Skip to main content

अग्निपथ

लेखक रणजित चितळे यांनी शुक्रवार, 17/06/2022 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत. सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे. आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..

वाचने 38645
प्रतिक्रिया 201

प्रतिक्रिया

In reply to by sunil kachure

यामध्ये भाडोत्री/ तात्पुरते कर्मचारी घ्यावेत काय याबद्दल आपले काय मत आहे?

जातीनिहाय आरक्षण ने काही वर्ष वाढत असतील. सैन्यात जात पात धर्म या गोष्टीना थारा नाही. वाटेल ते लिहू नका. सैन्यात माझ्या मते तुझ्या मते आसे काही नसते सर्व काही वेल डॉक्युमेंटेड आसते. महाराष्ट्र, गुजरात वगैरे प्रदेशात शिक्षणाची संधी,त्याबद्दल जागरूकता,उद्योग, नोकऱ्यांची अवसर पुष्कळ आहेत. येथील बरेच युवा उच्च शिक्षण घेऊन परदेशी सुद्धा व्यवस्थित रहात आहेत. तरीसुद्धा खुप मराठी मुले सैन्यात कार्यरत आहेत.

मी नाविक दलात सर्व physical परीक्षा देवून, तांत्रिक विभागात भरती झालो होतो. छाती चे मोजमाप काय असावे ह्या वर माझ्या वेळी सैन्य अधिकारी लोकात मत भेद झाले होते. छाती पाच इंच फुगणे महत्वाचे की इतकीच इंच छाती असणे महत्वाचं हा विषय होता .शेवटी छाती किती ही असू ध्या ती पाच इंच फुगली पाहिजे ह्या वर एकमत झाले

In reply to by सुक्या

आहो , सरदार,जाट यांच्या पेक्षा गुरखा ,मणिपूर यांची उंची कमी आसते. रिजनवाईज फिजिकल स्टँडर्ड चे मापदंड वेगळे आसतात. कुठं यांच्या नादी लागता.

दोन प्रश्न .. १. अग्नीवीर योजना लागु झाल्यावर आता जी सैन्य भरती होते ती बंद होणार आहे का? माझ्या मते ही योजना कार्पोरेट क्षेत्रात असते तशी अप्रेंटीस सारखी योजना आहे. म्हनजे अमुक लोक येतील त्यातले अमुक लोक कायमस्वरुपी भरती होतील. बाकी पुढे रोजगार शोधतील. २. जरा कुठे चाकोरी बाहेर जाउन कुणी काय करत असेल तर उठसुठ छाती बडवत (बुडले हो जग बुडले) रडायलाच (!) पाहिजे का? आताचे सरकार जरा कुठे चाकोरी बाहेर जाउन नवीन संकल्पना राबवत आहे. त्यात खासगिकरण / रेल्वे भाडेतत्वावर देणे / शेती विषयक कायदे वगेरे वगेरे आले. ह्या सार्‍या बाबी नवीन आहेत तर त्याचा फायदा तोटा तटस्थ पणे पाहणे हे जरा सुशिक्षित म्हणवनार्‍या नागरीकांचे कर्तव्य नाही का? बाकी चाकोरी बाहेर जाउन काही करणार्‍याला आजवर विरोधच झाला आहे. मुलींना शिक्षण देणारे फुले यातुन सुटले नाही तर बाकिच्यांची काय तमा? राहीला भाग आंदोलनांचा. यात भाग घेणार्‍यांनाच काही माहीती नसते की ते कसला विरोध करत आहेत. जालावर ढिगाने व्हिडीयो उपलब्ध आहेत की हे लोक कसे रोजंदारीवर येतात. मागे परीक्षा ऑनलाईनच घ्या म्हणुन आंदोलन झाले होते. त्यामागचा हेतु विपुल प्रमाणात कॉप्या करुन पास होणे हेह्च होते. त्यामुळे अग्नीवीर ही योजना वाईटच कशी आहे .. त्यात चांगले काहीच नाही हे कुणी जर तर ची भाषा न वापरता सांगेल का?

