वाढता हिंसाचार, जीएसटी यासह अनेक मुद्द्यांवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाचे राजकारण यांनी भारतात डोके वर काढले आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया’ आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधले. ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बर्कलेमध्ये बोलत होते. नोटाबंदीचा निर्णय, कथित गोरक्षकांकडून सुरु असलेला हिंसाचार, द्वेषाचे राजकारण अशा अनेक मुद्यांवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘राजकारणातील ध्रुवीकरण अतिशय धोकादायक आहे. द्वेष, राग आणि हिंसा सगळ्यांनाच उद्ध्वस्त करेल. देशातील उदारमतवादी पत्रकारांच्या हत्या होत आहेत. सामान्य लोकांवर हल्ले केले जात असून दलितांना गायींची तस्करी केल्याच्या केवळ संशयावरुन संपवले जात आहे. गोमांस सेवन केल्याच्या संशयावरुन मुस्लिमांच्या हत्या सुरु आहेत. हे सर्वकाही ‘न्यू इंडिया’मध्ये सुरू आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींच्या ‘न्यू इंडिया’ अभियानावर निशाणा साधला. हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे. अहिंसेच्या विचारांवरच हल्ले सुरु आहेत. अहिंसेमुळेच मानवता जिवंत राहू शकते. मात्र त्याच विचारधारेला लक्ष्य केले जात आहे,’ असा शब्दांमध्ये त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली. ‘मोदींनी संसद, मुख्य आर्थिक सल्लागार यापैकी कोणाचाही सल्ला न घेता, त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला. मोदींच्या या निर्णयाची किंमत देशाला चुकवावी लागली. सकल राष्ट्रीय उत्पादनात २ टक्यांची घट झाली. लोकांसोबतच संवाद कमी होत गेल्यानेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे मतही राहुल गांधींनी व्यक्त केले. ‘२०१२ च्या सुमारास पक्षात अहंकार निर्माण झाला. त्यामुळे आम्ही लोकांसोबत संवाद साधणेच बंद केले,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. रोजगार निर्मितीत केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. http://www.loksatta.com/desh-videsh-news/violence-and-politics-of-polarisation-raised-their-ugly-head-in-india-says-rahul-gandhi-in-his-us-speech-slams-pm-modi-1549154/ भाजप ही एक मशीन आहे. या मशीनशी संबंधित हजारो लोक सतत कम्युटरसमोर बसलेले असतात आणि माझ्याबद्दल अपप्रचार करतात. एका सभ्य माणसाच्या इशाऱ्यावर हे सगळं चालतं आणि हाच सभ्य माणूस सध्या देश चालवत आहे,' असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात आम्ही काश्मीरमधील दहशतवाद मोडून काढण्यात यश मिळवलं होतं. मात्र, तिथं पुन्हा एकदा दहशतवादानं डोकं वर काढलंय. मोदी सरकारची धोरणंच यासाठी जबाबदार असल्याचं ते म्हणाले. 'मुफ्तींचा पीडीपी हा पक्ष काश्मिरी तरुणांना राजकारणात आणण्यासाठी पुढाकार घ्यायचा. मात्र, भाजपशी युती झाल्यापासून मोदींनी हा पक्ष बरबाद करून टाकला,' असं त्यांनी सांगितलं. http://m.maharashtratimes.com/international/international-news/what-rahul-said-on-bjp-machine-his-stupidity/articleshow/60473274.cms

In reply to by श्रीगुरुजी

गामा पैलवान 12/09/2017 - 12:27
श्रीगुरुजी, बर्कले एव्हढी पप्पूमय झालेली पाहून संतोष झाला. एकंदरीत पप्पूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षच बनवला पाहिजे. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 12/09/2017 - 11:50
बस! एव्हढंच वाचायचं राहिलं होतं माझ्या आयुष्यात. धन्य जाहलो अजि मी या जीवनी :

सुज्ञ मनुष्य विचार करायला लागतो, तेव्हा तो आपसूकच डावीकडे झुकत असतो.

-गा.पै.

अमितदादा 12/09/2017 - 15:16
नोटबंदीचे समर्थन करणारे किंवा विरोध खोडून काढणारे प्रतिसाद आलेत हे उत्तम चर्चेचं लक्षण आहे. हा शेवटचा प्रतिसाद देतो ह्या विषयावरचा कारण मला जे म्हणायचं आहे ते मी मांडलेलं आहे. @श्रीगुरुजी
वरील उदाहरणात तसेच आहे. गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा बेकारीचे प्रत्यक्ष आकडे पाहिले तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या ९६ लाखांनी कमी झाली असे वृत्तांतात लिहिले आहे. आता कसेही गुणोत्तर मांडले किंवा टक्केवारीची तुलना केली तरी बेकारांची संख्या ९६ लाखांनी घटलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही.
the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. या वाक्याचा अर्थ बेकारी कमी झाली असा होत नाही असे मला वाटते, याचा अर्थशास्त्रात नेमका काय अर्थ होतो हे मी सांगू शकत नाही, परंतु बेकारी जवळजवळ १ कोटी ने ४ महिन्यात कमी झाली असा अर्थ होणार नाही, याच कारण क्र १. हे संशोधन करणारे एवढी साधी/बावळट चूक करतील असे वाटत नाही याचा अर्थ त्यांना वेगळे म्हणणे अभिप्रेत आहे अन्यथा त्यांनी ९६ लाख लोकांना नोकऱ्या लागल्या असे सरळ लिहलं असतं . २. एवढ्या मोठ्या संख्येने बेकारी कमी झाली असती तर मोदी सरकार ने रोजगार निर्मितीचे ढोल बडवले असते.
हे सॅम्पल खूपच कमी आहे आणि त्यामुळेच यांचे निष्कर्ष चुकलेले दिसतात.
मला अजिबात असे वाटत नाही, पोलिंग सर्वे येतात किती असते हो सॅम्पल size ? १००००-२०००० इथे सॅम्पल size चांगली मोठी आहे.
अन्यथा भारतातील यच्चयावत सर्व राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती.
मुळात देशात कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून (कमी/अधिक प्रमाणात ) असणारी राज्ये म्हणजे तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि बिहार. यातील ५ राज्यांनी कर्जमाफी /व्याजमाफी जाहीर केली आहे. नोटबंदी हे यामागचे कॅटॅलीस्ट आहे एकमेवे कारण नाहीये असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तेच मी फक्त मांडतोय. @ट्रेडमार्क तुमच्या मताशी सहमत नाही, त्याचा प्रतिवाद करत नाही. फक्त एक जनरल प्रतिसाद देतो, सगळा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाही.
नोटबंदी कशी चांगल्या पद्धतीने राबवता आली असती याचा प्लॅन काही मिपाकर जानेवारी २०१७ च्या आधी देणार होते, तो काही अजून मिळाला नाही. तुम्ही पण सांगा काय उपाय करता आले असते ते. आणि हो जे सांगाल ते सर्वच्या सर्व लोकांना फायद्याचे आणि फुलप्रूफ असावे. म्हणजे एक प्लॅन द्यायचा, जो इतका फुलप्रूफ असेल की ज्याने फक्त सर्वच्या सर्व अप्रामाणिक भारतीयांना तास झाला पाहिजे पण एकाही प्रामाणिक भारतीयास त्रास व्हायला नको. तसेच प्लॅन/ नियम एकदा केले की परत बदलता येणार नाहीत. बोला कधी देताय.
मुळात हा प्लॅन देणे हे माझे काम हि नाही आणि कुवत हि नाही. सरकारच्या (मग ते भाजप असो नाहीतर काँग्रेस ) निर्णयावर टीका केली कि त्यांचे पाठीराखे मुद्यावर बोलायचं सोडून मग तुम्हीच का नाही सुचवत चांगला प्लॅन ? मग तुम्हीच चांगला उपाय सुचवा? तुम्हीच का नाही सीमेवर जाऊन लढत? तुम्ही अर्थतज्ञ् आहात का ? तुम्ही जास्त हुशार आहात का ? असले निरुपयोगी प्रश्न विचारतात हा अनुभव आहे. तुम्ही काँग्रेस च्या आर्थिक आणि संरक्षण धोरणास विरोध करता त्यावेळी तुम्ही कोणते प्लॅन सादर करता ? किंवा कोणते प्लॅन तुमच्याकडे रेडी असतात जे सरकार पेक्षा चांगले आहेत? त्यावेळी तुम्ही कसे अर्थतज्ञ् किंवा संरक्षण क्षेत्रातील जाणकार होता ? मुळात मिसळपाव हे संस्थळ सामान्य आणि सुज्ञ वाचकांसाठी आहे असे माझे मत आहे, येथे विचार मांडायला तुम्हाला जाणकार व्हायायची गरज नाही जोपर्यन्त तुम्ही असबंद बोलत नाही तोपर्यंत. @पिज तुम्ही दिलेला लेख अर्धा वाचला तो फक्त डाळींच्या संधर्भात आहे असे दिसून येते. मुळात अन्नधान्याच्या किमती अनेक घटकावर अवलंबून आहेत हे मान्यच आहे, पंरतू जेंव्हा नोटबंदी मुळे अर्थव्यवस्था काही काळासाठी ठप्प होते किंवा मंदावते (तुम्ही तुमच्या प्रतिसादात हे मान्य केलंय ), तेंव्हा त्याचा शेती अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही असे आपण कसे म्हणू शकतो ? मुळात कधी कांदे, टोमॅटो, साखर यांच्या भावातील चढउतार आपण काही वेळा पाहतो मात्र एकाचवेळी वेगवेगळ्या अन्नधान्याच्या भावात उतार होताना दिसत नाही जे नोटबंदी च्या काळात घडलेलं आहे, हा मुद्दा कृपया तुम्ही लक्षात घ्या. हेच त्या लेखकाने मांडले आहे. @चिनार
हे जर खरे असेल तर, बँकेत कितीही पैसा वापस आला तरी चार लाख कोटींचे चलन सरळ सरळ बाद झाले असं म्हणता येऊ शकतं का? या चार लाख कोटींपैकी अर्धा जरी काळा पैसा असेल तरी चांगलेच नाही का ?
माझ्या मताप्रमाणे अजिबात नाही, याचा अर्थ फक्त बाजारात कमी नोटा आल्या एवढाच होतो. @अजो तुम्ही खूप सारे प्रतिसाद दिलेत, तुमच्या काही प्रश्नाची उत्तरे माझ्या प्रतिसादात सापडतील, काही नाहीत सापडणार. तुम्ही प्रश्न विचारण्यापेक्षा तुमची मते मांडावीत किंवा माझी खोडून काढावीत हि विनंती. सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही कारण १. माझं तोकडं अर्थ ज्ञान २. मर्यादित वेळ. शेवटी माझं मत: नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही, माझे असे म्हणणे आहे कि जे फायदे सांगितले जातायत त्यासाठी नोटबंदी करायची आवश्यकता न्हवती आणि नोटबंदीचे मूळ उद्देश असफल झालेत. नोटबंदी मधून भविष्यात जे काही फायदे होतील त्यातून आता जे नुकसान झालं आहे ते भरून निघेल असे मला वाटत नाही. आणि समजा उद्या मोदींनी ३ ते ४ लाख कोटी रुपये काळा पैसा नोटबंदी मुळे पकडला असे दाखवून दिले तर मी मत बदलेन ना शेवटी मी काही मोदींचा कट्टर विरोधक नाही जो पुढे असलेला डेटा अमान्य करून फक्त विरोधच करेन ते.

In reply to by अमितदादा

ट्रेड मार्क 12/09/2017 - 18:48
सरकारच्या (मग ते भाजप असो नाहीतर काँग्रेस ) निर्णयावर टीका केली कि त्यांचे पाठीराखे मुद्यावर बोलायचं सोडून मग तुम्हीच का नाही सुचवत.... असले निरुपयोगी प्रश्न विचारतात हा अनुभव आहे यावर काही लोक "तुमच्या मताशी सहमत नाही, त्याचा प्रतिवाद करत नाही" किंवा प्रतिवाद करायला मला वेळ नाही हे पण उत्तर देतात असा अनुभव आहे. असो. प्रश्न निरुपयोगी नव्हता कारण तुम्ही म्हणालात की नोटबंदी न करतासुद्धा हे साध्य करता आलं असतं, म्हणून आपलं विचारलं की प्लॅन द्या. अगदी प्लॅन नसेल तर निदान पॉइंटर्स तरी देऊच शकता. पण तुम्ही हा शेवटचा प्रतिसाद आणि वेळ नाही असं म्हणून पळवाट आधीच काढून ठेवली आहे. काँग्रेसच्या काळात बाकी कशाहीपेक्षा भ्रष्टाचार (ते स्वतः करत होते तो) कमी करा हाच सगळ्यात मोठा मुद्दा होता. बाकी त्यांनी फारसं काही केलं असं वाटत नाही. ज्या काही योजना आणल्या त्यात फक्त स्वतःचे खिसे कसे भारत येतील हे बघितलं गेलं. अगदी शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना बघा, त्यातही खऱ्या शेतकऱ्याला भरपाई मिळालीच नाही, पण पैसे मात्र वाटले गेले. येथे विचार मांडायला तुम्हाला जाणकार व्हायायची गरज नाही बरोब्बर. विचार म्हणजे दुसऱ्या कोणीतरी दाखवलेली आकडेवारी नव्हे. आकडेवारी तर दोन्ही बाजूची लोक दाखवत आहेत. मग दोन्ही बाजू अभ्यासून (जेवढं कळेल तेवढं) आपलं मत तयार करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की "नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही". पण जशी इतरांनी दिलेली आकडेवारी दाखवून नोटबंदी अपयशी आहे म्हणताय, तसेच इतरांनी दिलेले (किंवा तुम्हाला वाटलेले) फायदे कुठे लिहिले नाहीत. हे सर्व फक्त तुम्हाला उद्देशून नाही तर जनरल स्टेटमेंट आहे - मी तटस्थ आहे असं नुसतं म्हणून भागत नाही तर दोन्ही बाजू सुसंगतपणे मांडता यायला पाहिजेत. बहुतांशी लोक आपल्या विचारांशी सुसंगत असेल तेवढेच वाचतात किंवा घेतात.

In reply to by ट्रेड मार्क

अमितदादा 13/09/2017 - 00:05
ठीक आहे आता तुम्ही असंबद प्रतिसाद दिला आहे तर प्रतिवाद करतोच.
आकडेवारी तर दोन्ही बाजूची लोक दाखवत आहेत. मग दोन्ही बाजू अभ्यासून (जेवढं कळेल तेवढं) आपलं मत तयार करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की "नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही". पण जशी इतरांनी दिलेली आकडेवारी दाखवून नोटबंदी अपयशी आहे म्हणताय, तसेच इतरांनी दिलेले (किंवा तुम्हाला वाटलेले) फायदे कुठे लिहिले नाहीत.
मुळात तुम्ही माझा पहिला प्रतिसाद वाचला का ? हा पहा http://www.misalpav.com/comment/959658#comment-959658 यातील पहिले ७ पॉईंट हे मी नोटबंदी चे तोटे सांगितले आहेत आणि उरलेले ३ पॉईंट हे नोटबंदीच्या समर्थनार्थ आहेत जे नोटबंदीच्या एका समर्थक लेखकाने मांडले आहेत, ज्यातील लूपहोल मी दाखवून दिले आहेत. मी टोटल ६-७ रेफररेन्स (संधर्भ) दिलेले आहेत आणि त्यातील डेटा प्रेसेंट करून मांडलेला आहे. तुम्ही काय केलेय ? एक हि संदर्भ नाही , डेटा दिलेला नाही, तुम्ही फक्त "काही लोक नोटबंदी अयशस्वी करतायत " हेच टेप लावलीय, आता अश्या प्रतिसादांना काय उत्तर द्यायचं ? काय प्रतिवाद करायचा ? म्हणून मी सरळ म्हंटल कि तुमच्या मताशी असहमत आहे, त्याचा प्रतिवाद करत नाही. मुळात तुमच्या प्रतिसादात तुम्ही नोटबंदी ला लोकांना जबाबदार ठरवून (जे साफ चुकीचं आहे ) नोटबंदी अयशस्वी जालीय हे मान्य केलंय. तुमचे सगळे प्रतिसाद हे माझे मुद्दे खोडून काढण्यासाठी आहेत (त्यात काही अयोग्य नाही), परंतु एक हि मुद्दा नोटबंदीचे समर्थन सांगणारा नाही, हे हि नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. कि त्याचे समर्थन करण्याचे काम हि मीच करू. मुळात तुम्हाला माझे मुद्दे खोडून काढायचे होते तर दिलेलं संधर्भ वाचून मुद्दे खोडून काढायला हवे होते यासाठी श्री गुरुजींचे प्रतिसाद वाचा. तुम्ही फक्त लोक कशी जबाबदार आहेत हेच बोलताय. मुळात कमीत कमी लूपहोल असणारा प्लॅन बनवणं आणि त्याची अंमलबजावणी करण हे सरकार आणि अजस्त्र अश्या सरकारी यंत्रणेचं काम आहे, यात जर अपयश आलं आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार असेल तर एक नागरिक म्हणून आपल्याला टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यावेळी सरकारच्या पाठीराख्यानी "तुम्ही प्लॅन तयार करा " असे म्हणणे म्हणजे पराभूत मानसिकतेचं लक्षण आहे याच कारण १. त्याचा प्लॅन अयशस्वी झाला हे त्यांना मान्य आहे २. सरकार विरोधी योग्य प्रश्न विचारणाऱ्याला असे प्रतिप्रश्न विचारून गप्प करण्याचा त्यांची एक जुनी सवय आहे. तुम्ही काँग्रेस विरोधी मत मांडता तेंव्हा किती प्लॅन तयार ठेवता ? मांडा इथे तुमचे काही प्लॅन ? बरं काँग्रेस चे राहूदे नोटबंदी यशस्वी होण्यासाठी काय कराय हवं होत किंवा भविष्यात काळा पैसा कसा वसूल करायचा यापैकी कोणताही विषय निवडून इथे डिटेल प्लॅन द्या.
प्रतिवाद करायला मला वेळ नाही
मुळात माझे शब्द आहेत "मर्यादित वेळ " आणि ते हि फक्त अरुणजोशी यांच्यासाठी आहेत कारण त्यांनी १७६० प्रश्न विचारलेत स्वतःच कोणतंही मत न मांडता, मी काही इथे बसून त्यांच्या प्रत्येक प्रश्नास उत्तर देऊ शकत नाही म्हणून हे कारण त्यांना सांगितलं. बाकी ज्यांचे मुद्देसूद प्रतिसाद आहेत त्यांना मी उत्तरे दिली आहेत. असो हि वैयक्तिक व्हायला नको म्हणून इथेच थांबतो, तुमचा प्रतिसाद याला येणार याची अपेक्षा आहे त्याचा प्रतिवाद करणार नाही.

In reply to by अमितदादा

ट्रेड मार्क 13/09/2017 - 01:19
आकडेवारी गुरुजींनी दिलीच आहे परत तीच द्यायची गरज आहे असं मला वाटलं नाही. मुळात नोटबंदी फेलच झाली आहे याच दृष्टिकोनातून तुम्ही आकडेवारी बघताय आणि प्रतिसाद देताय. गुरुजींनी पण आकडेवारी कशी दोन्ही बाजूने इंटरप्रिट करता येते तेही दाखवलंय. पण तुम्ही दृष्टिकोन फायनल केला असल्याने तसंही चर्चा करून काही उपयोग नाही. तुम्ही प्रतिसाद देणार नाही म्हणताय म्हणून अधिक काही न लिहिता मी तुमची अपेक्षा पूर्ण करतो.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 13/09/2017 - 20:56
@श्रीगुरुजी वरील उदाहरणात तसेच आहे. गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा बेकारीचे प्रत्यक्ष आकडे पाहिले तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या ९६ लाखांनी कमी झाली असे वृत्तांतात लिहिले आहे. आता कसेही गुणोत्तर मांडले किंवा टक्केवारीची तुलना केली तरी बेकारांची संख्या ९६ लाखांनी घटलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही. the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. या वाक्याचा अर्थ बेकारी कमी झाली असा होत नाही असे मला वाटते, याचा अर्थशास्त्रात नेमका काय अर्थ होतो हे मी सांगू शकत नाही, परंतु बेकारी जवळजवळ १ कोटी ने ४ महिन्यात कमी झाली असा अर्थ होणार नाही, याच कारण क्र १. हे संशोधन करणारे एवढी साधी/बावळट चूक करतील असे वाटत नाही याचा अर्थ त्यांना वेगळे म्हणणे अभिप्रेत आहे अन्यथा त्यांनी ९६ लाख लोकांना नोकऱ्या लागल्या असे सरळ लिहलं असतं . २. एवढ्या मोठ्या संख्येने बेकारी कमी झाली असती तर मोदी सरकार ने रोजगार निर्मितीचे ढोल बडवले असते. the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. या वाक्याचा अर्थ बेकारी वाढली असा तर नक्कीच होत नाही. मूळ लेखात १५ लाख नोकर्‍या गेल्या, ३५% कर्मचार्‍यांनी नोकर्‍या गमाविल्या असे दावे आहेत. परंतु वरील वाक्य हे त्या दाव्यांशी पूर्णपणे विसंगत आहे. त्यामुळेच निदान या लेखांवर तरी विसंबून निश्चलीकरणामुळे नोकर्‍या गेल्या, बेकारी वाढली इ. दाव्यांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. मोदी सरकार ने रोजगार निर्मितीचे ढोल बडवले नाहीत याचा अर्थ असा होत नाही की रोजगार निर्मिती झालेलीच नाही. त्यामुळे मोदी सरकारने ढोल बडविले नाहीत म्हणजेच रोजगार निर्मिती झालेली नाही असा सोयिस्कर निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. एकंदरीत निश्चलीकरणामुळे बेकारी वाढली, नोकर्‍या गेल्या किंवा बेकारी कमी झाली, रोजगार निर्मिती वाढली असे कोणतेही ठोस निष्कर्ष वरील लेखातून काढता येणार नाही. हे सॅम्पल खूपच कमी आहे आणि त्यामुळेच यांचे निष्कर्ष चुकलेले दिसतात. मला अजिबात असे वाटत नाही, पोलिंग सर्वे येतात किती असते हो सॅम्पल size ? १००००-२०००० इथे सॅम्पल size चांगली मोठी आहे. निवडणुक सर्वेक्षण आणि रोजगार संबंधी सर्वेक्षण यात बराच फरक आहे. अगदी डेटाचा आकार बघितला तरी मतदार हे किमान १८ वर्षांचे असतात तर वरील सर्वेक्षण हे किमान १४ वर्षांवरील व्यक्ती रोजगारक्षम आहे या गृहितकावर आधारीत आहे. म्हणजेच हे सर्वेक्षण जास्त लोकसंख्येसाठी आहे. त्यामुळे अर्थातच या सर्वेक्षणासाठी निवडणुक सर्वेक्षणापेक्षा जास्त सॅम्पल हवे. अन्यथा भारतातील यच्चयावत सर्व राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती. मुळात देशात कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून (कमी/अधिक प्रमाणात ) असणारी राज्ये म्हणजे तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि बिहार. यातील ५ राज्यांनी कर्जमाफी /व्याजमाफी जाहीर केली आहे. नोटबंदी हे यामागचे कॅटॅलीस्ट आहे एकमेवे कारण नाहीये असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तेच मी फक्त मांडतोय. यातील फक्त महाराष्ट्र व उत्तर प्रदेशने कर्जमाफी जाहीर केली आहे. पंजाबचा त्याबाबतीत विचार सुरू आहे. इतर राज्यांनी कर्जमाफी जाहीर केल्याचे वाचनात आले नाही. मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी ही राजकीय मागणी असते व कर्जमाफी जाहीर करणे हा राजकीय निर्णय असतो. सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्ष कर्जमाफीची मागणी करून ब्राऊनी पॉईंट्स स्कोअर करण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः जेव्हा निवडणुक जवळ आलेली असते तेव्हा मतपेढीची सोय करण्यासाठी ही मागणी केली जाते. सत्ताधारी पक्ष हे ओळखून असतो. त्यामुळे कर्जमाफी देण्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये यासाठी सत्ताधारी पक्ष वेगवेगळे प्रयत्न करून शेवटी आपल्याला राजकीयदृष्ट्या सोयीच्या वेळी कर्जमाफी जाहीर केली जाते. निश्चलीकरण, दुष्काळ, उत्पादनाला कमी भाव, शेतीत नुकसान, शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती इ. कोणतेही कारण कर्जमाफी मागण्यामागे व देण्यामागे नसते. अर्थात हे उघडपणे कोणीच सांगत नाही. ही कारणे पुढे केली जातात, परंतु त्यामागचे एकमेव कारण राजकीय फायदा हेच असते.

गामा पैलवान 12/09/2017 - 18:02
मोहन भागवतांना झोपेतनं जाग आली आहे. हिंदू हाच खरा धर्म असून बाकी संप्रदाय आहेत असं वक्तव्य श्री. भागवतांनी केलं. अस्मादिक कधीपास्नं हेच बोंबलंत आहेत. शेवटी भागवतांना पटले म्हणायचे. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/hinduism-only-true-religion-in-world-says-mohan-bhagwat/articleshow/60475075.cms -गा.पै.

गामा पैलवान 12/09/2017 - 19:05
अरे वा ! पप्पू पंतप्रधान बनणार तर !
पक्षाने जबाबदारी सोपवली तर मी पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्यास तयार आहे.
पप्पूची एकंदरीत समज पाहता त्याने अमेरिकेचा पंतप्रधान बनणं इष्टं. मी आजपासून त्याचा तसाच उल्लेख करणार! -गा.पै.

पुंबा 13/09/2017 - 16:52

गामा पैलवान 16/09/2017 - 18:10
लोकहो, पश्चिम बंगालात भाजप कार्यकर्ते सौमित्र घोषाल या तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. सारे विचारवंत आपापली थोबाडं गच्च बंद करून बसली आहेत. जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहणे सोडून द्यावे इतकीच माफक अपेक्षा आहे. आ.न., -गा.पै.

अमितदादा 17/09/2017 - 01:35
या मोहिमेमागच्या तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि अनेक सहभागी लोकांच्या कष्टाचे, बुद्धिमत्तेचे, जिद्दीचे आणि प्लॅनिंग चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खालील लेखात Cassini च्या मोहीमेचे यश, शोध, त्याचबरोबर ते क्रॅश करण्यामागची कारणे दिली आहेत, याबरोबरच Huygens ह्या टायटन (शनी चा चंद्र) वर उतरलेल्या आणि Cassini बरोबर गेलेल्या प्रोब ची हि थोडक्यात माहिती दिली आहे. लेख जास्त टेकनिकल नसल्याने आपल्यासारख्याना समजण्यास सोपा आहे. अधिक माहितीसाठी विकिपीडिया आहेच. Cassini, NASA's 13-year Saturn mission, has ended

श्रीगुरुजी 18/09/2017 - 18:07
रोहिंग्या मुसलमान हे देशासाठी धोकादायक आहेत. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना भारतात राहू दिलं जाणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे. तसं प्रतिज्ञापत्रच केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलं आहे. इतकी स्पष्ट व नि:संदिग्ध भूमिका यापूर्वी कोणत्याही सरकारने घेतल्याचे ऐकिवात नाही. http://m.maharashtratimes.com/india-news/some-militant-rohingya-active-in-india-govt-to-sc/articleshow/60730706.cms

राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला घटस्थापनेचा मुहूर्त! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणे निश्चित केले आहे. ते बहुधा भाजपमध्ये प्रवेश करतील. अतिशय कमी शक्यता असलेला दुसरा मार्ग म्हणजे स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करणे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर राणे यांना पुरेसा बेस नसल्याने स्वतंत्र पक्ष स्थापन केला तरी जसा शेकाप रायगडपुरता मर्यादित आहे तसा राणेंचा पक्ष स्थानिक पातळीवर मर्यादित राहील. शिवाय पक्ष सोडताना त्यांच्या मुलांनाही पदे सोडावी लागतील. शिवाय राणेंना सोबत करणाऱ्या नगरसेवक व आमदारांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. 1998 नंतर शिवसेनेत मुख्यमंत्री होता येणार नाही, हे पाहून तेवढ्यासाठी ते सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये गेले. पण तिथे सुद्धा त्यांना फार काही मिळाले नाही. (महसूलमंत्री म्हणून राजकीय ताकद/ आर्थिक मिळकत किती असते माहिती नाही). आता इथून पुढे काँग्रेसमध्ये राहून हाती काहीच येणार नसल्याने त्यांनी सत्तेत असणाऱ्या भाजपशी जवळीक केलीय. अर्थात भाजप मध्ये त्यांना कितपत मोठेपणा मिळेल, याविषयी शंका आहे. अर्थात, राणे पिता-पुत्रांचे उपद्रव मूल्य खूप जास्त आहे, त्यामुळे त्यांना सांभाळणे ही मा. मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यासाठी नाजूक कसरतच असेल.

राघव 19/09/2017 - 16:12
उर्जा मत्रालयानं श्री. पियुष गोयल यांच्या कारकिर्दीत मागील ३ वर्षात चांगले काम केलेले दिसते - - पारंपारिक उर्जा स्त्रोतांत ६०,००० MW ने उत्पादन क्षमता वाढलेली आहे. २०१४-१५ मधे ८.४३%, २०१५-१६ मधे ५.४६% आणि २०१६-१७ मधे ४.७२% वाढ. - २०१६-१७ मधे नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार ला केली जाणारी वीज निर्यात २१३ मिलियन युनिट्स ने वाढलेली आहे. - पं. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत [DDUGJY] [गुजरातच्या ज्योती ग्राम योजनेवर आधारीत], एप्रील २०१५ मधे १८४५२ गावे वीजेविना होतीत त्यापैकी १३५११ गावांपर्यंत वीज पोचली आहे. याच योजनेअंतर्गत, Rural Feeder Monitoring Scheme सुरू करण्यात आलेली आहे, ज्यातून आलेली माहिती National Power Portal (NPP) वर मिळते. - अपारंपारिक उर्जा स्त्रोतांत २०१५-१६ मधे पवनचक्क्यांच्या माध्यमातून ३,४२३MW आणि सौरौर्जेतून ३०१९MW वाढ झालेली आहे. २०१६-१७ मधे अपारंपारिक उर्जास्त्रोतांच्या माध्यमातून झालेली एकूण वाढ ही पारंपारिक उर्जास्त्रोतांच्या माध्यमातून होणार्‍या वाढीपेक्षा प्रथमच जास्त आहे. Renewable Energy साठीचे २०१७ चे बजेट १५०० कोटी वरून ९००० कोटी पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. => डेटा Central Electricity Authority (CEA) वरून.

गामा पैलवान 19/09/2017 - 16:36
लोकहो, इक्बाल कासकर या दाऊद इब्राहीमच्या भावास खंडणीप्रकरणी अटक. बातमी इथे आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/iquabal-kasakar-arrested/articleshow/60739684.cms इक्बाल कधीच गुन्हेगार नव्हता (संदर्भ : एस. हुसेन झैदी यांचं डोंगरी ते दुबई या पुस्तकातलं द व्हाईट कासकर हे प्रकरण). मुंबई बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात दाऊद नेहमी स्वत:ला निर्दोष समजत आला आहे. १९९४ साली प्रथम याकूब मेमनला मुंबईस पाठवून त्याने कानोसा घेतला. त्यातून दाऊदला कळलं की आपण परत मुंबईस गेलो तर आपली गत त्याच्यासारखीच होईल. म्हणून काही वर्षे दाऊद गप्प बसला. पुढे २००३ साली त्याने इक्बाल नावाच्या आपल्या एका भावाला मुंबईस जाण्यास उद्युक्त केलं. (काही जण म्हणतात की इक्बाल स्वत:हून गेला. खखोदाजा.). हेतू अर्थात आपल्याविरुद्ध जनमत चाचपून बघण्याचा होता. इक्बालला मुंबई पोलिसांनी कुठलीशी केस उकरून कडून मोक्का लावला आणि चार वर्षे आत सडवला. सोबत पोलीस दलातला प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अधिकारी अस्लम मोमीन याच्या कारकिर्दीची आणि आयुष्याची मुंबई पोलिसांनी वाट लावली. त्याचा गुन्हा इतकाच की इक्बालची चकमकहत्या (=एनकाउंटर) होणार नाही म्हणून दिलासा दिला. पुढे बाहेर आल्यावर इक्बालने निवडणुका लढवायची तयारी सुरू केली. अरुण गवळीचं उदाहरण होतं समोर. अस्लम मात्र बहुतेक आजूनही अन्यायाविरुद्ध लढतोच आहे. इक्बालने अर्ज भरल्यावर कोण्या आयपीएस अधिकाऱ्याने त्याला 'समजावलं' की मुंबई पोलीस तुला 'सोडणार' नाहीत. त्याने निमूटपणे उमेदवारी मागे घेतली. एकंदरीत इक्बालला इतर टोळ्यांकडून अजिबात धोका नसून मुंबई पोलिसांकडून आहे. मुंबई पोलिसांना दाऊद आजिबात परत यायला नकोय. त्यासाठी त्यांची कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे. अस्लम आणि इक्बाल तर केव्हाही चिरडले जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर वरील बातमी महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे इक्बालला मुंबई पोलिसांनी अटक केली नसून ठाणे पोलिसांनी केली आहे. तसेच त्याच्यावरचे आरोप व खंडणीचा पीडित वगरे माहिती बाहेर फोडली नाही. त्याला खंडणीविरोधी कार्यालयात आणल्यावर वास्तूस सुरक्षारक्षकांनी गराडा घातला होता. इक्बाल खतरनाक सोडा, साधा गुन्हेगारही कधीच नव्हता. मग गराडा कशासाठी? त्याच्या बचावासाठीच ना? पाकिस्तानात लपलेल्या दाऊदला केवळ एकंच व्यक्ती हत्येपासून वाचवू शकते. ती म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी. दाऊद परत यायला बघतोय का? काहीतरी हालचाली नक्कीच चालल्या असणार. असं आपलं माझं मत. नुकतीच एक बातमी ऐकली. पाकिस्तानी माध्यम नियामक मंडळाने भारताविरुद्ध खोट्या बातम्या दिल्याबद्दल अनेक वाहिन्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. हे कधीही ऐकलं नव्हतं. मोदी नावाची जादू दिसते आहे. अशीच जादू दाऊद इब्राहीमवरही चालली असेल. खखोदाजा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आनंदयात्री 19/09/2017 - 19:55
>>सोबत पोलीस दलातला प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अधिकारी अस्लम मोमीन याच्या कारकिर्दीची आणि आयुष्याची मुंबई पोलिसांनी वाट लावली. म्हणजे काय? आणि अस्लम मोमीन प्रकरण काय आहे?

In reply to by आनंदयात्री

गामा पैलवान 19/09/2017 - 20:26
आनंदयात्री, अस्लम मोमीन प्रकरण थोडक्यात सांगतो. २००२/०३ साली दाऊद त्याचा इक्बालला मुंबईत पाठवू पहात होता. तेंव्हा मुंबई पोलीस इक्बालचं एनकाउंटर करतील अशी भीती होती. म्हणून इक्बालने अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी व नेत्यांशी संपर्क साधला. त्यापैकी एक अस्लम मोमीन. त्याने इक्बालला त्याची चकमकहत्या होणार नाही असा दिलासा दिला. कारण अस्लम पोलिसांत प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर म्हणून प्रसिद्ध होता. प्रतिष्ठितांना मध्यस्थ घेतात तसा तो होता. मात्र मुंबई पोलिसांना आणि अनेक नेत्यांना इक्बाल परत यायला नको होता. कारण उघड आहे. म्हणून मुंबई पोलिसांनी इक्बालला तर आत घेतलाच, शिवाय अस्लमवर गुन्हेगारांशी संबंध ठेवल्याचे खोटे आरोप लावले. आता पोलीस म्हंटला की गुन्हेगारांशी नाहीतर काय संतमहात्म्यांशी संबंध येणार का! पण हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे. केवळ अनधिकृत हत्या होणार नाही असा दिलासा देणं हा काही गंभीर गुन्हा नव्हे. ही सर्व कथा एस. हुसेन झैदी यांच्या डोंगरी ते दुबई या इंग्रजी पुस्तकातल्या The White Kaskar या प्रकरणात आहे. आ.न., -गा.पै.

ट्रेड मार्क 19/09/2017 - 19:35
'गेल्या वर्षभरापासून म्यानमारमध्ये होत असलेल्या हिंसाचाराला रोहिंग्या मुसलमानच जबाबदार आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे. देशहित डोळ्यासमोर ठेवूनच त्यांच्यावर कारवाई होत आहे. म्यानमारमध्ये कायदा-सुव्यवस्था व स्थैर्य राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जगाच्या निंदेला आम्ही घाबरत नाही,' अशी ठाम भूमिका म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान स्यू की यांनी मांडली आहे. संपूर्ण बातमी इथे. त्यांनी जागतिक मानवाधिकारवाल्यांना सुद्धा फटकारलं आहे. अशी कणखर भूमिका घेतल्याबद्दल कौतुक आहे.

In reply to by ट्रेड मार्क

अनिंद्य 21/09/2017 - 14:25
स्यू की यांच्या रोहिंग्यविरुद्धच्या धोरणाचे इतक्या घाईने घुमजाव होईल असे वाटले नव्हते. म्यांमारच्या आधी अगदी कडक आणि मग जागतिक दबावानंतर नरम पडलेल्या भूमिकेमुळे रोहिंग्या मुद्द्यावर भारतीय नीतीला शीर्षासन करावं लागलं आहे. हा दबाव मुख्यतः अमेरिका आणि जापान कडून आहे, चीनचा अपवाद सोडला तर तेच म्यांमारमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश आहेत सध्या. अगदी परवापर्यंत पाकिस्तानचे हस्तक, अरब आतंकवाद्यांशी संबंध वगैरे असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांसाठी (संदर्भ - सर्वोच्च न्यायालयात भारत सरकारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र आणि सरकारी वकिलाने केलेले भाष्य) सध्या युनोच्या बैठकांसाठी न्यूयॉर्क दौऱ्यावर असलेल्या सुषमाजी बांग्लादेशच्या पंतप्रधानांना अगत्याने भेटल्या. ह्या भेटीनंतर काही तासातच ढाका स्थित भारतीय दूतावासाने बांगलादेशातील सुमारे ४ लाख रोहिंग्या आश्रयाला असलेल्या शरणार्थी शिवीरांना तातडीने मदतीचा ओघ सुरु केला आहे. माझ्या मते बांगलादेशला ही 'मदत' पुढील काही वर्षे नक्कीच सुरु राहील - त्यातच सर्वांचे हित आहे. - अनिंद्य

In reply to by अनिंद्य

ट्रेड मार्क 21/09/2017 - 20:52
स्यू की यांनी काय रोहिंग्यांना बिनशर्त परत घेऊ असं जाहीर केलं की काय? अशी बातमी कुठे दिसत नाहीये. नक्की काय म्हणायचंय ते इस्कटून सांगता का? भारताने रेफ्युजींसाठी बांगलादेशला मदत पाठवली आणि पाठवत राहणार म्हणजे शीर्षासन केलं? तुमची अपेक्षा काय आहे की भारताने बांग्लादेशाबरोबर संबंध तोडून टाकावेत? अशांतता माजवणारे लोक आमच्या देशात नको हा म्यानमार आणि भारताचा पवित्रा असूनही बांगलादेशला ते रेफ्युजी सामावून घेण्यासाठी मदत करणार हे मात्र घुमजाव वाटतंय?

आनंदयात्री 19/09/2017 - 19:48
सरकारचे २०३० पर्यंत भारतीय वाहन उद्योगाला आमूलाग्र बदलण्याचे उद्दिष्ट्य आहे. पेट्रोल डिझेल वर चालणारी वाहने कालबाह्य होऊन भारतात फक्त इलेक्ट्रिक कार्सची विक्री होईल असे या बदलाचे स्वरूप आहे. हि बातमी वाचून पडलेले हे दोन प्रश्न, १. भारताचा पेट्रोलियम इम्पोर्ट वर होणार खर्च ६० बिलियन डॉलर्सने कमी होईल. लेखात म्हटल्याप्रमाणे पुढच्यावर्षी भारत सुमारे ८२ बिलियन डॉलर्स पेट्रोलियम इम्पोर्टवर खर्च करेल. म्हणजे २०३० नंतर ६० बिलियन डॉलर्स दरवर्षी वाचतील असेच ना? २. २०१५ मध्ये सुरु झालेली Faster Adoption and Manufacturing of Hybrid and Electric Vehicles (FAME) हि स्कीम का फसली?

In reply to by आनंदयात्री

राघव 19/09/2017 - 22:48
१. होय, ते दरवर्षीप्रमाणेच म्हणताहेत. पण हा डेटा किती ऑथोरेटीव्ह ते माहित नाही. २. लेखात म्हटल्याप्रमाणे ही स्कीम पूर्णपणे फसली असे मला वाटत नाही. हां, उशीर मात्र नक्कीच झाला आहे. - ह्या स्कीमची फेजेस मधे ६ वर्षांत अंमलबजावणी होणार होती. फेज १ दोन वर्षांसाठी प्लॅन केलेली होती. त्यासाठी दरवर्षी बजेटमधे तरतूद केलेली आहे. खालील दुव्यावर काही माहिती दिलेली आहे - लिंक - या योजनेअंतर्गत सरकार या वाहनांसाठी प्रोत्साहनपर सब्सिडी देवून त्यांचा खप वाढवू पाहते आहे कारण. मुख्य अडचण बॅटरीच्या किंमतीची आहे, तसेच बाकीचे इन्फ्रा कमी पडत असल्याने सर्वसाधारण किंमत जास्त आहे. अर्थात् हा केवळ एक उपाय आहे, पण सर्वसाधारण किंमत कमी झाल्याशिवाय या वाहनांचा खप वाढणार नाही. - ईस्रो या योजनेच्या अनुषंगानेच गडकरींच्या विनंतीवरून बॅटरी तयार करत होते, जी त्यांनी तयार केल्याची घोषणा झालेली आहे. लिंक१, - आता या बॅटरीचे भारतात व्यावसायिक स्तरावर उत्पादन केल्यास, बॅटरीची किंमत आवाक्यात येऊ शकेल. असे झाल्यास सर्वसाधारण किंमत बर्‍यापैकी कमी होणं अपेक्षीत आहे. काही कंपन्या यासाठी प्रयत्नशील आहेत, तसेच इस्रोनेही ह्या बॅटरीची टेक्नॉलॉजी देण्यास तयारी दाखवली आहे. लिंक२ - सध्या २०२० पर्यंतची तरतूद सरकारला या योजनेसाठी करायची आहे.

प्रसाद_१९८२ 30/08/2017 - 11:25
मुंबईचा सध्याचा महापौर अगदिच मंदबुद्धीचा माणुस आहे असे दिसते. काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने, सर्व मुंबई पाण्याखाली गेली होती. यावर पत्रकारांनी या महापौरांना विचारले की 'पावसाळ्यात मुंबईच्या कोणत्याही भागात पाणी भरणार नाही हा तुमचा दावा आजच्या पावसाने फोल ठरवला आहे' ह्या प्रश्नावर हे महापौर उलट पत्रकारांवरच उखडले की तुम्ही मुंबई बाहेरचे पाण्याचे फुटेज दाखवून शिवसेनेला उगाचच बदनाम करत आहात व मुंबईत आमचे सहाच्या सहा पंपिग स्टेशन आज सुरु आहेत म्हणुन नशिब समजा. नाहितर मुंबईकर जनतेचे ह्याहून वाईट हाल झाले असते.

In reply to by प्रसाद_१९८२

आर्य 30/08/2017 - 12:40
मुंबईचा (सेनेचा) महापौर कायमच बोलका भावला ठरला आहे, त्याचा बोलवता धनी कोण हे सर्व श्रुत आहेच. भ्रष्टाचार, पदाचा-गैरवापर आणि वितंडवाद हा ठरलेलाच, त्यात दुसरे साहेब अधुन मधुन शिळ्याकढीला उत आणतात.

जेम्स वांड 31/08/2017 - 07:13
पैलवानजी, -भारताला 'गस्त घालण्यावर' काहीच आक्षेप नव्हता, आक्षेप होता तो विवादित पट्ट्यात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात - चीन अजून तिथं गस्त घालणार आहेच, त्यात नवाई नाही, पण चीन ने तिथून कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट , अर्थ मूव्हर्स, वगैरे काढून मागे घेतलेत, अर्थात चीन सपाटून नाकावर आपटला आहे. - हे बांधकाम साहित्य, मशिनरी वगैरे मागे घ्यायचं कारण चीन नुसार 'खराब वातावरण' आहे, पुढे त्यांचे अधिकृत वक्तव्य म्हणते की 'वातावरण' साफ झाले तर 'पुढे बांधकाम सुरू ठेवायचा विचार' करता येईल. करूच वगैरे काही बोललेले नाहीत ते अद्याप तरी इतपत माझी माहिती आहे

नोटबंदीनंतर रु. १००० च्या जवळपास ९९% नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. १५.४४ लाख कोटी नोटांपैकी १५.२८ लाख कोटीच्या नोटा परत बँकेत जमा झाल्या आहेत. विरोधक म्हणतात हे अपयश आहे तर जेटली म्हणतात काहींना नोटाबंदी काय हे समजलंच नाही ! एवढ्या मोठ्या डोंगराएवढया मोहिमेचे फलित हे एवढे छोटे ? टेरर फंडींग ला आळा बसलाय, टॅक्स कलेक्शन वाढलेय असे आता मंत्री सांगतात मात्र हे या मोहिमेचे मुख्य उद्देश होते काय ? खरंच मलाही समजत नाहीये !

In reply to by धर्मराजमुटके

पुंबा 31/08/2017 - 10:46
++१११ बहुतांश काळा पैसा परत माघारी येणार नाही असेच उद्दिष्ट्य सांगितले गेले होते ना. आता म्हणतात आम्हाला अपेक्षा होती की सगळा पैसा माघारी येईल म्हणून. आता आलेल्या पैशावर डेटा अ‍ॅनालिसिस करून यातला काळा पैसा हुडकला जाईल असे म्हणत आहेत. पण हा टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा खर्च आहेच ना अजून. पण प्रश्न विचारले की अंगावर धावून येतात भाजपवाले.

जेटली म्हणतात तेच बरोबर आहे. लोकांना नोटाबंदी काय आहे हे समजलं असतं तर नोटाबंदी नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये ह्यांच्या पक्षाला निवडून दिलेच नसते.

अनिंद्य 31/08/2017 - 12:35
@ डोकला / डोकलाम आता पुन्हा पुढच्या वर्षी बर्फ वितळायला सुरवात झाली की एप्रिल-मे मध्ये ह्या नाट्याचा पुढचा अंक सुरु होईल. :-) भारत-चीन या दोन दादा लोकांनी दंड थोपटले आणि नूरा कुस्तीचा प्रयोग केला, त्यात खरा कस लागला तो भूतान ह्या पिटुकल्या राष्ट्राचा. त्यांच्या हुशार विदेश विभागाने नाजूक हातांनी गुंता सोडवण्याचे काम केले आहे - पण तसे कोणीच मान्य करणार नाही. वाद सुरु झाला, म्हणजे ह्यावर्षी जुलै पासून आजवर दिल्लीतील चिनी दूतावासातील डझनावारी अधिकारी, अनेक चिनी विद्वान आणि महनीय व्यक्ती 'पर्यटनासाठी' भूतानमध्ये गेल्या. त्यांनी काय कमी दबाव टाकला असेल? सोबतीला चीनची 'चेकबुक डिप्लोमसी' पण असेलच. पण ह्या देशाचे सरकार चीनला फार न फाटकारताही भारताच्या बाजूने ठाम राहिले. अर्थात हे भारतीय विदेश मंत्रालयाचेही यश आहे. भूतानच्या तिसऱ्या लोकसभेसाठी पुढीलवर्षी मतदान आहे. सध्या भूतान-चीनमध्ये थेट राजनयिक संबंध नाहीत. ते स्थापित व्हावेत अशी 'जनतेची इच्छा' असल्याची कुजबुज सुरु झाली आहे - मतदानावर प्रभाव टाकू शकणारा हा मोठा मुद्दा आहे. तरीही भारत आणि चीनप्रमाणे कोठल्याही स्व-स्तुतीच्या प्रतिक्रिया तेथिल मीडियात नाहीत. माझ्या मते हे तेथील सरकार आणि जनतेच्या परिपक्व्तेचे लक्षण आहे. - अनिंद्य

In reply to by अनिंद्य

अमितदादा 03/09/2017 - 15:24
तुम्ही म्हणताय ते पटतंय. त्याच आशयावरील एक उत्तम लेख वाचला खाली त्याची लिंक देतोय Giving Bhutan its due खालील लेखातील एक वाक्य In Doklam stand-off, the Himalayan kingdom once again came to the rescue of India’s interests, with costs to itself.

In reply to by अमितदादा

अनिंद्य 03/09/2017 - 17:31
@ अमितदादा, ज्या तेनसिंग नावाच्या भूतानी वृत्तपत्राच्या संपादकांनी हे लिहिलंय त्यांनी डोकलाम वादानंतर थिम्पूत घडलेल्या घटना जवळून बघितल्या आहेत ह्याबद्दल मला शंका नाही. म्हणूनच - "खरा कस लागला तो भूतान ह्या पिटुकल्या राष्ट्राचा. त्यांच्या हुशार विदेश विभागाने नाजूक हातांनी गुंता सोडवण्याचे काम केले आहे - पण तसे कोणीच मान्य करणार नाही." असे लिहिले होते.

In reply to by अनिंद्य

जेम्स वांड 03/09/2017 - 15:36
तरीही भारत आणि चीनप्रमाणे कोठल्याही स्व-स्तुतीच्या प्रतिक्रिया तेथिल मीडियात नाहीत. माझ्या मते हे तेथील सरकार आणि जनतेच्या परिपक्व्तेचे लक्षण आहे. माझं मत ह्यावर थोडं वेगळं पडतंय, भारत चीनने जे 'तथाकथित' चेस्ट थांपिंग केलंय, ते नेमकं निर्बुध्द अपरिपक्व चेस्ट थंपिंग होतं का ते हिशेबी 'सॉफ्टपॉवर प्रोजेक्शन' होतं, हे एकदा परत पाहायला हवंय. भूतानला सॉफ्ट पॉवर प्रोजेक्शन करण्याची गरजही नाही अन त्यांना शक्यही नाही, भारत चीनचं वेगळं पडतं....

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 03/09/2017 - 17:43
@ जेम्स वांड, मी अन्यत्र लिहिल्याप्रमाणे स्वतःच्या शेजाऱ्यांशी वाद घालण्याचा चीनला दांडगा अनुभव आहे. पण डोकलामच्या ह्या नूरा कुस्तीत चीनचा रोल आजपर्यंतच्या इतिहासातील वेगळा रोल होता, a little different flavour. म्हणून ही कुस्ती जरा जास्त रंगली :-) आता वाट पुढच्या जत्रेची.

सतिश गावडे 31/08/2017 - 14:07
अगदीच सपक आणि मिळमिळीत धागा. यात कुठेच राजकीय पक्षांची लाल केलेली नाही. याला ताज्या घडामोडीचा धागा का म्हणावे हा प्रश्न आहे. मात्र अजूनही नेहमीचे यशस्वी प्रतिसादकर्ते ही उणीव भरुन काढतील अशी आशा आहे.

In reply to by सतिश गावडे

जेम्स वांड 01/09/2017 - 13:28
फॅक्ट आर स्टबर्न, स्टॅट्स आर मोर प्लायेबल असं हरहुन्नरी मार्क ट्वेन म्हणून गेला होता बुआ, आपल्याला सोयीचा पडेल असा गुंडाळला जाणारा आकड्यांचा पुंजका म्हणजे सांख्यिकी ही सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब होय ह्या सुंदर विषयाची.

संग्राम 31/08/2017 - 16:16
वित्तमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की जुलै मध्ये ६४ टक्के जी एस टी जमा झाला आहे ... http://economictimes.indiatimes.com/small-biz/policy-trends/gst-collections-for-july-exceeded-target-finance-minister-arun-jaitley/articleshow/60289845.cms इथे काही धाग्यांवर प्रतिसादकर्ते त्यांचे जी एस टी बद्द्ल अनुभव सांगणार होते .. पण अजून वाचण्यात आले नाही म्हणून विचारत आहे ...

अभिदेश 31/08/2017 - 20:32
भारताचा ह्या तिमाहीचा GDP growth हा अतिशय निराशाजनक. ह्या वर्षी केवळ ५.७% , तुलनेने मागच्या वर्षी हा ७.९% होता. हा चीनपेक्षाही कमी झालेला आहे. म्हणजेच नुसती हवेतली आश्वासने , कृती शून्य असा प्रकार आहे. रोजगार निर्मिती सुद्धा ठप्प.

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल आज होत आहे. Cabinet reshuffle: 9 new ministers to take oath today. All you need to know about them मंत्रिमंडळ विस्तारात 9 नव्या चेहऱ्यांना संधी : सूत्र या सगळ्या घडामोडींमध्ये एनडीएच्या कुठल्याही मित्रपक्षाला मोदींनी फेरबदलात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे शिवसेना आणि जेडीयूचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. दुसऱ्या एका बातमी नुसार महत्वाच्या संरक्षण खात्यासाठी सुषमा स्वराज, नितीन गडकरी व सुरेश प्रभू यांनी नवे चर्चेत आहेत. सहा जुन्या व अपेक्षित कार्यक्षमता नसलेल्या मंत्र्यांना जावं लागलंय. त्यात पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या कलराज मिश्रा यांचा समावेश आहे. त्यांना बहुतेक कुठेतरी राज्यपाल बनवून पाठवले जाईल. (अवांतर: बरीच राज्यपाल पदे रिक्त आहेत व त्यामुळे त्या राज्यांचा राज्यपालपद दुसऱ्या राज्याच्या राज्यपालांकडे अतिरिक्त दिलेले आहे.) नवे ९ चेहरे हे आपापल्या क्षेत्रातील मातब्बर आहेत शिवाय सर्व जण उच्च शिक्षित आहेत. उच्चशिक्षित असणं हे चांगल्या कामगिरीचं लक्षण नसलं, तरी कमी/अर्ध/अशिक्षित चेहऱ्यांपेक्षा असे लोक मंत्रिमंडळात असणं जास्त चांगलं. पुणे/मुंबई/नागपूरचे माजी पोलीस आयुक्तसत्यपाल सिंग यांचीमंत्रिमंडळात वर्णी लागलीये.

Warned government about cost of demonetisation, former RBI governor Raghuram Rajan says रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी (त्यांचा कार्यकाळ सप्टेंबर'१६ मध्ये संपायच्या सुमारे सहा महिने आधी फेब्रुवारी'१६ मध्ये) केंद्राला इशारा दिला होता की नोटबंदीचे अल्पकालीन तोटे हे दीर्घकालीन फायद्यांपेक्षा खूप जास्त असतील. शिवाय काळ्या पैशाविषयी कारवाई करायचे पर्यायी मार्गही सुचवले होते. केंद्राने रिजर्व बँकेला नोटबंदीविषयी विचारणा केल्यावर, राजन यांनी केंद्राकडे हे मत व्यक्त केले होते. मात्र रिजर्व बँकेतर्फे नोटबंदी प्रक्रियेची आवश्यक ती माहितीसुद्धा केंद्राला देण्यात आली होती.

In reply to by तुषार काळभोर

अमितदादा 03/09/2017 - 14:46
नोटबंदी बाबत लिहण्यासारखं आता काही राहील नाही. रघुराम राजन यांचं ताज वाक्य "Certainly at this point, one cannot in anyway say it has been an economic success" पण अर्थतज्ञाना विचारता कोण म्हणा?

जेम्स वांड 03/09/2017 - 14:05
माझ्यालेखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्मला सीतारामन ह्यांना संरक्षण मंत्रिपद देण्यात आले आहे. मूळच्या तामिळनाडूच्या असणाऱ्या सीतारामन जेएनयू मधून अर्थशास्त्रात पीएचडी असून त्यांनी प्राईजवॉटरहाऊस कूपर्स सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम केलं आहे तसंच त्यांनी बीबीसी वर्ल्ड मध्ये पण काम केलं आहे. त्यांना पुढील कामाकरिता शुभेच्छा.

In reply to by जेम्स वांड

अमितदादा 03/09/2017 - 14:37
निर्मला सीतारामन ह्या अत्यंत हुशार आहेत पण संरक्षण मंत्रालय सारख डेलिकेट मंत्रालय कसे संभाळतायत हे भविष्यात दिसेलच. थोडीशी आश्चर्यकारक निवड. तसेच त्या अर्थशास्त्रात phd नसून व्यापार (कॉमर्स/ट्रेड) ह्या विषयात phd आहेत. पियुष गोयल यांना रेल्वे आणि प्रभू यांना व्यापार/कॉमर्स ही खाती देऊन उचित निवड आहे असे वाटते. बाकी माजी IFS आणि IAS अधिकाऱयांना योग्य ती खाती मिळावी ही अपेक्षा.

In reply to by जेम्स वांड

मराठी_माणूस 04/09/2017 - 11:47
http://www.loksatta.com/kathaaklechya-news/us-pressure-on-indian-patent-law-1163697/ ह्या लेखात लेखीकेने व्यक्त केलेले मत खुप मह्त्वाचे आहे.(शेवटुन दुसरा परीच्छेद)

गामा पैलवान 03/09/2017 - 17:14
अमितदादा, खालील लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद! :-)
In Doklam stand-off, the Himalayan kingdom once again came to the rescue of India’s interests, with costs to itself.
साधारणत: लेख पटला. भूतानचीन सीमांच्या डोकलाम वगळता इतर बाबी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसल्याने भारताने फारसं लक्ष घातलं नाही. या बाबतीत भूतानला हानी सोसावी लागली आहे असा लेखाचा एकंदरीत सूर आहे. तो बरोबरही आहे. मात्र एक गोष्ट इथे ध्यानी घ्यायला हवी. ती म्हणजे भूतानपुढे तिबेटचं लखलखीत चक्ष्वैसत्यं उदाहरण खडं आहे. चिन्यांनी तिबेट वन त्याची जी काही वाट लावली आहे ती भूतानला फारंच ढळढळीतपणे दिसते आहे. त्या वाटेने जायचं नसेल आणि भूतानची स्वत:ची संस्कृती टिकवायची असेल तर भारतासोबत राहणेच हिताचे आहे. यामुळे इतरत्र थोडी झळ सोसावी लागली तरी भूतान भारतास झुकतं माप देण्यास राजी आहे. नेमकी हीच बाब चीनला खटकते आहे. म्हणून की काय चीनने भूतांनी जनतेच्या इच्छेची कुजबूज प्रजोजित केलेली वाटते. अरुणाचलातही भारताबद्दल आत्मीयता याच कारणामुळे आहे. चिन्यांचा कोणालाही अगदी दस्तुरखुद्द चीनच्या नागरिकांनाही भरंवसा वाटंत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारताने जनरल सुंदरजींच्या नेतृत्वाखाली १९८७ साली चीनला जबर मार दिला होता. त्यानंतरच चीनने बोलणी करण्याची भूमिका घेतली. म्हणून जेव्हा चीन राजनैतिक विजय मिळवल्याची बढाई मारतो तेव्हा खरंतर तो भारताच्या रणनीतीचा विजय असतो. आ.न., -गा.पै.

लिओ 04/09/2017 - 20:56
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथेही ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने गेल्या महिन्याभरात ४९ मुलं दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळेच या मुलांचा मृत्यू झाल्याचं तपास अहवालात निष्पन्न झाल्यावर स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. http://www.hindustantimes.com/india-news/49-infants-die-in-up-s-farrukhabad-hospital-probe-blames-lack-of-oxygen-dm-and-senior-doctors-transferred/story-JGNxpubfXzCRnluVVUE79I.html

In reply to by मोदक

जेम्स वांड 07/09/2017 - 09:17
असं मला माझा धर्म शिकवतो, केवळ म्हणूनच गौरी लंकेश ह्यांना श्रद्धांजली असं म्हणून मी गप बसतो ____/\___

पुंबा 06/09/2017 - 11:54
लंकेश यांना आदरांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. एवढ्या लिंका लागूनदेखिल ४ ही केसमधील मारेकर्‍यांचा पत्ता कसा लागत नाही ही मोठी गूढ बाब आहे आणि स्टेट म्हणून भारतासाठी शरमेची बाबसुद्धा..

श्रीगुरुजी 06/09/2017 - 17:45
गौरी लंकेश यांना श्रद्धांजली. त्यांच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर पकडून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. त्यांची हत्या अत्यंत निंदनीय आहे. अशा हत्यांचा व लगेचच त्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरून तपासाची सुई एका विशिष्ट दिशेने वळविण्याचा एक पॅटर्न दिसत आहे. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर सुरवातीला काही मुस्लिमांची चौकशी सुरू होती. एक दिवस पवारांनी सांगितले की "मशिदीत बाँबस्फोट करणारा मुस्लिंम असूच शकत नाही. यामागे मुस्लिम नसून दुसरेच कोणतरी आहेत.". असे सांगून त्यांनी तपासाच्या सुईची दिशा १८० अंशाने वळविली. त्यानंतर काही दिवसांतच साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल श्रीकांत पुरोहित, दयानंद पांडे, असीमानंद इ. १०-११ हिंदूंना बाँबस्फोटासाठी अटक केली. नंतर त्यांना मोक्का लावण्यात येऊन तब्बल ९ वर्षे विनाखटला, विनाआरोपपत्र, विनाजामीन तुरूंगात डांबण्यात आले. मागील ९ वर्षांत त्यांच्याविरूद्ध पुरावा जमविता आलेला नाही. त्यामुळे २-३ महिन्यांपूर्वी साध्वी प्रज्ञासिंहला व काही दिवसांपूर्वी कर्नल पुरोहितांना तब्बल ९ वर्षानंतर जामीनावर सोडण्यात आले. परंतु यामागे वेगळीच योजना होती. बाँबस्फोटासाठी हिंदू संघटनांना जबाबदार धरण्यात आले. त्याचवेळी २६/११ च्या हल्ल्यात कसाब व त्याच्या साथीदारांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात या बाँबस्फोटाचा तपास करणारे हेमंत करकरे शहीद झाले. त्यांच्या मृत्युबद्दलसुद्धा संशय निर्माण करण्यात आला व असे पसरविले गेले की त्यांनी बाँफस्फोटात हिंदू संघटनांना अडकविल्यामुळे हिंदू संघटनांनीच त्यांना मारले. एप्रिल-मे २००९ मध्ये लोकसभेची निवडणुक होती. या निवडणुकीत भाजपला बॅकफुटवर नेण्यासाठी या अटकांचा भरपूर उपयोग करण्यात आला. याचा फायदा काँग्रेसला २००९ मध्ये झाला. काँग्रेसला २००४ च्या तुलनेत लोकसभेत व विधानसभेत जास्त जागा मिळाल्या. आता काँग्रेसला यशाचा एक नवीन फॉर्म्युला सापडला होता. २०१४ मध्ये लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक होती. ऑगस्ट २०१३ मध्ये दाभोळ्करांना मारण्यात आले व त्यांच्या खुनानंतर काही क्षणातच तपासाची सुई पुन्हा एकदा सनातन या हिंदू संघटनेकडे वळविण्यात आली. सुरवातीचे २-३ आठवडे पोलिस या दिशेनुसार सनातनचा तपास करीत होते. त्यामुळे खर्‍या खुन्यांना निसटून जायला, पुरावे नष्ट करायला भरपूर वेळ मिळाला. खुनाच्या स्थळाच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून जे चित्रण मिळाले त्यातून खून करणार्‍या दोघांची चित्रे तयार करण्यात आली. परंतु ते आजतगायत सापडलेले नाहीत. सनातनच्या तपासातून काहीच निष्पन्न न झाल्याने काही महिन्यांनंतर नागोरी व खंडेलवाल या बेकायदा शस्त्रे विक्री करणार्‍यांना खुनाच्या आरोपाखाली पकडण्यात आले. त्यांच्या तपासातूनही काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांना सोडावे लागले. नंतर जवळपास ३ वर्षानंतर सनातनच्या वीरेंद्र तावडेला पकडण्यात आले. तो मागील १५ महिने तुरूंगात आहे. त्याच्याविरूद्धसुद्धा काहीही पुरावा मिळाला नाही. आता विनय पवार व सारंग अकोलकर यांची नावे पुढे आणली आहेत. खुनींची आधी प्रसिद्ध केलेली चित्रे व विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यात काहीही साम्य नाही. एकंदरीत मागील ४ वर्षात खरे खुनी सापडलेले नाहीत. परंतु सनातनला झोडपणे सुरू आहे. दाभोळकरांच्या खुनानंतर जाणूनबुजून तपासाची दिशा भरकटविण्यात आली हे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसने या खुनाचाही वापर २०१४ च्या निवडणुकीवर डोळा ठेवून केला होता. दाभोळकरांच्या खुनामागे एखादी वेगळी थिअरी असू शकते. माझे व्यक्तिगत मत असे आहे की या खुनामागे तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमधील कोणतरी तगडा नेता असावा कारण २००९ प्रमाणे खुनाचे बालंट हिंदुत्ववादी संघटनांवर ढकलून त्याचा फायदा २०१४ च्या निवडणुकीत मिळविण्याचा डाव असण्याची शक्यता आहे. काल गौरी लंकेश यांचा झालेला खून हा याच योजनेचा भाग असावा. अजून ८ महिन्यांनी एप्रिल-मे २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणुक आहे. त्याआधी गुजरात व हिमाचल प्रदेशची निवडणुक आहे. काल हा खून झाल्यावर लगेचच त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरणे सुरू झाले आहे. २००८ व २०१३ मध्ये अगदी असेच झाले होते. कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकार अत्यंत अकार्यक्षम सिद्ध झाले आहे. त्यामुळेच त्यांनी टिपू जयंती साजरी करण्यासारखे कार्यक्रम सुरू करून राज्यात जातीय विष पेरण्याचे काम सुरू केले आहे. मागील १-२ महिन्यांपासून कर्नाटकमध्ये कन्नड विरूद्ध हिंदी हा वाद भडकविला जात आहे. एकंदरीत २०१८ मधील निवडणुक जिंकण्यासाठी लोकांमध्ये फूट पाडणे व लोकभावना भडकावणे अश्या सोप्या युक्त्या सिद्धरामय्याने वापरायला सुरूवात केली आहे. कालच्या खुनाने त्यांना हिंदुत्ववादी संघटनांना झोडपायला नवीन संधी मिळाली आहे. यापूर्वी झालेल्या दाभोळकर, पानसरे व कलबुर्गींच्या खुनातील एकही आरोपी सापडलेला नाही. त्या खुनांमागचे हेतू समजलेले नाहीत. खुनातील शस्त्रे व वाहने सापडलेली नाहीत. तपासात आजवर कोणतीही माहित मिळालेली नसताना अजूनपर्यंत खुनासाठी हिंदू संघटनांना जबाबदार धरणे सुरू आहे. या तिघांनी धर्मचिकित्सा केल्यानेच त्यांना हिंदुत्ववादी संघटनांनी मारले हा निष्कर्ष निधर्मांधांनी केव्हाच काढला आहे आणि तोसुद्धा अजूनपर्यंत कणभरही पुरावा मिळालेला नसताना. माझ्या मते गौरी लंकेश यांच्या खुनामागे २-३ कारणे संभवितात. त्या सातत्याने हिंदू संघटना, भाजप यांच्यावर टीका करीत होत्या. खुनामागे हे एक कारण असू शकते. परंतु भारतात अनेकजण हिंदू संघटना व भाजप यांच्यावर अत्यंत जहरी टीका करतात. त्यातील कोणाचेही खून या संघटनांनी केल्याचे आजवर सिद्ध झालेले नाही. त्यामुळे ही शक्यता अत्यल्प आहे. खुनामागील दुसरे कारण म्हणजे वर नमूद केल्याप्रमाणे निवडणुकीत फायदा मिळविण्यासाठी त्यांचा खून करून त्याचे बालंट हिंदू संघटनांवर ढकलायचे. यामागे कर्नाटकातील सत्ताधारी पक्ष असू शकतो. मागील वर्षी कर्नाटकातील गणपती नावाच्या एका एसीपीच्या आत्महत्येसाठी कर्नाटक सरकारमधील एक मंत्री जॉर्ज व त्याचे दोन मुलगे जबाबदार होते. खुनामागे अजून एक कारण असू शकते. गौरी लंकेश एक टॅब्लॉईड चालवायच्या. त्या भाजप व हिंदू संघटनांवर कठोर टीका करायच्या. केजरीवालांप्रमाणे त्या अनेकांवर बेलगाम आरोप करायच्या. मागील वर्षी भाजपचे खासदार प्रल्हाद जोशी यांच्यावर केलेल्या बेलगाम आरोपांमुळे प्रल्हाद जोशींनी त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता. त्या खटल्याचा निकाल लागून गौरी लंकेश यांना ६ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली होती. सध्या त्या जामीनावर बाहेर होत्या. टॅब्लॉईड चालविणारे काही जण ब्लॅकमेलिंगमध्ये गुंतलेले सापडले आहे. आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून समाजातील प्रभावशाली व्यक्तींविरूद्ध स्टिंग ऑपरेशन किंवा इतर तत्सम साधने वापरून पुरावी गोळा करायचे व पुराव्यांची भीति दाखवून त्या व्यक्तींना ब्लॅकमेल करण्याची काही प्रकरणे पूर्वी उघडकीला आली आहेत. तहलका, कोब्रापोस्ट इ. टॅब्लॉईड्स बदनाम आहेत. गौरी लंकेश सुद्धा अशाच प्रकरणात असल्या तर खुनामागे तेसुद्धा कारण असू शकते. काही काळापूर्वी त्यांचा स्वत:च्या भावाशी प्रेसच्या मालकीवरून वाद झाला होता व भावाने त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिली होती. तसेच त्यांचे नक्षलींशीही संबंध होते. या अंगाने सुद्धा तपास होणे जरूर आहे. एकंदरीत या खुनामागे अनेक कारणे असू शकतात. असे असताना व खुन्यांबद्दल कोणतीही माहिती व पुरावे नसताना खुनानंतर काही वेळातच लगेच त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरणे हे अत्यंत निषेधार्ह आहे.

विशुमित 06/09/2017 - 18:08
१. प्रज्ञा सिंग आणि श्रीकांत पुरोहित फक्त जामिन्यावर सुटले आहेत. दोघांची निर्दोष मुक्तता झालेली नाही आहे. त्यामुळे निकर्षांपर्यंत पोहचण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागेल. २. भले दाभोलकरांची हत्या आघाडी सरकारच्या काळात झाली होती आणि पानसरेंची युती सरकारच्या काळात. आताचे सरकार खरे मारेकरी शोधण्यात कोठे कमी पडत आहेत? ३. गौरी लंकेश: एकंदरीत या खुनामागे अनेक कारणे असू शकतात. असे असताना व खुन्यांबद्दल कोणतीही माहिती व पुरावे नसताना खुनानंतर काही वेळातच लगेच त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरणे हे अत्यंत निषेधार्ह आहे....याबद्दल सहमत.

In reply to by विशुमित

गामा पैलवान 06/09/2017 - 18:49
विशुमित,
दोघांची निर्दोष मुक्तता झालेली नाही आहे.
दोघांवर आरोप कसले आहेत? त्याचीपण चिकित्सा करावी म्हणतो मी. आरोप नसतांना तुरुंगात डांबून ठेवणं कितपत योग्य? आ.न., -गा.पै.

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 06/09/2017 - 20:30
१. नऊ वर्ष झाली तरी अजून आरोपपत्र सुद्धा दाखल करू शकले नाहीत. विना आरोपपत्र अटक करता यावी म्हणून मोक्का लावला. आता मोक्का संघटित गुन्हेगारी साठी बनवलेला कायदा आहे. मालेगाव बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला मानायचा का संघटित गुन्हेगारीचा प्रकार? बोभाटा झाला हिंदू दहशतवादाचा पण ते सिद्ध करण्यासाठी कुठलेच पुरावे सापडले नाहीत, त्यामुळे मोक्का लावावा लागला. मोक्का कायद्याप्रमाणे एकाच गुन्ह्यात सहभाग असेल तर मोक्का लावता येत नाही. म्हणून आधीच्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटाच्या खटल्यात या दोघांचे नाव घुसडले गेले. पण दोन्ही खटल्यात या दोघांविरुद्ध कुठलाच पुरावा अजून गोळा करता आला नाहीये. एक हिंदू साध्वी तथाकथित पुरोगाम्यांच्या रडारवर असू शकते पण आर्मीतला कर्नल का यात गोवण्यात आला असावा? देशांतर्गत दहशतवादी कारवायांची माहिती हल्ले होण्याआधीच काढून ते हल्ले अयशस्वी करण्यात कर्नल पुरोहित यांचा सहभाग होता असं म्हणतात. मग त्यांना टारगेट करण्याचं हे कारण असावं का? दहशतवादी आणि भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांच्या मानवी हक्कांसाठी गळे काढणाऱ्या कोणालाच ९ वर्ष विनापुरावे आणि विना आरोप जेल मध्ये टाकल्या गेलेल्या या दोघांसाठी आवाज उठवावासा वाटलं नाही. याच दुटप्पीपणासाठी ही तथाकथित पुरोगामी जमात मला आवडत नाही. २. तेव्हाची सरकारे कुठे कमी पडली? का त्यांनी तटस्थपणे शोध न घेता उगाच सनातन व इतर हिंदू संस्थांकडे लक्ष वळवलं? कदाचित पुरावे नष्ट करायचे असावेत का? CCTV वर मारेकऱ्यांची छबी सापडून सुद्धा तत्कालीन सरकारला मारेकरी सापडले नाहीत, ना हत्यारे सापडली ना कुठले पुरावे. मग या परिस्थितीत नंतर आलेल्या सरकारने काय करणं अपेक्षित आहे?

सुबोध खरे 06/09/2017 - 20:02
@विशुमित आताचे सरकार खरे मारेकरी शोधण्यात कोठे कमी पडत आहेत? डॉ दाभोळ्करांची हत्या ऑगस्ट २०१३ मध्ये झाली ( महाराष्ट्रात) आणि श्री कलबुर्गी यांची हत्या ऑगस्ट २०१५ मध्ये कर्नाटकात झाली. तरी बरं त्या वेळेस दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे सरकारच होते. मग आताचे सरकार मारेकरी शोधण्यात कमी पडत आहेत हे विचारणे आपला पूर्वग्रह दाखवतो आहे. मग तेथे भाजपचे सरकार असते तर काय म्हणाला असतात?

श्रीगुरुजी 07/09/2017 - 11:14
आजचा विनोद - हिंदुस्थानच्या भररस्त्यावर एका महिला पत्रकाराची हत्या व्हावी हे कसले लक्षण समजायचे? तिचे विचार व भूमिका कदाचित कुणाला पटत नसतील. तिच्या लिखाणाने व भूमिकेने कुणी अस्वस्थ झाले असतील, म्हणून त्या निःशस्त्र महिलेवर अशाप्रकारे निर्घृण हल्ला करणे हे अमानुष आहे. मानवता व देशाच्या इभ्रतीस कलंक लावणारे आहे. हे शौर्य नाही व मर्दानगीचा जयही नाही. - शूर वाघोबा उद्धट ठाकरे हे वाचल्यानंतर का कोणास ठाऊक, पण मलिष्का, पालघरच्या मुली, नगरसेविका घोसाळकर इ. आठविले. http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-attacks-on-bjp-over-gauri-lankesh-murder/articleshow/60401978

सुबोध खरे 07/09/2017 - 11:47
गेल्या तीन वर्षात २३ पत्रकारांची हत्या झाली आहे परंतु केवळ इंग्रजी भाषेत लिहीणार्या डाव्या विचारसरणीच्या पत्रकार गौरी लँकेश यांची हत्या झाल्यावर प्रेस्टिट्यूट्सनी( राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, बरखा दत्त, शेखर गुप्ता आणि वीर संघवी) यांनी ट्विटरवरून "पत्रकारांच्या विचार स्वातंत्र्याची" कोल्हेकुई सुरु केली आहे. केवळ हलकट आणि दांभिक लोक आहेत. कारण बाकी २२ पत्रकार हे भारतीय भाषेत लिखाण करणारे होते आणि ते बुबुडविपुमाधवि( विचारवंत, बुद्धिवादी पुरोगामी इ इ )नव्हते पण ते लोकल गुंडांच्या विरुध्द्व लिहीत होते. त्या सर्व पत्रकारांची हत्येवरील चर्चेला "टी आर पी" मिळणार नव्हता https://twitter.com/aranganathan72?lang=en https://twitter.com/aranganathan72?lang=en

In reply to by गामा पैलवान

वरील तक्त्यामधे महाराष्ट्रातील एकही पत्रकार नाहिये म्हणजे इथले सगळे पत्रकार, निर्भिड, निष्पक्ष, ताटाखालची मांजरे आहेत की इथले गुंड हे पत्रकारांचा आदर ठेवतात ? भाई तु तेरा काम कर मै मेरा ! अवांतर : २०१३ मधे शेखर चे ट्वीटर अकाऊंट नव्हते का ? तिकडे डॅश मारलाय म्हणून विचारले. आणि हे कोणी कोणत्या विषयावर किती ट्वीटस केले हे कसे मोजतात ? म्हणजे काही फॉर्मुला आहे की रोज लक्ष ठेवावे लागते की अमुक बाबाने अमुक विषयावर ट्वीट केले म्हणून ? कुतुहल म्हणून बरखा बाईंच्या ट्वीटर हँडलवर गेलो तर १,१३.००० इतके ट्वीटस दिसतात. केवढी एनर्जी लागत असेल ? शेवटचे ट्वीट कधी केले हे शोधायला स्र्कोल डाऊन करायला गेलो तर हात दुखायला लागला. वरचा तक्ता बनवणार्‍याला मानले पाहिजे. एवढी आकडेवारी तोंडावर फेकून मारायची ते पण असा प्रसंग घडल्यावर लगोलग तर केवढा अभ्यास करावा लागत असेल. की निव्वळ रँडम आकडे पकडून टेबल बनवितात ? मी अडाणीच राहिलो जगापेक्षा असे वाटतेय खरे !

In reply to by धर्मराजमुटके

श्रीगुरुजी 07/09/2017 - 23:31
वरील तक्त्यामधे महाराष्ट्रातील एकही पत्रकार नाहिये २-३ वर्षांपूर्वी मुंबईत पत्रकार जे डे यांचा खून झाला होता. काही पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. हत्यांची अजून काही प्रकरणे सुद्धा असतील.

In reply to by धर्मराजमुटके

रानरेडा 08/09/2017 - 00:04
गुगल नावाची एक साईट आहे हे बहुदा आपल्याला माहित असावे , त्यात बऱ्याच गोष्टी शोधता येतात ... https://twitter.com/search-advanced?lang=en अजूनही बरीच तुका असावीत

अधिक बातमी इथे ! कुणाचा जीव गेला नाही नशिब ! नाहितर पुन्हा नवीन रेल्वेमंत्री शोधावा लागला असता. प्रभुंनी राम बनण्याचा नादात उकाच स्वतःची विकेट टाकली.

अधिक बातमी इथे ! कुणाचा जीव गेला नाही नशिब ! नाहितर पुन्हा नवीन रेल्वेमंत्री शोधावा लागला असता. प्रभुंनी राम बनण्याचा नादात उगाच स्वतःची विकेट टाकली.

तेजस आठवले 08/09/2017 - 17:06
गोरखपूर दुर्घटनेनंतर २/४ दिवस आरडाओरडा झाला आणि प्रकरण फार पुढे ताणले नाही. मोर्चे, मेणबत्ती घेऊन श्रद्धांजली, पुरस्कार वापसी, असहिष्णुतावाढ, अल्पसंख्यांक कसे असुरक्षित आहेत, हुकूमशाही आणि फॅसिस्ट राजवट चालू आहे असा काहीही ओरडा आणि प्रचंड गदारोळ झाला नाही त्यावरून ह्या दुर्दैवी घटनातली मुले नक्कीच एका विशिष्ट धर्माची असावीत. नाहीतर आत्तापर्यंत ...

अमितदादा 09/09/2017 - 16:23
गेल्या काही दिवसात नोटबंदी वर काही लेख वाचनात आले, बहुतांश लेख हे नोटबंदी एक आर्थिक अरिष्ट आहे हे सांगणारेच आहेत (जे माझे सुद्धा मत आहे), त्यातील काही लेखाचा सारांश आणि माझी मते कंसामध्ये . लेख क्रमांक १. Calling black white लेख क्रमांक २. (या लेखाचं वैशिष्ट्य असे कि यामध्ये नोटबंदी चे समर्थक, विरोधक आणि neutral या सगळ्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. ) Demonetisation: now a proven failure? १. ५०० आणि १००० च्या जवळजवळ ९९% नोटा परत आल्या आहेत याचा अर्थ ज्या लोकांच्याकडे काळा पैसा होता व त्यांनी बँकिंग सिस्टिम मध्ये परत आणला आहे. (आता भाजप चे प्रवक्ते असे म्हणतात कि काळा पैसा बँकिंग सिस्टिम मध्ये आला म्हणून तो पांढरा होत नाही IT वाले त्यांची चौकशी करणार आहेत, पण आपण एक गोष्ट लक्ष्यात घयायला हवी कि हेच भाजप चे प्रवक्ते आधी ३ ते ४ लाख कोटी रुपये बँकेत परत येणार नाहीत असे अंदाज वर्तवित होते, आता काय झालं त्या अंदाजच ? हे अपयश नाही का? म्हणजे काळ्या पैशे वाल्यानी सरकारचा पहिला आणि मोठा अडथळा मोडून काढला. बरं आता ह्या IT डिपार्टमेंट कडे ह्या लाखो संशयास्पद लोकांचं चौकशी करण्याचं मनुष्यबळ आहे का ? लाखो केसेस उभ्या करण्याचे आणि सोडवण्याचे अधिकार आणि ताकत आहे का ?) २. बरं RBI ला जवळजवळ १४,००० कोटींचा जास्त खर्च करावा लागला (नवीन नोटा छापणे (४००० कोटी )+ नोटा वितरण ), तसेच बाजारातील कॅश बँकेत आल्यामुळे RBI ती तरलता शोषून घ्यावी लागली आणि त्याच कित्येक हजार कोटींचं व्याज द्यावं लागलं काही कारण नसताना. (याचा आकडा अजून जाहीर व्हायचंय) ३. GDP २ टक्यांनी गडगडला, एका इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत, शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला. याच श्रेय कोणाचं ? ४. अनेक राज्यांनी कृषी क्षेत्रासाठी २ लाख कोटींची कर्जमाफी जाहीर केलीय, यामध्ये नोटबंदी चा थोडाफार हातभार आहेच (संधर्भ: लोकसत्तातील एक लेख बहुदा मंगेश सोमण ) ५. सरकार असे म्हणताय कि ९१ लाख , मोदी म्हणतायत ५६ लाख , तर सरकारचा एक इकॉनॉमिक सर्वे म्हणतोय कि ५.४ लाख नवीन लोक इनकम टॅक्स च्या जाळ्यात आलेत. आता महत्वाचा प्रश्न यातील किती लोक टॅक्स देणार आहेत ? सरकारच्या एका इकॉनॉमिक सर्वे नुसार (लेख क्रमांक १) declared income १०००० करोड म्हणजे यातून जास्तीत जास्त टॅक्स ३००० करोड गोळा होईल. (हि चांगली गोष्ट असली तरी डोंगर पोखरून उंदीर काडल्यासारखी आहे. बरं आता दुसरा प्रश्न नवीन गोळा झालेले टॅक्स payer मध्ये GST मुळे समाविष्ट झालेल्या लोकांचा चा वाटा किती ? ) ६. म्हणजे digitization, cash less economy, आधार कार्ड संलग्नता, लोकांची बँक अकाउंट ह्या गोष्टी होणे अत्यंत महत्वाच्या आहेत पण यासाठी नोटबंदी ची अजिबात आवश्यकता नाही , जगातील अनेक देशांनी ह्या गोष्टी नोटबंदी सारखा निर्णय न घेता केलेला आहे. आता दुसऱ्या लेखातील नोटबंदी च्या समर्थनार्थ मांडलेल्या बाजू ७. बँकेत जमा झालेला ४-५ लाख कोटींचा पैसा हा संशयास्पद आहे, यातील बहुतांश पैसा काळा पैसा म्हणून उघड होणार आहे.(असे झाले तर चांगलंच आहे पण असे होणे खूप अवघड आहे. याच कारण हा प्रचंड पैसा खोटा आहे हे सरकार ला सिध्द करायचं आहे ह्या लोकांना न्हवे, तसेच सरकारचे आकडे हे अंदाज आहेत , proven फॅक्ट नाहीत. आणि सरकारचे जुने अंदाज पाहता माझा यावर विश्वास नाही. ) ८. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना हि काळ्या पैशाबाबत यशस्वी झाली आहे. (परंतु ह्या योजनेचा आणि नोटबंदी चा डायरेक्ट संबंध नाही, आणि मुळात यातून सरकार ला ४००० कोटींचं मिळाले आहेत. मुळात हि योजनाच नोटबंदी¨च्या अगोदर आलीय ) ९. कॅशलेस इकॉनॉमी ला मदत झाली. (यासाठी नोटबंदी करण्याची मुळात गरजच न्हवती असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच नोटबंदी नंतर वाढलेले ऑनलाईन transaction परत एकदा कमी झालेत हि वस्तुस्थिती आहे.) १०. खोट्या नोटा चलनातून बाद झाल्या. (मुळात RBI च्या अवहलानुसार सापडलेल्या काळ्या नोटा ४०-१०० कोटींच्या आसपास आहेत, म्हणजे हे एक प्रकारचं अपयश च) म्हणजे थोडक्यात काय तर तळ्यात जास्त मासे पकडण्यासाठी तळे आठवायची गरज न्हवती, चांगल्या पद्धतीचे जाळे वापरणे किंवा योग्य ठिकाणी मासे मारणे हे यावरचे उपाय होते. भविष्यात जरी नोटबंदीचे फायदे होणार असतील तरी आत्ता झालेले नुकसान खूप आहे ते भविष्यातील फायद्यातून भरून निघणार नाही. जाता जाता, नोटबंदी सारख्या अनेक गोष्टींचा ओव्हरऑल विचार करून मोदी समर्थक किंवा विरोधक असणे, आणि नोटबंदी सारख्या आर्थिक निर्णयाची कारणमिमीनसा करणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.

In reply to by अमितदादा

गामा पैलवान 09/09/2017 - 17:23
अमितदादा, जर नोटाबंदी केली नसती तर आजूनही काळा पैसा खेळताच राहिला असता ना? आजवर जो लपवलेला पैसा होता तो उघड्यावर येऊन नोंदबद्ध झाला आहे. याकडे कोणाचंच लक्ष नाही. शिवाय काळ्या पैशाने फुगलेल्या अर्थव्यवस्थेपेक्षा कृश पण धवल अर्थव्यवस्था जनतेस फायदेशीर नाही का? या प्रश्नात जनतेस हा प्रमुख शब्द आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 09/09/2017 - 23:02
३. GDP २ टक्यांनी गडगडला, एका इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत, शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला. याच श्रेय कोणाचं ? GDP २ टक्क्यांनी गडगडलेला नसून एका तिमाहीकरता १.४ टक्क्यांनी कमी झाला आहे. कोणत्या इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत व शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला?

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा 10/09/2017 - 00:35

In reply to by अमितदादा

गामा पैलवान 10/09/2017 - 01:55
अमितदादा, तुमचं बरोबर आहे. माझा विश्वास नाहीच बसणार. वरील पहिल्या दुव्याच्या सुरुवातीचं वाक्य आहे :
While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017.
अधिक खोदाईची गरज असतांना मी कसा विश्वास ठेवावा ! आ.न., -गा.पै.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 10/09/2017 - 14:56
पहिल्या लेखानुसार -
The Centre for Monitoring Indian Economy, a think-tank that tracks business and economic data, believes that 1.5 million jobs were lost in January-April 2017, a likely result of demonetisation.
believes that म्हणजे हे त्यांचे गृहितक/समजूत आहे. गृहितक/समजूत सत्य असेलच असे नाही. त्यापुढे असेही वाक्य आहे - This slide is believed to be an after-effect of demonetisation. नंतर त्याच लेखात labour participation rate घसरला असे लिहून एक आलेख दिला आहे. त्या आलेखानुसार नोव्हेंबरपूर्वीच यात मोठी घसरण झाली होती. नंतर नोव्हेंबरमध्ये यात घसरण न होता वाढ झाली व डिसेंबर हा रेट स्थिर होता आणि नंतर जानेवारीनंतर परत घसरला. म्हणजे या चढउताराशी निश्चलीकरणाचा संबंध दिसत नाही. आलेखानंतर लगेचच एक परस्परविरोधी टिप्पणी आहे. Demonetisation’s effect kicked in with a lag, as the period from September-December is a busy season for agrarian India and that could have had kept the employment levels high, explains the report. एकंदरीत या लेखातील निष्कर्षांना कोणताही ठोस आधार दिसत नाही. स्वतःच्या समजूतीनुसार निष्कर्ष काढले आहेत. ______________________________________________________________________________________________ लेख क्रमांक २ - लेखाच्या सुरवातीलाच एक टीप आहे. While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017. याचा सरळ अर्थ असा की या लेखातील निष्कर्ष पुरेशा संशोधनावर आधारीत नाहीत. या लेखातही परस्परविरोधी दावे आहेत. While India’s employed force grew from 401 million in April 2016 to 406.5 million in December 2016, it fell to 405 million in the four-month survey period of January through April 2017. “The workforce (persons greater than 14 years of age) swelled by 9.7 million to 960 million during January-April 2017. But, the number of employed did not grow, it shrank. This implies that the stock of persons to be provided with employment has increased, केवळ ४ महिन्यात १४ वर्षे पूर्ण केलेल्यांची संख्या तब्बल ९७ लाखांनी वाढली यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. कारण याच दराने १२ महिन्यात हीच संख्या जवळपास ३ कोटींनी वाढायला हवी. लोकसंख्या वाढीचा दर थोड्याफार फरकाने प्रतिवर्ष स्थिर धरला तर वरील दाव्यानुसार भारतात २००३ पर्यंत दरवर्षी ३ कोटींहून अधिक बालके जन्म घेत होती आणि एकूण लोकसंख्या व लोकसंख्यावाढीचे अधिकृत आकडे पाहिले तर हा आकडा खूपच अवास्तव वाटतो. पुढे असे लिहिले आहे की The unemployment rate during September-December 2016 was 6.8% (29.6 million unemployed out of a labour force of 436 million). in January-April the rate fell to 4.7% (20 million unemployed out of a labour force of 425 million). म्हणजे जानेवारी-एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या २ कोटी ९६ लाखांवरून कमी होऊन २ कोटींवर आली. एकीकडे म्हणतात की या काळात बेकारी वाढून १५ लाख नोकर्‍या गेल्या आणि दुसरीकडे लिहितात की बेकारी ९६ लाखांनी कमी झाली. Note that the 9.6 million fall in the unemployed count is close to the addition to the workforce. This is like saying that almost the entire new workforce of January-April 2017 did not offer themselves for employment. This is odd. Is this a seasonal phenomenon? म्हणजे असे का झाले हे यांना माहिती नाही. म्हणूनच यामागे निश्चलीकरण आहे असा निष्कर्ष काढला असावा. The second issue is that the India’s employed labour force went up during the September-December 2016 period – demonetisation occurred on November 8, 2016. आता म्हणतात की सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ या काळात काम असणार्‍यांची संख्या वाढली. यांच्या आधीच्या निष्कर्षानुसार ही संख्या ८ नोव्हेंबरनंतर कमी व्हायला हवी. परंतु या वाक्यानुसार ही संख्या वाढलेली दिसते. परंतु जानेवारीनंतर काम करणार्‍यांची संख्या का कमी झाली यामागचे कारणही त्यांनीच दिले आहे. “September-December is a busy season as the kharif crop is harvested during this period and most festivals fall during these months. 2016 was a good kharif crop and this could have kept employment levels high. January-April is a relatively lean season. Further, demonetisation could have had its full impact during these months while its impact during September-December was partial,” he notes. _____________________________________________________________________ तिसरा लेख - या लेखाचे शीर्षकातील अवास्तव आकडे वाचूनच (३५% नोकर्‍या गेल्या, महसूलात ५०% घट) त्यातील भंपकपणा लक्षात आला. निश्चलीकरणामुळे उद्योगधंद्यांवर इतका मोठा वाईट परीणाम झाला असेल तर डिसेंबर २०१६ मध्ये केद्रीय सीमाशुल्क संकलन, अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष करसंकलन यात मोठ्या प्रमाणात वाढ कशी झाली असती. डिसेंबर २०१५ च्या तुलनेत डिसेंबर २०१६ मध्ये केंद्रीय सीमाशुल्क संकलनात ३१.६% व अप्रत्यक्ष करात १२.८% इतकी वाढ झाली. संपूर्ण वर्षाचा विचार केला तर २०१६-१७ या वर्षात केंद्रीय सीमाशुल्क संकलनात ३३.९%, सेवाकर संकलनात २०.२%, प्रत्यक्ष कर संकलनात १४.२% व अप्रत्यक्ष कर संकलनात २२% वाढ झाली आहे. जर निश्चलीकरणामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात फटका बसला असेल तर इतक्या प्रमाणात वाढ कशी झाली असती? http://www.livemint.com/Politics/cH5gNYLvx0V4wjPxPsbRzK/Govt-exceeds-201617-tax-collection-target-collects-Rs1710.html मी इंडियन एक्सप्रेसमध्ये डिसेंबर २०-२१ तारखेच्या आसपास एक वृत्तांत वाचला होता. नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये २०१५ च्या तुलनेत वाहन खरेदीत घट झाली असे त्यात लिहिले होते. त्यात जवळपास २० कंपन्यांची आकडेवारी दिली होती. त्या आकडेवारीनुसार २० पैकी फक्त ६ कंपन्यांच्या खपात घट झाली होती. उर्वरीत १४ कंपन्यांच्या खपात वाढ झाली होती. म्हणजेच वृत्तांताचे शीर्षक फसवे होते. त्यामागे अजून एक कारण होते जे त्यांनी लक्षात घेतले नव्हते. भारतात वाहने, ग्राहकोपयोगी वस्तू साधारणपणे मुहूर्तावर घेतल्या जातात. गुढी पाडवा, दसरा, दिवाळी पाडवा अशा सणांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. २०१५ मध्ये दसरा ऑक्टोबरमध्ये व दिवाळी नोव्हेंबर मध्ये होती. त्यामुळे त्यावर्षीच्या खपाचे आकडे दोन महिन्यात विभागले गेले. २०१६ मध्ये दोन्ही सण ऑक्टोबरमध्येच आले होते. त्यामुळे २०१६ ची त्या काळातील विक्री ऑक्टोबरमध्येच झाली. साहजिकच नोव्हेंबरमध्ये तुलनेने कमी खरेदी झाली व नोव्हेंबर २०१६ चे आकडे २०१५ च्या तुलनेत कमी दिसले. हा मुद्दा वृत्तांत लिहिताना लक्षात घेतलेला नव्हता.

In reply to by अमितदादा

चिनार 11/09/2017 - 14:22
कृपया खालील शंकेचे निरसन करावे... एका आकडेवारीनुसार नोटबंदी आधी साधारण सतरा लाख कोटी रुपये पाचशे आणि हजाराच्या स्वरूपात होते. (काही लोक हा आकडा पंधरा लाख कोटी आहे असं सांगतात). तुमचं नाही-माझं नाही, आपण सोळा लाख कोटी पकडू. हे सर्व रक्कम ८ नोव्हेंबरला बाद झाली. पण सरकारने नवीन पाचशे आणि दोन हजाराच्या स्वरूपात फक्त बारा लाख कोटी बाजारात आणले असं सांगण्यात येते. हे जर खरे असेल तर, बँकेत कितीही पैसा वापस आला तरी चार लाख कोटींचे चलन सरळ सरळ बाद झाले असं म्हणता येऊ शकतं का? या चार लाख कोटींपैकी अर्धा जरी काळा पैसा असेल तरी चांगलेच नाही का ?

गामा पैलवान 09/09/2017 - 19:00
मेल्या म्हशीला मणभर दूध : http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/my-friend-and-f... तर अर्धमेल्या म्हशीला वीस शेरांपर्यंत न्यायला हरकत नाही : http://www.lokmat.com/national/security-protection-sonia-gandhis-securit... -गा.पै.

एस 09/09/2017 - 19:53
माजी पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी ठपका ठेवला आहे. हे चांगले झाले. आधीचे पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खरोखरच चांगली पावले उचलली होती. परंतु त्यांचा हा पवित्रा खुपणाऱ्या लॉबीने दबाव आणून त्यांची उचलबांगडी करवली होती. त्यांच्यानंतर आलेल्या नटराजन यांनी तर भ्रष्टाचाराचा धडाका लावला होता अशी कुजबूज बरीच ऐकू येत होती. त्यांना त्याचे योग्य फळ मिळेल अशी आशा.

In reply to by एस

arunjoshi123 11/09/2017 - 17:01
पतिकेंद्रित आयुष्य जगत असल्यामुळे स्त्रीवादी लोकांचा स्वाती यांस विरोध असेल काय? =================== स्त्रीचं आयुष्य पतीशी केंद्रित नसावं असा स्त्रीवादी सुर अनेकदा ऐकला आहे. स्वाती महाडिक यांनी पतीचे काम पुढे चालू ठेवणे, इ इ आपल्या प्रेरणेचे स्रोत सांगीतले आहेत.

तेजस आठवले 09/09/2017 - 20:13
१. ५०० आणि १००० च्या जवळजवळ ९९% नोटा परत आल्या आहेत याचा अर्थ ज्या लोकांच्याकडे काळा पैसा होता व त्यांनी बँकिंग सिस्टिम मध्ये परत आणला आहे. (आता भाजप चे प्रवक्ते असे म्हणतात कि काळा पैसा बँकिंग सिस्टिम मध्ये आला म्हणून तो पांढरा होत नाही IT वाले त्यांची चौकशी करणार आहेत, पण आपण एक गोष्ट लक्ष्यात घयायला हवी कि हेच भाजप चे प्रवक्ते आधी ३ ते ४ लाख कोटी रुपये बँकेत परत येणार नाहीत असे अंदाज वर्तवित होते, आता काय झालं त्या अंदाजच ? हे अपयश नाही का? म्हणजे काळ्या पैशे वाल्यानी सरकारचा पहिला आणि मोठा अडथळा मोडून काढला.
पण हा अंदाज जर चुकला तर त्यात वाईट काय आहे ? अंदाज चुकला हे अपयश कसे ? दडवून ठेवलेला काळा पैसा उजेडात आला, परत बँकेत जमा झाला आणि जर सगळ्याच लोकांना वापरायला मिळाला तर त्यात चुकीचे काय आहे? आणि राहिलेल्या १% नोटा जर परत सिस्टिम मध्ये आल्या नाहीयेत ह्याचा अर्थ ज्यांनी काळा पैसा रोखीत ठेवलेला होता ते पकडले जाण्याच्या भीतीने तो बाहेर काढत नाहीयेत आणि त्यावर त्यांनी पाणी सोडले आहे असा होऊ शकत नाही का ? अजून एक महत्वाची गोष्ट, बनावट नोटा ज्याकोणाकडे असतील(कळत/नकळत) ते त्या बँकेत भरायला जाणारच नाहीत / गेले तर पकडले जातील की नाही? त्यामुळे नोटाबंदीमुळे ज्या ५००/१००० च्या नोटा बनावट होत्या त्या आता अवैध झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा गैरवापर आता होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती नाही का ?
बरं आता ह्या IT डिपार्टमेंट कडे ह्या लाखो संशयास्पद लोकांचं चौकशी करण्याचं मनुष्यबळ आहे का ? लाखो केसेस उभ्या करण्याचे आणि सोडवण्याचे अधिकार आणि ताकत आहे का ?)
हा एक वेगळा मुद्दा आहे. मनुष्यबळ असणे/ नसणे, ते कुशल/अकुशल असणे ह्याचा नोटाबंदीशी काहीही संबंध नाही. तश्यापण भारतात सगळ्याच क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही. पोलीस आणि न्यायालये अपुरी आहेत म्हणून काय गुन्हेच दाखल करू नयेत की काय? लागतील तेव्हा लागतील निकाल.
६. म्हणजे digitization, cash less economy, आधार कार्ड संलग्नता, लोकांची बँक अकाउंट ह्या गोष्टी होणे अत्यंत महत्वाच्या आहेत पण यासाठी नोटबंदी ची अजिबात आवश्यकता नाही , जगातील अनेक देशांनी ह्या गोष्टी नोटबंदी सारखा निर्णय न घेता केलेला आहे.
भारतात रोख रकमेचे प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यामुळे रोख स्वरूपात पैसा कुठे कुठे फिरतो हे शोधून काढणे अवघड आहे. आपल्याकडे काही महाभाग असेही आहेत त्यांच्या नावावर २ पेक्षा जास्त पॅनकार्ड आहेत आणि त्यांनी त्या नावे व्यवहार केले आहेत. ह्याशिवाय बेनामी संपत्ती आहेच की. मेलेल्या व्यक्तीच्या नवे वर्षानुवर्षे पेन्शन जमा होत असल्याच्या केसेस आहेतच की.घरगुती वापराचे गॅस सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी वापरले जायचे की नाही? त्यामुळे आता गॅस बुक करताना पण KYC सक्तीची झाली.कुठून तरी सुरुवात व्हायलाच हवी की नाही?
७. बँकेत जमा झालेला ४-५ लाख कोटींचा पैसा हा संशयास्पद आहे, यातील बहुतांश पैसा काळा पैसा म्हणून उघड होणार आहे.(असे झाले तर चांगलंच आहे पण असे होणे खूप अवघड आहे. याच कारण हा प्रचंड पैसा खोटा आहे हे सरकार ला सिध्द करायचं आहे ह्या लोकांना न्हवे,
हे कसे काय बुआ ? माझ्या अकाउंट मध्ये भरलेला पैसा कुठून आला ते सरकार मलाच विचारणार ना? मी वैध स्रोत दाखवू शकलो नाही तर तो पैसा काळा पैसाच की. माझ्या जवळच्या नात्यातला एक माणूस वाहने खरेदी विक्री क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांच्या शोरूम मध्ये १५-१५ लाख कॅश देऊन गाड्या विकत घेणारी माणसे येत असत. (आता येतात की नाही ते माहित नाही). नोटबंदी आणि इतर उपायांमुळे आता अश्या स्वरूपाचे व्यवहार होण्याचे प्रमाण कमी होईल की नाही तुम्हीच सांगा. ज्यांच्या कडे काळे पैसे आहेत त्यांनी ते रोखीत न ठेवता मालमत्ता,जमीन, उद्योग, कंपन्या, सोने इ. स्वरूपात दडवून ठेवलेले आहेत त्यामुळे ही नोटबंदी फेल गेली असे म्हणणार्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्यांना बेहिशोबी संपत्ती निर्माण करायचीच आहे ते त्यासाठी काहीही करतील.भ्रष्टाचार करणारा कसाही करू शकेल.पैशांची लाच देता/घेता येत नसेल तर धान्य देईल, सोने देईल, गुपचूप एखादे दुसरे काम करून दिले जाईल. ह्या लोकांना संपत्ती इतकी प्रिय असते कि त्यासाठी पोटच्या अपत्यांचाही ही लोक व्यवहार करतील. पण म्हणून काहीच प्रयत्न करू नयेत का ?
भविष्यात जरी नोटबंदीचे फायदे होणार असतील तरी आत्ता झालेले नुकसान खूप आहे ते भविष्यातील फायद्यातून भरून निघणार नाही.
हे जरा समजावून सांगा.माझ्या मते कोणीच ह्याचे सर्वाना पटेल असे उत्तर देऊ शकत नाही.

In reply to by तेजस आठवले

सुबोध खरे 09/09/2017 - 20:40
असं कसं? असं कसं? एकदा ठरलंय ना डिमॉनेटायझेशन फेल गेलंय? मग परत परत शिळ्या कढीला ऊत का आणताय? एक फायदा नक्की झालाय यामुळे. सामान्य लोकांना जी डी पी, रोकडरहित अर्थव्यवस्था, आपली गंगाजळी इ बद्दल थोडं फार ज्ञानही झालं. एवढंच नव्हे तर बरेच "असामान्य" लोक एकदम अर्थतज्ज्ञ झाले आहेत आणि डिमॉनेटायझेशन फेल का झालं याबाबत माझं आणि रघुरामन राजन किंवा डॉ मनमोहन सिंह / अमर्त्य सेन यांचे एकमत कसं आहे याबद्दल व्याख्यानेही देऊ लागले आहेत.

In reply to by तेजस आठवले

अमितदादा 09/09/2017 - 21:19
पण हा अंदाज जर चुकला तर त्यात वाईट काय आहे ? अंदाज चुकला हे अपयश कसे ? दडवून ठेवलेला काळा पैसा उजेडात आला, परत बँकेत जमा झाला आणि जर सगळ्याच लोकांना वापरायला मिळाला तर त्यात चुकीचे काय आहे? आणि राहिलेल्या १% नोटा जर परत सिस्टिम मध्ये आल्या नाहीयेत ह्याचा अर्थ ज्यांनी काळा पैसा रोखीत ठेवलेला होता ते पकडले जाण्याच्या भीतीने तो बाहेर काढत नाहीयेत आणि त्यावर त्यांनी पाणी सोडले आहे असा होऊ शकत नाही का ?
मुळात मूळ प्रतिसादात एक गोष्ट लिहायची राहून गेली, कि ३-४ लाख कोटींचा काळा पैसा कॅश मध्ये आहे हे आधीच गृहीतक आणि आता तो पैसा बँकेत आला आहे हे दोन्ही गृहीतक (काळा पैसा बँकेत आला हे सत्य आहे परंतु त्याचा आकडा किती हे विवादित आहे ) आकड्याबाबत चुकीची आहेत, याबाबत सरकार ची किंवा RBI ची कोणतीही आकडेवारी उपलब्द नाही . लेख क्रमांक एक किंवा दोन वाचा त्यात लिहलंय कि काळा पैसा कॅश च्या स्वरूपात फक्त १०-१५ % आहे काळ धन हे जमीन, स्थावर मालमत्ता आणि सोने ह्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात आहे (हे आपल्यालाही माहित आहे ), त्यामुळे काळा पक्षाच्या स्वरूपातील लढाईसाठी जालीम उपाय म्हणून नोटबंदी आणली गेली तो मूळ उद्देशच चुकीच्या आकड्यावर अवलंबून होता. लक्ष्यात घ्या काळा पैसा बँकेत येणारच नाही हे गृहीतक होत ज्याच्यावर हा निर्णय घेतला होता, जर हे गृहीतक /अंदाज मोठ्या प्रमाणात चुकला तर हा निर्णय अयशस्वी ना. आता बँकेत आलेला काळा पैसा आम्ही शोधून काढू हे नंतरच शहाणपण आहे हे लक्ष्यात घ्या.
हे जरा समजावून सांगा.माझ्या मते कोणीच ह्याचे सर्वाना पटेल असे उत्तर देऊ शकत नाही.
हे वाक्य लिहंण्यामागचा उद्देश. समजा सरकार ने बँकेत जमा झालेला सगळा काळा पैसा जप्त केला (हे तुम्हाला आणि आम्हाला भविष्यात दिसूनच येईल) तरीही जेवढा फायदा सरकार ला होईल त्यापेक्षा जास्त तोटा आता झाला आहे, वेस्ट manhours, गेलेल्या नोकऱ्या, घटलेली GDP, शेती आणि असंघटित क्षेत्राची झालेली हानी.
अजून एक महत्वाची गोष्ट, बनावट नोटा ज्याकोणाकडे असतील(कळत/नकळत) ते त्या बँकेत भरायला जाणारच नाहीत / गेले तर पकडले जातील की नाही? त्यामुळे नोटाबंदीमुळे ज्या ५००/१००० च्या नोटा बनावट होत्या त्या आता अवैध झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा गैरवापर आता होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती नाही का ?
Fake notes amounting to Rs28 crore recovered till September: Kiren Rijiju चुकीचा समज. लोकांनी खोट्या नोटा छापून घरात ठेवलेल्या काय ? सरकार ने स्वतः सांगितलेलं कि खोट्या नोटा अर्थव्यवस्थेत फिरतायत. तसेच सामान्य लोकांना सुद्धा माहिती न्हाई कि नोटा खोट्या आहेत कि खऱ्या, त्या बँकेत आल्यानंतर च त्याची बहुतांश लोकांना खबर लागते कि नोटा खोट्या आहेत म्हणून. बरं वर दिलेली बातमी वाचा नोटबंदीच्या आधीची आहे, दरवर्षी ५० करोड हि न्हवत खोट्या नोटांचं प्रमाण. मग खोट्या नोटा निकालात काढणं कसं असू शकत नोटबंदी सारख्या क्लिष्ट आणि तापदायी प्रक्रियेचं उद्दिष्ट ? काश्मीर मधले हल्ले थांबले काय ?
भारतात रोख रकमेचे प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यामुळे रोख स्वरूपात पैसा कुठे कुठे फिरतो हे शोधून काढणे अवघड आहे. आपल्याकडे काही महाभाग असेही आहेत त्यांच्या नावावर २ पेक्षा जास्त पॅनकार्ड आहेत आणि त्यांनी त्या नावे व्यवहार केले आहेत. ह्याशिवाय बेनामी संपत्ती आहेच की. मेलेल्या व्यक्तीच्या नवे वर्षानुवर्षे पेन्शन जमा होत असल्याच्या केसेस आहेतच की.घरगुती वापराचे गॅस सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी वापरले जायचे की नाही? त्यामुळे आता गॅस बुक करताना पण KYC सक्तीची झाली.कुठून तरी सुरुवात व्हायलाच हवी की नाही?
हेच सांगतोय ह्या कारणासाठी नोटबंदी करायची आवश्यकता नाही. तुम्हाला यासाठी नोटबंदी हवी होती काय ?
माझ्या जवळच्या नात्यातला एक माणूस वाहने खरेदी विक्री क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांच्या शोरूम मध्ये १५-१५ लाख कॅश देऊन गाड्या विकत घेणारी माणसे येत असत. (आता येतात की नाही ते माहित नाही). नोटबंदी आणि इतर उपायांमुळे आता अश्या स्वरूपाचे व्यवहार होण्याचे प्रमाण कमी होईल की नाही तुम्हीच सांगा
अत्यंत नगण्य प्रमाणात कमी होईल. एक उदाहरण आता कर्नाटक मध्ये एका काँग्रेस च्या आमदारावर IT विभागाने छापे टाकून २०-४० कोटी काळे रुपये रोख पकडले, म्हणजे थोडक्यात काय ह्या आमदाराने त्याचा काळा पैसा बदलून नवीन नोटा मध्ये साठवला होता ना, मग का नाही हा सापडला आधी ? का हा राज्यसभेच्या निवडणुकी वेळीच सापडला ? भविष्यात तुम्हाला आणि आम्हाला दिसेलच कि किती काळा पैसा बाहेर आला ते.
ज्यांच्या कडे काळे पैसे आहेत त्यांनी ते रोखीत न ठेवता मालमत्ता,जमीन, उद्योग, कंपन्या, सोने इ. स्वरूपात दडवून ठेवलेले आहेत त्यामुळे ही नोटबंदी फेल गेली असे म्हणणार्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्यांना बेहिशोबी संपत्ती निर्माण करायचीच आहे ते त्यासाठी काहीही करतील.
अगदी अगदी आमचं सुद्धा हेच म्हणणं आहे. कि नोटबंदी हा काळ्या धनावरचा जालीम उपाय म्हणून सामान्य लोकांवर लादणारयांना एव्हडी गोष्ट लक्ष्यात अली नाही कि यातून काळे धन बाहेर निघेल याची कोणतीही गॅरंटी नाही पंरतु अर्थव्यवस्थेस किंवा प्रामाणिक लोकांना आपण फार मोठं नुकसान पोहचवू शकतो म्हणून. @गामा पैलवान अर्थव्यवस्थेतील साधे तत्व आहे कि निर्णय असा घ्यावा कि ज्याने फायदा होईल. इथे होणारे फायदे आणि तोटे यांचे गणित काढल्यास अर्थव्यवस्थेस झालेलं मोठं नुकसान दिसून येईल.

In reply to by अमितदादा

arunjoshi123 11/09/2017 - 18:08
लक्ष्यात घ्या काळा पैसा बँकेत येणारच नाही हे गृहीतक होत ज्याच्यावर हा निर्णय घेतला होता, जर हे गृहीतक /अंदाज मोठ्या प्रमाणात चुकला तर हा निर्णय अयशस्वी ना.
अंदाज चुकला हे १००% बरोबर आहे. याबद्दल खाली* मात्र निर्णय चुकला हे कसं? साध्य काय होतं? काळा पैसा नष्ट करणे. ते साध्य झालं का? तर हो. ============================================ सरकारचा अंदाज चुकला आणि वाईड मार्जिनने चुकला. लोकांना "झाकल्या मुठितली प्रतिष्ठा" आणि पैसा यांतील काय अधिक प्रिय असेल याबद्दलचा सरकारचा अंदाज चुकला. http://economictimes.indiatimes.com/wealth/tax/demonetisation-row-penalties-prosecution-that-tax-department-can-slap-on-black-money-holders/articleshow/55349571.cms इथे पाहता येईल कि आयकराबाबत पेनाल्टी कराच्या अर्धी असेल. म्हणजे १०० रु मधून एरवी ० रु द्यावे लागतात (काळापैसा), कायद्याने ३३ द्यावे लागतात, आणि नोटबंदीच्या इमर्जन्सीमुळे ५० द्यावे लागतात. मग उरलेल्या ५० वर पाणि का फेरायचं? त्याला एकच कारण असू शकतं ते म्हणजे पब्लिकली प्रतिष्ठा न जाणे. त्याची फार चाड नसेल तर प्रश्न येत नाही. ========================= आज भारताचं सबंध सिविल इंजिनिअरिंग क्षेत्र (सरकारी) ठप्प आहे. का? "तुम्ही" अगोदर व्हॅट नाही भरायचे? मिनिमम वेज नाही द्यायचे? इन्कम टॅक्स नाही द्यायचे? मग फरक काय आहे? याचं उत्तर असं आहे कि काळा पैसा वापरून चालवत असलेला धंदा पांढरा पैसा करून तसाच चालवता येत नाही. त्याची सगळी गणितं गडगडतात. वेफर थिन मार्जिन्स आणि ह्यूज बार्गेनिंग असतं त्याकरिता पण.

In reply to by तेजस आठवले

अमितदादा 09/09/2017 - 21:28
आणि राहिलेल्या १% नोटा जर परत सिस्टिम मध्ये आल्या नाहीयेत ह्याचा अर्थ ज्यांनी काळा पैसा रोखीत ठेवलेला होता ते पकडले जाण्याच्या भीतीने तो बाहेर काढत नाहीयेत आणि त्यावर त्यांनी पाणी सोडले आहे असा होऊ शकत नाही का ?
हे बरोबर नाहीये. उरलेली १ % सगळी लोक काळे पैसेवाली नाहीत, अनेक परदेशी भारतीय लोक ज्यांना २५ हजारपर्यंतची रक्कम कायदेशीर रित्या भारताबाहेर नेता येते त्यांना पैसा बदलता आला नाही (भारतात आल्यावर टॅक्सी हॉटेल इत्यादी साठी उपयोगी पडते) , अनेक दुर्गम भागात राहणारी लोक त्यांना पैसा बदलता आला नाही, नेपाळ आणि भूतान मध्ये असणारा भारतीय पैसा बदला गेला नाही (जालावर याची पूर्ण माहिती आहे ).

In reply to by अमितदादा

ट्रेड मार्क 09/09/2017 - 22:07
सगळ्यात एक मुद्दा सोयीस्करपणे विसरला जातोय की फक्त नोटबंदी हे एकच पाऊल सगळ्या समस्या सोडवणार नाहीये हे सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं. हे बाकी अनेक पावलांपैकी एक पाऊल आहे. तसंही नोटबंदी "असफल" व्हावी म्हणून प्रयत्न करणारे लोक सफल व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या लोकांपेक्षा बरेच जास्त होते आणि आहेत. स्वतःच्या थोड्या फायद्यासाठी किती लोकांनी काळाबाजारवाल्यांच्या नोटा लायनीत परत परत उभं राहून बदलून दिल्या? काही बँकेतल्या लोकांनी आणि काही सीए मंडळींनी या लोकांना कशी मदत केली? हे होऊ नये म्हणून तिथेच असणाऱ्या इतर लोकांनी काय केलं? जिथे लोकांचीच सुधारायची इच्छा नाहीये किंवा इच्छा असून "मी कशाला प्रयत्न करू, करेल दुसरं कोणीतरी" अशी वृत्ती असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी काही होणार नाही. नोटबंदीमुळे काही उद्योग बंद कसे पडले हे मात्र मला कळलं नाही. ते कायदेशीर उद्योग नव्हते का? जर कायदेशीर होते तर त्यांची बँकेत खाती नव्हती का? बँकांनी खाती उघडायला नकार दिला होता का? जरी तिथे काम करणाऱ्या लोकांची खाती आधी नव्हती म्हणलं तरी नंतर उघडायला काय अडचण होती? व्यवहार करीन तर रोखीनेच नाहीतर करणार नाही असे काही तत्व होते का?

In reply to by ट्रेड मार्क

तेजस आठवले 09/09/2017 - 22:20
हो. मी पण माझ्या प्रतिसादात असेच सांगायचं प्रयत्न करतोय की कुठून तरी सुरवात केली गेली आहे. पावत्या द्यायचा आग्रह मी पण पूर्वी धरत नसे पण आता शक्यतो सगळीकडे पावती मागतो. व्यापारी लोक सुद्धा पावत्या द्यायला काकु करत असत किंवा सरळ नकार देत असत. नोटाच दुर्मिळ झाल्यावर सगळ्यांनाच पांढरे व्यवहार करणे भाग पडतंय. मी सुद्धा पूर्वी ज्या गोष्टी रोखीने करत असे त्या आता रोखीने करत नाही (वीज/फोन ची बिले भरणे, ऑनलाईन गॅस बुक करणे इ.)

In reply to by ट्रेड मार्क

अमितदादा 09/09/2017 - 22:28
नोटबंदीमुळे काही उद्योग बंद कसे पडले हे मात्र मला कळलं नाही. ते कायदेशीर उद्योग नव्हते का? जर कायदेशीर होते तर त्यांची बँकेत खाती नव्हती का? बँकांनी खाती उघडायला नकार दिला होता का? जरी तिथे काम करणाऱ्या लोकांची खाती आधी नव्हती म्हणलं तरी नंतर उघडायला काय अडचण होती? व्यवहार करीन तर रोखीनेच नाहीतर करणार नाही असे काही तत्व होते का?
ट्रेडमार्क साहेब आपल्यास माहित असेलच कि ग्रामीण भागात शेती व्यवहार हे ९०%टक्के रोखीत च होतात ते. जेंव्हा अर्थव्यवस्थेतील पैसा काढून घेण्यात आला त्याचा शेतीच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला, कोणताही दुष्काळ नसताना शेत मालाचे भाव कसे पडले हे काही तज्ज्ञांनी दाखवून दिल आहे, यातूनच पुढं शेती कर्ज माफीला बळ मिळालं. कन्स्ट्रक्शन तसेच इतर असंघटित क्षेत्र जे पूर्ण रोखीवर अवलंबून होत ते एकाचवेळी ठप्प झाले (मी जालावरच्या अनेक बातम्या काडून इथे चिटकवू शकतो). व्यवहार हे रोखीने कमी व्हायला हवे मान्य परंतु हा बदल एका क्षणात नाही घडू शकत आणि असे करायला गेल्यास मोठा तोटा होऊ शकतो, जे इथे दिसून येते.
जिथे लोकांचीच सुधारायची इच्छा नाहीये किंवा इच्छा असून "मी कशाला प्रयत्न करू, करेल दुसरं कोणीतरी" अशी वृत्ती असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी काही होणार नाही.
याबाबत दुमत नाही, म्हणूनच कोणताही निर्णय घेताना प्रामाणिक लोकांना नुकसान होणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे, जर प्रामाणिक लोकांचं नुकसान होणार असेल आणि अप्रामाणिक लोकांना काही होणार नसेल किंवा कमी प्रमाणात नुकसान होणार असेल तर हे चुकीचे आहे.
सगळ्यात एक मुद्दा सोयीस्करपणे विसरला जातोय की फक्त नोटबंदी हे एकच पाऊल सगळ्या समस्या सोडवणार नाहीये हे सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं.
सरकारचा टोन आत्ता बदलाय, हे चूक समजल्यानंतर च शहाणपण आहे. मोदींची जुनी भाषणं पहा ते म्हणाले होते मला ५० दिवस द्या आणि मी चुकलो कि मला हवी ती शिक्षा द्या. त्यावेळी सरकारने हा निर्णय "हर एक दुःख एक हि दवा " म्हणून प्रेसेंट केलेला. हा निर्णय घेतला तेंव्हा मला हि वाटलं होत कि काही तरी क्रांतिकारी बदल घडेल परंतु हळूहळू यातील फोलपणा लक्ष्यात आला. मी काही तज्ञ् नाही, परंतु आता आलेल्या आकडेवारी नुसार आणि तज्ज्ञांच्या लेखानुसार माझे मत बदलले आहे, खरी वस्तूथिती दिसत आहे. नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही, माझे असे म्हणणे आहे कि जे फायदे सांगितले जातायत त्यासाठी नोटबंदी करायची आवश्यकता न्हवती आणि नोटबंदीचे मूळ उद्देश असफल झालेत.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 09/09/2017 - 22:58
कोणताही दुष्काळ नसताना शेत मालाचे भाव कसे पडले हे काही तज्ज्ञांनी दाखवून दिल आहे याच्याशी नोटाबंदीचा संबंध नाही. भूतकाळात नोटाबंदी नसतानाही व दुष्काळही नसताना अनेकदा भाव पडलेले आहेत. भाव कमीजास्त होण्याचा संबंध फक्त मागणी व पुरवठा यांच्याशीच असतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला की भाव पडतातच.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा 09/09/2017 - 23:22
भाव कमीजास्त होण्याचा संबंध फक्त मागणी व पुरवठा यांच्याशीच असतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला की भाव पडतातच.
अगदी बरोबर. मुळात नोटबंदी च्या काळात बाजारातील पैसा काढून घेतल्यामुळे ग्राहकांना आपल्या दैनंदिन गरजावरती नियंत्रण आणावं लागलं विशेतः रोखीने होणाऱ्या व्यहवारावरती, व्यापाऱ्यांनी आपली खरेदी थंडावली यातून कृत्रिमरीत्या मागणी कमी झाली पुरवठा मात्र तेवढाच राहिला यातून भाव पडले. विदर्भात व्यापाऱ्यांनी बहुतेक कापूस हमीभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्याची उदाहराणे आहेत. माझ्या कुटुंबास आलेला अनुभव: नोटबंदीच्या काळात सोयाबीन विकण्यास काढलेलं होत, व्यापाऱ्यांनी भाव पडून सांगितला, कारण बाजारात पैसेच नाहीत. आमच्या कुटुंबाने विकले नाही हि गोष्ट वेगळी परंतु फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना पर्याय न्हवता. बरं नोटबंदी चा परिणाम नाही तर गेल्यावर्षी दुष्काळ न पडता विविध राज्यातील शेतकरी एकाचवेळी कर्जमाफी साठी का मागे लागलेत? त्यांच्यातील सुप्त मागणीला कशामुळे बळ मिळाले. मला सध्या नोटबंदी आणि शेतमालाच्या घसरलेल्या किंमती यावर आकडेवारी सहित प्रसिद्ध झालेला इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता मधील लेख सापडत नाही सापडल्यास चिटकवतो इथे. तोपर्यंत कुणाला सापडल्यास कृपया इथे चिटकवावा.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 09/09/2017 - 23:29
मुळात नोटबंदी च्या काळात बाजारातील पैसा काढून घेतल्यामुळे ग्राहकांना आपल्या दैनंदिन गरजावरती नियंत्रण आणावं लागलं विशेतः रोखीने होणाऱ्या व्यहवारावरती म्हणजे नोटाबंदीच्या काळात लोकांनी खाणंपिणं कमी केलं होतं आणि ते अर्धपोटी रहात होते?

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 09/09/2017 - 23:33
बरं नोटबंदी चा परिणाम नाही तर गेल्यावर्षी दुष्काळ न पडता विविध राज्यातील शेतकरी एकाचवेळी कर्जमाफी साठी का मागे लागलेत? त्यांच्यातील सुप्त मागणीला कशामुळे बळ मिळाले. शेतकरी कायमच कर्जमाफी मागतात व पुढेही मागत राहतील. कर्जमाफीच्या मागणीचा व नोटाबंदीचा संबंध नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा 09/09/2017 - 23:47
The crops of wrath वरील लेख वाचा मग नोटबंदी चा शेती मालाच्या भावाशी असलेला संबंध कळेल. अजून एक चांगला लेख आहे तो सापडल्यास देतो इथे. मुळात ग्राहकांनी नियंत्रण आणणे याचा अर्थ ते अर्धपोटी होते असे होत नाही आणि मी बोललेलो नाही, तुम्ही उगाच काहीही conclusion काढू नका ते तुम्हाला शोभत नाही, चर्चेत रस नसेल तर बाजूला व्हा. नोटबंदी मुळे कापड व्यवसायास तोटा झाला हे सर्वश्रुत आहे कारण कमी झालेली मागणी म्हणून लोक काय उघडी राहत होती का ? शेतकरी कर्जमाफीची मागणी दरवर्षी करत नाही, बर समजा जरी केली तर शासन ते मान्य करत नाही मग का अनेक राज्य सरकारांनी मागण्या मान्य केल्या कोणतीही आपत्ती नसताना याच कारण त्यांना माहित होत कि शेतकऱयांना फटका बसलेला आहे ते भलेही ते मान्य न करोत.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 10/09/2017 - 15:21
नोटबंदीच्या काळात ग्राहकांनी नियंत्रण आणले याचा अर्थ नक्की काय होतो? कोणताही ग्राहक अन्नधान्यावरील खर्च कमी करणार नाही. तशीच वेळ आली तर वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. वस्तूंची खरेदी पुढे ढकलेल. या वस्तूंच्या विक्रीत घट झाल्यास त्याचा परीणाम शेतकर्‍यांवर कसा होईल कारण शेतकर्‍यांची उत्पादने वेगळी आहेत. वरील संपूर्ण लेखात टोमॅटो, कांदे, बटाटे इ. चे भाव कमी झाले याचा उहापोह आहे व त्याचा संबंध निश्चलीकरणाशी जोडला आहे. या उत्पादनांच्या २०१६ मधील भावाची तुलना २०१५ मधील भावाशी केली आहे. परंतु मागणी-पुरवठा या तत्वावरच भावात चढउतार होते याचा लेखकाने उल्लेख केलेला नाही. २ वेगवेगळ्या वर्षातील किंमतीची तुलना करताना दोन्ही वर्षातील भाव, मागणी व पुरवठा या तिन्हीची आकडेवारी दिली तरच ती तुलना वस्तुनिष्ठ होते. या दोन वर्षात वरील उत्पादनांचे एकूण उत्पादन किती झाले याची आकडेवारी दिलीच नाही. ती दिली असती तर नक्कीच लक्षात आले असते की २०१५ च्य तुलनेत २०१६ मध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने आपोआपच भाव घसरले. याबाबतीत तूर व इतर डाळींचे उदाहरण बोलके आहे. २०१५ मध्ये दुष्काळामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाल्यामुळे पुरवठा कमी होऊन भाव खूप वाढले होते. परंतु २०१६ मध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डाळींच्या भावात घट झाली. हेच तत्व भाजीपाला, फळे किंवा इतर कोणत्याही उत्पादनाला लागू होते. धान्य वगळता बराचसा शेतमाल नाशवंत असल्याने हे त्यात हे चढउतार खूपच मोठे असतात. बाकी कर्जमाफीचं म्हणाल तर शेतकरी कायमच कर्जमाफी मागतात, परंतु सत्ताधारी दरवर्षी ही मागणी मान्य न करता राजकीय सोय बघूनच तो निर्णय घेतात. हे निर्णय फक्त राजकीयच असतात. शेतकर्‍यांना फटका बसला आहे, दुष्काळ इ. कारणे त्यासाठी विचारात घेतली जात नाहीत. २००८ ची कर्जमाफी २००९ ची निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून झाली होती. २०१७ मधील उ. प्र. मधील कर्जमाफीमागे विधानसभा निवडणुक हे कारण होते. उत्तर प्रदेशात भाजपला सत्ता मिळाल्याने व सत्ता मिळाल्यावर तिथे लगेचच कर्जमाफीचा निर्णय केल्याने, महाराष्ट्राला कर्जमाफी नाकारण्यासाठी कोणतेही सबळ कारण उरले नव्हते. त्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. निश्चलीकरणामुळे शेतकर्‍यांना फटका बसला आणि म्हणून कर्जमाफी केली हा दावा असत्य आहे. उत्तर प्रदेशाने कर्जमाफी केली नसती तर ती महाराष्ट्रातही झाली नसती.

In reply to by अमितदादा

पिजा 11/09/2017 - 19:56
श्रीगुरुजी म्हणतात तसं तुम्ही शेअर केलेल्या हरीश दामोदरण यांच्या लेखात मागच्या वर्षीच्या उत्पादनाचे आकडे नाहीत. ते ह्या लेखात मिळतील. लेख वाचल्यास हेच दिसून येतं की भाव हे उत्पादन वाढ आणि आयातीवर जे निर्बंध घालण्यात सरकारने दाखवलेली अनास्था यामुळे घसरले, त्यात नोटबंदीचा फारसा हात नाही. पण सरकारी अनास्था हाच मोठा गंभीर मुद्दा आहे (तो यावर्षी सरकारने करेक्ट केल्याच्या बातम्या आहेत). आधीच भाव गडगडलेले त्यात नोटबंदीमुळे व्यवहार ठप्प, त्यामुळे खरंतर लोक वैतागलेले होते. तो वैताग यावर्षी online विमा आणि कर्जमाफीचे अर्ज भरताना अजून वाढलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा 10/09/2017 - 01:36
Modi’s DeMo Gambit Failed: Costs Exceed Gains And Farm Anger Is The Final Piece Of Evidence गुरुजी स्वराज ह्या मासिकामध्ये आलेला आणखी एक लेख वाचा हि विनंती आणि नंतर आपले मत बनवा. पूर्ण लेख नसेल वाचायचा तर खालील मुद्दे वाचा. त्या लेखातील काही मुद्दे १. It is time for a mea culpa on demonetisation. This writer has been largely positive on the medium-to-long-term benefits of notebandi, as opposed to its short-term downsides, including a fall in gross domestic product (GDP) growth rates for one or two quarters. Now, and especially after the farmer agitations for loan waivers, I believe that the negative side of the ledger on demonetisation (DeMo) is larger than the positive. It has failed. २. The bottom line on DeMo, seven months after Modi announced that he was withdrawing the legal tender status of Rs 500 and Rs 1,000 notes from 8 November, is that the costs are outweighing the benefits. And the rising demand for fiscally ruinous farm loan waivers surely has a direct link to DeMo. Maybe loan waivers would have happened anyway in the run-up to 2019, but it is equally clear that DeMo has emptied many mandis of cash, and the demand for ready harvested crops has collapsed in many parts of the country, as Harish Damodaran notes in his column in The Indian Express. ३. Even if we assume that only half the waivers are directly due to the DeMo impact, we are talking of a tripling of the figure first put out by CMIE – at the very least, with most costs yet to show up. This means the DeMo damage could be in the region of Rs 3.5-4 lakh crore at the minimum. Since the wildest estimate of gains from black money not coming back to the banking system do not exceed this latest ballpark estimate of loss, it is clear why DeMo has failed its cost-benefits test.

In reply to by अमितदादा

arunjoshi123 11/09/2017 - 18:19
ग्रामीण भागात शेती व्यवहार हे ९०%टक्के रोखीत च होतात.
जन धन खातं खोलावं नि व्यवहार रोखीत टाळावेत. शेतकरी झाले म्हणून काय झालं? त्यांना देखिल झटका देणं आवश्यक आहे.

In reply to by अमितदादा

ट्रेड मार्क 12/09/2017 - 02:21
ग्रामीण भागात शेती व्यवहार हे ९०%टक्के रोखीत च होतात जनधन खात्यांचा आग्रह धरून आता बराच काळ लोटला. सरकारने प्रयत्न करून आणि सोय उपलब्ध करून देऊनसुद्धा जर त्याचा फायदा लोक घेऊ शकत नसतील तर काय करावे? त्यापुढे जाऊनही, नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, प्रत्येक अडचणीत स्वतःची तुंबडी भरून घ्यायची वृत्ती कधी जाणार? शेतकऱ्यांचे बँक खाते नाही हे एकवेळ मानले तरी दलालांचे पण नव्हते? मला फारशी कल्पना नाही पण छोटे शेतकरी रोजच्या रोज असा किती हजारांचा माल विकतात? दलालांनी ही संधी समजून शेतकऱ्यांना नाडलेच ना? हा निर्णय घेतला तेंव्हा मला हि वाटलं होत कि काही तरी क्रांतिकारी बदल घडेल परंतु हळूहळू यातील फोलपणा लक्ष्यात आला. खरंच हे खेदाने म्हणावं लागतंय की नोटबंदी "सफल" व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्यांपेक्षा ती "असफल" कशी होईल हे बघणारे बरेच जास्त होते/ आहेत. असफल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये मुद्दामून करणारे होते तसेच अनावधानाने किंवा स्वतःच्या तात्कालिक फायद्यासाठी करणारे लोकही होते. साध्या १० लोकांच्या प्रोजेक्टमध्ये अगदी १ जरी मेम्बर प्रोजेक्ट सफल होऊ नये यासाठी प्रयत्न करणारा असेल आणि २/३ लोक चुकार असतील तर प्रोजेक्ट फेल होतो. इथे तर जवळपास १ कोटी लोकांचा प्रोजेक्ट होता. बदल घडवून आणायला सगळ्यांचा सपोर्ट आवश्यक असतो जो कदाचित कमी पडला. परंतु आता आलेल्या आकडेवारी नुसार आणि तज्ज्ञांच्या लेखानुसार माझे मत बदलले आहे आकडेवारीचं म्हणाल तर ती दोन्ही प्रकारे दाखवता येते. तज्ज्ञांचं म्हणाल तर नोटबंदी सफल आणि असफल दोन्ही म्हणणारे तज्ज्ञ आहेत. नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही, माझे असे म्हणणे आहे कि जे फायदे सांगितले जातायत त्यासाठी नोटबंदी करायची आवश्यकता न्हवती नोटबंदी कशी चांगल्या पद्धतीने राबवता आली असती याचा प्लॅन काही मिपाकर जानेवारी २०१७ च्या आधी देणार होते, तो काही अजून मिळाला नाही. तुम्ही पण सांगा काय उपाय करता आले असते ते. आणि हो जे सांगाल ते सर्वच्या सर्व लोकांना फायद्याचे आणि फुलप्रूफ असावे. म्हणजे एक प्लॅन द्यायचा, जो इतका फुलप्रूफ असेल की ज्याने फक्त सर्वच्या सर्व अप्रामाणिक भारतीयांना तास झाला पाहिजे पण एकाही प्रामाणिक भारतीयास त्रास व्हायला नको. तसेच प्लॅन/ नियम एकदा केले की परत बदलता येणार नाहीत. बोला कधी देताय.

In reply to by ट्रेड मार्क

नोटबंदी कशी चांगल्या पद्धतीने राबवता आली असती याचा प्लॅन काही मिपाकर जानेवारी २०१७ च्या आधी देणार होते, तो काही अजून मिळाला नाही. प्लॅन दिला होता की.

In reply to by ट्रेड मार्क

arunjoshi123 11/09/2017 - 17:32
नोटबंदीमुळे काही उद्योग बंद कसे पडले हे मात्र मला कळलं नाही.
सरकार असं उघड म्हणू शकत नाही, पण हे उद्योग बंद पाडणे हे एक उद्दिष्ट आहेच. ======================== असंघटित क्षेत्रनोटबंदिमुळं बंद पडलं असं म्हणणारे ते बंद पडायचा मेकॅनिझम्/कारण सांगत नाहित. नोटबंदीच्या दरम्यान जे व्यवसायाचे नुकसान झाले त्याच्या दशपट व्यवसायाच्या तेजिमंदिच्या लाटा ते नेहमी पाहत असतात. नेमके एका बार्कुश्या लाटेने कसे बंद पडले? बरं डिमांड तिथल्या तिथं आहे. मंजे बंद जरी पडले तरी पुन्हा दुसरे उभे राहिले पाहिजे होते.

In reply to by अमितदादा

arunjoshi123 11/09/2017 - 17:20
अमितदादा, भारतात काळा पैसा नव्हताच वाटतं. भारतीय लोकांना केवळ न्यूनगंड असावा कि आपले देशवासी अप्रामाणिक आहेत, भ्रष्ट आहेत आणि सगळं स्वच्छ चालत असावं. एन आर आय, नेपाळ आणि भूतानमधले पैसे धरून १००% पैसे पांढरे आहेत. कदाचित आर बी आय चे रेकॉर्ड्स (सरकारी असल्याने) चूक असावेत आणि लोकांकडे याच्यावर चार पैसे पांढरेच निघावेत. किंबहुना मला वाटतं ते तथाकथित काळे पैसे सरकारकडेच असावेत. उगाच लोकांवर शंका. पहा ना, चलनाचे आपण चार भाग करू - आर बी आय, बॅकिंग सिस्टिम, सरकार आणि लोक. यातले तिन भाग तर सिस्टिमचेच आहेत.

In reply to by तेजस आठवले

भंकस बाबा 10/09/2017 - 09:49
बनावट नोटा सिस्टीममध्ये आल्या नाहीत, हास्यस्पद बनावट नोटा बनवणं हे काय रॉकेट सायन्स आहे? दोन हजारच्या बनावट नोटा बाजारात फिरत आहेत, इतकी बेमालूम नक्कल आहे की सुशिक्षित माणूस फसेल, अगदी अशक्य आहे नक्कल मारणे हे ठोठो बोंबलून सांगत होते

In reply to by भंकस बाबा

arunjoshi123 11/09/2017 - 17:37
एकिकडे १. जुन्या बनावट नोटा सिस्टिममधून गेल्या नाहीत सिस्तिममधून नोटबंदीमुळे - कारण त्या नव्हत्याच, खूप कमी होत्या. बनवायला खूप वेळ होता तरी दुसरीकडे २. नव्या प्रचंड प्रमाणात बनावट नोटा बाजारात आहेत, सुशिक्षितांनाही फसवत. काही महिन्यांत. आणि तिसरीकडे ३. नोटबंदी फेल गेली आहे (या फ्रंटवर)

तेजस आठवले 09/09/2017 - 22:22
जिथे लोकांचीच सुधारायची इच्छा नाहीये किंवा इच्छा असून "मी कशाला प्रयत्न करू, करेल दुसरं कोणीतरी" अशी वृत्ती असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी काही होणार नाही.
हे सत्य आहे. बऱ्याच गोष्टी इथेच अडतात.

गामा पैलवान 09/09/2017 - 23:28
अमितदादा,
इथे होणारे फायदे आणि तोटे यांचे गणित काढल्यास अर्थव्यवस्थेस झालेलं मोठं नुकसान दिसून येईल.
शेतकऱ्यांचं नुकसान झालंय असं एकवेळ म्हणता येईल. पण पूर्ण अर्थव्यवस्थाच ठप्प झालीये असं नाही म्हणवंत. आ.न., -गा.पै.

बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, दुर्देवाने सरकारला हयात अपयश आल्याने नोटाबंदी नंतर झालेले अनुषंगिक फायद्याचेच ढोल पिटले जात आहेत. ह्यातील बरेचसे फायदे कायमस्वरूपी नाहीत (उदा: करसंकलन) किंवा नोटाबंदी न करताही ते करता आले असते. २००० हजाराच्या बनावट नोटा छापायचा उद्योग सुरू झाला आहे. भ्रष्टाचार बंद झालेला नाही, काळा पैसा निर्मिती परत चालू झाली आहे. आता राहिला प्रश्न दहशतवादाचा तो ही नष्ट झालेला नाही,मग नोटाबंदी यशस्वी झाली असं कसं म्हणता येईल? नोटाबंदी दरम्यान सामान्य जनतेची काहीही चूक नसताना आर्थिक नुकसान झाले, व अद्याप होत आहे. राज्यातील १२ जि.म.बँका अद्याप खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे देऊ शकत नाही. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळू शकत नाही. नोटाबंदी नंतर १० महिन्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. दीर्घकालीन तोटेही समोर आले पाहिजेत.

In reply to by मार्मिक गोडसे

मामाजी 10/09/2017 - 08:56
"२००० हजाराच्या बनावट नोटा छापायचा उद्योग सुरू झाला आहे. भ्रष्टाचार बंद झालेला नाही, काळा पैसा निर्मिती परत चालू झाली आहे. आता राहिला प्रश्न दहशतवादाचा तो ही नष्ट झालेला नाही,मग नोटाबंदी यशस्वी झाली असं कसं म्हणता येईल?" मी स्वच्छ धूतलेले कपडे वापरले ते परत मळले. माझी कपडे धूवायची मेहेनत अयशस्वी झाली? मी घरातले पंखे पुसले त्यावर परत धूळ जमा झाली. माझी धूळ पुसायची मेहनत अयशस्वी झाली? मी घासलेली भांडी वापरली ती परत खरकटी झाली. माझी भांडी घासायची मेहनत अयशस्वी झाली? चार पाच वर्षां पूर्वी मी घराला रंग लावला तो खराब झाला. माझा रंग लावण्यावर केलेला खर्च वाया गेला?

In reply to by मामाजी

चुकीची तुलना असली तरी नोटाबंदी हा जालीम इलाज नाही हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद! आता पुन्हा मळलेले कपडे, भांडी कधी धुणार?

In reply to by मामाजी

भंकस बाबा 10/09/2017 - 09:54
स्वच्छ धुवून कपडे वापरले, ते मळले, मेहनत बेकार झाली . अहो साहेब धुवायचा खर्च कपड्यापेक्षा जास्त झाला, आयला गिरा तो भी टांग उपर!

In reply to by भंकस बाबा

मामाजी 11/09/2017 - 07:20
भंकस बाबा, धन्यवाद प्रथम मी स्पष्ट शब्दात सांगतो की मी नोटाबंदि चा पूर्ण समर्थक आहे व माझ्या दृष्टीकोनातून ही चाल यशस्वी झालेली आहे. माझ्या मते “गिरा तो भी टांग उपर ही” ही अवस्था आपल्या सारख्यांची झाली आहे. नोटाबंदि यशस्वी झाली हे सत्य स्वीकाराता येत नसल्याने वेगवेगळे तर्क देउन ही अयशस्वी कशी झाली आहे हे सिद्ध करण्याची सध्या चढाओढ सुरू आहे. “अहो साहेब धुवायचा खर्च कपड्यापेक्षा जास्त झाला” ह्या वाक्यातून आपल्याला काय सूचित करायचे आहे ते मला समजले नाही. तेंव्हा कृपा करून थोड विस्तारानी समजाउन द्यावे ही आपणास विनंती. धन्यवाद.

????? विद्यार्थ्यांनो, पर्यावरणपूरक गणेश विसर्जनात सहभागी होऊ नका, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा पुण्यातील उच्च शिक्षण विभाग हिंदू जनजागृती समितीच्या सांगण्यावरुन काम करते काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पर्यावरणपूरक गणपती विसर्जनात सहभागी न होण्याचा फतवा काढल्याचं उघड झालं आहे. महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी असे आदेश उच्च शिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सोबत शिक्षण विभागाने महाविद्यालयांना मार्गदर्शनासाठी हिंदू जनजागृती समितीचं पत्रही जोडलं आहे.

In reply to by तुषार काळभोर

पैसा 10/09/2017 - 09:42
द ग्रेट मुंबई युनिव्हर्सिटीच्या एम ए सोशलॉजि पेपरमध्ये 72 मुलांना शून्य मार्क दिलेत. 80% मुले नापास डिक्लेअर केलीत. शेवट या विषयाचे मुलांचे पेपर गहाळ झाल्याचे कबुल केले म्हणे.

In reply to by जेम्स वांड

विशुमित 11/09/2017 - 16:31
दुसऱ्यांनी कोणी लिहण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा कृपया तुम्हाला "त्या" प्रकरणाबद्दल काय वाटले ते लिहा. ---------- समाज माध्यमामध्ये वावरताना एक समजले आहे की अशा गोष्टींची दखल घेतली तर खोलेंसारख्या कोत्या मनाच्या उच्चशिक्षित जातीवादी लोकांना नको तितके महत्त्व दिल्यासारखे होते. वरून ब्रिगेडी म्हणून शिक्का सुद्धा बसतो. दुटप्पी, फुरोगामी, सराजमशाही असेही सहज संबोधले जाते. पण होते काय की "आपला तो बाबा" असे वाटायला वाव मिळतो. प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाने प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असा बिलकुल अट्टाहास नाही आहे. अशी कोणाची सक्ती मी सुद्धा कधी मान्य करणार नाही. असो..!! ----------- समाजामध्ये अजून ही अशी मध्ययुगीन विचारसरणी असणारे लोक आहेत हे खूप कमी लोक मान्य करतात. विरोध व्यक्ति/जातीसाक्षेप नसून विचारसरणीला आहे. उदाहरण माझ्या घरातील देतो(सत्य कथन आहे). माझी सखी चुलत बहीण आणि तिचे संपूर्ण कुटुंब सनातन संस्थेचे पाईक आहेत. आमच्या भावजींनी तर चांगली अधिकारी दर्जाची सरकारी नोकरी धर्मकारणासाठी सोडून दिली आहे. मध्यंतरी पंढरपूर मधील पुजारी बदल्याप्रकरणी आणि परीक्षा घेऊन प्रशिक्षित ब्राह्मणेत्तर पुजारी नेमल्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया खूप बोलकी होती. 'पांडुरंगाची पूजा ही ब्राह्मणानेच केली पाहिजे. ब्राह्मणेत्तर पुजाऱ्यांकडून सोवळे पाळल्या न गेल्यामुळे पांडुरंग बाटला आहे' असे तिचे मत होते. वरून मला सल्ला पण देण्यात आला की दर्शन घेण्यासाठी जाऊ नकोस कारण तुला त्या दर्शनातून कोणतीच अध्यात्मिक अनुभूती मिळणार नाही. ---------- खोले बाईंच्या धार्मिक श्रद्धे बाबत मला आदर आहे पण त्यांनी प्रकरण एवढे ताणायची गरज नव्हती. आपला धर्म घराच्या भिंती आड झाकून, प्रश्न सोडवला असता तर बरे झाले असते. त्यामुळे असा विचार करणारे इतर बरेच जण नाहक जनतेसमोर आले. त्यात घर काम करण्यासाठी ब्राह्मण उरलेत तरी किती म्हणा. त्यांना एवढे समजायला हवे होते. हवामान खात्याचा अनुभव कामी येईला पाहिजे होता. जाऊ द्यात.. ---------

या धाग्यावरील प्रतिसाद वाचून एक लक्षात येते काँग्रेसच्या सत्ताकाळात अतिरेकी भ्रष्टाचार, सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आपल्या अल्पसंख्यांक व्होट बँकेचे लांगुलचालन इत्यांदीमुळे एका टोकाला गेलेला लंबक भाजपा समर्थक (यांना त्यांचे विरोधक भक्त म्हणतात) "आपल्या" सरकारचे समर्थन करताना दुसर्‍या टोकाला नेत आहेत. आधीच्या सरकारांनी समाजातील एका विशिष्ट घटकाची कायम उपेक्षा केल्याने तो समाज घटक आता "आपल्या" सरकारचे हिरिरीने समर्थन करत आहे.

In reply to by भंकस बाबा

जेम्स वांड 10/09/2017 - 13:00
हिंदूंना साईडलाईन केलं, हे जरी मला बऱ्यापैकी मान्य असलं तरी त्याकरता दुसरे टोक गाठणे मला मंजूर नाही. सत्य स्थिर असावं, त्यांचं सत्य भडकपणे रंगवलेलं खोटं होतं म्हणून आम्हीही तितकाच भडकपणा करणार हे मला तू गाढवाची लीद खाल्लीस तर मी हत्तीची खाणार पण खाणार लीदच इतकं विचित्र वाटतं

In reply to by भंकस बाबा

गामा पैलवान 10/09/2017 - 13:20
भंकस बाबा,
तटस्थ वृत्तीने राजकारणाकडे बघतो, पण आता जर आवाज नाही केला तर डोक्यावर मिरे वाटतील
वरील विधानात दोन गंभीर त्रुटी आहेत. १. उत्तरार्ध : आता आवाज केला नाही तर डोक्यावर मिरे वाटतील म्हणजे नक्की काय? काँग्रेस डोक्यावर मिरे वाटंत होती तेव्हा तुम्ही काय करंत होतात? आवाज तरी उठवलात का? आम्हांस (म्हणजे मोदीभक्तांना बरंका) ऐकू आला नाही. अंगी ताकद नसतांना नुसता आवाज केल्याने मिरे वाटणे थांबणार आहे, हे स्वप्नरंजनच नव्हे काय? ही एक गंभीर त्रुटी आहे. १. पूर्वार्ध : पण हिच्यापेक्षाही गंभीर त्रुटी विधानाच्या पूर्वार्धात आहे. तुम्ही तटस्थ वृत्तीने राजकारणाकडे बघंत आहात. ही तटस्थता हळूहळू संपुष्टात येते हे याकडे तुमचं लक्ष आहे का? मोदी ही धृवीकारक शक्ती आहे, हे तुम्हांस जाणवलं आहे का? दोनपैकी कुठल्यातरी एका कंपूत दाखल व्हावं लागेल अशी परिस्थिती उत्पन्न होते आहे. तुमच्या मूळ तटस्थ भूमिकेस हरताळ फसला जाण्याची शक्यता उत्तरोत्तर वाढंत आहे. Ignorence is NOT strength. तेव्हा सावधान. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भंकस बाबा 10/09/2017 - 14:11
काँग्रेस सरकार असताना आम्ही सामान्यजन हेच गृहीत धरून चाललो होतो की असेच चालणार, आपण मतदानाने परिस्थिती बदलू, नवीन आलेले सरकार नक्कीच काहीतरी चांगले करेल. पण आता आलेले सरकार कट्टर हिंदुत्ववादी आहे, कट्टरता कुठेही वाईटच! नशीब आपले की होणारे रेल्वे अपघात , हॉस्पिटलमध्ये बालमृत्यू हे काँग्रेसप्रणित आहे असे हे बोलत नाही , अगदी छत्तीस गुण जुळवून शेजाऱ्यांपाजाऱ्याकडे चोकशी करून लग्न जमवावे आणि बायको गुण उधळणारी निघावी तर अपेक्षाभंग होणारच

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

arunjoshi123 11/09/2017 - 18:40
तुम्ही समर्थक इ इ कोणाचेही असा. त्यात काही विशेष नाही. पण विधान करताना, खास करून निगेटिव विधान करताना, इतरांची मते प्रभावित करताना मोघमपणा नको. =================
आधीच्या सरकारांनी समाजातील एका विशिष्ट घटकाची कायम उपेक्षा केल्याने तो समाज घटक आता "आपल्या" सरकारचे हिरिरीने समर्थन करत आहे.
आधीचं सरकार सेक्यूलर होतं. असले फालतू प्रकार करायचं नाही.

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

ट्रेड मार्क 12/09/2017 - 01:39
काँग्रेसच्या सत्ताकाळात अतिरेकी भ्रष्टाचार, सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आपल्या अल्पसंख्यांक व्होट बँकेचे लांगुलचालन इत्यांदीमुळे एका टोकाला गेलेला लंबक भाजपा समर्थक (यांना त्यांचे विरोधक भक्त म्हणतात) "आपल्या" सरकारचे समर्थन करताना दुसर्या टोकाला नेत आहेत. तुम्ही जे काँग्रेसच्या काळाच्या विरुद्ध टोक म्हणताय ते म्हणजे संपुष्टात आलेला भ्रष्टाचार, अल्पसंख्यांक व्होट बँकेचे लांगुलचालन आता होत नाही हेच ना? आता यावर म्हणाल की अजूनही कनिष्ठ सरकारी कर्मचारी, पोलीस ई भ्रष्टाचार करतात. तर तो आपल्याच मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात जसे २जी, कोळसा, संरक्षण सामग्री आणि इतर हजारो लाखो कोटींचे घोटाळे झाले तसे गेल्या ३ वर्षात झाले का? काही लोक नोटबंदी हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याची बोंब ठोकतात पण तो घोटाळा कसा म्हणायचा? सगळे पैसे बँकेत जमा झाले ना? सत्ताधारी पक्षातील लोकांनी आधीच पैसे बदलून घेतल्याचा पण आरोप झाला, पण पुरावा सापडत नाही. बँकांची एनपीए झालेली कर्ज माफ करण्यावरून आरोप होतात पण कर्ज एनपीए काही ३ वर्षात झालेली नाहीत. ही कर्ज आधीच कधीतरी वाटली गेली होती. जी वसूल करण्यासाठी जगातले महान अर्थशात्रज्ञ भारताचे पंतप्रधान असूनही आणि सगळ्यांचे लाडके रघुराम राजन आरबीआयचे गव्हर्नर असूनही काही करू शकले नाहीत. ती एनपीए write-off केली म्हणजेच माफ करून टाकली असा चुकीचा समज सामान्य जनतेचा कोणी करून दिला? अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याचं म्हणाल तर काँग्रेसने त्यांना पण उल्लू बनवलंय. कुठल्या मुस्लिमांची काँग्रेसच्या काळात भरभराट झाली किंवा सुधारणा झाली ते सांगा. तोंडी तीन तलाक सारख्या प्रथा अगदी कट्टर मुस्लिम असलेल्या देशात सुद्धा नाहीत त्या आपल्या देशात रुजू करून घेण्यासाठी राजीव गांधींनी कायदा बदलला. स्त्रियांचं सबलीकरण करणार म्हणून डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेसने अल्पसंख्यांक महिलांना आयुष्यभर त्रास सहन करायला लागेल याची कायदेशीर व्यवस्था करून ठेवली. त्यातून मुक्तता करायला "मुस्लिमविरोधी" आणि "कट्टर हिंदू" अशी बिरुदावली मिळालेल्या मोदींना प्रयत्न करायला लागले आणि ते यशस्वीसुद्धा झाले. काँग्रेस सत्तेवर असताना बऱ्याच धार्मिक दंगली झाल्या. २००२ च्या एका दंगलीवरून मोदींना एवढं धारेवर धरलं गेलं, पण त्यावेळेला ते नुकतेच सत्तेवर आले होते आणि नंतर १२ वर्षात एकही धार्मिक दंगल झाली नाही हे मात्र सोयीस्करपणे विसरलं जातं. त्यामुळे लंबक जितका तिकडे गेला होता तितका तो इकडे येणारच पण ते टेम्पररी असेल. हिंदू मुळातच एवढे क्रूर आणि दुसऱ्या धर्मातील लोकांच्या कत्तली उगाचच कराव्या या वृत्तीचे नाहीत. मुसलमानांनी कट्टरपणा सोडला आणि हिंदूंच्या कुरापती काढणं बंद केलं तर हिंदू स्वतःहून आपला कट्टरपणा दाखवायला जाणार नाहीत. हिंदू दहशतवाद ही उगाच पसरवलेली अफवा होती, पण अजूनही काही सामान्य (राजकारणी नसलेल्या) हिंदूंचाच त्यावर विश्वास आहे असं वाटतंय. हिंदूंना राहण्यासाठी भारत हाच एक हक्काचा देश आहे, त्यामुळे हिंदूंनी एकत्र येण्यात/ असण्यात काहीच चुकीचं नाहीये. हिंदू असण्याचा अभिमान बाळगायला हवा कारण आपला धर्म प्रार्थना पद्धतीवरून आणि कुठला देव मानता यावरून त्यांच्या कत्तली कराव्या हे सांगत नाही. कट्टर हिंदू फार फार तर रोज मंदिरात जाईल, ३ वेळा पूजा करेल. पण आमच्या धर्मात सांगितलंय म्हणून मशिदी पाडा, मुस्लिमांना मारा आणि मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार करा हे करणार नाही. पण जर मुस्लिम, त्यांच्या धर्मात सांगितलंय म्हणून, हिंदूंना त्रास द्यायला लागले तर हिंदूंनी का शांत बसावं? आणि प्रॉब्लेम असा आहे की हिंदूंनी प्रतिकार करायला सुरुवात केली की आपल्यातलेच "सेक्युलर" मुस्लिमांनी केलेल्या कुरापती विसरून कट्टर हिंदू कसे धोकादायक आहेत हे सांगत फिरतात.

शलभ 10/09/2017 - 15:08
अमितदादा ह्यांच्या मतांशी सहमत..सुरुवातीला नॉटबंदीचा फायदा होईल असा वाटलं होतं, पण आता जो डेटा समोर आलाय त्यात फायद्यांपेक्षा तोटे जास्त आहेत असं दिसतं आहे. अजून पुढे कदाचित फायदे जास्त झालेत असा डेटा समोर येऊ शकतो. पण आताचे अमितदादा यांचे विश्लेषण बरोबर वाटत आहे. उगाच फक्त समर्थन करायच्या नादात जे समोर दिसतंय ते नाकारण्यात अर्थ नाही.

थिटे मास्तर 10/09/2017 - 21:29
लोकसत्तातल्या मधु कांबळेंची बातमि तर वाचली. आपले मत वाचायला आवडेल ह्या बातमि संदर्भात. वैदिक ब्राह्मण समाजाला म्हणजे नेमका कुठला समाज ?

थिटे मास्तर 10/09/2017 - 21:47
आणि हि ऐक फक्त जात आहे हिंदु धर्मात. वैदिक ब्राह्मण समाज / अवैदिक ब्राम्हण समाज ह्याविषयी प्लस ह्यांना कधिपासुन आणि का अल्पसंख्याक असल्याचि भावना आलिय हे ऐकायला / वाचायला आवडेल.

अमितदादा 10/09/2017 - 22:26
@शलभ जी
उगाच फक्त समर्थन करायच्या नादात जे समोर दिसतंय ते नाकारण्यात अर्थ नाही.
अगदी बरोबर. लोक आर्थिक निर्णयाचं राजकीय समर्थन करतायत त्यामुळं हा घोळ होतोय, त्यापेक्षा लोकांनी आर्थिक निर्णयाचं आर्थिक विवेचन करून समर्थन किंवा विरोध करावा ते हि पुढे असलेला डेटा पाहून. @श्री गुरुजी आता तुमचा अभ्यासू प्रतिसाद आला त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आता.
While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017. याचा सरळ अर्थ असा की या लेखातील निष्कर्ष पुरेशा संशोधनावर आधारीत नाहीत.
याचा अर्थ असा हि होतो कि आमच्या संशोधनास बळकटी मिळण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे, त्याचवेळी आमचं संशोधन योग्य कारण न देता फेटाळता येणार नाही.
एकंदरीत या लेखातील निष्कर्षांना कोणताही ठोस आधार दिसत नाही. स्वतःच्या समजूतीनुसार निष्कर्ष काढले आहेत. काही दावे परस्परविरोधी आहेत
मला अजिबात असे वाटत नाही, मुळात गोंधळ टाळण्यासाठी आपण दोन्ही लेखात दिलेली मूळ लिंक किंवा मूळ संशोधन पाहू मूळ संशोधन १. These are all-India household surveys over a sample size of 161,167 households that included 519,285 adults. २. We estimated the employed force at 401 million then. This grew to 403 million during May-August 2016 and then to 406.5 million in September-December 2016. Then, it fell to 405 million. (साध्य सिम्पल भाषेत १५ लाख जॉब गेले कुठही गोंधळ नाही कि परस्परविरोधाभास नाही )
म्हणजे जानेवारी-एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या २ कोटी ९६ लाखांवरून कमी होऊन २ कोटींवर आली. एकीकडे म्हणतात की या काळात बेकारी वाढून १५ लाख नोकर्‍या गेल्या आणि दुसरीकडे लिहितात की बेकारी ९६ लाखांनी कमी झाली.
याच उत्तर खाली तुम्हाला गणित समजत अशी आशा करतो. While the number of employed persons has dropped, the unemployment rate has also fallen. This is odd and it merits an explanation. The unemployment rate is the ratio of the unemployed to the labour force where the labour force is the sum of the employed and the unemployed. While the number of persons employed fell by 1.5 million, the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. As a result, the labour force fell by 11 million. This substantial fall in the denominator is responsible for the fall in the unemployment rate. वरील लेखातील पहिली आकृती पहा तुम्हाला लेबर पार्टीसिपेशन फोर्स nov -april पर्यंत कमी झालेला दिसेल हा आहे नोटबंदीचा परिणाम. मूळ संशोधन लेखात कुठेही विरोधाभास नाही, असला तर तो आहे समजवून न घेणाऱयांच्या मनात. आता शेती कर्ज माफी संधर्भात तुमचं जे मत आहे त्याच्याशी मी सहमत नाही, मुळात नोटबंदी हे शेती कर्ज माफी साठी एकमेव कारण नाही तर एक catalist आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात काही लगेच निवडणूक न्हवती परंतु तरीही राज्य सरकारे झुकली आणि कर्जमाफी दिली, याला अनेक कारणाबरोबर नोटबंदी जबाबदार आहे हे आपण नाकारू शकत नाही.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 11/09/2017 - 14:56
While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017. याचा सरळ अर्थ असा की या लेखातील निष्कर्ष पुरेशा संशोधनावर आधारीत नाहीत. याचा अर्थ असा हि होतो कि आमच्या संशोधनास बळकटी मिळण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे, त्याचवेळी आमचं संशोधन योग्य कारण न देता फेटाळता येणार नाही. याचा असाही अर्थ होऊ शकतो की आमच्या संशोधनास बळकटी मिळण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे आणि ते केलं तर आमचं संशोधन फेटाळता सुद्धा येऊ शकतं. वरील वाक्यातून आपण आपल्याला हवा तसा अर्थ काढू शकतो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या संस्थेने ज्या संशोधनावर व आकडेवारीवर आपले निष्कर्ष काढले आहेत ते संशोधन व आकडेवारी पुरेशी नाही व त्यामुळे आता या क्षणी अपुर्‍या संशोधनावर आणि आकडेवारीवर कोणताही ठाम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. याच उत्तर खाली तुम्हाला गणित समजत अशी आशा करतो. While the number of employed persons has dropped, the unemployment rate has also fallen. This is odd and it merits an explanation. The unemployment rate is the ratio of the unemployed to the labour force where the labour force is the sum of the employed and the unemployed. While the number of persons employed fell by 1.5 million, the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. As a result, the labour force fell by 11 million. This substantial fall in the denominator is responsible for the fall in the unemployment rate. वरील लेखातील पहिली आकृती पहा तुम्हाला लेबर पार्टीसिपेशन फोर्स nov -april पर्यंत कमी झालेला दिसेल हा आहे नोटबंदीचा परिणाम. मूळ संशोधन लेखात कुठेही विरोधाभास नाही, असला तर तो आहे समजवून न घेणाऱयांच्या मनात. एखादे गुणोत्तर किंवा टक्केवारी योग्य चित्र उभे करू शकत नाही. उदाहरणार्थ एखादा फलंदाज एका डावात ५ धावांवर बाद झाला व दुसर्‍या डावात त्याने १० धावा केल्या तर निव्वळ गुणोत्तर किंवा टक्केवारीचा विचार केला तर असे म्हणता येईल की दुसर्‍या डावात त्याने प्रचंड प्रगती केली असून पहिल्या डावाच्या तुलनेत दुप्पट धावा केल्या आणि त्यावर समाधान मानता येईल. परंतु प्रत्यक्ष धावांचा आकडा पाहिला तर दोन्ही डावात तो अपयशी ठरलेला आहे हे दिसून येईल. म्हणजेच कोणत्याही गोष्टीवर निष्कर्ष काढण्याआधी गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा प्रत्यक्ष आकडे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. वरील उदाहरणात तसेच आहे. गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा बेकारीचे प्रत्यक्ष आकडे पाहिले तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या ९६ लाखांनी कमी झाली असे वृत्तांतात लिहिले आहे. आता कसेही गुणोत्तर मांडले किंवा टक्केवारीची तुलना केली तरी बेकारांची संख्या ९६ लाखांनी घटलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही आणि त्यामुळेच या काळात ३५% लोकांनी नोकर्‍या गमाविल्या अशासारखे निष्कर्ष अविश्वसनीय वाटतात. त्याला अजून एक आधार म्हणजे २०१६-१७ या वर्षात झालेले करसंकलन. केंद्रीय सीमाशुल्क, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, सेवा कर अशा सर्व करांच्या संकलनामध्ये या वर्षात मोठी वाढ झाली आहे. जर भारतात या वर्षात ३५% लोकांनी नोकर्‍या गमाविलेल्या असतील व कंपन्यांच्या महसूलात ५०% घट झाली असेल तर करसंकलनात मोठ्या प्रमाणात घट व्हायला हवी. त्यामुळे या वृत्तांतात दिलेल्या आकड्यांवर विश्वास ठेवणे अवघड आहे कारण वृत्तांतातील आकडे व निष्कर्ष प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी विसंगत आहेत. या संस्थेन अंदाजे १,६१,००० कुटुंबांचे सर्वेक्षण करून आपले निष्कर्ष काढले असे लिहिले आहे. भारतात २६ कोटींपेक्षा अधिक कुटुंबे आहेत. त्यापैकी जेमतेम १,६१,००० कुटुंबे म्हणजे हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या जेमतेम ०.०६% लोकसंख्येचे (म्हणजेच प्रत्येक ५००० नागरिकांमागे ३ नागरिक) सर्वेक्षण केलेले आहे. हे सॅम्पल खूपच कमी आहे आणि त्यामुळेच यांचे निष्कर्ष चुकलेले दिसतात. आता शेती कर्ज माफी संधर्भात तुमचं जे मत आहे त्याच्याशी मी सहमत नाही, मुळात नोटबंदी हे शेती कर्ज माफी साठी एकमेव कारण नाही तर एक catalist आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात काही लगेच निवडणूक न्हवती परंतु तरीही राज्य सरकारे झुकली आणि कर्जमाफी दिली, याला अनेक कारणाबरोबर नोटबंदी जबाबदार आहे हे आपण नाकारू शकत नाही. महाराष्ट्रात लगेच निवडणुक नसली तरी उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी जाहीर केल्यामुळे महाराष्ट्राला कर्जमाफी नाकारता आली नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे फडणविसांनी खूपच कठोर निकष लावून कमीतकमी शेतकर्‍यांना थोडीशी कर्जमाफी मिळेल अशी योजना आणली आहे. कर्नाटकमध्ये कर्जमाफी दिली आहे का नाही हे मला माहिती नाही. परंतु अजून ६ महिन्यांनी कर्नाटक विधानसभेची निवडणुक आहे. जर तिथे कर्जमाफी दिली तर त्यासाठी निवडणुक हे एकमेव कारण असेल. तामिळनाडूत अजून कर्जमाफी दिलेली नाही. ३-४ महिन्यांपूर्वी तिथल्या शेतकर्‍यांनी दिल्लीत बरेच दिवस आंदोलन केले होते. बर्‍याच दिवसानंतर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत शेतकर्‍यांची भेट घेऊन काहीतरी थातुरमातुर आश्वासन दिल्यावर शेतकर्‍यांनी आंदोलन थांबविले. परंतु तिथे कर्जमाफीचा निर्णय झाल्याचे ऐकिवात नाही. एकंदरीत कर्जमाफीसाठी नोटबंदी, शेतकर्‍यांची हलाखीची स्थिती इ. कारणे जबाबदार नसून निवडणुक किंवा राजकीय अपरिहार्यता हेच कारण त्यामागे असते. अन्यथा भारतातील यच्चयावत सर्व राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती.

थिटे मास्तर 10/09/2017 - 22:36
लोक आर्थिक निर्णयाचं राजकीय समर्थन करतायत त्यामुळं हा घोळ होतोय, त्यापेक्षा लोकांनी आर्थिक निर्णयाचं आर्थिक विवेचन करून समर्थन किंवा विरोध करावा आर्थिक विवेचन... लोक ( सामान्य माणुस ).... बाकि चालुद्या.

थिटे मास्तर 10/09/2017 - 22:52
आर्थिक विवेचन... लोक ( सामान्य माणुस )....अच्छो अच्छो के पल्ले नहि पडा सर सामान्य माणसाला काय समजणार. आताशा लोक ( सामान्य माणुस ) मते देतो तेंव्हा त्याला हे समजायला लागल आहे कि what is optimism? ते लोक ( सामान्य माणुस ) ज्या गाडित बसलेत ति गाडि कोणि डोळस माणुस आंधळा बनुन ऐका अश्या व्यक्तिच्या ईशार्यावर चालवतोय कि ज्याला मुळात गाडि काय आहे हेच माहित नाहि. आणि आता ति गाडि अशि व्यक्ति चालवतेय ज्याने सगळ्या भारतिय गाड्या चालवल्यात आणि आता लेफ्ट हँड ड्रिव्हन अँटोमँटिक हातात आलिय. बाळबोध उदाहरण आहे आय नो.

थिटे मास्तर 10/09/2017 - 23:01
तुम्हाला नाहि कळाल्यास आमच्या बौध्दिकात प्रॉब्लेम आहे हे आम्हि लोकांनी (सामान्य लोक ) पहिलेहि त्यांना जिंकवुन मान्य केलच आहे. तुम्हि विवेचन चालु ठेवावे. लोक ( अतिसामान्य) घंटा ( देवळाचा किंवा चर्च कुठलाहि... नाहि चिदंबरम मस्जिद मध्ये घंटा नसते )

श्रीगुरुजी 12/09/2017 - 11:07
राहुलजी दोन आठवड्यांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. Rahul Gandhi is on his two-week visit to the US during which he will interact with global thinkers and political leaders, and address overseas Indians as part of an outreach initiative by his party. In his first engagement, Gandhi today addressed students of the prestigious University of California, Berkeley on India at 70: Reflections on the Path Forward, in which he will offer his reflections on contemporary India and the path forward for the world's largest democracy. राहुवजींचे हे भाषण एक सुखद धक्का होता. या अवघड विषयावरील त्यांचे अभ्यासू विचार ऐकल्यानंतर भारताचे भवितव्य या बुद्धिमान, दूरदर्शी युवा नेत्याच्या हातात सुखरूप राहील याची खात्री पटली. "७० वर्षानंतरचा भारत - वर्तमान व भवितव्य" या महत्त्वाच्या विषयावरील राहुलजींच्या या अभ्यासू व मुद्देसूद भाषणाचा सारांश - नोटाबंदी, वाढता हिंसाचार, जीएसटी यासह अनेक मुद्द्यांवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाचे राजकारण यांनी भारतात डोके वर काढले आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया’ आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधले. ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बर्कलेमध्ये बोलत होते. नोटाबंदीचा निर्णय, कथित गोरक्षकांकडून सुरु असलेला हिंसाचार, द्वेषाचे राजकारण अशा अनेक मुद्यांवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘राजकारणातील ध्रुवीकरण अतिशय धोकादायक आहे. द्वेष, राग आणि हिंसा सगळ्यांनाच उद्ध्वस्त करेल. देशातील उदारमतवादी पत्रकारांच्या हत्या होत आहेत. सामान्य लोकांवर हल्ले केले जात असून दलितांना गायींची तस्करी केल्याच्या केवळ संशयावरुन संपवले जात आहे. गोमांस सेवन केल्याच्या संशयावरुन मुस्लिमांच्या हत्या सुरु आहेत. हे सर्वकाही ‘न्यू इंडिया’मध्ये सुरू आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींच्या ‘न्यू इंडिया’ अभियानावर निशाणा साधला. हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे. अहिंसेच्या विचारांवरच हल्ले सुरु आहेत. अहिंसेमुळेच मानवता जिवंत राहू शकते. मात्र त्याच विचारधारेला लक्ष्य केले जात आहे,’ असा शब्दांमध्ये त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली. ‘मोदींनी संसद, मुख्य आर्थिक सल्लागार यापैकी कोणाचाही सल्ला न घेता, त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला. मोदींच्या या निर्णयाची किंमत देशाला चुकवावी लागली. सकल राष्ट्रीय उत्पादनात २ टक्यांची घट झाली. लोकांसोबतच संवाद कमी होत गेल्यानेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे मतही राहुल गांधींनी व्यक्त केले. ‘२०१२ च्या सुमारास पक्षात अहंकार निर्माण झाला. त्यामुळे आम्ही लोकांसोबत संवाद साधणेच बंद केले,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. रोजगार निर्मितीत केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. http://www.loksatta.com/desh-videsh-news/violence-and-politics-of-polarisation-raised-their-ugly-head-in-india-says-rahul-gandhi-in-his-us-speech-slams-pm-modi-1549154/ भाजप ही एक मशीन आहे. या मशीनशी संबंधित हजारो लोक सतत कम्युटरसमोर बसलेले असतात आणि माझ्याबद्दल अपप्रचार करतात. एका सभ्य माणसाच्या इशाऱ्यावर हे सगळं चालतं आणि हाच सभ्य माणूस सध्या देश चालवत आहे,' असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात आम्ही काश्मीरमधील दहशतवाद मोडून काढण्यात यश मिळवलं होतं. मात्र, तिथं पुन्हा एकदा दहशतवादानं डोकं वर काढलंय. मोदी सरकारची धोरणंच यासाठी जबाबदार असल्याचं ते म्हणाले. 'मुफ्तींचा पीडीपी हा पक्ष काश्मिरी तरुणांना राजकारणात आणण्यासाठी पुढाकार घ्यायचा. मात्र, भाजपशी युती झाल्यापासून मोदींनी हा पक्ष बरबाद करून टाकला,' असं त्यांनी सांगितलं. http://m.maharashtratimes.com/international/international-news/what-rahul-said-on-bjp-machine-his-stupidity/articleshow/60473274.cms

In reply to by श्रीगुरुजी

गामा पैलवान 12/09/2017 - 12:27
श्रीगुरुजी, बर्कले एव्हढी पप्पूमय झालेली पाहून संतोष झाला. एकंदरीत पप्पूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षच बनवला पाहिजे. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 12/09/2017 - 11:50
बस! एव्हढंच वाचायचं राहिलं होतं माझ्या आयुष्यात. धन्य जाहलो अजि मी या जीवनी :

सुज्ञ मनुष्य विचार करायला लागतो, तेव्हा तो आपसूकच डावीकडे झुकत असतो.