In reply to by सुक्या

त्यामुळे अग्नीवीर ही योजना वाईटच कशी आहे .. त्यात चांगले काहीच नाही हे कुणी जर तर ची भाषा न वापरता सांगेल का? ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. अजून या योजनेची पुरेशी माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यासाठी थोडा काळ ही योजना चालवून त्यातून मिळालेल्या फायद्यतोट्यांचा, त्रुटींचा अभ्यास करून नंतरच प्राथमिक निष्कर्ष काढता येईल. अर्थात कणभरही प्राथमिक माहिती नसताना, योजना राबवायला अजून प्रारंभ सुद्धा झालेला नसताना, त्यातील फायदेतोटे त्रुटी समजलेल्याच नसताना विरोधी पक्ष व मिपावरील नेहमीचेच यशस्वी मोदीद्वेष्टे यांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. काहींनी तर प्रचंड स्पेक्युलेशन करून या योजनेमुळे देशात अराजक माजेल, तरूण गुन्हेगारी मार्गाला लागतील, चीन पाकिस्तान भारतावर हल्ला करून युद्ध जिंकतील वगैरे निष्कर्ष काढून अकलेचे तारे तोडले आहेत. बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राज्यात तरूणांना भडकवून जाळपोळ केली जात आहे. जर दंगली, जाळपोळ वगैरे खूप वाढले तर नाईलाजाने मोदींना ही योजना गुंडाळावी लागेल व त्यातून त्यांचे काहीही नुकसान न होता तरूणांचेच नुकसान होईल.

In reply to by श्रीगुरुजी

ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. अगदी हेच माझ्या मानात होते. कुठलीही नवीन योजना मग ती कुठल्याही क्षेत्रात असो, तिचे फायदे तोटे काही काळानेच दिसतात. फायदा झाला की योजना पुढे जाते. तोटा झाला की बारगळते. साधा हिशेब आहे. पण आता ज्या पध्द्तीने या किंवा कुठल्याही योजनेला विरोध होतो तो पाहता एक समाजविघातक शक्ती जोर लाउन कार्य करते आहे असेच दिसते. गंम्मत म्हणजे ही आंदोलनकारी लोक सार्वजनीक किंवा दुसर्‍याच्या मालमत्ते चे नुकसान करतात. एकाने तरी मी या योजनेचा विरोध करतो आहे म्हणुन मी माझी कार जाळतो आहे किंवा माझा या योजनेला विरोध म्हणुन मी माझे घर जाळणार आहे असा विरोध केला नाही. सार्वजनीक मालमत्ता च (जी पर्यायाने आपल्याच पैशातुन आलेली असते) यात बळी पडते . . बेरोजगार लोक सार्या जगात आहेत. पण सरकारी नोकरी साठी हापापलेली जनता माझ्या भारतातच जास्त आहे ..

In reply to by सुक्या

अग्निपथ ही एक दम फालतू कल्पना आहे भक्ताने समजावयाचे प्रयत्न करू नये. लोक मूर्ख किंवा आंधळी नाहीत. एक रुपयाची अक्कल ह्या योजनेत दिसून येत नाही.

In reply to by sunil kachure

बाकी अग्निपथ चांगली की वाईट हे काळ दाखवुन देईलच , पण तुम्ही ज्या प्रकारे भक्त ह्या पवित्र हिंदु संकल्पनेचे शब्दाचे विद्रुपीकरण करत आहात त्यावरुन त्यावरुन तुमची अक्कल मात्र नकीच दिसुन येत आहे !

In reply to by sunil kachure

साहेब . . जसं सुक्या म्हणतो म्हणुन ही योजना चांगली होत नाही तसे (आणी तसेच) तुम्ही बोलला म्हणुन ही योजना फालतु होत नाही. कुवत असेल तर योजना का चांगली नाही हे लिहा ... ते ही जर तर न वापरता. नसेल जमत तर जाउ द्या ...

In reply to by सुक्या

चार वर्ष नोकरी असणारे कॉन्ट्रॅक्ट चे सैनिक भारताचे असतील तर . एक दोन हजार चीन,किंवा Pakistan चे सैनिक आरामात भारत जिंकतील. काही हजार ब्रिटिश लोकांनी मूर्ख राज्य करते भारतात होते त्या मुळे भारत जिंकला ना. आणि किती तरी वर्ष राज्य केले. महायुध्द झाले नसते तर आज पण ११०, करोड भारतीय लोकांवर एक दोन करोड ब्रिटिश लोकांनी राज्य केले असते मूर्ख राज्य करते असतील तर काय होते ह्याचे उत्तम उदाहरण ब्रिटिश लोकांनी भारतावर १५० वर्ष राज्य केले . आता परत भारत त्याच स्थिती मधून जात आहे . आता ब्रिटिश भारतावर राज्य करतील की अजून कोणता देश . हे फक्त माहीत नाही.