-गा.पै.

अमितदादा 12/09/2017 - 15:16
नोटबंदीचे समर्थन करणारे किंवा विरोध खोडून काढणारे प्रतिसाद आलेत हे उत्तम चर्चेचं लक्षण आहे. हा शेवटचा प्रतिसाद देतो ह्या विषयावरचा कारण मला जे म्हणायचं आहे ते मी मांडलेलं आहे. @श्रीगुरुजी
वरील उदाहरणात तसेच आहे. गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा बेकारीचे प्रत्यक्ष आकडे पाहिले तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या ९६ लाखांनी कमी झाली असे वृत्तांतात लिहिले आहे. आता कसेही गुणोत्तर मांडले किंवा टक्केवारीची तुलना केली तरी बेकारांची संख्या ९६ लाखांनी घटलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही.
the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. या वाक्याचा अर्थ बेकारी कमी झाली असा होत नाही असे मला वाटते, याचा अर्थशास्त्रात नेमका काय अर्थ होतो हे मी सांगू शकत नाही, परंतु बेकारी जवळजवळ १ कोटी ने ४ महिन्यात कमी झाली असा अर्थ होणार नाही, याच कारण क्र १. हे संशोधन करणारे एवढी साधी/बावळट चूक करतील असे वाटत नाही याचा अर्थ त्यांना वेगळे म्हणणे अभिप्रेत आहे अन्यथा त्यांनी ९६ लाख लोकांना नोकऱ्या लागल्या असे सरळ लिहलं असतं . २. एवढ्या मोठ्या संख्येने बेकारी कमी झाली असती तर मोदी सरकार ने रोजगार निर्मितीचे ढोल बडवले असते.
हे सॅम्पल खूपच कमी आहे आणि त्यामुळेच यांचे निष्कर्ष चुकलेले दिसतात.
मला अजिबात असे वाटत नाही, पोलिंग सर्वे येतात किती असते हो सॅम्पल size ? १००००-२०००० इथे सॅम्पल size चांगली मोठी आहे.
अन्यथा भारतातील यच्चयावत सर्व राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती.
मुळात देशात कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून (कमी/अधिक प्रमाणात ) असणारी राज्ये म्हणजे तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि बिहार. यातील ५ राज्यांनी कर्जमाफी /व्याजमाफी जाहीर केली आहे. नोटबंदी हे यामागचे कॅटॅलीस्ट आहे एकमेवे कारण नाहीये असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तेच मी फक्त मांडतोय. @ट्रेडमार्क तुमच्या मताशी सहमत नाही, त्याचा प्रतिवाद करत नाही. फक्त एक जनरल प्रतिसाद देतो, सगळा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाही.
नोटबंदी कशी चांगल्या पद्धतीने राबवता आली असती याचा प्लॅन काही मिपाकर जानेवारी २०१७ च्या आधी देणार होते, तो काही अजून मिळाला नाही. तुम्ही पण सांगा काय उपाय करता आले असते ते. आणि हो जे सांगाल ते सर्वच्या सर्व लोकांना फायद्याचे आणि फुलप्रूफ असावे. म्हणजे एक प्लॅन द्यायचा, जो इतका फुलप्रूफ असेल की ज्याने फक्त सर्वच्या सर्व अप्रामाणिक भारतीयांना तास झाला पाहिजे पण एकाही प्रामाणिक भारतीयास त्रास व्हायला नको. तसेच प्लॅन/ नियम एकदा केले की परत बदलता येणार नाहीत. बोला कधी देताय.
मुळात हा प्लॅन देणे हे माझे काम हि नाही आणि कुवत हि नाही. सरकारच्या (मग ते भाजप असो नाहीतर काँग्रेस ) निर्णयावर टीका केली कि त्यांचे पाठीराखे मुद्यावर बोलायचं सोडून मग तुम्हीच का नाही सुचवत चांगला प्लॅन ? मग तुम्हीच चांगला उपाय सुचवा? तुम्हीच का नाही सीमेवर जाऊन लढत? तुम्ही अर्थतज्ञ् आहात का ? तुम्ही जास्त हुशार आहात का ? असले निरुपयोगी प्रश्न विचारतात हा अनुभव आहे. तुम्ही काँग्रेस च्या आर्थिक आणि संरक्षण धोरणास विरोध करता त्यावेळी तुम्ही कोणते प्लॅन सादर करता ? किंवा कोणते प्लॅन तुमच्याकडे रेडी असतात जे सरकार पेक्षा चांगले आहेत? त्यावेळी तुम्ही कसे अर्थतज्ञ् किंवा संरक्षण क्षेत्रातील जाणकार होता ? मुळात मिसळपाव हे संस्थळ सामान्य आणि सुज्ञ वाचकांसाठी आहे असे माझे मत आहे, येथे विचार मांडायला तुम्हाला जाणकार व्हायायची गरज नाही जोपर्यन्त तुम्ही असबंद बोलत नाही तोपर्यंत. @पिज तुम्ही दिलेला लेख अर्धा वाचला तो फक्त डाळींच्या संधर्भात आहे असे दिसून येते. मुळात अन्नधान्याच्या किमती अनेक घटकावर अवलंबून आहेत हे मान्यच आहे, पंरतू जेंव्हा नोटबंदी मुळे अर्थव्यवस्था काही काळासाठी ठप्प होते किंवा मंदावते (तुम्ही तुमच्या प्रतिसादात हे मान्य केलंय ), तेंव्हा त्याचा शेती अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही असे आपण कसे म्हणू शकतो ? मुळात कधी कांदे, टोमॅटो, साखर यांच्या भावातील चढउतार आपण काही वेळा पाहतो मात्र एकाचवेळी वेगवेगळ्या अन्नधान्याच्या भावात उतार होताना दिसत नाही जे नोटबंदी च्या काळात घडलेलं आहे, हा मुद्दा कृपया तुम्ही लक्षात घ्या. हेच त्या लेखकाने मांडले आहे. @चिनार
हे जर खरे असेल तर, बँकेत कितीही पैसा वापस आला तरी चार लाख कोटींचे चलन सरळ सरळ बाद झाले असं म्हणता येऊ शकतं का? या चार लाख कोटींपैकी अर्धा जरी काळा पैसा असेल तरी चांगलेच नाही का ?
माझ्या मताप्रमाणे अजिबात नाही, याचा अर्थ फक्त बाजारात कमी नोटा आल्या एवढाच होतो. @अजो तुम्ही खूप सारे प्रतिसाद दिलेत, तुमच्या काही प्रश्नाची उत्तरे माझ्या प्रतिसादात सापडतील, काही नाहीत सापडणार. तुम्ही प्रश्न विचारण्यापेक्षा तुमची मते मांडावीत किंवा माझी खोडून काढावीत हि विनंती. सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही कारण १. माझं तोकडं अर्थ ज्ञान २. मर्यादित वेळ. शेवटी माझं मत: नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही, माझे असे म्हणणे आहे कि जे फायदे सांगितले जातायत त्यासाठी नोटबंदी करायची आवश्यकता न्हवती आणि नोटबंदीचे मूळ उद्देश असफल झालेत. नोटबंदी मधून भविष्यात जे काही फायदे होतील त्यातून आता जे नुकसान झालं आहे ते भरून निघेल असे मला वाटत नाही. आणि समजा उद्या मोदींनी ३ ते ४ लाख कोटी रुपये काळा पैसा नोटबंदी मुळे पकडला असे दाखवून दिले तर मी मत बदलेन ना शेवटी मी काही मोदींचा कट्टर विरोधक नाही जो पुढे असलेला डेटा अमान्य करून फक्त विरोधच करेन ते.

In reply to by अमितदादा

ट्रेड मार्क 12/09/2017 - 18:48
सरकारच्या (मग ते भाजप असो नाहीतर काँग्रेस ) निर्णयावर टीका केली कि त्यांचे पाठीराखे मुद्यावर बोलायचं सोडून मग तुम्हीच का नाही सुचवत.... असले निरुपयोगी प्रश्न विचारतात हा अनुभव आहे यावर काही लोक "तुमच्या मताशी सहमत नाही, त्याचा प्रतिवाद करत नाही" किंवा प्रतिवाद करायला मला वेळ नाही हे पण उत्तर देतात असा अनुभव आहे. असो. प्रश्न निरुपयोगी नव्हता कारण तुम्ही म्हणालात की नोटबंदी न करतासुद्धा हे साध्य करता आलं असतं, म्हणून आपलं विचारलं की प्लॅन द्या. अगदी प्लॅन नसेल तर निदान पॉइंटर्स तरी देऊच शकता. पण तुम्ही हा शेवटचा प्रतिसाद आणि वेळ नाही असं म्हणून पळवाट आधीच काढून ठेवली आहे. काँग्रेसच्या काळात बाकी कशाहीपेक्षा भ्रष्टाचार (ते स्वतः करत होते तो) कमी करा हाच सगळ्यात मोठा मुद्दा होता. बाकी त्यांनी फारसं काही केलं असं वाटत नाही. ज्या काही योजना आणल्या त्यात फक्त स्वतःचे खिसे कसे भारत येतील हे बघितलं गेलं. अगदी शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना बघा, त्यातही खऱ्या शेतकऱ्याला भरपाई मिळालीच नाही, पण पैसे मात्र वाटले गेले. येथे विचार मांडायला तुम्हाला जाणकार व्हायायची गरज नाही बरोब्बर. विचार म्हणजे दुसऱ्या कोणीतरी दाखवलेली आकडेवारी नव्हे. आकडेवारी तर दोन्ही बाजूची लोक दाखवत आहेत. मग दोन्ही बाजू अभ्यासून (जेवढं कळेल तेवढं) आपलं मत तयार करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की "नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही". पण जशी इतरांनी दिलेली आकडेवारी दाखवून नोटबंदी अपयशी आहे म्हणताय, तसेच इतरांनी दिलेले (किंवा तुम्हाला वाटलेले) फायदे कुठे लिहिले नाहीत. हे सर्व फक्त तुम्हाला उद्देशून नाही तर जनरल स्टेटमेंट आहे - मी तटस्थ आहे असं नुसतं म्हणून भागत नाही तर दोन्ही बाजू सुसंगतपणे मांडता यायला पाहिजेत. बहुतांशी लोक आपल्या विचारांशी सुसंगत असेल तेवढेच वाचतात किंवा घेतात.

In reply to by ट्रेड मार्क

अमितदादा 13/09/2017 - 00:05
ठीक आहे आता तुम्ही असंबद प्रतिसाद दिला आहे तर प्रतिवाद करतोच.
आकडेवारी तर दोन्ही बाजूची लोक दाखवत आहेत. मग दोन्ही बाजू अभ्यासून (जेवढं कळेल तेवढं) आपलं मत तयार करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की "नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही". पण जशी इतरांनी दिलेली आकडेवारी दाखवून नोटबंदी अपयशी आहे म्हणताय, तसेच इतरांनी दिलेले (किंवा तुम्हाला वाटलेले) फायदे कुठे लिहिले नाहीत.
मुळात तुम्ही माझा पहिला प्रतिसाद वाचला का ? हा पहा http://www.misalpav.com/comment/959658#comment-959658 यातील पहिले ७ पॉईंट हे मी नोटबंदी चे तोटे सांगितले आहेत आणि उरलेले ३ पॉईंट हे नोटबंदीच्या समर्थनार्थ आहेत जे नोटबंदीच्या एका समर्थक लेखकाने मांडले आहेत, ज्यातील लूपहोल मी दाखवून दिले आहेत. मी टोटल ६-७ रेफररेन्स (संधर्भ) दिलेले आहेत आणि त्यातील डेटा प्रेसेंट करून मांडलेला आहे. तुम्ही काय केलेय ? एक हि संदर्भ नाही , डेटा दिलेला नाही, तुम्ही फक्त "काही लोक नोटबंदी अयशस्वी करतायत " हेच टेप लावलीय, आता अश्या प्रतिसादांना काय उत्तर द्यायचं ? काय प्रतिवाद करायचा ? म्हणून मी सरळ म्हंटल कि तुमच्या मताशी असहमत आहे, त्याचा प्रतिवाद करत नाही. मुळात तुमच्या प्रतिसादात तुम्ही नोटबंदी ला लोकांना जबाबदार ठरवून (जे साफ चुकीचं आहे ) नोटबंदी अयशस्वी जालीय हे मान्य केलंय. तुमचे सगळे प्रतिसाद हे माझे मुद्दे खोडून काढण्यासाठी आहेत (त्यात काही अयोग्य नाही), परंतु एक हि मुद्दा नोटबंदीचे समर्थन सांगणारा नाही, हे हि नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. कि त्याचे समर्थन करण्याचे काम हि मीच करू. मुळात तुम्हाला माझे मुद्दे खोडून काढायचे होते तर दिलेलं संधर्भ वाचून मुद्दे खोडून काढायला हवे होते यासाठी श्री गुरुजींचे प्रतिसाद वाचा. तुम्ही फक्त लोक कशी जबाबदार आहेत हेच बोलताय. मुळात कमीत कमी लूपहोल असणारा प्लॅन बनवणं आणि त्याची अंमलबजावणी करण हे सरकार आणि अजस्त्र अश्या सरकारी यंत्रणेचं काम आहे, यात जर अपयश आलं आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार असेल तर एक नागरिक म्हणून आपल्याला टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यावेळी सरकारच्या पाठीराख्यानी "तुम्ही प्लॅन तयार करा " असे म्हणणे म्हणजे पराभूत मानसिकतेचं लक्षण आहे याच कारण १. त्याचा प्लॅन अयशस्वी झाला हे त्यांना मान्य आहे २. सरकार विरोधी योग्य प्रश्न विचारणाऱ्याला असे प्रतिप्रश्न विचारून गप्प करण्याचा त्यांची एक जुनी सवय आहे. तुम्ही काँग्रेस विरोधी मत मांडता तेंव्हा किती प्लॅन तयार ठेवता ? मांडा इथे तुमचे काही प्लॅन ? बरं काँग्रेस चे राहूदे नोटबंदी यशस्वी होण्यासाठी काय कराय हवं होत किंवा भविष्यात काळा पैसा कसा वसूल करायचा यापैकी कोणताही विषय निवडून इथे डिटेल प्लॅन द्या.
प्रतिवाद करायला मला वेळ नाही
मुळात माझे शब्द आहेत "मर्यादित वेळ " आणि ते हि फक्त अरुणजोशी यांच्यासाठी आहेत कारण त्यांनी १७६० प्रश्न विचारलेत स्वतःच कोणतंही मत न मांडता, मी काही इथे बसून त्यांच्या प्रत्येक प्रश्नास उत्तर देऊ शकत नाही म्हणून हे कारण त्यांना सांगितलं. बाकी ज्यांचे मुद्देसूद प्रतिसाद आहेत त्यांना मी उत्तरे दिली आहेत. असो हि वैयक्तिक व्हायला नको म्हणून इथेच थांबतो, तुमचा प्रतिसाद याला येणार याची अपेक्षा आहे त्याचा प्रतिवाद करणार नाही.

In reply to by अमितदादा

ट्रेड मार्क 13/09/2017 - 01:19
आकडेवारी गुरुजींनी दिलीच आहे परत तीच द्यायची गरज आहे असं मला वाटलं नाही. मुळात नोटबंदी फेलच झाली आहे याच दृष्टिकोनातून तुम्ही आकडेवारी बघताय आणि प्रतिसाद देताय. गुरुजींनी पण आकडेवारी कशी दोन्ही बाजूने इंटरप्रिट करता येते तेही दाखवलंय. पण तुम्ही दृष्टिकोन फायनल केला असल्याने तसंही चर्चा करून काही उपयोग नाही. तुम्ही प्रतिसाद देणार नाही म्हणताय म्हणून अधिक काही न लिहिता मी तुमची अपेक्षा पूर्ण करतो.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 13/09/2017 - 20:56
@श्रीगुरुजी वरील उदाहरणात तसेच आहे. गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा बेकारीचे प्रत्यक्ष आकडे पाहिले तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या ९६ लाखांनी कमी झाली असे वृत्तांतात लिहिले आहे. आता कसेही गुणोत्तर मांडले किंवा टक्केवारीची तुलना केली तरी बेकारांची संख्या ९६ लाखांनी घटलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही. the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. या वाक्याचा अर्थ बेकारी कमी झाली असा होत नाही असे मला वाटते, याचा अर्थशास्त्रात नेमका काय अर्थ होतो हे मी सांगू शकत नाही, परंतु बेकारी जवळजवळ १ कोटी ने ४ महिन्यात कमी झाली असा अर्थ होणार नाही, याच कारण क्र १. हे संशोधन करणारे एवढी साधी/बावळट चूक करतील असे वाटत नाही याचा अर्थ त्यांना वेगळे म्हणणे अभिप्रेत आहे अन्यथा त्यांनी ९६ लाख लोकांना नोकऱ्या लागल्या असे सरळ लिहलं असतं . २. एवढ्या मोठ्या संख्येने बेकारी कमी झाली असती तर मोदी सरकार ने रोजगार निर्मितीचे ढोल बडवले असते. the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. या वाक्याचा अर्थ बेकारी वाढली असा तर नक्कीच होत नाही. मूळ लेखात १५ लाख नोकर्‍या गेल्या, ३५% कर्मचार्‍यांनी नोकर्‍या गमाविल्या असे दावे आहेत. परंतु वरील वाक्य हे त्या दाव्यांशी पूर्णपणे विसंगत आहे. त्यामुळेच निदान या लेखांवर तरी विसंबून निश्चलीकरणामुळे नोकर्‍या गेल्या, बेकारी वाढली इ. दाव्यांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. मोदी सरकार ने रोजगार निर्मितीचे ढोल बडवले नाहीत याचा अर्थ असा होत नाही की रोजगार निर्मिती झालेलीच नाही. त्यामुळे मोदी सरकारने ढोल बडविले नाहीत म्हणजेच रोजगार निर्मिती झालेली नाही असा सोयिस्कर निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. एकंदरीत निश्चलीकरणामुळे बेकारी वाढली, नोकर्‍या गेल्या किंवा बेकारी कमी झाली, रोजगार निर्मिती वाढली असे कोणतेही ठोस निष्कर्ष वरील लेखातून काढता येणार नाही. हे सॅम्पल खूपच कमी आहे आणि त्यामुळेच यांचे निष्कर्ष चुकलेले दिसतात. मला अजिबात असे वाटत नाही, पोलिंग सर्वे येतात किती असते हो सॅम्पल size ? १००००-२०००० इथे सॅम्पल size चांगली मोठी आहे. निवडणुक सर्वेक्षण आणि रोजगार संबंधी सर्वेक्षण यात बराच फरक आहे. अगदी डेटाचा आकार बघितला तरी मतदार हे किमान १८ वर्षांचे असतात तर वरील सर्वेक्षण हे किमान १४ वर्षांवरील व्यक्ती रोजगारक्षम आहे या गृहितकावर आधारीत आहे. म्हणजेच हे सर्वेक्षण जास्त लोकसंख्येसाठी आहे. त्यामुळे अर्थातच या सर्वेक्षणासाठी निवडणुक सर्वेक्षणापेक्षा जास्त सॅम्पल हवे. अन्यथा भारतातील यच्चयावत सर्व राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती. मुळात देशात कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून (कमी/अधिक प्रमाणात ) असणारी राज्ये म्हणजे तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि बिहार. यातील ५ राज्यांनी कर्जमाफी /व्याजमाफी जाहीर केली आहे. नोटबंदी हे यामागचे कॅटॅलीस्ट आहे एकमेवे कारण नाहीये असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तेच मी फक्त मांडतोय. यातील फक्त महाराष्ट्र व उत्तर प्रदेशने कर्जमाफी जाहीर केली आहे. पंजाबचा त्याबाबतीत विचार सुरू आहे. इतर राज्यांनी कर्जमाफी जाहीर केल्याचे वाचनात आले नाही. मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी ही राजकीय मागणी असते व कर्जमाफी जाहीर करणे हा राजकीय निर्णय असतो. सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्ष कर्जमाफीची मागणी करून ब्राऊनी पॉईंट्स स्कोअर करण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः जेव्हा निवडणुक जवळ आलेली असते तेव्हा मतपेढीची सोय करण्यासाठी ही मागणी केली जाते. सत्ताधारी पक्ष हे ओळखून असतो. त्यामुळे कर्जमाफी देण्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये यासाठी सत्ताधारी पक्ष वेगवेगळे प्रयत्न करून शेवटी आपल्याला राजकीयदृष्ट्या सोयीच्या वेळी कर्जमाफी जाहीर केली जाते. निश्चलीकरण, दुष्काळ, उत्पादनाला कमी भाव, शेतीत नुकसान, शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती इ. कोणतेही कारण कर्जमाफी मागण्यामागे व देण्यामागे नसते. अर्थात हे उघडपणे कोणीच सांगत नाही. ही कारणे पुढे केली जातात, परंतु त्यामागचे एकमेव कारण राजकीय फायदा हेच असते.

गामा पैलवान 12/09/2017 - 18:02
मोहन भागवतांना झोपेतनं जाग आली आहे. हिंदू हाच खरा धर्म असून बाकी संप्रदाय आहेत असं वक्तव्य श्री. भागवतांनी केलं. अस्मादिक कधीपास्नं हेच बोंबलंत आहेत. शेवटी भागवतांना पटले म्हणायचे. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/hinduism-only-true-religion-in-world-says-mohan-bhagwat/articleshow/60475075.cms -गा.पै.

गामा पैलवान 12/09/2017 - 19:05
अरे वा ! पप्पू पंतप्रधान बनणार तर !
पक्षाने जबाबदारी सोपवली तर मी पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्यास तयार आहे.
पप्पूची एकंदरीत समज पाहता त्याने अमेरिकेचा पंतप्रधान बनणं इष्टं. मी आजपासून त्याचा तसाच उल्लेख करणार! -गा.पै.

पुंबा 13/09/2017 - 16:52

गामा पैलवान 16/09/2017 - 18:10
लोकहो, पश्चिम बंगालात भाजप कार्यकर्ते सौमित्र घोषाल या तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. सारे विचारवंत आपापली थोबाडं गच्च बंद करून बसली आहेत. जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहणे सोडून द्यावे इतकीच माफक अपेक्षा आहे. आ.न., -गा.पै.

अमितदादा 17/09/2017 - 01:35
या मोहिमेमागच्या तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि अनेक सहभागी लोकांच्या कष्टाचे, बुद्धिमत्तेचे, जिद्दीचे आणि प्लॅनिंग चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खालील लेखात Cassini च्या मोहीमेचे यश, शोध, त्याचबरोबर ते क्रॅश करण्यामागची कारणे दिली आहेत, याबरोबरच Huygens ह्या टायटन (शनी चा चंद्र) वर उतरलेल्या आणि Cassini बरोबर गेलेल्या प्रोब ची हि थोडक्यात माहिती दिली आहे. लेख जास्त टेकनिकल नसल्याने आपल्यासारख्याना समजण्यास सोपा आहे. अधिक माहितीसाठी विकिपीडिया आहेच. Cassini, NASA's 13-year Saturn mission, has ended

श्रीगुरुजी 18/09/2017 - 18:07
रोहिंग्या मुसलमान हे देशासाठी धोकादायक आहेत. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना भारतात राहू दिलं जाणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे. तसं प्रतिज्ञापत्रच केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलं आहे. इतकी स्पष्ट व नि:संदिग्ध भूमिका यापूर्वी कोणत्याही सरकारने घेतल्याचे ऐकिवात नाही. http://m.maharashtratimes.com/india-news/some-militant-rohingya-active-in-india-govt-to-sc/articleshow/60730706.cms

राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला घटस्थापनेचा मुहूर्त! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणे निश्चित केले आहे. ते बहुधा भाजपमध्ये प्रवेश करतील. अतिशय कमी शक्यता असलेला दुसरा मार्ग म्हणजे स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करणे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर राणे यांना पुरेसा बेस नसल्याने स्वतंत्र पक्ष स्थापन केला तरी जसा शेकाप रायगडपुरता मर्यादित आहे तसा राणेंचा पक्ष स्थानिक पातळीवर मर्यादित राहील. शिवाय पक्ष सोडताना त्यांच्या मुलांनाही पदे सोडावी लागतील. शिवाय राणेंना सोबत करणाऱ्या नगरसेवक व आमदारांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. 1998 नंतर शिवसेनेत मुख्यमंत्री होता येणार नाही, हे पाहून तेवढ्यासाठी ते सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये गेले. पण तिथे सुद्धा त्यांना फार काही मिळाले नाही. (महसूलमंत्री म्हणून राजकीय ताकद/ आर्थिक मिळकत किती असते माहिती नाही). आता इथून पुढे काँग्रेसमध्ये राहून हाती काहीच येणार नसल्याने त्यांनी सत्तेत असणाऱ्या भाजपशी जवळीक केलीय. अर्थात भाजप मध्ये त्यांना कितपत मोठेपणा मिळेल, याविषयी शंका आहे. अर्थात, राणे पिता-पुत्रांचे उपद्रव मूल्य खूप जास्त आहे, त्यामुळे त्यांना सांभाळणे ही मा. मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यासाठी नाजूक कसरतच असेल.

राघव 19/09/2017 - 16:12
उर्जा मत्रालयानं श्री. पियुष गोयल यांच्या कारकिर्दीत मागील ३ वर्षात चांगले काम केलेले दिसते - - पारंपारिक उर्जा स्त्रोतांत ६०,००० MW ने उत्पादन क्षमता वाढलेली आहे. २०१४-१५ मधे ८.४३%, २०१५-१६ मधे ५.४६% आणि २०१६-१७ मधे ४.७२% वाढ. - २०१६-१७ मधे नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार ला केली जाणारी वीज निर्यात २१३ मिलियन युनिट्स ने वाढलेली आहे. - पं. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत [DDUGJY] [गुजरातच्या ज्योती ग्राम योजनेवर आधारीत], एप्रील २०१५ मधे १८४५२ गावे वीजेविना होतीत त्यापैकी १३५११ गावांपर्यंत वीज पोचली आहे. याच योजनेअंतर्गत, Rural Feeder Monitoring Scheme सुरू करण्यात आलेली आहे, ज्यातून आलेली माहिती National Power Portal (NPP) वर मिळते. - अपारंपारिक उर्जा स्त्रोतांत २०१५-१६ मधे पवनचक्क्यांच्या माध्यमातून ३,४२३MW आणि सौरौर्जेतून ३०१९MW वाढ झालेली आहे. २०१६-१७ मधे अपारंपारिक उर्जास्त्रोतांच्या माध्यमातून झालेली एकूण वाढ ही पारंपारिक उर्जास्त्रोतांच्या माध्यमातून होणार्‍या वाढीपेक्षा प्रथमच जास्त आहे. Renewable Energy साठीचे २०१७ चे बजेट १५०० कोटी वरून ९००० कोटी पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. => डेटा Central Electricity Authority (CEA) वरून.

गामा पैलवान 19/09/2017 - 16:36
लोकहो, इक्बाल कासकर या दाऊद इब्राहीमच्या भावास खंडणीप्रकरणी अटक. बातमी इथे आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/iquabal-kasakar-arrested/articleshow/60739684.cms इक्बाल कधीच गुन्हेगार नव्हता (संदर्भ : एस. हुसेन झैदी यांचं डोंगरी ते दुबई या पुस्तकातलं द व्हाईट कासकर हे प्रकरण). मुंबई बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात दाऊद नेहमी स्वत:ला निर्दोष समजत आला आहे. १९९४ साली प्रथम याकूब मेमनला मुंबईस पाठवून त्याने कानोसा घेतला. त्यातून दाऊदला कळलं की आपण परत मुंबईस गेलो तर आपली गत त्याच्यासारखीच होईल. म्हणून काही वर्षे दाऊद गप्प बसला. पुढे २००३ साली त्याने इक्बाल नावाच्या आपल्या एका भावाला मुंबईस जाण्यास उद्युक्त केलं. (काही जण म्हणतात की इक्बाल स्वत:हून गेला. खखोदाजा.). हेतू अर्थात आपल्याविरुद्ध जनमत चाचपून बघण्याचा होता. इक्बालला मुंबई पोलिसांनी कुठलीशी केस उकरून कडून मोक्का लावला आणि चार वर्षे आत सडवला. सोबत पोलीस दलातला प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अधिकारी अस्लम मोमीन याच्या कारकिर्दीची आणि आयुष्याची मुंबई पोलिसांनी वाट लावली. त्याचा गुन्हा इतकाच की इक्बालची चकमकहत्या (=एनकाउंटर) होणार नाही म्हणून दिलासा दिला. पुढे बाहेर आल्यावर इक्बालने निवडणुका लढवायची तयारी सुरू केली. अरुण गवळीचं उदाहरण होतं समोर. अस्लम मात्र बहुतेक आजूनही अन्यायाविरुद्ध लढतोच आहे. इक्बालने अर्ज भरल्यावर कोण्या आयपीएस अधिकाऱ्याने त्याला 'समजावलं' की मुंबई पोलीस तुला 'सोडणार' नाहीत. त्याने निमूटपणे उमेदवारी मागे घेतली. एकंदरीत इक्बालला इतर टोळ्यांकडून अजिबात धोका नसून मुंबई पोलिसांकडून आहे. मुंबई पोलिसांना दाऊद आजिबात परत यायला नकोय. त्यासाठी त्यांची कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे. अस्लम आणि इक्बाल तर केव्हाही चिरडले जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर वरील बातमी महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे इक्बालला मुंबई पोलिसांनी अटक केली नसून ठाणे पोलिसांनी केली आहे. तसेच त्याच्यावरचे आरोप व खंडणीचा पीडित वगरे माहिती बाहेर फोडली नाही. त्याला खंडणीविरोधी कार्यालयात आणल्यावर वास्तूस सुरक्षारक्षकांनी गराडा घातला होता. इक्बाल खतरनाक सोडा, साधा गुन्हेगारही कधीच नव्हता. मग गराडा कशासाठी? त्याच्या बचावासाठीच ना? पाकिस्तानात लपलेल्या दाऊदला केवळ एकंच व्यक्ती हत्येपासून वाचवू शकते. ती म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी. दाऊद परत यायला बघतोय का? काहीतरी हालचाली नक्कीच चालल्या असणार. असं आपलं माझं मत. नुकतीच एक बातमी ऐकली. पाकिस्तानी माध्यम नियामक मंडळाने भारताविरुद्ध खोट्या बातम्या दिल्याबद्दल अनेक वाहिन्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. हे कधीही ऐकलं नव्हतं. मोदी नावाची जादू दिसते आहे. अशीच जादू दाऊद इब्राहीमवरही चालली असेल. खखोदाजा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आनंदयात्री 19/09/2017 - 19:55
>>सोबत पोलीस दलातला प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अधिकारी अस्लम मोमीन याच्या कारकिर्दीची आणि आयुष्याची मुंबई पोलिसांनी वाट लावली. म्हणजे काय? आणि अस्लम मोमीन प्रकरण काय आहे?

In reply to by आनंदयात्री

गामा पैलवान 19/09/2017 - 20:26
आनंदयात्री, अस्लम मोमीन प्रकरण थोडक्यात सांगतो. २००२/०३ साली दाऊद त्याचा इक्बालला मुंबईत पाठवू पहात होता. तेंव्हा मुंबई पोलीस इक्बालचं एनकाउंटर करतील अशी भीती होती. म्हणून इक्बालने अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी व नेत्यांशी संपर्क साधला. त्यापैकी एक अस्लम मोमीन. त्याने इक्बालला त्याची चकमकहत्या होणार नाही असा दिलासा दिला. कारण अस्लम पोलिसांत प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर म्हणून प्रसिद्ध होता. प्रतिष्ठितांना मध्यस्थ घेतात तसा तो होता. मात्र मुंबई पोलिसांना आणि अनेक नेत्यांना इक्बाल परत यायला नको होता. कारण उघड आहे. म्हणून मुंबई पोलिसांनी इक्बालला तर आत घेतलाच, शिवाय अस्लमवर गुन्हेगारांशी संबंध ठेवल्याचे खोटे आरोप लावले. आता पोलीस म्हंटला की गुन्हेगारांशी नाहीतर काय संतमहात्म्यांशी संबंध येणार का! पण हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे. केवळ अनधिकृत हत्या होणार नाही असा दिलासा देणं हा काही गंभीर गुन्हा नव्हे. ही सर्व कथा एस. हुसेन झैदी यांच्या डोंगरी ते दुबई या इंग्रजी पुस्तकातल्या The White Kaskar या प्रकरणात आहे. आ.न., -गा.पै.

ट्रेड मार्क 19/09/2017 - 19:35
'गेल्या वर्षभरापासून म्यानमारमध्ये होत असलेल्या हिंसाचाराला रोहिंग्या मुसलमानच जबाबदार आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे. देशहित डोळ्यासमोर ठेवूनच त्यांच्यावर कारवाई होत आहे. म्यानमारमध्ये कायदा-सुव्यवस्था व स्थैर्य राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जगाच्या निंदेला आम्ही घाबरत नाही,' अशी ठाम भूमिका म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान स्यू की यांनी मांडली आहे. संपूर्ण बातमी इथे. त्यांनी जागतिक मानवाधिकारवाल्यांना सुद्धा फटकारलं आहे. अशी कणखर भूमिका घेतल्याबद्दल कौतुक आहे.

In reply to by ट्रेड मार्क

अनिंद्य 21/09/2017 - 14:25
स्यू की यांच्या रोहिंग्यविरुद्धच्या धोरणाचे इतक्या घाईने घुमजाव होईल असे वाटले नव्हते. म्यांमारच्या आधी अगदी कडक आणि मग जागतिक दबावानंतर नरम पडलेल्या भूमिकेमुळे रोहिंग्या मुद्द्यावर भारतीय नीतीला शीर्षासन करावं लागलं आहे. हा दबाव मुख्यतः अमेरिका आणि जापान कडून आहे, चीनचा अपवाद सोडला तर तेच म्यांमारमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश आहेत सध्या. अगदी परवापर्यंत पाकिस्तानचे हस्तक, अरब आतंकवाद्यांशी संबंध वगैरे असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांसाठी (संदर्भ - सर्वोच्च न्यायालयात भारत सरकारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र आणि सरकारी वकिलाने केलेले भाष्य) सध्या युनोच्या बैठकांसाठी न्यूयॉर्क दौऱ्यावर असलेल्या सुषमाजी बांग्लादेशच्या पंतप्रधानांना अगत्याने भेटल्या. ह्या भेटीनंतर काही तासातच ढाका स्थित भारतीय दूतावासाने बांगलादेशातील सुमारे ४ लाख रोहिंग्या आश्रयाला असलेल्या शरणार्थी शिवीरांना तातडीने मदतीचा ओघ सुरु केला आहे. माझ्या मते बांगलादेशला ही 'मदत' पुढील काही वर्षे नक्कीच सुरु राहील - त्यातच सर्वांचे हित आहे. - अनिंद्य

In reply to by अनिंद्य

ट्रेड मार्क 21/09/2017 - 20:52
स्यू की यांनी काय रोहिंग्यांना बिनशर्त परत घेऊ असं जाहीर केलं की काय? अशी बातमी कुठे दिसत नाहीये. नक्की काय म्हणायचंय ते इस्कटून सांगता का? भारताने रेफ्युजींसाठी बांगलादेशला मदत पाठवली आणि पाठवत राहणार म्हणजे शीर्षासन केलं? तुमची अपेक्षा काय आहे की भारताने बांग्लादेशाबरोबर संबंध तोडून टाकावेत? अशांतता माजवणारे लोक आमच्या देशात नको हा म्यानमार आणि भारताचा पवित्रा असूनही बांगलादेशला ते रेफ्युजी सामावून घेण्यासाठी मदत करणार हे मात्र घुमजाव वाटतंय?

आनंदयात्री 19/09/2017 - 19:48
सरकारचे २०३० पर्यंत भारतीय वाहन उद्योगाला आमूलाग्र बदलण्याचे उद्दिष्ट्य आहे. पेट्रोल डिझेल वर चालणारी वाहने कालबाह्य होऊन भारतात फक्त इलेक्ट्रिक कार्सची विक्री होईल असे या बदलाचे स्वरूप आहे. हि बातमी वाचून पडलेले हे दोन प्रश्न, १. भारताचा पेट्रोलियम इम्पोर्ट वर होणार खर्च ६० बिलियन डॉलर्सने कमी होईल. लेखात म्हटल्याप्रमाणे पुढच्यावर्षी भारत सुमारे ८२ बिलियन डॉलर्स पेट्रोलियम इम्पोर्टवर खर्च करेल. म्हणजे २०३० नंतर ६० बिलियन डॉलर्स दरवर्षी वाचतील असेच ना? २. २०१५ मध्ये सुरु झालेली Faster Adoption and Manufacturing of Hybrid and Electric Vehicles (FAME) हि स्कीम का फसली?

In reply to by आनंदयात्री

राघव 19/09/2017 - 22:48
१. होय, ते दरवर्षीप्रमाणेच म्हणताहेत. पण हा डेटा किती ऑथोरेटीव्ह ते माहित नाही. २. लेखात म्हटल्याप्रमाणे ही स्कीम पूर्णपणे फसली असे मला वाटत नाही. हां, उशीर मात्र नक्कीच झाला आहे. - ह्या स्कीमची फेजेस मधे ६ वर्षांत अंमलबजावणी होणार होती. फेज १ दोन वर्षांसाठी प्लॅन केलेली होती. त्यासाठी दरवर्षी बजेटमधे तरतूद केलेली आहे. खालील दुव्यावर काही माहिती दिलेली आहे - लिंक - या योजनेअंतर्गत सरकार या वाहनांसाठी प्रोत्साहनपर सब्सिडी देवून त्यांचा खप वाढवू पाहते आहे कारण. मुख्य अडचण बॅटरीच्या किंमतीची आहे, तसेच बाकीचे इन्फ्रा कमी पडत असल्याने सर्वसाधारण किंमत जास्त आहे. अर्थात् हा केवळ एक उपाय आहे, पण सर्वसाधारण किंमत कमी झाल्याशिवाय या वाहनांचा खप वाढणार नाही. - ईस्रो या योजनेच्या अनुषंगानेच गडकरींच्या विनंतीवरून बॅटरी तयार करत होते, जी त्यांनी तयार केल्याची घोषणा झालेली आहे. लिंक१, - आता या बॅटरीचे भारतात व्यावसायिक स्तरावर उत्पादन केल्यास, बॅटरीची किंमत आवाक्यात येऊ शकेल. असे झाल्यास सर्वसाधारण किंमत बर्‍यापैकी कमी होणं अपेक्षीत आहे. काही कंपन्या यासाठी प्रयत्नशील आहेत, तसेच इस्रोनेही ह्या बॅटरीची टेक्नॉलॉजी देण्यास तयारी दाखवली आहे. लिंक२ - सध्या २०२० पर्यंतची तरतूद सरकारला या योजनेसाठी करायची आहे.
१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय. २) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत.

हात दाखवून अवलक्षण

नाखु ·

विशुमित 24/10/2016 - 10:36
इसकाळ वरील हे दोन्ही विचार पटले -- सैनिक कल्याण निधीसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेमागील भारतीय नागरिकांच्या भावनेबद्दल लष्कराच्या मनात जराही शंका नाही; मात्र, ही रक्कम राज ठाकरेंच्या खंडणीचा भाग असू शकत नाही. - मनमोहन बहादूर, एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) उत्तर कमांडचे माजी लेप्टनंट जनरल बी. एस.जैस्वाल यांनी म्हटले की, सैनिक कल्याण निधी कोणाला भीक मागत नाही. जर एखादा चित्रपट निर्माता सैनिक कल्याण निधीला योगदान देत असेल, तर त्याने अन्य भारतीय नागरिकांप्रमाणे मदत करावी. मात्र, यापद्धतीने जमा केलेला पैसा सैनिक कधीही स्वीकारणार नाही. सैनिक कल्याण निधीसाठी देण्यात येणारी रक्कम ही स्वेच्छेने देण्यात आली असल्यासच स्वीकारली जाते. खंडणी वा बळजबरी करून देण्यास भाग पाडलेला निधी हा सैनिक कल्याण निधीसाठी स्वीकारला जात नाही,‘

खेडूत 24/10/2016 - 11:09
समाज शेकडो विकृतींनी भरलेला आहेच. ही त्यातलीच एक मनोवृत्ती. आपल्याला राग आला की आपण एक सकारात्मक गोष्ट करावी, जेणेकरून आपल्याला थोडे समाधान मिळेल. या संस्थळावर जाऊन आपण सारेजण एक हजार किंवा त्या पटीत रक्कम देऊ शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक हजार कोटी रुपये तिथेही पडून आहेत, आणि दरवर्षी जमतात त्यातले निम्मेही खर्च् केले जात नाहीत.

मुद्दा क्र. १ व २ यावरच काथ्याकूट बास आहे! अशा वेळेस न्यायालय स्वत:हून मध्ये का पडू शकत नाही हाही मला पडलेला एक प्रश्न आहे. Sandy

हि सेटलमेंट म्हणजे राजकीय अपरिहार्यता वाटली, फडणवीस आणि राज ठाकरे यांची. ऐन दिवाळीत महाराष्ट्रात अशांतता हि गृहविभागाच्या दृष्टीने चान्गली गोष्ट नव्हती आणि आंदोलनात सहभागी लोकांची ऐन दिवाळीत अटक हि मनसेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नव्हती. तेव्हा हा मधला मार्ग काढला गेला असावा. बाकी "कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे" हे सार कशावरून ते कळले नाही. कारण मनसेने पैसे द्या आणि काहीही करा असे म्हटलेले नाही. त्यांची पत्रकार परिषद आणि मराठी वाहिन्यांवरून मला वाटतं ह्या खालील अटी मनसेने ठेवल्या होत्या - त्याही चित्रपट प्रदर्शितच न होऊ देण्याची भूमिका मागे घेण्यासाठी. १. चित्रपट निर्माता संघाने यापुढे पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेऊ नये असा निर्णय लिखित स्वरूपात द्यावा. २. करण जोहर ने आपल्या सिनेमाच्या सुरुवातीला जवानांना श्रद्धांजली वाहणारा फलक दाखवावा. ३. चित्रपट "चालो अथवा न चालो", करण जोहरने सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रुपये द्यावेत. ४. मनसे चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याची भूमिका मागे घेत आहे, चित्रपटावरील बहिष्कार कायम आहे आणि लोकांनाही तसे आवाहन आहे. यावरून पैसे द्याआणि पाक कलाकरांना आणा असा अर्थ निघू शकत नाही. बाकी शेपटाला कशाकशाचे आणि कसले कसले बोळे लावून आग लावत फिरणाऱ्या इतर कोणाचीही जनतेला घृणा वाटत नाही हे काही नवल नाही. बाकी मनसेने ह्या प्रकरणात काय केले असते तर ते सर्वग्राह्य झाले असते ते वाचायला आवडेल. बाकी आज ऐकलेल्या दोन बातम्यांनी मन विषण्ण झाले. आपले बीएसएफचे अजून एक जवान गुरनामसिंग शहीद झाले आणि इकडे श्याम बेनेगल यांनी फवाद खान याला घेऊन चित्रपट काढायचा ठरवल्याचे बातमी ऐकिवात आली. छान आहे!

मृत्युन्जय 24/10/2016 - 11:46
सरकारने यापुढे मांडवली किंग म्हणुन नावलौकिक कमवावा. या क्षेत्रात त्यांना बर्‍याच संधी आहेत आणि सरकारचे अश्या प्रकरणांना हाताळण्याचे कौशल्य देखील वादातीत दिसते. पाकिस्तानी कलाकारांनी चित्रपटांमध्ये काम करु नये अशी इच्छा एखाद्या पक्षाची मनसा असण्यात काहिच गैर नाही. सर्वसामान्य जनतेची अशी भावना किंवा इच्छा होणे देखील समजु शकते. सर्वसामान्यांच्या भावनांना आवाहन घालत स्वतःची इमेज सुधारण्याचा एखाद्या पक्षाचा प्रयत्न देखील समजुन येतो, पण ... पण जर: १. पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन चा दर्जा अजुनही काढुन घेतला गेलेला नसेल २. पाकिस्तानी नागरिकांना (भारतीय संविधानानुसार बनवलेल्या) कायद्याने भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी नसेल ३. चित्रपट वगळता इतर क्षेत्रांत हे साटेलोटे चालुच असेल तर मग २-४ भारतीय चित्रपटांत काम करुन पाकिस्तानी अभिनेत्यांनी असे काय घोडे मारले आहे? बर मारलेच असेल तर सरकार काय झोपा काढते आहे काय? बर झोपा काढत असेल तर त्याची झळ सामान्य (पक्षी करण जोहर इत्यादी) नागरिकांनी का सोसावी? जर सरकारने या सव्रांवर बंदी घालणारा कुठलाही कायदा आणला नसेल, जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर सरकारची ही नैतिक आणी कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी अश्या चित्रपटांना योग्य ती सुरक्षा द्यावी आणि एखाद्या पक्षाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा. मनसेबरोबर मांडवली करायला लावुन फडणावीसांनी असे चित्र निर्माण केले आहे की जणू: १. मनसे म्हणजे प्रतिसरकार आहे २. राज ठाकरे हे सर्वोच्च पातळीवरचे देशभक्त आहेत (तसे ते नाहित असे काही मी म्हणत नाही.) ३. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी आहे ४. यापुढे व्यवसाय / धंदा करण्यापुर्वी फक्त कायदा पाळणे महत्वाचे नसुन सर्व राजकीय पक्षांची महत्वाकांक्षा आणि त्यांची व्हिजन पाळणेही महत्वाचे आहे. ५. सरकार इतके नाकर्ते आहे की एका नगण्य अस्तित्व असलेल्या राजकीय पक्षासमोर देखील त्याला मान तुकवावी लागते. ६. कायदा आणि सुवव्यवस्था इतकी विस्कळीत आहे की हम करे सो कायदा म्हणणार्‍या विचारशक्तीच्या खळळ खट्ञाक परंपरेला आभान देउ शकत नाही. हे असले मांडवली धंदे करण्यापेक्षा सरकारने चित्रपटांना चोख सुरक्षा द्यायला हवी होती, या विरोधात जाउन हिंसात्मक निदर्शने करणार्‍ञांवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, योग्य वेळीस अशातता माजवण्यार्या घटकांना कायदेशीर आणी सनदशीर मार्गाने योग्य समज द्यायला हवी होती. पण तसे केल्याने विरोधकांनी सरकारच्या "देशभक्तीवर" ताशेरे ओढवले असते. याला भिन बहुधा सरकारने असले उरफाटे निर्णय घेतले असावेत,

In reply to by मृत्युन्जय

अधोरेखित करण्यासारखा मुद्दा म्हणजे:
३. चित्रपट वगळता इतर क्षेत्रांत हे साटेलोटे चालुच असेल तर मग २-४ भारतीय चित्रपटांत काम करुन पाकिस्तानी अभिनेत्यांनी असे काय घोडे मारले आहे? बर मारलेच असेल तर सरकार काय झोपा काढते आहे काय? बर झोपा काढत असेल तर त्याची झळ सामान्य (पक्षी करण जोहर इत्यादी) नागरिकांनी का सोसावी? जर सरकारने या सव्रांवर बंदी घालणारा कुठलाही कायदा आणला नसेल, जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर सरकारची ही नैतिक आणी कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी अश्या चित्रपटांना योग्य ती सुरक्षा द्यावी आणि एखाद्या पक्षाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा.
पाकीस्तान बरोबर मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवहार राजरोसपणे सुरू असतील. मालाची आयात-निर्यात सुरळीत सुरू असेल. सीमेवर बससेवा निर्धोक सुरू असेल. लोकांचे येणे-जाणे इकडून तिकडे नेहमीसारखे सुरू असेल तर फक्त चित्रपट उद्योगाला मार का?? Sandy

In reply to by चांदणे संदीप

साहना 25/10/2016 - 06:21
राज ठाकरे काही मूर्ख नाहीत. चित्रपट हा time sensitive धंदा आहे. योग्य वेळी चित्रपट रिलीस नाही झाला काही दिवस जरी लेट झाला तरी गल्ला ५०% कमी होऊ शकतो. त्यामुळे मूठभर गुंड घेऊन खूप त्रास निर्माण करता येतो.

In reply to by मृत्युन्जय

शब्दबम्बाळ 24/10/2016 - 14:30
आणि हि असली मांडवली मुख्यमंत्र्यांनी दोन्ही 'पार्टींना' आपल्या बंगल्यावर बोलावून करावी हे पाहून भयानक चीड आली! महाराष्ट्रात काय राजेशाही आहे कि हुकूमशाही? म्हणजे मनात आलं कि एखादी गोष्ट स्वतःच चुकीची ठरवून, त्यावर 'निवाडा' करण्यासाठी लोकांना बोलवून दंडाची रक्कम आणि शिक्षेचे स्वरूप स्वतःच ठरवून परत, हि आमच्या रयतेची इच्छा होती म्हणूनच कारवाई केली असे म्हणणे?! असल्या प्रवृत्तींना 'सरकारमान्यता' मिळून गेली या प्रसंगातुन... आता असले कुठलेही राजकीय अस्तित्वासाठी झगडणारे पक्ष आपल्या 'मना'नुसार लोकांना वेठीला धरणार आणि सरकार समंजसपणे मध्यस्ती करून मांडवली घडवून आणणार!(अर्थात स्वतःचा फायदा दिसत असेल तरच!) "या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.">> आयते कोलीत म्हणजे काय? हा जो काही कारनामा केला गेला आहे, तो काही अनावधानाने केला आहे असे आपल्याला वाटते का? स्पष्ट राजकीय खेळी आहे हि... आपल्याला आठवत असेल पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात गोंधळ करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या तेव्हा सरकारने पोलीस बंदोबस्तात तो कार्यक्रम पार पडला होता. कारण त्यावेळी कणखर सरकार हि प्रतिमा दाखवून द्यायची होती! आता, निवडणूक जवळच आहेत आणि शिवसेनेला धडा देखील शिकवायचा आहे. मग शिवसेनेची मते खाणारा पक्ष कोणता तर मनसे! त्याला जरा बळकटी देणे पण गरजेचे आहे... पण हे सगळे जनकल्याणार्थ असेही दिसले पाहिजे, मग सैन्यदल आठवते! सैन्याला समर्थन म्हणजेच राष्ट्रवाद हि जी प्रतिमा आजकाल बनवायची चालली आहे ती देशाला घातक आहे असे वाटते! त्या विरोधात जास्त काही बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह असे काहीसे चित्र तयार होऊ लागले आहे...

In reply to by शब्दबम्बाळ

श्रीगुरुजी 24/10/2016 - 14:50
आणि हि असली मांडवली मुख्यमंत्र्यांनी दोन्ही 'पार्टींना' आपल्या बंगल्यावर बोलावून करावी हे पाहून भयानक चीड आली!
राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने राज्यात शांतता राखणे हे मुख्यमंत्र्यांना करावेच लागते. जर बोलणी करून हिंसक आंदोलन रद्द करता येत असेल तर त्यात काय चुकीचे आहे. जर बोलणी करूनसुद्धा समोरचा ऐकत नसेल तर शेवटी पोलिस वापरावेच लागले असते.
आपल्याला आठवत असेल पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात गोंधळ करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या तेव्हा सरकारने पोलीस बंदोबस्तात तो कार्यक्रम पार पडला होता. कारण त्यावेळी कणखर सरकार हि प्रतिमा दाखवून द्यायची होती!
दोन्ही गोष्टीत प्रचंड फरक आहे. पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध फक्त मूठभरांचाच होता. सामान्य जनतेत याविषयी विरोधाची भावना नव्हती. याउलट सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानविरोधी भावना आहे व काहीही करून, कोणत्याही मार्गाने पाकिस्तानला अद्दल घडवा ही जनतेची मागणी आहे. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम हा फक्त एकदाच व एकाच ठिकाणी होणार होता. त्यामुळे त्या कार्यक्रमाला पोलिस संरक्षण देणे फारच सोपे होते. याउलट हा चित्रपट राज्यात शेकडो चित्रपटगृहातून अनेक दिवस दाखविला जाणार होता. इतके दिवस इतक्या सर्व ठिकाणी पोलिस संरक्षण देणे हे अत्यंत अवघड होते.

In reply to by श्रीगुरुजी

मराठी_माणूस 24/10/2016 - 15:53
याउलट सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानविरोधी भावना आहे व काहीही करून, कोणत्याही मार्गाने पाकिस्तानला अद्दल घडवा ही जनतेची मागणी आहे.
जनतेला चित्रपट न बघण्याचा अहींसक मार्ग उपलब्ध आहे. चित्रपट न बघणे हा गुन्हा होउ शकत नाही.कोणाला काहीही करायची गरज नाही. सुंठी वाचुन खोकला जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

साहना 25/10/2016 - 06:28
> राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने राज्यात शांतता राखणे हे मुख्यमंत्र्यांना करावेच लागते. उद्या मुख्यमंत्र्यांनी tutu घालून चौपाटीवर नाच करून शांतता आणता येईल तर करावी काय ? कायद्याची कसोटी तेंव्हाच असते जेंव्हा कायद्याची अंबलबजावणी करणे कठीण असते. खंडणी देऊन कसली शांतता ? मग द्यावे काश्मीर पाकिस्तानला आणि घ्यावी विकत शांतता ! > पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध फक्त मूठभरांचाच होता. विरोध १ माणसाचा असेल किंवा १०० कोटी जनतेचा काहीही फरक पडत नाही. रिपब्लिक ह्याचा अर्थच मुळांत कायद्याचे राज्य असा असतो. कायदा लागू करण्याचे काम मुख मंत्र्यांचे आहे. "बाई संध्याकाळी वाड्यावर या मदत केली जाईल " हे निळू फुलेंचे (चित्रपट मधील) काम आहे. लोकांची भावना असेल पाकिस्तान विरोधी तर लोक पाहणार नाहीत चित्रपट. आणि एक आमदार असणाऱ्या राज ठाकरेला मूठभर नाही तर काय म्हणायचे ? > इतके दिवस इतक्या सर्व ठिकाणी पोलिस संरक्षण देणे हे अत्यंत अवघड होते. तर उद्या हिजाब ना घालता येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकू अशी कुना मुस्लिम संघटनेने धमकी दिल्यास मुख्यमंत्री वाटाघाटी करून "मुलींनी फक्त केस झाकावेत" हा तोडगा काढणार आहेत का ? पक्ष भक्ती आणि व्यक्ती पूजा सुविचारी माणसाला सुद्धा कशी लाचार बनवू शकते हे तुमचे उत्तर दाखवून देते.

विशुमित 24/10/2016 - 12:33
हे असले मांडवली धंदे करण्यापेक्षा सरकारने चित्रपटांना चोख सुरक्षा द्यायला हवी होती, या विरोधात जाउन हिंसात्मक निदर्शने करणार्‍ञांवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, योग्य वेळीस अशातता माजवण्यार्या घटकांना कायदेशीर आणी सनदशीर मार्गाने योग्य समज द्यायला हवी होती.>>> -- सहमत..

श्रीगुरुजी 24/10/2016 - 13:25
या वादात एकूण ३ हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) होते. करण जोहर (म्हणजेच निर्माते), राज ठाकरे (म्हणजेच मनसे) आणि फडणविस (म्हणजेच राज्य सरकार). तसे चित्रपटगृहांचे मालक, वितरक, प्रेक्षक इ. सुद्धा हितसंबंधी होते, परंतु वरील ३ हे प्रमुख हितसंबंधी होते. - यातील करण जोहरची भूमिका पूर्णतः कायदेशीर असली तरी ती लोकभावनेच्या दृष्टीकोनातून अयोग्य होती. - राज ठाकरेची भूमिका पूर्णत: बेकायदेशीर असली तरी ती लोकभावनेच्या दृष्टीकोनातून योग्य होती. - फडणविसांना कायदेशीर भूमिकेच्या बाजूने उभे राहणे बंधनकारक होते आणि त्याचवेळी लोकभावनेकडे पूर्ण दुर्लक्ष करूनही चालले नसते. राज्य सरकारला कोणत्याही तर्‍हेने हिंसाचार, तोडफोड होऊन न देता कायद्याच्या बाजूने उभे राहण्याची व त्याचवेळी लोकभावनेचा आदर करण्याची दुहेरी कसरत करायची होती. समजा राज्य सरकार पूर्ण गप्प राहून या वादात पडलेच नसते तर तोडफोड वगैरे होऊन प्रचंड नुकसान होऊन अशांतता निर्माण झाली असती व बेकायदेशीर मार्गाचा विजय झाला असता व त्यामुळे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली असती. समजा राज्य सरकारने लोकभावनेकडे पूर्ण दुर्लक्ष करून चित्रपटाला पूर्ण संरक्षण दिले असते तरीसुद्धा तोडफोड, लाठीमार होऊनही चित्रपट चालू राहिलाच असता व अशा परिस्थितीत आपण लोकभावनेकडे दुर्लक्ष करून विजय मिळविला व भविष्यात सुद्धा याच मार्गाने पाकड्यांना घेऊन चित्रपट निर्माण करून सरकारच्या संरक्षणाखाली चित्रपट प्रदर्शित करू शकतो अशी विजयी भावना करण जोहरच्या मनात निर्माण होऊन त्याने आपल्यात भूमिकेत कोणताही बदल केला नसता. अशा परिस्थितीतही लोकभावनेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका राज्य सरकारवर आला असता. त्यामुळे कायदेशीर बाजूने उभे राहणे व त्याचवेळी लोकभावनेचा आदर करण्याच्या भूमिकेच्या बाजूने उभे राहणे हे राज्य सरकारसाठी आवश्यक होते. या दोन्ही गोष्टी या विशिष्ट प्रकरणात पूर्णतः परस्परविरोधी असल्याने राज्य सरकारची पंचाईत झाली होती. इतर कोणत्याही सूज्ञ सरकारने जे केले असते तेच फडणविसांनी केले. अशांतता व हिंसाचार टाळण्यासाठी त्यांनी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला व त्यात यश आले. मनसेने चित्रपटाविरूद्ध आंदोलन न करण्याचे मान्य केल्यामुळे कायदा हातात घेण्याचा प्रश्न निकालात निघाला. त्याचवेळी भविष्यात पाकड्यांना काम ने देण्याचे जाहीर केल्यामुळे लोकभावनेचाही आदर राखला गेला. त्याचबरोबर सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रूपये देणगी देण्याचे जाहीर करून करण जोहरने सैनिकांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. अर्थात तो खरोखरच ५ कोटी देईल का, भविष्यात पाकड्यांना न घेण्याचा निर्णय खरोखरच पाळेल का हे आज तरी सांगता येणे अवघड आहे. या ५ कोटीला खंडणी म्हणणे पटत नाही कारण हे पैसे सैनिकांना जाणार असून राज ठाकरेच्या खिशात जाणार नाहीत. या चर्चेत काही डील झाले का, राजला टेबलाखालून काही मिळाले का, फडणविस मनसेपुढे झुकले का इ. गोष्टी अजून तरी माहित नाहीत व जोपर्यंत त्याविषयी काही ठोस माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याबद्दल स्पेक्युलेशन करणे योग्य नाही. माझ्या दृष्टीने दृष्टीने फडणविसांनी एका वादग्रस्त व अशांतता निर्माण करू शकणार्‍या या स्फोटक विषयावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी योग्य प्रयत्न केले व त्यात ते यशस्वी झाले. माझ्या दॄष्टीने हा विन-विन तोडगा होता.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 24/10/2016 - 19:24
मृत्युंजय साहेबांनी केलेला प्रतिवाद पुरेसा आहे, मी केल्यास पुनरुक्ती होईल , वेळेचा अपव्यही!

In reply to by श्रीगुरुजी

मृत्युन्जय 24/10/2016 - 15:06
सरकारने सनदशीर आणी कायदेशीर मार्गाने या प्रकरणाचा निकाल लावणे अपेक्षित होते. हा विन विन तोडगा नाही. ही तर चक्क मांडवली आहे. एका नगण्य अस्तित्व असलेल्या पक्षाविरुद्ध कायद्याचा आणि पोलिस यंत्रणेचा वापर करुन जर निर्दोष चित्रपटनिर्मात्याला संरक्षण पुरवता येत नसेल तर ते सरकारचे नाकर्तेपण आहे, सूज्ञपणा नाही. सरकारचे काम काय्दा आणि सुव्यवस्था राखणे आहे. कायद्याच्या विरोधात जाउन अहिंसक मार्गांचा अवलंब करणार्‍यांना लोकभावनेच्या गोंडस नावाखाली पाठिशी घालणे हे नाही. ही गोष्ट (पाकिस्तानी कलाकारांना काम देणे) जर बेकायदेशीर असले असते तर मी चित्रपट प्रदर्शनालाचा विरोध केला असता. आणी जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर त्याला नाहक या मनस्तापाला तोड द्यावे लागणे हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे. कुठलाही सोम्यागोम्या पक्ष, संघटना अथवा व्यक्ती अश्याप्रकारे व्यावसायिकांना आणि सरकारला धारेवर धरु शकत नाही. लोक्भावना महत्वाची आहेच पण ती कधीही कायद्यापेक्षा वरचढ होउ शकत नाही. होत असेल तर कायदे बदलणे सरकारच्या हातात आहे आणि मग लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करणे हे देखील. बलात्कार्‍याला भर चौकात गुप्तांग तोडुन मग फाशी द्यावी ही लोकभावना झाली पण जर ते कायद्याच्या विरोधात असेल तर तसे न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बलात्कार्‍याला कायद्यानुसार शिक्षा जरुर द्यावी पण उद्या लोकभावनेचा आदर म्हणुन मांडवली करुन "गुप्तांग न कापता " केवळ भर चौकात बांधुन १०० फटक्यांची शिक्षा आणि मग भर चौकात फाशी ही मांडवली सरकारने करणे अपेक्षित नाही मग ती भलेही सो कॉल्ड विन विन सिच्युएशन का असेना. एकीकडे सरकार पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न करणार. फील गुड फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न करणार मग एखाद्या चित्रपट निर्मात्याने पाकड्यांना घेउन चित्रपट काढला की त्याला वेठीस धरणार. हे कसे जमावे. चित्रपट बनवायला ३-४ महिन्यांचा कालावधी जातो, कधी कधी वर्षभराचा सुद्धा. मग अश्यावेळेस एकाएकी (युद्ध पुकारलेले नसताना आणी असे करणे बेकायदेशीर नसताना) केवळा कुणीतरी माणुस किंवा व्य्क्तीसमूह अशी मागणी करतो म्हणून एकाएकी चित्रपट बॅन करण्याला माझा विरोध आहे. शिवाय जर हा निर्णय लोकभावनेचा आदर ठेउन घेतला असेल तर सर्वोत्तम मार्ग होता की चित्रपट प्रदर्शित होउ देणे. जर जनभावना इतकीच विरोधात होती तर चित्रपट साफ कोसळलाच असता की. लोकभावना दिसलीच असती. प्रत्यक्षात मात्र ही भावनाप्रधान जनता मोठ्या प्रमाणावर चित्रपट पहायला उत्सुक असेल. मनसे ज्या लोकभावनेच्य आधारावर हे राजकारण करते आहे ती जनता पाकिस्तानी कलाकार चित्रपटात आहे म्हणुन पेटुन उठुन कदाचित चित्रपटाचा द्वेष करेल पण तरीही चित्रपट पाहिलच. मग कसली आलीय डोंबलाची भावना. कित्येकांना या सगळ्या प्रकरणाशी काडीचे घेणेदेणे नसेल. खास पब्लिसिटी केलेले ऐश्वर्या रणबीर ची गरमा गरम चुंबनालिंगनादी दृष्ञे पाहण्यासाठी चित्रपटात गर्दी देखील होइल आणि मग चित्रपट संपल्यावर या भावनाशील लोकांपैकीच काही लोक "फवाद कित्ती क्युट दिसतो ना?" म्हणून उसासे पण सोडतील. त्यामुळे लोकभावनेच्या गोंडस आवरणाखाली नाकर्तेपणा लपवण्याचा जो प्रकार चालला आहे तो निव्वळ हास्यास्पद आहे. खरे सांगायचे तर स्वतः प्रमोट करत असलेल्या नॅशनलिजमच्या बुरख्याआडुन केल्या गेलेल्या या शरसंधानाला तोंड कसे द्यावे हे भाजपाला कळत नाही आहे. करण जोहरला संरक्षण द्यावे तर नॅशनलिजम आडवा येतो आणि न देणे " सरकार " साठी शक्य नाही. त्यातुन हा बनियाचा मध्यममार्ग निघाला. पण हा राजधर्म होउ शकत नाही.

In reply to by मृत्युन्जय

प्लसच वन, शिवाय लोकभावना लोकभावना करणाऱ्यांना आत्ता बोलूनही उपयोग नाहीये मृत्युंजय भाऊ, हातच्या काकणाला आरसा कश्याला ह्या नियमाने, करण जोहरचा जो सिनेमा (नावही आठवत नाही) रीलीज होणार आहे, त्याचे कलेक्शन फिगर पाहून ही लोकभावना होती का लोकभावनेच्या गोंडस नावाखाली मांडवली होती हे चित्र स्पष्ट होईलच, तोवर तुमच्या प्रतिसादाला मम् म्हणतो आम्ही बापडे

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 24/10/2016 - 15:38
सरकारने सनदशीर आणी कायदेशीर मार्गाने या प्रकरणाचा निकाल लावणे अपेक्षित होते. हा विन विन तोडगा नाही. ही तर चक्क मांडवली आहे. एका नगण्य अस्तित्व असलेल्या पक्षाविरुद्ध कायद्याचा आणि पोलिस यंत्रणेचा वापर करुन जर निर्दोष चित्रपटनिर्मात्याला संरक्षण पुरवता येत नसेल तर ते सरकारचे नाकर्तेपण आहे, सूज्ञपणा नाही.
सरकारने सनदशीर व कायदेशीर मार्गानेच या प्रकरणावर तोडगा काढलेला आहे. जर कायद्याच्या बडग्याची सक्ती करण्यापेक्षा चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटत असेल तर सर्वप्रथम चर्चेचाच मार्ग स्वीकारावा लागतो व फडणविसांनी तेच केले आहे. या प्रकरणातील दोन्ही बाजूंनी काही गोष्टी मान्य केल्या आहेत ज्या संपूर्णपणे कायदेशीर आहेत. मनसेच्या आंदोलनाविरूद्ध निश्चितच पोलिस यंत्रणेचा वापर करता आला असता. परंतु पोलिस वापरूनसुद्धा तोडफोड, हिंसात्मक आंदोलन पूर्णपणे टाळता आले नसते. श्रीनगरमध्ये अनेक महिने संचारबंदी असूनसुद्धा व सैनिक/पोलिस अश्रुधूर, पेलेट गन्स इ. चा वापर करत असूनसुद्धा जनता दगडफेकीसाठी संचारबंदी मोडून रस्त्यावर येत होती. इथे तर फक्त लाठ्या हातात असलेले थोडे पोलिस चित्रपटगृहांवर तैनात असते व आंदोलकांनी त्यांना भीक घातली नसती. राज्य सरकारने चित्रपटाला संरक्षण द्यायचे आधीच कबूल केले होते, चित्रपटावर बंदी घालणार नसल्याचेही सांगितले होते, मनसेच्या काही कार्यकर्त्यांना आधीच अटक झाली होती व चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी मनसेचे बरेच कार्यकर्ते पकडले गेले असते. एवढे होऊनसुद्धा अशांतता टाळता आली नसती. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून कायदेशीर तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.
सरकारचे काम काय्दा आणि सुव्यवस्था राखणे आहे. कायद्याच्या विरोधात जाउन अहिंसक मार्गांचा अवलंब करणार्‍यांना लोकभावनेच्या गोंडस नावाखाली पाठिशी घालणे हे नाही. ही गोष्ट (पाकिस्तानी कलाकारांना काम देणे) जर बेकायदेशीर असले असते तर मी चित्रपट प्रदर्शनालाचा विरोध केला असता. आणी जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर त्याला नाहक या मनस्तापाला तोड द्यावे लागणे हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे. कुठलाही सोम्यागोम्या पक्ष, संघटना अथवा व्यक्ती अश्याप्रकारे व्यावसायिकांना आणि सरकारला धारेवर धरु शकत नाही.
सरकार कायद्याचे पालन करीत होतेच. राज्य सरकारने चित्रपटाला संरक्षण द्यायचे आधीच कबूल केले होते आणि चित्रपटावर बंदी घालणार नसल्याचेही सांगितले होते कारण या दोन्ही गोष्टी कायद्याच्या विरूद्ध झाल्या असत्या. जर मनसेने हिंसक आंदोलन केले असते तर त्याला तोंड द्यायची सरकारची तयारी होतीच. परंतु कोणत्याही परिस्थितीत सर्वात आधी चर्चेच्या माध्यमातून कायदेशीर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे व चर्चा अपयशी झाल्यास कायद्याच्या बडग्याची सक्ती करणे हेच मार्ग सरकारपुढे असतात व फडणविसांनी नेमके तेच केले आहे.
लोक्भावना महत्वाची आहेच पण ती कधीही कायद्यापेक्षा वरचढ होउ शकत नाही. होत असेल तर कायदे बदलणे सरकारच्या हातात आहे आणि मग लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करणे हे देखील. बलात्कार्‍याला भर चौकात गुप्तांग तोडुन मग फाशी द्यावी ही लोकभावना झाली पण जर ते कायद्याच्या विरोधात असेल तर तसे न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बलात्कार्‍याला कायद्यानुसार शिक्षा जरुर द्यावी पण उद्या लोकभावनेचा आदर म्हणुन मांडवली करुन "गुप्तांग न कापता " केवळ भर चौकात बांधुन १०० फटक्यांची शिक्षा आणि मग भर चौकात फाशी ही मांडवली सरकारने करणे अपेक्षित नाही मग ती भलेही सो कॉल्ड विन विन सिच्युएशन का असेना.
लोकभावना कायद्यापेक्षा वरचढ होऊ शकत नाही, परंतु लोकभावनेकडे पूर्णपणे दुर्लक्षही करता येत नाही. कायदे बदलणे ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे व या विशिष्ट प्रकरणात इतक्या कमी वेळात कायदे बदलणे अशक्य आहे. लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करता येतो आणि चर्चेच्या माध्यमातून नेमके तेच झाले आहे. निदान भविष्यात तरी पाकड्यांना चित्रपटात घेणार नाही ही जाहीर कबुली हे त्याचेच उदाहरण आहे.
एकीकडे सरकार पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न करणार. फील गुड फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न करणार मग एखाद्या चित्रपट निर्मात्याने पाकड्यांना घेउन चित्रपट काढला की त्याला वेठीस धरणार. हे कसे जमावे. चित्रपट बनवायला ३-४ महिन्यांचा कालावधी जातो, कधी कधी वर्षभराचा सुद्धा. मग अश्यावेळेस एकाएकी (युद्ध पुकारलेले नसताना आणी असे करणे बेकायदेशीर नसताना) केवळा कुणीतरी माणुस किंवा व्य्क्तीसमूह अशी मागणी करतो म्हणून एकाएकी चित्रपट बॅन करण्याला माझा विरोध आहे.
संबंध हे एकतर्फी सुधारत नसतात. संबंध सुधारणे हा एकेरी मार्ग नसतो. भारताने आपल्या बाजूने संबंध सुधारण्याचे असंख्य प्रयत्न केले आहेत. परंतु ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. एखाद्या पाकड्याला चित्रपटात घेतल्यामुळे संबंध सुधारतील असे मानणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे. चित्रपट बॅन झालेला मला आवडला असता. परंतु तसे करणे कायदेशीर नाही व त्यामुळे तसे होणे शक्य नाही.
शिवाय जर हा निर्णय लोकभावनेचा आदर ठेउन घेतला असेल तर सर्वोत्तम मार्ग होता की चित्रपट प्रदर्शित होउ देणे. जर जनभावना इतकीच विरोधात होती तर चित्रपट साफ कोसळलाच असता की. लोकभावना दिसलीच असती. प्रत्यक्षात मात्र ही भावनाप्रधान जनता मोठ्या प्रमाणावर चित्रपट पहायला उत्सुक असेल. मनसे ज्या लोकभावनेच्य आधारावर हे राजकारण करते आहे ती जनता पाकिस्तानी कलाकार चित्रपटात आहे म्हणुन पेटुन उठुन कदाचित चित्रपटाचा द्वेष करेल पण तरीही चित्रपट पाहिलच. मग कसली आलीय डोंबलाची भावना. कित्येकांना या सगळ्या प्रकरणाशी काडीचे घेणेदेणे नसेल. खास पब्लिसिटी केलेले ऐश्वर्या रणबीर ची गरमा गरम चुंबनालिंगनादी दृष्ञे पाहण्यासाठी चित्रपटात गर्दी देखील होइल आणि मग चित्रपट संपल्यावर या भावनाशील लोकांपैकीच काही लोक "फवाद कित्ती क्युट दिसतो ना?" म्हणून उसासे पण सोडतील.
भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात एखाद्या गोष्टीवर एकमत होणे जवळपास अशक्य आहे. जर लोकांना पाकड्यांची तीव्र चीड असेल तर ते नक्कीच तो चित्रपट बघणार नाहीत.
त्यामुळे लोकभावनेच्या गोंडस आवरणाखाली नाकर्तेपणा लपवण्याचा जो प्रकार चालला आहे तो निव्वळ हास्यास्पद आहे. खरे सांगायचे तर स्वतः प्रमोट करत असलेल्या नॅशनलिजमच्या बुरख्याआडुन केल्या गेलेल्या या शरसंधानाला तोंड कसे द्यावे हे भाजपाला कळत नाही आहे. करण जोहरला संरक्षण द्यावे तर नॅशनलिजम आडवा येतो आणि न देणे " सरकार " साठी शक्य नाही. त्यातुन हा बनियाचा मध्यममार्ग निघाला. पण हा राजधर्म होउ शकत नाही.
नॅशनलिझमचा कसला आला आहे बुरखा? सत्ताधारी पक्ष या नात्याने भाजप ती जबाबदारी ओळखूनच हे प्रकरण हाताळत आहे. फडणविसांनी संघर्षाचा मार्ग टाळून दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून एक कायदेशीर तोडगा काढून शांतताभंग टाळला व लोकभावनेचाही आदर केला.

In reply to by श्रीगुरुजी

सरकारने सनदशीर व कायदेशीर मार्गानेच या प्रकरणावर तोडगा काढलेला आहे. कुठल्या सनदी नुसार हा सनदशीर तोडगा काढला आहे म्हणे? कायदेशीर म्हणता आहात तर कुठल्या कायद्यान्वये हा तोडगा वर्षांवर काढायचा ठरला त्याचा मसुदा किंवा किमान कलम क्रमांक अन त्या कलमाची वाक्यरचना विदास्वरूप द्यावीत ही नम्र विनंती. जाता जाता सनदशीर ह्या शब्दाचा उगम सनद उर्फ इंग्रजीत "charter" ह्यावरून आलेला आहे त्यामुळे सनदशीर म्हणले की मूळ सनदीची संहिता देणे बंधनकारक असते किंवा त्या सनदीच्या अंतर्गत कार्य करणे अपेक्षित असते म्हणूनच टॅली प्रो वापरणारे खंडीभर "अकाउंटंट" असले तरी महत्व "चार्टर्ड अकाउंटंट" उर्फ सनदप्राप्त सनदी लेखपालालच असते, हेच सीएस, वकील, डॉक्टर इत्यादी पेशांना सुद्धा लागू होते, ह्याची नोंद घेऊन संबंधितांनी "सनदशीर" हा शब्द वापरला असावा अशी अपेक्षा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कुठल्या कोर्टाने "असे वाद झाल्यास परस्पर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दोन्ही वादी अन फिर्यादी पक्षाला बोलवून तोडगा काढावा अन शांतता प्रस्थापित करावी" असा आदेश दिलाय का? असल्यास तो लेखी असेलच, त्याची प्रत जमल्यास द्यावी ही विनंती, तसेही असे आदेश द्यायचेच असले तर ती शक्ती फक्त सुप्रीम कोर्टाकडे आहे असे वाटते, कारण "एपेलेट ज्यूरीसडीक्शन" फक्त सुप्रीम कोर्टाचे असते असे वाटते, तरीही असा कायदा असल्यास तो द्यावा म्हणजे पुढील अभ्यासाला बरे पडेल

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 24/10/2016 - 20:44
फडणविसांनी राज व करणला एकत्र बोलावून तोडगा काढण्याचे केलेले प्रयत्न हे बेकायदेशीर किंवा घटनेच्या विरोधी होते का? एखाद्या वादावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची पद्धत अनेक वर्षांपासून वापरली जाते. १९८५ मध्ये राजीव गांधींनी शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटी या धार्मिक संस्थेशी व त्या संस्थेच्या लोंगोवाल (जे कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते किंवा निवडून आलेले जनतेचे प्रतिनिधीही नव्हते) यांच्याशी वाटाघाटी करून तोडगा काढला होता. त्याच वर्षी अखिल आसाम विद्यार्थी परीषदेच्या विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा काढण्यात आला होता. १९८६ मध्ये मिझोराममधील बंडखोर लाल डेंगाशी वाटाघाटी करून शांततेसाठी तोडगा काढण्यात आला होता. फुटिरतावादी हुरियत नेत्यांशी सुद्धा केंद्र सरकारने वाटाघाटी केल्या आहेत. कोणत्याही वादात सुरवातीला चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जातो. घटस्फोटाचे प्रकरण असो किंवा एकाने दुसर्‍याची बदनामी केल्याचा आरोप असो, सर्वात आधी दोन्ही बाजूंनी एकत्र बोलून वाद मिटवावा यासाठीच प्रयत्न केले जातात. ते प्रयत्न अपयशी ठरले तर कायद्याची कारवाई सुरू होते. फडणविसांनी नेमके तेच केले आहे. दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला. समजा तो प्रयत्न अयशस्वी ठरला असता तर त्यांना चित्रपटाला संरक्षण द्यायची आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडावीच लागली असती.

In reply to by श्रीगुरुजी

अच्छा म्हणजे एका सिनेमाला विरोध करणे अन खलिस्तानी किंवा पूर्वोत्तरी फुटीरतावादी लोकांच्या बरोबरीचं वाटतं का काय तुम्हाला? का फक्त किल्ला लढवायचा म्हणून कायच्या काय बोलताय का काय? तुम्ही किती खालिस्तानी किंवा उल्फा , एनएस्सीएनवाल्या लोकांचे राडे पाहिले आहेत? एकतर तुम्ही ते पाहिलेले नाहीत किंवा मनसेची बेडकी फुगवून दाखवताय कारण नाव तुमच्या सीएमचं अडकलंय म्हणून कदाचित. रक्तपाती राडे अन असल्या दीड दमडीच्या राजकीय स्टंट मध्ये फरक असतो हो साहेब, प्लिजच ___/\__

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 24/10/2016 - 23:44
मनसेने पूर्वी बिहारींविरूद्ध केलेले राडे आठवत असतील. यावेळीही तसेच राडे होण्याची वाट बघायची होती का?

In reply to by श्रीगुरुजी

अच्छा म्हणजे एका सिनेमाला विरोध करणे अन खलिस्तानी किंवा पूर्वोत्तरी फुटीरतावादी लोकांच्या बरोबरीचं वाटतं का काय तुम्हाला? का फक्त किल्ला लढवायचा म्हणून कायच्या काय बोलताय का काय? तुम्ही किती खालिस्तानी किंवा उल्फा , एनएस्सीएनवाल्या लोकांचे राडे पाहिले आहेत? एकतर तुम्ही ते पाहिलेले नाहीत किंवा मनसेची बेडकी फुगवून दाखवताय कारण नाव तुमच्या सीएमचं अडकलंय म्हणून कदाचित. रक्तपाती राडे अन असल्या दीड दमडीच्या राजकीय स्टंट मध्ये फरक असतो हो साहेब, प्लिजच ___/\__

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

संदीप डांगे 24/10/2016 - 22:21
राष्ट्रवादी एक फुटकळ पक्ष असतो. पण मनसे तोडफोड करणारा, विध्वंसकारी, राज्यव्यापी, जनतेपेक्षा मोठा पक्ष असतो. त्याईची सतरंजी अटकेल हाये, एवढी दलाली(इंग्रजीत Pimp या अर्थाने)….? _/\_

In reply to by श्रीगुरुजी

काश्मिर मध्ये १०० लोक मेले तर तिथे तोडगा काढायला कोणि प्रयत्न करत नाही. पण इथे करतात, यावरुनच मनसे किती मोठी दहशतवादी संघटना असेल याची कल्पना येते. याची कल्पना महाराष्ट्राबाहेर राहणार्या बीड-नंदुरबार च्या लोकांना येणार नाही, पण ती मुख्यमंत्र्याना आहे, म्हणुनच त्यांनी जिवाची बाजी लावुन हा संघर्ष टाळला.

In reply to by श्रीगुरुजी

तोडगा काढताना फक्त एका बाजुला पैसे खर्च कराय्ला लावायला नको होते. राज ठाकरें नी प्रत्येक पाकिस्तानी कलाकाराच्या बदल्यात ५ करोड स्वतः आर्मीला द्याय्ला हवे होते. किंवा निदान २.५ करोड तरी. किति माणसे मारायची हे ठरवायला राजबरोबर वेगळी मीटींग ठेवावी. फक्त मोदिंना बोलवु नका म्हणजे झाले. == हिच गोष्ट एखद्या मुस्लीम पुढार्याने केलि असती तर अशी मांडवली झाली असती का?

In reply to by भक्त प्रल्हाद

श्रीगुरुजी 25/10/2016 - 15:02
मला नाही वाटत की ५ कोटी रूपये देणे हा तोडग्याचा प्राथमिक भाग होता म्हणून. अशांतता टाळण्यासाठी आंदोलन मागे घेतले जावे हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. ५ कोटी देणे, चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्याच्या निषेधाचा फलक दाखविणे इ. गोष्टी नंतर आलेल्या आहेत. राज ठाकरेंनी किती द्यावे किंवा अजिबातच न द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे.
हिच गोष्ट एखद्या मुस्लीम पुढार्याने केलि असती तर अशी मांडवली झाली असती का?
मुस्लिमांबरोबरही यापूर्वी बोलणी करून तडजोड केल्याची उदाहरणे आहेत. हुरियतच्या नेत्यांबरोबर चर्चा करणे हे एक उदाहरण. दुसरे उदाहरण म्हणजे सप्टेंबर १९९३ मध्ये ५-६ पाकिस्तानी अतिरेक्यांनी हजरतबाल मशिदीत प्रवेश केल्यावर सैनिकांनी मशिदीला वेढा घालून त्यांना अडकवून ठेवले होते. मशिदीत अतिरेक्यांव्यतिरिक्त इतर कोणीही नव्हते. अतिरेक्यांना पळून जाणे अशक्य होते. तरीसुद्धा तत्कालीन केंद्र सरकारने अतिरेक्यांशी बोलणी करून मशिदीचे नुकसान न करण्याच्या अटीवर वेढा उठवून त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते.

In reply to by श्रीगुरुजी

गणामास्तर 25/10/2016 - 15:08
मला नाही वाटत की ५ कोटी रूपये देणे हा तोडग्याचा प्राथमिक भाग होता म्हणून.
गुरुजी, पाच कोटी देणे हा तोडग्याचा प्राथमिक वा दुय्यम भाग होता हेचं मुळात इथे दुय्यम आहे. मुख्य प्रॉब्लेम या असल्या तोडग्याशीचं आहे. बाकी पूर्वी कुणा कुणासोबत कसे तोडगे काढले गेले याचा इथे काही संबंध आहे असे मला वाटत नाही, उगाचं समोरचा चिखलात खेळला म्हणून आम्ही शेणात लोळलो म्हणण्याला काही अर्थ नसतो.

In reply to by गणामास्तर

संदीप डांगे 25/10/2016 - 15:30
मुख्य प्रॉब्लेम या असल्या तोडग्याशीचं आहे. ^^^ सहमत! काय करायला पाहिजे होते? १. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे. 2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे. 3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे, मनसे दंगा करेल म्हणून हा सरकारने दोघांना बोलावून तोडगा काढणे चुकीचा पायंडा पाडणे आहे, हुर्रीयात किंवा इतर आतंकवादी, नक्षलवादी, अलगाव्वदी संघटन यांची मनसे सारख्या राजकीय पक्षाबरोबर तुलना करणेच चुकीचे. ह्या प्रकरणात चित्रपट किंवा पाच कोटी महत्वाचे नाहीत, मुख्यमंत्र्यासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने गुंडगिरी करणाऱ्याला भिऊन असले तोडग्याचे पाउल उचलणे लोकशाहिस मारक आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही, चारपाच हजार गुंड हाताशी असले की कोणीही काहीही कबूल करून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो हा संदेश जात आहे. राज ठाकरे ह्या घटनाबाह्य व्यक्तीला महत्त्व देणे खटलेलं आहे, व्हाटबौटेरीच करायची असेल तर राहुल गांधीने अध्यादेश मागे घ्यायला लावल्यावर विरोधकांनी केलेला थयथयाट आठवावा.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 25/10/2016 - 15:39
काय करायला पाहिजे होते? १. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे. 2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे. 3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे,
चित्रपटाला संरक्षण देण्यात येणारच होते. परंतु ते देऊनसुद्धा तोडफोड टाळता आली नसती. त्यामुळे सामोपचाराने मार्ग काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक होते. मनसे धरणे आंदोलन करण्याची किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये असा प्रचार करण्याची शक्यता दिसत नव्हती आणि करण तर चर्चेच्या आदल्या दिवसापर्यंत गप्प होता व त्याच्या वतीने काही जण पाकड्यांना घेण्याचे समर्थन करीत होते. या दोघांपैकी कोणीतरी एकाने अशी भूमिका आधीच घेतली असती तर तडजोडीची वेळच आली नसती.

In reply to by संदीप डांगे

गणामास्तर 25/10/2016 - 16:13
१. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे. = सहमत. आपण अशी अपेक्षा सरकार कडून करणे योग्य आहे. 2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे. = मनसे कसलाही विरोध अहिंसक मार्गाने करेल असे वाटत नाही. आपल्या सारख्या काही लोकांचा जरी अशा प्रकारांना विरोध असला तरी काही लोकांचा त्याला सपोर्ट आहे आणि अजून काही लोक सपोर्ट करतील अशी मनसे ला अपेक्षा असल्यामुळे ते धिंगाणा घालून स्वताचे उपद्रवमूल्य वाढवणे हा हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारचं. 3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे, = जर सरकारने अशी काही बंदी घातलेली नाही आणि बहुसंख्य लोकांना त्याचा काही फरक पडत नसेल तर कायद्याच्या चौकटीत राहून पाकी कलाकारांना घेण्यात काय प्रॉब्लेम असू शकतो हे मला कळत नाहीये. जेव्हा या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते तेव्हा तरी वातावरण इतके तापलेले नव्हते, आपले पंप्र सुद्धा पाकिस्तान दौरा करत होते आणि नवाझ शरीफांना आमंत्रणे धाडीत होते.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 24/10/2016 - 17:23
कुठले विन विन? कुठली लोकभावना? माझा दुसरीकडचा प्रतिसाद इथे चिकटवते. ही आहे लोकभावना.
पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी सिनेमे काढायच्या परवानगीची आणि आपल्या हजारों सैनिकांच्या जिवाची किंमत का? मांडवलीसाठी मध्यस्थी करणारे नरकात जातीलच. पण तोडगा स्वीकारणार्‍या सरकारचे काय? तो नालायक करण जोहर एका सिनेमामागे ५० कोटीचा निव्वळ अधिकृत फायदा कमावतो म्हणे. आणि सैनिकांच्या तोंडावर पाच कोटी फेकायची हिंमत कशी झाली त्याची? सिनेमात दाऊद आणि त्याच्यासारख्या गुन्हेगार धंदेवाल्यांचा पैसा येतो ही लोकांची समजूत आहे. तिला पुरावे देता येणार नाहीत तसेच खोटीही म्हणता येणार नाही. उद्या कोणीही दाऊदच्या पैशाने सिनेमा काढील आणि पाच कोटी सैनिक फंडाला भीक फेकेल. ते चालेल का? म्हणजे लोक गरीबाना लुबाडतात. त्यांच्या अंगावर गाड्या घालून मारतात आणि मग सिद्धीविनायकाला देणगी देऊन सगळी पापे धुवून काढतात. अजून एक दानपेटी असेच सैनिक फंडाला समजले का काय हे खंडणीखोर?
सैनिक खंडणीच्या पैशांवर जगत नाहीत म्हणून माजी अधिकार्‍यांनी झोडपून काढले आहे ना, त्याचा अर्थ समजत असला तर जरा तरी लाज वाटून घेऊ देत हे नालायक. अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना. फडणवीस मोर्चांचा प्रसंग ज्या चातुर्याने हाताळत होते त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले होते पण मांडवली करणार्‍यांच्या रांगेत बसून खरेच त्यानी हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे.

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 24/10/2016 - 20:54
फडणवीस मोर्चांचा प्रसंग ज्या चातुर्याने हाताळत होते त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले होते पण मांडवली करणार्‍यांच्या रांगेत बसून खरेच त्यानी हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे.
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 24/10/2016 - 21:04
काहीही काय? नवराबायकोचे भांडण हा एका कुटुंबातला खाजगी वाद आहे. समाजाचा त्याच्याशी संबंध नाही. बादवे, वरील प्रतिसाद वाचून कायम विषय भलतीकडेच भरकटविणार्‍या, असंख्य डुआय असणार्‍या आणि प्रचंड फॅन फॉलोइंग असणार्‍या एका ट्रोलची आठवण झाली.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 24/10/2016 - 21:13
बादवे, खालील वाक्यांवर प्रतिसाद अपेक्षित होता.
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 24/10/2016 - 22:47
करण जोहरने कोर्टात जायचे होते आणि मनसेने शांततापूर्ण आंदोलन करायचे होते. हे ब्लॅकमेलिंग कशाला? आम्ही तो सिनेमा बघणार नाहीच पण म्हणून मनसे गुंडगिरी करणार असेल तर आमचा अजिबात पाठिंबा नाही. करण जोहर आणि मनसे यांच्याकडून कसलीही चांगल्या कामाची अपेक्षा अजिबात नाही पण ही मांडवली फडणविसानी करावी याचा जास्त राग आला आहे. धमक्या देऊन मनसे दंगल करणार होते? करून बघू देत. आतापर्यंत महाराष्ट्रात किती दंगलीमधे सैन्याला बोलावावे लागले? गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत. फडणविसानी एजंटाचे काम न करता गप्प बसून लक्ष ठेवायचे होते. नसते धंदे करायला सांगितले कोणी? महाराष्ट्रातली सगळी कोर्ट आणि पोलीस मेले का?

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 24/10/2016 - 23:35
>>> करण जोहरने कोर्टात जायचे होते आणि मनसेने शांततापूर्ण आंदोलन करायचे होते. ते दोघे तसे करीत नव्हते, त्यामुळेच फडणविसांना त्यात पडावे लागले. >>> गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत. पोलीस संरक्षण हा शेवटचा पर्याय शिल्लक होताच. परंतु त्यापूर्वी चर्चने मार्ग काढणे आवश्यक होते. >>> फडणविसानी एजंटाचे काम न करता गप्प बसून लक्ष ठेवायचे होते. नसते धंदे करायला सांगितले कोणी? महाराष्ट्रातली सगळी कोर्ट आणि पोलीस मेले का? नुसते गप्प बसून लक्ष ठेवायचे? दंगेधोपे टाळून वाद मिटविणे हे त्यांचे कर्तव्य होते व तेच त्यांनी केले.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 24/10/2016 - 23:40
तेच तेच लिहायचा कंटाळा आला. आता पुढे टंकाळ्याचा अधिकार वापरत आहे. तुमचे म्हणणे कुठूनही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचायची काही शक्यता असेल तर महाराष्ट्रातल्या १०० पैकी ९५ लोकांना या प्रकाराचा भयंकर राग आला आहे हेही त्यांच्यापर्यंत पोचवा ही हात जोडून विनंती. आपण सगळ्यानीच बापड्या करण जोहरला यथाशक्ती १०/११ रुपयाचे चेक्स पाठवून देऊया. गरिबाला तेवढीच मदत. त्यातले पैसे त्याने अजून कोणाला दानधर्म केले तरी आमचे काही म्हणणे नाही. पण सैनिकांची चेष्टा कृपा करून थांबवा आता.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 24/10/2016 - 23:29
मग करण जोहर आणि राज ठाकरे असे कोण मोठे समाजाचे धुरीण लागून गेले की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी आपला बहुमूल्य वेळ खर्च करावा? एक फडतूस सिनेमा म्हणजे काय लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे का? करण जोहर रडला म्हणे आपली, आपल्या लोकांची रोजीरोटी बुडाली मग उद्या कोणा रस्त्यावरच्या मजुराला मुकादमाने कामावरून काढून टाकले आणि त्याची रोजीरोटी बुडाली तर त्याला मुख्यमंत्री स्वत मदत करणार का? कायदा आणि सरकारला मजूर आणि करण जोहर दोघे सारखेच ना?

In reply to by पैसा

अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना. भारीच कल्पक आहे तो दुकानदार ! पण, असे बरेच चेक आले तर पैश्याच्या मागे धावणारे बॉलीवूडी लोक ते निर्लज्जपणे घेतीलही. पैसा सोडून त्यांना इतर काही दिसते असे वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

साहना 25/10/2016 - 06:34
> या वादात एकूण ३ हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) होते. करण जोहर (म्हणजेच निर्माते), राज ठाकरे (म्हणजेच मनसे) आणि फडणविस (म्हणजेच राज्य सरकार). तसे चित्रपटगृहांचे मालक, वितरक, प्रेक्षक इ. सुद्धा हितसंबंधी होते, परंतु वरील ३ हे प्रमुख हितसंबंधी होते. इथे राज ठाकरेंना स्टॅकहोल्डर म्हणणेच मुळांत चुकीचे आहे. ठाकरे ह्यांनी स्टेक होल्डर बनण्याचा प्रयत्न केला तेंव्हाच त्यांना हिसका दाखवायला पाहिजे होता. उद्या मुलीची छेड काढणाऱ्याला तिच्या लग्नाच्या वेळी "स्टेक होल्डर' म्हणावे काय ? रेड रायडींग हूड मध्ये लांडग्याची जी भूमिका होती, शोले मध्ये गब्बर ची जी भूमिका होती, रामायणात रावणाची जी भूमिका होती, बाजारांत हफ्ता गोळा करायला येणार्यांची जी भूमिका असते, काश्मीर मध्ये पाकिस्तानची जी भूमिका आहे तीच भूमिका राज ठाकरे ह्यांची वरील घटनेत होती.

टर्मीनेटर 24/10/2016 - 14:16
सब गंदा है...पर धंदा है ये... जिथे आर्थिक फायदा नुकसानीच्या गोष्टी येतात तिथे चित्रपट व्यावसायिक काय किंवा राजकारणी व मुख्यमंत्री काय सगळे कमरेच सोडून डोक्याला गुंडाळायला तयार होतात. हीच गोष्ट ह्या प्रसंगातून ह्या तिघांनी दाखवून दिली आहे....बाकी सेना आणि सैनिक वगैरे गोष्टी ह्या लोकांसाठी नगण्य आहेत.

(ह्यातील काही मुद्दे रिपीट झाले असतील तर क्षमस्व.) शेवटी लावलेच की नाही करण जोहरला गुढगे टेकायला खळ्ळ खट्याक 'संस्कृती'पुढे (चुकलो, लोकेच्छेपुढे)? आपली लोकशाहीदेखील अशीच गुढगे टेकील लवकरच केंव्हातरी. मग आपण आपली शस्त्रे खाली ठेवू व आनंदोत्सव साजरा करू. आपण खाली ठेवलेली शस्त्रे केव्हातरी आपल्यावरच उगारली जातील पण ते नंतर पाहता येईल. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देऊ नये व जे कोणी इथे असतील त्यांनी भारत सोडून जावे अशी हाकाटी उरीच्या हल्ल्यानंतर सुरु झाली. ज्या कोणी (उदा. सलमान खान) त्याविरुद्ध सूर लावला त्याच्यावर हल्लाबोल झाला. आपली राष्ट्रनिष्ठा कशी मोठी हे सिद्ध करण्याची अहमहिका लागली. पाकिस्तानी कलाकारांना भारतात का येऊ देऊ नये ह्यासाठी हास्यापद कारणे देण्यात आली - भारतात कलाकार नाहीत का, पाकिस्तानी कलाकारांना म्हणजे शेवटी पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसे द्यायचे, आपण परकीयांना पैसे द्यायचे म्हणजे आपला तेवढा तोटा करून घायचा, पाकिस्तानी कलाकार भारताच्या सुरक्षेला धोका आहेत, हे प्रमुख आक्षेप होते. पण जर आपल्या सरकारचीदेखील अधिकृत भूमिका अशी असेल की आम्ही अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करून ते उद्वस्थ केले; आमचे पाक सरकारशी वा जनतेशी भांडण नाही, तर त्यासाठी काही कारण असेल ना? ते कारण एकच असू शकते ते म्हणजे पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांना जमेल तितके एकटे पाडावयाचे आणि इतरांचा पाठिंबा मिळवायचा नाहीतर किमान ते तटस्थ राहतील असे बघायचे. हे ह्या 'राज'कारणी नेत्यांना समजत नसेल असे नाही पण स्वतःच्या क्षुल्लक राजकारणासाठी त्यांना ते समजूनच घ्यायचे नाही. दुसरा मुद्दा पाकिस्तानी कलाकार भारतात पैसे मिळवितात म्हणजे आपण अतिरेक्यांना आर्थिक मदत करतो. असे असेल तर इथल्या हिंदी चित्रपटसृष्टीला कितीतरी पट जास्त पैसे पाकिस्तानातून मिळतात ते चालतात का? पाकिस्तानी कलाकार भारतात येउन हेरगिरी करू शकतात, हा आक्षेपही पोकळ आहे. सलमान म्हणतो त्याप्रमाणे आपल्या सरकारनेच त्यांना व्हिसा दिलेले आहेत ना? मग जर सरकारला त्यांना इथे येऊ देण्यात धोका वाटत नसेल तर हे कोण लागून गेले स्वतःचा कायदेबाह्य अधिकार चालवणारे? (आता जर कोणी म्हणत असेल की सरकारच शिवसेना आणि मनसेचा वापर करून त्यांना भारताबाहेर काढीत आहे तर पुढे बोलावे असे काही राहात नाही.) शेवटचा मुद्दा म्हणजे करण जोहरला किंवा तत्सम कुणाला भारतीय कलाकार मिळत नाहीत का? हा तर प्रतिवाद करण्याच्याही लायकीचा मुद्दा नाही. ह्या तमाशाची परवाच्या दिवशी तात्पुरती सांगता झाली. ('तात्पुरती' अशासाठी की 'ह्यापुढे मी पाकिस्तानी कलाकारांना माझ्या चित्रपटात घेणार नाही' अशी हमी करण जोहरकडून घेतली आहे.) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती, म्हणजे मांडवली, केली. करण जोहरने पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीला द्यायचे असा करार झाला. त्यावर शिवसेनेने 'लष्कराला खंडणीचा पैसा नको' अशी कॉमेंट देण्याचा उपचारदेखील पार पाडला. असे सर्व यथासांग झाले. ह्यात एक बरे झाले; भाजपाचे खरे रूप प्रकटले. 'party with a difference' म्हणजे काय ते लोकांसमोर आले. सत्य कटू असले तरी भ्रम दूर झालेला केव्हाही चांगलाच, नाही का? पाकिस्तानी कलाकाराला घेतले ही काही करण जोहरची चूक नव्हे. परिस्थिती बदलली म्हणून पूर्वीचे करार रद्द करता येत नसतात. तशी कोणी मागणी जर करत असेल तर ते घटनाबाह्य आहे. प्रत्येक नागरिकाचे अधिकार राखण्यास सरकार बांधील आहे अशी तर्कशुद्ध आणि न्यायाची भूमिका सरकारची असायला हवी होती. त्याविरुद्ध कोणी येत असेल तर त्याचा कठोरपणे बीमोड करणे हे सरकारचे कर्तव्य होते. निदान ज्या पक्षाचे पंतप्रधान 'भारताची राज्यघटना हा माझा धर्म आहे' अशी जाहीर भूमिका घेतात त्या पक्षाची तरी. पण कसचे काय? निवडणुकींच्या आणि मतांच्या हिशोबापुढे सगळे दुय्यम असते, हेच खरे. (शिवसेनाशी आपले फाटलेलेच आहे. मनसे तरी आपल्या बाजूला असलेला बरा, निदान विरुद्ध तरी नको अशी भाजपाची भूमीका असावी.) आता ह्या त्रिपक्षीय कराराचा निषेध करणाऱ्यांविरुद्ध हल्लाबोल करता येईल. 'आता मनसे आमची देशभक्ती ठरवणार का' असा प्रश्न शबाना आझमी हिने केला आहे, तिलाही राष्ट्रद्रोही ठरविता येईल. आणि हो, देशातील वाढत्याअसहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या रतन टाटा ह्यांना देखील. आणि हे सर्व लिहिल्याबद्दल मलासुद्धा. पण मी काही शबाना आझमी, रतन टाटा ह्यांच्या पंक्तीत बसणारा नव्हे. मी एक क्षुल्लक इसम. म्हणून मला माफही करतील कदाचित. शेवटी एवढेच, की हे राजापेक्षा राजनिष्ठ लोक राजालाही तापदायक ठरू शकतात.

In reply to by रविकिरण फडके

साहना 25/10/2016 - 06:40
माझ्या मते सर्व घटनेचे अनालिसिस करणारा सर्वांत चांगला कमेंट हा आहे. > ह्यात एक बरे झाले; भाजपाचे खरे रूप प्रकटले. 'party with a difference' म्हणजे काय ते लोकांसमोर आले. सत्य कटू असले तरी भ्रम दूर झालेला केव्हाही चांगलाच, नाही का? पाकिस्तानी कलाकाराला घेतले ही काही करण जोहरची चूक नव्हे. भाजपचे खरे रूप हेच आहे ह्याची शंका अनेकांना आधीपासून होतीच म्हणून विशेष आश्चर्य वाटत नाही. आश्चर्य अश्या गोष्टीचे वाटते कि सभ्य, चांगली माणसे अचानक "लोकेच्छा", "दिवाळीचं वेळी शांतता" इत्यादी इत्यादी करणे देऊन आणि शाब्दिक कोलांट्या उड्या मारून आपल्या आवडत्या पक्षाचे समर्थन करीत आहेत. काँग्रेस पक्ष भ्रष्ट असला तरी किमान आपल्या चमच्याची खूप काळजी घेतो. भाजपच्या समर्थानात नाचणाऱ्या भक्तगणांच्या गळ्यांत मात्र शेवटी धोंडाच पडेल असे वाटते.

श्रीगुरुजी 24/10/2016 - 15:13
पाकिस्तानी कलाकारांना भारतात का येऊ देऊ नये ह्यासाठी हास्यापद कारणे देण्यात आली - भारतात कलाकार नाहीत का, पाकिस्तानी कलाकारांना म्हणजे शेवटी पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसे द्यायचे, आपण परकीयांना पैसे द्यायचे म्हणजे आपला तेवढा तोटा करून घायचा, पाकिस्तानी कलाकार भारताच्या सुरक्षेला धोका आहेत, हे प्रमुख आक्षेप होते.
या कारणात काय हास्यास्पद आहे? ज्या प्रमाणात भारतात पाकड्यांना कामे दिली जातात त्या प्रमाणात भारतीय कलाकारांना पाकिस्तानी चित्रपटात कामे दिली जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे (खरं पाकिस्तानी चित्रपटात काम करणार्‍या भारतीय कलाकारांची संख्या शून्याच्या जवळपासच आहे). कोणतीही देवाणघेवाण/व्यापार/व्यवहार एकतर्फी होऊ शकत नाही. आपण इथे बोलावून पाकड्यांना कोट्यवधी रूपये देऊन चित्रपटात झळकवायचे आणि आपल्या एकाही कलाकाराला तिथे काम नाही असे किती दिवस चालणार? पाकिस्तानी कलाकारांना जे पैसे मिळतात त्यातील काही भाग करांच्या रुपाने त्यांच्या सरकारकडे जातोच व सरकारकडून त्यातला काही भाग दहशतवादासाठी वापरला जातो. म्हणजे आपणच पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाकड्या कलाकारांच्या माध्यमातून अर्थपुरवठा करीत आहोत.
पण जर आपल्या सरकारचीदेखील अधिकृत भूमिका अशी असेल की आम्ही अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करून ते उद्वस्थ केले; आमचे पाक सरकारशी वा जनतेशी भांडण नाही, तर त्यासाठी काही कारण असेल ना? ते कारण एकच असू शकते ते म्हणजे पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांना जमेल तितके एकटे पाडावयाचे आणि इतरांचा पाठिंबा मिळवायचा नाहीतर किमान ते तटस्थ राहतील असे बघायचे. हे ह्या 'राज'कारणी नेत्यांना समजत नसेल असे नाही पण स्वतःच्या क्षुल्लक राजकारणासाठी त्यांना ते समजूनच घ्यायचे नाही.
पाकिस्तानमधील कट्टरतावाद्यांना एकटे पाडायचे हे त्यामागे कारण नाही. भारताने अशी कारवाई करून पहिल्यांदाच तसे अधिकृतरित्या जाहीर केले. पहिल्यांदाच कारवाईची जाहीर कबुली करताना भारत अत्यंत सावध होता. आम्ही फक्त दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करीत आहोत, ही कारवाई पाकिस्तानविरूद्ध नसून पूर्वी आमचाच भाग असलेल्या पाकव्याप्त काश्मिरमध्ये केली इ. स्पष्टीकरण भारताने दिले. आंतरराष्ट्रीय राजकारणात इतर देश आपल्याविरूद्ध जाऊ नयेत, आम्ही स्वसरंक्षणासाठी असे केले, इतर देशांचा आपल्याला पाठिंबा मिळावा हा त्यामागे उद्देश होता व तो उद्देश सफल झाला.
दुसरा मुद्दा पाकिस्तानी कलाकार भारतात पैसे मिळवितात म्हणजे आपण अतिरेक्यांना आर्थिक मदत करतो. असे असेल तर इथल्या हिंदी चित्रपटसृष्टीला कितीतरी पट जास्त पैसे पाकिस्तानातून मिळतात ते चालतात का?
का चालू नये? हरकत काय आहे?
पाकिस्तानी कलाकार भारतात येउन हेरगिरी करू शकतात, हा आक्षेपही पोकळ आहे. सलमान म्हणतो त्याप्रमाणे आपल्या सरकारनेच त्यांना व्हिसा दिलेले आहेत ना? मग जर सरकारला त्यांना इथे येऊ देण्यात धोका वाटत नसेल तर हे कोण लागून गेले स्वतःचा कायदेबाह्य अधिकार चालवणारे? (आता जर कोणी म्हणत असेल की सरकारच शिवसेना आणि मनसेचा वापर करून त्यांना भारताबाहेर काढीत आहे तर पुढे बोलावे असे काही राहात नाही.)
सरकारने व्हिसा दिला असला तरी सरकारी निर्णयाला विरोध करण्याचा कायदेशीर हक्क सर्वांना आहे. मनसेने त्यांना विरोध केला यात काहीही चुकीचे नाही. तो मनसेला घटनेने दिलेला हक्क आहे.
शेवटचा मुद्दा म्हणजे करण जोहरला किंवा तत्सम कुणाला भारतीय कलाकार मिळत नाहीत का? हा तर प्रतिवाद करण्याच्याही लायकीचा मुद्दा नाही.
पाकिस्तान व पाकिस्तानी आपले शत्रू आहेत. त्यामुळे शत्रूला अर्थपुरवठा करण्याऐवजी इथलेच कलाकार घ्यावेत हा मुद्दा योग्यच आहे.

"सरकारने व्हिसा दिला असला तरी सरकारी निर्णयाला विरोध करण्याचा कायदेशीर हक्क सर्वांना आहे. मनसेने त्यांना विरोध केला यात काहीही चुकीचे नाही. तो मनसेला घटनेने दिलेला हक्क आहे." कायदेशीर? होच की! आणि पाच कोटी रुपये खंडणी उकळण्याचाही हक्कच. असो. ह्यावर वाद घालण्यात अर्थ नाही. आपण सहमत होणार नाही ह्यावर सहमत होऊया.

श्रीगुरुजी 24/10/2016 - 15:45
कायदेशीर? होच की! आणि पाच कोटी रुपये खंडणी उकळण्याचाही हक्कच.
ते पैसे मनसेला मिळणार नाहीत हो किंवा राजच्या खिशातही जाणार नाहीत. सैनिक कल्याण निधीला ते पैसे दिले जाणार आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मोदक 24/10/2016 - 16:05
याच गोष्टीचा अनेक लोकांना राग आला आहे गुरूजी.. सैनीक कल्याण निधीला पैसे देण्याचा हा मार्ग चुकीचा आहे हे तरी मान्य आहे का?

In reply to by मोदक

श्रीगुरुजी 24/10/2016 - 20:58
याच गोष्टीचा अनेक लोकांना राग आला आहे गुरूजी.. सैनीक कल्याण निधीला पैसे देण्याचा हा मार्ग चुकीचा आहे हे तरी मान्य आहे का?
ती बैठक मुळात सैनिक कल्याण निधीला देणगी देण्यासाठी बोलविलेली बैठक नव्हती. चर्चेच्या माध्यमातून दिवाळीत निर्माण होणारी संभाव्य अशांतता टाळणे हा बैठकीचा मुख्य उद्देश होता. तो साध्य झाला व त्यातून भविष्यात पाकड्यांवर बंदी, सैनिक कल्याण निधीला देणगी, चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्याच्या निषेधाचा फलक इ. अजून काही गोष्टी बाहेर आल्या. परंतु मूळ उद्देश आंदोलन रद्द करणे हाच होता.

In reply to by श्रीगुरुजी

मोदक 24/10/2016 - 21:05
ते काहीही असले तरी अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून सैनीक कल्याण निधीला देणगी देणवण्याची गोष्ट पटली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सैनिक कल्याण नाव घेतले की काहीही कायदेशीर होईल का? असे असले तर सैन्याचे नाव संबंधित खराब करत आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, उद्या तुमची कॉलर धरून कोणी काढ सगळे खिशातले पैसे आर्मी फंडला द्यायचे म्हणले तर तुम्ही राष्टरकार्य असल्यासारखा द्याल का आपल्या घामाचा पैसा? अन तो पैसा सैन्य स्वीकारेल ह्याची काय शाश्वती, त्यांनी नाकारल्यास तुमचा पैसा तुम्हाला परत पोच करायचे ओनस कोणाचे असेल? आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी प्रमाणे आर्मी वेल्फेयर फंड नामे नवी खंडणी जन्माला घालतोय का ? ह्याचा जरूर विचार केला जावा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. 24/10/2016 - 16:43
आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी प्रमाणे आर्मी वेल्फेयर फंड नामे नवी खंडणी जन्माला घालतोय का
सेमच बाप्पू, मला सेम उधारण आमच्या इथले आठवलेले. सगळ्यांच्या होलसेल जयंत्या ब्यंत्याचे पैसे आम्ही देत नै. नवीन दुकान टाकले की एरीयावाईज एक सर्टिफिकेट मिळते. त्याला ४-५ ह्जार मोजायचे एकवट्ट. मग त्यांचे ते सगळ्या मंडळांना पैसे देतात. मंडळे आमच्याकडे फिरकत नैत. एकूणच ह्या मिलिभगत प्रकरणात प्रथमदर्शनी विनविन सगळे दिसत असले तरी स्वतःचे मत (वर्गणी नाहि द्यायची असे) मांडायची सोय नाही. एकट्याने ह्या सिस्टिमशी लढायची ताकद नाही आणि धंदा करु की हेच करत बसू म्हणून आम्ही सहन करतो. जवळपास सर्वत्र शहरात ही सर्वमान्य प्र्याक्टीस झालीय. वरील आर्मीसाठी खंडणी प्रकरणात तोच पायंडा पडू नये हीच इच्छा.

In reply to by श्रीगुरुजी

साहना 25/10/2016 - 06:41
तुमच्या मुलाला कुणी किडनॅप करून उद्या सैनिक निधीला पैसे द्यायला लावले तर ते नैतिक दृष्ट्या बरोबर वाटते का ? (उदाहरणादाखल)

आणि BTW , आपण सर्वानीच पाकड्या पाकडे इत्यादी शब्द टाळावेत. सुसंकृत माणसे असे बोलत नाहीत आपापसात. (अर्थात, ह्यालाही उत्तर असेलच. आम्ही असंस्कृत लोकांबद्दल बोलतोय, असे.)

बोका-ए-आझम 24/10/2016 - 16:57
असताना मनसेला एवढं महत्व देण्याची गरज होती का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतोय. त्यामुळे त्यांनी असले स्टंट करणं हे समजण्यासारखं आहे. पण मुख्यमंत्र्यांना हे अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग करण्याची काय गरज होती? येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला चुचकारून शिवसेनेची कोंडी करण्याची व्यूहरचना हे एक कारण असू शकतं, पण त्यासाठी मनसेच्या एवढ्या पायघड्या घालणं आवश्यक नव्हतं.

In reply to by बोका-ए-आझम

श्रीगुरुजी 24/10/2016 - 20:55
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

In reply to by श्रीगुरुजी

बोका-ए-आझम 25/10/2016 - 00:24
राज ठाक-यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना स्वतःलाही प्रतिबंधात्मक अटक करायला हवी होती, ज्याचे आदेश गृहमंत्री म्हणून ते देऊ शकत होते. सरकारने मध्यस्थी करावी असं ना करण जोहर म्हणत होता, ना राज ठाकरे म्हणत होते.

In reply to by बोका-ए-आझम

श्रीगुरुजी 25/10/2016 - 15:24
- चित्रपटावर बंदी घालण्यात येणार नाही हे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते. - चित्रपटाला पूर्ण संरक्षण देण्यात येईल हे राजनाथसिंग व फडणविसांनी पूर्वीच सांगितले होते. - एका चित्रपटगृहावर निदर्शने करणार्‍या मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना आधीच अटक केलेली होती. - प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित होताना सर्व चित्रपटगृहांना संरक्षण देण्यात येणार होते. सरकार संपूर्णपणे कायदेपालन करणार होते. परंतु एवढे करून तोडफोड, दंगेधोपे व त्यातून निर्माण होणारी अशांतता व हिंसाचार पूर्णपणे टाळणे अशक्य होते. प्रत्यक्ष राज ठाकर्‍यांना व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करूनसुद्धा काही कार्यकर्ते मोकळे राहिलेच असते व त्यांनी तोडफोड केलीच असती. संपूर्ण महाराष्ट्रात किमान ७००-८०० चित्रपटगृहात हा चित्रपट दाखविला जाईल असा अंदाज आहे. प्रत्येक चित्रपटगृहावर किमान १० पोलिस ठेवले तरी ७-८ हजार पोलिस गुंतुन पडले असते. दिवाळीत दहशतवादी हल्ल्याचा धोका कायमच असतो आणि अशा परिस्थितीत इतके पोलिस वेगळ्या कामात अडकवून ठेवणे योग्य झाले नसते. आणि एवढे पोलिस ठेवूनसुद्धा तोडफोड पूर्णपणे टाळता आली नसती. काश्मिरमध्ये संचारबंदी असून व सैनिक पॅलेट गन्स घेऊन उभे असताना सुद्धा तिथले नागरिक संचारबंदी मोडून गन्सची भीति न बाळगता रस्त्यावर येऊन दगडफेक करीत होते. इथे तर हातात लाठ्या घेतलेले १०-१२ पोलिस काय करू शकणार होते? अशा परिस्थितीत आंदोलन टाळण्यासाठी सामोपचाराच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक होते. समजा बोलणी फिसकटली असती तर शेवटी पोलिस फोर्स होताच. परंतु कोणत्याही संघर्षात/वादात बलाचा वापर हा शेवटचा पर्याय असतो. वादावर चर्चेच्या, सामोपचाराच्याच माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आधी केला जातो. खलिस्तान आंदोलन, काश्मिर आंदोलन, आसाम आंदोलन, नक्षलवादी, मिझोराम आंदोलन इ. वादात वाटाघाटी करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केला गेला होता. नक्षलवादी, शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीचे सदस्य, मिझोरामचा लाल डेंगा, आसाममधील विद्यार्थी, हुरियतचे सदस्य हे काही जनतेचे निवडून आलेले प्रतिनिधी नव्हते. तरीसुद्धा त्यांचे उपद्रवमूल्य ओळखून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अगदी रामायणात सुद्धा प्रभू रामचंद्रांनी युद्ध करण्यापूर्वी अंगदाला शिष्टाईसाठी पाठविले होते आणि भगवान श्रीकृष्णानेसुद्धा महाभारत युद्ध टाळण्यासाठी दुर्योधनाशी वाटाघाटी केल्या होत्या (इथे मी फडणविसांची श्रीराम किंवा श्रीकृष्णाशी तुलना करीत आहे असा गैरसमज करून घेऊ नये). मनसेचा एकच आमदार असला तरी मनसेकडे भरपूर कार्यकर्ते आहेत व मनसे या पक्षाचे उपद्रवमूल्य खूप मोठे आहे. मनसेचे आंदोलन म्हणजे अण्णा हजारेंचे मौन किंवा उपोषण नाही किंवा अंनिसचा मोर्चा नाही. मनसे आंदोलनातून हिंसाचार, तोडफोड होण्याचा इतिहास आहे. मनसेचे आंदोलन कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर असले तरी त्यातून अशांतता निर्माण होऊन जनतेला त्रास होणार होता. राज ठाकर्‍यांना किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांना अटकेत ठेवून आंदोलन दडपता आले नसते. कायद्याचे पालन करणे हे जसे मुख्यमंत्र्यांवर बंधनकारक आहे तसेच शांतताभंग होऊन न देणे ही देखील त्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे आधी मनसेशी बोलणी करून आंदोलन रद्द करण्याचा प्रयत्न करणे व बोलणी फिसकटल्यास पोलिस फोर्स वापरून कायद्याचे पालन करणे हाच मार्ग त्यांच्यापुढे होता. परंतु पोलिस फोर्स वापरून तोडफोड पूर्णपणे टाळणे शक्य झाले नसते. त्यामुळेच त्यांनी दोघांना एकत्र बोलावून वाटाघाटींच्या माध्यमातून आंदोलन रद्द करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आधी लिहिल्याप्रमाणे ५ कोटींची देणगी हा काही चर्चेतील मुख्य मुद्दा किंवा अट नव्हती. आंदोलन रद्द करण्याचा प्रयत्न करणे हाच चर्चेतील प्राथमिक मुद्दा होता. या विषयावर खालील लेख चांगला आहे. http://indianexpress.com/article/india/india-news-india/devendra-fadnavis-ae-dil-hai-mushkil-ban-karan-johar-5-crore-raj-thackeray-3101411/

In reply to by श्रीगुरुजी

शब्दबम्बाळ 25/10/2016 - 00:33
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं असतं तर एक निवेदन द्यायला हवं होत, ज्यात स्पष्टपणे सांगितलं असत कि जर या आंदोलनातून कुठल्याही पद्धतीचे मालमत्तेचे नुकसान झाले तर ते 'मनसे' कडून वसूल करण्यात येईल. आंदोलन करताना पकडण्यात आलेले कार्यकर्ते मनसे चे आढळल्यास 'मनसे' प्रमुखांना अशा हिंसक आंदोलनास पाठबळ देण्यासाठी अटक करण्यात येईल! पण हे केलं असत तर काही लोकांचा रोष घ्यावा लागला असता! त्यात निवडणूक आल्यात त्यात शिवसेना ताप देतेय!! मग मनसे ला दुखवून कसे चालेल? मनसे चे कार्यकर्तेसुद्धा आजकाल पक्षप्रमुखांच्या नावाने ओरडत असतात. आधीच दहीहंडीच्या केसेस पडल्यात कार्यकर्त्यांवर त्यात अशी काही कणखर कारवाई होण्याची शक्यता दिसली असती तर 10 वेळा विचार करावा लागला असता कार्यकर्त्यांना सुद्धा!

In reply to by शब्दबम्बाळ

विशुमित 25/10/2016 - 09:59
बरोबर आहे.. मनसे अध्यक्षा सकट सर्व पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंदात्मक कारवाई करायला पाहिजे होती. वेळ पडली तर अध्यक्षा ला चोप देत पोलीस स्थानकात डांबून ठेवायला पाहिजे होते. मागील आघाडी सरकार ने त्यांचे खूप लाड पुरवले. खळ खट्याक ची धमकी देऊन सार्वजनिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या प्रवृत्तीना चाप बसवण्याची संधी फडणवीस यांच्या सारख्या कर्तबदार मुख्यमंत्र्यानी घालवली आहे. याचा खेड वाटतो.

In reply to by शब्दबम्बाळ

श्रीगुरुजी 25/10/2016 - 15:34
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं असतं तर एक निवेदन द्यायला हवं होत, ज्यात स्पष्टपणे सांगितलं असत कि जर या आंदोलनातून कुठल्याही पद्धतीचे मालमत्तेचे नुकसान झाले तर ते 'मनसे' कडून वसूल करण्यात येईल. आंदोलन करताना पकडण्यात आलेले कार्यकर्ते मनसे चे आढळल्यास 'मनसे' प्रमुखांना अशा हिंसक आंदोलनास पाठबळ देण्यासाठी अटक करण्यात येईल!
वर सविस्तर उत्तर दिले आहे. त्यामुळे परत लिहित नाही.
पण हे केलं असत तर काही लोकांचा रोष घ्यावा लागला असता! त्यात निवडणूक आल्यात त्यात शिवसेना ताप देतेय!! मग मनसे ला दुखवून कसे चालेल? मनसे चे कार्यकर्तेसुद्धा आजकाल पक्षप्रमुखांच्या नावाने ओरडत असतात. आधीच दहीहंडीच्या केसेस पडल्यात कार्यकर्त्यांवर त्यात अशी काही कणखर कारवाई होण्याची शक्यता दिसली असती तर 10 वेळा विचार करावा लागला असता कार्यकर्त्यांना सुद्धा!
राज ठाकरे हा उधोजींइतकाच बेभरवशाचा व स्वतःच्या ताकदीबद्दल अवास्तव भ्रम बाळगणारा आहे. शेवटी हे दोन्ही बंधू शिवसेना संस्कृतीत वाढले आहेत. आपला पक्ष फार मोठा आहे, आपल्याला महाराष्ट्रात प्रचंड पाठिंबा आहे, आपण स्वबळावर सत्ता काबीज करू शकतो अशा भ्रमात हे दोघेही वावरत असतात. या दोघांबरोबरही युती किंवा तडजोड करणे अत्यंत अवघड आहे हे भाजप पुरेपूर ओळखून आहे. भाजपचे मुख्य ध्येय स्वबळावर लढण्याचेच आहे. त्यामुळे मनसेला दुखवू नये किंवा सेनेला चुचकारावे अशा गोष्टी भाजप करणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

राजाभाऊ 25/10/2016 - 20:35
>>पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं? सत्तेत नसुनहि राज ठाकरेंचीच चालते महाराष्ट्रात, तेंव्हा जनाची नाहि तरी मनाची लाज असेल तर फडणविसांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खाली करावी...

बोका-ए-आझम 24/10/2016 - 19:08
डावीकडून आणि उजवीकडून थपडा खाणे. सेन्सॉरने मंजुरी दिली असताना एका राजकीय पक्षाच्या दंडेलीला भीक घातली म्हणून डावीकडून आणि देशभक्ती खंडणीखोरांच्या दावणीला बांधली म्हणून उजवीकडून. #तोंडघशीफडणवीस

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 24/10/2016 - 19:14
हि सगळी पवारसाह्यबांनी राज ठाक्रे, करन जोहर आदींकडून करवून आणलेली गेम आहे. फडनवीस बिचारे तोंडघशी पडले. आता त्यांनी जायला हरकत नाही. उगा मोर्चामुळे गेले असते तर महाराष्ट्रात वेगळा मेसेज गेला असता. ;) #सर्वकाहीसाहेबांमुळे

सोत्रि 24/10/2016 - 22:04
१. मुंबई नगरपालिकेच्या २०१७ निवडणूकीची ही नांदी आहे २. 'टायमिंग' साधून केलेली राजनिती आहे (आठवा टोल राड्याचे टायमिंग) ३. भाजपाने शिवसेनेला दाखवलेले 'मधले बोट' आहे ४. मनसे पार्टी फक्त पैसा छापण्याचे माॅडेल म्हणून कसा एस्टॅब्लिश झाला आहे त्याचे उदाहरण आहे ५. राजकारणातले निवडणूकपूर्व स्कोर सेटलिंग आहे ६. करण जोहरचा सिनेमा आणि पाक कलाकार हे निनीत्त आणि ह्या प्रकरणातले बळी आहेत ७. पाक कलाकारांना कधीच काम मिळणार नाही हा विजयी मुद्दा, मूळ मुद्द्याला झाकोळूना टाकण्याची तजवीज आहे - (दिलसे) सोकाजी

संदीप डांगे 24/10/2016 - 22:16
गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. घटनात्मक पदावर बसून काय निर्णय घ्यावे ह्याची अक्कल नसेल तर ... असो. डोकं फार तापलं आहे. उगा उणादुणा शब्द निघायचा... श्रीगुरुजी, मिपाची जनभावना तुमच्या विचारांविरुद्ध आहे असेच चर्चेत दिसत आहे, योग्य ती समज आपल्याला येवो, भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 24/10/2016 - 23:00
आपल्या प्रतिसादातील भाषा अस्थायी आणि सौजन्यशील आहे असे खेदाने नमूद करतो. श्रीगुरुजींनी अजुनतरी पातळी सोडुन बोलल्याचे किमान या धाग्यावर दिसत नाही. ते चुकीच्या गोष्टीचे समर्थन करताना दिसत आहेत. त्यात त्यांची केविलवाणी धडपड दिसते पण जाणुनबुजुन एखाद्या व्यक्तीची, पक्षाची अथवा समुदायाची खोडी काढलेली दिसत नाही. अश्या परिस्थितीत त्यांची कानौघडणी करणारा प्रतिसाद रास्तच असावा पण " फालतू टिवटिव बंद करा" आणि "भाजपाचे दलाल नकोत इथे मिपावर" ही वाक्ये पुर्णतः अस्थायी आहेत. मिपावर सर्वच पक्षांचे समर्थक आहेत. सर्वांचे विरोधक आहेत. आपण स्वतः भाजपाचे कट्टर विरोधक आहात. अश्या परिस्थितीत कोण्या एकाला "दलाल" वगैरे संबोधणे ही फारच वैयक्तिक टिप्पणी होते. शिवाय एखाद्याच पक्षाचे समर्थक नकोच असे म्हणणे ही चुकीचे आहे. आम्ही तर मिपावर आप आणी राष्ट्रवादीच्या समर्थकांना पण सहन करतो. त्यात काय एवढे?

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 24/10/2016 - 23:14
ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं. धन्यवाद! रच्याकने, मी कोणाचा कट्टर विरोधक आहे किंवा नाही हेही तुम्हीच ठरवा.. परत असो.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 25/10/2016 - 10:21
डांगे अण्णा गुरुजींच्या मताशी मी पण सहमत नाही परंतु आपली भाषा (दलाल इ शब्द) हि कमरेच्या खाली उतरते आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते. आपल्याला गुरुजी दलाल आहेत हे सिद्ध करून दाखवता येईल काय? तुम्ही भक्त म्हणत होतात तोवर ठीक होते. याबाबतीत मृत्युंजय यांच्याशी सहमत.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 25/10/2016 - 10:31
मी गुरुजींनाच दलाल बोललो हे सिद्ध करता येईल काय? मिपावर भाजपचे दलाल नकोत अशी इच्छा व्यक्त केली आहे, ह्यात काय गैर? आणि हो, 'भाजपचे नकोत तर इतरांचे चालतील का' असा बुद्धिमान प्रश्न कोणी विचारू नये, ;)

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/10/2016 - 10:38
तुमचा प्रतिसाद लिहिताना तोल सुटला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर गुरूजींना बोललेले शब्द मागे घ्या. अशी शब्दांची कसरत करत तुम्ही पायर्‍या खाली उतरत जाण्यापेक्षा शब्द मागे घेणे सोपे आहे.

In reply to by सुबोध खरे

शब्दबम्बाळ 25/10/2016 - 13:31
दलाल वगैरे शब्द अयोग्य आहेत वगैरे सगळ्यांनी बोलून झालाय आणि ते बरोबर हि आहे. पण एखाद्या आयडी ला (तो नावडता असल्याकारणाने) "चड्डीला हात घातला", "सुंता केला" असे दिले गेलेले प्रतिसाद हे कमरेच्या वरचे आहेत का? कि आयडी च्या प्रसिद्धी आणि कंपू नुसार 'कमरेचे' माप बदलते?

In reply to by मृत्युन्जय

शब्दबम्बाळ 26/10/2016 - 15:09
मी एकाच ठिकाणी दोन्ही ठिकाणचा आक्षेप घेतला आहे! ;) असाही माझ्या आक्षेपाला कोण विचारतो? आमची ना फॅन फॉलोविंग ना कंपू त्यामुळे ज्या धाग्यावर प्रतिक्रिया देत असतो तिथे ताळतंत्र सोडून प्रतिक्रिया दिल्याचे दिसले तर थोडं सांगायचं प्रयत्न करतो... पण तुमच्या प्रश्नाचा रोख काय आहे हे कळलं तर नीट उत्तर देऊ शकेन...

In reply to by शब्दबम्बाळ

मृत्युन्जय 26/10/2016 - 16:48
इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच विचारत नाही. मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो वा नसो समर्थन मिळते. त्यामुळे इथे कंपुचा संबंध नाही. ताळतण्त्र सोडुन कुणी वागत असेल तर जरुर समज द्यावी. जिथे मला दिसते तिथे तशी समज मी देतोच. जर तसे करणे मला योग्य वाटले तर,. त्यामुळे माझ्या प्रतिक्रियेवर प्रतिसाद देण्याचे प्रयोजन कळाले नाही हा मुख्य रोख आहे. शिवाय प्रतिसाद देताना मी प्रतिसाद अयोग्य का वाट्तो याची कारणेही दिलेली आहेतच. असो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

In reply to by मृत्युन्जय

मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो वा नसो समर्थन मिळते. मिळत नाही.धन्यवाद.

In reply to by मृत्युन्जय

शब्दबम्बाळ 26/10/2016 - 17:17
अहो ती प्रतिक्रिया खरे काकांच्या प्रतिसादाला दिलेली आहे.. बघा पुन्हा! खरे काका काही वेळा मी त्या प्रतिक्रियेत लिहिल्या वाक्यांपैकी काहीतरी वापरतात(प्रसिद्ध आयडीला ) , त्या अनुषंगाने विचारले होते मी... असो, दिवाळीच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा!

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 26/10/2016 - 13:36
अरेच्या. मग सगळे ठरवण्याचा ठेका काय मिपा व्यवस्थापनाने तुम्हालाच दिलाय की काय? तुम्ही नाही का श्री गुरुजींना " भक्त", ठरवुन टाकलेत? जर तुम्ही भाजपा विरोधक नसाल तर श्री गुर्जी आपचे खंदे कार्यकर्ते आहेत असे पण म्हणूयात की. हाकानाका. असो. असोच. ....

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 24/10/2016 - 23:21
यात काहीच नवीन नाही. माझ्या प्रतिसादाचा प्रतिवाद न करता आल्याने समोरच्याने चिरडीला येउन संदर्भहीन व व्यक्तिगत टिप्पणी करणे हे नेहमीचेच आहे.

In reply to by मृत्युन्जय

साहना 25/10/2016 - 06:48
फालतू टिवटिव आणि दलाल ह्या शब्दांत सौजन्यहीन असे काही आहे असे वाटत नाही. "श्री गुरुजी" असे सोज्वळ नाव धारण करणारी व्यक्ती खंडणीखोर वृत्तीची आणि अपली पदाची शपथ मोडणाऱ्या मुख्यमंत्र्याची बाजू मांडत आहे अन नेत्यासाठी "दलाल" हा शब्द १००% योग्य वाटतो. खुद्द मुख्यमंत्र्यानी जे काही केलं आहे त्याची बातमी इंग्रजी वर्तमान पत्रांनी "brokered" अशी दिली आहे. गुरुजींचा युक्तिवाद "फालतू टिवटिव" ह्याच सदरांत मोडतो. प्रत्यक्षांत श्री गुरुजी हे फार चांगले व्यक्ती असतील ह्यांची शंका नाही पण पक्ष भक्तीने त्यांना आंधळे बनवले आहे.

In reply to by मृत्युन्जय

विशुमित 25/10/2016 - 10:06
राष्ट्रवादीच्या समर्थकांना पण सहन करतो>>>> -- उपकारच झाले मायबाप आमच्यावर. कुठे ऋण फेडू हे. या जन्मात तर शक्यच नाही. (हलके घ्या)

In reply to by संदीप डांगे

अभिदेश 24/10/2016 - 23:56
आणि सौजन्यहीन प्रतिसाद .... हे अनेकवेळा झालेले आहे. तुमच्या इतर धाग्यावरच्या प्रतिसादावरून आम्ही तुम्हाला पवार साहेबांचे दलाल असे म्हटले तर चालेल का ?

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/10/2016 - 00:06
डांगेण्णा.. प्रतिसाद पटला नाही. तुमचा वाद घालण्याचा स्टॅमिना संपला असेल तर गुरूजींकडे दुर्लक्ष करा. सरकारचे चुकले आहे आणि गुरूजी लंगडी बाजू सावरत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. बादवे.. "आपण अशी भाषा वापरणे = आपल्या बाबतीत दुसर्‍याला अशीच भाषा वापरण्याची परवानगी देणे"

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 25/10/2016 - 00:09
भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,
१. बाकी पक्षांचे दलाल चालतील का? २. मिपावर काय चालेल आणि काय नाही हे नीलकांत आणि संपादक यांना ठरवू द्या की. तुम्ही नक्की कुठल्या अधिकाराने हे बोलताय?

अर्धवटराव 24/10/2016 - 22:24
सरकारने दोन विरोधी पार्टींना आमने-सामने बसवुन वाद मिटवावे, आंदोलनं टाळावी यात काहिच वावगं नाहि, नवखं देखील नाहि. बाँबे पासुन ते झेंड्यापर्यंत, आणि क्रिकेट सामन्यांपासुन ते अमुक तमुक लवादापर्यंत हेच धोरण अनेकदा नौभवलं आहे महाराष्ट्राने. यंदा फरक हाच, कि मनसेला एकदम सीएम लेव्हलची मध्यस्थी मिळायला नको होती. त्यामागे कदाचीत आगामी मुंबई इलेक्शनचे आराखडे असतील. दुसरी बाब म्हणजे ५ करोडच्या देणागीला खंडणीचा वास येणे. करण जोहर वगैरे मंडळींना काहिच तोशीक न लागता प्रकरण मिटु नये, व सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे मिळवुन देऊन आपलं उदात्तीकरण करावं हा त्यातला स्वार्थ-परमार्थ असु शकेल. अदरवाईज जे झालं त्यात काहि खटकण्यासारखं काहि नाहि. या प्रकरणाची भारत-पाक व्यापारी संबंधांशी याचि तुलना करणे फारच हास्यास्पद आहे. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा, इतर व्यापार हे सर्व वाणिज्य, अर्थ, गृह, अगदी मिलट्री इंटलीजन्स आणि गुप्तहेर संघटनांच्या कॉर्डीनेशनचे उद्योग आहेत. आणि ते काय योग्य ते करतीलच. एखाद्या चित्रपटाच्या रिलीजशी त्याचा संबंध जोडणे म्हणजे फारच झालं.

In reply to by अर्धवटराव

सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे मिळवुन देऊन आपलं उदात्तीकरण करावं हा त्यातला स्वार्थ-परमार्थ असु शकेल. अदरवाईज जे झालं त्यात काहि खटकण्यासारखं काहि नाहि. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माहित नाही पण त्यातून आयजीच्या जीवावर बायजी उदारचा वहीम येतोय!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अर्धवटराव 24/10/2016 - 22:39
तसा तो आहेच. नुसतच इशारे वगैरे देऊन प्रकरण मिटवलं असतं तर ठाकरेंच्या हाति काहि लागलं नसतं. पक्षाला खंडणी मिळाली असती ( ति तशीही मिळाली असेल टेबलाखालुन) तर उरली-सुरली इज्जत गेली असती. नैसर्गीक आपत्ती, खेळ, पुतळे वगैरे करता पैसे घेऊन काहिच फायदा झाला नसता. सैन्याकरता पैसे घेऊन ठाकरे गंगेत बुडी मारायला गेले, पण ते प्रकरण अंगावर शेकलं दिसतय. खास करुन सैन्याधिकार्‍यांनी कानउघडणी केल्यामुळे काहि उत्तर पण देत येणार नाहि मनसेला. हे थोडं हात दाखवुन अवलक्षण झालेलं आहे मात्रं :)

गामा पैलवान 24/10/2016 - 22:28
श्रीगुरुजी,
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?
मलाही नेमका हाच प्रश्न पडला आहे. फडणविसांनी नक्की काय करायला पाहिजे? लांडे कारभार करायला सांगितलं होतं कोणी करण जोहरला? आ.न., -गा.पै.

संदीप डांगे 25/10/2016 - 00:32
मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम! 'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल! माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना! कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो! मनोरंजनाची हि पहिलीच वेळ नाही व शेवटचीही नसणार :) =))

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/10/2016 - 00:59
लैच करमणूक करायला लागलात की. भाजप = गुरूजी..? मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम! गुरूजींची पडेल बाजू कोण सांभाळत आहे..? इथे तुमच्या प्रतिसादाला विरोध नोंदवणार्‍या किती जणांनी गुरूजींना पाठिंबा दर्शवला आहे? नीट बघा जरा. 'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल! हा हा.. खूपच विनोदी प्रतिवाद. यावर शब्द खुंटले. मुद्द्यावरून लक्ष हटवणे...??? - गिव्ह अ ब्रेक..!!!!! माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना! असो. यावर पास. कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो! यासाठी आपण स्वतः शब्द जपून वापरायचे असतात. कोण कुणाच्या सहाय्याने कोणत्या विचारधारेची भलामण करत असते आणि कोण सरसकटीकरणाचे पिवळे चष्मे घालून प्रतिसादांचा रतीब पाडत असते हे न कळण्याइतके पब्लीक खुळे नसते. असो, तुमच्या प्रतिसादाला विरोध केला तर लगेचच सरसकट वैयक्तीक लेबले लाऊन आलेला प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले नसले तरी याही प्रतिसादाचा टोन पटला नाही हे खेदपूर्वक नमूद करतो.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 25/10/2016 - 01:33
माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल!
Joke of the day! इथं तुमच्या प्रतिसादांना अाक्षेप घेणाऱ्या किती जणांनी गुरुजींच्या युक्तिवादाला समर्थन दिलंय ते एकदा बघून घ्या आणि मग काय ते बोला. नेहमी भाजपच्या बाजूने लिहिणाऱ्या किती जणांनी इथे सरकारची बाजू घेतलीय ते नीट बघा. अगदी धागा काढणाऱ्या नाखुकाकांपासून सुरूवात करा.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 26/10/2016 - 16:52
तुमच्या भाषेबद्दल सर्वप्रथम आक्षेप मीच घेतला आहे. तरी वरील सर्व आक्षेप माझ्याबद्दल असतील तर ते आधी स्पष्ट करावे तर मी पुढील प्रतिसाद देतो. अन्यथा उगाच तुमच्याबद्द्दल गैरसमज करुन घेउन प्रतिसाद देण्यात हशील नाही.

कपिलमुनी 25/10/2016 - 00:54
इथे ५० जणांनी ५०० प्रतिसाद लिहीे तरी गुर्जीं काय ऐकणार नाहीत, फक्त लिहीणारांची चिकाटी या मुद्दयांवर टिकते का हे पहायचा आहे !

गामा पैलवान 25/10/2016 - 03:17
पैसाताई,
गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत.
हाहाहा ! ज्योक ऑफ द डेकेड !! ऑगस्ट २०१२ चे आझाद मैदानातले दंगे विसरलात की काय? त्यानंतर पोलिसांचा मोर्चा निघाला होता. त्यातलं हे चित्रं खास तुमच्यासाठी डकवतोय : http://static.dainiktribuneonline.com/wp-content/uploads/2012/08/PTI8_21_2012_000146B.jpg पोलीस मनसेवर का हात उचलणार नाहीत हे वरील चित्रातून कळतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पैसा 25/10/2016 - 10:59
राजकीय इच्छाशक्ती दाखवावी. गोव्यासारख्या लहान राज्याचे पोलीस टोल बूथ मोडणाऱ्या नारायण राणेंच्या सुपुत्राला झोडून काढून आत टाकू शकतात तर महाराष्ट्र पोलिसात नुसत्या लाठीने सशस्त्र अतिरेक्यांचा सामना करायची हिम्मत आहे. थोडा विश्वास दाखवा.

साहना 25/10/2016 - 05:56
१. सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी. देश स्वतंत्र असेल तर कायद्याने ज्या गोष्टीची मुभा दिली आहे ते करण्याची १००% मुभा सर्वानाच असून त्यांत बंदी इत्यादींची भाषा करणारे गुंड आहेत. मुलीची छेड कडणाऱ्याला काय करतात तेच त्यांचे करावे. २. निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत. न्यायालयाला क्रिकेट नियामक मंडळ चालवण्याचे फार महत्वाचे काम असताना कायद्याचे रक्षण वगैरे करण्याचे फुटकळ काम करण्यासाठी काम नसावा. त्या शिवाय ह्यावर कायदेशीर निर्णय येई पर्यंत फवाद खान ला नातवंडे होतील. ह्या शिवाय न्यायालयाच्या निवडायचे पालन होईल ह्याची काय शाश्वती ? गुंड गिरीची भीती असेल तर तुम्ही आपल्या मुलांना चित्रपट गृहांत पाठवाल का ? इतर ५६ विषय सोडून राज ठाकरेंनी "चित्रपट" हेच क्षेत्र गुंडगिरी दाखविण्यासाठी का वापरले ? कारण इथे "वेळेला" महत्व आहे. ३. महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी? इथे फक्त चित्रपटाच्या गल्ल्याचा आणि निर्मात्यांच्या फायद्याचा प्रश्न नाही. चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युशन मार्केटिंग साठी आधीपासूनच पैसे खर्च केलेला असतो. बहुतेक करून चित्रपटगृहांनी ऍडव्हान्स मध्ये प्रिंट्स आणि स्क्रिन्स बुक केलेल्या असतात. अनेक लोकांचे भवितव्याचा इथे प्रश्न आहे. करण जोहर चा चित्रपट लागला नाही तर पुढच्या वेळी त्याला ऍडव्हान्स डील्स बुक करणे मुश्किल होईल. ४. मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय? १००%. मुख्यमंत्र्यांचा निर्णय मूर्खपणाचा होता. २०% आमदार असणाऱ्या पक्षाने धमकी दिली असती तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाख घालून कायद्याचे रक्षण चित्रपटाला द्यायला पाहिजे होते. मनसेचे आमदार आहेत १. अश्या पक्षाची धमकी फार तर पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर हाताळली गेली पाहिजे होती. ५. आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे? खंडणीचा पैसे कुठे जातो ह्यावर काहीही अवलंबून राहत नाही. खंडणी ती खंडणी. ६. या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे. ह्या वादांत राज ठाकरे ह्यांच्या फायदा झाला आहे. फक्त १ आमदार असून सुद्धा आपण कोणी तरी मोठे नेते आहोत हे त्यांना दाखविण्याची संधी फडणवीसांनी विनाकारण उपलब्ध करून दिली आहे. आत रिपब्लिकन पक्ष, शेकाप, शिवसेना, AIIMB इत्यादी मंडळी सुद्धा त्यांच्या छाताडावर चढतील ह्यांत काहीही शंका नाही. कायदा हि सोयीस्कर आहे तेव्हांच अंबलबजावणी करण्याची गोष्ट नाही. उलट जेव्हा कायदा बजावण्यात धोका असतो तेव्हांच देशाच्या कायद्याची खरी कसोटी लागते. देवेंद्र ह्याच्या वागणुकीतून महाराष्ट्रांत कायदा बजावण्याची धमक नाही हेच स्पष्ट झाले आहे. इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दार वाढवून वसूल केले असते.

In reply to by साहना

राही 25/10/2016 - 10:38
"इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दर वाढवून वसूल केले असते." इथे असे काही झालेले नाही असे छातीठोकपणे सांगता येईल? सैनिक फण्डला काही रक्कम उघडपणे देऊन उरलेले निम्मे निम्मे वाटून घेतलेले नाहीत असे छातीठोकपणे सांगता येईल? अशा बातम्या विकीवर किंवा पेपरमध्ये येत नसतात. लोकांना दाट संशय आहे हे खरे.

In reply to by राही

मोदक 25/10/2016 - 10:45
या ठिकाणी भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा. आपणच आरोप करायचे आणि पुरावे नसल्याने समोरच्यालाच निर्दोषत्व सिद्ध करायला सांगायचे ही केजरीवाली पद्धत जुनी झाली. पत्रकारांना, सत्तेत नसलेल्यांना किंवा अगदी मराठी संस्थळावर आपल्या पक्षाचा अजेंडा रेटवणार्‍या खर्‍या खोट्या आयडींना हे सगळे करण्याबाबत काय काय मिळत असावेत याबाबत अनेकांना अनेक संशय आहेत. हे ही खरे.

In reply to by मोदक

राही 25/10/2016 - 11:00
एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे. आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतात. तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेच. आणि पक्षाचा अजेंडा संतप्त भक्तिभावाने कोण रेटते ते वेगळे लिहायला नको. आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे.. आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही.

In reply to by राही

मोदक 25/10/2016 - 13:41
एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे. आरोपाच्या पूर्वीची पायरी किंवा आरोप करण्याइतके पुरावे नाहीत पण धुरळा उडवायचा आहे म्हणून काढलेली पळवाट असे काही आहे का..? आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतात पैशांच्या मोहाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे माहिती होते पण असे सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे वाटले नव्हते. असो. माध्यमे संशय व्यक्त करण्यासाठी नसतात तर माध्यमांचे काम "निरपेक्षपणे विचार मांडणे आणि कोणत्याही घडामोडींवर संतुलीत भुमीकेने व्यक्त होणे" असे असावे. अर्थात हे मी माझ्या अत्यल्प अनुभवावरून आणि कोणत्याही विचारधारेच्या दावणीला बुद्धी न बांधता बोलत आहे. तुमचे विचार वेगळे असतील तर मान्यच आहे. तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेच तुम्ही / आम्ही..?? मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाहीये हो, तसेच कोणत्याही प्रकरणाचे पुरावे माझ्यापर्यंत गुप्तपणे पोहोचण्याची सुतराम शक्यता नसल्याने मी कधीही कोणताही संशय व्यक्त करत नाही. आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे.. या वाक्याचा संदर्भ कळाला नाही. आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. मी आव्हान दिले आहे हे शोधून दाखवा बरं. तुम्ही खुलेपणाने संशय व्यक्त करत आहात म्हणजे तुमच्याकडे काहीतरी खास पुरावे असावेत म्हणून मी म्हटले आहे की "भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा" सांगोवांगीच्या गप्पा असतील तर तसे सांगा.

In reply to by राही

बोका-ए-आझम 25/10/2016 - 13:46
डाव्या लोकांचे जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप असतात, माहित आहे ना तुम्हाला? एकदा डावी विचारसरणी म्हटल्यावर दुर्लक्ष करावं.

In reply to by बोका-ए-आझम

मोदक 25/10/2016 - 13:58
सल्ल्याबद्दल धन्यवाद बोकाशेठ. याबाबत मी क्लिंटन ला आदर्श मानतो, डावे दिसले की त्यांच्या विचारांमधील दांभीकता उघड पाडण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्याकडे पळवाटा तयार असतातच पण "इथे विरोध होतो आहे" इतकी साधी गोष्टही त्यांना पळ काढायला पुरेशी असते. दुर्लक्ष केले की "समोरच्याने उत्तर दिले नाही म्हणजे माझेच बरोबर" आणि उत्तर दिले की "बघा बघा किती असहिष्णुता वाढली आहे किंवा "अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी" वगैरे अपेक्षित रूळावरून गाडी जाईलच त्यामुळे आजिबात दुर्लक्ष करू नये.

In reply to by मोदक

राही 25/10/2016 - 17:40
पळ वगैरे काढण्याचा प्रश्नच नाही. पण तेच तेच मुद्दे उगाळले जाऊ लागले आणि तर्कहीन आर्ग्युमेंट होऊ लागले की प्रतिसाद लिहिण्याचाही कंटाळा येतो. मग गप्प राहावेसे वाटते इतकेच. मला इथे काही युद्धबिद्ध खेळण्यासाठी यायचे नसते. म्हणून तर कमीत कमी वावर असतो. पैशाच्या लोभाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे (तुम्हाला/सगळ्यांना) माहीत होते पण इथे (माझ्या प्रतिसादात) सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे (तुम्हाला) वाटले नव्हते, हा तुम्ही काढलेला अर्थ वा तुम्ही व्यक्त केलेले मत माझ्या प्रतिसादातल्या कोणत्या वाक्यावरून होऊ शकते? आणि या माझ्या प्रतिसादात तुम्हाला दांभिकता कुठे दिसली? 'बघा बघा किती असहिष्णुता....' वगैरे टाइपचे प्रतिसाद मी कधी दिले? आणि 'डावे दिसले की त्यांच्या विचारातली दांभिकता उघड पाडण्याचा प्रयत्न करायचा' हा तुमचा अजेंडा असेल तर (असू शकतो, माझे त्याबाबत काहीही मत नाही) तुमचा वरील प्रतिसाद त्यानुसार नाही कारण त्यातून कोणतीही दांभिकता उघड झालेली नाही. म्हणून टंकाळा येतो.

इतर ५६ विषय सोडून राज ठाकरेंनी "चित्रपट" हेच क्षेत्र गुंडगिरी दाखविण्यासाठी का वापरले ? कारण इथे "वेळेला" महत्व आहे.
मुद्दा समजून घ्या. हे आंदोलन राज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले आहे. मला वाटतं ते त्यांच्याशी संबंधितच क्षेत्र असावं.
मनसेचे आमदार आहेत १. अश्या पक्षाची धमकी फार तर पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर हाताळली गेली पाहिजे होती
आमदार असणे हेच एखाद्या पक्षाच्या ताकदीचं मोजमाप असू शकतं काय? आता या घडीला तरी रस्त्यावर सगळ्यात जास्त पाठिंबा असलेले नेते राज ठाकरे नाहीयेत का? मला असं वाटतंय कि तथाकथित खंडणीचा पैसा सैनिक कल्याण निधीला नको हे मुळी दुखणंच नसून मनसे हे दुखणं आहे. अवांतर : सध्या सैनिक कल्याण निधीला जात असलेला सगळा पैसा खातरजमा करून घेतला जात असेल का (म्हणजे तो भ्रष्टाचारातून आलेला वगैरे नाही असा)? तो पैसा सैनिक कल्याण निधीत जातोय यापेक्षा खरंतर दुसरा आनंद नाही.
इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दार वाढवून वसूल केले असते.
व्वा! हे लॉजिक कशावरून बुआ? कि उगाच काहींच्या काही! म्हणून म्हणतो, दुखणं हे खंडणी नाही, दुखणं हे मनसे आहे!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

साहना 25/10/2016 - 11:43
> मुद्दा समजून घ्या. हे आंदोलन राज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले आहे. मला वाटतं ते त्यांच्याशी संबंधितच क्षेत्र असावं. 1 पक्ष असलेल्या पक्षाची कसली चित्रपट सेना ? आणि हिंसा सोडून इतर कुठली नीती ह्यांची होती ? होती हिम्मत तर बहिष्कार टाकायचा. > आमदार असणे हेच एखाद्या पक्षाच्या ताकदीचं मोजमाप असू शकतं काय? १००% होय. आणखीन काय माप आहे ? गुंडगिरीची प्रवृत्ती ? > सध्या सैनिक कल्याण निधीला जात असलेला सगळा पैसा खातरजमा करून घेतला जात असेल का (म्हणजे तो भ्रष्टाचारातून आलेला वगैरे नाही असा)? तो पैसा सैनिक कल्याण निधीत जातोय यापेक्षा खरंतर दुसरा आनंद नाही. खंडणीचा पैसा सैनिकांना द्या नाहीतर आणखीन कोणाला द्या. चोरी ती चोरी आहे. तुमची मुले किडनॅप करून मिळणार पैसे सैनिक निधीला दिला तर चालेल काय ? > व्वा! हे लॉजिक कशावरून बुआ? कि उगाच काहींच्या काही! म्हणून म्हणतो, दुखणं हे खंडणी नाही, दुखणं हे मनसे आहे! १ आमदार असलेल्या पक्षाचे काहीही दुखणे नाही. देवेंद्र फडणवीस सारख्या मुख्यमंत्र्याने ज्याच्या कडून अनेक अपेक्षा होत्या त्यानी फुटकळ गुंडा पुढे सपशेल शरणागती पत्करून दलाली करावी हे पटले नाही. मूळ दुखणे हेच आहे. मनसे किंवा राज ठाकरे माझ्या खिजगणतीत सुद्धा नाही.

In reply to by साहना

>>1 पक्ष असलेल्या पक्षाची कसली चित्रपट सेना ? आणि हिंसा सोडून इतर कुठली नीती ह्यांची होती ? होती हिम्मत तर बहिष्कार टाकायचा. परत तेच, फक्त द्वेष. माझ्या माहितीनुसार मनसे चित्रपट सेना हि सभासदांच्या संख्येनुसार सर्वात मोठी चित्रपट संघटना आहे! >>१००% होय. आणखीन काय माप आहे ? गुंडगिरीची प्रवृत्ती ? फक्त तुम्ही म्हणाल म्हणून सगळे खरे असे नसते! गुंडगिरीची प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय? >>खंडणीचा पैसा सैनिकांना द्या नाहीतर आणखीन कोणाला द्या. चोरी ती चोरी आहे. तुमची मुले किडनॅप करून मिळणार पैसे सैनिक निधीला दिला तर चालेल काय ? हि तुलना योग्य वाटते तुम्हाला? मनसे ने तसे केले तर तो नक्कीच गुन्हा आहे आणि कोर्ट आहे त्यासाठी! तुमचा द्वेष व्यक्त करण्यासाठीचा हा कपोलकल्पित मुद्दा लागू होत नाही इथे. >>मनसे किंवा राज ठाकरे माझ्या खिजगणतीत सुद्धा नाही. हाहाहा! परत परत फुटकळ गुंड म्हणालात तरी तुम्ही परिस्थिती जाणतच असाल असे गृहीत धरतो! तुम्ही हा राग व्यक्त करत आहात कारण फक्त तुमचं मनसे बद्दलचं फुटकळ असं मत आणि मुख्यमंत्रांचं परिस्थितीचा आढावा घेऊन महत्व देण्याचं मत जुळत नाही. खरंतर तुमच्या या वाक्यावरूनच कळतंय कि तुमच्या खिजगणतीत कोण आहे आणि कोण नाही.

सुबोध खरे 25/10/2016 - 10:48
पाकिस्तानी कलाकारांना येथे काम करू द्यावे हे तात्विक दृष्ट्या बरोबर असले तरीही पाकिस्तानी कलाकारांच्या वाचून यांचे का आणि काय अडते? इतर परदेशी कलाकारांबाबत भारतीय नागरिकांची आत्यंतिक भूमिका नाही तर "फक्त पाकिस्तानी" कलाकारांबाबत आहे याचे कारण प्रत्येकाला माहीत आहे. हे "बाहेरून" येणारा पैसे बोलतो आणि "फिल्मी" लोकांचा पैसा हाच देव आहे. जसे जिहादी धर्मासाठी काहीही करायला तयार असतात तसेच हे फिल्मी लोक पैशासाठी काहीही करायला तयार होतात. मुळात मी सिनेमे कमीच पाहतो परंतु सलमान खान आणि शाहरुख खान यांचे "कर्तृत्व" पाहिल्यावर मी आणि माझे कुटुंब यांनी त्यांच्या सिनेमावर पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे. पाकिस्तानी कलाकारांबाबत प्रश्नच येत नाही. मी याच कारणासाठी "हिना" सुद्धा पहिला नाही. यांचे सिनेमे किंवा पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे पाहिले नाही तर काही जीव जात नाही. प्रत्येक गोष्ट कायदेशीर असली तरीही नैतिक दृष्ट्या बरोबर असतेच असे नाही. सरकार कायद्यावर बोट ठेवून चालते त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना प्रवेश नाही हे म्हणणे त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यामुळे कठीण जात असावे. ( मला नक्की माहिती नाही हे मी आत्ताच नमूद करू इच्छितो). अगोदर झाले ते झाले. परंतु आपले इतके सैनिक( आणि आपले सीमेलगतच्या नागरिक आणि त्यांची गुरे/ पाळीव प्राणी) पाकिस्तान कडून मारले गेल्यावर जर श्री शाम बेनेगल याना बेशरम पणे परत पाकिस्तानी कलाकारांना घ्यावेसे वाटत असेल तर देशद्रोही म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यासाठी मी पाठिंबाच देईन. माझी देशभक्तीची व्याख्या चूक असेल एकांगी असेल तरीही ती कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत आहे.

सुज्ञ 25/10/2016 - 11:51
मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे संडास झ्हाली आहे . त्यामानाने टीवटीव हा सौम्यच शब्द म्हणावा लागेल . असेच आवांतर : आपण कुठल्या पार्टी ला समर्थन करतो त्यावरून आपली वैचारिक पात्रता कळते काय ?

In reply to by सुज्ञ

@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय, इथे तुमचा निरक्षीर विवेक दिसलेला नाही असे सखेद आश्चर्याने नमूद करावे वाटते आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गणामास्तर 25/10/2016 - 12:26
बापू थोडा वेळ तरी द्यायचा कि. पाच सात मिनिटांत लगेचं सगळे प्रतिक्रिया देतील असे कसे होईल?

In reply to by मोदक

अरेच्या! असा वेळ देतात होय! पूर्वानुभवावरून तरी तसे वाटले नव्हते, डांगेंच्याच एका प्रतिसादाला आम्ही ५ मिनिटात रिप्लाय दिला नाही म्हणून आम्हाला मानसिक क्लेश होऊस्तोवर शेलकी विशेषणे बहाल केली गेली होती, ह्याच मिपावर, खास त्या कामाकरता एक डू आयडी डेप्युट करून, त्यावरून आमचा ग्रह झाला की बोवा हीच जनरीत असेल, असो तशी जनरीत नसल्यास आम्ही समस्तांची जाहीर माफी मागतो अन "सम इक्वल्स आर मोर इक्वल्स" इतकेच म्हणतो, वरती आमचे लेखन दैवत बोक्याभाऊ , किंवा इतर भद्रजन "आम्ही इतर पक्षीय भक्त सहन करतो वगैरे" बोलले आहेत तेव्हा "तुम्ही सरळ ऐसी अक्षरेवर जा" वगैरे कोण कोणाला बोलले होते त्याचा गोंधळ उडतो बघा बाकी काही नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मोदक 25/10/2016 - 13:51
बापू, नक्की मुद्दा काय आहे..? मी माझ्यापुरते बोलतो. मी जसा डांगेंचा विरोध केला आहे तसाच गुरूजींचाही विरोध केला आहे. आणि असा प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा विरोध करावा अशी अपेक्षा असेल तर ते प्रॅक्टिकली शक्य नाही. त्यासाठी "डुआयडींची पिलावळ किंवा नैतीकतेचा कंपास हरवून खुशाल आरोप करणारे" आणि "डांगे व श्रीगुरूजी" यांना एकाच रांगेत बसवावे लागेल. बाकी प्रतिसादाबद्दल "सम इक्वल्स आर मोर इक्वल्स" हे इथे कसे लागू आहे सांगा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मोदक 25/10/2016 - 13:18
@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय बापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का? नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..? सुज्ञ यांच्या कमेंटबद्दल - मुळात या धाग्यावर मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटलेले मला आढळलेले नाहीये. त्यामुळे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे माहिती नाही. जर त्यांना मिपावर कुठेतरी म्हटले गेलेले अपेक्षित असेल तर त्याबद्दल इतकेच म्हणू शकतो की इथे साक्षात शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या गेल्या आहेत त्यांच्या कामगिरीवर त्यांनी अफझलखानाला मारलेच नाही असेही सर्टिफिकेट देवून खोटे ठरवले गेले आहे (हे प्रतिसाद आता उडाले आहेत) मग मुख्यमंत्री किस झाड की पत्ती..? मी जसे डांगेंच्या प्रतिसादाला विरोध दर्शवला तसा गुरूजींच्या अनेक प्रतिसादाला विरोध दर्शवला आहे. अर्थात गुरूजींनी स्वत:च्या प्रतिसादांना नेहमी स्वतः प्रतिवाद केला आहे, चुकीचा असला तरी. माझ्या मते डांगे या मुद्द्यापासून कोसो दूर आहेत कारण त्यांच्यावर शेकलेल्या कांही प्रकरणामध्ये ते स्वत: कमी आणि त्यांच्या वतीने तुम्हीच लगेच प्रतिवाद करता असेही दिसून आले आहे. आता हे सगळे सांगावयाचे काम जर संपादक मंडळाचे असेल आणि त्याबाबत आमच्यासारख्या सामान्य सदस्याने बोलू नये असे कोणाचे मत असले तर तसे सांगा.

In reply to by मोदक

डिस्क्लेमर :- डांगेंची माझी मैत्री जुळणे, किंवा मी त्यांच्यावतीने प्रतिवाद करणे, आम्ही एकाच गावचे (नियतीच्या कृपेने) असणे ह्याचा कोणी अर्थाअर्थी संबंध जोडत असल्यास खाली लिहिलेले सगळेच तुम्हाला आवडेल असे नाही, आपापल्या जबाबदारीवर वाचा बापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का? हे सुस्पष्ट नाहीये का? असला घाण श्लेष केल्याबद्दलच मागे एक डु आयडी बॅन झाल्याचे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..? तुम्ही खास मित्र म्हणून ही एक अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतोय असे समजा, बोक्याभाऊला करत नाही कारण त्यांनी आधीच निसंदिग्धपणे ते "काय लिहिले पेक्षा कोण लिहितो आहे" हे पाहत असल्याचे जाहीर केले आहेच. तर निरक्षीर म्हणजे फक्त गुर्जीच्या मुद्द्याला विरोध करणे होते का? माझ्यामते नाही, थेट मुद्द्याला हात घालतो, मोगा काय चीज आहे हे सगळ्यांना माहिती आहे,मोगाच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत बसले तर आपले मानसिक स्वास्थ्य हरपायची भीतीच जास्त, 90% मोगांचे रिप्लाय हे टाकाऊ असतात, पण उरलेल्या 10%चे काय ?? त्यावर किमान विचार करणे म्हणजे माझ्यालेखी निरक्षीरविवेक, मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो, तेच गुर्जी काय करतात??, मागे एका प्रतिसादावर चक्क "ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे अश्या विक्षिप्त माणसाच्या बोलण्याला काय किंमत द्यावी" वगैरे ते बोलले आहेत, अरे तुमच्यात इतका दम आहे तर मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करा की राव, का म्हणून आपली पातळी सोडावी??, आता मी थोडे माझे सांगतो, मोगाच्या प्रत्येक कॉमेंटवर म्हणजे आगाऊ कॉमेंटवर मी का व्यक्त होत नाही?? कारण मोगाला मूर्ख बडबड केली की सुज्ञ मिपाकर ताबडतोब झोडपतातच !, गुरुजींचे भाजप भलामण करणारे प्रतिसाद आजकाल कैच्याकै असतात, अन तुम्ही त्यांचा विरोध करताच हे तुम्हीच वर बोलला आहात, अशात जर मोगाने काही राजकीय प्रश्न विचारले तर त्याला कोण लक्षात घेतो का? किमान त्या प्रश्नांची उत्तरे तरी मागतो का? मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा, की दादा, मग मान्य करता येईल निरक्षीर तुमचाही

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुज्ञ 25/10/2016 - 14:37
मोदक भाऊ, बोक्याभाऊ, मृत्युंजय भाऊ ना का त्रास देता . श्लेष करणे चुकीचे असे मलाच म्हणा की . होय ते चुकीचेच आहे . मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे मजल गेली आहे असे वाचा आणि मुद्यावर विचार करा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मोदक 25/10/2016 - 16:42
सुज्ञ यांनी मान्य केले असेल तर ठीक अन्यथा "संडास" हा शब्द संदीप डांगेंच्य नावावरचा श्लेष आहे हे पटणे थोडे अवघड आहे. नीरक्षीरविवेकाची गाडी जर विखारी डुआयडी या स्टेशनाला लागत असेल तर माझा पास. कितीही लॉजीकल लिहून वाद घातला तरी एका क्षणानंतर ती पिलावळ मूळपदावर येते असा स्वानुभव असल्याने अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणे योग्य. असे मी माझ्यापुरते ठरवले आहे. मोगाखान आणि डांगे ही तुलना पटली नाही. डांगे बहुतेकदा लॉजीकल लिहिण्यचा प्रयत्न करतात असे मी येथेच एक दोन ठिकाणी लिहिलेले सापडेल. मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? अनेकदा केली आहे. दाखवून देऊ का..? अर्थात नक्की कोणत्या आयडीने केली आहे आणि तो आयडी मोगाखानचा आहे का? हा वादाचा मुद्दा आहे आणि रोज आयडी बदलण्याची वेळ आल्याने असे होणारच. तरीही त्याचे मोदींबद्दलचे विचार शोधून बघा, तुम्हाला अपेक्षित असलेल्या कमेंट्स पेक्षाही विखारी कमेंट्स मिळतील. मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा बापू, या प्रकरणाची मला कल्पना नाही. रोज नवीन नवीन कपडे घालून इतके आयडी अवतरतात. किती जणांचा ट्रॅक ठेवणार..? आणि असा किती जणांना विरोध दर्शवणार..? जेथे शक्य आहे तेथे विरोध दर्शवला आहे आणि जेथे विरोध दाखवला नाही तेथे मी (विरोध दाखवला नाही म्हणून) त्या विचारांशी सपशेल सहमत आहे असेही नक्कीच नाही. मी विरोध असेल तर स्पष्ट आणि सहमती असेल तर तीही सुस्पष्टरीत्या दाखवतो. प्रत्येक धाग्यावर प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देणे शक्य होत नाही ही माझी मर्यादा समजा. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी तुम्हाला मोगा समर्थक म्हटलेले मला आठवत नाही आणि तसे घडेल याची शक्यता नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 25/10/2016 - 23:49
तुम्ही खास मित्र म्हणून ही एक अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतोय असे समजा, बोक्याभाऊला करत नाही कारण त्यांनी आधीच निसंदिग्धपणे ते "काय लिहिले पेक्षा कोण लिहितो आहे" हे पाहत असल्याचे जाहीर केले आहेच. तर निरक्षीर म्हणजे फक्त गुर्जीच्या मुद्द्याला विरोध करणे होते का? माझ्यामते नाही, थेट मुद्द्याला हात घालतो, मोगा काय चीज आहे हे सगळ्यांना माहिती आहे,मोगाच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत बसले तर आपले मानसिक स्वास्थ्य हरपायची भीतीच जास्त, 90% मोगांचे रिप्लाय हे टाकाऊ असतात, पण उरलेल्या 10%चे काय ?? त्यावर किमान विचार करणे म्हणजे माझ्यालेखी निरक्षीरविवेक, मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो, तेच गुर्जी काय करतात??, मागे एका प्रतिसादावर चक्क "ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे अश्या विक्षिप्त माणसाच्या बोलण्याला काय किंमत द्यावी" वगैरे ते बोलले आहेत, अरे तुमच्यात इतका दम आहे तर मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करा की राव, का म्हणून आपली पातळी सोडावी??, आता मी थोडे माझे सांगतो, मोगाच्या प्रत्येक कॉमेंटवर म्हणजे आगाऊ कॉमेंटवर मी का व्यक्त होत नाही?? कारण मोगाला मूर्ख बडबड केली की सुज्ञ मिपाकर ताबडतोब झोडपतातच !, गुरुजींचे भाजप भलामण करणारे प्रतिसाद आजकाल कैच्याकै असतात, अन तुम्ही त्यांचा विरोध करताच हे तुम्हीच वर बोलला आहात, अशात जर मोगाने काही राजकीय प्रश्न विचारले तर त्याला कोण लक्षात घेतो का? किमान त्या प्रश्नांची उत्तरे तरी मागतो का? मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा, की दादा, मग मान्य करता येईल निरक्षीर तुमचाही
मुद्द्याला मुद्द्द्याने प्रतिवाद करावा असे आपले वरील वाक्य वाचून अंमळ आश्चर्य वाटले. मला भाजपकडून पैसे मिळतात अशा अर्थाचे आरोप तुम्हीच माझ्यावर दोन वेळा केले आहेत. पहिल्या आरोपाला मी काहीच उत्तर न देता फक्त "अवघड आहे" एवढाच प्रतिसाद दिल्यानंतर, "सॉरी. गंमत केली." अशा अर्थाचे लिहून तुम्ही तो विषय संपविला होता. या धाग्यात पुन्हा एकदा तोच आरोप आहे. मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करण्याचे हे उदाहरण समजावे का? याच मोगाच्या चंपाबाई नामक अवतारात तुम्ही चंपाबाई या आयडीबद्दलही असेच असभ्य, वैयक्तिक लिहिले होते. त्यावर एकाने आक्षेप घेतल्यावर, "मला माझ्यावर नियंत्रण ठेवायला हवे. काही वैयक्तिक कारणाने माझा ताबा जातो." असा तुमचा प्रतिसाद होता. वरील उदाहरणात आपण पातळी सोडली नाही का? याच मोगाने आपल्या एका पूर्वातरात स्वतःच एक धागा काढून आपली बायको अनेक वर्षे आपल्याला सोडून माहेरी रहात होती असे लिहिले होते. आपले सासूसासरे, मेव्ह्णे, मेव्हणी यांच्याविषयी त्याने अत्यंत गलिच्छ भाषा वापरली होती. "आपले स्वतःचे स्पर्म संपले म्हणून सासरा मला पोरं काढायला सांगतोय" अशा अर्थाची वाक्ये त्यात होती. इतका गलिच्छ धागा संपादकांनी लगेच उडवून टाकला होता. याच मोगाने आपल्या असंख्य अवतारांपैकी अनेक अवतारांमध्ये मोदी व त्यांची बायको, वाजपेयींचे ब्रह्मचर्य यावर अत्यंत असभ्य प्रतिसाद दिले आहेत. "मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो," असे आपण आज तावातावाने सांगत आहात. परंतु मोगाचे मागील असंख्य असभ्य प्रतिसाद आपण सोयिस्कररित्या विसरलेला दिसता. आता नीलकांतभाऊंना सांगून आपण आपला आयडी सरेंडर करणार का? मी मोगाच्या जवळपास सर्व प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. अगदी क्वचितच त्याच्या प्रतिसादाला मला उत्तर द्यावे लागते. मी मोगावर जी काँमेट केली ती नक्की कोणत्या धाग्यात केली हे आता आठवत नाही. परंतु त्या काँमेंटमागे काहीतरी असभ्य संदर्भ होता व तो कोणता होता ते आठवत नाही. मोगाच्या १०% प्रतिसादांवर विचार करणे म्हणजे तुमच्या लेखी नीरक्षीरविवेक असेल. तुम्हाला त्याच्या १०% प्रतिसादांचे कौतुक असेल, पण मोगाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे हा माझ्या लेखी नीरक्षीरविवेक आहे. असो. असभ्य, वैयक्तिक प्रतिसादांचं म्हणाल तर माझ्याबाबतीत अनेकांनी, अनेकवेळा वैयक्तिक हल्ले केलेले आहेत (तुमच्यासहीत). एका ऋषीतुल्य सदस्याने लागोपाठ १०-१२ प्रतिसादात माझा "खोटारडे" असा उल्लेख करून मला मूळव्याध झाली आहे, मला कावीळ झाली आहे असे शोध लावले होते. एका उंदीरमामांनी तर मी ऑफिसमधील नेट फुकट वापरतो व मिपावर मी लिहिलेल्या प्रत्येक प्रतिसादाला, प्रतिसादातील प्रत्येक परिच्छेदाला, परिच्छेदातील प्रत्येक वाक्याला व वाक्यातील प्रत्येक शब्दाला मला भाजपकडून पैसे मिळतात असे बिनदिक्क्त ठोकून दिले होते. ऑफिसमधील नेट फुकट वापरून मी भाजपची भलामण करून पैसे कमावतो असा त्यांचा शोध होता. मी कोण आहे, मी काय करतो इ. ची कणभरदेखील माहिती नसताना बिनदिक्कतपणे असा शोध लावणे कौतुकास्पद होते. अजून एका भटजीबुवांनी तर अनेक प्रतिसादातून माझा एकेरी उल्लेख करून माझी भ्याड, कपटी, पाताळयंत्री, खोटारडा, टनाटनी असे शब्द वापरून माझी संभावना केली होती. एका अभ्यासू समजल्या जाणार्‍या सदस्याने एका प्रतिसादात "मला भरपूर रिकामा वेळ असतो, म्हणून मी वेगवेगळ्या लिंका देतो" असा शोध लावला होता. एनीवे, सवयीने मी अशा वैयक्तिक हल्ल्यांना फार गांभिर्याने न घेता त्याकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष करण्यास शिकलो आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला नाही मोदकभाऊला होता, तरी तुमचा उल्लेख असल्यामुळे तुम्ही बोललात हे रास्तच आहे. याच मोगाच्या चंपाबाई नामक अवतारात तुम्ही चंपाबाई या आयडीबद्दलही असेच असभ्य, वैयक्तिक लिहिले होते. त्यावर एकाने आक्षेप घेतल्यावर, "मला माझ्यावर नियंत्रण ठेवायला हवे. काही वैयक्तिक कारणाने माझा ताबा जातो." असा तुमचा प्रतिसाद होता. होय, चूक केली तरी ती कबुल करायचा दम असावा लागतो गुर्जी, सुदैवाने तो माझ्यात आजही शाबूत आहे :), शिवाय ती एक चूक "एक्सप्लॉइट" करायचा चुकूनही प्रयत्न करू नका, कारण स्वतःचा मुद्दा चूक असला तरी कबूल करायची दानत तुमच्यात नाहीये, हे स्पष्ट आहे दुसरे म्हणजे, वरती तुम्ही म्हणता आहात की मी दोन वेळा तुम्हाला पेड प्रचारक म्हणालो, खाली तुम्ही इतर आयडीजने सुद्धा तेच म्हणलेले सांगताय, मी एकटा बोललो असतो तर कदाचित मलाच भ्रम झाला असे म्हणता आले असते, पण ज्या नेटाने तुम्ही भाजपचे मुद्दे तर्कहीनपणे अक्षरशः रेटत असता ते इतर सदस्यांना ही जाणवले आहे हे मी म्हणत नाहीये तर तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट होतंय तिसरे म्हणजे, आता बुआ बाप्या आयडी सोडणार हा आनंद तुम्हाला झाला असल्यास तो जरा कह्यात ठेवा अन माझे शब्द परत एकदा वाचा, मी म्हणले आहे मोगाने जीवशास्त्रीय कॉमेंट वगैरे.... त्यावर तुम्ही अटलजी वगैरे बोलताय! सिरियसली? मोगाने "तुमच्या" वैयक्तिक आयुष्याबद्दल काय बोललंय ते सांगा, कारण मोगा विरुद्ध तुम्हीही एकदा नाही तर दोनचारदा वैयक्तिक बोलले आहात, त्याच्या बायकोवर टिप्पणी केली तेव्हा "असे काहीतरी कारण असावे/होते" वगैरे गुळमुळीत बोलताय तुम्ही,म्हणजे तुम्ही बोललात त्याला पार्श्वभूमी होती असं आम्ही समजायचं ? अन आम्ही एकदा तोल जाऊन बोललो तर तुम्ही त्याचा वापर करून घेणार ? कुठल्या कायद्याने हो महाराज? बाकी मोगा अटलजी ते शिवाजी महाराज सगळ्यांवर बोलला आहे, त्या करता त्याला लागेल तितके झोडा, किंबहुना तुम्ही जे चवीचवीने "तुम्ही सुद्धा मोगाला बोलला होतात" म्हणताय न तिथे सुद्धा त्याला मी त्याने आर्मी वर काही बोलला म्हणूनच झोडले होते अन मला ती कॉमेंट नीट आठवते, मी मोगाला "तुम्ही मेलात तरी फरक पडत नाही" म्हणले होते, वैयक्तिक आयुष्य काढून पर्यायाने त्याच्या घरच्यांना मध्ये ओढले नव्हते, कोण कोण सोईस्कर दृष्ट्या काय काय विसरले आहे हे स्पष्ट आहेच म्हणा आता मला.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वरील तीनचार प्रतिसाद अतिशय अवांतर आणि विषयाला सोडून/वैयक्तिक आहेत असं वाटत नाहीये का? संदिपजी, सोन्याबापू, श्रीगुरुजी, मोदकभाऊ घ्या सांभाळून झालं!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 26/10/2016 - 13:38
होय, चूक केली तरी ती कबुल करायचा दम असावा लागतो गुर्जी, सुदैवाने तो माझ्यात आजही शाबूत आहे :), शिवाय ती एक चूक "एक्सप्लॉइट" करायचा चुकूनही प्रयत्न करू नका, कारण स्वतःचा मुद्दा चूक असला तरी कबूल करायची दानत तुमच्यात नाहीये, हे स्पष्ट आहे
तुमची दानत, तुमचा दम तुम्हालाच लखलाभ होवो. मला तुमची दानत, दम दाखविण्याची गरज नाही.
दुसरे म्हणजे, वरती तुम्ही म्हणता आहात की मी दोन वेळा तुम्हाला पेड प्रचारक म्हणालो, खाली तुम्ही इतर आयडीजने सुद्धा तेच म्हणलेले सांगताय, मी एकटा बोललो असतो तर कदाचित मलाच भ्रम झाला असे म्हणता आले असते, पण ज्या नेटाने तुम्ही भाजपचे मुद्दे तर्कहीनपणे अक्षरशः रेटत असता ते इतर सदस्यांना ही जाणवले आहे हे मी म्हणत नाहीये तर तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट होतंय
म्हणजे तुम्हाला भ्रम झालेला नसून तुमची माझ्याबद्दल खात्री झालेली दिसतेय. माझ्याबद्दल कणभरही माहिती नसताना आपले भ्रम हेच अंतिम सत्य आहे अशा समजूत करून घेण्यात व त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यात नक्कीच "दम" असावा लागतो.
तिसरे म्हणजे, आता बुआ बाप्या आयडी सोडणार हा आनंद तुम्हाला झाला असल्यास तो जरा कह्यात ठेवा अन माझे शब्द परत एकदा वाचा,
तुम्ही राहिलात किंवा गेलात मला शष्प फरक पडत नाही. तुम्ही असल्याचे आनंद किंवा दु:ख मला नसल्याने तुम्ही गेल्याने मला दु:ख किंवा आनंद होण्याची सुतराम शक्यता नाही. मी नीलकांतभाऊंना सांगून आयडी सरेंडर करेन हे तुमचेच शब्द होते.
मी म्हणले आहे मोगाने जीवशास्त्रीय कॉमेंट वगैरे.... त्यावर तुम्ही अटलजी वगैरे बोलताय! सिरियसली? मोगाने "तुमच्या" वैयक्तिक आयुष्याबद्दल काय बोललंय ते सांगा, कारण मोगा विरुद्ध तुम्हीही एकदा नाही तर दोनचारदा वैयक्तिक बोलले आहात, त्याच्या बायकोवर टिप्पणी केली तेव्हा "असे काहीतरी कारण असावे/होते" वगैरे गुळमुळीत बोलताय तुम्ही,म्हणजे तुम्ही बोललात त्याला पार्श्वभूमी होती असं आम्ही समजायचं ? अन आम्ही एकदा तोल जाऊन बोललो तर तुम्ही त्याचा वापर करून घेणार ? कुठल्या कायद्याने हो महाराज? बाकी मोगा अटलजी ते शिवाजी महाराज सगळ्यांवर बोलला आहे, त्या करता त्याला लागेल तितके झोडा, किंबहुना तुम्ही जे चवीचवीने "तुम्ही सुद्धा मोगाला बोलला होतात" म्हणताय न तिथे सुद्धा त्याला मी त्याने आर्मी वर काही बोलला म्हणूनच झोडले होते अन मला ती कॉमेंट नीट आठवते, मी मोगाला "तुम्ही मेलात तरी फरक पडत नाही" म्हणले होते, वैयक्तिक आयुष्य काढून पर्यायाने त्याच्या घरच्यांना मध्ये ओढले नव्हते, कोण कोण सोईस्कर दृष्ट्या काय काय विसरले आहे हे स्पष्ट आहेच म्हणा आता मला.
म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले तरच मी लिहायचे, पण इतर सार्वजनिक व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही लिहिले किंवा माझ्या धर्मातील माझ्या श्रद्धास्थानांवर किंवा इतरांवर वाईटसाईट लिहिले तरी ते वैध अशी तुमची मोजपट्टी दिसते. आपण एकदा तोल जाऊन बोललो असे काहीतरी स्वतःचे समर्थन करताय. दुसर्‍या एकाने लिहिलेल्या "संडास" या शब्दाचा संबंध तुम्ही संदीप डांगेंशी जोडून राग व्यक्त केला तो कशासाठी? तो आयडी काही तुमच्याबद्दल बोलत नव्हता. आणि आपण स्वतःच चंपाबाई या आयडीचा "चंपी" असा एकेरी उल्लेख केला होता याचे सोयिस्कर विस्मरण झालेलं दिसतंय. माझ्याविरूद्ध एकदा सोडून दोन वेळा वैयक्तिक कामेंट केलीत. काही दिवसांपूर्वीच अजून एका सदस्याला आपण धमकीवजा इशारा दिलेला आहे. तुमचा तोल गेल्याची बघताबघता ४ उदाहरणे सापडली. थोडी खोदाखोद केली अजून बरीच उदाहरणे निघतील. आणि याला तुम्ही फक्त एकदा तोल जाऊन बोललो असे म्हणून समर्थन करता! बाकी कायद्याचं म्हणाल तर तुम्ही ज्या कायद्याने मोगाला किंवा मला किंवा इतरांना झोडपता तोच कायदा मी वापरतो असे म्हणता येईल.

विशुमित 24/10/2016 - 10:36
इसकाळ वरील हे दोन्ही विचार पटले -- सैनिक कल्याण निधीसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेमागील भारतीय नागरिकांच्या भावनेबद्दल लष्कराच्या मनात जराही शंका नाही; मात्र, ही रक्कम राज ठाकरेंच्या खंडणीचा भाग असू शकत नाही. - मनमोहन बहादूर, एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) उत्तर कमांडचे माजी लेप्टनंट जनरल बी. एस.जैस्वाल यांनी म्हटले की, सैनिक कल्याण निधी कोणाला भीक मागत नाही. जर एखादा चित्रपट निर्माता सैनिक कल्याण निधीला योगदान देत असेल, तर त्याने अन्य भारतीय नागरिकांप्रमाणे मदत करावी. मात्र, यापद्धतीने जमा केलेला पैसा सैनिक कधीही स्वीकारणार नाही. सैनिक कल्याण निधीसाठी देण्यात येणारी रक्कम ही स्वेच्छेने देण्यात आली असल्यासच स्वीकारली जाते. खंडणी वा बळजबरी करून देण्यास भाग पाडलेला निधी हा सैनिक कल्याण निधीसाठी स्वीकारला जात नाही,‘

खेडूत 24/10/2016 - 11:09
समाज शेकडो विकृतींनी भरलेला आहेच. ही त्यातलीच एक मनोवृत्ती. आपल्याला राग आला की आपण एक सकारात्मक गोष्ट करावी, जेणेकरून आपल्याला थोडे समाधान मिळेल. या संस्थळावर जाऊन आपण सारेजण एक हजार किंवा त्या पटीत रक्कम देऊ शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक हजार कोटी रुपये तिथेही पडून आहेत, आणि दरवर्षी जमतात त्यातले निम्मेही खर्च् केले जात नाहीत.

मुद्दा क्र. १ व २ यावरच काथ्याकूट बास आहे! अशा वेळेस न्यायालय स्वत:हून मध्ये का पडू शकत नाही हाही मला पडलेला एक प्रश्न आहे. Sandy

हि सेटलमेंट म्हणजे राजकीय अपरिहार्यता वाटली, फडणवीस आणि राज ठाकरे यांची. ऐन दिवाळीत महाराष्ट्रात अशांतता हि गृहविभागाच्या दृष्टीने चान्गली गोष्ट नव्हती आणि आंदोलनात सहभागी लोकांची ऐन दिवाळीत अटक हि मनसेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नव्हती. तेव्हा हा मधला मार्ग काढला गेला असावा. बाकी "कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे" हे सार कशावरून ते कळले नाही. कारण मनसेने पैसे द्या आणि काहीही करा असे म्हटलेले नाही. त्यांची पत्रकार परिषद आणि मराठी वाहिन्यांवरून मला वाटतं ह्या खालील अटी मनसेने ठेवल्या होत्या - त्याही चित्रपट प्रदर्शितच न होऊ देण्याची भूमिका मागे घेण्यासाठी. १. चित्रपट निर्माता संघाने यापुढे पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेऊ नये असा निर्णय लिखित स्वरूपात द्यावा. २. करण जोहर ने आपल्या सिनेमाच्या सुरुवातीला जवानांना श्रद्धांजली वाहणारा फलक दाखवावा. ३. चित्रपट "चालो अथवा न चालो", करण जोहरने सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रुपये द्यावेत. ४. मनसे चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याची भूमिका मागे घेत आहे, चित्रपटावरील बहिष्कार कायम आहे आणि लोकांनाही तसे आवाहन आहे. यावरून पैसे द्याआणि पाक कलाकरांना आणा असा अर्थ निघू शकत नाही. बाकी शेपटाला कशाकशाचे आणि कसले कसले बोळे लावून आग लावत फिरणाऱ्या इतर कोणाचीही जनतेला घृणा वाटत नाही हे काही नवल नाही. बाकी मनसेने ह्या प्रकरणात काय केले असते तर ते सर्वग्राह्य झाले असते ते वाचायला आवडेल. बाकी आज ऐकलेल्या दोन बातम्यांनी मन विषण्ण झाले. आपले बीएसएफचे अजून एक जवान गुरनामसिंग शहीद झाले आणि इकडे श्याम बेनेगल यांनी फवाद खान याला घेऊन चित्रपट काढायचा ठरवल्याचे बातमी ऐकिवात आली. छान आहे!

मृत्युन्जय 24/10/2016 - 11:46
सरकारने यापुढे मांडवली किंग म्हणुन नावलौकिक कमवावा. या क्षेत्रात त्यांना बर्‍याच संधी आहेत आणि सरकारचे अश्या प्रकरणांना हाताळण्याचे कौशल्य देखील वादातीत दिसते. पाकिस्तानी कलाकारांनी चित्रपटांमध्ये काम करु नये अशी इच्छा एखाद्या पक्षाची मनसा असण्यात काहिच गैर नाही. सर्वसामान्य जनतेची अशी भावना किंवा इच्छा होणे देखील समजु शकते. सर्वसामान्यांच्या भावनांना आवाहन घालत स्वतःची इमेज सुधारण्याचा एखाद्या पक्षाचा प्रयत्न देखील समजुन येतो, पण ... पण जर: १. पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन चा दर्जा अजुनही काढुन घेतला गेलेला नसेल २. पाकिस्तानी नागरिकांना (भारतीय संविधानानुसार बनवलेल्या) कायद्याने भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी नसेल ३. चित्रपट वगळता इतर क्षेत्रांत हे साटेलोटे चालुच असेल तर मग २-४ भारतीय चित्रपटांत काम करुन पाकिस्तानी अभिनेत्यांनी असे काय घोडे मारले आहे? बर मारलेच असेल तर सरकार काय झोपा काढते आहे काय? बर झोपा काढत असेल तर त्याची झळ सामान्य (पक्षी करण जोहर इत्यादी) नागरिकांनी का सोसावी? जर सरकारने या सव्रांवर बंदी घालणारा कुठलाही कायदा आणला नसेल, जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर सरकारची ही नैतिक आणी कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी अश्या चित्रपटांना योग्य ती सुरक्षा द्यावी आणि एखाद्या पक्षाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा. मनसेबरोबर मांडवली करायला लावुन फडणावीसांनी असे चित्र निर्माण केले आहे की जणू: १. मनसे म्हणजे प्रतिसरकार आहे २. राज ठाकरे हे सर्वोच्च पातळीवरचे देशभक्त आहेत (तसे ते नाहित असे काही मी म्हणत नाही.) ३. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी आहे ४. यापुढे व्यवसाय / धंदा करण्यापुर्वी फक्त कायदा पाळणे महत्वाचे नसुन सर्व राजकीय पक्षांची महत्वाकांक्षा आणि त्यांची व्हिजन पाळणेही महत्वाचे आहे. ५. सरकार इतके नाकर्ते आहे की एका नगण्य अस्तित्व असलेल्या राजकीय पक्षासमोर देखील त्याला मान तुकवावी लागते. ६. कायदा आणि सुवव्यवस्था इतकी विस्कळीत आहे की हम करे सो कायदा म्हणणार्‍या विचारशक्तीच्या खळळ खट्ञाक परंपरेला आभान देउ शकत नाही. हे असले मांडवली धंदे करण्यापेक्षा सरकारने चित्रपटांना चोख सुरक्षा द्यायला हवी होती, या विरोधात जाउन हिंसात्मक निदर्शने करणार्‍ञांवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, योग्य वेळीस अशातता माजवण्यार्या घटकांना कायदेशीर आणी सनदशीर मार्गाने योग्य समज द्यायला हवी होती. पण तसे केल्याने विरोधकांनी सरकारच्या "देशभक्तीवर" ताशेरे ओढवले असते. याला भिन बहुधा सरकारने असले उरफाटे निर्णय घेतले असावेत,

In reply to by मृत्युन्जय

अधोरेखित करण्यासारखा मुद्दा म्हणजे:
३. चित्रपट वगळता इतर क्षेत्रांत हे साटेलोटे चालुच असेल तर मग २-४ भारतीय चित्रपटांत काम करुन पाकिस्तानी अभिनेत्यांनी असे काय घोडे मारले आहे? बर मारलेच असेल तर सरकार काय झोपा काढते आहे काय? बर झोपा काढत असेल तर त्याची झळ सामान्य (पक्षी करण जोहर इत्यादी) नागरिकांनी का सोसावी? जर सरकारने या सव्रांवर बंदी घालणारा कुठलाही कायदा आणला नसेल, जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर सरकारची ही नैतिक आणी कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी अश्या चित्रपटांना योग्य ती सुरक्षा द्यावी आणि एखाद्या पक्षाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा.
पाकीस्तान बरोबर मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवहार राजरोसपणे सुरू असतील. मालाची आयात-निर्यात सुरळीत सुरू असेल. सीमेवर बससेवा निर्धोक सुरू असेल. लोकांचे येणे-जाणे इकडून तिकडे नेहमीसारखे सुरू असेल तर फक्त चित्रपट उद्योगाला मार का?? Sandy

In reply to by चांदणे संदीप

साहना 25/10/2016 - 06:21
राज ठाकरे काही मूर्ख नाहीत. चित्रपट हा time sensitive धंदा आहे. योग्य वेळी चित्रपट रिलीस नाही झाला काही दिवस जरी लेट झाला तरी गल्ला ५०% कमी होऊ शकतो. त्यामुळे मूठभर गुंड घेऊन खूप त्रास निर्माण करता येतो.

In reply to by मृत्युन्जय

शब्दबम्बाळ 24/10/2016 - 14:30
आणि हि असली मांडवली मुख्यमंत्र्यांनी दोन्ही 'पार्टींना' आपल्या बंगल्यावर बोलावून करावी हे पाहून भयानक चीड आली! महाराष्ट्रात काय राजेशाही आहे कि हुकूमशाही? म्हणजे मनात आलं कि एखादी गोष्ट स्वतःच चुकीची ठरवून, त्यावर 'निवाडा' करण्यासाठी लोकांना बोलवून दंडाची रक्कम आणि शिक्षेचे स्वरूप स्वतःच ठरवून परत, हि आमच्या रयतेची इच्छा होती म्हणूनच कारवाई केली असे म्हणणे?! असल्या प्रवृत्तींना 'सरकारमान्यता' मिळून गेली या प्रसंगातुन... आता असले कुठलेही राजकीय अस्तित्वासाठी झगडणारे पक्ष आपल्या 'मना'नुसार लोकांना वेठीला धरणार आणि सरकार समंजसपणे मध्यस्ती करून मांडवली घडवून आणणार!(अर्थात स्वतःचा फायदा दिसत असेल तरच!) "या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.">> आयते कोलीत म्हणजे काय? हा जो काही कारनामा केला गेला आहे, तो काही अनावधानाने केला आहे असे आपल्याला वाटते का? स्पष्ट राजकीय खेळी आहे हि... आपल्याला आठवत असेल पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात गोंधळ करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या तेव्हा सरकारने पोलीस बंदोबस्तात तो कार्यक्रम पार पडला होता. कारण त्यावेळी कणखर सरकार हि प्रतिमा दाखवून द्यायची होती! आता, निवडणूक जवळच आहेत आणि शिवसेनेला धडा देखील शिकवायचा आहे. मग शिवसेनेची मते खाणारा पक्ष कोणता तर मनसे! त्याला जरा बळकटी देणे पण गरजेचे आहे... पण हे सगळे जनकल्याणार्थ असेही दिसले पाहिजे, मग सैन्यदल आठवते! सैन्याला समर्थन म्हणजेच राष्ट्रवाद हि जी प्रतिमा आजकाल बनवायची चालली आहे ती देशाला घातक आहे असे वाटते! त्या विरोधात जास्त काही बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह असे काहीसे चित्र तयार होऊ लागले आहे...

In reply to by शब्दबम्बाळ

श्रीगुरुजी 24/10/2016 - 14:50
आणि हि असली मांडवली मुख्यमंत्र्यांनी दोन्ही 'पार्टींना' आपल्या बंगल्यावर बोलावून करावी हे पाहून भयानक चीड आली!
राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने राज्यात शांतता राखणे हे मुख्यमंत्र्यांना करावेच लागते. जर बोलणी करून हिंसक आंदोलन रद्द करता येत असेल तर त्यात काय चुकीचे आहे. जर बोलणी करूनसुद्धा समोरचा ऐकत नसेल तर शेवटी पोलिस वापरावेच लागले असते.
आपल्याला आठवत असेल पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात गोंधळ करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या तेव्हा सरकारने पोलीस बंदोबस्तात तो कार्यक्रम पार पडला होता. कारण त्यावेळी कणखर सरकार हि प्रतिमा दाखवून द्यायची होती!
दोन्ही गोष्टीत प्रचंड फरक आहे. पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध फक्त मूठभरांचाच होता. सामान्य जनतेत याविषयी विरोधाची भावना नव्हती. याउलट सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानविरोधी भावना आहे व काहीही करून, कोणत्याही मार्गाने पाकिस्तानला अद्दल घडवा ही जनतेची मागणी आहे. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम हा फक्त एकदाच व एकाच ठिकाणी होणार होता. त्यामुळे त्या कार्यक्रमाला पोलिस संरक्षण देणे फारच सोपे होते. याउलट हा चित्रपट राज्यात शेकडो चित्रपटगृहातून अनेक दिवस दाखविला जाणार होता. इतके दिवस इतक्या सर्व ठिकाणी पोलिस संरक्षण देणे हे अत्यंत अवघड होते.

In reply to by श्रीगुरुजी

मराठी_माणूस 24/10/2016 - 15:53
याउलट सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानविरोधी भावना आहे व काहीही करून, कोणत्याही मार्गाने पाकिस्तानला अद्दल घडवा ही जनतेची मागणी आहे.
जनतेला चित्रपट न बघण्याचा अहींसक मार्ग उपलब्ध आहे. चित्रपट न बघणे हा गुन्हा होउ शकत नाही.कोणाला काहीही करायची गरज नाही. सुंठी वाचुन खोकला जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

साहना 25/10/2016 - 06:28
> राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने राज्यात शांतता राखणे हे मुख्यमंत्र्यांना करावेच लागते. उद्या मुख्यमंत्र्यांनी tutu घालून चौपाटीवर नाच करून शांतता आणता येईल तर करावी काय ? कायद्याची कसोटी तेंव्हाच असते जेंव्हा कायद्याची अंबलबजावणी करणे कठीण असते. खंडणी देऊन कसली शांतता ? मग द्यावे काश्मीर पाकिस्तानला आणि घ्यावी विकत शांतता ! > पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध फक्त मूठभरांचाच होता. विरोध १ माणसाचा असेल किंवा १०० कोटी जनतेचा काहीही फरक पडत नाही. रिपब्लिक ह्याचा अर्थच मुळांत कायद्याचे राज्य असा असतो. कायदा लागू करण्याचे काम मुख मंत्र्यांचे आहे. "बाई संध्याकाळी वाड्यावर या मदत केली जाईल " हे निळू फुलेंचे (चित्रपट मधील) काम आहे. लोकांची भावना असेल पाकिस्तान विरोधी तर लोक पाहणार नाहीत चित्रपट. आणि एक आमदार असणाऱ्या राज ठाकरेला मूठभर नाही तर काय म्हणायचे ? > इतके दिवस इतक्या सर्व ठिकाणी पोलिस संरक्षण देणे हे अत्यंत अवघड होते. तर उद्या हिजाब ना घालता येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकू अशी कुना मुस्लिम संघटनेने धमकी दिल्यास मुख्यमंत्री वाटाघाटी करून "मुलींनी फक्त केस झाकावेत" हा तोडगा काढणार आहेत का ? पक्ष भक्ती आणि व्यक्ती पूजा सुविचारी माणसाला सुद्धा कशी लाचार बनवू शकते हे तुमचे उत्तर दाखवून देते.

विशुमित 24/10/2016 - 12:33
हे असले मांडवली धंदे करण्यापेक्षा सरकारने चित्रपटांना चोख सुरक्षा द्यायला हवी होती, या विरोधात जाउन हिंसात्मक निदर्शने करणार्‍ञांवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, योग्य वेळीस अशातता माजवण्यार्या घटकांना कायदेशीर आणी सनदशीर मार्गाने योग्य समज द्यायला हवी होती.>>> -- सहमत..

श्रीगुरुजी 24/10/2016 - 13:25
या वादात एकूण ३ हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) होते. करण जोहर (म्हणजेच निर्माते), राज ठाकरे (म्हणजेच मनसे) आणि फडणविस (म्हणजेच राज्य सरकार). तसे चित्रपटगृहांचे मालक, वितरक, प्रेक्षक इ. सुद्धा हितसंबंधी होते, परंतु वरील ३ हे प्रमुख हितसंबंधी होते. - यातील करण जोहरची भूमिका पूर्णतः कायदेशीर असली तरी ती लोकभावनेच्या दृष्टीकोनातून अयोग्य होती. - राज ठाकरेची भूमिका पूर्णत: बेकायदेशीर असली तरी ती लोकभावनेच्या दृष्टीकोनातून योग्य होती. - फडणविसांना कायदेशीर भूमिकेच्या बाजूने उभे राहणे बंधनकारक होते आणि त्याचवेळी लोकभावनेकडे पूर्ण दुर्लक्ष करूनही चालले नसते. राज्य सरकारला कोणत्याही तर्‍हेने हिंसाचार, तोडफोड होऊन न देता कायद्याच्या बाजूने उभे राहण्याची व त्याचवेळी लोकभावनेचा आदर करण्याची दुहेरी कसरत करायची होती. समजा राज्य सरकार पूर्ण गप्प राहून या वादात पडलेच नसते तर तोडफोड वगैरे होऊन प्रचंड नुकसान होऊन अशांतता निर्माण झाली असती व बेकायदेशीर मार्गाचा विजय झाला असता व त्यामुळे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली असती. समजा राज्य सरकारने लोकभावनेकडे पूर्ण दुर्लक्ष करून चित्रपटाला पूर्ण संरक्षण दिले असते तरीसुद्धा तोडफोड, लाठीमार होऊनही चित्रपट चालू राहिलाच असता व अशा परिस्थितीत आपण लोकभावनेकडे दुर्लक्ष करून विजय मिळविला व भविष्यात सुद्धा याच मार्गाने पाकड्यांना घेऊन चित्रपट निर्माण करून सरकारच्या संरक्षणाखाली चित्रपट प्रदर्शित करू शकतो अशी विजयी भावना करण जोहरच्या मनात निर्माण होऊन त्याने आपल्यात भूमिकेत कोणताही बदल केला नसता. अशा परिस्थितीतही लोकभावनेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका राज्य सरकारवर आला असता. त्यामुळे कायदेशीर बाजूने उभे राहणे व त्याचवेळी लोकभावनेचा आदर करण्याच्या भूमिकेच्या बाजूने उभे राहणे हे राज्य सरकारसाठी आवश्यक होते. या दोन्ही गोष्टी या विशिष्ट प्रकरणात पूर्णतः परस्परविरोधी असल्याने राज्य सरकारची पंचाईत झाली होती. इतर कोणत्याही सूज्ञ सरकारने जे केले असते तेच फडणविसांनी केले. अशांतता व हिंसाचार टाळण्यासाठी त्यांनी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला व त्यात यश आले. मनसेने चित्रपटाविरूद्ध आंदोलन न करण्याचे मान्य केल्यामुळे कायदा हातात घेण्याचा प्रश्न निकालात निघाला. त्याचवेळी भविष्यात पाकड्यांना काम ने देण्याचे जाहीर केल्यामुळे लोकभावनेचाही आदर राखला गेला. त्याचबरोबर सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रूपये देणगी देण्याचे जाहीर करून करण जोहरने सैनिकांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. अर्थात तो खरोखरच ५ कोटी देईल का, भविष्यात पाकड्यांना न घेण्याचा निर्णय खरोखरच पाळेल का हे आज तरी सांगता येणे अवघड आहे. या ५ कोटीला खंडणी म्हणणे पटत नाही कारण हे पैसे सैनिकांना जाणार असून राज ठाकरेच्या खिशात जाणार नाहीत. या चर्चेत काही डील झाले का, राजला टेबलाखालून काही मिळाले का, फडणविस मनसेपुढे झुकले का इ. गोष्टी अजून तरी माहित नाहीत व जोपर्यंत त्याविषयी काही ठोस माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याबद्दल स्पेक्युलेशन करणे योग्य नाही. माझ्या दृष्टीने दृष्टीने फडणविसांनी एका वादग्रस्त व अशांतता निर्माण करू शकणार्‍या या स्फोटक विषयावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी योग्य प्रयत्न केले व त्यात ते यशस्वी झाले. माझ्या दॄष्टीने हा विन-विन तोडगा होता.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 24/10/2016 - 19:24
मृत्युंजय साहेबांनी केलेला प्रतिवाद पुरेसा आहे, मी केल्यास पुनरुक्ती होईल , वेळेचा अपव्यही!

In reply to by श्रीगुरुजी

मृत्युन्जय 24/10/2016 - 15:06
सरकारने सनदशीर आणी कायदेशीर मार्गाने या प्रकरणाचा निकाल लावणे अपेक्षित होते. हा विन विन तोडगा नाही. ही तर चक्क मांडवली आहे. एका नगण्य अस्तित्व असलेल्या पक्षाविरुद्ध कायद्याचा आणि पोलिस यंत्रणेचा वापर करुन जर निर्दोष चित्रपटनिर्मात्याला संरक्षण पुरवता येत नसेल तर ते सरकारचे नाकर्तेपण आहे, सूज्ञपणा नाही. सरकारचे काम काय्दा आणि सुव्यवस्था राखणे आहे. कायद्याच्या विरोधात जाउन अहिंसक मार्गांचा अवलंब करणार्‍यांना लोकभावनेच्या गोंडस नावाखाली पाठिशी घालणे हे नाही. ही गोष्ट (पाकिस्तानी कलाकारांना काम देणे) जर बेकायदेशीर असले असते तर मी चित्रपट प्रदर्शनालाचा विरोध केला असता. आणी जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर त्याला नाहक या मनस्तापाला तोड द्यावे लागणे हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे. कुठलाही सोम्यागोम्या पक्ष, संघटना अथवा व्यक्ती अश्याप्रकारे व्यावसायिकांना आणि सरकारला धारेवर धरु शकत नाही. लोक्भावना महत्वाची आहेच पण ती कधीही कायद्यापेक्षा वरचढ होउ शकत नाही. होत असेल तर कायदे बदलणे सरकारच्या हातात आहे आणि मग लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करणे हे देखील. बलात्कार्‍याला भर चौकात गुप्तांग तोडुन मग फाशी द्यावी ही लोकभावना झाली पण जर ते कायद्याच्या विरोधात असेल तर तसे न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बलात्कार्‍याला कायद्यानुसार शिक्षा जरुर द्यावी पण उद्या लोकभावनेचा आदर म्हणुन मांडवली करुन "गुप्तांग न कापता " केवळ भर चौकात बांधुन १०० फटक्यांची शिक्षा आणि मग भर चौकात फाशी ही मांडवली सरकारने करणे अपेक्षित नाही मग ती भलेही सो कॉल्ड विन विन सिच्युएशन का असेना. एकीकडे सरकार पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न करणार. फील गुड फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न करणार मग एखाद्या चित्रपट निर्मात्याने पाकड्यांना घेउन चित्रपट काढला की त्याला वेठीस धरणार. हे कसे जमावे. चित्रपट बनवायला ३-४ महिन्यांचा कालावधी जातो, कधी कधी वर्षभराचा सुद्धा. मग अश्यावेळेस एकाएकी (युद्ध पुकारलेले नसताना आणी असे करणे बेकायदेशीर नसताना) केवळा कुणीतरी माणुस किंवा व्य्क्तीसमूह अशी मागणी करतो म्हणून एकाएकी चित्रपट बॅन करण्याला माझा विरोध आहे. शिवाय जर हा निर्णय लोकभावनेचा आदर ठेउन घेतला असेल तर सर्वोत्तम मार्ग होता की चित्रपट प्रदर्शित होउ देणे. जर जनभावना इतकीच विरोधात होती तर चित्रपट साफ कोसळलाच असता की. लोकभावना दिसलीच असती. प्रत्यक्षात मात्र ही भावनाप्रधान जनता मोठ्या प्रमाणावर चित्रपट पहायला उत्सुक असेल. मनसे ज्या लोकभावनेच्य आधारावर हे राजकारण करते आहे ती जनता पाकिस्तानी कलाकार चित्रपटात आहे म्हणुन पेटुन उठुन कदाचित चित्रपटाचा द्वेष करेल पण तरीही चित्रपट पाहिलच. मग कसली आलीय डोंबलाची भावना. कित्येकांना या सगळ्या प्रकरणाशी काडीचे घेणेदेणे नसेल. खास पब्लिसिटी केलेले ऐश्वर्या रणबीर ची गरमा गरम चुंबनालिंगनादी दृष्ञे पाहण्यासाठी चित्रपटात गर्दी देखील होइल आणि मग चित्रपट संपल्यावर या भावनाशील लोकांपैकीच काही लोक "फवाद कित्ती क्युट दिसतो ना?" म्हणून उसासे पण सोडतील. त्यामुळे लोकभावनेच्या गोंडस आवरणाखाली नाकर्तेपणा लपवण्याचा जो प्रकार चालला आहे तो निव्वळ हास्यास्पद आहे. खरे सांगायचे तर स्वतः प्रमोट करत असलेल्या नॅशनलिजमच्या बुरख्याआडुन केल्या गेलेल्या या शरसंधानाला तोंड कसे द्यावे हे भाजपाला कळत नाही आहे. करण जोहरला संरक्षण द्यावे तर नॅशनलिजम आडवा येतो आणि न देणे " सरकार " साठी शक्य नाही. त्यातुन हा बनियाचा मध्यममार्ग निघाला. पण हा राजधर्म होउ शकत नाही.

In reply to by मृत्युन्जय

प्लसच वन, शिवाय लोकभावना लोकभावना करणाऱ्यांना आत्ता बोलूनही उपयोग नाहीये मृत्युंजय भाऊ, हातच्या काकणाला आरसा कश्याला ह्या नियमाने, करण जोहरचा जो सिनेमा (नावही आठवत नाही) रीलीज होणार आहे, त्याचे कलेक्शन फिगर पाहून ही लोकभावना होती का लोकभावनेच्या गोंडस नावाखाली मांडवली होती हे चित्र स्पष्ट होईलच, तोवर तुमच्या प्रतिसादाला मम् म्हणतो आम्ही बापडे

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 24/10/2016 - 15:38
सरकारने सनदशीर आणी कायदेशीर मार्गाने या प्रकरणाचा निकाल लावणे अपेक्षित होते. हा विन विन तोडगा नाही. ही तर चक्क मांडवली आहे. एका नगण्य अस्तित्व असलेल्या पक्षाविरुद्ध कायद्याचा आणि पोलिस यंत्रणेचा वापर करुन जर निर्दोष चित्रपटनिर्मात्याला संरक्षण पुरवता येत नसेल तर ते सरकारचे नाकर्तेपण आहे, सूज्ञपणा नाही.
सरकारने सनदशीर व कायदेशीर मार्गानेच या प्रकरणावर तोडगा काढलेला आहे. जर कायद्याच्या बडग्याची सक्ती करण्यापेक्षा चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटत असेल तर सर्वप्रथम चर्चेचाच मार्ग स्वीकारावा लागतो व फडणविसांनी तेच केले आहे. या प्रकरणातील दोन्ही बाजूंनी काही गोष्टी मान्य केल्या आहेत ज्या संपूर्णपणे कायदेशीर आहेत. मनसेच्या आंदोलनाविरूद्ध निश्चितच पोलिस यंत्रणेचा वापर करता आला असता. परंतु पोलिस वापरूनसुद्धा तोडफोड, हिंसात्मक आंदोलन पूर्णपणे टाळता आले नसते. श्रीनगरमध्ये अनेक महिने संचारबंदी असूनसुद्धा व सैनिक/पोलिस अश्रुधूर, पेलेट गन्स इ. चा वापर करत असूनसुद्धा जनता दगडफेकीसाठी संचारबंदी मोडून रस्त्यावर येत होती. इथे तर फक्त लाठ्या हातात असलेले थोडे पोलिस चित्रपटगृहांवर तैनात असते व आंदोलकांनी त्यांना भीक घातली नसती. राज्य सरकारने चित्रपटाला संरक्षण द्यायचे आधीच कबूल केले होते, चित्रपटावर बंदी घालणार नसल्याचेही सांगितले होते, मनसेच्या काही कार्यकर्त्यांना आधीच अटक झाली होती व चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी मनसेचे बरेच कार्यकर्ते पकडले गेले असते. एवढे होऊनसुद्धा अशांतता टाळता आली नसती. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून कायदेशीर तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.
सरकारचे काम काय्दा आणि सुव्यवस्था राखणे आहे. कायद्याच्या विरोधात जाउन अहिंसक मार्गांचा अवलंब करणार्‍यांना लोकभावनेच्या गोंडस नावाखाली पाठिशी घालणे हे नाही. ही गोष्ट (पाकिस्तानी कलाकारांना काम देणे) जर बेकायदेशीर असले असते तर मी चित्रपट प्रदर्शनालाचा विरोध केला असता. आणी जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर त्याला नाहक या मनस्तापाला तोड द्यावे लागणे हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे. कुठलाही सोम्यागोम्या पक्ष, संघटना अथवा व्यक्ती अश्याप्रकारे व्यावसायिकांना आणि सरकारला धारेवर धरु शकत नाही.
सरकार कायद्याचे पालन करीत होतेच. राज्य सरकारने चित्रपटाला संरक्षण द्यायचे आधीच कबूल केले होते आणि चित्रपटावर बंदी घालणार नसल्याचेही सांगितले होते कारण या दोन्ही गोष्टी कायद्याच्या विरूद्ध झाल्या असत्या. जर मनसेने हिंसक आंदोलन केले असते तर त्याला तोंड द्यायची सरकारची तयारी होतीच. परंतु कोणत्याही परिस्थितीत सर्वात आधी चर्चेच्या माध्यमातून कायदेशीर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे व चर्चा अपयशी झाल्यास कायद्याच्या बडग्याची सक्ती करणे हेच मार्ग सरकारपुढे असतात व फडणविसांनी नेमके तेच केले आहे.
लोक्भावना महत्वाची आहेच पण ती कधीही कायद्यापेक्षा वरचढ होउ शकत नाही. होत असेल तर कायदे बदलणे सरकारच्या हातात आहे आणि मग लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करणे हे देखील. बलात्कार्‍याला भर चौकात गुप्तांग तोडुन मग फाशी द्यावी ही लोकभावना झाली पण जर ते कायद्याच्या विरोधात असेल तर तसे न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बलात्कार्‍याला कायद्यानुसार शिक्षा जरुर द्यावी पण उद्या लोकभावनेचा आदर म्हणुन मांडवली करुन "गुप्तांग न कापता " केवळ भर चौकात बांधुन १०० फटक्यांची शिक्षा आणि मग भर चौकात फाशी ही मांडवली सरकारने करणे अपेक्षित नाही मग ती भलेही सो कॉल्ड विन विन सिच्युएशन का असेना.
लोकभावना कायद्यापेक्षा वरचढ होऊ शकत नाही, परंतु लोकभावनेकडे पूर्णपणे दुर्लक्षही करता येत नाही. कायदे बदलणे ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे व या विशिष्ट प्रकरणात इतक्या कमी वेळात कायदे बदलणे अशक्य आहे. लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करता येतो आणि चर्चेच्या माध्यमातून नेमके तेच झाले आहे. निदान भविष्यात तरी पाकड्यांना चित्रपटात घेणार नाही ही जाहीर कबुली हे त्याचेच उदाहरण आहे.
एकीकडे सरकार पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न करणार. फील गुड फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न करणार मग एखाद्या चित्रपट निर्मात्याने पाकड्यांना घेउन चित्रपट काढला की त्याला वेठीस धरणार. हे कसे जमावे. चित्रपट बनवायला ३-४ महिन्यांचा कालावधी जातो, कधी कधी वर्षभराचा सुद्धा. मग अश्यावेळेस एकाएकी (युद्ध पुकारलेले नसताना आणी असे करणे बेकायदेशीर नसताना) केवळा कुणीतरी माणुस किंवा व्य्क्तीसमूह अशी मागणी करतो म्हणून एकाएकी चित्रपट बॅन करण्याला माझा विरोध आहे.
संबंध हे एकतर्फी सुधारत नसतात. संबंध सुधारणे हा एकेरी मार्ग नसतो. भारताने आपल्या बाजूने संबंध सुधारण्याचे असंख्य प्रयत्न केले आहेत. परंतु ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. एखाद्या पाकड्याला चित्रपटात घेतल्यामुळे संबंध सुधारतील असे मानणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे. चित्रपट बॅन झालेला मला आवडला असता. परंतु तसे करणे कायदेशीर नाही व त्यामुळे तसे होणे शक्य नाही.
शिवाय जर हा निर्णय लोकभावनेचा आदर ठेउन घेतला असेल तर सर्वोत्तम मार्ग होता की चित्रपट प्रदर्शित होउ देणे. जर जनभावना इतकीच विरोधात होती तर चित्रपट साफ कोसळलाच असता की. लोकभावना दिसलीच असती. प्रत्यक्षात मात्र ही भावनाप्रधान जनता मोठ्या प्रमाणावर चित्रपट पहायला उत्सुक असेल. मनसे ज्या लोकभावनेच्य आधारावर हे राजकारण करते आहे ती जनता पाकिस्तानी कलाकार चित्रपटात आहे म्हणुन पेटुन उठुन कदाचित चित्रपटाचा द्वेष करेल पण तरीही चित्रपट पाहिलच. मग कसली आलीय डोंबलाची भावना. कित्येकांना या सगळ्या प्रकरणाशी काडीचे घेणेदेणे नसेल. खास पब्लिसिटी केलेले ऐश्वर्या रणबीर ची गरमा गरम चुंबनालिंगनादी दृष्ञे पाहण्यासाठी चित्रपटात गर्दी देखील होइल आणि मग चित्रपट संपल्यावर या भावनाशील लोकांपैकीच काही लोक "फवाद कित्ती क्युट दिसतो ना?" म्हणून उसासे पण सोडतील.
भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात एखाद्या गोष्टीवर एकमत होणे जवळपास अशक्य आहे. जर लोकांना पाकड्यांची तीव्र चीड असेल तर ते नक्कीच तो चित्रपट बघणार नाहीत.
त्यामुळे लोकभावनेच्या गोंडस आवरणाखाली नाकर्तेपणा लपवण्याचा जो प्रकार चालला आहे तो निव्वळ हास्यास्पद आहे. खरे सांगायचे तर स्वतः प्रमोट करत असलेल्या नॅशनलिजमच्या बुरख्याआडुन केल्या गेलेल्या या शरसंधानाला तोंड कसे द्यावे हे भाजपाला कळत नाही आहे. करण जोहरला संरक्षण द्यावे तर नॅशनलिजम आडवा येतो आणि न देणे " सरकार " साठी शक्य नाही. त्यातुन हा बनियाचा मध्यममार्ग निघाला. पण हा राजधर्म होउ शकत नाही.
नॅशनलिझमचा कसला आला आहे बुरखा? सत्ताधारी पक्ष या नात्याने भाजप ती जबाबदारी ओळखूनच हे प्रकरण हाताळत आहे. फडणविसांनी संघर्षाचा मार्ग टाळून दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून एक कायदेशीर तोडगा काढून शांतताभंग टाळला व लोकभावनेचाही आदर केला.

In reply to by श्रीगुरुजी

सरकारने सनदशीर व कायदेशीर मार्गानेच या प्रकरणावर तोडगा काढलेला आहे. कुठल्या सनदी नुसार हा सनदशीर तोडगा काढला आहे म्हणे? कायदेशीर म्हणता आहात तर कुठल्या कायद्यान्वये हा तोडगा वर्षांवर काढायचा ठरला त्याचा मसुदा किंवा किमान कलम क्रमांक अन त्या कलमाची वाक्यरचना विदास्वरूप द्यावीत ही नम्र विनंती. जाता जाता सनदशीर ह्या शब्दाचा उगम सनद उर्फ इंग्रजीत "charter" ह्यावरून आलेला आहे त्यामुळे सनदशीर म्हणले की मूळ सनदीची संहिता देणे बंधनकारक असते किंवा त्या सनदीच्या अंतर्गत कार्य करणे अपेक्षित असते म्हणूनच टॅली प्रो वापरणारे खंडीभर "अकाउंटंट" असले तरी महत्व "चार्टर्ड अकाउंटंट" उर्फ सनदप्राप्त सनदी लेखपालालच असते, हेच सीएस, वकील, डॉक्टर इत्यादी पेशांना सुद्धा लागू होते, ह्याची नोंद घेऊन संबंधितांनी "सनदशीर" हा शब्द वापरला असावा अशी अपेक्षा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कुठल्या कोर्टाने "असे वाद झाल्यास परस्पर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दोन्ही वादी अन फिर्यादी पक्षाला बोलवून तोडगा काढावा अन शांतता प्रस्थापित करावी" असा आदेश दिलाय का? असल्यास तो लेखी असेलच, त्याची प्रत जमल्यास द्यावी ही विनंती, तसेही असे आदेश द्यायचेच असले तर ती शक्ती फक्त सुप्रीम कोर्टाकडे आहे असे वाटते, कारण "एपेलेट ज्यूरीसडीक्शन" फक्त सुप्रीम कोर्टाचे असते असे वाटते, तरीही असा कायदा असल्यास तो द्यावा म्हणजे पुढील अभ्यासाला बरे पडेल

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 24/10/2016 - 20:44
फडणविसांनी राज व करणला एकत्र बोलावून तोडगा काढण्याचे केलेले प्रयत्न हे बेकायदेशीर किंवा घटनेच्या विरोधी होते का? एखाद्या वादावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची पद्धत अनेक वर्षांपासून वापरली जाते. १९८५ मध्ये राजीव गांधींनी शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटी या धार्मिक संस्थेशी व त्या संस्थेच्या लोंगोवाल (जे कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते किंवा निवडून आलेले जनतेचे प्रतिनिधीही नव्हते) यांच्याशी वाटाघाटी करून तोडगा काढला होता. त्याच वर्षी अखिल आसाम विद्यार्थी परीषदेच्या विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा काढण्यात आला होता. १९८६ मध्ये मिझोराममधील बंडखोर लाल डेंगाशी वाटाघाटी करून शांततेसाठी तोडगा काढण्यात आला होता. फुटिरतावादी हुरियत नेत्यांशी सुद्धा केंद्र सरकारने वाटाघाटी केल्या आहेत. कोणत्याही वादात सुरवातीला चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जातो. घटस्फोटाचे प्रकरण असो किंवा एकाने दुसर्‍याची बदनामी केल्याचा आरोप असो, सर्वात आधी दोन्ही बाजूंनी एकत्र बोलून वाद मिटवावा यासाठीच प्रयत्न केले जातात. ते प्रयत्न अपयशी ठरले तर कायद्याची कारवाई सुरू होते. फडणविसांनी नेमके तेच केले आहे. दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला. समजा तो प्रयत्न अयशस्वी ठरला असता तर त्यांना चित्रपटाला संरक्षण द्यायची आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडावीच लागली असती.

In reply to by श्रीगुरुजी

अच्छा म्हणजे एका सिनेमाला विरोध करणे अन खलिस्तानी किंवा पूर्वोत्तरी फुटीरतावादी लोकांच्या बरोबरीचं वाटतं का काय तुम्हाला? का फक्त किल्ला लढवायचा म्हणून कायच्या काय बोलताय का काय? तुम्ही किती खालिस्तानी किंवा उल्फा , एनएस्सीएनवाल्या लोकांचे राडे पाहिले आहेत? एकतर तुम्ही ते पाहिलेले नाहीत किंवा मनसेची बेडकी फुगवून दाखवताय कारण नाव तुमच्या सीएमचं अडकलंय म्हणून कदाचित. रक्तपाती राडे अन असल्या दीड दमडीच्या राजकीय स्टंट मध्ये फरक असतो हो साहेब, प्लिजच ___/\__

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 24/10/2016 - 23:44
मनसेने पूर्वी बिहारींविरूद्ध केलेले राडे आठवत असतील. यावेळीही तसेच राडे होण्याची वाट बघायची होती का?

In reply to by श्रीगुरुजी

अच्छा म्हणजे एका सिनेमाला विरोध करणे अन खलिस्तानी किंवा पूर्वोत्तरी फुटीरतावादी लोकांच्या बरोबरीचं वाटतं का काय तुम्हाला? का फक्त किल्ला लढवायचा म्हणून कायच्या काय बोलताय का काय? तुम्ही किती खालिस्तानी किंवा उल्फा , एनएस्सीएनवाल्या लोकांचे राडे पाहिले आहेत? एकतर तुम्ही ते पाहिलेले नाहीत किंवा मनसेची बेडकी फुगवून दाखवताय कारण नाव तुमच्या सीएमचं अडकलंय म्हणून कदाचित. रक्तपाती राडे अन असल्या दीड दमडीच्या राजकीय स्टंट मध्ये फरक असतो हो साहेब, प्लिजच ___/\__

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

संदीप डांगे 24/10/2016 - 22:21
राष्ट्रवादी एक फुटकळ पक्ष असतो. पण मनसे तोडफोड करणारा, विध्वंसकारी, राज्यव्यापी, जनतेपेक्षा मोठा पक्ष असतो. त्याईची सतरंजी अटकेल हाये, एवढी दलाली(इंग्रजीत Pimp या अर्थाने)….? _/\_

In reply to by श्रीगुरुजी

काश्मिर मध्ये १०० लोक मेले तर तिथे तोडगा काढायला कोणि प्रयत्न करत नाही. पण इथे करतात, यावरुनच मनसे किती मोठी दहशतवादी संघटना असेल याची कल्पना येते. याची कल्पना महाराष्ट्राबाहेर राहणार्या बीड-नंदुरबार च्या लोकांना येणार नाही, पण ती मुख्यमंत्र्याना आहे, म्हणुनच त्यांनी जिवाची बाजी लावुन हा संघर्ष टाळला.

In reply to by श्रीगुरुजी

तोडगा काढताना फक्त एका बाजुला पैसे खर्च कराय्ला लावायला नको होते. राज ठाकरें नी प्रत्येक पाकिस्तानी कलाकाराच्या बदल्यात ५ करोड स्वतः आर्मीला द्याय्ला हवे होते. किंवा निदान २.५ करोड तरी. किति माणसे मारायची हे ठरवायला राजबरोबर वेगळी मीटींग ठेवावी. फक्त मोदिंना बोलवु नका म्हणजे झाले. == हिच गोष्ट एखद्या मुस्लीम पुढार्याने केलि असती तर अशी मांडवली झाली असती का?

In reply to by भक्त प्रल्हाद

श्रीगुरुजी 25/10/2016 - 15:02
मला नाही वाटत की ५ कोटी रूपये देणे हा तोडग्याचा प्राथमिक भाग होता म्हणून. अशांतता टाळण्यासाठी आंदोलन मागे घेतले जावे हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. ५ कोटी देणे, चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्याच्या निषेधाचा फलक दाखविणे इ. गोष्टी नंतर आलेल्या आहेत. राज ठाकरेंनी किती द्यावे किंवा अजिबातच न द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे.
हिच गोष्ट एखद्या मुस्लीम पुढार्याने केलि असती तर अशी मांडवली झाली असती का?
मुस्लिमांबरोबरही यापूर्वी बोलणी करून तडजोड केल्याची उदाहरणे आहेत. हुरियतच्या नेत्यांबरोबर चर्चा करणे हे एक उदाहरण. दुसरे उदाहरण म्हणजे सप्टेंबर १९९३ मध्ये ५-६ पाकिस्तानी अतिरेक्यांनी हजरतबाल मशिदीत प्रवेश केल्यावर सैनिकांनी मशिदीला वेढा घालून त्यांना अडकवून ठेवले होते. मशिदीत अतिरेक्यांव्यतिरिक्त इतर कोणीही नव्हते. अतिरेक्यांना पळून जाणे अशक्य होते. तरीसुद्धा तत्कालीन केंद्र सरकारने अतिरेक्यांशी बोलणी करून मशिदीचे नुकसान न करण्याच्या अटीवर वेढा उठवून त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते.

In reply to by श्रीगुरुजी

गणामास्तर 25/10/2016 - 15:08
मला नाही वाटत की ५ कोटी रूपये देणे हा तोडग्याचा प्राथमिक भाग होता म्हणून.
गुरुजी, पाच कोटी देणे हा तोडग्याचा प्राथमिक वा दुय्यम भाग होता हेचं मुळात इथे दुय्यम आहे. मुख्य प्रॉब्लेम या असल्या तोडग्याशीचं आहे. बाकी पूर्वी कुणा कुणासोबत कसे तोडगे काढले गेले याचा इथे काही संबंध आहे असे मला वाटत नाही, उगाचं समोरचा चिखलात खेळला म्हणून आम्ही शेणात लोळलो म्हणण्याला काही अर्थ नसतो.

In reply to by गणामास्तर

संदीप डांगे 25/10/2016 - 15:30
मुख्य प्रॉब्लेम या असल्या तोडग्याशीचं आहे. ^^^ सहमत! काय करायला पाहिजे होते? १. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे. 2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे. 3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे, मनसे दंगा करेल म्हणून हा सरकारने दोघांना बोलावून तोडगा काढणे चुकीचा पायंडा पाडणे आहे, हुर्रीयात किंवा इतर आतंकवादी, नक्षलवादी, अलगाव्वदी संघटन यांची मनसे सारख्या राजकीय पक्षाबरोबर तुलना करणेच चुकीचे. ह्या प्रकरणात चित्रपट किंवा पाच कोटी महत्वाचे नाहीत, मुख्यमंत्र्यासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने गुंडगिरी करणाऱ्याला भिऊन असले तोडग्याचे पाउल उचलणे लोकशाहिस मारक आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही, चारपाच हजार गुंड हाताशी असले की कोणीही काहीही कबूल करून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो हा संदेश जात आहे. राज ठाकरे ह्या घटनाबाह्य व्यक्तीला महत्त्व देणे खटलेलं आहे, व्हाटबौटेरीच करायची असेल तर राहुल गांधीने अध्यादेश मागे घ्यायला लावल्यावर विरोधकांनी केलेला थयथयाट आठवावा.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 25/10/2016 - 15:39
काय करायला पाहिजे होते? १. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे. 2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे. 3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे,
चित्रपटाला संरक्षण देण्यात येणारच होते. परंतु ते देऊनसुद्धा तोडफोड टाळता आली नसती. त्यामुळे सामोपचाराने मार्ग काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक होते. मनसे धरणे आंदोलन करण्याची किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये असा प्रचार करण्याची शक्यता दिसत नव्हती आणि करण तर चर्चेच्या आदल्या दिवसापर्यंत गप्प होता व त्याच्या वतीने काही जण पाकड्यांना घेण्याचे समर्थन करीत होते. या दोघांपैकी कोणीतरी एकाने अशी भूमिका आधीच घेतली असती तर तडजोडीची वेळच आली नसती.

In reply to by संदीप डांगे

गणामास्तर 25/10/2016 - 16:13
१. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे. = सहमत. आपण अशी अपेक्षा सरकार कडून करणे योग्य आहे. 2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे. = मनसे कसलाही विरोध अहिंसक मार्गाने करेल असे वाटत नाही. आपल्या सारख्या काही लोकांचा जरी अशा प्रकारांना विरोध असला तरी काही लोकांचा त्याला सपोर्ट आहे आणि अजून काही लोक सपोर्ट करतील अशी मनसे ला अपेक्षा असल्यामुळे ते धिंगाणा घालून स्वताचे उपद्रवमूल्य वाढवणे हा हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारचं. 3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे, = जर सरकारने अशी काही बंदी घातलेली नाही आणि बहुसंख्य लोकांना त्याचा काही फरक पडत नसेल तर कायद्याच्या चौकटीत राहून पाकी कलाकारांना घेण्यात काय प्रॉब्लेम असू शकतो हे मला कळत नाहीये. जेव्हा या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते तेव्हा तरी वातावरण इतके तापलेले नव्हते, आपले पंप्र सुद्धा पाकिस्तान दौरा करत होते आणि नवाझ शरीफांना आमंत्रणे धाडीत होते.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 24/10/2016 - 17:23
कुठले विन विन? कुठली लोकभावना? माझा दुसरीकडचा प्रतिसाद इथे चिकटवते. ही आहे लोकभावना.
पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी सिनेमे काढायच्या परवानगीची आणि आपल्या हजारों सैनिकांच्या जिवाची किंमत का? मांडवलीसाठी मध्यस्थी करणारे नरकात जातीलच. पण तोडगा स्वीकारणार्‍या सरकारचे काय? तो नालायक करण जोहर एका सिनेमामागे ५० कोटीचा निव्वळ अधिकृत फायदा कमावतो म्हणे. आणि सैनिकांच्या तोंडावर पाच कोटी फेकायची हिंमत कशी झाली त्याची? सिनेमात दाऊद आणि त्याच्यासारख्या गुन्हेगार धंदेवाल्यांचा पैसा येतो ही लोकांची समजूत आहे. तिला पुरावे देता येणार नाहीत तसेच खोटीही म्हणता येणार नाही. उद्या कोणीही दाऊदच्या पैशाने सिनेमा काढील आणि पाच कोटी सैनिक फंडाला भीक फेकेल. ते चालेल का? म्हणजे लोक गरीबाना लुबाडतात. त्यांच्या अंगावर गाड्या घालून मारतात आणि मग सिद्धीविनायकाला देणगी देऊन सगळी पापे धुवून काढतात. अजून एक दानपेटी असेच सैनिक फंडाला समजले का काय हे खंडणीखोर?
सैनिक खंडणीच्या पैशांवर जगत नाहीत म्हणून माजी अधिकार्‍यांनी झोडपून काढले आहे ना, त्याचा अर्थ समजत असला तर जरा तरी लाज वाटून घेऊ देत हे नालायक. अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना. फडणवीस मोर्चांचा प्रसंग ज्या चातुर्याने हाताळत होते त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले होते पण मांडवली करणार्‍यांच्या रांगेत बसून खरेच त्यानी हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे.

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 24/10/2016 - 20:54
फडणवीस मोर्चांचा प्रसंग ज्या चातुर्याने हाताळत होते त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले होते पण मांडवली करणार्‍यांच्या रांगेत बसून खरेच त्यानी हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे.
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 24/10/2016 - 21:04
काहीही काय? नवराबायकोचे भांडण हा एका कुटुंबातला खाजगी वाद आहे. समाजाचा त्याच्याशी संबंध नाही. बादवे, वरील प्रतिसाद वाचून कायम विषय भलतीकडेच भरकटविणार्‍या, असंख्य डुआय असणार्‍या आणि प्रचंड फॅन फॉलोइंग असणार्‍या एका ट्रोलची आठवण झाली.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 24/10/2016 - 21:13
बादवे, खालील वाक्यांवर प्रतिसाद अपेक्षित होता.
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 24/10/2016 - 22:47
करण जोहरने कोर्टात जायचे होते आणि मनसेने शांततापूर्ण आंदोलन करायचे होते. हे ब्लॅकमेलिंग कशाला? आम्ही तो सिनेमा बघणार नाहीच पण म्हणून मनसे गुंडगिरी करणार असेल तर आमचा अजिबात पाठिंबा नाही. करण जोहर आणि मनसे यांच्याकडून कसलीही चांगल्या कामाची अपेक्षा अजिबात नाही पण ही मांडवली फडणविसानी करावी याचा जास्त राग आला आहे. धमक्या देऊन मनसे दंगल करणार होते? करून बघू देत. आतापर्यंत महाराष्ट्रात किती दंगलीमधे सैन्याला बोलावावे लागले? गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत. फडणविसानी एजंटाचे काम न करता गप्प बसून लक्ष ठेवायचे होते. नसते धंदे करायला सांगितले कोणी? महाराष्ट्रातली सगळी कोर्ट आणि पोलीस मेले का?

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 24/10/2016 - 23:35
>>> करण जोहरने कोर्टात जायचे होते आणि मनसेने शांततापूर्ण आंदोलन करायचे होते. ते दोघे तसे करीत नव्हते, त्यामुळेच फडणविसांना त्यात पडावे लागले. >>> गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत. पोलीस संरक्षण हा शेवटचा पर्याय शिल्लक होताच. परंतु त्यापूर्वी चर्चने मार्ग काढणे आवश्यक होते. >>> फडणविसानी एजंटाचे काम न करता गप्प बसून लक्ष ठेवायचे होते. नसते धंदे करायला सांगितले कोणी? महाराष्ट्रातली सगळी कोर्ट आणि पोलीस मेले का? नुसते गप्प बसून लक्ष ठेवायचे? दंगेधोपे टाळून वाद मिटविणे हे त्यांचे कर्तव्य होते व तेच त्यांनी केले.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 24/10/2016 - 23:40
तेच तेच लिहायचा कंटाळा आला. आता पुढे टंकाळ्याचा अधिकार वापरत आहे. तुमचे म्हणणे कुठूनही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचायची काही शक्यता असेल तर महाराष्ट्रातल्या १०० पैकी ९५ लोकांना या प्रकाराचा भयंकर राग आला आहे हेही त्यांच्यापर्यंत पोचवा ही हात जोडून विनंती. आपण सगळ्यानीच बापड्या करण जोहरला यथाशक्ती १०/११ रुपयाचे चेक्स पाठवून देऊया. गरिबाला तेवढीच मदत. त्यातले पैसे त्याने अजून कोणाला दानधर्म केले तरी आमचे काही म्हणणे नाही. पण सैनिकांची चेष्टा कृपा करून थांबवा आता.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 24/10/2016 - 23:29
मग करण जोहर आणि राज ठाकरे असे कोण मोठे समाजाचे धुरीण लागून गेले की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी आपला बहुमूल्य वेळ खर्च करावा? एक फडतूस सिनेमा म्हणजे काय लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे का? करण जोहर रडला म्हणे आपली, आपल्या लोकांची रोजीरोटी बुडाली मग उद्या कोणा रस्त्यावरच्या मजुराला मुकादमाने कामावरून काढून टाकले आणि त्याची रोजीरोटी बुडाली तर त्याला मुख्यमंत्री स्वत मदत करणार का? कायदा आणि सरकारला मजूर आणि करण जोहर दोघे सारखेच ना?

In reply to by पैसा

अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना. भारीच कल्पक आहे तो दुकानदार ! पण, असे बरेच चेक आले तर पैश्याच्या मागे धावणारे बॉलीवूडी लोक ते निर्लज्जपणे घेतीलही. पैसा सोडून त्यांना इतर काही दिसते असे वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

साहना 25/10/2016 - 06:34
> या वादात एकूण ३ हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) होते. करण जोहर (म्हणजेच निर्माते), राज ठाकरे (म्हणजेच मनसे) आणि फडणविस (म्हणजेच राज्य सरकार). तसे चित्रपटगृहांचे मालक, वितरक, प्रेक्षक इ. सुद्धा हितसंबंधी होते, परंतु वरील ३ हे प्रमुख हितसंबंधी होते. इथे राज ठाकरेंना स्टॅकहोल्डर म्हणणेच मुळांत चुकीचे आहे. ठाकरे ह्यांनी स्टेक होल्डर बनण्याचा प्रयत्न केला तेंव्हाच त्यांना हिसका दाखवायला पाहिजे होता. उद्या मुलीची छेड काढणाऱ्याला तिच्या लग्नाच्या वेळी "स्टेक होल्डर' म्हणावे काय ? रेड रायडींग हूड मध्ये लांडग्याची जी भूमिका होती, शोले मध्ये गब्बर ची जी भूमिका होती, रामायणात रावणाची जी भूमिका होती, बाजारांत हफ्ता गोळा करायला येणार्यांची जी भूमिका असते, काश्मीर मध्ये पाकिस्तानची जी भूमिका आहे तीच भूमिका राज ठाकरे ह्यांची वरील घटनेत होती.

टर्मीनेटर 24/10/2016 - 14:16
सब गंदा है...पर धंदा है ये... जिथे आर्थिक फायदा नुकसानीच्या गोष्टी येतात तिथे चित्रपट व्यावसायिक काय किंवा राजकारणी व मुख्यमंत्री काय सगळे कमरेच सोडून डोक्याला गुंडाळायला तयार होतात. हीच गोष्ट ह्या प्रसंगातून ह्या तिघांनी दाखवून दिली आहे....बाकी सेना आणि सैनिक वगैरे गोष्टी ह्या लोकांसाठी नगण्य आहेत.

(ह्यातील काही मुद्दे रिपीट झाले असतील तर क्षमस्व.) शेवटी लावलेच की नाही करण जोहरला गुढगे टेकायला खळ्ळ खट्याक 'संस्कृती'पुढे (चुकलो, लोकेच्छेपुढे)? आपली लोकशाहीदेखील अशीच गुढगे टेकील लवकरच केंव्हातरी. मग आपण आपली शस्त्रे खाली ठेवू व आनंदोत्सव साजरा करू. आपण खाली ठेवलेली शस्त्रे केव्हातरी आपल्यावरच उगारली जातील पण ते नंतर पाहता येईल. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देऊ नये व जे कोणी इथे असतील त्यांनी भारत सोडून जावे अशी हाकाटी उरीच्या हल्ल्यानंतर सुरु झाली. ज्या कोणी (उदा. सलमान खान) त्याविरुद्ध सूर लावला त्याच्यावर हल्लाबोल झाला. आपली राष्ट्रनिष्ठा कशी मोठी हे सिद्ध करण्याची अहमहिका लागली. पाकिस्तानी कलाकारांना भारतात का येऊ देऊ नये ह्यासाठी हास्यापद कारणे देण्यात आली - भारतात कलाकार नाहीत का, पाकिस्तानी कलाकारांना म्हणजे शेवटी पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसे द्यायचे, आपण परकीयांना पैसे द्यायचे म्हणजे आपला तेवढा तोटा करून घायचा, पाकिस्तानी कलाकार भारताच्या सुरक्षेला धोका आहेत, हे प्रमुख आक्षेप होते. पण जर आपल्या सरकारचीदेखील अधिकृत भूमिका अशी असेल की आम्ही अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करून ते उद्वस्थ केले; आमचे पाक सरकारशी वा जनतेशी भांडण नाही, तर त्यासाठी काही कारण असेल ना? ते कारण एकच असू शकते ते म्हणजे पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांना जमेल तितके एकटे पाडावयाचे आणि इतरांचा पाठिंबा मिळवायचा नाहीतर किमान ते तटस्थ राहतील असे बघायचे. हे ह्या 'राज'कारणी नेत्यांना समजत नसेल असे नाही पण स्वतःच्या क्षुल्लक राजकारणासाठी त्यांना ते समजूनच घ्यायचे नाही. दुसरा मुद्दा पाकिस्तानी कलाकार भारतात पैसे मिळवितात म्हणजे आपण अतिरेक्यांना आर्थिक मदत करतो. असे असेल तर इथल्या हिंदी चित्रपटसृष्टीला कितीतरी पट जास्त पैसे पाकिस्तानातून मिळतात ते चालतात का? पाकिस्तानी कलाकार भारतात येउन हेरगिरी करू शकतात, हा आक्षेपही पोकळ आहे. सलमान म्हणतो त्याप्रमाणे आपल्या सरकारनेच त्यांना व्हिसा दिलेले आहेत ना? मग जर सरकारला त्यांना इथे येऊ देण्यात धोका वाटत नसेल तर हे कोण लागून गेले स्वतःचा कायदेबाह्य अधिकार चालवणारे? (आता जर कोणी म्हणत असेल की सरकारच शिवसेना आणि मनसेचा वापर करून त्यांना भारताबाहेर काढीत आहे तर पुढे बोलावे असे काही राहात नाही.) शेवटचा मुद्दा म्हणजे करण जोहरला किंवा तत्सम कुणाला भारतीय कलाकार मिळत नाहीत का? हा तर प्रतिवाद करण्याच्याही लायकीचा मुद्दा नाही. ह्या तमाशाची परवाच्या दिवशी तात्पुरती सांगता झाली. ('तात्पुरती' अशासाठी की 'ह्यापुढे मी पाकिस्तानी कलाकारांना माझ्या चित्रपटात घेणार नाही' अशी हमी करण जोहरकडून घेतली आहे.) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती, म्हणजे मांडवली, केली. करण जोहरने पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीला द्यायचे असा करार झाला. त्यावर शिवसेनेने 'लष्कराला खंडणीचा पैसा नको' अशी कॉमेंट देण्याचा उपचारदेखील पार पाडला. असे सर्व यथासांग झाले. ह्यात एक बरे झाले; भाजपाचे खरे रूप प्रकटले. 'party with a difference' म्हणजे काय ते लोकांसमोर आले. सत्य कटू असले तरी भ्रम दूर झालेला केव्हाही चांगलाच, नाही का? पाकिस्तानी कलाकाराला घेतले ही काही करण जोहरची चूक नव्हे. परिस्थिती बदलली म्हणून पूर्वीचे करार रद्द करता येत नसतात. तशी कोणी मागणी जर करत असेल तर ते घटनाबाह्य आहे. प्रत्येक नागरिकाचे अधिकार राखण्यास सरकार बांधील आहे अशी तर्कशुद्ध आणि न्यायाची भूमिका सरकारची असायला हवी होती. त्याविरुद्ध कोणी येत असेल तर त्याचा कठोरपणे बीमोड करणे हे सरकारचे कर्तव्य होते. निदान ज्या पक्षाचे पंतप्रधान 'भारताची राज्यघटना हा माझा धर्म आहे' अशी जाहीर भूमिका घेतात त्या पक्षाची तरी. पण कसचे काय? निवडणुकींच्या आणि मतांच्या हिशोबापुढे सगळे दुय्यम असते, हेच खरे. (शिवसेनाशी आपले फाटलेलेच आहे. मनसे तरी आपल्या बाजूला असलेला बरा, निदान विरुद्ध तरी नको अशी भाजपाची भूमीका असावी.) आता ह्या त्रिपक्षीय कराराचा निषेध करणाऱ्यांविरुद्ध हल्लाबोल करता येईल. 'आता मनसे आमची देशभक्ती ठरवणार का' असा प्रश्न शबाना आझमी हिने केला आहे, तिलाही राष्ट्रद्रोही ठरविता येईल. आणि हो, देशातील वाढत्याअसहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या रतन टाटा ह्यांना देखील. आणि हे सर्व लिहिल्याबद्दल मलासुद्धा. पण मी काही शबाना आझमी, रतन टाटा ह्यांच्या पंक्तीत बसणारा नव्हे. मी एक क्षुल्लक इसम. म्हणून मला माफही करतील कदाचित. शेवटी एवढेच, की हे राजापेक्षा राजनिष्ठ लोक राजालाही तापदायक ठरू शकतात.

In reply to by रविकिरण फडके

साहना 25/10/2016 - 06:40
माझ्या मते सर्व घटनेचे अनालिसिस करणारा सर्वांत चांगला कमेंट हा आहे. > ह्यात एक बरे झाले; भाजपाचे खरे रूप प्रकटले. 'party with a difference' म्हणजे काय ते लोकांसमोर आले. सत्य कटू असले तरी भ्रम दूर झालेला केव्हाही चांगलाच, नाही का? पाकिस्तानी कलाकाराला घेतले ही काही करण जोहरची चूक नव्हे. भाजपचे खरे रूप हेच आहे ह्याची शंका अनेकांना आधीपासून होतीच म्हणून विशेष आश्चर्य वाटत नाही. आश्चर्य अश्या गोष्टीचे वाटते कि सभ्य, चांगली माणसे अचानक "लोकेच्छा", "दिवाळीचं वेळी शांतता" इत्यादी इत्यादी करणे देऊन आणि शाब्दिक कोलांट्या उड्या मारून आपल्या आवडत्या पक्षाचे समर्थन करीत आहेत. काँग्रेस पक्ष भ्रष्ट असला तरी किमान आपल्या चमच्याची खूप काळजी घेतो. भाजपच्या समर्थानात नाचणाऱ्या भक्तगणांच्या गळ्यांत मात्र शेवटी धोंडाच पडेल असे वाटते.

श्रीगुरुजी 24/10/2016 - 15:13
पाकिस्तानी कलाकारांना भारतात का येऊ देऊ नये ह्यासाठी हास्यापद कारणे देण्यात आली - भारतात कलाकार नाहीत का, पाकिस्तानी कलाकारांना म्हणजे शेवटी पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसे द्यायचे, आपण परकीयांना पैसे द्यायचे म्हणजे आपला तेवढा तोटा करून घायचा, पाकिस्तानी कलाकार भारताच्या सुरक्षेला धोका आहेत, हे प्रमुख आक्षेप होते.
या कारणात काय हास्यास्पद आहे? ज्या प्रमाणात भारतात पाकड्यांना कामे दिली जातात त्या प्रमाणात भारतीय कलाकारांना पाकिस्तानी चित्रपटात कामे दिली जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे (खरं पाकिस्तानी चित्रपटात काम करणार्‍या भारतीय कलाकारांची संख्या शून्याच्या जवळपासच आहे). कोणतीही देवाणघेवाण/व्यापार/व्यवहार एकतर्फी होऊ शकत नाही. आपण इथे बोलावून पाकड्यांना कोट्यवधी रूपये देऊन चित्रपटात झळकवायचे आणि आपल्या एकाही कलाकाराला तिथे काम नाही असे किती दिवस चालणार? पाकिस्तानी कलाकारांना जे पैसे मिळतात त्यातील काही भाग करांच्या रुपाने त्यांच्या सरकारकडे जातोच व सरकारकडून त्यातला काही भाग दहशतवादासाठी वापरला जातो. म्हणजे आपणच पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाकड्या कलाकारांच्या माध्यमातून अर्थपुरवठा करीत आहोत.
पण जर आपल्या सरकारचीदेखील अधिकृत भूमिका अशी असेल की आम्ही अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करून ते उद्वस्थ केले; आमचे पाक सरकारशी वा जनतेशी भांडण नाही, तर त्यासाठी काही कारण असेल ना? ते कारण एकच असू शकते ते म्हणजे पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांना जमेल तितके एकटे पाडावयाचे आणि इतरांचा पाठिंबा मिळवायचा नाहीतर किमान ते तटस्थ राहतील असे बघायचे. हे ह्या 'राज'कारणी नेत्यांना समजत नसेल असे नाही पण स्वतःच्या क्षुल्लक राजकारणासाठी त्यांना ते समजूनच घ्यायचे नाही.
पाकिस्तानमधील कट्टरतावाद्यांना एकटे पाडायचे हे त्यामागे कारण नाही. भारताने अशी कारवाई करून पहिल्यांदाच तसे अधिकृतरित्या जाहीर केले. पहिल्यांदाच कारवाईची जाहीर कबुली करताना भारत अत्यंत सावध होता. आम्ही फक्त दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करीत आहोत, ही कारवाई पाकिस्तानविरूद्ध नसून पूर्वी आमचाच भाग असलेल्या पाकव्याप्त काश्मिरमध्ये केली इ. स्पष्टीकरण भारताने दिले. आंतरराष्ट्रीय राजकारणात इतर देश आपल्याविरूद्ध जाऊ नयेत, आम्ही स्वसरंक्षणासाठी असे केले, इतर देशांचा आपल्याला पाठिंबा मिळावा हा त्यामागे उद्देश होता व तो उद्देश सफल झाला.
दुसरा मुद्दा पाकिस्तानी कलाकार भारतात पैसे मिळवितात म्हणजे आपण अतिरेक्यांना आर्थिक मदत करतो. असे असेल तर इथल्या हिंदी चित्रपटसृष्टीला कितीतरी पट जास्त पैसे पाकिस्तानातून मिळतात ते चालतात का?
का चालू नये? हरकत काय आहे?
पाकिस्तानी कलाकार भारतात येउन हेरगिरी करू शकतात, हा आक्षेपही पोकळ आहे. सलमान म्हणतो त्याप्रमाणे आपल्या सरकारनेच त्यांना व्हिसा दिलेले आहेत ना? मग जर सरकारला त्यांना इथे येऊ देण्यात धोका वाटत नसेल तर हे कोण लागून गेले स्वतःचा कायदेबाह्य अधिकार चालवणारे? (आता जर कोणी म्हणत असेल की सरकारच शिवसेना आणि मनसेचा वापर करून त्यांना भारताबाहेर काढीत आहे तर पुढे बोलावे असे काही राहात नाही.)
सरकारने व्हिसा दिला असला तरी सरकारी निर्णयाला विरोध करण्याचा कायदेशीर हक्क सर्वांना आहे. मनसेने त्यांना विरोध केला यात काहीही चुकीचे नाही. तो मनसेला घटनेने दिलेला हक्क आहे.
शेवटचा मुद्दा म्हणजे करण जोहरला किंवा तत्सम कुणाला भारतीय कलाकार मिळत नाहीत का? हा तर प्रतिवाद करण्याच्याही लायकीचा मुद्दा नाही.
पाकिस्तान व पाकिस्तानी आपले शत्रू आहेत. त्यामुळे शत्रूला अर्थपुरवठा करण्याऐवजी इथलेच कलाकार घ्यावेत हा मुद्दा योग्यच आहे.

"सरकारने व्हिसा दिला असला तरी सरकारी निर्णयाला विरोध करण्याचा कायदेशीर हक्क सर्वांना आहे. मनसेने त्यांना विरोध केला यात काहीही चुकीचे नाही. तो मनसेला घटनेने दिलेला हक्क आहे." कायदेशीर? होच की! आणि पाच कोटी रुपये खंडणी उकळण्याचाही हक्कच. असो. ह्यावर वाद घालण्यात अर्थ नाही. आपण सहमत होणार नाही ह्यावर सहमत होऊया.

श्रीगुरुजी 24/10/2016 - 15:45
कायदेशीर? होच की! आणि पाच कोटी रुपये खंडणी उकळण्याचाही हक्कच.
ते पैसे मनसेला मिळणार नाहीत हो किंवा राजच्या खिशातही जाणार नाहीत. सैनिक कल्याण निधीला ते पैसे दिले जाणार आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मोदक 24/10/2016 - 16:05
याच गोष्टीचा अनेक लोकांना राग आला आहे गुरूजी.. सैनीक कल्याण निधीला पैसे देण्याचा हा मार्ग चुकीचा आहे हे तरी मान्य आहे का?

In reply to by मोदक

श्रीगुरुजी 24/10/2016 - 20:58
याच गोष्टीचा अनेक लोकांना राग आला आहे गुरूजी.. सैनीक कल्याण निधीला पैसे देण्याचा हा मार्ग चुकीचा आहे हे तरी मान्य आहे का?
ती बैठक मुळात सैनिक कल्याण निधीला देणगी देण्यासाठी बोलविलेली बैठक नव्हती. चर्चेच्या माध्यमातून दिवाळीत निर्माण होणारी संभाव्य अशांतता टाळणे हा बैठकीचा मुख्य उद्देश होता. तो साध्य झाला व त्यातून भविष्यात पाकड्यांवर बंदी, सैनिक कल्याण निधीला देणगी, चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्याच्या निषेधाचा फलक इ. अजून काही गोष्टी बाहेर आल्या. परंतु मूळ उद्देश आंदोलन रद्द करणे हाच होता.

In reply to by श्रीगुरुजी

मोदक 24/10/2016 - 21:05
ते काहीही असले तरी अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून सैनीक कल्याण निधीला देणगी देणवण्याची गोष्ट पटली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सैनिक कल्याण नाव घेतले की काहीही कायदेशीर होईल का? असे असले तर सैन्याचे नाव संबंधित खराब करत आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, उद्या तुमची कॉलर धरून कोणी काढ सगळे खिशातले पैसे आर्मी फंडला द्यायचे म्हणले तर तुम्ही राष्टरकार्य असल्यासारखा द्याल का आपल्या घामाचा पैसा? अन तो पैसा सैन्य स्वीकारेल ह्याची काय शाश्वती, त्यांनी नाकारल्यास तुमचा पैसा तुम्हाला परत पोच करायचे ओनस कोणाचे असेल? आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी प्रमाणे आर्मी वेल्फेयर फंड नामे नवी खंडणी जन्माला घालतोय का ? ह्याचा जरूर विचार केला जावा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. 24/10/2016 - 16:43
आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी प्रमाणे आर्मी वेल्फेयर फंड नामे नवी खंडणी जन्माला घालतोय का
सेमच बाप्पू, मला सेम उधारण आमच्या इथले आठवलेले. सगळ्यांच्या होलसेल जयंत्या ब्यंत्याचे पैसे आम्ही देत नै. नवीन दुकान टाकले की एरीयावाईज एक सर्टिफिकेट मिळते. त्याला ४-५ ह्जार मोजायचे एकवट्ट. मग त्यांचे ते सगळ्या मंडळांना पैसे देतात. मंडळे आमच्याकडे फिरकत नैत. एकूणच ह्या मिलिभगत प्रकरणात प्रथमदर्शनी विनविन सगळे दिसत असले तरी स्वतःचे मत (वर्गणी नाहि द्यायची असे) मांडायची सोय नाही. एकट्याने ह्या सिस्टिमशी लढायची ताकद नाही आणि धंदा करु की हेच करत बसू म्हणून आम्ही सहन करतो. जवळपास सर्वत्र शहरात ही सर्वमान्य प्र्याक्टीस झालीय. वरील आर्मीसाठी खंडणी प्रकरणात तोच पायंडा पडू नये हीच इच्छा.

In reply to by श्रीगुरुजी

साहना 25/10/2016 - 06:41
तुमच्या मुलाला कुणी किडनॅप करून उद्या सैनिक निधीला पैसे द्यायला लावले तर ते नैतिक दृष्ट्या बरोबर वाटते का ? (उदाहरणादाखल)

आणि BTW , आपण सर्वानीच पाकड्या पाकडे इत्यादी शब्द टाळावेत. सुसंकृत माणसे असे बोलत नाहीत आपापसात. (अर्थात, ह्यालाही उत्तर असेलच. आम्ही असंस्कृत लोकांबद्दल बोलतोय, असे.)

बोका-ए-आझम 24/10/2016 - 16:57
असताना मनसेला एवढं महत्व देण्याची गरज होती का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतोय. त्यामुळे त्यांनी असले स्टंट करणं हे समजण्यासारखं आहे. पण मुख्यमंत्र्यांना हे अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग करण्याची काय गरज होती? येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला चुचकारून शिवसेनेची कोंडी करण्याची व्यूहरचना हे एक कारण असू शकतं, पण त्यासाठी मनसेच्या एवढ्या पायघड्या घालणं आवश्यक नव्हतं.

In reply to by बोका-ए-आझम

श्रीगुरुजी 24/10/2016 - 20:55
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

In reply to by श्रीगुरुजी

बोका-ए-आझम 25/10/2016 - 00:24
राज ठाक-यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना स्वतःलाही प्रतिबंधात्मक अटक करायला हवी होती, ज्याचे आदेश गृहमंत्री म्हणून ते देऊ शकत होते. सरकारने मध्यस्थी करावी असं ना करण जोहर म्हणत होता, ना राज ठाकरे म्हणत होते.

In reply to by बोका-ए-आझम

श्रीगुरुजी 25/10/2016 - 15:24
- चित्रपटावर बंदी घालण्यात येणार नाही हे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते. - चित्रपटाला पूर्ण संरक्षण देण्यात येईल हे राजनाथसिंग व फडणविसांनी पूर्वीच सांगितले होते. - एका चित्रपटगृहावर निदर्शने करणार्‍या मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना आधीच अटक केलेली होती. - प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित होताना सर्व चित्रपटगृहांना संरक्षण देण्यात येणार होते. सरकार संपूर्णपणे कायदेपालन करणार होते. परंतु एवढे करून तोडफोड, दंगेधोपे व त्यातून निर्माण होणारी अशांतता व हिंसाचार पूर्णपणे टाळणे अशक्य होते. प्रत्यक्ष राज ठाकर्‍यांना व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करूनसुद्धा काही कार्यकर्ते मोकळे राहिलेच असते व त्यांनी तोडफोड केलीच असती. संपूर्ण महाराष्ट्रात किमान ७००-८०० चित्रपटगृहात हा चित्रपट दाखविला जाईल असा अंदाज आहे. प्रत्येक चित्रपटगृहावर किमान १० पोलिस ठेवले तरी ७-८ हजार पोलिस गुंतुन पडले असते. दिवाळीत दहशतवादी हल्ल्याचा धोका कायमच असतो आणि अशा परिस्थितीत इतके पोलिस वेगळ्या कामात अडकवून ठेवणे योग्य झाले नसते. आणि एवढे पोलिस ठेवूनसुद्धा तोडफोड पूर्णपणे टाळता आली नसती. काश्मिरमध्ये संचारबंदी असून व सैनिक पॅलेट गन्स घेऊन उभे असताना सुद्धा तिथले नागरिक संचारबंदी मोडून गन्सची भीति न बाळगता रस्त्यावर येऊन दगडफेक करीत होते. इथे तर हातात लाठ्या घेतलेले १०-१२ पोलिस काय करू शकणार होते? अशा परिस्थितीत आंदोलन टाळण्यासाठी सामोपचाराच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक होते. समजा बोलणी फिसकटली असती तर शेवटी पोलिस फोर्स होताच. परंतु कोणत्याही संघर्षात/वादात बलाचा वापर हा शेवटचा पर्याय असतो. वादावर चर्चेच्या, सामोपचाराच्याच माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आधी केला जातो. खलिस्तान आंदोलन, काश्मिर आंदोलन, आसाम आंदोलन, नक्षलवादी, मिझोराम आंदोलन इ. वादात वाटाघाटी करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केला गेला होता. नक्षलवादी, शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीचे सदस्य, मिझोरामचा लाल डेंगा, आसाममधील विद्यार्थी, हुरियतचे सदस्य हे काही जनतेचे निवडून आलेले प्रतिनिधी नव्हते. तरीसुद्धा त्यांचे उपद्रवमूल्य ओळखून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अगदी रामायणात सुद्धा प्रभू रामचंद्रांनी युद्ध करण्यापूर्वी अंगदाला शिष्टाईसाठी पाठविले होते आणि भगवान श्रीकृष्णानेसुद्धा महाभारत युद्ध टाळण्यासाठी दुर्योधनाशी वाटाघाटी केल्या होत्या (इथे मी फडणविसांची श्रीराम किंवा श्रीकृष्णाशी तुलना करीत आहे असा गैरसमज करून घेऊ नये). मनसेचा एकच आमदार असला तरी मनसेकडे भरपूर कार्यकर्ते आहेत व मनसे या पक्षाचे उपद्रवमूल्य खूप मोठे आहे. मनसेचे आंदोलन म्हणजे अण्णा हजारेंचे मौन किंवा उपोषण नाही किंवा अंनिसचा मोर्चा नाही. मनसे आंदोलनातून हिंसाचार, तोडफोड होण्याचा इतिहास आहे. मनसेचे आंदोलन कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर असले तरी त्यातून अशांतता निर्माण होऊन जनतेला त्रास होणार होता. राज ठाकर्‍यांना किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांना अटकेत ठेवून आंदोलन दडपता आले नसते. कायद्याचे पालन करणे हे जसे मुख्यमंत्र्यांवर बंधनकारक आहे तसेच शांतताभंग होऊन न देणे ही देखील त्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे आधी मनसेशी बोलणी करून आंदोलन रद्द करण्याचा प्रयत्न करणे व बोलणी फिसकटल्यास पोलिस फोर्स वापरून कायद्याचे पालन करणे हाच मार्ग त्यांच्यापुढे होता. परंतु पोलिस फोर्स वापरून तोडफोड पूर्णपणे टाळणे शक्य झाले नसते. त्यामुळेच त्यांनी दोघांना एकत्र बोलावून वाटाघाटींच्या माध्यमातून आंदोलन रद्द करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आधी लिहिल्याप्रमाणे ५ कोटींची देणगी हा काही चर्चेतील मुख्य मुद्दा किंवा अट नव्हती. आंदोलन रद्द करण्याचा प्रयत्न करणे हाच चर्चेतील प्राथमिक मुद्दा होता. या विषयावर खालील लेख चांगला आहे. http://indianexpress.com/article/india/india-news-india/devendra-fadnavis-ae-dil-hai-mushkil-ban-karan-johar-5-crore-raj-thackeray-3101411/

In reply to by श्रीगुरुजी

शब्दबम्बाळ 25/10/2016 - 00:33
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं असतं तर एक निवेदन द्यायला हवं होत, ज्यात स्पष्टपणे सांगितलं असत कि जर या आंदोलनातून कुठल्याही पद्धतीचे मालमत्तेचे नुकसान झाले तर ते 'मनसे' कडून वसूल करण्यात येईल. आंदोलन करताना पकडण्यात आलेले कार्यकर्ते मनसे चे आढळल्यास 'मनसे' प्रमुखांना अशा हिंसक आंदोलनास पाठबळ देण्यासाठी अटक करण्यात येईल! पण हे केलं असत तर काही लोकांचा रोष घ्यावा लागला असता! त्यात निवडणूक आल्यात त्यात शिवसेना ताप देतेय!! मग मनसे ला दुखवून कसे चालेल? मनसे चे कार्यकर्तेसुद्धा आजकाल पक्षप्रमुखांच्या नावाने ओरडत असतात. आधीच दहीहंडीच्या केसेस पडल्यात कार्यकर्त्यांवर त्यात अशी काही कणखर कारवाई होण्याची शक्यता दिसली असती तर 10 वेळा विचार करावा लागला असता कार्यकर्त्यांना सुद्धा!

In reply to by शब्दबम्बाळ

विशुमित 25/10/2016 - 09:59
बरोबर आहे.. मनसे अध्यक्षा सकट सर्व पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंदात्मक कारवाई करायला पाहिजे होती. वेळ पडली तर अध्यक्षा ला चोप देत पोलीस स्थानकात डांबून ठेवायला पाहिजे होते. मागील आघाडी सरकार ने त्यांचे खूप लाड पुरवले. खळ खट्याक ची धमकी देऊन सार्वजनिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या प्रवृत्तीना चाप बसवण्याची संधी फडणवीस यांच्या सारख्या कर्तबदार मुख्यमंत्र्यानी घालवली आहे. याचा खेड वाटतो.

In reply to by शब्दबम्बाळ

श्रीगुरुजी 25/10/2016 - 15:34
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं असतं तर एक निवेदन द्यायला हवं होत, ज्यात स्पष्टपणे सांगितलं असत कि जर या आंदोलनातून कुठल्याही पद्धतीचे मालमत्तेचे नुकसान झाले तर ते 'मनसे' कडून वसूल करण्यात येईल. आंदोलन करताना पकडण्यात आलेले कार्यकर्ते मनसे चे आढळल्यास 'मनसे' प्रमुखांना अशा हिंसक आंदोलनास पाठबळ देण्यासाठी अटक करण्यात येईल!
वर सविस्तर उत्तर दिले आहे. त्यामुळे परत लिहित नाही.
पण हे केलं असत तर काही लोकांचा रोष घ्यावा लागला असता! त्यात निवडणूक आल्यात त्यात शिवसेना ताप देतेय!! मग मनसे ला दुखवून कसे चालेल? मनसे चे कार्यकर्तेसुद्धा आजकाल पक्षप्रमुखांच्या नावाने ओरडत असतात. आधीच दहीहंडीच्या केसेस पडल्यात कार्यकर्त्यांवर त्यात अशी काही कणखर कारवाई होण्याची शक्यता दिसली असती तर 10 वेळा विचार करावा लागला असता कार्यकर्त्यांना सुद्धा!
राज ठाकरे हा उधोजींइतकाच बेभरवशाचा व स्वतःच्या ताकदीबद्दल अवास्तव भ्रम बाळगणारा आहे. शेवटी हे दोन्ही बंधू शिवसेना संस्कृतीत वाढले आहेत. आपला पक्ष फार मोठा आहे, आपल्याला महाराष्ट्रात प्रचंड पाठिंबा आहे, आपण स्वबळावर सत्ता काबीज करू शकतो अशा भ्रमात हे दोघेही वावरत असतात. या दोघांबरोबरही युती किंवा तडजोड करणे अत्यंत अवघड आहे हे भाजप पुरेपूर ओळखून आहे. भाजपचे मुख्य ध्येय स्वबळावर लढण्याचेच आहे. त्यामुळे मनसेला दुखवू नये किंवा सेनेला चुचकारावे अशा गोष्टी भाजप करणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

राजाभाऊ 25/10/2016 - 20:35
>>पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं? सत्तेत नसुनहि राज ठाकरेंचीच चालते महाराष्ट्रात, तेंव्हा जनाची नाहि तरी मनाची लाज असेल तर फडणविसांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खाली करावी...

बोका-ए-आझम 24/10/2016 - 19:08
डावीकडून आणि उजवीकडून थपडा खाणे. सेन्सॉरने मंजुरी दिली असताना एका राजकीय पक्षाच्या दंडेलीला भीक घातली म्हणून डावीकडून आणि देशभक्ती खंडणीखोरांच्या दावणीला बांधली म्हणून उजवीकडून. #तोंडघशीफडणवीस

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 24/10/2016 - 19:14
हि सगळी पवारसाह्यबांनी राज ठाक्रे, करन जोहर आदींकडून करवून आणलेली गेम आहे. फडनवीस बिचारे तोंडघशी पडले. आता त्यांनी जायला हरकत नाही. उगा मोर्चामुळे गेले असते तर महाराष्ट्रात वेगळा मेसेज गेला असता. ;) #सर्वकाहीसाहेबांमुळे

सोत्रि 24/10/2016 - 22:04
१. मुंबई नगरपालिकेच्या २०१७ निवडणूकीची ही नांदी आहे २. 'टायमिंग' साधून केलेली राजनिती आहे (आठवा टोल राड्याचे टायमिंग) ३. भाजपाने शिवसेनेला दाखवलेले 'मधले बोट' आहे ४. मनसे पार्टी फक्त पैसा छापण्याचे माॅडेल म्हणून कसा एस्टॅब्लिश झाला आहे त्याचे उदाहरण आहे ५. राजकारणातले निवडणूकपूर्व स्कोर सेटलिंग आहे ६. करण जोहरचा सिनेमा आणि पाक कलाकार हे निनीत्त आणि ह्या प्रकरणातले बळी आहेत ७. पाक कलाकारांना कधीच काम मिळणार नाही हा विजयी मुद्दा, मूळ मुद्द्याला झाकोळूना टाकण्याची तजवीज आहे - (दिलसे) सोकाजी

संदीप डांगे 24/10/2016 - 22:16
गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. घटनात्मक पदावर बसून काय निर्णय घ्यावे ह्याची अक्कल नसेल तर ... असो. डोकं फार तापलं आहे. उगा उणादुणा शब्द निघायचा... श्रीगुरुजी, मिपाची जनभावना तुमच्या विचारांविरुद्ध आहे असेच चर्चेत दिसत आहे, योग्य ती समज आपल्याला येवो, भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 24/10/2016 - 23:00
आपल्या प्रतिसादातील भाषा अस्थायी आणि सौजन्यशील आहे असे खेदाने नमूद करतो. श्रीगुरुजींनी अजुनतरी पातळी सोडुन बोलल्याचे किमान या धाग्यावर दिसत नाही. ते चुकीच्या गोष्टीचे समर्थन करताना दिसत आहेत. त्यात त्यांची केविलवाणी धडपड दिसते पण जाणुनबुजुन एखाद्या व्यक्तीची, पक्षाची अथवा समुदायाची खोडी काढलेली दिसत नाही. अश्या परिस्थितीत त्यांची कानौघडणी करणारा प्रतिसाद रास्तच असावा पण " फालतू टिवटिव बंद करा" आणि "भाजपाचे दलाल नकोत इथे मिपावर" ही वाक्ये पुर्णतः अस्थायी आहेत. मिपावर सर्वच पक्षांचे समर्थक आहेत. सर्वांचे विरोधक आहेत. आपण स्वतः भाजपाचे कट्टर विरोधक आहात. अश्या परिस्थितीत कोण्या एकाला "दलाल" वगैरे संबोधणे ही फारच वैयक्तिक टिप्पणी होते. शिवाय एखाद्याच पक्षाचे समर्थक नकोच असे म्हणणे ही चुकीचे आहे. आम्ही तर मिपावर आप आणी राष्ट्रवादीच्या समर्थकांना पण सहन करतो. त्यात काय एवढे?

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 24/10/2016 - 23:14
ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं. धन्यवाद! रच्याकने, मी कोणाचा कट्टर विरोधक आहे किंवा नाही हेही तुम्हीच ठरवा.. परत असो.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 25/10/2016 - 10:21
डांगे अण्णा गुरुजींच्या मताशी मी पण सहमत नाही परंतु आपली भाषा (दलाल इ शब्द) हि कमरेच्या खाली उतरते आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते. आपल्याला गुरुजी दलाल आहेत हे सिद्ध करून दाखवता येईल काय? तुम्ही भक्त म्हणत होतात तोवर ठीक होते. याबाबतीत मृत्युंजय यांच्याशी सहमत.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 25/10/2016 - 10:31
मी गुरुजींनाच दलाल बोललो हे सिद्ध करता येईल काय? मिपावर भाजपचे दलाल नकोत अशी इच्छा व्यक्त केली आहे, ह्यात काय गैर? आणि हो, 'भाजपचे नकोत तर इतरांचे चालतील का' असा बुद्धिमान प्रश्न कोणी विचारू नये, ;)

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/10/2016 - 10:38
तुमचा प्रतिसाद लिहिताना तोल सुटला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर गुरूजींना बोललेले शब्द मागे घ्या. अशी शब्दांची कसरत करत तुम्ही पायर्‍या खाली उतरत जाण्यापेक्षा शब्द मागे घेणे सोपे आहे.

In reply to by सुबोध खरे

शब्दबम्बाळ 25/10/2016 - 13:31
दलाल वगैरे शब्द अयोग्य आहेत वगैरे सगळ्यांनी बोलून झालाय आणि ते बरोबर हि आहे. पण एखाद्या आयडी ला (तो नावडता असल्याकारणाने) "चड्डीला हात घातला", "सुंता केला" असे दिले गेलेले प्रतिसाद हे कमरेच्या वरचे आहेत का? कि आयडी च्या प्रसिद्धी आणि कंपू नुसार 'कमरेचे' माप बदलते?

In reply to by मृत्युन्जय

शब्दबम्बाळ 26/10/2016 - 15:09
मी एकाच ठिकाणी दोन्ही ठिकाणचा आक्षेप घेतला आहे! ;) असाही माझ्या आक्षेपाला कोण विचारतो? आमची ना फॅन फॉलोविंग ना कंपू त्यामुळे ज्या धाग्यावर प्रतिक्रिया देत असतो तिथे ताळतंत्र सोडून प्रतिक्रिया दिल्याचे दिसले तर थोडं सांगायचं प्रयत्न करतो... पण तुमच्या प्रश्नाचा रोख काय आहे हे कळलं तर नीट उत्तर देऊ शकेन...

In reply to by शब्दबम्बाळ

मृत्युन्जय 26/10/2016 - 16:48
इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच विचारत नाही. मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो वा नसो समर्थन मिळते. त्यामुळे इथे कंपुचा संबंध नाही. ताळतण्त्र सोडुन कुणी वागत असेल तर जरुर समज द्यावी. जिथे मला दिसते तिथे तशी समज मी देतोच. जर तसे करणे मला योग्य वाटले तर,. त्यामुळे माझ्या प्रतिक्रियेवर प्रतिसाद देण्याचे प्रयोजन कळाले नाही हा मुख्य रोख आहे. शिवाय प्रतिसाद देताना मी प्रतिसाद अयोग्य का वाट्तो याची कारणेही दिलेली आहेतच. असो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

In reply to by मृत्युन्जय

मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो वा नसो समर्थन मिळते. मिळत नाही.धन्यवाद.

In reply to by मृत्युन्जय

शब्दबम्बाळ 26/10/2016 - 17:17
अहो ती प्रतिक्रिया खरे काकांच्या प्रतिसादाला दिलेली आहे.. बघा पुन्हा! खरे काका काही वेळा मी त्या प्रतिक्रियेत लिहिल्या वाक्यांपैकी काहीतरी वापरतात(प्रसिद्ध आयडीला ) , त्या अनुषंगाने विचारले होते मी... असो, दिवाळीच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा!

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 26/10/2016 - 13:36
अरेच्या. मग सगळे ठरवण्याचा ठेका काय मिपा व्यवस्थापनाने तुम्हालाच दिलाय की काय? तुम्ही नाही का श्री गुरुजींना " भक्त", ठरवुन टाकलेत? जर तुम्ही भाजपा विरोधक नसाल तर श्री गुर्जी आपचे खंदे कार्यकर्ते आहेत असे पण म्हणूयात की. हाकानाका. असो. असोच. ....

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 24/10/2016 - 23:21
यात काहीच नवीन नाही. माझ्या प्रतिसादाचा प्रतिवाद न करता आल्याने समोरच्याने चिरडीला येउन संदर्भहीन व व्यक्तिगत टिप्पणी करणे हे नेहमीचेच आहे.

In reply to by मृत्युन्जय

साहना 25/10/2016 - 06:48
फालतू टिवटिव आणि दलाल ह्या शब्दांत सौजन्यहीन असे काही आहे असे वाटत नाही. "श्री गुरुजी" असे सोज्वळ नाव धारण करणारी व्यक्ती खंडणीखोर वृत्तीची आणि अपली पदाची शपथ मोडणाऱ्या मुख्यमंत्र्याची बाजू मांडत आहे अन नेत्यासाठी "दलाल" हा शब्द १००% योग्य वाटतो. खुद्द मुख्यमंत्र्यानी जे काही केलं आहे त्याची बातमी इंग्रजी वर्तमान पत्रांनी "brokered" अशी दिली आहे. गुरुजींचा युक्तिवाद "फालतू टिवटिव" ह्याच सदरांत मोडतो. प्रत्यक्षांत श्री गुरुजी हे फार चांगले व्यक्ती असतील ह्यांची शंका नाही पण पक्ष भक्तीने त्यांना आंधळे बनवले आहे.

In reply to by मृत्युन्जय

विशुमित 25/10/2016 - 10:06
राष्ट्रवादीच्या समर्थकांना पण सहन करतो>>>> -- उपकारच झाले मायबाप आमच्यावर. कुठे ऋण फेडू हे. या जन्मात तर शक्यच नाही. (हलके घ्या)

In reply to by संदीप डांगे

अभिदेश 24/10/2016 - 23:56
आणि सौजन्यहीन प्रतिसाद .... हे अनेकवेळा झालेले आहे. तुमच्या इतर धाग्यावरच्या प्रतिसादावरून आम्ही तुम्हाला पवार साहेबांचे दलाल असे म्हटले तर चालेल का ?

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/10/2016 - 00:06
डांगेण्णा.. प्रतिसाद पटला नाही. तुमचा वाद घालण्याचा स्टॅमिना संपला असेल तर गुरूजींकडे दुर्लक्ष करा. सरकारचे चुकले आहे आणि गुरूजी लंगडी बाजू सावरत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. बादवे.. "आपण अशी भाषा वापरणे = आपल्या बाबतीत दुसर्‍याला अशीच भाषा वापरण्याची परवानगी देणे"

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 25/10/2016 - 00:09
भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,
१. बाकी पक्षांचे दलाल चालतील का? २. मिपावर काय चालेल आणि काय नाही हे नीलकांत आणि संपादक यांना ठरवू द्या की. तुम्ही नक्की कुठल्या अधिकाराने हे बोलताय?

अर्धवटराव 24/10/2016 - 22:24
सरकारने दोन विरोधी पार्टींना आमने-सामने बसवुन वाद मिटवावे, आंदोलनं टाळावी यात काहिच वावगं नाहि, नवखं देखील नाहि. बाँबे पासुन ते झेंड्यापर्यंत, आणि क्रिकेट सामन्यांपासुन ते अमुक तमुक लवादापर्यंत हेच धोरण अनेकदा नौभवलं आहे महाराष्ट्राने. यंदा फरक हाच, कि मनसेला एकदम सीएम लेव्हलची मध्यस्थी मिळायला नको होती. त्यामागे कदाचीत आगामी मुंबई इलेक्शनचे आराखडे असतील. दुसरी बाब म्हणजे ५ करोडच्या देणागीला खंडणीचा वास येणे. करण जोहर वगैरे मंडळींना काहिच तोशीक न लागता प्रकरण मिटु नये, व सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे मिळवुन देऊन आपलं उदात्तीकरण करावं हा त्यातला स्वार्थ-परमार्थ असु शकेल. अदरवाईज जे झालं त्यात काहि खटकण्यासारखं काहि नाहि. या प्रकरणाची भारत-पाक व्यापारी संबंधांशी याचि तुलना करणे फारच हास्यास्पद आहे. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा, इतर व्यापार हे सर्व वाणिज्य, अर्थ, गृह, अगदी मिलट्री इंटलीजन्स आणि गुप्तहेर संघटनांच्या कॉर्डीनेशनचे उद्योग आहेत. आणि ते काय योग्य ते करतीलच. एखाद्या चित्रपटाच्या रिलीजशी त्याचा संबंध जोडणे म्हणजे फारच झालं.

In reply to by अर्धवटराव

सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे मिळवुन देऊन आपलं उदात्तीकरण करावं हा त्यातला स्वार्थ-परमार्थ असु शकेल. अदरवाईज जे झालं त्यात काहि खटकण्यासारखं काहि नाहि. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माहित नाही पण त्यातून आयजीच्या जीवावर बायजी उदारचा वहीम येतोय!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अर्धवटराव 24/10/2016 - 22:39
तसा तो आहेच. नुसतच इशारे वगैरे देऊन प्रकरण मिटवलं असतं तर ठाकरेंच्या हाति काहि लागलं नसतं. पक्षाला खंडणी मिळाली असती ( ति तशीही मिळाली असेल टेबलाखालुन) तर उरली-सुरली इज्जत गेली असती. नैसर्गीक आपत्ती, खेळ, पुतळे वगैरे करता पैसे घेऊन काहिच फायदा झाला नसता. सैन्याकरता पैसे घेऊन ठाकरे गंगेत बुडी मारायला गेले, पण ते प्रकरण अंगावर शेकलं दिसतय. खास करुन सैन्याधिकार्‍यांनी कानउघडणी केल्यामुळे काहि उत्तर पण देत येणार नाहि मनसेला. हे थोडं हात दाखवुन अवलक्षण झालेलं आहे मात्रं :)

गामा पैलवान 24/10/2016 - 22:28
श्रीगुरुजी,
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?
मलाही नेमका हाच प्रश्न पडला आहे. फडणविसांनी नक्की काय करायला पाहिजे? लांडे कारभार करायला सांगितलं होतं कोणी करण जोहरला? आ.न., -गा.पै.

संदीप डांगे 25/10/2016 - 00:32
मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम! 'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल! माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना! कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो! मनोरंजनाची हि पहिलीच वेळ नाही व शेवटचीही नसणार :) =))

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/10/2016 - 00:59
लैच करमणूक करायला लागलात की. भाजप = गुरूजी..? मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम! गुरूजींची पडेल बाजू कोण सांभाळत आहे..? इथे तुमच्या प्रतिसादाला विरोध नोंदवणार्‍या किती जणांनी गुरूजींना पाठिंबा दर्शवला आहे? नीट बघा जरा. 'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल! हा हा.. खूपच विनोदी प्रतिवाद. यावर शब्द खुंटले. मुद्द्यावरून लक्ष हटवणे...??? - गिव्ह अ ब्रेक..!!!!! माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना! असो. यावर पास. कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो! यासाठी आपण स्वतः शब्द जपून वापरायचे असतात. कोण कुणाच्या सहाय्याने कोणत्या विचारधारेची भलामण करत असते आणि कोण सरसकटीकरणाचे पिवळे चष्मे घालून प्रतिसादांचा रतीब पाडत असते हे न कळण्याइतके पब्लीक खुळे नसते. असो, तुमच्या प्रतिसादाला विरोध केला तर लगेचच सरसकट वैयक्तीक लेबले लाऊन आलेला प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले नसले तरी याही प्रतिसादाचा टोन पटला नाही हे खेदपूर्वक नमूद करतो.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 25/10/2016 - 01:33
माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल!
Joke of the day! इथं तुमच्या प्रतिसादांना अाक्षेप घेणाऱ्या किती जणांनी गुरुजींच्या युक्तिवादाला समर्थन दिलंय ते एकदा बघून घ्या आणि मग काय ते बोला. नेहमी भाजपच्या बाजूने लिहिणाऱ्या किती जणांनी इथे सरकारची बाजू घेतलीय ते नीट बघा. अगदी धागा काढणाऱ्या नाखुकाकांपासून सुरूवात करा.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 26/10/2016 - 16:52
तुमच्या भाषेबद्दल सर्वप्रथम आक्षेप मीच घेतला आहे. तरी वरील सर्व आक्षेप माझ्याबद्दल असतील तर ते आधी स्पष्ट करावे तर मी पुढील प्रतिसाद देतो. अन्यथा उगाच तुमच्याबद्द्दल गैरसमज करुन घेउन प्रतिसाद देण्यात हशील नाही.

कपिलमुनी 25/10/2016 - 00:54
इथे ५० जणांनी ५०० प्रतिसाद लिहीे तरी गुर्जीं काय ऐकणार नाहीत, फक्त लिहीणारांची चिकाटी या मुद्दयांवर टिकते का हे पहायचा आहे !

गामा पैलवान 25/10/2016 - 03:17
पैसाताई,
गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत.
हाहाहा ! ज्योक ऑफ द डेकेड !! ऑगस्ट २०१२ चे आझाद मैदानातले दंगे विसरलात की काय? त्यानंतर पोलिसांचा मोर्चा निघाला होता. त्यातलं हे चित्रं खास तुमच्यासाठी डकवतोय : http://static.dainiktribuneonline.com/wp-content/uploads/2012/08/PTI8_21_2012_000146B.jpg पोलीस मनसेवर का हात उचलणार नाहीत हे वरील चित्रातून कळतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पैसा 25/10/2016 - 10:59
राजकीय इच्छाशक्ती दाखवावी. गोव्यासारख्या लहान राज्याचे पोलीस टोल बूथ मोडणाऱ्या नारायण राणेंच्या सुपुत्राला झोडून काढून आत टाकू शकतात तर महाराष्ट्र पोलिसात नुसत्या लाठीने सशस्त्र अतिरेक्यांचा सामना करायची हिम्मत आहे. थोडा विश्वास दाखवा.

साहना 25/10/2016 - 05:56
१. सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी. देश स्वतंत्र असेल तर कायद्याने ज्या गोष्टीची मुभा दिली आहे ते करण्याची १००% मुभा सर्वानाच असून त्यांत बंदी इत्यादींची भाषा करणारे गुंड आहेत. मुलीची छेड कडणाऱ्याला काय करतात तेच त्यांचे करावे. २. निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत. न्यायालयाला क्रिकेट नियामक मंडळ चालवण्याचे फार महत्वाचे काम असताना कायद्याचे रक्षण वगैरे करण्याचे फुटकळ काम करण्यासाठी काम नसावा. त्या शिवाय ह्यावर कायदेशीर निर्णय येई पर्यंत फवाद खान ला नातवंडे होतील. ह्या शिवाय न्यायालयाच्या निवडायचे पालन होईल ह्याची काय शाश्वती ? गुंड गिरीची भीती असेल तर तुम्ही आपल्या मुलांना चित्रपट गृहांत पाठवाल का ? इतर ५६ विषय सोडून राज ठाकरेंनी "चित्रपट" हेच क्षेत्र गुंडगिरी दाखविण्यासाठी का वापरले ? कारण इथे "वेळेला" महत्व आहे. ३. महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी? इथे फक्त चित्रपटाच्या गल्ल्याचा आणि निर्मात्यांच्या फायद्याचा प्रश्न नाही. चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युशन मार्केटिंग साठी आधीपासूनच पैसे खर्च केलेला असतो. बहुतेक करून चित्रपटगृहांनी ऍडव्हान्स मध्ये प्रिंट्स आणि स्क्रिन्स बुक केलेल्या असतात. अनेक लोकांचे भवितव्याचा इथे प्रश्न आहे. करण जोहर चा चित्रपट लागला नाही तर पुढच्या वेळी त्याला ऍडव्हान्स डील्स बुक करणे मुश्किल होईल. ४. मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय? १००%. मुख्यमंत्र्यांचा निर्णय मूर्खपणाचा होता. २०% आमदार असणाऱ्या पक्षाने धमकी दिली असती तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाख घालून कायद्याचे रक्षण चित्रपटाला द्यायला पाहिजे होते. मनसेचे आमदार आहेत १. अश्या पक्षाची धमकी फार तर पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर हाताळली गेली पाहिजे होती. ५. आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे? खंडणीचा पैसे कुठे जातो ह्यावर काहीही अवलंबून राहत नाही. खंडणी ती खंडणी. ६. या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे. ह्या वादांत राज ठाकरे ह्यांच्या फायदा झाला आहे. फक्त १ आमदार असून सुद्धा आपण कोणी तरी मोठे नेते आहोत हे त्यांना दाखविण्याची संधी फडणवीसांनी विनाकारण उपलब्ध करून दिली आहे. आत रिपब्लिकन पक्ष, शेकाप, शिवसेना, AIIMB इत्यादी मंडळी सुद्धा त्यांच्या छाताडावर चढतील ह्यांत काहीही शंका नाही. कायदा हि सोयीस्कर आहे तेव्हांच अंबलबजावणी करण्याची गोष्ट नाही. उलट जेव्हा कायदा बजावण्यात धोका असतो तेव्हांच देशाच्या कायद्याची खरी कसोटी लागते. देवेंद्र ह्याच्या वागणुकीतून महाराष्ट्रांत कायदा बजावण्याची धमक नाही हेच स्पष्ट झाले आहे. इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दार वाढवून वसूल केले असते.

In reply to by साहना

राही 25/10/2016 - 10:38
"इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दर वाढवून वसूल केले असते." इथे असे काही झालेले नाही असे छातीठोकपणे सांगता येईल? सैनिक फण्डला काही रक्कम उघडपणे देऊन उरलेले निम्मे निम्मे वाटून घेतलेले नाहीत असे छातीठोकपणे सांगता येईल? अशा बातम्या विकीवर किंवा पेपरमध्ये येत नसतात. लोकांना दाट संशय आहे हे खरे.

In reply to by राही

मोदक 25/10/2016 - 10:45
या ठिकाणी भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा. आपणच आरोप करायचे आणि पुरावे नसल्याने समोरच्यालाच निर्दोषत्व सिद्ध करायला सांगायचे ही केजरीवाली पद्धत जुनी झाली. पत्रकारांना, सत्तेत नसलेल्यांना किंवा अगदी मराठी संस्थळावर आपल्या पक्षाचा अजेंडा रेटवणार्‍या खर्‍या खोट्या आयडींना हे सगळे करण्याबाबत काय काय मिळत असावेत याबाबत अनेकांना अनेक संशय आहेत. हे ही खरे.

In reply to by मोदक

राही 25/10/2016 - 11:00
एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे. आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतात. तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेच. आणि पक्षाचा अजेंडा संतप्त भक्तिभावाने कोण रेटते ते वेगळे लिहायला नको. आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे.. आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही.

In reply to by राही

मोदक 25/10/2016 - 13:41
एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे. आरोपाच्या पूर्वीची पायरी किंवा आरोप करण्याइतके पुरावे नाहीत पण धुरळा उडवायचा आहे म्हणून काढलेली पळवाट असे काही आहे का..? आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतात पैशांच्या मोहाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे माहिती होते पण असे सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे वाटले नव्हते. असो. माध्यमे संशय व्यक्त करण्यासाठी नसतात तर माध्यमांचे काम "निरपेक्षपणे विचार मांडणे आणि कोणत्याही घडामोडींवर संतुलीत भुमीकेने व्यक्त होणे" असे असावे. अर्थात हे मी माझ्या अत्यल्प अनुभवावरून आणि कोणत्याही विचारधारेच्या दावणीला बुद्धी न बांधता बोलत आहे. तुमचे विचार वेगळे असतील तर मान्यच आहे. तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेच तुम्ही / आम्ही..?? मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाहीये हो, तसेच कोणत्याही प्रकरणाचे पुरावे माझ्यापर्यंत गुप्तपणे पोहोचण्याची सुतराम शक्यता नसल्याने मी कधीही कोणताही संशय व्यक्त करत नाही. आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे.. या वाक्याचा संदर्भ कळाला नाही. आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. मी आव्हान दिले आहे हे शोधून दाखवा बरं. तुम्ही खुलेपणाने संशय व्यक्त करत आहात म्हणजे तुमच्याकडे काहीतरी खास पुरावे असावेत म्हणून मी म्हटले आहे की "भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा" सांगोवांगीच्या गप्पा असतील तर तसे सांगा.

In reply to by राही

बोका-ए-आझम 25/10/2016 - 13:46
डाव्या लोकांचे जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप असतात, माहित आहे ना तुम्हाला? एकदा डावी विचारसरणी म्हटल्यावर दुर्लक्ष करावं.

In reply to by बोका-ए-आझम

मोदक 25/10/2016 - 13:58
सल्ल्याबद्दल धन्यवाद बोकाशेठ. याबाबत मी क्लिंटन ला आदर्श मानतो, डावे दिसले की त्यांच्या विचारांमधील दांभीकता उघड पाडण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्याकडे पळवाटा तयार असतातच पण "इथे विरोध होतो आहे" इतकी साधी गोष्टही त्यांना पळ काढायला पुरेशी असते. दुर्लक्ष केले की "समोरच्याने उत्तर दिले नाही म्हणजे माझेच बरोबर" आणि उत्तर दिले की "बघा बघा किती असहिष्णुता वाढली आहे किंवा "अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी" वगैरे अपेक्षित रूळावरून गाडी जाईलच त्यामुळे आजिबात दुर्लक्ष करू नये.

In reply to by मोदक

राही 25/10/2016 - 17:40
पळ वगैरे काढण्याचा प्रश्नच नाही. पण तेच तेच मुद्दे उगाळले जाऊ लागले आणि तर्कहीन आर्ग्युमेंट होऊ लागले की प्रतिसाद लिहिण्याचाही कंटाळा येतो. मग गप्प राहावेसे वाटते इतकेच. मला इथे काही युद्धबिद्ध खेळण्यासाठी यायचे नसते. म्हणून तर कमीत कमी वावर असतो. पैशाच्या लोभाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे (तुम्हाला/सगळ्यांना) माहीत होते पण इथे (माझ्या प्रतिसादात) सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे (तुम्हाला) वाटले नव्हते, हा तुम्ही काढलेला अर्थ वा तुम्ही व्यक्त केलेले मत माझ्या प्रतिसादातल्या कोणत्या वाक्यावरून होऊ शकते? आणि या माझ्या प्रतिसादात तुम्हाला दांभिकता कुठे दिसली? 'बघा बघा किती असहिष्णुता....' वगैरे टाइपचे प्रतिसाद मी कधी दिले? आणि 'डावे दिसले की त्यांच्या विचारातली दांभिकता उघड पाडण्याचा प्रयत्न करायचा' हा तुमचा अजेंडा असेल तर (असू शकतो, माझे त्याबाबत काहीही मत नाही) तुमचा वरील प्रतिसाद त्यानुसार नाही कारण त्यातून कोणतीही दांभिकता उघड झालेली नाही. म्हणून टंकाळा येतो.

इतर ५६ विषय सोडून राज ठाकरेंनी "चित्रपट" हेच क्षेत्र गुंडगिरी दाखविण्यासाठी का वापरले ? कारण इथे "वेळेला" महत्व आहे.
मुद्दा समजून घ्या. हे आंदोलन राज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले आहे. मला वाटतं ते त्यांच्याशी संबंधितच क्षेत्र असावं.
मनसेचे आमदार आहेत १. अश्या पक्षाची धमकी फार तर पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर हाताळली गेली पाहिजे होती
आमदार असणे हेच एखाद्या पक्षाच्या ताकदीचं मोजमाप असू शकतं काय? आता या घडीला तरी रस्त्यावर सगळ्यात जास्त पाठिंबा असलेले नेते राज ठाकरे नाहीयेत का? मला असं वाटतंय कि तथाकथित खंडणीचा पैसा सैनिक कल्याण निधीला नको हे मुळी दुखणंच नसून मनसे हे दुखणं आहे. अवांतर : सध्या सैनिक कल्याण निधीला जात असलेला सगळा पैसा खातरजमा करून घेतला जात असेल का (म्हणजे तो भ्रष्टाचारातून आलेला वगैरे नाही असा)? तो पैसा सैनिक कल्याण निधीत जातोय यापेक्षा खरंतर दुसरा आनंद नाही.
इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दार वाढवून वसूल केले असते.
व्वा! हे लॉजिक कशावरून बुआ? कि उगाच काहींच्या काही! म्हणून म्हणतो, दुखणं हे खंडणी नाही, दुखणं हे मनसे आहे!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

साहना 25/10/2016 - 11:43
> मुद्दा समजून घ्या. हे आंदोलन राज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले आहे. मला वाटतं ते त्यांच्याशी संबंधितच क्षेत्र असावं. 1 पक्ष असलेल्या पक्षाची कसली चित्रपट सेना ? आणि हिंसा सोडून इतर कुठली नीती ह्यांची होती ? होती हिम्मत तर बहिष्कार टाकायचा. > आमदार असणे हेच एखाद्या पक्षाच्या ताकदीचं मोजमाप असू शकतं काय? १००% होय. आणखीन काय माप आहे ? गुंडगिरीची प्रवृत्ती ? > सध्या सैनिक कल्याण निधीला जात असलेला सगळा पैसा खातरजमा करून घेतला जात असेल का (म्हणजे तो भ्रष्टाचारातून आलेला वगैरे नाही असा)? तो पैसा सैनिक कल्याण निधीत जातोय यापेक्षा खरंतर दुसरा आनंद नाही. खंडणीचा पैसा सैनिकांना द्या नाहीतर आणखीन कोणाला द्या. चोरी ती चोरी आहे. तुमची मुले किडनॅप करून मिळणार पैसे सैनिक निधीला दिला तर चालेल काय ? > व्वा! हे लॉजिक कशावरून बुआ? कि उगाच काहींच्या काही! म्हणून म्हणतो, दुखणं हे खंडणी नाही, दुखणं हे मनसे आहे! १ आमदार असलेल्या पक्षाचे काहीही दुखणे नाही. देवेंद्र फडणवीस सारख्या मुख्यमंत्र्याने ज्याच्या कडून अनेक अपेक्षा होत्या त्यानी फुटकळ गुंडा पुढे सपशेल शरणागती पत्करून दलाली करावी हे पटले नाही. मूळ दुखणे हेच आहे. मनसे किंवा राज ठाकरे माझ्या खिजगणतीत सुद्धा नाही.

In reply to by साहना

>>1 पक्ष असलेल्या पक्षाची कसली चित्रपट सेना ? आणि हिंसा सोडून इतर कुठली नीती ह्यांची होती ? होती हिम्मत तर बहिष्कार टाकायचा. परत तेच, फक्त द्वेष. माझ्या माहितीनुसार मनसे चित्रपट सेना हि सभासदांच्या संख्येनुसार सर्वात मोठी चित्रपट संघटना आहे! >>१००% होय. आणखीन काय माप आहे ? गुंडगिरीची प्रवृत्ती ? फक्त तुम्ही म्हणाल म्हणून सगळे खरे असे नसते! गुंडगिरीची प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय? >>खंडणीचा पैसा सैनिकांना द्या नाहीतर आणखीन कोणाला द्या. चोरी ती चोरी आहे. तुमची मुले किडनॅप करून मिळणार पैसे सैनिक निधीला दिला तर चालेल काय ? हि तुलना योग्य वाटते तुम्हाला? मनसे ने तसे केले तर तो नक्कीच गुन्हा आहे आणि कोर्ट आहे त्यासाठी! तुमचा द्वेष व्यक्त करण्यासाठीचा हा कपोलकल्पित मुद्दा लागू होत नाही इथे. >>मनसे किंवा राज ठाकरे माझ्या खिजगणतीत सुद्धा नाही. हाहाहा! परत परत फुटकळ गुंड म्हणालात तरी तुम्ही परिस्थिती जाणतच असाल असे गृहीत धरतो! तुम्ही हा राग व्यक्त करत आहात कारण फक्त तुमचं मनसे बद्दलचं फुटकळ असं मत आणि मुख्यमंत्रांचं परिस्थितीचा आढावा घेऊन महत्व देण्याचं मत जुळत नाही. खरंतर तुमच्या या वाक्यावरूनच कळतंय कि तुमच्या खिजगणतीत कोण आहे आणि कोण नाही.

सुबोध खरे 25/10/2016 - 10:48
पाकिस्तानी कलाकारांना येथे काम करू द्यावे हे तात्विक दृष्ट्या बरोबर असले तरीही पाकिस्तानी कलाकारांच्या वाचून यांचे का आणि काय अडते? इतर परदेशी कलाकारांबाबत भारतीय नागरिकांची आत्यंतिक भूमिका नाही तर "फक्त पाकिस्तानी" कलाकारांबाबत आहे याचे कारण प्रत्येकाला माहीत आहे. हे "बाहेरून" येणारा पैसे बोलतो आणि "फिल्मी" लोकांचा पैसा हाच देव आहे. जसे जिहादी धर्मासाठी काहीही करायला तयार असतात तसेच हे फिल्मी लोक पैशासाठी काहीही करायला तयार होतात. मुळात मी सिनेमे कमीच पाहतो परंतु सलमान खान आणि शाहरुख खान यांचे "कर्तृत्व" पाहिल्यावर मी आणि माझे कुटुंब यांनी त्यांच्या सिनेमावर पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे. पाकिस्तानी कलाकारांबाबत प्रश्नच येत नाही. मी याच कारणासाठी "हिना" सुद्धा पहिला नाही. यांचे सिनेमे किंवा पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे पाहिले नाही तर काही जीव जात नाही. प्रत्येक गोष्ट कायदेशीर असली तरीही नैतिक दृष्ट्या बरोबर असतेच असे नाही. सरकार कायद्यावर बोट ठेवून चालते त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना प्रवेश नाही हे म्हणणे त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यामुळे कठीण जात असावे. ( मला नक्की माहिती नाही हे मी आत्ताच नमूद करू इच्छितो). अगोदर झाले ते झाले. परंतु आपले इतके सैनिक( आणि आपले सीमेलगतच्या नागरिक आणि त्यांची गुरे/ पाळीव प्राणी) पाकिस्तान कडून मारले गेल्यावर जर श्री शाम बेनेगल याना बेशरम पणे परत पाकिस्तानी कलाकारांना घ्यावेसे वाटत असेल तर देशद्रोही म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यासाठी मी पाठिंबाच देईन. माझी देशभक्तीची व्याख्या चूक असेल एकांगी असेल तरीही ती कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत आहे.

सुज्ञ 25/10/2016 - 11:51
मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे संडास झ्हाली आहे . त्यामानाने टीवटीव हा सौम्यच शब्द म्हणावा लागेल . असेच आवांतर : आपण कुठल्या पार्टी ला समर्थन करतो त्यावरून आपली वैचारिक पात्रता कळते काय ?

In reply to by सुज्ञ

@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय, इथे तुमचा निरक्षीर विवेक दिसलेला नाही असे सखेद आश्चर्याने नमूद करावे वाटते आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गणामास्तर 25/10/2016 - 12:26
बापू थोडा वेळ तरी द्यायचा कि. पाच सात मिनिटांत लगेचं सगळे प्रतिक्रिया देतील असे कसे होईल?

In reply to by मोदक

अरेच्या! असा वेळ देतात होय! पूर्वानुभवावरून तरी तसे वाटले नव्हते, डांगेंच्याच एका प्रतिसादाला आम्ही ५ मिनिटात रिप्लाय दिला नाही म्हणून आम्हाला मानसिक क्लेश होऊस्तोवर शेलकी विशेषणे बहाल केली गेली होती, ह्याच मिपावर, खास त्या कामाकरता एक डू आयडी डेप्युट करून, त्यावरून आमचा ग्रह झाला की बोवा हीच जनरीत असेल, असो तशी जनरीत नसल्यास आम्ही समस्तांची जाहीर माफी मागतो अन "सम इक्वल्स आर मोर इक्वल्स" इतकेच म्हणतो, वरती आमचे लेखन दैवत बोक्याभाऊ , किंवा इतर भद्रजन "आम्ही इतर पक्षीय भक्त सहन करतो वगैरे" बोलले आहेत तेव्हा "तुम्ही सरळ ऐसी अक्षरेवर जा" वगैरे कोण कोणाला बोलले होते त्याचा गोंधळ उडतो बघा बाकी काही नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मोदक 25/10/2016 - 13:51
बापू, नक्की मुद्दा काय आहे..? मी माझ्यापुरते बोलतो. मी जसा डांगेंचा विरोध केला आहे तसाच गुरूजींचाही विरोध केला आहे. आणि असा प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा विरोध करावा अशी अपेक्षा असेल तर ते प्रॅक्टिकली शक्य नाही. त्यासाठी "डुआयडींची पिलावळ किंवा नैतीकतेचा कंपास हरवून खुशाल आरोप करणारे" आणि "डांगे व श्रीगुरूजी" यांना एकाच रांगेत बसवावे लागेल. बाकी प्रतिसादाबद्दल "सम इक्वल्स आर मोर इक्वल्स" हे इथे कसे लागू आहे सांगा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मोदक 25/10/2016 - 13:18
@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय बापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का? नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..? सुज्ञ यांच्या कमेंटबद्दल - मुळात या धाग्यावर मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटलेले मला आढळलेले नाहीये. त्यामुळे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे माहिती नाही. जर त्यांना मिपावर कुठेतरी म्हटले गेलेले अपेक्षित असेल तर त्याबद्दल इतकेच म्हणू शकतो की इथे साक्षात शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या गेल्या आहेत त्यांच्या कामगिरीवर त्यांनी अफझलखानाला मारलेच नाही असेही सर्टिफिकेट देवून खोटे ठरवले गेले आहे (हे प्रतिसाद आता उडाले आहेत) मग मुख्यमंत्री किस झाड की पत्ती..? मी जसे डांगेंच्या प्रतिसादाला विरोध दर्शवला तसा गुरूजींच्या अनेक प्रतिसादाला विरोध दर्शवला आहे. अर्थात गुरूजींनी स्वत:च्या प्रतिसादांना नेहमी स्वतः प्रतिवाद केला आहे, चुकीचा असला तरी. माझ्या मते डांगे या मुद्द्यापासून कोसो दूर आहेत कारण त्यांच्यावर शेकलेल्या कांही प्रकरणामध्ये ते स्वत: कमी आणि त्यांच्या वतीने तुम्हीच लगेच प्रतिवाद करता असेही दिसून आले आहे. आता हे सगळे सांगावयाचे काम जर संपादक मंडळाचे असेल आणि त्याबाबत आमच्यासारख्या सामान्य सदस्याने बोलू नये असे कोणाचे मत असले तर तसे सांगा.

In reply to by मोदक

डिस्क्लेमर :- डांगेंची माझी मैत्री जुळणे, किंवा मी त्यांच्यावतीने प्रतिवाद करणे, आम्ही एकाच गावचे (नियतीच्या कृपेने) असणे ह्याचा कोणी अर्थाअर्थी संबंध जोडत असल्यास खाली लिहिलेले सगळेच तुम्हाला आवडेल असे नाही, आपापल्या जबाबदारीवर वाचा बापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का? हे सुस्पष्ट नाहीये का? असला घाण श्लेष केल्याबद्दलच मागे एक डु आयडी बॅन झाल्याचे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..? तुम्ही खास मित्र म्हणून ही एक अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतोय असे समजा, बोक्याभाऊला करत नाही कारण त्यांनी आधीच निसंदिग्धपणे ते "काय लिहिले पेक्षा कोण लिहितो आहे" हे पाहत असल्याचे जाहीर केले आहेच. तर निरक्षीर म्हणजे फक्त गुर्जीच्या मुद्द्याला विरोध करणे होते का? माझ्यामते नाही, थेट मुद्द्याला हात घालतो, मोगा काय चीज आहे हे सगळ्यांना माहिती आहे,मोगाच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत बसले तर आपले मानसिक स्वास्थ्य हरपायची भीतीच जास्त, 90% मोगांचे रिप्लाय हे टाकाऊ असतात, पण उरलेल्या 10%चे काय ?? त्यावर किमान विचार करणे म्हणजे माझ्यालेखी निरक्षीरविवेक, मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो, तेच गुर्जी काय करतात??, मागे एका प्रतिसादावर चक्क "ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे अश्या विक्षिप्त माणसाच्या बोलण्याला काय किंमत द्यावी" वगैरे ते बोलले आहेत, अरे तुमच्यात इतका दम आहे तर मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करा की राव, का म्हणून आपली पातळी सोडावी??, आता मी थोडे माझे सांगतो, मोगाच्या प्रत्येक कॉमेंटवर म्हणजे आगाऊ कॉमेंटवर मी का व्यक्त होत नाही?? कारण मोगाला मूर्ख बडबड केली की सुज्ञ मिपाकर ताबडतोब झोडपतातच !, गुरुजींचे भाजप भलामण करणारे प्रतिसाद आजकाल कैच्याकै असतात, अन तुम्ही त्यांचा विरोध करताच हे तुम्हीच वर बोलला आहात, अशात जर मोगाने काही राजकीय प्रश्न विचारले तर त्याला कोण लक्षात घेतो का? किमान त्या प्रश्नांची उत्तरे तरी मागतो का? मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा, की दादा, मग मान्य करता येईल निरक्षीर तुमचाही

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुज्ञ 25/10/2016 - 14:37
मोदक भाऊ, बोक्याभाऊ, मृत्युंजय भाऊ ना का त्रास देता . श्लेष करणे चुकीचे असे मलाच म्हणा की . होय ते चुकीचेच आहे . मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे मजल गेली आहे असे वाचा आणि मुद्यावर विचार करा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मोदक 25/10/2016 - 16:42
सुज्ञ यांनी मान्य केले असेल तर ठीक अन्यथा "संडास" हा शब्द संदीप डांगेंच्य नावावरचा श्लेष आहे हे पटणे थोडे अवघड आहे. नीरक्षीरविवेकाची गाडी जर विखारी डुआयडी या स्टेशनाला लागत असेल तर माझा पास. कितीही लॉजीकल लिहून वाद घातला तरी एका क्षणानंतर ती पिलावळ मूळपदावर येते असा स्वानुभव असल्याने अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणे योग्य. असे मी माझ्यापुरते ठरवले आहे. मोगाखान आणि डांगे ही तुलना पटली नाही. डांगे बहुतेकदा लॉजीकल लिहिण्यचा प्रयत्न करतात असे मी येथेच एक दोन ठिकाणी लिहिलेले सापडेल. मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? अनेकदा केली आहे. दाखवून देऊ का..? अर्थात नक्की कोणत्या आयडीने केली आहे आणि तो आयडी मोगाखानचा आहे का? हा वादाचा मुद्दा आहे आणि रोज आयडी बदलण्याची वेळ आल्याने असे होणारच. तरीही त्याचे मोदींबद्दलचे विचार शोधून बघा, तुम्हाला अपेक्षित असलेल्या कमेंट्स पेक्षाही विखारी कमेंट्स मिळतील. मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा बापू, या प्रकरणाची मला कल्पना नाही. रोज नवीन नवीन कपडे घालून इतके आयडी अवतरतात. किती जणांचा ट्रॅक ठेवणार..? आणि असा किती जणांना विरोध दर्शवणार..? जेथे शक्य आहे तेथे विरोध दर्शवला आहे आणि जेथे विरोध दाखवला नाही तेथे मी (विरोध दाखवला नाही म्हणून) त्या विचारांशी सपशेल सहमत आहे असेही नक्कीच नाही. मी विरोध असेल तर स्पष्ट आणि सहमती असेल तर तीही सुस्पष्टरीत्या दाखवतो. प्रत्येक धाग्यावर प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देणे शक्य होत नाही ही माझी मर्यादा समजा. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी तुम्हाला मोगा समर्थक म्हटलेले मला आठवत नाही आणि तसे घडेल याची शक्यता नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 25/10/2016 - 23:49
तुम्ही खास मित्र म्हणून ही एक अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतोय असे समजा, बोक्याभाऊला करत नाही कारण त्यांनी आधीच निसंदिग्धपणे ते "काय लिहिले पेक्षा कोण लिहितो आहे" हे पाहत असल्याचे जाहीर केले आहेच. तर निरक्षीर म्हणजे फक्त गुर्जीच्या मुद्द्याला विरोध करणे होते का? माझ्यामते नाही, थेट मुद्द्याला हात घालतो, मोगा काय चीज आहे हे सगळ्यांना माहिती आहे,मोगाच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत बसले तर आपले मानसिक स्वास्थ्य हरपायची भीतीच जास्त, 90% मोगांचे रिप्लाय हे टाकाऊ असतात, पण उरलेल्या 10%चे काय ?? त्यावर किमान विचार करणे म्हणजे माझ्यालेखी निरक्षीरविवेक, मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो, तेच गुर्जी काय करतात??, मागे एका प्रतिसादावर चक्क "ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे अश्या विक्षिप्त माणसाच्या बोलण्याला काय किंमत द्यावी" वगैरे ते बोलले आहेत, अरे तुमच्यात इतका दम आहे तर मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करा की राव, का म्हणून आपली पातळी सोडावी??, आता मी थोडे माझे सांगतो, मोगाच्या प्रत्येक कॉमेंटवर म्हणजे आगाऊ कॉमेंटवर मी का व्यक्त होत नाही?? कारण मोगाला मूर्ख बडबड केली की सुज्ञ मिपाकर ताबडतोब झोडपतातच !, गुरुजींचे भाजप भलामण करणारे प्रतिसाद आजकाल कैच्याकै असतात, अन तुम्ही त्यांचा विरोध करताच हे तुम्हीच वर बोलला आहात, अशात जर मोगाने काही राजकीय प्रश्न विचारले तर त्याला कोण लक्षात घेतो का? किमान त्या प्रश्नांची उत्तरे तरी मागतो का? मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा, की दादा, मग मान्य करता येईल निरक्षीर तुमचाही
मुद्द्याला मुद्द्द्याने प्रतिवाद करावा असे आपले वरील वाक्य वाचून अंमळ आश्चर्य वाटले. मला भाजपकडून पैसे मिळतात अशा अर्थाचे आरोप तुम्हीच माझ्यावर दोन वेळा केले आहेत. पहिल्या आरोपाला मी काहीच उत्तर न देता फक्त "अवघड आहे" एवढाच प्रतिसाद दिल्यानंतर, "सॉरी. गंमत केली." अशा अर्थाचे लिहून तुम्ही तो विषय संपविला होता. या धाग्यात पुन्हा एकदा तोच आरोप आहे. मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करण्याचे हे उदाहरण समजावे का? याच मोगाच्या चंपाबाई नामक अवतारात तुम्ही चंपाबाई या आयडीबद्दलही असेच असभ्य, वैयक्तिक लिहिले होते. त्यावर एकाने आक्षेप घेतल्यावर, "मला माझ्यावर नियंत्रण ठेवायला हवे. काही वैयक्तिक कारणाने माझा ताबा जातो." असा तुमचा प्रतिसाद होता. वरील उदाहरणात आपण पातळी सोडली नाही का? याच मोगाने आपल्या एका पूर्वातरात स्वतःच एक धागा काढून आपली बायको अनेक वर्षे आपल्याला सोडून माहेरी रहात होती असे लिहिले होते. आपले सासूसासरे, मेव्ह्णे, मेव्हणी यांच्याविषयी त्याने अत्यंत गलिच्छ भाषा वापरली होती. "आपले स्वतःचे स्पर्म संपले म्हणून सासरा मला पोरं काढायला सांगतोय" अशा अर्थाची वाक्ये त्यात होती. इतका गलिच्छ धागा संपादकांनी लगेच उडवून टाकला होता. याच मोगाने आपल्या असंख्य अवतारांपैकी अनेक अवतारांमध्ये मोदी व त्यांची बायको, वाजपेयींचे ब्रह्मचर्य यावर अत्यंत असभ्य प्रतिसाद दिले आहेत. "मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो," असे आपण आज तावातावाने सांगत आहात. परंतु मोगाचे मागील असंख्य असभ्य प्रतिसाद आपण सोयिस्कररित्या विसरलेला दिसता. आता नीलकांतभाऊंना सांगून आपण आपला आयडी सरेंडर करणार का? मी मोगाच्या जवळपास सर्व प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. अगदी क्वचितच त्याच्या प्रतिसादाला मला उत्तर द्यावे लागते. मी मोगावर जी काँमेट केली ती नक्की कोणत्या धाग्यात केली हे आता आठवत नाही. परंतु त्या काँमेंटमागे काहीतरी असभ्य संदर्भ होता व तो कोणता होता ते आठवत नाही. मोगाच्या १०% प्रतिसादांवर विचार करणे म्हणजे तुमच्या लेखी नीरक्षीरविवेक असेल. तुम्हाला त्याच्या १०% प्रतिसादांचे कौतुक असेल, पण मोगाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे हा माझ्या लेखी नीरक्षीरविवेक आहे. असो. असभ्य, वैयक्तिक प्रतिसादांचं म्हणाल तर माझ्याबाबतीत अनेकांनी, अनेकवेळा वैयक्तिक हल्ले केलेले आहेत (तुमच्यासहीत). एका ऋषीतुल्य सदस्याने लागोपाठ १०-१२ प्रतिसादात माझा "खोटारडे" असा उल्लेख करून मला मूळव्याध झाली आहे, मला कावीळ झाली आहे असे शोध लावले होते. एका उंदीरमामांनी तर मी ऑफिसमधील नेट फुकट वापरतो व मिपावर मी लिहिलेल्या प्रत्येक प्रतिसादाला, प्रतिसादातील प्रत्येक परिच्छेदाला, परिच्छेदातील प्रत्येक वाक्याला व वाक्यातील प्रत्येक शब्दाला मला भाजपकडून पैसे मिळतात असे बिनदिक्क्त ठोकून दिले होते. ऑफिसमधील नेट फुकट वापरून मी भाजपची भलामण करून पैसे कमावतो असा त्यांचा शोध होता. मी कोण आहे, मी काय करतो इ. ची कणभरदेखील माहिती नसताना बिनदिक्कतपणे असा शोध लावणे कौतुकास्पद होते. अजून एका भटजीबुवांनी तर अनेक प्रतिसादातून माझा एकेरी उल्लेख करून माझी भ्याड, कपटी, पाताळयंत्री, खोटारडा, टनाटनी असे शब्द वापरून माझी संभावना केली होती. एका अभ्यासू समजल्या जाणार्‍या सदस्याने एका प्रतिसादात "मला भरपूर रिकामा वेळ असतो, म्हणून मी वेगवेगळ्या लिंका देतो" असा शोध लावला होता. एनीवे, सवयीने मी अशा वैयक्तिक हल्ल्यांना फार गांभिर्याने न घेता त्याकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष करण्यास शिकलो आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला नाही मोदकभाऊला होता, तरी तुमचा उल्लेख असल्यामुळे तुम्ही बोललात हे रास्तच आहे. याच मोगाच्या चंपाबाई नामक अवतारात तुम्ही चंपाबाई या आयडीबद्दलही असेच असभ्य, वैयक्तिक लिहिले होते. त्यावर एकाने आक्षेप घेतल्यावर, "मला माझ्यावर नियंत्रण ठेवायला हवे. काही वैयक्तिक कारणाने माझा ताबा जातो." असा तुमचा प्रतिसाद होता. होय, चूक केली तरी ती कबुल करायचा दम असावा लागतो गुर्जी, सुदैवाने तो माझ्यात आजही शाबूत आहे :), शिवाय ती एक चूक "एक्सप्लॉइट" करायचा चुकूनही प्रयत्न करू नका, कारण स्वतःचा मुद्दा चूक असला तरी कबूल करायची दानत तुमच्यात नाहीये, हे स्पष्ट आहे दुसरे म्हणजे, वरती तुम्ही म्हणता आहात की मी दोन वेळा तुम्हाला पेड प्रचारक म्हणालो, खाली तुम्ही इतर आयडीजने सुद्धा तेच म्हणलेले सांगताय, मी एकटा बोललो असतो तर कदाचित मलाच भ्रम झाला असे म्हणता आले असते, पण ज्या नेटाने तुम्ही भाजपचे मुद्दे तर्कहीनपणे अक्षरशः रेटत असता ते इतर सदस्यांना ही जाणवले आहे हे मी म्हणत नाहीये तर तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट होतंय तिसरे म्हणजे, आता बुआ बाप्या आयडी सोडणार हा आनंद तुम्हाला झाला असल्यास तो जरा कह्यात ठेवा अन माझे शब्द परत एकदा वाचा, मी म्हणले आहे मोगाने जीवशास्त्रीय कॉमेंट वगैरे.... त्यावर तुम्ही अटलजी वगैरे बोलताय! सिरियसली? मोगाने "तुमच्या" वैयक्तिक आयुष्याबद्दल काय बोललंय ते सांगा, कारण मोगा विरुद्ध तुम्हीही एकदा नाही तर दोनचारदा वैयक्तिक बोलले आहात, त्याच्या बायकोवर टिप्पणी केली तेव्हा "असे काहीतरी कारण असावे/होते" वगैरे गुळमुळीत बोलताय तुम्ही,म्हणजे तुम्ही बोललात त्याला पार्श्वभूमी होती असं आम्ही समजायचं ? अन आम्ही एकदा तोल जाऊन बोललो तर तुम्ही त्याचा वापर करून घेणार ? कुठल्या कायद्याने हो महाराज? बाकी मोगा अटलजी ते शिवाजी महाराज सगळ्यांवर बोलला आहे, त्या करता त्याला लागेल तितके झोडा, किंबहुना तुम्ही जे चवीचवीने "तुम्ही सुद्धा मोगाला बोलला होतात" म्हणताय न तिथे सुद्धा त्याला मी त्याने आर्मी वर काही बोलला म्हणूनच झोडले होते अन मला ती कॉमेंट नीट आठवते, मी मोगाला "तुम्ही मेलात तरी फरक पडत नाही" म्हणले होते, वैयक्तिक आयुष्य काढून पर्यायाने त्याच्या घरच्यांना मध्ये ओढले नव्हते, कोण कोण सोईस्कर दृष्ट्या काय काय विसरले आहे हे स्पष्ट आहेच म्हणा आता मला.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वरील तीनचार प्रतिसाद अतिशय अवांतर आणि विषयाला सोडून/वैयक्तिक आहेत असं वाटत नाहीये का? संदिपजी, सोन्याबापू, श्रीगुरुजी, मोदकभाऊ घ्या सांभाळून झालं!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 26/10/2016 - 13:38
होय, चूक केली तरी ती कबुल करायचा दम असावा लागतो गुर्जी, सुदैवाने तो माझ्यात आजही शाबूत आहे :), शिवाय ती एक चूक "एक्सप्लॉइट" करायचा चुकूनही प्रयत्न करू नका, कारण स्वतःचा मुद्दा चूक असला तरी कबूल करायची दानत तुमच्यात नाहीये, हे स्पष्ट आहे
तुमची दानत, तुमचा दम तुम्हालाच लखलाभ होवो. मला तुमची दानत, दम दाखविण्याची गरज नाही.
दुसरे म्हणजे, वरती तुम्ही म्हणता आहात की मी दोन वेळा तुम्हाला पेड प्रचारक म्हणालो, खाली तुम्ही इतर आयडीजने सुद्धा तेच म्हणलेले सांगताय, मी एकटा बोललो असतो तर कदाचित मलाच भ्रम झाला असे म्हणता आले असते, पण ज्या नेटाने तुम्ही भाजपचे मुद्दे तर्कहीनपणे अक्षरशः रेटत असता ते इतर सदस्यांना ही जाणवले आहे हे मी म्हणत नाहीये तर तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट होतंय
म्हणजे तुम्हाला भ्रम झालेला नसून तुमची माझ्याबद्दल खात्री झालेली दिसतेय. माझ्याबद्दल कणभरही माहिती नसताना आपले भ्रम हेच अंतिम सत्य आहे अशा समजूत करून घेण्यात व त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यात नक्कीच "दम" असावा लागतो.
तिसरे म्हणजे, आता बुआ बाप्या आयडी सोडणार हा आनंद तुम्हाला झाला असल्यास तो जरा कह्यात ठेवा अन माझे शब्द परत एकदा वाचा,
तुम्ही राहिलात किंवा गेलात मला शष्प फरक पडत नाही. तुम्ही असल्याचे आनंद किंवा दु:ख मला नसल्याने तुम्ही गेल्याने मला दु:ख किंवा आनंद होण्याची सुतराम शक्यता नाही. मी नीलकांतभाऊंना सांगून आयडी सरेंडर करेन हे तुमचेच शब्द होते.
मी म्हणले आहे मोगाने जीवशास्त्रीय कॉमेंट वगैरे.... त्यावर तुम्ही अटलजी वगैरे बोलताय! सिरियसली? मोगाने "तुमच्या" वैयक्तिक आयुष्याबद्दल काय बोललंय ते सांगा, कारण मोगा विरुद्ध तुम्हीही एकदा नाही तर दोनचारदा वैयक्तिक बोलले आहात, त्याच्या बायकोवर टिप्पणी केली तेव्हा "असे काहीतरी कारण असावे/होते" वगैरे गुळमुळीत बोलताय तुम्ही,म्हणजे तुम्ही बोललात त्याला पार्श्वभूमी होती असं आम्ही समजायचं ? अन आम्ही एकदा तोल जाऊन बोललो तर तुम्ही त्याचा वापर करून घेणार ? कुठल्या कायद्याने हो महाराज? बाकी मोगा अटलजी ते शिवाजी महाराज सगळ्यांवर बोलला आहे, त्या करता त्याला लागेल तितके झोडा, किंबहुना तुम्ही जे चवीचवीने "तुम्ही सुद्धा मोगाला बोलला होतात" म्हणताय न तिथे सुद्धा त्याला मी त्याने आर्मी वर काही बोलला म्हणूनच झोडले होते अन मला ती कॉमेंट नीट आठवते, मी मोगाला "तुम्ही मेलात तरी फरक पडत नाही" म्हणले होते, वैयक्तिक आयुष्य काढून पर्यायाने त्याच्या घरच्यांना मध्ये ओढले नव्हते, कोण कोण सोईस्कर दृष्ट्या काय काय विसरले आहे हे स्पष्ट आहेच म्हणा आता मला.
म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले तरच मी लिहायचे, पण इतर सार्वजनिक व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही लिहिले किंवा माझ्या धर्मातील माझ्या श्रद्धास्थानांवर किंवा इतरांवर वाईटसाईट लिहिले तरी ते वैध अशी तुमची मोजपट्टी दिसते. आपण एकदा तोल जाऊन बोललो असे काहीतरी स्वतःचे समर्थन करताय. दुसर्‍या एकाने लिहिलेल्या "संडास" या शब्दाचा संबंध तुम्ही संदीप डांगेंशी जोडून राग व्यक्त केला तो कशासाठी? तो आयडी काही तुमच्याबद्दल बोलत नव्हता. आणि आपण स्वतःच चंपाबाई या आयडीचा "चंपी" असा एकेरी उल्लेख केला होता याचे सोयिस्कर विस्मरण झालेलं दिसतंय. माझ्याविरूद्ध एकदा सोडून दोन वेळा वैयक्तिक कामेंट केलीत. काही दिवसांपूर्वीच अजून एका सदस्याला आपण धमकीवजा इशारा दिलेला आहे. तुमचा तोल गेल्याची बघताबघता ४ उदाहरणे सापडली. थोडी खोदाखोद केली अजून बरीच उदाहरणे निघतील. आणि याला तुम्ही फक्त एकदा तोल जाऊन बोललो असे म्हणून समर्थन करता! बाकी कायद्याचं म्हणाल तर तुम्ही ज्या कायद्याने मोगाला किंवा मला किंवा इतरांना झोडपता तोच कायदा मी वापरतो असे म्हणता येईल.
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला. पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय?

ताज्या घडामोडी - १

श्रीगुरुजी ·

श्रीगुरुजी 14/07/2016 - 20:37
धाग्याची सुरुवात खालील बातमीने करीत आहे. उत्तर प्रदेशात शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार उत्तर प्रदेश मध्ये जानेवारी-फेब्रुवारी २०१७ या महिन्यात विधानसभेची निवडणुक आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजिस्ट म्हणून नेमणुक केली आहे. प्रियांका गांधींना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केल्यास काँगेसला मोठा फायदा होईल असे त्यांनी सुचविले आहे. परंतु काँग्रेस अजूनही राहुल किंवा प्रियांका यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यास उत्सुक नाही. काँग्रेसने कोणालाही पुढे केले तरी काँग्रेसला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २०२ जागा मिळणे अशक्य आहे. काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष होणे सुद्धा अशक्य आहे. मागील ३ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अनुक्रमे ४०३ पैकी २५, २२ व २८ इतक्या कमी जागा मिळाल्या होत्या. अलिकडच्या काळात २००९ मधील लोकसभा निवडणुकीत ८० पैकी २० जागा ही काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉम्ग्रेसला फक्त २ जागा मिळाल्या. प्रियांकाचे नाव पुढे करून जर पुन्हा एकदा दारूण पराभव झाला (असेच होण्याची शक्यता सर्वाधिक आहे) तर पदार्पणात शून्यावर बाद झालेल्या फलंदाजाप्रमाणे प्रियांकावर पदार्पणातच अपयशाचा शिक्का बसेल. २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसची प्रचाराची संपूर्ण धुरा राहुल गांधींनी आपल्या खांद्यावर घेऊन सुद्धा काँग्रेसला फक्त २८ जागा मिळाल्या होत्या. अमेठी व रायबरेली लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात प्रियांकाने जोरदार प्रचार करूनसुद्धा कॉंग्रेसला फक्त २ जागा जिंकता आल्या होत्या. अशा परिस्थितीत प्रियांकाचे नाव पुढे केले तरी काँग्रेसला फारसा फायदा होणार नाही हे स्पष्ट आहे. म्हणूनच बळीचा बकरा या न्यायाने काँग्रेसने शीला दिक्षित यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करायचे ठरविले आहे. शीला दिक्षित ब्राह्मण असल्याने उ.प्र. मधील १०% अधिक असलेली ब्राह्मण मते आपल्याकडे वळतील असा काँग्रेसचा भोळा आशावाद आहे. अर्थात शीला दिक्षित केवळ लग्नानंतर ब्राह्मण झाल्या आहेत. लग्नापूर्वी त्या खत्री समाजातल्या होत्या हे आता माध्यमातून येईलच. त्यांची कारकीर्द भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांमुळे डागळलेली आहे. त्यामुळे त्यांना पुढे करूनही फार फायदा होणार नाही. जर काँग्रेसची परिस्थिती सुधारली तर श्रेय प्रियांकाच्या प्रचाराला व जर काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला तर दोष शीला दिक्षितांच्या माथी असेच काँग्रेसचे धोरण असणार आहे.

बोका-ए-आझम 14/07/2016 - 21:05
काँग्रेसने ब्राम्हण उमेदवार देणार ही अटकळ बरोबर ठरवलेली आहे. शीला दीक्षित यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने भाजपच्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या मतांमध्ये विभागणी करण्याचा आपला उद्देश स्पष्ट केला आहे असं मला वाटतंय. हा काँग्रेसचा नकारात्मक पवित्रा आहे पण एका म्हणीनुसार ' नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा झाली पाहिजे ' असं काँग्रेसचं धोरण आहे, विशेषतः दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून. गुरुजी - शीला दीक्षित या माहेरहून खत्री समाजाच्या आहेत याने काही फरक पडेल असं मला वाटत नाही. सोनिया गांधींच्या जन्माने विदेशी असण्याचा मुद्दा कोणालाही फायदेशीर ठरला नव्हता. उलट उत्तर प्रदेशसारख्या राज्यात ब्राम्हण बहू हा काँग्रेसचा मुद्दा असेल असे वाटते.

In reply to by बोका-ए-आझम

श्रीगुरुजी 14/07/2016 - 21:16
सपचे अखिलेश यादव, बसपच्या मायावती आणि आता काँग्रेसच्या शीला दिक्षित. फक्त भाजपने अजून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजप यावेळी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करेल असे वाटत नाही कारण भाजपकडे मायावती व अखिलेश यांच्या तुलनेत तगडा उमेदवार नाही. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जर तगडा असेल तरच आधी त्याचे नाव जाहीर करून फायदा असतो. अन्यथा तोटा होण्याचीच शक्यता जास्त.

"अरूणाचल मध्ये काँग्रेस सरकार बरखास्तीचा निर्णय घटनाबाह्य" --------सुप्रिम कोर्ट _____________________________________ अखलाक च्या कुटुंबियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी!!! प्राण्यांमध्ये भेदभाव नकोच,गायीचे मांस बाळगले म्हणून लोकांनी मारले. मुळात कोणत्याच प्राण्याचे मांस खाऊ नये. आणि आता त्याच्या कुटूंबियांना छळत आहेत.

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 15/07/2016 - 17:49
उत्तर प्रदेशात गौवध बंदी कायदा आहे. त्यानुसार कार्रवाई होणारच. बाकी तिथे कुणी मारायला गेले नव्हते, कुणाही जवळ तलवारी किंवा कट्टे इत्यादी नव्हते. तो जर मेला नसता तर गौ. हत्याची FIR तेंव्हाच दायर झाली असती.

काळ्या पैसा शोधण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी ) तीन लाख रुपयांवरील रोख व्यवहारांवर बंदी आणण्याची शिफारस केली आहे . शिवाय, एखाद्या व्यक्तीकडे 15 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम ठेवण्यास मनाई करण्याचीही शिफारस केली आहे .

फ्रांसच्या नीस गावी बॅस्टील डे परेड पाहायला आलेल्या गर्दीवर ट्रक चढवून एक दहशतवादी हल्ला झाला आहे, ट्रक मध्ये ग्रेनेड आणि इतर स्वयंचलित हत्यारे सापडली आहेत, राष्ट्राध्यक्ष फ्रांझवा ओलांद ह्यांनी इमर्जन्सी अजून पुढे पर्यंत सुरु ठेवायचे सूतोवाच केले आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सदर हल्ल्यात ८० निष्पाप लोकांनी प्राण गमावले असून इतर १०० लोकं जखमी झाल्याचे वृत्त कळते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पद्मावति 16/07/2016 - 20:42
बळी पडलेल्या लोकांमधे लहान मुलांचा समावेश बराच होता. बिचारे मुलं fire works बघायला आली असतील:( या अतिरेक्यांचा पापाचा घडा आहे का अक्षय पात्र काही कळेना ....भरतच नाहीये:(

हुप्प्या 15/07/2016 - 10:35
ह्या भीषण प्रसंग घडल्यावर लोकसत्तामधे अशी बातमी होती की फ्रान्समधे ट्रक अपघातात ७६ ठार! (आता ती काढून टाकली आहे) ट्रक अपघातात ७६ लोक कसे मरतील अशी शंका कशी आली नाही? घातपात असल्याची खात्रीच पटायला हवी होती. असो. पण कुणी केला असेल हा हल्ला? कर्मठ ब्राह्मण? हिंदू सनातनी? की महायान वा हीनयान वाले बौद्ध लोक? का श्वेतांबर वा दिगंबर जैन? शीख अतिरेकी? का कडवे नास्तिक? की हे कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमधले लफडे आहे? काही कळत नाही. इतकी हिंसक मानसिकता कुठल्या गटाकडे आहे हे सुचतच नाही बुवा! कदाचित ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून हे भयंकर घडले असेल.

In reply to by हुप्प्या

....हे भयंकर घडले असेल." छे हो. उलट ती लोकच ट्र्कच्या मार्गा-मध्ये आली असतील.

बोलबोलेरो 15/07/2016 - 11:55
"ट्रक अपघातात ७६ लोक कसे मरतील अशी शंका कशी आली नाही? घातपात असल्याची खात्रीच पटायला हवी होती. असो. पण कुणी केला असेल हा हल्ला? कर्मठ ब्राह्मण? हिंदू सनातनी? की महायान वा हीनयान वाले बौद्ध लोक? का श्वेतांबर वा दिगंबर जैन? शीख अतिरेकी? का कडवे नास्तिक? की हे कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमधले लफडे आहे? काही कळत नाही. इतकी हिंसक मानसिकता कुठल्या गटाकडे आहे हे सुचतच नाही बुवा! कदाचित ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून हे भयंकर घडले असेल." उत्तम उपहास! हहपुवा. फ्रान्सच्या निसमधील हत्याकांडाला बळी पडलेल्यांना श्रद्धांजली! परंतु यातून युरोप काही शिकणार का? की परत एखादा "अयलान कुर्दी" झाल्यानंतर भावनिक अविचार करायला प्रवृत्त होणार? दुवा http://qz.com/554555/france-has-doubled-down-on-its-promise-to-syrian-refugees-after-the-paris-attacks/

शिद 15/07/2016 - 16:23
a शुक्रवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवड येथील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या घरात घुसून चार ते पाच जणांनी अपहरण करून नंतर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास भोसरी येथील राहत्या घरातून फुगे यांना चार ते पाच जणांनी बळजबरीने बाहेर काढले, अशी माहिती त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सीमा फुगे यांनी पोलिसांना दिली. दिघीच्या भारतमातानगरमध्ये रात्री बाराच्या सुमारास फुगे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. तसेच दगड घालून डोक्‍याचा चेंदामेंदा करून हल्लेखोर पसार झाले. घटना स्थळावर पोलिसांना कोयता मिळाला आहे. पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व फुगे यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची शोधपथके रवाना झाली असून पहाटेपर्यंत तरी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. दिघी येथील भारतमाता नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या आर्थिक वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोन्याचा शर्ट तयार केल्याने फुगे जगभर गाजले होते. फुगे हे खासगी सावकारीचा व्यवसाय करीत असत. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंड फंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून तसेच व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी हल्लेखोरांबरोबर फुगे यांचे पैशांवरून भांडण झाले होते, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

In reply to by शिद

चंपाबाई 15/07/2016 - 20:55
कलियुग सुरु होण्यापुर्बी कलिने जनमेजयाकडे आश्रयाची याचना केली होती. त्याने कलिला सोन्यात रहायला सांगितले होते. अंगभर सोने घालुन राजकारण करताना अपमृत्यू झाल्याचे हे दुसरे उदाहरण. ... इति श्री हिंदु पुराणम.

विवेकपटाईत 15/07/2016 - 17:56

संस्कृत भाषेला अच्छे दिन आले,

कालच रात्री आठ वाजता बाबा रामदेवांचे प्रवचन ऐकत होतो. पुढील १० वर्षांत १००० जवळ आचार्यकुलम् उघडण्याचा त्यांचा विचार आहे. (सध्या १ कार्यरत २०१३ पासून, ९ निर्माणाधीन). या शिवाय काही हजार संस्कृत ग्रंथांचे (जुन्या पांडूलिपींचे डीजीटीलाईजेशन करायचे आहे). (याच महिन्यात १३ जुनी पुस्तके प्रकाशित केली आहे) २०,०००हून जास्त संस्कृत शिक्षक/विद्वानांची गरज त्यांना भासणार आहे. १२वी नंतर संस्कृत भाषा शिकायला हरकत नाही.

श्रीगुरुजी 15/07/2016 - 23:16
This is the second reduction in rates this month. Petrol price was cut by 89 paise a litre and diesel by 49 paise on July 1. Petrol price was on Friday cut by Rs. 2.25 a litre and diesel by 42 paise a litre, the second reduction in rates this month on global cues.

In reply to by भंकस बाबा

खरं आहे तुमचं म्हणणं, पण तुम्हाला कधी स्वधर्माची चिकित्सा करताना पाहिलं नाही.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

भंकस बाबा 17/07/2016 - 10:26
टक्केवारी द्या ना स्वधर्माची चिकिस्या करायला, आपण नक्की करु, कशाला मी आमच्या घरात पितृपक्ष, नागपंचमी अशा प्रथा हट्टाने बंद केल्या आहेत. देवळात जाणे बंद केले आहे, आता तुम्ही एक मशिद दाखवा की ज्यात भोंगे वाजत नाहीत, मंदिरे मी दाखवायला तयार आहे. हां सर्वधर्मसम्भाव सोडा, हिन्दुमधील पुष्कळानी कट्टरवाद सोडला आहे. मुस्लिमानी सोडला असला तरि जाहिर करण्याचे धाडस फार् कमी लोकांनी केले आहे. रच्याकने झाक्याचे प्रवचन फ़ॉर द चेंज कॉमेडी शो म्हणुन बघायला हरकत नाही

In reply to by भंकस बाबा

चेक आणि मेट 17/07/2016 - 18:19
खरं आहे, मुस्लिम धर्मात कट्टरतावाद अधिक आहे, ते कधीही धर्माची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करीत नाहीत,त्यामानाने हिंदू आणि ख्रिश्चनांच्यात नास्तिकता जास्त आहे.देवाविरूद्ध बोलणे हाच जगन्य अपराध आहे असे मानतात ते.

In reply to by भंकस बाबा

चंपाबाई 17/07/2016 - 19:32
एकदा दत्तगुरु मॉर्निंग वॉकला चालले होते... समोरुन एक मिरवणुक वाद्ये वाजवत जात होती.. पण रस्त्याच्या कडेला बसलेला एक चांभार एकाग्रतेने त्याचे काम करत होता. त्याला तो कोलाहल ऐकु येत नव्हता. दत्तगुरुनी त्याला आपल्या गुरुस्थानी मानले. तात्पर्य : हिंदु धर्मावर अढळ श्रद्धा असुनही मशिदीचे भोंगे ऐकू येत असतील तर आपली एकाग्रता कमी पडत आहे... कृप्या एकाग्रता व श्रद्धा वाढवावी. होमवर्क : दत्ताने केलेले इतर २३ गुरु कोणते ?

In reply to by चंपाबाई

भंकस बाबा 17/07/2016 - 20:27
एकाग्रतेने मशिदिचा भोंगा वाजत असताना अभ्यास कसा करावा हे शिकवा, आमच्या घरातील आबालवृद्धाना सकाळी पाच वाजता भोंगा वाजल्यावर साखरझोप न मोड़ता स्थितप्रज्ञ रहायला शिकवा,

In reply to by भंकस बाबा

भोंगा किती वेळ वाजतो ओ. सकाळी दोन मिनटं,आणि पाच वाजता दोन मिनटं! झालं कि, पारायणे आठवडाभर चालतात भोंगे लावून ते चालतं का?? आणि किती पारायणे/कार्यक्रम होतात,,,तुकाराम बीज,रामनवमी,गणेश चतुर्थी,रामदास नवमी,एकादशी,संकष्टी,षष्ठी,हनुमान जयंती,काकड आरती,फाकड आरती,गोंधळ,शिमगा,धुळवड,रंगपंचमी,म्हसोबा,खंडोबा, ज्योतिबा,मरगूबाई,यल्लमा,इइइइइ आणि शिमग्याला तर किती ते ध्वनीप्रदूषण?? कोणी मेलं नसलं तरीही ठ्ठो ठ्ठो ?? कशाला फुक्कटचा पुरोगामित्वाचा आव आणताय?

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

भंकस बाबा 18/07/2016 - 01:51
अहो आजकाल मदरशावर देखिल भोंगे लावुन लाखो सलाम घातले जातात, ते पण सकाळच्या पारी, तुम्ही फारच त्रासलेले दिसताय, कानाजवळ एक भोंगा ठेऊन वाजवा , बहिरेपणा आला की सगळे त्रास दूर होतील, बायको बड़बडु देत की सासरा बोम्ब ठोकु दे

viraj thale 16/07/2016 - 08:42
काश्मीरमध्ये चकमकित मारला गेलेला आतंकवादी बुरहान वाणी पकिस्तान कडून हुतात्मा म्हणून घोषित .

बोका-ए-आझम 16/07/2016 - 08:55
NEET च्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय देताना राज्यांना त्यांच्या वैद्यकीय प्रवेशपरीक्षा घ्यायला परवानगी दिली. ९ मे या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने NEET ही एकमेव वैद्यकीय प्रवेश परीक्षा असेल असं जाहीर केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. २४ मे या दिवशी केंद्र शासनाने एक वटहुकूम काढून राज्यांनाही त्यांच्या वैद्यकीय प्रवेशपरीक्षा घेण्याची परवानगी दिली. काही राज्यांनी त्यांच्या प्रवेशपरीक्षा ९ मेच्या आधीच घेतलेल्या असल्यामुळे हा इतर राज्यांवर अन्याय होईल अशी भूमिका केंद्राने घेतली. केंद्र सरकारच्या वटहुकूमावर प्रतिबंधात्मक आदेश (stay) आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला गेला. आणि आता त्या वटहुकूमावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाने राज्यांचा स्वतःच्या परीक्षा असण्याचा मार्ग सुकर केलेला आहे.

श्रीगुरुजी 16/07/2016 - 11:27
नऊ महिन्यांनंतर हार्दिक पटेल तुरुंगाबाहेर
देशद्रोहाच्या आरोपाखाली ९ महिने तुरूंगात राहून जामीनावर सुटल्यानंतरसुद्धा अजूनही हार्दिकची खुमखुमी कायम आहे. त्याला ६ महिने गुजरातबाहेर रहावे लागणार आहे. देशद्रोहाचा आरोप अजूनही कायम आहे. द्वितीय श्रेणीत बी. कॉम. पास झालेल्या हार्दिकला गुणवत्तेवर होणारा अन्याय या विषयावर बोलायचा अधिकार तरी आहे का? _________________________________________________________________________________ पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याची नऊ महिन्यांच्या कारावासानंतर येथील लाजपूर तुरुंगातून सुटका झाली. यावेळी हे आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, मला ‘५६ इंचांची छाती’ नको असून माझ्या समुदायाचे अधिकार हवे आहेत, असा टोला त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारला. पाटीदार समुदायाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण मिळावे या मागणीसाठीचे आंदोलन आपण सुरूच ठेवणार असल्याचे जामीन मिळून तुरुंगाबाहेर आलेल्या हार्दिक (२२) याने सांगितले. पाटीदार समाज ज्यांना आपलेच भाईबंद असल्याचे मानतो, त्या कुर्मी समुदायाला सहभागी करून हा लढा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे संकेतही त्याने दिले. हार्दिकविरुद्धचे देशद्रोहाचे दोन गुन्हे आणि पाटीदार आंदोलनादरम्यान विसानगर येथील आमदाराच्या कार्यालयातील हिंसाचाराचे एक प्रकरण यामध्ये हार्दिकला जामीन मंजूर करून गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. येत्या सहा महिन्यांसाठी हार्दिकने गुजरातबाहेर राहावे, अशी अट न्यायालयाने घातली होती. या अटीनुसार, हा तरुण नेता येत्या सहा महिन्यांसाठी राजस्थानच्या उदयपूर शहरात राहील, असे त्याच्या वकिलाने स्थानिक न्यायालयाला सांगितले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/hardik-patel-released-from-jail-1268273/

In reply to by श्रीगुरुजी

द्वितीय श्रेणीत बी. कॉम. पास झालेल्या हार्दिकला गुणवत्तेवर होणारा अन्याय या विषयावर बोलायचा अधिकार तरी आहे का?
ऑ तसं तर काहींनी मंत्री होण्याचा पण नैतिक अधिकार नाही.आणि मंत्रीपद देण्याचा पण.

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 16/07/2016 - 21:19
द्वितिय श्रेणीतील असली तरी निदान खरी डिग्री आहे. डिग्रीचे कागद गायब , रविवारी मिळालेली डिग्री .. असे चावट प्रकार नाहीत. . .. एका बडबड्या बाईंना नुकतेच मंत्रीमंडळातुन बाजुला ढकलले. त्यांची डिग्री बिए की बिकॉम ?

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 16/07/2016 - 22:02
द्वितिय श्रेणीतील असली तरी निदान खरी डिग्री आहे. डिग्रीचे कागद गायब , रविवारी मिळालेली डिग्री .. असे चावट प्रकार नाहीत. . .. एका बडबड्या बाईंना नुकतेच मंत्रीमंडळातुन बाजुला ढकलले. त्यांची डिग्री बिए की बिकॉम ?

श्रीगुरुजी 16/07/2016 - 15:08
पाकिस्तानची पूनम पांडे http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4615728673501636712&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20160716&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%20%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%20%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE

In reply to by श्रीगुरुजी

अभ्या.. 17/07/2016 - 00:27
कंदील बलोच च्या मर्डर नंतर युट्युबवर प्रतिक्रिया भारी आहेत. . नाव मात्र भारिय राव. कंदील, आहाहाहा

संदीप डांगे 17/07/2016 - 00:19
मोदी सरकारने तूर डाळ उत्पादनाचा मेक इन आफ्रिका कार्यक्रम सुरु केलाय म्हणे! कांदाप्रश्नाबद्दल शेतकरी आधीच भाजप सरकारवर उखडलाय. त्यात आणि हे.... https://furtherafrica.com/2016/06/27/india-hopeful-of-long-term-tur-dal-supply-from-mozambique/

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 17/07/2016 - 14:42
जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे. Under pressure to control pulses prices, the Centre is hopeful of clinching a long-term deal with Mozambique for assured supply of lentils after the two countries had positive talks last week. Indian delegations last week visited pulses growing nations, Mozambique and Myanmar, to explore government-to- government arrangement for assured supply of lentils, especially tur, on a long term basis. तूर व इतर डाळीचे देशांतर्गत उत्पादन कमी असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. खात्रीशीर आयातीसाठी आफ्रिकेतील देशांशी करार करणे हे एक चांगले पाऊल आहे. त्यावर टीका करण्यासारखे काय आहे? काही जणांना मोदी सरकारचे मीठ कायमच अळणी लागते. त्यात मीठाचा दोष आहे का खाणार्‍याच्या जीभेचा दोष आहे?

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 17/07/2016 - 18:14
काँग्रेसच्या काळातही डाळ आयात करुन दर १०० रु होता... आता अचानक २०० व्हायला आणि अजुन आयात करायला आणखी काय कारण घडले?

In reply to by चंपाबाई

विकास 31/08/2016 - 21:31
तूरडाळीच्या दरघसरणीस सुरुवात या बातमीतील खालील भाग (त्यातही बोल्ड केलेला भाग) वाचण्यासारखा आहे... जाणकारांनी प्रकाश टाकावा! ;)
केंद्र शासनाने डाळ आयातीस परवानगी दिल्याने मोठय़ा प्रमाणात डाळीची आवक झाली असून देशांतर्गत असलेल्या दरापेक्षा आयात डाळीचे दर कमी आहेत. यामुळे बाजारपेठेतील गणिते बदलली आहेत. नवे उत्पादन त्यातच या आयात डाळीची भर याच्या भीतीने व्यापाऱ्यांनीही आपली गोदामे खुली करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे डाळीची मुबलक उपलब्धता आहे.
असो.

In reply to by विकास

संदीप डांगे 31/08/2016 - 23:12
जे काय व्हायचे ते नुकसान होऊन गेलंय, डॅमेज कंट्रोलने आता काही उपयोग नाही, दालप्रकरण काही अजरामर राहणार नव्हते, आता पुढची कमोडिटी कोणती ते बघणे आले,

In reply to by संदीप डांगे

विकास 01/09/2016 - 01:27
जे काय व्हायचे ते नुकसान होऊन गेलंय अगदी मनातलं बोललात, युपिएच्या दहा वर्षांमधे जे काही नुकसान होयचे होते ते झाले हे खरेच आहे! डॅमेज कंट्रोलने आता काही उपयोग नाही ह्या सरकारने डॅमेज कंट्रोल केलेला नसून आत्तापर्यंत जी काही, काहीजणांसाठींची (पक्षी: व्यापार्‍यांच्या स्वार्थासाठी) व्यवस्था होती, तीलाच शह देत त्यात बदल घडवून आणला. आता त्याचे परीणाम लगेच दिसत नव्हते हे देखील खरेच. पण नुसताच डॅमेज कंट्रोल करायचा असता तर काही तरी तात्पुरती पलमपट्टी लावली असती, दोन चार व्यापार्‍यांना - मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे काहीसे करून मोकळे झाले असते. असो.

In reply to by संदीप डांगे

मोदक 01/09/2016 - 14:16
कांही लोकांबद्दल सार्वकालीक असेल.. काही लोकांसाठी मोदींचे फॅसीस्ट आणि हुकूमशाही सरकार पडून प्रतिभावान आणि समंजस राहुलचंद्ररावजी गांधींचे काँग्रेस रामराज्य येईपर्यंत असेल.. कांही लोकांसाठी आजादी येईपर्यंत असेल...

In reply to by मोदक

सर्वलोकांसाठी सार्वकालिक असणे अन हे सत्य समजणे ह्यातच माझेतरी भारतीयत्व वसते :) जय हिंद :)

In reply to by विकास

श्रीगुरुजी 01/09/2016 - 14:21
डाळीचे भाव वाढले होते तेव्हा प्रॉब्लेम होता आणि काही जण सरकारला नावे ठेवीत होते. आणि आता भाव घसरले आहेत तेव्हाही प्रॉब्लेम आहेच आणि आताही सरकारला नावे ठेवणे सुरूच आहे.

In reply to by मोदक

श्रीगुरुजी 01/09/2016 - 14:33
जानेवारी-फेब्रुवारी २०१७ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तरांचल व पंजाब राज्यांची विधानसभा निवडणुक आहे. याच काळात महाराष्ट्रातील १० महानगरपालिकेची निवडणुक आहे. त्यामुळे निधर्मांधांचे पुरस्कार परतीचे दुसरे सत्र डिसेंबर २०१६/जानेवारी २०१७ या कालखंडात सुरू होईल व मतदानाच्या शेवटच्या दिवशी ते थांबून परत नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये तिसरे सत्र सुरू होईल. .

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 17/07/2016 - 21:05
जंप कसली? तुम्ही दिलेल्या बातमीच्या आधारेच मी प्रतिसाद लिहिलाय. त्यातलेच काही परिच्छेद मी दिलेत. स्वतःच्या मनाचे त्यात काहीही टाकलेले नाही.

In reply to by संदीप डांगे

जेपी 18/07/2016 - 20:44
काय डांगे साब, कांदा उत्पादक उखडले आहेत की लासलगाव बाजारसमिती, तुमी बरेच फिरता आणी अभ्यास पण करता.तरीही अभ्यास वाढवा. -टिप -आंजावरील बातम्या वाचुन मी माझे मत बनवत नाही याची नोंद घ्यावी.

In reply to by जेपी

संदीप डांगे 18/07/2016 - 22:23
काय जेपी भौ..? कांदा उत्पादक उखडले आहेत की लासलगाव बाजारसमिती, तुम्हीच सांगा. तुमी बरेच फिरता आणी अभ्यास पण करता.तरीही अभ्यास वाढवा. टोमणा आहे असं दिसतंय. असो. -टिप -आंजावरील बातम्या वाचुन मी माझे मत बनवत नाही याची नोंद घ्यावी. तुम्ही तुमचे मत कसे बनवता याचे इथे काय प्रयोजन ते कळले नाही.

संदीप डांगे 18/07/2016 - 00:42
श्रीगुरुजी. थोडं थांबा म्हणलो होतो. अधिकचे बोललात, आता पंचाईत होईल बघा. प्रथमतः मोझांबिक हे आफ्रिकेत नाही हे तुम्ही सांगितल्यापासून मला दहावी भूगोलात (+इतिहासात) मिळालेल्या १३० (१५० पैकी) गुणांवर प्रथमच अविश्वास वाटला. मग गुगलबाबाला विनंती केली माझे अज्ञान दुर करावे म्हणून. तसेच तुमचेही दुर होवो म्हणून हा वसा धरा हाती. दुसरे असे की संबंधित देशांत तूर 'उत्पादन होणार नसून' ते देश 'खात्रीशीर पुरवठा' करणार आहे असे तुम्हाला वाटले ह्याबद्दलही आश्चर्य वाटावे काय असेही वाटले. ते देश म्हणजे जणू भारतनामे देशात साठमारी करणारे नेहमीचेच व्यापारी असावेत असे तुमच्या विधानांवरुन वाटले. 'उत्पादन न करता पुरवठा करणार' म्हणजे व्यापारीच म्हणायचे नाही का? मघाशी घाइत एकच लिंक चिटकवू शकलो. तेवढ्यात तुम्ही मोदी सरकारच्या मिठाच्या अळणी नसण्यापर्यंत छातीठोक पोचलात. गुड. आय लाईक यो'र स्पिरिट! १. दुवा क्रमांक एकः India and Mozambique on Thursday signed an agreement where New Delhi will buy pulses from the southern African nation. The agreement, one of the three, was signed in Maputo. Prime Minister Narendra Modi, currently on a four-nation Africa visit, said: "India's commitment to buy pulses from Mozambique would help meet India's requirement. It will also facilitate long-term investments in commercial farming, generation of farm employment and raise farmers' incomes in this country (Mozambique)," he said. According to the agreement, India will encourage greater production of pulses in Mozambique with an assurance that it will be purchased by India at a mutually-agreed price. While India generally has a shortfall of pulses leading to price rise, Mozambique grows the commodity without much consumption locally, officials said, adding the agreement will be a "win-win" for the two countries. Last month, the Union Cabinet cleared a proposal to enter into an agreement with Mozambique for importing 100,000 tonnes of pulses in 2016-17 with an option to scale it up to 200,000 tonnes by 2020-2021. The agreement will promote production of pigeon peas or tur in Mozambique. These would be imported either through private channels or through nominated state agencies, an official statement issued after the Cabinet meeting said. २. दुवा क्रमांक दोन प्रस्तुत दुवा मुळातून वाचावा. दोन देशांमधे झालेल्या करारानुसार भारत मोझांबिकमधे तूरडाळीच्या शेतीला प्रोत्साहन देणार असून मूलभूत गरजा, मार्गदर्शन, इ पुरवण्यासोबतच शेतकर्‍यांकडून डाळ विकत घेतलीच जाईल असे आश्वासनही देत आहे. करारामधे ह्या गोष्टी नमूद आहे. ही डाळ भारतालाच विकावी अशी अट आहे म्हणजे ती भारताने विकत घेतलीच पाहिजे अशीही अट आहे. मग इथे भारतीय शेतकर्‍याने कितीही उत्पादन करो. मोझांबिकमधल्या शेतकर्‍यांना सर्व सुविधा देऊन त्यांच्या कडून डाळ विकत घेण्याची हमी जर भारत सरकार देऊ शकते पण तेच भारत सरकार आपल्याच देशातल्या शेतकर्‍यांना त्याच प्रकारे मदत करु शकत नाही हे विचित्र नाही? केवळ मध्यस्थ व्यापार्‍यांचा खिसा भरावा आणि शहरी मध्यमवर्गाला आम्ही काहीतरी करतोय असे दाखवण्याच्या तिकडमबाजीत भारतीय शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देणार्‍या सरकारने हा करार करुन नेमके काय व कोणाचे भले करायचे ठरवले आहे? (रोजच्या रोज कैक शेतकर्‍यांना "शरद पवार कृषीमंत्री असतांना बरे होते" असे म्हणतांना ऐकत आहे. हे ऐकून वाईट वाटावे का चांगले ह्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.)

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव 18/07/2016 - 11:36
पण अफ्रिकन देशांत ऊस आणि इतर नगदी पिकं हमी भावात मिळवण्याची कॉर्पोरेट लेव्हल शेती करावी हि योजना बारामतीकर काकांची. कदाचीत त्यांनीही कुठुन तरी उचलली असेल, कोण जाणे. इथेनॉल व तत्सम जैवइंधनाची सोय म्हणुन मोठ्या पेट्रोलियम कंपन्या अगोदरच अफ्रिकन देशांवर डोळा ठेऊन आहेत. चीन ने देखील अफ्रीकन देशांत मुसंडी मारली आहे. भारताने याअगोदर बहुतेक कांगो वगैरे देशांशी असले करार करायचे प्रयत्न केले होते. थोडक्यात काय, कि अफ्रिकन देशांशी हमी भावातली शेती हि केवळ आपली भोजनाची सोय नसुन त्यामागे बरेच आंतरराष्ट्रीय आराखडे आहेत.
(रोजच्या रोज कैक शेतकर्‍यांना "शरद पवार कृषीमंत्री असतांना बरे होते" असे म्हणतांना ऐकत आहे. हे ऐकून वाईट वाटावे का चांगले ह्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.)
तसं वाटणं सहाजीक आहे. पवारांसारखा कृषीमंत्री मिळणं अवघड आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 18/07/2016 - 18:39
प्रथमतः मोझांबिक हे आफ्रिकेत नाही हे तुम्ही सांगितल्यापासून मला दहावी भूगोलात (+इतिहासात) मिळालेल्या १३० (१५० पैकी) गुणांवर प्रथमच अविश्वास वाटला. मग गुगलबाबाला विनंती केली माझे अज्ञान दुर करावे म्हणून. तसेच तुमचेही दुर होवो म्हणून हा वसा धरा हाती.
अरेच्चा! मी कधी म्हणालो मोझांबिक हे आफ्रिकेत नाही म्हणून. तुम्हाला इभू मध्ये १५० पैकी २३० गुण सुद्धा असतील. पण म्हणून मी कधी म्हणालो की मोझांबिक हे आफ्रिकेत नाही.
दुसरे असे की संबंधित देशांत तूर 'उत्पादन होणार नसून' ते देश 'खात्रीशीर पुरवठा' करणार आहे असे तुम्हाला वाटले ह्याबद्दलही आश्चर्य वाटावे काय असेही वाटले. ते देश म्हणजे जणू भारतनामे देशात साठमारी करणारे नेहमीचेच व्यापारी असावेत असे तुमच्या विधानांवरुन वाटले. 'उत्पादन न करता पुरवठा करणार' म्हणजे व्यापारीच म्हणायचे नाही का?
अहो, तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये तेच लिहिलेले आहे. मी स्वतःच्या मनाचे काहीही लिहिलेले नाही. तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये जे आहे तेच मी फक्त मराठीत लिहिले आहे.
मघाशी घाइत एकच लिंक चिटकवू शकलो. तेवढ्यात तुम्ही मोदी सरकारच्या मिठाच्या अळणी नसण्यापर्यंत छातीठोक पोचलात. गुड. आय लाईक यो'र स्पिरिट!
तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिसादाची वेळ - संदीप डांगे - Sun, 17/07/2016 - 00:19 यावरचा माझा प्रतिसाद १४ तासानंतर दिला - श्रीगुरुजी - Sun, 17/07/2016 - 14:42 घाईघाईत एकच लिंक दिली होती, तर दुसरी लिंक १४ तासानंतर सुद्धा आलेली नव्हती. जी पहिली लिंक होती त्यावरच मी प्रतिसाद दिला आहे. पहिल्या लिंकमधील फोलपणा मी दाखवून दिल्यानंतरच आता हा पुढचा प्रतिसाद आला आहे. गुड! आता दुसर्‍या लिंकबद्दल . . .
दोन देशांमधे झालेल्या करारानुसार भारत मोझांबिकमधे तूरडाळीच्या शेतीला प्रोत्साहन देणार असून मूलभूत गरजा, मार्गदर्शन, इ पुरवण्यासोबतच शेतकर्‍यांकडून डाळ विकत घेतलीच जाईल असे आश्वासनही देत आहे. करारामधे ह्या गोष्टी नमूद आहे. ही डाळ भारतालाच विकावी अशी अट आहे म्हणजे ती भारताने विकत घेतलीच पाहिजे अशीही अट आहे. मग इथे भारतीय शेतकर्‍याने कितीही उत्पादन करो. मोझांबिकमधल्या शेतकर्‍यांना सर्व सुविधा देऊन त्यांच्या कडून डाळ विकत घेण्याची हमी जर भारत सरकार देऊ शकते पण तेच भारत सरकार आपल्याच देशातल्या शेतकर्‍यांना त्याच प्रकारे मदत करु शकत नाही हे विचित्र नाही? केवळ मध्यस्थ व्यापार्‍यांचा खिसा भरावा आणि शहरी मध्यमवर्गाला आम्ही काहीतरी करतोय असे दाखवण्याच्या तिकडमबाजीत भारतीय शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देणार्‍या सरकारने हा करार करुन नेमके काय व कोणाचे भले करायचे ठरवले आहे?
भारतात बहुतेक वर्षी मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी असल्याने वेगवेगळ्या डाळींची आयात करावी लागते. ज्या ज्या वर्षी कमी पाऊस पडतो, त्या त्या वर्षी स्थानिक उत्पादन अजून कमी होऊन भाववाढ होते व मोठ्या प्रमाणावर डाळी आयात कराव्या लागतात. अशा परिस्थितीत भारताने मोझांबिक व म्यानमारसारख्या डाळी पिकविणार्‍या देशांशी करार करून खात्रीशीर डाळी आयातीची पावले उचलली असतील तर ते स्वागतार्ह आहे. या करारामुळे भारतीय शेतकर्‍याच्या पोटावर पाय येईल हा तर्क अनाकलनीय आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे 18/07/2016 - 19:20
१.
अरेच्चा! मी कधी म्हणालो मोझांबिक हे आफ्रिकेत नाही म्हणून. तुम्हाला इभू मध्ये १५० पैकी २३० गुण सुद्धा असतील. पण म्हणून मी कधी म्हणालो की मोझांबिक हे आफ्रिकेत नाही.
खालील विधाने आपल्याच प्रतिसादात आहेत. जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे. आता मी दिलेल्या बातमीत आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नाही असे कुठे लिहिले आहे ते दाखवाल काय? तसेच मोझाम्बिक जर आफ्रिकेतच आहे तर 'आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नाही' असे तुम्ही का म्हणालात? २.
तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिसादाची वेळ - संदीप डांगे - Sun, 17/07/2016 - 00:19 यावरचा माझा प्रतिसाद १४ तासानंतर दिला - श्रीगुरुजी - Sun, 17/07/2016 - 14:42 घाईघाईत एकच लिंक दिली होती, तर दुसरी लिंक १४ तासानंतर सुद्धा आलेली नव्हती. जी पहिली लिंक होती त्यावरच मी प्रतिसाद दिला आहे. पहिल्या लिंकमधील फोलपणा मी दाखवून दिल्यानंतरच आता हा पुढचा प्रतिसाद आला आहे. गुड!
कसंय गुरुजी, मला तूरडाळीवर मोठाच प्रतिसाद लिहायचा होता. पण रात्रीचे साडेबारा वाजल्याने व दुसर्‍या दिवशी पहाटेच घराबाहेर पडावे लागत असल्याने हा अर्धवट लिहून टाकला. लिन्क्स चेक करुन वाचून अभ्यासून नीट टाकाव्या ह्या मताचा मी असल्याने उर्वरित काम उद्या करु असे ठरवून सोडून दिले. तसेच आजकाल मी खेड्यापाड्यांमधे फिरत असल्याने इंटरनेट मिळत नाही. मिळाले तरी फोनवरुन जुजबी चेक करतो, तेही वेळ असल्यास. थेट संध्याकाळीच लॅपटॉप व ब्रॉडबॅण्ड मिळत असल्याने दिर्घ प्रतिसाद संध्याकाळनंतरच देता येतात. त्यामुळे चौदा काय चोविसतासांनी जरी लिंक आली असती तरी काही फरक पडावयास नको किंवा प्रतिसाद अर्धवट असला तरी बोंबाबोंब व्हावयास नको. कारण बातमी काही माझ्या घरातली नाही. तूरडाळीच्या आफ्रिका-भारत करारावर चिक्कार लिन्का पडलेल्या आहेत. मी दिली नाही ह्याचा अर्थ तुम्हीही अभ्यास केला नाही असे दिसते. तुम्हाला 'वेट वेट' म्हणालो ते मोबाईलवरुन टायपले होते. तुमच्या उतावळेपणाने तुम्हीच अडकलात, वरुन अमुक तासांत लिन्का आल्या नाहीत चा फुकाचा कांगावा करत आहात. ह्याला काय म्हणावे बरे? मुद्द्याचे: पहिल्या लिन्कमधे कोणता फोलपणा आहे (जो तुमच्यामते तुम्ही दाखवून दिलाय) तेही कळले तर बरे होईल. ३.
भारतात बहुतेक वर्षी मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी असल्याने वेगवेगळ्या डाळींची आयात करावी लागते. ज्या ज्या वर्षी कमी पाऊस पडतो, त्या त्या वर्षी स्थानिक उत्पादन अजून कमी होऊन भाववाढ होते व मोठ्या प्रमाणावर डाळी आयात कराव्या लागतात. अशा परिस्थितीत भारताने मोझांबिक व म्यानमारसारख्या डाळी पिकविणार्‍या देशांशी करार करून खात्रीशीर डाळी आयातीची पावले उचलली असतील तर ते स्वागतार्ह आहे. या करारामुळे भारतीय शेतकर्‍याच्या पोटावर पाय येईल हा तर्क अनाकलनीय आहे.
डाळ उत्पादनाचे व पुरवठ्याचे चक्र जरा सोन्याबापुंकडून मागच्याच वेळेस नीट समजवून घेतले असते तर असली भंपक विधाने करायची वेळ आली नसती, गुरुजी. मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी होतो तर त्यावर तयार डाळीची ताबडतोब थेट आयात करणे वेगळे व परक्या देशात सर्व प्रकारच्या सुविधा देऊन परदेशी शेतकर्‍यांना खरेदीच्या खात्रीसह हमीभावही देणे हे वेगळे हे इतकेही कसे समजत नाही? 'घरची म्हणते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा' असा प्रकार का म्हणून चाललाय इतकाच माझा मुद्दा होता. हा करार आणि तूर डाळ, आधी नीट समजून घ्या नंतर चर्चेला या.

In reply to by संदीप डांगे

चंपाबाई 18/07/2016 - 19:42
आज जी तूर खातो ती गेल्या वर्षी पिकलेली असते... मग अचानक पाउस कमी / जास्त झाला म्हणुन यावर्षीची तूर का महाग होते ? आयत्या वेळेची क्याजुअल्टी म्हणुन डाळ आयात करणे व दुसर्‍या देशाला आर्थिक मदत आधीच देउन तिथे तूर पिकवणे हे दोन्ही भिन्न आहेत व हे म्हणजे घरातलं नागडं व शेजारणीला लुगडं असा प्रकार आहे.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 18/07/2016 - 19:48
राजकारण राजकारण्यांसाठी सोडून द्या. प्रत्यक्ष भारतात डाळींचे उत्पादन होणे आणि डाळींची टंचाई दूर होण्याला काही काळ जावा लागेल आफ्रिकेत( मोझाम्बिक) किंवा म्यानमारमध्ये मनुष्यबळ बरंच स्वस्त आहे आणि तेथील जमीन सुपीक आहे. त्यामुळे तेथून डाळ उत्पादन करून आयात करणे हे आपले उत्पादन वाढेपर्यंत नक्कीच आवश्यक आहे. उगीच आयात केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येईल हे अरण्यरुदन आहे आणि विरोधी पक्ष ते राजकीय फायद्यासाठी करणारच. मुळात आपले डाळींचे उत्पादन हे लोकसंख्या वाढीप्रमाणे वाढलेलेच नाही. त्याशिवाय पोषणासाठी अतिरिक्त लागणारी डाळ कुठून आणणार हा अधिकच प्रश्न आहे. खालील दुवा वाचून पाहावा. The real problem, however, is how to increase the availability of pulses in the country. At present, we are meeting about one-fifth of the domestic demand through imports but such imports are getting difficult to arrange. Even after tapping markets of 46 countries, we are able to arrange only around five million tonne of pulses. Unlike edible oil, pulses are not easily available for import from other countries, especially with the preference for pulse intake rising in most of the developed countries. India, being the largest producer as well as consumer of pulses, thus needs to tap the domestic potential of raising the production. The productivity of pulses in the country is very low because of several reasons. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. India has reached a stage where cereals will continue to be important to sustain the present level of nutrition. However, the reduction in hunger and the improvement in nutrition require more of pulses. Going forward, the future production targets should involve much higher growth in pulses than in cereals. http://www.thehindu.com/opinion/op-ed/consumption-of-pulses-and-nutrition/article8816406.ece

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 18/07/2016 - 20:04
हा लेख नीती आयोगाच्या( नियोजन आयोगाच्या जागी स्थापन झालेला) तज्ज्ञांनी लिहिलेला आहे आणि या लोकांचा राजकारणाचा आज तरी संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 18/07/2016 - 20:08
The real problem, however, is how to increase the availability of pulses in the country. At present, we are meeting about one-fifth of the domestic demand through imports but such imports are getting difficult to arrange. Even after tapping markets of 46 countries, we are able to arrange only around five million tonne of pulses. Unlike edible oil, pulses are not easily available for import from other countries, especially with the preference for pulse intake rising in most of the developed countries.
वरील परीच्छेदात परिस्थितीचे योग्य ते वर्णन आहे. त्यामुळेच मोझांबिक, म्यानमार इ. देशांबरोबर जी कराराची बोलणी सुरू आहेत ते एक निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 18/07/2016 - 20:18
डॉक्टरसाहेब. प्रस्तुत दुवा मी आधीच वाचलेला, आता तुम्ही दिलाच आहे तर ह्यातलीही गंमत सांगतो. जर भारताने ४६ देशांमधे फिरुनही पुरवठा होण्याची चिन्हे दिसत नाहीत तर काय करावे? दुव्यातच म्हटले आहे की आपलेच उत्पादन वाढवा. ओके? पण आपल्याकडे उत्पादन वाढवण्याच्या मर्यादा आहेत असेही म्हटले आहे. ह्या मर्यादा कोणत्या? १. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. का झाल्या नाहीत आजवर? किंवा आता होऊ शकत नाहीत असेही नाही. नवीन जाती शोधायला किमान पाच ते सहा वर्षे जातात. चला मान्य करु आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मग जगातून दुसरीकडून आणून आपल्या भूमीत सुधारित जाती लावू शकतोच की. ह्यात फारतर एक वर्ष जाईल. हे बियाणे विनामूल्य देऊन नविन शेतकर्‍यांना प्रोत्साहित करता येईल. २. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. डाळीस योग्य असे वातावरण ह्या विस्तीर्ण भारतात मिळूच नये हे अशक्य आहे. प्रश्न निर्माण झाला तो पारंपरिक डाळ-उत्पादक पट्ट्याचा. तिथे पाणी नसेल तर पाणी उपलब्ध करा. जिथे पाणी आहे तिथे डाळ घ्या. आफ्रिकेत जे उभारणीचे उद्योगात पैसा घालताय तोच त्याच कामासाठी इथे घालू शकतात ना. ३. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. वातावरणीय बदल व बुरशी-किडीला दाद देणार्‍या नवीन जाती शोधून काढणे हा उपाय आहे. बुरशी किडी ह्या अगदी काटेकोरपणे वनस्पती-केंद्रीत नसतात. ९० टक्के रोग जवळपास सारखेच असतात. मुख्य मुद्दा आहे तो डाळीच्या पिकावर शेतकर्‍याने खर्च किती करावा कारण खर्चाला साजेसे भाव नसतील तर कोण कशाला औषधांचा खर्च करेल. आज इथे जुन्नरात वीस किलो टोमॅटोला हजार बाराशे भाव मिळतोय तर शेतकरी औषधे किती महाग आहेत ह्याचा अजिबात विचार करत नाही आहे. दोनशे रुपये सोडा अगदी १६० रुपये किलो जर शेतकर्‍याला भाव मिळत असेल तर शेतकरी आनंदाने भरभरुन डाळीचे उत्पादन करतील. नाही कोण म्हणतंय? पण शेतकर्‍याकडून ३०-८० ला घ्यायची आणि उपभोक्त्याला २०० ला विकायची हे गणित कसे आणि कोण सोडवणार? ४. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. हेच तर मीही म्हणतोय ना. भारत सरकार हेच करतंय फक्त आपल्या देशात नाही, आफ्रिकेत. तिथेच विरोध आहे. ह्यात स्थानिक डाळ-उत्पादक शेतकर्‍याचे नुकसान नाही असे म्हणणे हेच अनभिज्ञपणाचे लक्षण आहे. इथल्या शेतकर्‍याला प्रोत्साहन द्यायचे नाही आणि बाहेरच्याला सर्व सुविधा देऊन आपल्याच नागरिकांसमोर स्पर्धेला उभे करायचे हे नक्की कशाचे द्योतक आहे? प्रस्तुत निर्णय फक्त व्यापारीवर्गाच्या हिताचा आहे. ॑.

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव 19/07/2016 - 07:00
१) ह्यात फारतर एक वर्ष जाईल. हे बियाणे विनामूल्य देऊन नविन शेतकर्‍यांना प्रोत्साहित करता येईल.
सगळी ट्रायल-बॅलन्स टोटल लाऊन सुधारीत बियाणं पुरेशा प्रमाणात वाटायला किमान ३ वर्षे लागतील. त्यातला सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे कुठल्या पिकाच्या खिशातुन डाळींचे भाव वधारायचे. अजुनपर्यंत डाळी आणि तेलबियांच्याबाबतीत आपण सतत भिजतं घोंगडं ठेवलय. आणल्या डाळीच्या बिया वाटल्या फुकट शेतकर्‍यांना इतकं सहज नसावं ते काम.
२) आफ्रिकेत जे उभारणीचे उद्योगात पैसा घालताय तोच त्याच कामासाठी इथे घालू शकतात ना.
अफ्रिका किंवा अन्य गरीब देशांत शेतकी विषयांत पैसा गुंतवायचे एक कारण म्हणजे यात बड्या आंतरराष्ट्रीय लवादांच्या सोयी-सुवीधांचं पाठबळ असतं. गरीब देशांत शेती-उद्योगधंद्यांना प्रोत्साहन म्हणुन बरेच प्रोग्राम राबवले जातात व ते गॅरेण्टर म्हणुन काम करतात. काहि कारणाने उद्या आपल्या शेतकर्‍यांनी डाळींचं उत्पादन म्हणावं तेव्हढं नाहि घेतलं तर सरकारचा पैसा बुडाला. अफ्रिकेतुन आयातीची हमी आणि नुकसान भरपायीची देखील.
३) अगदी १६० रुपये किलो जर शेतकर्‍याला भाव मिळत असेल तर शेतकरी आनंदाने भरभरुन डाळीचे उत्पादन करतील. नाही कोण म्हणतंय? पण शेतकर्‍याकडून ३०-८० ला घ्यायची आणि उपभोक्त्याला २०० ला विकायची हे गणित कसे आणि कोण सोडवणार?
थेरॉटीकली हे खरं आहे. शेती उत्पादनाचा खर्च आणि उपभोक्त्याला मोजायला लागणारे दाम याचं अजव गणीत आहे. पण एक नक्की, कि या समीकरणातुन डाळी अशा वेगळ्या काढता येणार नाहित. हे गणीत सामायीक पद्धतीनेच सोडवायला लागेल.
४) हेच तर मीही म्हणतोय ना. भारत सरकार हेच करतंय फक्त आपल्या देशात नाही, आफ्रिकेत. तिथेच विरोध आहे.
भारत सरकारने हे करावच. केवळ डाळींच्या बाबतीत नव्हे तर अगदी सरप्लस होणार्‍या उत्पादनात देखील. सगळी अंडी एकाच बास्केटमधे ठेऊ नये म्हणतात ना, त्यातला प्रकार. अर्थात, आपल्या लोकांच्या हातातोंडाची काळजी घेऊनच हे प्रकार करायला लागतील.
ह्यात स्थानिक डाळ-उत्पादक शेतकर्‍याचे नुकसान नाही असे म्हणणे हेच अनभिज्ञपणाचे लक्षण आहे. इथल्या शेतकर्‍याला प्रोत्साहन द्यायचे नाही आणि बाहेरच्याला सर्व सुविधा देऊन आपल्याच नागरिकांसमोर स्पर्धेला उभे करायचे हे नक्की कशाचे द्योतक आहे?
नागरीकांच्या भुकेचा प्रश्न मिटवायचा असेल तर हे काम प्रत्येक राज्यकर्त्याला करावेच लागेल. शेती किफायतशीर बनवायला त्यात गुंतलेलं मनुष्यबळ आणि थ्रोपुट याची योग्य सांगड घालुन अनेक वेगळे मार्ग शोधावे लागतील. या फार मोठ्या सुधारणा आहेत. पण सगळं सुरळीत झालं तरी दुसर्‍या देशांत शेती करुन आपल्या लोकांचं पोट भरायचा मार्ग कधिही बंद होता कामा नये.
प्रस्तुत निर्णय फक्त व्यापारीवर्गाच्या हिताचा आहे.
निश्चीत त्यात व्यापारीवर्गाचं हित आहे. तसं ते प्रत्येक बाबतीत असतच. पण हि पॉलिसी केवळ व्यापारीवर्गाच्या हितासाठी म्हणुन राबवली जात नाहि.

In reply to by संदीप डांगे

हेमन्त वाघे 19/07/2016 - 09:27
आफ्रिकेत धान्य पिकवणे - आणि ते सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात - नियोजन करून आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उप्योयोग करून - ही नवीन गोष्ट नाही ओलाम हे कंपनी याचे ऐक उदाहरण आहे http://olamgroup.com/ आणि ती एक भारतीयाने नायजेरियातून भारतात काजू निर्यात करण्यासाठी स्थापन केली होती https://en.wikipedia.org/wiki/Olam_InternationaL होय नायजेरियातून भारतात काजू निर्यात ! आफ्रिकेत शेती व शेतकरी मागासलेले असल्याने तेथील सरकारे मोठ्या प्रमाण जमिनी उपलब्ध करून अतिमोठ्या प्रमाणात धंदेवाईक शेती ( large scale commercial farming ) करण्यास प्रोत्साहन देतात.. http://www.thehindubusinessline.com/economy/agri-business/largescale-commercial-farming-in-africa/article2910459.ece http://africaworks.nl/en/farming-as-a-business मोठ्या प्रमाणात चिनी लोक जमिनी खरेदी करत आहेत http://www.forbes.com/sites/danalexander/2015/07/09/the-biggest-opportunity-in-agriculture-may-be-in-africa-and-china-is-seizing-it/#7f40c2f35c33 पण भारतीय लोक पण यात मागे नाहीत http://www.africa-business.com/features/indians-africa-farmlands.html http://scroll.in/article/729328/one-map-that-shows-indians-are-buying-large-farmlands-abroad-as-we-debate-land-acquisition-at-home शेवटच्या लेखाचे शीर्षकच सांगते - as we debate land acquisition at home भारतात मोठ्या प्रमाणात सलग जमीन उपलबध नाही , शेतमजूर अनेक ठिकाणी काम करीत नाहीत , या व्यवसायात बाहेरच्या लोकांना प्रवेशाचा नाही ( शेतजमीन घायला अनेक राज्यात तुम्ही शेतकरी असल्याचे प्रमाण पात्र लागते ) त्यामळे मोठ्या प्रमाणात planned शेती ही अतिशय कठीण आहे किंवा ज्वलजल अषयकच आहे . http://web.worldbank.org/WBSITE/EXTERNAL/COUNTRIES/AFRICAEXT/0,,contentMDK:21730621~menuPK:4900969~pagePK:146736~piPK:146830~theSitePK:258644,00.html

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 18/07/2016 - 20:01
खालील विधाने आपल्याच प्रतिसादात आहेत. जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे.
या विधानांचा अर्थ मोझांबिक हे आफ्रिकेत नाही असा होतो का? तुम्हाला इभू मध्ये किती गुण मिळाले याचा इथे काय संदर्भ होता?
मुद्द्याचे: पहिल्या लिन्कमधे कोणता फोलपणा आहे (जो तुमच्यामते तुम्ही दाखवून दिलाय) तेही कळले तर बरे होईल.
स्वतःच दिलेली लिंक जरा नीट वाचा हो. मोझांबिकशी केलेला करार, शेतकर्‍यांच्या पोटावर पाय, मध्यमवर्गीय व्यापार्‍यांचा खिसा भरणे इ. गोष्टी कोठून आल्या ते जरा सांगता का?
डाळ उत्पादनाचे व पुरवठ्याचे चक्र जरा सोन्याबापुंकडून मागच्याच वेळेस नीट समजवून घेतले असते तर असली भंपक विधाने करायची वेळ आली नसती, गुरुजी. मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी होतो तर त्यावर तयार डाळीची ताबडतोब थेट आयात करणे वेगळे व परक्या देशात सर्व प्रकारच्या सुविधा देऊन परदेशी शेतकर्‍यांना खरेदीच्या खात्रीसह हमीभावही देणे हे वेगळे हे इतकेही कसे समजत नाही? 'घरची म्हणते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा' असा प्रकार का म्हणून चाललाय इतकाच माझा मुद्दा होता.
ज्या गोष्टीची दरवर्षीच वेगवेगळ्या देशातून मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते त्या गोष्टीच्या खात्रीशीर पुरवठ्यासाठी एक दीर्घकालीन उपाययोजना करणे हे एक निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे. हे लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे.
हा करार आणि तूर डाळ, आधी नीट समजून घ्या नंतर चर्चेला या.
मला यातले काही समजत नसेल असे वाटत असेल तर देऊ नका प्रतिसाद.

In reply to by संदीप डांगे

सध्या दक्षीण आफ्रीकेमधला चिनचा वावर बघता, भारताला तेथे हालचाली करणे आवश्यक आहे असे मल वाटते. मोझांबीकचं भौगोलीक महत्व त्याद्रुष्टीने नाकारता येत नाही. जास्त बोलत नाही, समजुन जा.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 19/07/2016 - 02:02
आणि तीसुद्धा दोन्हीही बाजूंनी. मला स्वतःला या विषयातलं काहीही कळत नाही हे सुरूवातीलाच सांगतो. काही प्रश्न आहेत - १. मोझांबिकबरोबरचा करार हा फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे हे कसं काय? २.जर आज डाळींचे भाव रू.२००/किलो असतील तर त्याचा अर्थ मागणी भरपूर आहे पण त्या मानाने पुरवठा नाहीये. हे बरोबर की चूक ते आधी सांगावे. ३.आणि जर तसं असेल तर देशांतर्गत उत्पादन जे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असल्यामुळे त्याची खात्री देता येत नाही - आणि त्यामुळे दरांचीही खात्री देता येत नाही - अशा परिस्थितीत जर दुस-या देशात पिकवलेली डाळ आपल्या देशात यावी असा करार केला असेल तर त्यात चूक काय आहे ते सांगावे. ४.आणि व्यापाऱ्यांना फायदा होत नसेल तर ते मुळात कुठलाही व्यवसाय का करतील? त्यामुळे त्यांचा फायदा होणं हे कसं चुकीचं आहे हेही सांगावे. ५.त्याचबरोबर मोझांबिकबरोबर करार करणे बरोबर कसे आहे आणि त्याचे काय फायदे असू शकतात? तेही सांगावे. यात काहीही sarcastic किंवा prejudicial नाही. मला शेतीची अजिबात पार्श्वभूमी नाही. त्याच्या अर्थशास्त्रात जरुर रस आहे आणि त्याच अनुषंगाने हे प्रश्न विचारलेले आहेत. जर यात काही राजकीय bias आहे असं वाटत असेल तर मी हा पूर्वग्रह आहे असं म्हणेन. मग निदान माहिती असल्याचा आणि सांगण्याचा आव तरी आणू नका अशी माझी प्रतिक्रिया असेल आणि तीही दोन्ही बाजूंना. हा प्रश्न फक्त जिज्ञासा म्हणून विचारलेला आहे. उत्तरं मिळावीत अशी अपेक्षा आहे.

In reply to by बोका-ए-आझम

१. मोझांबिकबरोबरचा करार हा फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे हे कसं काय? खाली खरे सरांना दिलेले उत्तर वाचावेत, शंका असल्यास विचाराव्यात, यथामती उत्तरे देईन, माझे काही हुकले असल्यास ते दुरुस्त करेल. २.जर आज डाळींचे भाव रू.२००/किलो असतील तर त्याचा अर्थ मागणी भरपूर आहे पण त्या मानाने पुरवठा नाहीये. हे बरोबर की चूक ते आधी सांगावे. होय, हे बरोबरच आहे भाऊ, नाही कोण म्हणू राहिला, फक्त पुरवठा कमी का आहे हा कळीचा मुद्दा आहे, अन तो मुद्दा येऊन जाऊन आपल्या नाखु काकांच्या दलाल अडते समीकरणापाशी जाऊन थांबतो बघा ३.आणि जर तसं असेल तर देशांतर्गत उत्पादन जे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असल्यामुळे त्याची खात्री देता येत नाही - आणि त्यामुळे दरांचीही खात्री देता येत नाही - अशा परिस्थितीत जर दुस-या देशात पिकवलेली डाळ आपल्या देशात यावी असा करार केला असेल तर त्यात चूक काय आहे ते सांगावे. दुसऱ्या देशात जमीन कंत्राटावर घेऊन पिकवून इथे आणणे अन इथले विपणन ह्या सगळ्यानंतर ती डाळ स्वस्तच असेल, ह्याची तरी काय खात्री देता येईल बरं??, बरं खरे सरांच्या उत्तरात लिहिल्या प्रमाणे आपल्या देशातल्या इंनोवशनला बासनात गुंडाळून परक्या देशात जमीन घेऊन काम करणे हा सुद्धा शहाणपणा म्हणवत नाही! ४.आणि व्यापाऱ्यांना फायदा होत नसेल तर ते मुळात कुठलाही व्यवसाय का करतील? त्यामुळे त्यांचा फायदा होणं हे कसं चुकीचं आहे हेही सांगावे. भाऊ इथे आपण बजाज ऑटो किंवा मेरसिडेस च्या शेयरची चौकशी करत नसून जीवनावश्यक वस्तूंविषयी बोलतोय हे नम्रपणे नमूद करू इच्छितो, तरीही व्यापारी बंधूंचा फायदा होणे हे चूक नाहीच, पण तो फायदा होण्यात समतोल हवा न? म्हणजे गव्हर्नमेंट स्पॉन्सर अनफेर ट्रेड प्रॅक्टिस मधून मिळवलेला फायदा नसावा, शिवाय व्यापाऱ्यांचा असला फायदा आपण जस्टिफाय करत असू तर मग 200/किलोलाच का रडावे? घेऊयात की डाळ 200 ची शेरभर अन म्हणू 200 रुपये असली तरी 'चतुर व्यापारी त्याचा फायदा काढणारच' ;), हे असले हेजिंग जस्टिफाय होणार असेल तर ह्या चर्चेचा कार्यकारणभावच आटोपतो असे वाटते बुआ ५.त्याचबरोबर मोझांबिकबरोबर करार करणे बरोबर कसे आहे आणि त्याचे काय फायदे असू शकतात? तेही सांगावे. मी कॉन्स आधी पाहतो, ते मी मांडले आहेत, प्रोज संबंधी सध्या अभ्यास सुरु आहे, जे काही दिसतील ते नक्की मांडेल मी , सकृतदर्शनी तरी हा निर्णय अनफेर अन व्यस्तप्रमाणात व्यापारी हित जपणारा आहे असे मत पडते आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बोका-ए-आझम 19/07/2016 - 11:12
१. मुळात मोझांबिकमध्ये डाळ उत्पादन केलं जाणार आहे याचा अर्थ भारतात ते उत्पादन बंद किंवा कमी केलं जाणार आहे असं नाहीये, बरोबर? २.
दुसऱ्या देशात जमीन कंत्राटावर घेऊन पिकवून इथे आणणे अन इथले विपणन ह्या सगळ्यानंतर ती डाळ स्वस्तच असेल, ह्याची तरी काय खात्री देता येईल बरं??,
नक्कीच नाही देता येणार, पण ती subsidized दरांवर सरकार विकू शकतं. ही शक्यता नाकारता येणार नाही, बरोबर? शिवाय तुमच्याच प्रतिसादात म्हटल्यानुसार डाळीला मिळणारी MSP (किमान समर्थन मूल्य) वाढवलेलं आहे. याचा अर्थ समजा या मोझांबिकमधून आलेल्या डाळींमुळे भाव पडले तरीही भारतातल्या शेतकऱ्यांना किमान एक किंमत सरकारकडून मिळणारच आहे. ३. अशी किती डाळ मोझांबिककडून मिळणार आहे भारताला? मोझांबिक हा छोटा देश आहे. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांएवढा असेल फारतर. तिथली सगळी शेतजमीन तर तूरडाळ किंवा इतर डाळींच्या उत्पादनासाठी वापरली जाणार नाही. याचा अर्थ मोझांबिकमधलं डाळींचं उत्पादन हे भारतीय बाजारपेठेत प्रचंड फेरफार करु शकणारं नक्कीच नसावं. ४. मोझांबिकमधल्या शेतकऱ्यांची उत्पादकता भारतीय बाजारपेठेत बदल घडवून आणण्याएवढी आहे का? अमेरिका किंवा युरोपीय देश असते तर मी मान्य केलं असतं. अमेरिकेतील जेमतेम २% लोकसंख्या शेती करत असली तरी त्यांची उत्पादकता (productivity) ही खूपच जास्त आहे. त्यामुळे तिथल्या शेतमालाला भारतात विकू दिलं तर इथले भाव कोसळतील आणि इथला शेतकरी भरडला जाईल हे १००% मान्य. पण मोझांबिकच्या शेतकऱ्यांची उत्पादकता एवढी आहे का? ५. या करारात reciprocity असायला हरकत नाही, म्हणजे भारताने मोझांबिक किंवा इतर आफ्रिकन देशांकडून घेतलेल्या शेतमालाच्या मोबदल्यात त्या देशांची बाजारपेठ भारतीय उत्पादकांना मिळेल. अशा वेळी या आफ्रिकन देशांची आर्थिक परिस्थिती जर सुधारली (भारतात त्यांचा शेतमाल विकला गेल्यामुळे)तर भारतीय वस्तू विकत घेतल्या जातील आणि त्याचा फायदा भारतातील लोकांना होईल. जशी मागणी वाढेल, तसं उत्पादन वाढेल आणि नोक-याही वाढतील. अर्थात हा फारच long term चा विचार आहे, पण चीन असंच करतोय, विशेषतः झांबियामध्ये आणि पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये. ६.
भाऊ इथे आपण बजाज ऑटो किंवा मेरसिडेस च्या शेयरची चौकशी करत नसून जीवनावश्यक वस्तूंविषयी बोलतोय हे नम्रपणे नमूद करू इच्छितो
Exactly my point बापू. जीवनावश्यक गोष्ट आहे म्हणूनच तर त्याचा व्यापार करणाऱ्या लोकांना फायदा व्हायला हवा, म्हणजे ते तो व्यापार पुढेही करत राहतील. शिवाय तुम्ही फक्त व्यापारी हा एक व्यापक शब्द वापरलात. पण इथे वेगवेगळ्या पातळ्या असतील ना? Stockist - Distributor - Wholesaler - Retailer अशा. तुम्हाला व्यापारी म्हणजे नक्की कुठल्या पातळीवरचा व्यापारी अभिप्रेत आहे?

मितभाषी 18/07/2016 - 12:24
अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी अहमदनगरमधील कर्जतमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. ‘सरकार सुस्त असून मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ आहे. मात्र, पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला वेळ नाही.’ अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जो पर्यंत राजीनामा देत नाही, तो पर्यंत विरोधी पक्षांनी अधिवेशन चालवू देऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. दरम्यान, कर्जत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी कुठल्याही जातीचा असला, तरी त्याच्यावर कारवाई होणारच अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कर्जत बलात्कार प्रकरणाचा तपास जातीय गतिरोधात अडखळत असल्याची सोशल मीडियावर टीका होते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान कर्जत बलात्काराप्रकरणी दोन्ही आरोपींना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मितभाषी 18/07/2016 - 12:26
Marathi News > Maharashtra > नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर By: पांडुरंग रायकर, एबीपी माझा, अहमदनगर | Last Updated: Saturday, 16 July 2016 4:56 PM Share 17 अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी कर्जत परिसरातले नागरिक आक्रमक झाले आहेत. कारवाई करण्यात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप करत आज कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये बंद पाळण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर कर्जतमधला रास्ता रोको 5 तासांनी मागे घेण्यात आला. बलात्कार आणि हत्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संतोष भवार असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आणि खटला जलदगती न्यायालयात

चंपाबाई 18/07/2016 - 21:00
भारतातील शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योजकाना देउन तिथे मेक इन इंडियाची गाजरं लावायची. आनि मग भार्तात अन्न पुरेंसं पिकत नाई असे म्हणुन फॉरिनची डाळ मागवायची.

चंपाबाई 18/07/2016 - 21:00
भारतातील शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योजकाना देउन तिथे मेक इन इंडियाची गाजरं लावायची. आनि मग भार्तात अन्न पुरेंसं पिकत नाई असे म्हणुन फॉरिनची डाळ मागवायची.

(तुम्ही दिलेला रिपोर्ट प्लॅनिंग कमिशनने देणे, ते लोक राजकीय नसणे ह्या दोन्ही सत्य असलेल्या फॅक्टस मुळे त्यांना शेतातले सगळे कळते हा निष्कर्ष निघत नाही न सर, अर्थात मी हे कुठलाही मुटेछाप अभिनिवेश न ठेवता मांडतोय हे आधीच सप्रेम सांगतो, अन माझे मुद्दे मांडायला सुरुवात करतो) १. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. साफ चूक, अश्या जाती विकसित होत असतात किंबहुना झाल्या आहेत, पण त्यांच्या विस्तार अन लोकप्रियकरणासाठी आवश्यक सरकारी आस्था पूर्ण गायब आहे, ती फक्त ह्या शासनात आहे असे नाही तर कायम होतीच, बीडीएन-१ हे वाण फक्त आंतरपीक म्हणून लावायला उत्तम असे विकसित केले गेले आहे, मध्यप्रदेश ते महाराष्ट्र वातावरणातील टोकाचे बदल ग्राह्य धरून त्यांच्यात टिकून राहतील अशी एरिया स्पेसिफिक वाणं सुद्धा विकसित आहेत, उदा मरी रोग प्रतिकारक अन खास वैदर्भ वातावरणासाठी विकसित टी-विशाखा १ हे वाण, एकेटी-८८११ हे खास मध्य अन दक्षिण भारतीय वाण, आता अजून एक गंमत सांगतो, ही तर वाणं झाली आधुनिक लॅबोरेटरी अन परिस्थितीत विकसित केलेली, तर ही लिंक सुद्धा जरा बघा , ही लिंक आहे राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान उर्फ नॅशनल इनोव्हेशन फौंडेशनची, अन ह्या लिंकमधले नायक आहेत वाराणसीचे श्रीयुत जयप्रकाश सिंग, ह्याचा जरूर लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती, इतकं सगळं असताना जर प्लॅनिंग कमिशन असे म्हणत असेल तर तो त्यांचा सरकारी अनास्था रिपोर्टमध्ये लपवायचा दुर्दैवी प्रयत्न मी का म्हणू नये?? २. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. अहो ही डाळ पिकाची (प्रश्नात तूर आहे त्याची) नैसर्गिक मागणी आहे हो, ते एनविरोन्मेण्ट पुअर नसतं तर स्केन्टी रेनफॉल एरिया असतं, मी स्वतः वरकड पाणी न देता तूर आंतरपीक म्हणून ओढली आहे कैक वेळा, हरबरा तर फक्त दवाच्या ओलाव्यावर (फ्रॉस्टिंगवर) येतो रब्बीतला, तेव्हा वातावरण हा इशू नाही तर वरती मी जो मुद्दा सांगितलाय ती खरी ज्ञानबाची मेख आहे असे वाटते, जास्त उत्पादन करणारी वाणं विकसित झाली/होत आहेतच फक्त त्यांचा पुरस्कार सरकार स्वतःच करत नाहीये आधीपासूनच ३. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. मला वाटतंय हा मुद्दा मी माझ्या पहिल्या उत्तरात कव्हर केलाय, तस्मात पुनरुक्ती टाळतो आहे :) ४. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. सरकारने बहुतेक मागच्या नोव्हेंबर मध्ये डाळींचे समर्थनमूल्य वाढवले आहे, टू एनकरेज मोर प्रोडक्शन, ही एक अभिनंदनीय बाब आहे, पण मग हे काय मधेच मोजांबीकचं सूरु केलंय ? लिंक स्पष्ट म्हणते की शेती मोझमबीक मध्ये होणार, त्याची गरज काही नाही खरेतर, अगदी कॉर्पोरेट फार्मिंग म्हणले तरी जमीन मशागत करून कंपनीफार्म सुरु करायला जितका वेळ लागेल तितक्यावेळात जय प्रकाश सिंगाची वाणं व्यावसायिक निर्मिती मध्ये आणून आपल्याच कडले प्रोडक्शन वाढेल की नाही? हा फायदा डायरेक्ट शेतकरी/ग्राहक सगळ्यांचा आहे, मोझमबीक मध्ये शुद्ध व्यापारी फायदा आहे, हे सुस्पष्ट आहेच की, तुम्ही करार केलात पण शेती करायला कंत्राट पद्धतीने सरकार जाणार नाहीये कंपनीच जाणार आहेत, धंद्याचे मूळ तत्व नफा, मग त्यांना तिकडे स्वस्त मनुष्यबळ ते जमीन मिळूनसुद्धा अन सरकारने त्यांना उत्पादन एका ठराविक किमतीत विकायचे बंधन केले तरी सुद्धा ते लोक आपली लागवड मशागत अन वाहतूक खर्च + नफा सोडून विकतील डाळ हा भाबडा आशावाद असेल नाही तर काय असेल? त्यामुळे हा निर्णय व्यापारी धार्जिणा आहे असे म्हणालास गैर ते काय? बरं सरकार म्हणाली अन ह्यांनी विकले इतके साधे व्यापारी कसे असणार? तूर डाळ पेरा ते पुढे असे विवेचन मी मागे 'एका वर्षानंतर' ह्यावर केले होते, तिथे साठेबाजी सप्रमाण दाखवली होती, मोझमबीक मध्ये उत्पादन झाले 'क' ते दाखवले गेले 'ख' (कमी दाखवणे सहज शक्य आहे अन अटळ आहे माझ्यामते) अन वरील प्रमाणे किंमत 'घ' दाबलेली डाळ इंटरनॅशनल मार्केट मध्ये नफा काढायला विकली जाणार नाही ह्याची काय हमी असणार आहे? तेव्हा हा निर्णय व्यापारीहिताचाच आहे सर.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आनंदयात्री 20/07/2016 - 20:06
>>हा निष्कर्ष निघत नाही न सर, अर्थात मी हे कुठलाही मुटेछाप अभिनिवेश न ठेवता मांडतोय हे आधीच सप्रेम सांगतो, अन माझे मुद्दे मांडायला सुरुवात करतो बाकी चर्चा राहूद्या पण 'मुटेछाप अभिनिवेश' ही टर्म कॉईन केल्याबद्दल रॉल्फ थँक्स ! =))

श्रीगुरुजी 19/07/2016 - 08:52
http://m.rediff.com/news/report/navjot-singh-sidhu-quits-rajya-sabha-could-join-aap-ranks-in-punjab/20160718.htm नवजोतसिंग सिधूने भाजपचा व राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. तो आआप मध्ये जाण्याची शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 19/07/2016 - 14:36
सिधूने भाजप सोडून आआपमध्ये जाण्याचा भाजपला किती तोटा होईल व आआपला किती फायदा होईल हे सांगता येणे अवघड आहे. सिधू तसाही गेली काही वर्षे राजकारणात सक्रीय नव्हता. वेगवेगळ्या वाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शो, आयपीएल सामन्यांचे समालोचन यातच तो गर्क होता (त्याचे व विवेक राजदानचे समालोचन ऐकणे ही शिक्षा होती. त्यांची अत्यंत संदर्भहीन व नळ गळल्यासारखी अखंड बेताल बडबड ऐकणे असह्य होते. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात एखाद्या महान गायकाचे सुरेल गायन ऐकल्यानंतर लगेच 'रिक्षावाला' किंवा 'शांताबाई' ऐकल्यावर जसे वाटेल, तसेच इतरांचे समालोचन ऐकल्यानंतर सिधू व राजदानचे समालोचन ऐकताना वाटायचे.). त्याच्या जाण्याने भाजपला फारसा तोटा होणार नाही व आआपला फारसा फायदा होणार नाही असा माझा अंदाज आहे. आआपने त्याला बहुतेक पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन दिले असावे.

गॅरी ट्रुमन 19/07/2016 - 13:48
राहुल गांधींनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारसभेत भिवंडीत बोलताना रा.स्व.संघाने गांधीजींचा खून केला असा आरोप केला. त्याविरूध्द संघाने न्यायालयात धाव घेतली.त्याविषयी राहुल गांधींनी माफी मागावी अन्यथा अब्रूनुकसानीच्या खटल्याला सामोरे जायची तयारी ठेवावी अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ जुलै रोजी आहे. मला वाटते की यावेळी रा.स्व.संघाने राहुल गांधींना अजिबात सोडायला नको. फेब्रुवारी १९९८ मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी कोईम्बतूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये रा.स्व.संघाचा हात असून आपल्याकडे त्याविषयीचा पुरावाही आहे असे विधान केले होते.त्याविरूध्द संघाने केसरींवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. पण नंतर केसरींचे वय झाले आहे आणि त्यांना म्हातारचळ लागले आहे म्हणून ते काहीतरी बरळत आहेत असे वाटल्यामुळे असेल कदाचित पण संघाने तो खटला मागे घेतला. राहुल गांधींना मात्र अजिबात सोडायला नको.

In reply to by गॅरी ट्रुमन

चंपाबाई 19/07/2016 - 13:57
संघ व मोदी गांधीजींना प्रातःस्मरणीय मानतात .. त्यांच्या पावलावर चालून माफ करुन सोडुन द्यावे. तसेही राहुल गांधीना शासन झाले, न झाले, संघाबाबत जनतेच्या मनात जी संशयास्पद प्रतिमा आहे, ती तर तशीच रहाणार ना?

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी 19/07/2016 - 14:39
NEW DELHI: The Supreme Court on Tuesday asked Congress vice-president Rahul Gandhi to express regret for his comments holding the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) responsible for Mahatma Gandhi's assassination or be ready to face a defamation trial. "Why did you make a sweeping statement against the RSS branding everyone associated with the organization in the same brush," the Supreme Court asked Rahul Gandhi while hearing a defamation case filed against him. " You can't make wholesale denunciation of an organization," the SC bench observed. Rahul Gandhi's counsel tried to justify his remarks saying these are historical facts and even part of the government records. The apex court said that Rahul needed to prove what was the public good in his statement against the RSS and hence it was a matter of trial. The SC said that if Rahul Gandhi wanted to defend himself and was not ready to express his regret, than it will be better that he faced trial. A bench of Justices Dipak Misra and R F Nariman refused Rahul's request for two-week adjournment and posted the matter for hearing on July 27. Rahul wanted two-week's time saying his counsel Kapil Sibal is not free before that. The SC said this is no ground for adjournment and posted the matter for July 27, saying no further postponement of hearing would be allowed. http://timesofindia.indiatimes.com/india/RSS-killed-Gandhi-Express-regret-or-face-trial-Supreme-Court-tells-Rahul-Gandhi/articleshow/53279452.cms

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 19/07/2016 - 14:53
संघावरील आरोप कोर्टात सिद्ध झालेले नाहीत. हे खरेच आहे. पण गोपाळ गोडसेंच्या स्टेटमेंट्समुळे आम लोकांचा गोंधळ उडतो. https://www.sscnet.ucla.edu/southasia/History/Hindu_Rashtra/nathuram.html shortly after releasing Nathuram’s book, Why I Assassinated Mahatma Gandhi, in December 1993, Gopal Godse in an interview with Frontline magazine stated: “All the [Godse] brothers were in the RSS. Nathuram, Dattatreya, myself and Govind. You can say we grew up in the RSS rather than in our home. It was like a family to us. Nathuram had become a baudhik karyavah [intellectual worker] in the RSS. He has said in his statement that he left the RSS. He said it because [Madhav Sadashiv] Golwalkar and the RSS were in a lot of trouble after the murder of Gandhi. But he did not leave the RSS.” [See issue of 28 January 1994] असो. ज असेल ते असो. पण राहुलजीनी असा उघ्ड आरोप कराउला नको होता.

In reply to by श्रीगुरुजी

दिगोचि 05/08/2016 - 09:17
मला वाटते राहुल गान्धीला या वेळी सन्घाने सोडुच नये. कारण त्याला जितके दिस्क्रेदित करता येइल तेव्हढे करावे त्यामुळे कॉन्ग्रेस्पक्षाला काय करावे ते व काय करु नये अशी त्यान्ची अवस्था होईल याचा भाजपाला २०१९च्या निवडणुकीत झाला तर फयदाच होइल.

चंपाबाई 19/07/2016 - 13:54
मेलेल्या गायीचे कातडी काढायला दलिताना बोलावुन त्यानीच गाय मारली असा खोटा आरोप ठेऊन दलिताना मोदींच्या गुजरातेत मारहाण .. कट्टर हिंदुत्ववाद्यांचे खोडसाळ कृत्य

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई 19/07/2016 - 15:02
तो अवतार माझा नव्हता http://m.economictimes.com/news/politics-and-nation/dalits-unload-cow-carcass-in-front-of-collectorate-in-gujarat/articleshow/53273931.cms इंग्लिशमधी नाई कळत तर मराठीत सांगू काय ? http://m.maharashtratimes.com/nation/dalits-flogging-in-una-sparks-angry-protests-in-saurashtra/articleshow/53281324.cms

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई 20/07/2016 - 02:54
Such incidents of violent interventions by the Sangh Parivar activists have been a regular occurance in Gujarat for the last two decades since the BJP came to power in the state in 1995. However, their numbers are increasing day by day. These incidents are also getting reported more often or 'recorded' due to the proliferation of video cameras and mobile phones. http://googleweblight.com/?lite_url=http://www.catchnews.com/india-news/gujarat-s-cow-vigilantes-don-t-love-their-gau-mata-they-just-hate-dalits-1468419334.html/fullview&lc=en-IN&s=1&m=956&host=www.google.co.in&ts=1468918873&sig=AKOVD65CGrUuPBdOYm1ftFebfoXY08WiXw ......

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई 20/07/2016 - 02:56
ते गोंदवले काळे की गोरे मी स्वप्नातही पाहिलेले नाही. तिथे कधी जाणेही झालेले नाही. त्यामुळे तिथे काय करतात , याबाबत मी कधी लिहिले नाही.. आमच्या आजारपणाच्या काळात गोंदवलेकर प्रवचनांची दोन चार पुस्तके माझ्या समोर टाकली होती.. दोन चार पाने चघळुन , हे जीवन दु:खमय आहे , प्रभू रामाचे नाव घेऊन भवसागर तरुन जावे , इ जुजबी ब्रह्मज्ञान घेउन त्या प्रवचनास ( कायमचे ) रामराम म्हटले होते.

गामा पैलवान 20/07/2016 - 23:40
लोकहो, गेला आठवडा युरोपास ज्याम गडबडीचा गेला. १. शनिवारी १६ जुलैच्या सकाळी (वा आदल्या रात्री) आर्दोगानने तुर्कस्थानात माजलेली बंडाळी मोडून काढल्याचं जाहीर केलं. ही खरोखरची बंडाळी होती का? कोणी प्रमुख नेता तर दिसंत नाही. लगेचंच त्याने ८८०० पोलीस, ६००० सैनिक, २७५० न्यायाधीश आणि १५००० शिक्षण कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली. आपल्या हातात सत्तासूत्रे एकवटावी म्हणून त्याने खोटं बंड उभारलेलं दिसतंय. बंडाळीचं खापर फोडायला फतेउल्ला गुलेनचं कपाळ सापडलंय. पण आपल्या हाती सत्ता एकवटण्याचा प्रयत्न कशासाठी? २. माझ्या मते याचं कारण की दोनंच दिवसांपूर्वी १४ जुलैच्या रात्री फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलाँ यांनी आणीबाणी ३ महिन्यांसाठी वाढवली. निमित्त अर्थातंच नीस येथील आक्रमणाचं होतं. याचीही जबाबदारी कोण्या संघटनेने उचलली नव्हती. दुसऱ्या दिवशी नीसच्या बळींना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात ओलाँची हुर्यो उडवण्यात आली. कुठेतरी पाणी मुरतंय याचा फ्रेंच नागरिकांना सुगावा लागलेला आहे. पण ओलाँ यांना घाई करून आणीबाणी वाढवायची गरज का पडावी? त्यासाठी तत्पूर्वी दोनतीन दिवस ब्रिटनमध्ये काय घडलं ते बघावं लागेल. ३. सोमवारी ११ जुलैला आपण ताबडतोब पायउतार होणार म्हणून क्यामेरन यांनी जाहीर केलं. आणि बुधवारी १३ तारखेला निघाले देखील. अचानकपणे लेडसमबाईंनी माघार घेतली आणि घाईघाईने तेरेसा मे यांची नियुक्ती झाली. नंतरच्या चारपाच दिवसांतल्या घटनांनंतर तेरेसाबाई लई प्येटल्या. वेळ आली तर अणुबॉम्ब फोडेन म्हणाल्या. एकमेकांची पाठ खाजावायचा प्रकार तर चालला नाहीये? पण क्यामेरन तर दोन तीन महिन्यांनंतर पायउतार होणार होते. ऑक्टोबरपर्यंत पदावर राहायचा विचार होता साहेबांचा. अचानक जुलैच्या मध्यावर का निघाले? दोनतीन महिन्यांनी असा काय फरक पडणार होता? की तोवर नवं नेतृत्व पूर्णपणे सुस्थापित व्हावं अशी योजना होती? येत्या दोन तीन महिन्यांत काही धमाका उडणार आहे का? असल्यास कारण काय? इथे एक गोष्ट विचारांत घ्यायला हवी. ४. ती म्हणजे मंगळवार दिनांक १२ जुलै रोजी पुतीन यांनी संपूर्ण बाल्टिक नौदल ताफा बडतर्फ केला. आता प्रश्न असा आहे की बाल्टिक ताफ्याने पाश्चात्य (म्हणजे नाटोच्या) हालचालींना प्रत्युत्तर द्यायचं का नाकारलं? रशियात काही गडबड होण्याची शक्यता आहे का? की नाटोने बाल्टिक मधल्या हालचाली वाढवल्या? येत्या दोन तीन महिन्यांत काहीतरी घडणारसं दिसतंय खरं. ५. या सर्व घडामोडी होत असतांना अमेरिकेचं मौन मात्र अगदीच आश्चर्यजनक आहे. ओबामा निघालाय. त्याला काही पडली नाहीये. ट्रंप बुवा निवडून आल्यातंच जमा आहेत (निदान वागताहेत तरी तसंच). त्यांनीही तोंड उघडलं नाहीये. युरोपापासून अमेरिका अलग पडंत चाललीये का? असो. या सर्व घडामोडींना लाभलेली ब्रेक्झिटची पार्श्वभूमी देखील लक्षणीय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पद्मावति 21/07/2016 - 23:24
गामा पैलवान उत्तम आढावा.पुढचे काही महिने बर्‍याच घडामोडी होणार असे दिसतंय खरं... मला वाटतं अमेरिका सध्या मौन आहे कारण निवडणुका डोक्यावर आहेत. वेट आणि वॉच चाललंय त्यांचं.

चंपाबाई 21/07/2016 - 11:42
1) give it up योजनांमुळे झालेली बचत प्रत्यक्षात 2000 कोटी इतकीच आहे, पंतप्रधान हा आकडा 22000 कोटी सांगत आहेत. उरलेली बचत आंतर्राष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्याने झाली आहे. 2) ग्रामीण विद्युतीकरण योजनेत alotted रकमेच्या केवळ 3% रक्कम वापरण्यात आली आहे. केवळ 3%रकमेत जर जवळपास सर्व काम केले गेले आहे . मग बाकीची 97% का sanction केली http://www.dnaindia.com/india/report-modi-government-s-flagship-scheme-deendayal-upadhyay-gram-jyoti-yojna-remains-largely-on-paper-2236194

आकाश कंदील 21/07/2016 - 16:23
गामाजी, तुम्ही खुपच छान विश्लेषण केले आहे. माझ्यामते जरी पुढील ३, ४ महिन्यात खूपच क्रातिकारक / विस्मयकारी काही होणार नसले तरी तुमचे मुद्दे नक्कीच विचार करायला लावणारे आहेत.

गामा पैलवान 21/07/2016 - 23:06
लोकहो, १३ नोव्हेंबर २०१५ रोजी प्यारी (पॅरिस) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलाँ यांनी १४ जुलै रोजी आणीबाणी २६ जुलैपर्यंतच लागू राहील असे वक्तव्य केले. राष्ट्राध्यक्षांचा या वचनानंतर अवघ्या काही तासांत नीस येथे दहशतवाद्याने शेकडो लोकांना ट्रकखाली चिरडले. त्यामुळे ओलाँ यांनी आगोदरच्या वाचनाकडे दुर्लक्ष करंत आणीबाणी ६ महिन्यांसाठी वाढवली. काय गडबड चाललीये? कुठेतरी पाणी मुरतंय खास. तुर्कस्थानाचे अध्यक्ष आर्दोगान यांनीही ३ महिन्यांसाठी आणीबाणी कालंच घोषित केली. फ्रान्सच्या आणीबाणीविस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही बाब लक्षणीय वाटते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भंकस बाबा 27/07/2016 - 22:28
उत्तम आढावा, यूरोपमधे शेयर मार्केट दोलायमान स्थितीत असताना अमेरिकेत नवीन उचांक करत आहे, हे पण दुर्लक्षुन चालणार नाही

चंपाबाई 27/07/2016 - 22:05
बाल कामगार कायद्यात काही बदल घडलेत म्हणे. पूर्वी फक्त आई बापाच्या घरच्या कामात मुलानी काम करणे चालत होते. आता लांबच्या जवळच्या कोणत्याही नात्याची व्यक्ती बालकाला कामगार म्हण्य्न नेमु शकते. पुर्वीच्या सरकारला हझार्डस वाटणारे अनेक उद्योग आता सेफ आहेतम्हणे. तिथे बालके जॉब करु शकतात. आनंद आहे !

चंपाबाई 29/07/2016 - 13:21
केंद्रात सत्ताधारी झालेल्या भाजपानं निर्लज्जपणाच्या सगळ्या सीमा पार करण्याचा चंग बांधला आहे. लोकपालात प्रस्तावित असलेले बदल हेच दाखवतात. केंद्रातलं महाढोंगी सरकार कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडून आलं. लोकपालाला या पक्षानं बिनशर्त, एकमुखी पाठिंबा दिला होता. कॉंग्रेसवर त्या काळात या पक्षाचे ढोंगी नेते मानभावीपणानं उच्चरवात टीका करत असत. आता त्याच लोकपाल कायद्याला हा पक्ष सुरूंग लावत आहे. लोकपालाच्या कक्षेतून आता राजकारणी आणि अधिकारी यांच्या नातेवाईकांना बाहेर काढलं जाणार आहे. भारतातील कोणताही नेता, अधिकारी स्वत:च्या नावावर संपत्ती ठेवण्याएवढा मूर्ख नसतो, म्हणून तर जवळच्या नातेवाईकांची मालमत्ता पण चौकशीच्या दायर्यात यावी अशी तरतूद लोकपालात आणली गेली. आता मोदींनी कावेबाजपणा करून ती तरतूद हटवण्याचा घाट घातलाय. वरवर हे महाशय भ्रष्टाचाराचा बिमोड करू वगैरे प्रचारी थाटाची दणकेबाज विधानं करतात आणि आतून भ्रष्ट नेते आणि भ्रष्ट अधिकार्यांना संरक्षण देतात. कायद्यात बंधनकारक असूनही लोकपाल गेली दोन वर्ष नेमण्यातंच आला नाही! मोदी लोकपालाला एवढे का घाबरतात? कोणाच्या कुलंगड्या बाहेर पडण्याची ही भीती त्यांना वाटते? एकीकडे राजकारणी आणि अधिकार्यांना सोडून देत असतांनाच स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्यांच्या नातेवाईकांचे उत्पन्न जाहीर करण्याची मात्र सक्ती असणार आहे! मोदी स्वयंसेवी संस्थांचा सूड घेण्यासाठी लोकपाल कायद्याचा वापर करणार आहेत. त्यांनी ते करावं पण सगळ्यांच्याच नातेवाईकांची संपत्ती जाहीर व्हावी, भाजपा आणि त्यांची पितृसंस्था रा स्व संघ यांनी लोकपाल आंदोलनाचा दुरूपयोग केवळ स्वत:ची सत्ता आणण्यासाठी केला हे आता पुरेसं स्पष्ट झालंय. तसं नसतं तर अण्णांच्या लोकपालाला रामलीला मैदानावर येऊन लेखी पाठिंबा देणारा संघ आज मूग गिळून गप्प बसला नसता

श्रीगुरुजी 29/07/2016 - 14:51
हरितपत्र मिळविण्याचा एक नवीन सोपा उपाय - For the rich who want to be American citizens, here is the quickest way to have a Green Card. What one needs to do is to invest $500,000 to $1 million, depending on the U.S. government rules, in an employment-generating Regional Centre Program or have a direct investment to get a permanent residence Visa within 15 months under the EB-5 program. This is as compared to 7 to 10 years taken in employment-based and 15 to 20 years in family-based Green Cards. http://www.thehindu.com/news/national/short-route-to-green-card/article8912439.ece?utm_source=MostCommented&utm_medium=Homepage&utm_campaign=WidgetPromo

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 30/07/2016 - 15:39
http://www.thequint.com/india/2016/03/16/lalit-modi-is-now-a-citizen-of-malta-but-ed-still-wants-him-back The Republic of Malta, an archipelago in the central Mediterranean between Sicily and the North African coast, is known for historic sites. As per the law of the land, a person can get Malta citizenship by making investments in the country. The Malta Individual Investor Programme rules provide for affluent persons of impeccable standing and repute to be naturalised and to receive Maltese citizenship on the basis of a contribution to and investment in Malta. इस्ट इंडिया कंपनी स्थापन करुन दुसर्‍या देशात व्यापार करा व पैसे मिळवा . त्यापेक्षा नवा मॉडर्न ऑप्शन चांगला आहे. त्या देशात फ्रॉड करुन पैसे घेउन येणार्‍या माणसाला सिटिजनशिप द्या व ते पैसे गुंतवुन घ्या. छान

In reply to by मार्मिक गोडसे

प्रदीप 01/08/2016 - 16:14
दुनियेतील अनेक विकसीत देशात असली स्कीम सुरू असते. त्यात अजिबात काही नवीन नाही. 'नवीन' आता फक्त मोदी सरकार आहे, तेव्हा चंपाबाईंना ते सगळे नव्याने दिसत आहे. चालायचंच !

In reply to by श्रीगुरुजी

हेमन्त वाघे 01/08/2016 - 12:27
हे अनेक वर्ष पासून चालू आहे माझ्या एका मित्राने - ज्याची भारतात ऐक सॉफ्टवेर कंपनी होती - जी त्याला विकावी लागली - अशा तर्हेने अमेरिकन नागरिकत्व घेतले आहे यात तुम्हाला पैसे आदीकृतरित्या न्यावे लागतात , तसेच बऱ्यापैकी टॅक्स पडतो . आणि यात ग्रीन कार्ड नाही ( जे दुय्यम नागरिकत्व असते ) तर नागरिकत्व मिळते ..

श्रीगुरुजी 14/07/2016 - 20:37
धाग्याची सुरुवात खालील बातमीने करीत आहे. उत्तर प्रदेशात शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार उत्तर प्रदेश मध्ये जानेवारी-फेब्रुवारी २०१७ या महिन्यात विधानसभेची निवडणुक आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजिस्ट म्हणून नेमणुक केली आहे. प्रियांका गांधींना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केल्यास काँगेसला मोठा फायदा होईल असे त्यांनी सुचविले आहे. परंतु काँग्रेस अजूनही राहुल किंवा प्रियांका यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यास उत्सुक नाही. काँग्रेसने कोणालाही पुढे केले तरी काँग्रेसला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २०२ जागा मिळणे अशक्य आहे. काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष होणे सुद्धा अशक्य आहे. मागील ३ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अनुक्रमे ४०३ पैकी २५, २२ व २८ इतक्या कमी जागा मिळाल्या होत्या. अलिकडच्या काळात २००९ मधील लोकसभा निवडणुकीत ८० पैकी २० जागा ही काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉम्ग्रेसला फक्त २ जागा मिळाल्या. प्रियांकाचे नाव पुढे करून जर पुन्हा एकदा दारूण पराभव झाला (असेच होण्याची शक्यता सर्वाधिक आहे) तर पदार्पणात शून्यावर बाद झालेल्या फलंदाजाप्रमाणे प्रियांकावर पदार्पणातच अपयशाचा शिक्का बसेल. २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसची प्रचाराची संपूर्ण धुरा राहुल गांधींनी आपल्या खांद्यावर घेऊन सुद्धा काँग्रेसला फक्त २८ जागा मिळाल्या होत्या. अमेठी व रायबरेली लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात प्रियांकाने जोरदार प्रचार करूनसुद्धा कॉंग्रेसला फक्त २ जागा जिंकता आल्या होत्या. अशा परिस्थितीत प्रियांकाचे नाव पुढे केले तरी काँग्रेसला फारसा फायदा होणार नाही हे स्पष्ट आहे. म्हणूनच बळीचा बकरा या न्यायाने काँग्रेसने शीला दिक्षित यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करायचे ठरविले आहे. शीला दिक्षित ब्राह्मण असल्याने उ.प्र. मधील १०% अधिक असलेली ब्राह्मण मते आपल्याकडे वळतील असा काँग्रेसचा भोळा आशावाद आहे. अर्थात शीला दिक्षित केवळ लग्नानंतर ब्राह्मण झाल्या आहेत. लग्नापूर्वी त्या खत्री समाजातल्या होत्या हे आता माध्यमातून येईलच. त्यांची कारकीर्द भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांमुळे डागळलेली आहे. त्यामुळे त्यांना पुढे करूनही फार फायदा होणार नाही. जर काँग्रेसची परिस्थिती सुधारली तर श्रेय प्रियांकाच्या प्रचाराला व जर काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला तर दोष शीला दिक्षितांच्या माथी असेच काँग्रेसचे धोरण असणार आहे.

बोका-ए-आझम 14/07/2016 - 21:05
काँग्रेसने ब्राम्हण उमेदवार देणार ही अटकळ बरोबर ठरवलेली आहे. शीला दीक्षित यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने भाजपच्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या मतांमध्ये विभागणी करण्याचा आपला उद्देश स्पष्ट केला आहे असं मला वाटतंय. हा काँग्रेसचा नकारात्मक पवित्रा आहे पण एका म्हणीनुसार ' नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा झाली पाहिजे ' असं काँग्रेसचं धोरण आहे, विशेषतः दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून. गुरुजी - शीला दीक्षित या माहेरहून खत्री समाजाच्या आहेत याने काही फरक पडेल असं मला वाटत नाही. सोनिया गांधींच्या जन्माने विदेशी असण्याचा मुद्दा कोणालाही फायदेशीर ठरला नव्हता. उलट उत्तर प्रदेशसारख्या राज्यात ब्राम्हण बहू हा काँग्रेसचा मुद्दा असेल असे वाटते.

In reply to by बोका-ए-आझम

श्रीगुरुजी 14/07/2016 - 21:16
सपचे अखिलेश यादव, बसपच्या मायावती आणि आता काँग्रेसच्या शीला दिक्षित. फक्त भाजपने अजून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजप यावेळी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करेल असे वाटत नाही कारण भाजपकडे मायावती व अखिलेश यांच्या तुलनेत तगडा उमेदवार नाही. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जर तगडा असेल तरच आधी त्याचे नाव जाहीर करून फायदा असतो. अन्यथा तोटा होण्याचीच शक्यता जास्त.

"अरूणाचल मध्ये काँग्रेस सरकार बरखास्तीचा निर्णय घटनाबाह्य" --------सुप्रिम कोर्ट _____________________________________ अखलाक च्या कुटुंबियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी!!! प्राण्यांमध्ये भेदभाव नकोच,गायीचे मांस बाळगले म्हणून लोकांनी मारले. मुळात कोणत्याच प्राण्याचे मांस खाऊ नये. आणि आता त्याच्या कुटूंबियांना छळत आहेत.

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 15/07/2016 - 17:49
उत्तर प्रदेशात गौवध बंदी कायदा आहे. त्यानुसार कार्रवाई होणारच. बाकी तिथे कुणी मारायला गेले नव्हते, कुणाही जवळ तलवारी किंवा कट्टे इत्यादी नव्हते. तो जर मेला नसता तर गौ. हत्याची FIR तेंव्हाच दायर झाली असती.

काळ्या पैसा शोधण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी ) तीन लाख रुपयांवरील रोख व्यवहारांवर बंदी आणण्याची शिफारस केली आहे . शिवाय, एखाद्या व्यक्तीकडे 15 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम ठेवण्यास मनाई करण्याचीही शिफारस केली आहे .

फ्रांसच्या नीस गावी बॅस्टील डे परेड पाहायला आलेल्या गर्दीवर ट्रक चढवून एक दहशतवादी हल्ला झाला आहे, ट्रक मध्ये ग्रेनेड आणि इतर स्वयंचलित हत्यारे सापडली आहेत, राष्ट्राध्यक्ष फ्रांझवा ओलांद ह्यांनी इमर्जन्सी अजून पुढे पर्यंत सुरु ठेवायचे सूतोवाच केले आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सदर हल्ल्यात ८० निष्पाप लोकांनी प्राण गमावले असून इतर १०० लोकं जखमी झाल्याचे वृत्त कळते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पद्मावति 16/07/2016 - 20:42
बळी पडलेल्या लोकांमधे लहान मुलांचा समावेश बराच होता. बिचारे मुलं fire works बघायला आली असतील:( या अतिरेक्यांचा पापाचा घडा आहे का अक्षय पात्र काही कळेना ....भरतच नाहीये:(

हुप्प्या 15/07/2016 - 10:35
ह्या भीषण प्रसंग घडल्यावर लोकसत्तामधे अशी बातमी होती की फ्रान्समधे ट्रक अपघातात ७६ ठार! (आता ती काढून टाकली आहे) ट्रक अपघातात ७६ लोक कसे मरतील अशी शंका कशी आली नाही? घातपात असल्याची खात्रीच पटायला हवी होती. असो. पण कुणी केला असेल हा हल्ला? कर्मठ ब्राह्मण? हिंदू सनातनी? की महायान वा हीनयान वाले बौद्ध लोक? का श्वेतांबर वा दिगंबर जैन? शीख अतिरेकी? का कडवे नास्तिक? की हे कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमधले लफडे आहे? काही कळत नाही. इतकी हिंसक मानसिकता कुठल्या गटाकडे आहे हे सुचतच नाही बुवा! कदाचित ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून हे भयंकर घडले असेल.

In reply to by हुप्प्या

....हे भयंकर घडले असेल." छे हो. उलट ती लोकच ट्र्कच्या मार्गा-मध्ये आली असतील.

बोलबोलेरो 15/07/2016 - 11:55
"ट्रक अपघातात ७६ लोक कसे मरतील अशी शंका कशी आली नाही? घातपात असल्याची खात्रीच पटायला हवी होती. असो. पण कुणी केला असेल हा हल्ला? कर्मठ ब्राह्मण? हिंदू सनातनी? की महायान वा हीनयान वाले बौद्ध लोक? का श्वेतांबर वा दिगंबर जैन? शीख अतिरेकी? का कडवे नास्तिक? की हे कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमधले लफडे आहे? काही कळत नाही. इतकी हिंसक मानसिकता कुठल्या गटाकडे आहे हे सुचतच नाही बुवा! कदाचित ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून हे भयंकर घडले असेल." उत्तम उपहास! हहपुवा. फ्रान्सच्या निसमधील हत्याकांडाला बळी पडलेल्यांना श्रद्धांजली! परंतु यातून युरोप काही शिकणार का? की परत एखादा "अयलान कुर्दी" झाल्यानंतर भावनिक अविचार करायला प्रवृत्त होणार? दुवा http://qz.com/554555/france-has-doubled-down-on-its-promise-to-syrian-refugees-after-the-paris-attacks/

शिद 15/07/2016 - 16:23
a शुक्रवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवड येथील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या घरात घुसून चार ते पाच जणांनी अपहरण करून नंतर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास भोसरी येथील राहत्या घरातून फुगे यांना चार ते पाच जणांनी बळजबरीने बाहेर काढले, अशी माहिती त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सीमा फुगे यांनी पोलिसांना दिली. दिघीच्या भारतमातानगरमध्ये रात्री बाराच्या सुमारास फुगे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. तसेच दगड घालून डोक्‍याचा चेंदामेंदा करून हल्लेखोर पसार झाले. घटना स्थळावर पोलिसांना कोयता मिळाला आहे. पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व फुगे यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची शोधपथके रवाना झाली असून पहाटेपर्यंत तरी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. दिघी येथील भारतमाता नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या आर्थिक वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोन्याचा शर्ट तयार केल्याने फुगे जगभर गाजले होते. फुगे हे खासगी सावकारीचा व्यवसाय करीत असत. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंड फंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून तसेच व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी हल्लेखोरांबरोबर फुगे यांचे पैशांवरून भांडण झाले होते, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

In reply to by शिद

चंपाबाई 15/07/2016 - 20:55
कलियुग सुरु होण्यापुर्बी कलिने जनमेजयाकडे आश्रयाची याचना केली होती. त्याने कलिला सोन्यात रहायला सांगितले होते. अंगभर सोने घालुन राजकारण करताना अपमृत्यू झाल्याचे हे दुसरे उदाहरण. ... इति श्री हिंदु पुराणम.

विवेकपटाईत 15/07/2016 - 17:56

संस्कृत भाषेला अच्छे दिन आले,

कालच रात्री आठ वाजता बाबा रामदेवांचे प्रवचन ऐकत होतो. पुढील १० वर्षांत १००० जवळ आचार्यकुलम् उघडण्याचा त्यांचा विचार आहे. (सध्या १ कार्यरत २०१३ पासून, ९ निर्माणाधीन). या शिवाय काही हजार संस्कृत ग्रंथांचे (जुन्या पांडूलिपींचे डीजीटीलाईजेशन करायचे आहे). (याच महिन्यात १३ जुनी पुस्तके प्रकाशित केली आहे) २०,०००हून जास्त संस्कृत शिक्षक/विद्वानांची गरज त्यांना भासणार आहे. १२वी नंतर संस्कृत भाषा शिकायला हरकत नाही.

श्रीगुरुजी 15/07/2016 - 23:16
This is the second reduction in rates this month. Petrol price was cut by 89 paise a litre and diesel by 49 paise on July 1. Petrol price was on Friday cut by Rs. 2.25 a litre and diesel by 42 paise a litre, the second reduction in rates this month on global cues.

In reply to by भंकस बाबा

खरं आहे तुमचं म्हणणं, पण तुम्हाला कधी स्वधर्माची चिकित्सा करताना पाहिलं नाही.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

भंकस बाबा 17/07/2016 - 10:26
टक्केवारी द्या ना स्वधर्माची चिकिस्या करायला, आपण नक्की करु, कशाला मी आमच्या घरात पितृपक्ष, नागपंचमी अशा प्रथा हट्टाने बंद केल्या आहेत. देवळात जाणे बंद केले आहे, आता तुम्ही एक मशिद दाखवा की ज्यात भोंगे वाजत नाहीत, मंदिरे मी दाखवायला तयार आहे. हां सर्वधर्मसम्भाव सोडा, हिन्दुमधील पुष्कळानी कट्टरवाद सोडला आहे. मुस्लिमानी सोडला असला तरि जाहिर करण्याचे धाडस फार् कमी लोकांनी केले आहे. रच्याकने झाक्याचे प्रवचन फ़ॉर द चेंज कॉमेडी शो म्हणुन बघायला हरकत नाही

In reply to by भंकस बाबा

चेक आणि मेट 17/07/2016 - 18:19
खरं आहे, मुस्लिम धर्मात कट्टरतावाद अधिक आहे, ते कधीही धर्माची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करीत नाहीत,त्यामानाने हिंदू आणि ख्रिश्चनांच्यात नास्तिकता जास्त आहे.देवाविरूद्ध बोलणे हाच जगन्य अपराध आहे असे मानतात ते.

In reply to by भंकस बाबा

चंपाबाई 17/07/2016 - 19:32
एकदा दत्तगुरु मॉर्निंग वॉकला चालले होते... समोरुन एक मिरवणुक वाद्ये वाजवत जात होती.. पण रस्त्याच्या कडेला बसलेला एक चांभार एकाग्रतेने त्याचे काम करत होता. त्याला तो कोलाहल ऐकु येत नव्हता. दत्तगुरुनी त्याला आपल्या गुरुस्थानी मानले. तात्पर्य : हिंदु धर्मावर अढळ श्रद्धा असुनही मशिदीचे भोंगे ऐकू येत असतील तर आपली एकाग्रता कमी पडत आहे... कृप्या एकाग्रता व श्रद्धा वाढवावी. होमवर्क : दत्ताने केलेले इतर २३ गुरु कोणते ?

In reply to by चंपाबाई

भंकस बाबा 17/07/2016 - 20:27
एकाग्रतेने मशिदिचा भोंगा वाजत असताना अभ्यास कसा करावा हे शिकवा, आमच्या घरातील आबालवृद्धाना सकाळी पाच वाजता भोंगा वाजल्यावर साखरझोप न मोड़ता स्थितप्रज्ञ रहायला शिकवा,

In reply to by भंकस बाबा

भोंगा किती वेळ वाजतो ओ. सकाळी दोन मिनटं,आणि पाच वाजता दोन मिनटं! झालं कि, पारायणे आठवडाभर चालतात भोंगे लावून ते चालतं का?? आणि किती पारायणे/कार्यक्रम होतात,,,तुकाराम बीज,रामनवमी,गणेश चतुर्थी,रामदास नवमी,एकादशी,संकष्टी,षष्ठी,हनुमान जयंती,काकड आरती,फाकड आरती,गोंधळ,शिमगा,धुळवड,रंगपंचमी,म्हसोबा,खंडोबा, ज्योतिबा,मरगूबाई,यल्लमा,इइइइइ आणि शिमग्याला तर किती ते ध्वनीप्रदूषण?? कोणी मेलं नसलं तरीही ठ्ठो ठ्ठो ?? कशाला फुक्कटचा पुरोगामित्वाचा आव आणताय?

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

भंकस बाबा 18/07/2016 - 01:51
अहो आजकाल मदरशावर देखिल भोंगे लावुन लाखो सलाम घातले जातात, ते पण सकाळच्या पारी, तुम्ही फारच त्रासलेले दिसताय, कानाजवळ एक भोंगा ठेऊन वाजवा , बहिरेपणा आला की सगळे त्रास दूर होतील, बायको बड़बडु देत की सासरा बोम्ब ठोकु दे

viraj thale 16/07/2016 - 08:42
काश्मीरमध्ये चकमकित मारला गेलेला आतंकवादी बुरहान वाणी पकिस्तान कडून हुतात्मा म्हणून घोषित .

बोका-ए-आझम 16/07/2016 - 08:55
NEET च्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय देताना राज्यांना त्यांच्या वैद्यकीय प्रवेशपरीक्षा घ्यायला परवानगी दिली. ९ मे या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने NEET ही एकमेव वैद्यकीय प्रवेश परीक्षा असेल असं जाहीर केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. २४ मे या दिवशी केंद्र शासनाने एक वटहुकूम काढून राज्यांनाही त्यांच्या वैद्यकीय प्रवेशपरीक्षा घेण्याची परवानगी दिली. काही राज्यांनी त्यांच्या प्रवेशपरीक्षा ९ मेच्या आधीच घेतलेल्या असल्यामुळे हा इतर राज्यांवर अन्याय होईल अशी भूमिका केंद्राने घेतली. केंद्र सरकारच्या वटहुकूमावर प्रतिबंधात्मक आदेश (stay) आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला गेला. आणि आता त्या वटहुकूमावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाने राज्यांचा स्वतःच्या परीक्षा असण्याचा मार्ग सुकर केलेला आहे.

श्रीगुरुजी 16/07/2016 - 11:27
नऊ महिन्यांनंतर हार्दिक पटेल तुरुंगाबाहेर
देशद्रोहाच्या आरोपाखाली ९ महिने तुरूंगात राहून जामीनावर सुटल्यानंतरसुद्धा अजूनही हार्दिकची खुमखुमी कायम आहे. त्याला ६ महिने गुजरातबाहेर रहावे लागणार आहे. देशद्रोहाचा आरोप अजूनही कायम आहे. द्वितीय श्रेणीत बी. कॉम. पास झालेल्या हार्दिकला गुणवत्तेवर होणारा अन्याय या विषयावर बोलायचा अधिकार तरी आहे का? _________________________________________________________________________________ पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याची नऊ महिन्यांच्या कारावासानंतर येथील लाजपूर तुरुंगातून सुटका झाली. यावेळी हे आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, मला ‘५६ इंचांची छाती’ नको असून माझ्या समुदायाचे अधिकार हवे आहेत, असा टोला त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारला. पाटीदार समुदायाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण मिळावे या मागणीसाठीचे आंदोलन आपण सुरूच ठेवणार असल्याचे जामीन मिळून तुरुंगाबाहेर आलेल्या हार्दिक (२२) याने सांगितले. पाटीदार समाज ज्यांना आपलेच भाईबंद असल्याचे मानतो, त्या कुर्मी समुदायाला सहभागी करून हा लढा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे संकेतही त्याने दिले. हार्दिकविरुद्धचे देशद्रोहाचे दोन गुन्हे आणि पाटीदार आंदोलनादरम्यान विसानगर येथील आमदाराच्या कार्यालयातील हिंसाचाराचे एक प्रकरण यामध्ये हार्दिकला जामीन मंजूर करून गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. येत्या सहा महिन्यांसाठी हार्दिकने गुजरातबाहेर राहावे, अशी अट न्यायालयाने घातली होती. या अटीनुसार, हा तरुण नेता येत्या सहा महिन्यांसाठी राजस्थानच्या उदयपूर शहरात राहील, असे त्याच्या वकिलाने स्थानिक न्यायालयाला सांगितले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/hardik-patel-released-from-jail-1268273/

In reply to by श्रीगुरुजी

द्वितीय श्रेणीत बी. कॉम. पास झालेल्या हार्दिकला गुणवत्तेवर होणारा अन्याय या विषयावर बोलायचा अधिकार तरी आहे का?
ऑ तसं तर काहींनी मंत्री होण्याचा पण नैतिक अधिकार नाही.आणि मंत्रीपद देण्याचा पण.

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 16/07/2016 - 21:19
द्वितिय श्रेणीतील असली तरी निदान खरी डिग्री आहे. डिग्रीचे कागद गायब , रविवारी मिळालेली डिग्री .. असे चावट प्रकार नाहीत. . .. एका बडबड्या बाईंना नुकतेच मंत्रीमंडळातुन बाजुला ढकलले. त्यांची डिग्री बिए की बिकॉम ?

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 16/07/2016 - 22:02
द्वितिय श्रेणीतील असली तरी निदान खरी डिग्री आहे. डिग्रीचे कागद गायब , रविवारी मिळालेली डिग्री .. असे चावट प्रकार नाहीत. . .. एका बडबड्या बाईंना नुकतेच मंत्रीमंडळातुन बाजुला ढकलले. त्यांची डिग्री बिए की बिकॉम ?

श्रीगुरुजी 16/07/2016 - 15:08
पाकिस्तानची पूनम पांडे http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4615728673501636712&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20160716&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%20%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%20%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE

In reply to by श्रीगुरुजी

अभ्या.. 17/07/2016 - 00:27
कंदील बलोच च्या मर्डर नंतर युट्युबवर प्रतिक्रिया भारी आहेत. . नाव मात्र भारिय राव. कंदील, आहाहाहा

संदीप डांगे 17/07/2016 - 00:19
मोदी सरकारने तूर डाळ उत्पादनाचा मेक इन आफ्रिका कार्यक्रम सुरु केलाय म्हणे! कांदाप्रश्नाबद्दल शेतकरी आधीच भाजप सरकारवर उखडलाय. त्यात आणि हे.... https://furtherafrica.com/2016/06/27/india-hopeful-of-long-term-tur-dal-supply-from-mozambique/

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 17/07/2016 - 14:42
जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे. Under pressure to control pulses prices, the Centre is hopeful of clinching a long-term deal with Mozambique for assured supply of lentils after the two countries had positive talks last week. Indian delegations last week visited pulses growing nations, Mozambique and Myanmar, to explore government-to- government arrangement for assured supply of lentils, especially tur, on a long term basis. तूर व इतर डाळीचे देशांतर्गत उत्पादन कमी असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. खात्रीशीर आयातीसाठी आफ्रिकेतील देशांशी करार करणे हे एक चांगले पाऊल आहे. त्यावर टीका करण्यासारखे काय आहे? काही जणांना मोदी सरकारचे मीठ कायमच अळणी लागते. त्यात मीठाचा दोष आहे का खाणार्‍याच्या जीभेचा दोष आहे?

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 17/07/2016 - 18:14
काँग्रेसच्या काळातही डाळ आयात करुन दर १०० रु होता... आता अचानक २०० व्हायला आणि अजुन आयात करायला आणखी काय कारण घडले?

In reply to by चंपाबाई

विकास 31/08/2016 - 21:31
तूरडाळीच्या दरघसरणीस सुरुवात या बातमीतील खालील भाग (त्यातही बोल्ड केलेला भाग) वाचण्यासारखा आहे... जाणकारांनी प्रकाश टाकावा! ;)
केंद्र शासनाने डाळ आयातीस परवानगी दिल्याने मोठय़ा प्रमाणात डाळीची आवक झाली असून देशांतर्गत असलेल्या दरापेक्षा आयात डाळीचे दर कमी आहेत. यामुळे बाजारपेठेतील गणिते बदलली आहेत. नवे उत्पादन त्यातच या आयात डाळीची भर याच्या भीतीने व्यापाऱ्यांनीही आपली गोदामे खुली करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे डाळीची मुबलक उपलब्धता आहे.
असो.

In reply to by विकास

संदीप डांगे 31/08/2016 - 23:12
जे काय व्हायचे ते नुकसान होऊन गेलंय, डॅमेज कंट्रोलने आता काही उपयोग नाही, दालप्रकरण काही अजरामर राहणार नव्हते, आता पुढची कमोडिटी कोणती ते बघणे आले,

In reply to by संदीप डांगे

विकास 01/09/2016 - 01:27
जे काय व्हायचे ते नुकसान होऊन गेलंय अगदी मनातलं बोललात, युपिएच्या दहा वर्षांमधे जे काही नुकसान होयचे होते ते झाले हे खरेच आहे! डॅमेज कंट्रोलने आता काही उपयोग नाही ह्या सरकारने डॅमेज कंट्रोल केलेला नसून आत्तापर्यंत जी काही, काहीजणांसाठींची (पक्षी: व्यापार्‍यांच्या स्वार्थासाठी) व्यवस्था होती, तीलाच शह देत त्यात बदल घडवून आणला. आता त्याचे परीणाम लगेच दिसत नव्हते हे देखील खरेच. पण नुसताच डॅमेज कंट्रोल करायचा असता तर काही तरी तात्पुरती पलमपट्टी लावली असती, दोन चार व्यापार्‍यांना - मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे काहीसे करून मोकळे झाले असते. असो.

In reply to by संदीप डांगे

मोदक 01/09/2016 - 14:16
कांही लोकांबद्दल सार्वकालीक असेल.. काही लोकांसाठी मोदींचे फॅसीस्ट आणि हुकूमशाही सरकार पडून प्रतिभावान आणि समंजस राहुलचंद्ररावजी गांधींचे काँग्रेस रामराज्य येईपर्यंत असेल.. कांही लोकांसाठी आजादी येईपर्यंत असेल...

In reply to by मोदक

सर्वलोकांसाठी सार्वकालिक असणे अन हे सत्य समजणे ह्यातच माझेतरी भारतीयत्व वसते :) जय हिंद :)

In reply to by विकास

श्रीगुरुजी 01/09/2016 - 14:21
डाळीचे भाव वाढले होते तेव्हा प्रॉब्लेम होता आणि काही जण सरकारला नावे ठेवीत होते. आणि आता भाव घसरले आहेत तेव्हाही प्रॉब्लेम आहेच आणि आताही सरकारला नावे ठेवणे सुरूच आहे.

In reply to by मोदक

श्रीगुरुजी 01/09/2016 - 14:33
जानेवारी-फेब्रुवारी २०१७ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तरांचल व पंजाब राज्यांची विधानसभा निवडणुक आहे. याच काळात महाराष्ट्रातील १० महानगरपालिकेची निवडणुक आहे. त्यामुळे निधर्मांधांचे पुरस्कार परतीचे दुसरे सत्र डिसेंबर २०१६/जानेवारी २०१७ या कालखंडात सुरू होईल व मतदानाच्या शेवटच्या दिवशी ते थांबून परत नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये तिसरे सत्र सुरू होईल. .

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 17/07/2016 - 21:05
जंप कसली? तुम्ही दिलेल्या बातमीच्या आधारेच मी प्रतिसाद लिहिलाय. त्यातलेच काही परिच्छेद मी दिलेत. स्वतःच्या मनाचे त्यात काहीही टाकलेले नाही.

In reply to by संदीप डांगे

जेपी 18/07/2016 - 20:44
काय डांगे साब, कांदा उत्पादक उखडले आहेत की लासलगाव बाजारसमिती, तुमी बरेच फिरता आणी अभ्यास पण करता.तरीही अभ्यास वाढवा. -टिप -आंजावरील बातम्या वाचुन मी माझे मत बनवत नाही याची नोंद घ्यावी.

In reply to by जेपी

संदीप डांगे 18/07/2016 - 22:23
काय जेपी भौ..? कांदा उत्पादक उखडले आहेत की लासलगाव बाजारसमिती, तुम्हीच सांगा. तुमी बरेच फिरता आणी अभ्यास पण करता.तरीही अभ्यास वाढवा. टोमणा आहे असं दिसतंय. असो. -टिप -आंजावरील बातम्या वाचुन मी माझे मत बनवत नाही याची नोंद घ्यावी. तुम्ही तुमचे मत कसे बनवता याचे इथे काय प्रयोजन ते कळले नाही.

संदीप डांगे 18/07/2016 - 00:42
श्रीगुरुजी. थोडं थांबा म्हणलो होतो. अधिकचे बोललात, आता पंचाईत होईल बघा. प्रथमतः मोझांबिक हे आफ्रिकेत नाही हे तुम्ही सांगितल्यापासून मला दहावी भूगोलात (+इतिहासात) मिळालेल्या १३० (१५० पैकी) गुणांवर प्रथमच अविश्वास वाटला. मग गुगलबाबाला विनंती केली माझे अज्ञान दुर करावे म्हणून. तसेच तुमचेही दुर होवो म्हणून हा वसा धरा हाती. दुसरे असे की संबंधित देशांत तूर 'उत्पादन होणार नसून' ते देश 'खात्रीशीर पुरवठा' करणार आहे असे तुम्हाला वाटले ह्याबद्दलही आश्चर्य वाटावे काय असेही वाटले. ते देश म्हणजे जणू भारतनामे देशात साठमारी करणारे नेहमीचेच व्यापारी असावेत असे तुमच्या विधानांवरुन वाटले. 'उत्पादन न करता पुरवठा करणार' म्हणजे व्यापारीच म्हणायचे नाही का? मघाशी घाइत एकच लिंक चिटकवू शकलो. तेवढ्यात तुम्ही मोदी सरकारच्या मिठाच्या अळणी नसण्यापर्यंत छातीठोक पोचलात. गुड. आय लाईक यो'र स्पिरिट! १. दुवा क्रमांक एकः India and Mozambique on Thursday signed an agreement where New Delhi will buy pulses from the southern African nation. The agreement, one of the three, was signed in Maputo. Prime Minister Narendra Modi, currently on a four-nation Africa visit, said: "India's commitment to buy pulses from Mozambique would help meet India's requirement. It will also facilitate long-term investments in commercial farming, generation of farm employment and raise farmers' incomes in this country (Mozambique)," he said. According to the agreement, India will encourage greater production of pulses in Mozambique with an assurance that it will be purchased by India at a mutually-agreed price. While India generally has a shortfall of pulses leading to price rise, Mozambique grows the commodity without much consumption locally, officials said, adding the agreement will be a "win-win" for the two countries. Last month, the Union Cabinet cleared a proposal to enter into an agreement with Mozambique for importing 100,000 tonnes of pulses in 2016-17 with an option to scale it up to 200,000 tonnes by 2020-2021. The agreement will promote production of pigeon peas or tur in Mozambique. These would be imported either through private channels or through nominated state agencies, an official statement issued after the Cabinet meeting said. २. दुवा क्रमांक दोन प्रस्तुत दुवा मुळातून वाचावा. दोन देशांमधे झालेल्या करारानुसार भारत मोझांबिकमधे तूरडाळीच्या शेतीला प्रोत्साहन देणार असून मूलभूत गरजा, मार्गदर्शन, इ पुरवण्यासोबतच शेतकर्‍यांकडून डाळ विकत घेतलीच जाईल असे आश्वासनही देत आहे. करारामधे ह्या गोष्टी नमूद आहे. ही डाळ भारतालाच विकावी अशी अट आहे म्हणजे ती भारताने विकत घेतलीच पाहिजे अशीही अट आहे. मग इथे भारतीय शेतकर्‍याने कितीही उत्पादन करो. मोझांबिकमधल्या शेतकर्‍यांना सर्व सुविधा देऊन त्यांच्या कडून डाळ विकत घेण्याची हमी जर भारत सरकार देऊ शकते पण तेच भारत सरकार आपल्याच देशातल्या शेतकर्‍यांना त्याच प्रकारे मदत करु शकत नाही हे विचित्र नाही? केवळ मध्यस्थ व्यापार्‍यांचा खिसा भरावा आणि शहरी मध्यमवर्गाला आम्ही काहीतरी करतोय असे दाखवण्याच्या तिकडमबाजीत भारतीय शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देणार्‍या सरकारने हा करार करुन नेमके काय व कोणाचे भले करायचे ठरवले आहे? (रोजच्या रोज कैक शेतकर्‍यांना "शरद पवार कृषीमंत्री असतांना बरे होते" असे म्हणतांना ऐकत आहे. हे ऐकून वाईट वाटावे का चांगले ह्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.)

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव 18/07/2016 - 11:36
पण अफ्रिकन देशांत ऊस आणि इतर नगदी पिकं हमी भावात मिळवण्याची कॉर्पोरेट लेव्हल शेती करावी हि योजना बारामतीकर काकांची. कदाचीत त्यांनीही कुठुन तरी उचलली असेल, कोण जाणे. इथेनॉल व तत्सम जैवइंधनाची सोय म्हणुन मोठ्या पेट्रोलियम कंपन्या अगोदरच अफ्रिकन देशांवर डोळा ठेऊन आहेत. चीन ने देखील अफ्रीकन देशांत मुसंडी मारली आहे. भारताने याअगोदर बहुतेक कांगो वगैरे देशांशी असले करार करायचे प्रयत्न केले होते. थोडक्यात काय, कि अफ्रिकन देशांशी हमी भावातली शेती हि केवळ आपली भोजनाची सोय नसुन त्यामागे बरेच आंतरराष्ट्रीय आराखडे आहेत.
(रोजच्या रोज कैक शेतकर्‍यांना "शरद पवार कृषीमंत्री असतांना बरे होते" असे म्हणतांना ऐकत आहे. हे ऐकून वाईट वाटावे का चांगले ह्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.)
तसं वाटणं सहाजीक आहे. पवारांसारखा कृषीमंत्री मिळणं अवघड आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 18/07/2016 - 18:39
प्रथमतः मोझांबिक हे आफ्रिकेत नाही हे तुम्ही सांगितल्यापासून मला दहावी भूगोलात (+इतिहासात) मिळालेल्या १३० (१५० पैकी) गुणांवर प्रथमच अविश्वास वाटला. मग गुगलबाबाला विनंती केली माझे अज्ञान दुर करावे म्हणून. तसेच तुमचेही दुर होवो म्हणून हा वसा धरा हाती.
अरेच्चा! मी कधी म्हणालो मोझांबिक हे आफ्रिकेत नाही म्हणून. तुम्हाला इभू मध्ये १५० पैकी २३० गुण सुद्धा असतील. पण म्हणून मी कधी म्हणालो की मोझांबिक हे आफ्रिकेत नाही.
दुसरे असे की संबंधित देशांत तूर 'उत्पादन होणार नसून' ते देश 'खात्रीशीर पुरवठा' करणार आहे असे तुम्हाला वाटले ह्याबद्दलही आश्चर्य वाटावे काय असेही वाटले. ते देश म्हणजे जणू भारतनामे देशात साठमारी करणारे नेहमीचेच व्यापारी असावेत असे तुमच्या विधानांवरुन वाटले. 'उत्पादन न करता पुरवठा करणार' म्हणजे व्यापारीच म्हणायचे नाही का?
अहो, तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये तेच लिहिलेले आहे. मी स्वतःच्या मनाचे काहीही लिहिलेले नाही. तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये जे आहे तेच मी फक्त मराठीत लिहिले आहे.
मघाशी घाइत एकच लिंक चिटकवू शकलो. तेवढ्यात तुम्ही मोदी सरकारच्या मिठाच्या अळणी नसण्यापर्यंत छातीठोक पोचलात. गुड. आय लाईक यो'र स्पिरिट!
तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिसादाची वेळ - संदीप डांगे - Sun, 17/07/2016 - 00:19 यावरचा माझा प्रतिसाद १४ तासानंतर दिला - श्रीगुरुजी - Sun, 17/07/2016 - 14:42 घाईघाईत एकच लिंक दिली होती, तर दुसरी लिंक १४ तासानंतर सुद्धा आलेली नव्हती. जी पहिली लिंक होती त्यावरच मी प्रतिसाद दिला आहे. पहिल्या लिंकमधील फोलपणा मी दाखवून दिल्यानंतरच आता हा पुढचा प्रतिसाद आला आहे. गुड! आता दुसर्‍या लिंकबद्दल . . .
दोन देशांमधे झालेल्या करारानुसार भारत मोझांबिकमधे तूरडाळीच्या शेतीला प्रोत्साहन देणार असून मूलभूत गरजा, मार्गदर्शन, इ पुरवण्यासोबतच शेतकर्‍यांकडून डाळ विकत घेतलीच जाईल असे आश्वासनही देत आहे. करारामधे ह्या गोष्टी नमूद आहे. ही डाळ भारतालाच विकावी अशी अट आहे म्हणजे ती भारताने विकत घेतलीच पाहिजे अशीही अट आहे. मग इथे भारतीय शेतकर्‍याने कितीही उत्पादन करो. मोझांबिकमधल्या शेतकर्‍यांना सर्व सुविधा देऊन त्यांच्या कडून डाळ विकत घेण्याची हमी जर भारत सरकार देऊ शकते पण तेच भारत सरकार आपल्याच देशातल्या शेतकर्‍यांना त्याच प्रकारे मदत करु शकत नाही हे विचित्र नाही? केवळ मध्यस्थ व्यापार्‍यांचा खिसा भरावा आणि शहरी मध्यमवर्गाला आम्ही काहीतरी करतोय असे दाखवण्याच्या तिकडमबाजीत भारतीय शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देणार्‍या सरकारने हा करार करुन नेमके काय व कोणाचे भले करायचे ठरवले आहे?
भारतात बहुतेक वर्षी मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी असल्याने वेगवेगळ्या डाळींची आयात करावी लागते. ज्या ज्या वर्षी कमी पाऊस पडतो, त्या त्या वर्षी स्थानिक उत्पादन अजून कमी होऊन भाववाढ होते व मोठ्या प्रमाणावर डाळी आयात कराव्या लागतात. अशा परिस्थितीत भारताने मोझांबिक व म्यानमारसारख्या डाळी पिकविणार्‍या देशांशी करार करून खात्रीशीर डाळी आयातीची पावले उचलली असतील तर ते स्वागतार्ह आहे. या करारामुळे भारतीय शेतकर्‍याच्या पोटावर पाय येईल हा तर्क अनाकलनीय आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे 18/07/2016 - 19:20
१.
अरेच्चा! मी कधी म्हणालो मोझांबिक हे आफ्रिकेत नाही म्हणून. तुम्हाला इभू मध्ये १५० पैकी २३० गुण सुद्धा असतील. पण म्हणून मी कधी म्हणालो की मोझांबिक हे आफ्रिकेत नाही.
खालील विधाने आपल्याच प्रतिसादात आहेत. जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे. आता मी दिलेल्या बातमीत आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नाही असे कुठे लिहिले आहे ते दाखवाल काय? तसेच मोझाम्बिक जर आफ्रिकेतच आहे तर 'आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नाही' असे तुम्ही का म्हणालात? २.
तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिसादाची वेळ - संदीप डांगे - Sun, 17/07/2016 - 00:19 यावरचा माझा प्रतिसाद १४ तासानंतर दिला - श्रीगुरुजी - Sun, 17/07/2016 - 14:42 घाईघाईत एकच लिंक दिली होती, तर दुसरी लिंक १४ तासानंतर सुद्धा आलेली नव्हती. जी पहिली लिंक होती त्यावरच मी प्रतिसाद दिला आहे. पहिल्या लिंकमधील फोलपणा मी दाखवून दिल्यानंतरच आता हा पुढचा प्रतिसाद आला आहे. गुड!
कसंय गुरुजी, मला तूरडाळीवर मोठाच प्रतिसाद लिहायचा होता. पण रात्रीचे साडेबारा वाजल्याने व दुसर्‍या दिवशी पहाटेच घराबाहेर पडावे लागत असल्याने हा अर्धवट लिहून टाकला. लिन्क्स चेक करुन वाचून अभ्यासून नीट टाकाव्या ह्या मताचा मी असल्याने उर्वरित काम उद्या करु असे ठरवून सोडून दिले. तसेच आजकाल मी खेड्यापाड्यांमधे फिरत असल्याने इंटरनेट मिळत नाही. मिळाले तरी फोनवरुन जुजबी चेक करतो, तेही वेळ असल्यास. थेट संध्याकाळीच लॅपटॉप व ब्रॉडबॅण्ड मिळत असल्याने दिर्घ प्रतिसाद संध्याकाळनंतरच देता येतात. त्यामुळे चौदा काय चोविसतासांनी जरी लिंक आली असती तरी काही फरक पडावयास नको किंवा प्रतिसाद अर्धवट असला तरी बोंबाबोंब व्हावयास नको. कारण बातमी काही माझ्या घरातली नाही. तूरडाळीच्या आफ्रिका-भारत करारावर चिक्कार लिन्का पडलेल्या आहेत. मी दिली नाही ह्याचा अर्थ तुम्हीही अभ्यास केला नाही असे दिसते. तुम्हाला 'वेट वेट' म्हणालो ते मोबाईलवरुन टायपले होते. तुमच्या उतावळेपणाने तुम्हीच अडकलात, वरुन अमुक तासांत लिन्का आल्या नाहीत चा फुकाचा कांगावा करत आहात. ह्याला काय म्हणावे बरे? मुद्द्याचे: पहिल्या लिन्कमधे कोणता फोलपणा आहे (जो तुमच्यामते तुम्ही दाखवून दिलाय) तेही कळले तर बरे होईल. ३.
भारतात बहुतेक वर्षी मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी असल्याने वेगवेगळ्या डाळींची आयात करावी लागते. ज्या ज्या वर्षी कमी पाऊस पडतो, त्या त्या वर्षी स्थानिक उत्पादन अजून कमी होऊन भाववाढ होते व मोठ्या प्रमाणावर डाळी आयात कराव्या लागतात. अशा परिस्थितीत भारताने मोझांबिक व म्यानमारसारख्या डाळी पिकविणार्‍या देशांशी करार करून खात्रीशीर डाळी आयातीची पावले उचलली असतील तर ते स्वागतार्ह आहे. या करारामुळे भारतीय शेतकर्‍याच्या पोटावर पाय येईल हा तर्क अनाकलनीय आहे.
डाळ उत्पादनाचे व पुरवठ्याचे चक्र जरा सोन्याबापुंकडून मागच्याच वेळेस नीट समजवून घेतले असते तर असली भंपक विधाने करायची वेळ आली नसती, गुरुजी. मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी होतो तर त्यावर तयार डाळीची ताबडतोब थेट आयात करणे वेगळे व परक्या देशात सर्व प्रकारच्या सुविधा देऊन परदेशी शेतकर्‍यांना खरेदीच्या खात्रीसह हमीभावही देणे हे वेगळे हे इतकेही कसे समजत नाही? 'घरची म्हणते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा' असा प्रकार का म्हणून चाललाय इतकाच माझा मुद्दा होता. हा करार आणि तूर डाळ, आधी नीट समजून घ्या नंतर चर्चेला या.

In reply to by संदीप डांगे

चंपाबाई 18/07/2016 - 19:42
आज जी तूर खातो ती गेल्या वर्षी पिकलेली असते... मग अचानक पाउस कमी / जास्त झाला म्हणुन यावर्षीची तूर का महाग होते ? आयत्या वेळेची क्याजुअल्टी म्हणुन डाळ आयात करणे व दुसर्‍या देशाला आर्थिक मदत आधीच देउन तिथे तूर पिकवणे हे दोन्ही भिन्न आहेत व हे म्हणजे घरातलं नागडं व शेजारणीला लुगडं असा प्रकार आहे.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 18/07/2016 - 19:48
राजकारण राजकारण्यांसाठी सोडून द्या. प्रत्यक्ष भारतात डाळींचे उत्पादन होणे आणि डाळींची टंचाई दूर होण्याला काही काळ जावा लागेल आफ्रिकेत( मोझाम्बिक) किंवा म्यानमारमध्ये मनुष्यबळ बरंच स्वस्त आहे आणि तेथील जमीन सुपीक आहे. त्यामुळे तेथून डाळ उत्पादन करून आयात करणे हे आपले उत्पादन वाढेपर्यंत नक्कीच आवश्यक आहे. उगीच आयात केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येईल हे अरण्यरुदन आहे आणि विरोधी पक्ष ते राजकीय फायद्यासाठी करणारच. मुळात आपले डाळींचे उत्पादन हे लोकसंख्या वाढीप्रमाणे वाढलेलेच नाही. त्याशिवाय पोषणासाठी अतिरिक्त लागणारी डाळ कुठून आणणार हा अधिकच प्रश्न आहे. खालील दुवा वाचून पाहावा. The real problem, however, is how to increase the availability of pulses in the country. At present, we are meeting about one-fifth of the domestic demand through imports but such imports are getting difficult to arrange. Even after tapping markets of 46 countries, we are able to arrange only around five million tonne of pulses. Unlike edible oil, pulses are not easily available for import from other countries, especially with the preference for pulse intake rising in most of the developed countries. India, being the largest producer as well as consumer of pulses, thus needs to tap the domestic potential of raising the production. The productivity of pulses in the country is very low because of several reasons. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. India has reached a stage where cereals will continue to be important to sustain the present level of nutrition. However, the reduction in hunger and the improvement in nutrition require more of pulses. Going forward, the future production targets should involve much higher growth in pulses than in cereals. http://www.thehindu.com/opinion/op-ed/consumption-of-pulses-and-nutrition/article8816406.ece

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 18/07/2016 - 20:04
हा लेख नीती आयोगाच्या( नियोजन आयोगाच्या जागी स्थापन झालेला) तज्ज्ञांनी लिहिलेला आहे आणि या लोकांचा राजकारणाचा आज तरी संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 18/07/2016 - 20:08
The real problem, however, is how to increase the availability of pulses in the country. At present, we are meeting about one-fifth of the domestic demand through imports but such imports are getting difficult to arrange. Even after tapping markets of 46 countries, we are able to arrange only around five million tonne of pulses. Unlike edible oil, pulses are not easily available for import from other countries, especially with the preference for pulse intake rising in most of the developed countries.
वरील परीच्छेदात परिस्थितीचे योग्य ते वर्णन आहे. त्यामुळेच मोझांबिक, म्यानमार इ. देशांबरोबर जी कराराची बोलणी सुरू आहेत ते एक निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 18/07/2016 - 20:18
डॉक्टरसाहेब. प्रस्तुत दुवा मी आधीच वाचलेला, आता तुम्ही दिलाच आहे तर ह्यातलीही गंमत सांगतो. जर भारताने ४६ देशांमधे फिरुनही पुरवठा होण्याची चिन्हे दिसत नाहीत तर काय करावे? दुव्यातच म्हटले आहे की आपलेच उत्पादन वाढवा. ओके? पण आपल्याकडे उत्पादन वाढवण्याच्या मर्यादा आहेत असेही म्हटले आहे. ह्या मर्यादा कोणत्या? १. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. का झाल्या नाहीत आजवर? किंवा आता होऊ शकत नाहीत असेही नाही. नवीन जाती शोधायला किमान पाच ते सहा वर्षे जातात. चला मान्य करु आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मग जगातून दुसरीकडून आणून आपल्या भूमीत सुधारित जाती लावू शकतोच की. ह्यात फारतर एक वर्ष जाईल. हे बियाणे विनामूल्य देऊन नविन शेतकर्‍यांना प्रोत्साहित करता येईल. २. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. डाळीस योग्य असे वातावरण ह्या विस्तीर्ण भारतात मिळूच नये हे अशक्य आहे. प्रश्न निर्माण झाला तो पारंपरिक डाळ-उत्पादक पट्ट्याचा. तिथे पाणी नसेल तर पाणी उपलब्ध करा. जिथे पाणी आहे तिथे डाळ घ्या. आफ्रिकेत जे उभारणीचे उद्योगात पैसा घालताय तोच त्याच कामासाठी इथे घालू शकतात ना. ३. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. वातावरणीय बदल व बुरशी-किडीला दाद देणार्‍या नवीन जाती शोधून काढणे हा उपाय आहे. बुरशी किडी ह्या अगदी काटेकोरपणे वनस्पती-केंद्रीत नसतात. ९० टक्के रोग जवळपास सारखेच असतात. मुख्य मुद्दा आहे तो डाळीच्या पिकावर शेतकर्‍याने खर्च किती करावा कारण खर्चाला साजेसे भाव नसतील तर कोण कशाला औषधांचा खर्च करेल. आज इथे जुन्नरात वीस किलो टोमॅटोला हजार बाराशे भाव मिळतोय तर शेतकरी औषधे किती महाग आहेत ह्याचा अजिबात विचार करत नाही आहे. दोनशे रुपये सोडा अगदी १६० रुपये किलो जर शेतकर्‍याला भाव मिळत असेल तर शेतकरी आनंदाने भरभरुन डाळीचे उत्पादन करतील. नाही कोण म्हणतंय? पण शेतकर्‍याकडून ३०-८० ला घ्यायची आणि उपभोक्त्याला २०० ला विकायची हे गणित कसे आणि कोण सोडवणार? ४. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. हेच तर मीही म्हणतोय ना. भारत सरकार हेच करतंय फक्त आपल्या देशात नाही, आफ्रिकेत. तिथेच विरोध आहे. ह्यात स्थानिक डाळ-उत्पादक शेतकर्‍याचे नुकसान नाही असे म्हणणे हेच अनभिज्ञपणाचे लक्षण आहे. इथल्या शेतकर्‍याला प्रोत्साहन द्यायचे नाही आणि बाहेरच्याला सर्व सुविधा देऊन आपल्याच नागरिकांसमोर स्पर्धेला उभे करायचे हे नक्की कशाचे द्योतक आहे? प्रस्तुत निर्णय फक्त व्यापारीवर्गाच्या हिताचा आहे. ॑.

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव 19/07/2016 - 07:00
१) ह्यात फारतर एक वर्ष जाईल. हे बियाणे विनामूल्य देऊन नविन शेतकर्‍यांना प्रोत्साहित करता येईल.
सगळी ट्रायल-बॅलन्स टोटल लाऊन सुधारीत बियाणं पुरेशा प्रमाणात वाटायला किमान ३ वर्षे लागतील. त्यातला सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे कुठल्या पिकाच्या खिशातुन डाळींचे भाव वधारायचे. अजुनपर्यंत डाळी आणि तेलबियांच्याबाबतीत आपण सतत भिजतं घोंगडं ठेवलय. आणल्या डाळीच्या बिया वाटल्या फुकट शेतकर्‍यांना इतकं सहज नसावं ते काम.
२) आफ्रिकेत जे उभारणीचे उद्योगात पैसा घालताय तोच त्याच कामासाठी इथे घालू शकतात ना.
अफ्रिका किंवा अन्य गरीब देशांत शेतकी विषयांत पैसा गुंतवायचे एक कारण म्हणजे यात बड्या आंतरराष्ट्रीय लवादांच्या सोयी-सुवीधांचं पाठबळ असतं. गरीब देशांत शेती-उद्योगधंद्यांना प्रोत्साहन म्हणुन बरेच प्रोग्राम राबवले जातात व ते गॅरेण्टर म्हणुन काम करतात. काहि कारणाने उद्या आपल्या शेतकर्‍यांनी डाळींचं उत्पादन म्हणावं तेव्हढं नाहि घेतलं तर सरकारचा पैसा बुडाला. अफ्रिकेतुन आयातीची हमी आणि नुकसान भरपायीची देखील.
३) अगदी १६० रुपये किलो जर शेतकर्‍याला भाव मिळत असेल तर शेतकरी आनंदाने भरभरुन डाळीचे उत्पादन करतील. नाही कोण म्हणतंय? पण शेतकर्‍याकडून ३०-८० ला घ्यायची आणि उपभोक्त्याला २०० ला विकायची हे गणित कसे आणि कोण सोडवणार?
थेरॉटीकली हे खरं आहे. शेती उत्पादनाचा खर्च आणि उपभोक्त्याला मोजायला लागणारे दाम याचं अजव गणीत आहे. पण एक नक्की, कि या समीकरणातुन डाळी अशा वेगळ्या काढता येणार नाहित. हे गणीत सामायीक पद्धतीनेच सोडवायला लागेल.
४) हेच तर मीही म्हणतोय ना. भारत सरकार हेच करतंय फक्त आपल्या देशात नाही, आफ्रिकेत. तिथेच विरोध आहे.
भारत सरकारने हे करावच. केवळ डाळींच्या बाबतीत नव्हे तर अगदी सरप्लस होणार्‍या उत्पादनात देखील. सगळी अंडी एकाच बास्केटमधे ठेऊ नये म्हणतात ना, त्यातला प्रकार. अर्थात, आपल्या लोकांच्या हातातोंडाची काळजी घेऊनच हे प्रकार करायला लागतील.
ह्यात स्थानिक डाळ-उत्पादक शेतकर्‍याचे नुकसान नाही असे म्हणणे हेच अनभिज्ञपणाचे लक्षण आहे. इथल्या शेतकर्‍याला प्रोत्साहन द्यायचे नाही आणि बाहेरच्याला सर्व सुविधा देऊन आपल्याच नागरिकांसमोर स्पर्धेला उभे करायचे हे नक्की कशाचे द्योतक आहे?
नागरीकांच्या भुकेचा प्रश्न मिटवायचा असेल तर हे काम प्रत्येक राज्यकर्त्याला करावेच लागेल. शेती किफायतशीर बनवायला त्यात गुंतलेलं मनुष्यबळ आणि थ्रोपुट याची योग्य सांगड घालुन अनेक वेगळे मार्ग शोधावे लागतील. या फार मोठ्या सुधारणा आहेत. पण सगळं सुरळीत झालं तरी दुसर्‍या देशांत शेती करुन आपल्या लोकांचं पोट भरायचा मार्ग कधिही बंद होता कामा नये.
प्रस्तुत निर्णय फक्त व्यापारीवर्गाच्या हिताचा आहे.
निश्चीत त्यात व्यापारीवर्गाचं हित आहे. तसं ते प्रत्येक बाबतीत असतच. पण हि पॉलिसी केवळ व्यापारीवर्गाच्या हितासाठी म्हणुन राबवली जात नाहि.

In reply to by संदीप डांगे

हेमन्त वाघे 19/07/2016 - 09:27
आफ्रिकेत धान्य पिकवणे - आणि ते सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात - नियोजन करून आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उप्योयोग करून - ही नवीन गोष्ट नाही ओलाम हे कंपनी याचे ऐक उदाहरण आहे http://olamgroup.com/ आणि ती एक भारतीयाने नायजेरियातून भारतात काजू निर्यात करण्यासाठी स्थापन केली होती https://en.wikipedia.org/wiki/Olam_InternationaL होय नायजेरियातून भारतात काजू निर्यात ! आफ्रिकेत शेती व शेतकरी मागासलेले असल्याने तेथील सरकारे मोठ्या प्रमाण जमिनी उपलब्ध करून अतिमोठ्या प्रमाणात धंदेवाईक शेती ( large scale commercial farming ) करण्यास प्रोत्साहन देतात.. http://www.thehindubusinessline.com/economy/agri-business/largescale-commercial-farming-in-africa/article2910459.ece http://africaworks.nl/en/farming-as-a-business मोठ्या प्रमाणात चिनी लोक जमिनी खरेदी करत आहेत http://www.forbes.com/sites/danalexander/2015/07/09/the-biggest-opportunity-in-agriculture-may-be-in-africa-and-china-is-seizing-it/#7f40c2f35c33 पण भारतीय लोक पण यात मागे नाहीत http://www.africa-business.com/features/indians-africa-farmlands.html http://scroll.in/article/729328/one-map-that-shows-indians-are-buying-large-farmlands-abroad-as-we-debate-land-acquisition-at-home शेवटच्या लेखाचे शीर्षकच सांगते - as we debate land acquisition at home भारतात मोठ्या प्रमाणात सलग जमीन उपलबध नाही , शेतमजूर अनेक ठिकाणी काम करीत नाहीत , या व्यवसायात बाहेरच्या लोकांना प्रवेशाचा नाही ( शेतजमीन घायला अनेक राज्यात तुम्ही शेतकरी असल्याचे प्रमाण पात्र लागते ) त्यामळे मोठ्या प्रमाणात planned शेती ही अतिशय कठीण आहे किंवा ज्वलजल अषयकच आहे . http://web.worldbank.org/WBSITE/EXTERNAL/COUNTRIES/AFRICAEXT/0,,contentMDK:21730621~menuPK:4900969~pagePK:146736~piPK:146830~theSitePK:258644,00.html

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 18/07/2016 - 20:01
खालील विधाने आपल्याच प्रतिसादात आहेत. जरा बातमी नीट वाचा हो. आफ्रिकेत तूर डाळ उत्पादन होणार नसून भारत मोझांबिक व म्यानमार या देशांकडून खात्रीशीर तूर डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे असे वरील बातमीत लिहिले आहे.
या विधानांचा अर्थ मोझांबिक हे आफ्रिकेत नाही असा होतो का? तुम्हाला इभू मध्ये किती गुण मिळाले याचा इथे काय संदर्भ होता?
मुद्द्याचे: पहिल्या लिन्कमधे कोणता फोलपणा आहे (जो तुमच्यामते तुम्ही दाखवून दिलाय) तेही कळले तर बरे होईल.
स्वतःच दिलेली लिंक जरा नीट वाचा हो. मोझांबिकशी केलेला करार, शेतकर्‍यांच्या पोटावर पाय, मध्यमवर्गीय व्यापार्‍यांचा खिसा भरणे इ. गोष्टी कोठून आल्या ते जरा सांगता का?
डाळ उत्पादनाचे व पुरवठ्याचे चक्र जरा सोन्याबापुंकडून मागच्याच वेळेस नीट समजवून घेतले असते तर असली भंपक विधाने करायची वेळ आली नसती, गुरुजी. मागणीपेक्षा स्थानिक पुरवठा कमी होतो तर त्यावर तयार डाळीची ताबडतोब थेट आयात करणे वेगळे व परक्या देशात सर्व प्रकारच्या सुविधा देऊन परदेशी शेतकर्‍यांना खरेदीच्या खात्रीसह हमीभावही देणे हे वेगळे हे इतकेही कसे समजत नाही? 'घरची म्हणते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा' असा प्रकार का म्हणून चाललाय इतकाच माझा मुद्दा होता.
ज्या गोष्टीची दरवर्षीच वेगवेगळ्या देशातून मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते त्या गोष्टीच्या खात्रीशीर पुरवठ्यासाठी एक दीर्घकालीन उपाययोजना करणे हे एक निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे. हे लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे.
हा करार आणि तूर डाळ, आधी नीट समजून घ्या नंतर चर्चेला या.
मला यातले काही समजत नसेल असे वाटत असेल तर देऊ नका प्रतिसाद.

In reply to by संदीप डांगे

सध्या दक्षीण आफ्रीकेमधला चिनचा वावर बघता, भारताला तेथे हालचाली करणे आवश्यक आहे असे मल वाटते. मोझांबीकचं भौगोलीक महत्व त्याद्रुष्टीने नाकारता येत नाही. जास्त बोलत नाही, समजुन जा.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 19/07/2016 - 02:02
आणि तीसुद्धा दोन्हीही बाजूंनी. मला स्वतःला या विषयातलं काहीही कळत नाही हे सुरूवातीलाच सांगतो. काही प्रश्न आहेत - १. मोझांबिकबरोबरचा करार हा फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे हे कसं काय? २.जर आज डाळींचे भाव रू.२००/किलो असतील तर त्याचा अर्थ मागणी भरपूर आहे पण त्या मानाने पुरवठा नाहीये. हे बरोबर की चूक ते आधी सांगावे. ३.आणि जर तसं असेल तर देशांतर्गत उत्पादन जे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असल्यामुळे त्याची खात्री देता येत नाही - आणि त्यामुळे दरांचीही खात्री देता येत नाही - अशा परिस्थितीत जर दुस-या देशात पिकवलेली डाळ आपल्या देशात यावी असा करार केला असेल तर त्यात चूक काय आहे ते सांगावे. ४.आणि व्यापाऱ्यांना फायदा होत नसेल तर ते मुळात कुठलाही व्यवसाय का करतील? त्यामुळे त्यांचा फायदा होणं हे कसं चुकीचं आहे हेही सांगावे. ५.त्याचबरोबर मोझांबिकबरोबर करार करणे बरोबर कसे आहे आणि त्याचे काय फायदे असू शकतात? तेही सांगावे. यात काहीही sarcastic किंवा prejudicial नाही. मला शेतीची अजिबात पार्श्वभूमी नाही. त्याच्या अर्थशास्त्रात जरुर रस आहे आणि त्याच अनुषंगाने हे प्रश्न विचारलेले आहेत. जर यात काही राजकीय bias आहे असं वाटत असेल तर मी हा पूर्वग्रह आहे असं म्हणेन. मग निदान माहिती असल्याचा आणि सांगण्याचा आव तरी आणू नका अशी माझी प्रतिक्रिया असेल आणि तीही दोन्ही बाजूंना. हा प्रश्न फक्त जिज्ञासा म्हणून विचारलेला आहे. उत्तरं मिळावीत अशी अपेक्षा आहे.

In reply to by बोका-ए-आझम

१. मोझांबिकबरोबरचा करार हा फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे हे कसं काय? खाली खरे सरांना दिलेले उत्तर वाचावेत, शंका असल्यास विचाराव्यात, यथामती उत्तरे देईन, माझे काही हुकले असल्यास ते दुरुस्त करेल. २.जर आज डाळींचे भाव रू.२००/किलो असतील तर त्याचा अर्थ मागणी भरपूर आहे पण त्या मानाने पुरवठा नाहीये. हे बरोबर की चूक ते आधी सांगावे. होय, हे बरोबरच आहे भाऊ, नाही कोण म्हणू राहिला, फक्त पुरवठा कमी का आहे हा कळीचा मुद्दा आहे, अन तो मुद्दा येऊन जाऊन आपल्या नाखु काकांच्या दलाल अडते समीकरणापाशी जाऊन थांबतो बघा ३.आणि जर तसं असेल तर देशांतर्गत उत्पादन जे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असल्यामुळे त्याची खात्री देता येत नाही - आणि त्यामुळे दरांचीही खात्री देता येत नाही - अशा परिस्थितीत जर दुस-या देशात पिकवलेली डाळ आपल्या देशात यावी असा करार केला असेल तर त्यात चूक काय आहे ते सांगावे. दुसऱ्या देशात जमीन कंत्राटावर घेऊन पिकवून इथे आणणे अन इथले विपणन ह्या सगळ्यानंतर ती डाळ स्वस्तच असेल, ह्याची तरी काय खात्री देता येईल बरं??, बरं खरे सरांच्या उत्तरात लिहिल्या प्रमाणे आपल्या देशातल्या इंनोवशनला बासनात गुंडाळून परक्या देशात जमीन घेऊन काम करणे हा सुद्धा शहाणपणा म्हणवत नाही! ४.आणि व्यापाऱ्यांना फायदा होत नसेल तर ते मुळात कुठलाही व्यवसाय का करतील? त्यामुळे त्यांचा फायदा होणं हे कसं चुकीचं आहे हेही सांगावे. भाऊ इथे आपण बजाज ऑटो किंवा मेरसिडेस च्या शेयरची चौकशी करत नसून जीवनावश्यक वस्तूंविषयी बोलतोय हे नम्रपणे नमूद करू इच्छितो, तरीही व्यापारी बंधूंचा फायदा होणे हे चूक नाहीच, पण तो फायदा होण्यात समतोल हवा न? म्हणजे गव्हर्नमेंट स्पॉन्सर अनफेर ट्रेड प्रॅक्टिस मधून मिळवलेला फायदा नसावा, शिवाय व्यापाऱ्यांचा असला फायदा आपण जस्टिफाय करत असू तर मग 200/किलोलाच का रडावे? घेऊयात की डाळ 200 ची शेरभर अन म्हणू 200 रुपये असली तरी 'चतुर व्यापारी त्याचा फायदा काढणारच' ;), हे असले हेजिंग जस्टिफाय होणार असेल तर ह्या चर्चेचा कार्यकारणभावच आटोपतो असे वाटते बुआ ५.त्याचबरोबर मोझांबिकबरोबर करार करणे बरोबर कसे आहे आणि त्याचे काय फायदे असू शकतात? तेही सांगावे. मी कॉन्स आधी पाहतो, ते मी मांडले आहेत, प्रोज संबंधी सध्या अभ्यास सुरु आहे, जे काही दिसतील ते नक्की मांडेल मी , सकृतदर्शनी तरी हा निर्णय अनफेर अन व्यस्तप्रमाणात व्यापारी हित जपणारा आहे असे मत पडते आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बोका-ए-आझम 19/07/2016 - 11:12
१. मुळात मोझांबिकमध्ये डाळ उत्पादन केलं जाणार आहे याचा अर्थ भारतात ते उत्पादन बंद किंवा कमी केलं जाणार आहे असं नाहीये, बरोबर? २.
दुसऱ्या देशात जमीन कंत्राटावर घेऊन पिकवून इथे आणणे अन इथले विपणन ह्या सगळ्यानंतर ती डाळ स्वस्तच असेल, ह्याची तरी काय खात्री देता येईल बरं??,
नक्कीच नाही देता येणार, पण ती subsidized दरांवर सरकार विकू शकतं. ही शक्यता नाकारता येणार नाही, बरोबर? शिवाय तुमच्याच प्रतिसादात म्हटल्यानुसार डाळीला मिळणारी MSP (किमान समर्थन मूल्य) वाढवलेलं आहे. याचा अर्थ समजा या मोझांबिकमधून आलेल्या डाळींमुळे भाव पडले तरीही भारतातल्या शेतकऱ्यांना किमान एक किंमत सरकारकडून मिळणारच आहे. ३. अशी किती डाळ मोझांबिककडून मिळणार आहे भारताला? मोझांबिक हा छोटा देश आहे. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांएवढा असेल फारतर. तिथली सगळी शेतजमीन तर तूरडाळ किंवा इतर डाळींच्या उत्पादनासाठी वापरली जाणार नाही. याचा अर्थ मोझांबिकमधलं डाळींचं उत्पादन हे भारतीय बाजारपेठेत प्रचंड फेरफार करु शकणारं नक्कीच नसावं. ४. मोझांबिकमधल्या शेतकऱ्यांची उत्पादकता भारतीय बाजारपेठेत बदल घडवून आणण्याएवढी आहे का? अमेरिका किंवा युरोपीय देश असते तर मी मान्य केलं असतं. अमेरिकेतील जेमतेम २% लोकसंख्या शेती करत असली तरी त्यांची उत्पादकता (productivity) ही खूपच जास्त आहे. त्यामुळे तिथल्या शेतमालाला भारतात विकू दिलं तर इथले भाव कोसळतील आणि इथला शेतकरी भरडला जाईल हे १००% मान्य. पण मोझांबिकच्या शेतकऱ्यांची उत्पादकता एवढी आहे का? ५. या करारात reciprocity असायला हरकत नाही, म्हणजे भारताने मोझांबिक किंवा इतर आफ्रिकन देशांकडून घेतलेल्या शेतमालाच्या मोबदल्यात त्या देशांची बाजारपेठ भारतीय उत्पादकांना मिळेल. अशा वेळी या आफ्रिकन देशांची आर्थिक परिस्थिती जर सुधारली (भारतात त्यांचा शेतमाल विकला गेल्यामुळे)तर भारतीय वस्तू विकत घेतल्या जातील आणि त्याचा फायदा भारतातील लोकांना होईल. जशी मागणी वाढेल, तसं उत्पादन वाढेल आणि नोक-याही वाढतील. अर्थात हा फारच long term चा विचार आहे, पण चीन असंच करतोय, विशेषतः झांबियामध्ये आणि पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये. ६.
भाऊ इथे आपण बजाज ऑटो किंवा मेरसिडेस च्या शेयरची चौकशी करत नसून जीवनावश्यक वस्तूंविषयी बोलतोय हे नम्रपणे नमूद करू इच्छितो
Exactly my point बापू. जीवनावश्यक गोष्ट आहे म्हणूनच तर त्याचा व्यापार करणाऱ्या लोकांना फायदा व्हायला हवा, म्हणजे ते तो व्यापार पुढेही करत राहतील. शिवाय तुम्ही फक्त व्यापारी हा एक व्यापक शब्द वापरलात. पण इथे वेगवेगळ्या पातळ्या असतील ना? Stockist - Distributor - Wholesaler - Retailer अशा. तुम्हाला व्यापारी म्हणजे नक्की कुठल्या पातळीवरचा व्यापारी अभिप्रेत आहे?

मितभाषी 18/07/2016 - 12:24
अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी अहमदनगरमधील कर्जतमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. ‘सरकार सुस्त असून मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ आहे. मात्र, पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला वेळ नाही.’ अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जो पर्यंत राजीनामा देत नाही, तो पर्यंत विरोधी पक्षांनी अधिवेशन चालवू देऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. दरम्यान, कर्जत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी कुठल्याही जातीचा असला, तरी त्याच्यावर कारवाई होणारच अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कर्जत बलात्कार प्रकरणाचा तपास जातीय गतिरोधात अडखळत असल्याची सोशल मीडियावर टीका होते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान कर्जत बलात्काराप्रकरणी दोन्ही आरोपींना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मितभाषी 18/07/2016 - 12:26
Marathi News > Maharashtra > नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर By: पांडुरंग रायकर, एबीपी माझा, अहमदनगर | Last Updated: Saturday, 16 July 2016 4:56 PM Share 17 अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी कर्जत परिसरातले नागरिक आक्रमक झाले आहेत. कारवाई करण्यात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप करत आज कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये बंद पाळण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर कर्जतमधला रास्ता रोको 5 तासांनी मागे घेण्यात आला. बलात्कार आणि हत्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संतोष भवार असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आणि खटला जलदगती न्यायालयात

चंपाबाई 18/07/2016 - 21:00
भारतातील शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योजकाना देउन तिथे मेक इन इंडियाची गाजरं लावायची. आनि मग भार्तात अन्न पुरेंसं पिकत नाई असे म्हणुन फॉरिनची डाळ मागवायची.

चंपाबाई 18/07/2016 - 21:00
भारतातील शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योजकाना देउन तिथे मेक इन इंडियाची गाजरं लावायची. आनि मग भार्तात अन्न पुरेंसं पिकत नाई असे म्हणुन फॉरिनची डाळ मागवायची.

(तुम्ही दिलेला रिपोर्ट प्लॅनिंग कमिशनने देणे, ते लोक राजकीय नसणे ह्या दोन्ही सत्य असलेल्या फॅक्टस मुळे त्यांना शेतातले सगळे कळते हा निष्कर्ष निघत नाही न सर, अर्थात मी हे कुठलाही मुटेछाप अभिनिवेश न ठेवता मांडतोय हे आधीच सप्रेम सांगतो, अन माझे मुद्दे मांडायला सुरुवात करतो) १. High-yielding varieties of pulses haven’t been developed in the absence of any technological breakthrough. साफ चूक, अश्या जाती विकसित होत असतात किंबहुना झाल्या आहेत, पण त्यांच्या विस्तार अन लोकप्रियकरणासाठी आवश्यक सरकारी आस्था पूर्ण गायब आहे, ती फक्त ह्या शासनात आहे असे नाही तर कायम होतीच, बीडीएन-१ हे वाण फक्त आंतरपीक म्हणून लावायला उत्तम असे विकसित केले गेले आहे, मध्यप्रदेश ते महाराष्ट्र वातावरणातील टोकाचे बदल ग्राह्य धरून त्यांच्यात टिकून राहतील अशी एरिया स्पेसिफिक वाणं सुद्धा विकसित आहेत, उदा मरी रोग प्रतिकारक अन खास वैदर्भ वातावरणासाठी विकसित टी-विशाखा १ हे वाण, एकेटी-८८११ हे खास मध्य अन दक्षिण भारतीय वाण, आता अजून एक गंमत सांगतो, ही तर वाणं झाली आधुनिक लॅबोरेटरी अन परिस्थितीत विकसित केलेली, तर ही लिंक सुद्धा जरा बघा , ही लिंक आहे राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान उर्फ नॅशनल इनोव्हेशन फौंडेशनची, अन ह्या लिंकमधले नायक आहेत वाराणसीचे श्रीयुत जयप्रकाश सिंग, ह्याचा जरूर लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती, इतकं सगळं असताना जर प्लॅनिंग कमिशन असे म्हणत असेल तर तो त्यांचा सरकारी अनास्था रिपोर्टमध्ये लपवायचा दुर्दैवी प्रयत्न मी का म्हणू नये?? २. Pulses are grown mainly in marginal and poor environments under rainfed conditions. अहो ही डाळ पिकाची (प्रश्नात तूर आहे त्याची) नैसर्गिक मागणी आहे हो, ते एनविरोन्मेण्ट पुअर नसतं तर स्केन्टी रेनफॉल एरिया असतं, मी स्वतः वरकड पाणी न देता तूर आंतरपीक म्हणून ओढली आहे कैक वेळा, हरबरा तर फक्त दवाच्या ओलाव्यावर (फ्रॉस्टिंगवर) येतो रब्बीतला, तेव्हा वातावरण हा इशू नाही तर वरती मी जो मुद्दा सांगितलाय ती खरी ज्ञानबाची मेख आहे असे वाटते, जास्त उत्पादन करणारी वाणं विकसित झाली/होत आहेतच फक्त त्यांचा पुरस्कार सरकार स्वतःच करत नाहीये आधीपासूनच ३. Low productivity is also associated with the sharp year-on-year fluctuations due to high vulnerability to environmental stresses as well as insects and pests. मला वाटतंय हा मुद्दा मी माझ्या पहिल्या उत्तरात कव्हर केलाय, तस्मात पुनरुक्ती टाळतो आहे :) ४. There is an urgent need to upgrade varieties, practices and policy support for pulses. Both public and private sector research should be encouraged and supported for breakthroughs in pulse technology at the earliest. सरकारने बहुतेक मागच्या नोव्हेंबर मध्ये डाळींचे समर्थनमूल्य वाढवले आहे, टू एनकरेज मोर प्रोडक्शन, ही एक अभिनंदनीय बाब आहे, पण मग हे काय मधेच मोजांबीकचं सूरु केलंय ? लिंक स्पष्ट म्हणते की शेती मोझमबीक मध्ये होणार, त्याची गरज काही नाही खरेतर, अगदी कॉर्पोरेट फार्मिंग म्हणले तरी जमीन मशागत करून कंपनीफार्म सुरु करायला जितका वेळ लागेल तितक्यावेळात जय प्रकाश सिंगाची वाणं व्यावसायिक निर्मिती मध्ये आणून आपल्याच कडले प्रोडक्शन वाढेल की नाही? हा फायदा डायरेक्ट शेतकरी/ग्राहक सगळ्यांचा आहे, मोझमबीक मध्ये शुद्ध व्यापारी फायदा आहे, हे सुस्पष्ट आहेच की, तुम्ही करार केलात पण शेती करायला कंत्राट पद्धतीने सरकार जाणार नाहीये कंपनीच जाणार आहेत, धंद्याचे मूळ तत्व नफा, मग त्यांना तिकडे स्वस्त मनुष्यबळ ते जमीन मिळूनसुद्धा अन सरकारने त्यांना उत्पादन एका ठराविक किमतीत विकायचे बंधन केले तरी सुद्धा ते लोक आपली लागवड मशागत अन वाहतूक खर्च + नफा सोडून विकतील डाळ हा भाबडा आशावाद असेल नाही तर काय असेल? त्यामुळे हा निर्णय व्यापारी धार्जिणा आहे असे म्हणालास गैर ते काय? बरं सरकार म्हणाली अन ह्यांनी विकले इतके साधे व्यापारी कसे असणार? तूर डाळ पेरा ते पुढे असे विवेचन मी मागे 'एका वर्षानंतर' ह्यावर केले होते, तिथे साठेबाजी सप्रमाण दाखवली होती, मोझमबीक मध्ये उत्पादन झाले 'क' ते दाखवले गेले 'ख' (कमी दाखवणे सहज शक्य आहे अन अटळ आहे माझ्यामते) अन वरील प्रमाणे किंमत 'घ' दाबलेली डाळ इंटरनॅशनल मार्केट मध्ये नफा काढायला विकली जाणार नाही ह्याची काय हमी असणार आहे? तेव्हा हा निर्णय व्यापारीहिताचाच आहे सर.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आनंदयात्री 20/07/2016 - 20:06
>>हा निष्कर्ष निघत नाही न सर, अर्थात मी हे कुठलाही मुटेछाप अभिनिवेश न ठेवता मांडतोय हे आधीच सप्रेम सांगतो, अन माझे मुद्दे मांडायला सुरुवात करतो बाकी चर्चा राहूद्या पण 'मुटेछाप अभिनिवेश' ही टर्म कॉईन केल्याबद्दल रॉल्फ थँक्स ! =))

श्रीगुरुजी 19/07/2016 - 08:52
http://m.rediff.com/news/report/navjot-singh-sidhu-quits-rajya-sabha-could-join-aap-ranks-in-punjab/20160718.htm नवजोतसिंग सिधूने भाजपचा व राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. तो आआप मध्ये जाण्याची शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 19/07/2016 - 14:36
सिधूने भाजप सोडून आआपमध्ये जाण्याचा भाजपला किती तोटा होईल व आआपला किती फायदा होईल हे सांगता येणे अवघड आहे. सिधू तसाही गेली काही वर्षे राजकारणात सक्रीय नव्हता. वेगवेगळ्या वाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शो, आयपीएल सामन्यांचे समालोचन यातच तो गर्क होता (त्याचे व विवेक राजदानचे समालोचन ऐकणे ही शिक्षा होती. त्यांची अत्यंत संदर्भहीन व नळ गळल्यासारखी अखंड बेताल बडबड ऐकणे असह्य होते. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात एखाद्या महान गायकाचे सुरेल गायन ऐकल्यानंतर लगेच 'रिक्षावाला' किंवा 'शांताबाई' ऐकल्यावर जसे वाटेल, तसेच इतरांचे समालोचन ऐकल्यानंतर सिधू व राजदानचे समालोचन ऐकताना वाटायचे.). त्याच्या जाण्याने भाजपला फारसा तोटा होणार नाही व आआपला फारसा फायदा होणार नाही असा माझा अंदाज आहे. आआपने त्याला बहुतेक पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन दिले असावे.

गॅरी ट्रुमन 19/07/2016 - 13:48
राहुल गांधींनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारसभेत भिवंडीत बोलताना रा.स्व.संघाने गांधीजींचा खून केला असा आरोप केला. त्याविरूध्द संघाने न्यायालयात धाव घेतली.त्याविषयी राहुल गांधींनी माफी मागावी अन्यथा अब्रूनुकसानीच्या खटल्याला सामोरे जायची तयारी ठेवावी अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ जुलै रोजी आहे. मला वाटते की यावेळी रा.स्व.संघाने राहुल गांधींना अजिबात सोडायला नको. फेब्रुवारी १९९८ मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी कोईम्बतूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये रा.स्व.संघाचा हात असून आपल्याकडे त्याविषयीचा पुरावाही आहे असे विधान केले होते.त्याविरूध्द संघाने केसरींवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. पण नंतर केसरींचे वय झाले आहे आणि त्यांना म्हातारचळ लागले आहे म्हणून ते काहीतरी बरळत आहेत असे वाटल्यामुळे असेल कदाचित पण संघाने तो खटला मागे घेतला. राहुल गांधींना मात्र अजिबात सोडायला नको.

In reply to by गॅरी ट्रुमन

चंपाबाई 19/07/2016 - 13:57
संघ व मोदी गांधीजींना प्रातःस्मरणीय मानतात .. त्यांच्या पावलावर चालून माफ करुन सोडुन द्यावे. तसेही राहुल गांधीना शासन झाले, न झाले, संघाबाबत जनतेच्या मनात जी संशयास्पद प्रतिमा आहे, ती तर तशीच रहाणार ना?

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी 19/07/2016 - 14:39
NEW DELHI: The Supreme Court on Tuesday asked Congress vice-president Rahul Gandhi to express regret for his comments holding the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) responsible for Mahatma Gandhi's assassination or be ready to face a defamation trial. "Why did you make a sweeping statement against the RSS branding everyone associated with the organization in the same brush," the Supreme Court asked Rahul Gandhi while hearing a defamation case filed against him. " You can't make wholesale denunciation of an organization," the SC bench observed. Rahul Gandhi's counsel tried to justify his remarks saying these are historical facts and even part of the government records. The apex court said that Rahul needed to prove what was the public good in his statement against the RSS and hence it was a matter of trial. The SC said that if Rahul Gandhi wanted to defend himself and was not ready to express his regret, than it will be better that he faced trial. A bench of Justices Dipak Misra and R F Nariman refused Rahul's request for two-week adjournment and posted the matter for hearing on July 27. Rahul wanted two-week's time saying his counsel Kapil Sibal is not free before that. The SC said this is no ground for adjournment and posted the matter for July 27, saying no further postponement of hearing would be allowed. http://timesofindia.indiatimes.com/india/RSS-killed-Gandhi-Express-regret-or-face-trial-Supreme-Court-tells-Rahul-Gandhi/articleshow/53279452.cms

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 19/07/2016 - 14:53
संघावरील आरोप कोर्टात सिद्ध झालेले नाहीत. हे खरेच आहे. पण गोपाळ गोडसेंच्या स्टेटमेंट्समुळे आम लोकांचा गोंधळ उडतो. https://www.sscnet.ucla.edu/southasia/History/Hindu_Rashtra/nathuram.html shortly after releasing Nathuram’s book, Why I Assassinated Mahatma Gandhi, in December 1993, Gopal Godse in an interview with Frontline magazine stated: “All the [Godse] brothers were in the RSS. Nathuram, Dattatreya, myself and Govind. You can say we grew up in the RSS rather than in our home. It was like a family to us. Nathuram had become a baudhik karyavah [intellectual worker] in the RSS. He has said in his statement that he left the RSS. He said it because [Madhav Sadashiv] Golwalkar and the RSS were in a lot of trouble after the murder of Gandhi. But he did not leave the RSS.” [See issue of 28 January 1994] असो. ज असेल ते असो. पण राहुलजीनी असा उघ्ड आरोप कराउला नको होता.

In reply to by श्रीगुरुजी

दिगोचि 05/08/2016 - 09:17
मला वाटते राहुल गान्धीला या वेळी सन्घाने सोडुच नये. कारण त्याला जितके दिस्क्रेदित करता येइल तेव्हढे करावे त्यामुळे कॉन्ग्रेस्पक्षाला काय करावे ते व काय करु नये अशी त्यान्ची अवस्था होईल याचा भाजपाला २०१९च्या निवडणुकीत झाला तर फयदाच होइल.

चंपाबाई 19/07/2016 - 13:54
मेलेल्या गायीचे कातडी काढायला दलिताना बोलावुन त्यानीच गाय मारली असा खोटा आरोप ठेऊन दलिताना मोदींच्या गुजरातेत मारहाण .. कट्टर हिंदुत्ववाद्यांचे खोडसाळ कृत्य

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई 19/07/2016 - 15:02
तो अवतार माझा नव्हता http://m.economictimes.com/news/politics-and-nation/dalits-unload-cow-carcass-in-front-of-collectorate-in-gujarat/articleshow/53273931.cms इंग्लिशमधी नाई कळत तर मराठीत सांगू काय ? http://m.maharashtratimes.com/nation/dalits-flogging-in-una-sparks-angry-protests-in-saurashtra/articleshow/53281324.cms

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई 20/07/2016 - 02:54
Such incidents of violent interventions by the Sangh Parivar activists have been a regular occurance in Gujarat for the last two decades since the BJP came to power in the state in 1995. However, their numbers are increasing day by day. These incidents are also getting reported more often or 'recorded' due to the proliferation of video cameras and mobile phones. http://googleweblight.com/?lite_url=http://www.catchnews.com/india-news/gujarat-s-cow-vigilantes-don-t-love-their-gau-mata-they-just-hate-dalits-1468419334.html/fullview&lc=en-IN&s=1&m=956&host=www.google.co.in&ts=1468918873&sig=AKOVD65CGrUuPBdOYm1ftFebfoXY08WiXw ......

In reply to by बोका-ए-आझम

चंपाबाई 20/07/2016 - 02:56
ते गोंदवले काळे की गोरे मी स्वप्नातही पाहिलेले नाही. तिथे कधी जाणेही झालेले नाही. त्यामुळे तिथे काय करतात , याबाबत मी कधी लिहिले नाही.. आमच्या आजारपणाच्या काळात गोंदवलेकर प्रवचनांची दोन चार पुस्तके माझ्या समोर टाकली होती.. दोन चार पाने चघळुन , हे जीवन दु:खमय आहे , प्रभू रामाचे नाव घेऊन भवसागर तरुन जावे , इ जुजबी ब्रह्मज्ञान घेउन त्या प्रवचनास ( कायमचे ) रामराम म्हटले होते.

गामा पैलवान 20/07/2016 - 23:40
लोकहो, गेला आठवडा युरोपास ज्याम गडबडीचा गेला. १. शनिवारी १६ जुलैच्या सकाळी (वा आदल्या रात्री) आर्दोगानने तुर्कस्थानात माजलेली बंडाळी मोडून काढल्याचं जाहीर केलं. ही खरोखरची बंडाळी होती का? कोणी प्रमुख नेता तर दिसंत नाही. लगेचंच त्याने ८८०० पोलीस, ६००० सैनिक, २७५० न्यायाधीश आणि १५००० शिक्षण कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली. आपल्या हातात सत्तासूत्रे एकवटावी म्हणून त्याने खोटं बंड उभारलेलं दिसतंय. बंडाळीचं खापर फोडायला फतेउल्ला गुलेनचं कपाळ सापडलंय. पण आपल्या हाती सत्ता एकवटण्याचा प्रयत्न कशासाठी? २. माझ्या मते याचं कारण की दोनंच दिवसांपूर्वी १४ जुलैच्या रात्री फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलाँ यांनी आणीबाणी ३ महिन्यांसाठी वाढवली. निमित्त अर्थातंच नीस येथील आक्रमणाचं होतं. याचीही जबाबदारी कोण्या संघटनेने उचलली नव्हती. दुसऱ्या दिवशी नीसच्या बळींना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात ओलाँची हुर्यो उडवण्यात आली. कुठेतरी पाणी मुरतंय याचा फ्रेंच नागरिकांना सुगावा लागलेला आहे. पण ओलाँ यांना घाई करून आणीबाणी वाढवायची गरज का पडावी? त्यासाठी तत्पूर्वी दोनतीन दिवस ब्रिटनमध्ये काय घडलं ते बघावं लागेल. ३. सोमवारी ११ जुलैला आपण ताबडतोब पायउतार होणार म्हणून क्यामेरन यांनी जाहीर केलं. आणि बुधवारी १३ तारखेला निघाले देखील. अचानकपणे लेडसमबाईंनी माघार घेतली आणि घाईघाईने तेरेसा मे यांची नियुक्ती झाली. नंतरच्या चारपाच दिवसांतल्या घटनांनंतर तेरेसाबाई लई प्येटल्या. वेळ आली तर अणुबॉम्ब फोडेन म्हणाल्या. एकमेकांची पाठ खाजावायचा प्रकार तर चालला नाहीये? पण क्यामेरन तर दोन तीन महिन्यांनंतर पायउतार होणार होते. ऑक्टोबरपर्यंत पदावर राहायचा विचार होता साहेबांचा. अचानक जुलैच्या मध्यावर का निघाले? दोनतीन महिन्यांनी असा काय फरक पडणार होता? की तोवर नवं नेतृत्व पूर्णपणे सुस्थापित व्हावं अशी योजना होती? येत्या दोन तीन महिन्यांत काही धमाका उडणार आहे का? असल्यास कारण काय? इथे एक गोष्ट विचारांत घ्यायला हवी. ४. ती म्हणजे मंगळवार दिनांक १२ जुलै रोजी पुतीन यांनी संपूर्ण बाल्टिक नौदल ताफा बडतर्फ केला. आता प्रश्न असा आहे की बाल्टिक ताफ्याने पाश्चात्य (म्हणजे नाटोच्या) हालचालींना प्रत्युत्तर द्यायचं का नाकारलं? रशियात काही गडबड होण्याची शक्यता आहे का? की नाटोने बाल्टिक मधल्या हालचाली वाढवल्या? येत्या दोन तीन महिन्यांत काहीतरी घडणारसं दिसतंय खरं. ५. या सर्व घडामोडी होत असतांना अमेरिकेचं मौन मात्र अगदीच आश्चर्यजनक आहे. ओबामा निघालाय. त्याला काही पडली नाहीये. ट्रंप बुवा निवडून आल्यातंच जमा आहेत (निदान वागताहेत तरी तसंच). त्यांनीही तोंड उघडलं नाहीये. युरोपापासून अमेरिका अलग पडंत चाललीये का? असो. या सर्व घडामोडींना लाभलेली ब्रेक्झिटची पार्श्वभूमी देखील लक्षणीय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पद्मावति 21/07/2016 - 23:24
गामा पैलवान उत्तम आढावा.पुढचे काही महिने बर्‍याच घडामोडी होणार असे दिसतंय खरं... मला वाटतं अमेरिका सध्या मौन आहे कारण निवडणुका डोक्यावर आहेत. वेट आणि वॉच चाललंय त्यांचं.

चंपाबाई 21/07/2016 - 11:42
1) give it up योजनांमुळे झालेली बचत प्रत्यक्षात 2000 कोटी इतकीच आहे, पंतप्रधान हा आकडा 22000 कोटी सांगत आहेत. उरलेली बचत आंतर्राष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्याने झाली आहे. 2) ग्रामीण विद्युतीकरण योजनेत alotted रकमेच्या केवळ 3% रक्कम वापरण्यात आली आहे. केवळ 3%रकमेत जर जवळपास सर्व काम केले गेले आहे . मग बाकीची 97% का sanction केली http://www.dnaindia.com/india/report-modi-government-s-flagship-scheme-deendayal-upadhyay-gram-jyoti-yojna-remains-largely-on-paper-2236194

आकाश कंदील 21/07/2016 - 16:23
गामाजी, तुम्ही खुपच छान विश्लेषण केले आहे. माझ्यामते जरी पुढील ३, ४ महिन्यात खूपच क्रातिकारक / विस्मयकारी काही होणार नसले तरी तुमचे मुद्दे नक्कीच विचार करायला लावणारे आहेत.

गामा पैलवान 21/07/2016 - 23:06
लोकहो, १३ नोव्हेंबर २०१५ रोजी प्यारी (पॅरिस) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलाँ यांनी १४ जुलै रोजी आणीबाणी २६ जुलैपर्यंतच लागू राहील असे वक्तव्य केले. राष्ट्राध्यक्षांचा या वचनानंतर अवघ्या काही तासांत नीस येथे दहशतवाद्याने शेकडो लोकांना ट्रकखाली चिरडले. त्यामुळे ओलाँ यांनी आगोदरच्या वाचनाकडे दुर्लक्ष करंत आणीबाणी ६ महिन्यांसाठी वाढवली. काय गडबड चाललीये? कुठेतरी पाणी मुरतंय खास. तुर्कस्थानाचे अध्यक्ष आर्दोगान यांनीही ३ महिन्यांसाठी आणीबाणी कालंच घोषित केली. फ्रान्सच्या आणीबाणीविस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही बाब लक्षणीय वाटते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भंकस बाबा 27/07/2016 - 22:28
उत्तम आढावा, यूरोपमधे शेयर मार्केट दोलायमान स्थितीत असताना अमेरिकेत नवीन उचांक करत आहे, हे पण दुर्लक्षुन चालणार नाही

चंपाबाई 27/07/2016 - 22:05
बाल कामगार कायद्यात काही बदल घडलेत म्हणे. पूर्वी फक्त आई बापाच्या घरच्या कामात मुलानी काम करणे चालत होते. आता लांबच्या जवळच्या कोणत्याही नात्याची व्यक्ती बालकाला कामगार म्हण्य्न नेमु शकते. पुर्वीच्या सरकारला हझार्डस वाटणारे अनेक उद्योग आता सेफ आहेतम्हणे. तिथे बालके जॉब करु शकतात. आनंद आहे !

चंपाबाई 29/07/2016 - 13:21
केंद्रात सत्ताधारी झालेल्या भाजपानं निर्लज्जपणाच्या सगळ्या सीमा पार करण्याचा चंग बांधला आहे. लोकपालात प्रस्तावित असलेले बदल हेच दाखवतात. केंद्रातलं महाढोंगी सरकार कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडून आलं. लोकपालाला या पक्षानं बिनशर्त, एकमुखी पाठिंबा दिला होता. कॉंग्रेसवर त्या काळात या पक्षाचे ढोंगी नेते मानभावीपणानं उच्चरवात टीका करत असत. आता त्याच लोकपाल कायद्याला हा पक्ष सुरूंग लावत आहे. लोकपालाच्या कक्षेतून आता राजकारणी आणि अधिकारी यांच्या नातेवाईकांना बाहेर काढलं जाणार आहे. भारतातील कोणताही नेता, अधिकारी स्वत:च्या नावावर संपत्ती ठेवण्याएवढा मूर्ख नसतो, म्हणून तर जवळच्या नातेवाईकांची मालमत्ता पण चौकशीच्या दायर्यात यावी अशी तरतूद लोकपालात आणली गेली. आता मोदींनी कावेबाजपणा करून ती तरतूद हटवण्याचा घाट घातलाय. वरवर हे महाशय भ्रष्टाचाराचा बिमोड करू वगैरे प्रचारी थाटाची दणकेबाज विधानं करतात आणि आतून भ्रष्ट नेते आणि भ्रष्ट अधिकार्यांना संरक्षण देतात. कायद्यात बंधनकारक असूनही लोकपाल गेली दोन वर्ष नेमण्यातंच आला नाही! मोदी लोकपालाला एवढे का घाबरतात? कोणाच्या कुलंगड्या बाहेर पडण्याची ही भीती त्यांना वाटते? एकीकडे राजकारणी आणि अधिकार्यांना सोडून देत असतांनाच स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्यांच्या नातेवाईकांचे उत्पन्न जाहीर करण्याची मात्र सक्ती असणार आहे! मोदी स्वयंसेवी संस्थांचा सूड घेण्यासाठी लोकपाल कायद्याचा वापर करणार आहेत. त्यांनी ते करावं पण सगळ्यांच्याच नातेवाईकांची संपत्ती जाहीर व्हावी, भाजपा आणि त्यांची पितृसंस्था रा स्व संघ यांनी लोकपाल आंदोलनाचा दुरूपयोग केवळ स्वत:ची सत्ता आणण्यासाठी केला हे आता पुरेसं स्पष्ट झालंय. तसं नसतं तर अण्णांच्या लोकपालाला रामलीला मैदानावर येऊन लेखी पाठिंबा देणारा संघ आज मूग गिळून गप्प बसला नसता

श्रीगुरुजी 29/07/2016 - 14:51
हरितपत्र मिळविण्याचा एक नवीन सोपा उपाय - For the rich who want to be American citizens, here is the quickest way to have a Green Card. What one needs to do is to invest $500,000 to $1 million, depending on the U.S. government rules, in an employment-generating Regional Centre Program or have a direct investment to get a permanent residence Visa within 15 months under the EB-5 program. This is as compared to 7 to 10 years taken in employment-based and 15 to 20 years in family-based Green Cards. http://www.thehindu.com/news/national/short-route-to-green-card/article8912439.ece?utm_source=MostCommented&utm_medium=Homepage&utm_campaign=WidgetPromo

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 30/07/2016 - 15:39
http://www.thequint.com/india/2016/03/16/lalit-modi-is-now-a-citizen-of-malta-but-ed-still-wants-him-back The Republic of Malta, an archipelago in the central Mediterranean between Sicily and the North African coast, is known for historic sites. As per the law of the land, a person can get Malta citizenship by making investments in the country. The Malta Individual Investor Programme rules provide for affluent persons of impeccable standing and repute to be naturalised and to receive Maltese citizenship on the basis of a contribution to and investment in Malta. इस्ट इंडिया कंपनी स्थापन करुन दुसर्‍या देशात व्यापार करा व पैसे मिळवा . त्यापेक्षा नवा मॉडर्न ऑप्शन चांगला आहे. त्या देशात फ्रॉड करुन पैसे घेउन येणार्‍या माणसाला सिटिजनशिप द्या व ते पैसे गुंतवुन घ्या. छान

In reply to by मार्मिक गोडसे

प्रदीप 01/08/2016 - 16:14
दुनियेतील अनेक विकसीत देशात असली स्कीम सुरू असते. त्यात अजिबात काही नवीन नाही. 'नवीन' आता फक्त मोदी सरकार आहे, तेव्हा चंपाबाईंना ते सगळे नव्याने दिसत आहे. चालायचंच !

In reply to by श्रीगुरुजी

हेमन्त वाघे 01/08/2016 - 12:27
हे अनेक वर्ष पासून चालू आहे माझ्या एका मित्राने - ज्याची भारतात ऐक सॉफ्टवेर कंपनी होती - जी त्याला विकावी लागली - अशा तर्हेने अमेरिकन नागरिकत्व घेतले आहे यात तुम्हाला पैसे आदीकृतरित्या न्यावे लागतात , तसेच बऱ्यापैकी टॅक्स पडतो . आणि यात ग्रीन कार्ड नाही ( जे दुय्यम नागरिकत्व असते ) तर नागरिकत्व मिळते ..
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.