In reply to by sunil kachure

महायुध्द झाले नसते तर आज पण ११०, करोड भारतीय लोकांवर एक दोन करोड ब्रिटिश लोकांनी राज्य केले असते
नक्की का? म्हणजे क्रांतीकारक फासावर गेलेत, सुभाषबाबू लढले, सैनिकांनी बंड केले, आदी गोष्टिंचा काहीच परीणाम नव्हता, असे म्हणायचे का?

१)हिंसाचार ज्या राज्यात चालू त्यांची नावं बघितली तर ही राज्य देशातील अतिशय मागास राज्य आहेत. देश स्वतंत्र होवून इतकी वर्ष झाली तरी ह्या राज्यांची स्थिती सुधारली नाही. त्या मुळे प्रचंड बेकरी आहे. अगदी राज ठाकरे नी एक वाक्य " ह्यांना येवून देवू नका. असे बोलले तरी ह्याच राज्यात हिंसाचार होईल..नोकरी साठी देशाचे सरकार आणि इतर राज्य हाच ह्यांच्या कडे पर्याय आहे. २)आता पर्यंत सैनिकांची भरती ज्या रीती नी कायम स्वरूप तत्वावर होत होती ती पद्धत चालू राहणार की बंद होणार? लोकांना वाटत ती जुनी पद्धत बंद केली जाईल ३) सरकारी नोकरी म्हणून जे लाभ सशस्त्र दलात काम करणाऱ्या लोकांना मिळत होते ते तसेच मिळतील की बंद होतील. अजून वेगळी शंका Cds हे पद निर्माण करावे असे सरकार का वाटले. आनं ek cds नेमला पण . देशाचे करोड रुपये खर्च केले. मग ते पद गेले वर्षभर खाली का ठेवले आहे. मनमानी कारभार करण् ही bjp सरकार ची सवय आहे. असे संदेश अशा प्रकरण मधून जातात. मीडिया सांगत नाही म्हणजे लोकांच्या डोक्यात शंका नसतात असे नाही.

ORPO हा बराच खर्चिक निर्णय होता. ह्याचे दूरगामी परिणाम देशाच्या बजेटवर आणि संरक्षण यंत्रणेवर होणार हे सरकारला ठाऊक होतेच पण काँग्रेस ला पछाड मारण्याच्या नादांत भाजपने घेतले. अग्निपथ कदाचित त्याचीच परिणीती असावी. कागदावर तरी तरुणांच्या दृष्टिकोनातून चांगली स्कीम वाटते. १८ वर्षे वयावर भरती झालेला पोरटा २२ व्य वर्षी साधारण ११ लाख घेऊन बाहेर पडेल त्याशिवाय डिग्री सुद्धा घेऊन बाहेर पडेल. ४ वर्षांची शिस्त आणि इतर महत्वाची लाईफ स्किल्स घेऊन समाजांत मिक्स होईल. चांगली गोष्ट आहे.

२३ लाख ११ लाख हे लाखाचे आकडे इथे दिले जातात ती माहिती कोणी दिली आहे. सरकार नी (आयटी cell, what's app univercity, तोरसकर व्हिडिओ ह्यांनी हे लाखाचे आकडे सांगितले असती तर इथे ते सांगू नका)दिली आहे का? अधिकृत सरकारी निर्णयाची लिंक त्या साठी इथे द्यावी. हे जे लाखाचे आकडे दिले जात आहेत ते pkg च्या स्वरूपात असावेत त्या pkg मध्ये काय काय खर्च आणि देणे अंतर्भूत आहे ह्याची पक्की माहिती हवी. मोठमोठे आयटी इंजिनियर्सची पण ही pkgs फसवणूक करतात. तेव्हा पूर्ण माहिती असेल तर च इथे. द्यावी. अफवा पसरवू नये.

In reply to by sunil kachure

ती उघडून बघण्याची तरी खटपट करा ना. काय होतंय असे प्रतिसाद देऊन चर्चेत खोडा का घालता आहात. जर ती खोटी वाटली तर मग तुमची लिंक द्या. मायबोलीवरचाही धागा वाचा. टाईम्स,इंडिअन एक्सप्रेस,इंडिया टुडे या़च्या साईट्स पाहा ना. तिकडे वाचून इकडे संदर्भासह मते मांडा.

- सैन्यातले जवान 17 ते 20 वर्ष सेवा करून निवृत्त होतात 60 व्या वर्षी नाही. बरेच जवान 40 वर्षी पेन्शन घेतात. - ह्या आधीही भरती १० पास किंवा १२ पास ची होती. - २५ टक्के जे घेतले जातील त्यांची सर्वीस पेन्शनेबल असेल. तेव्हा पेन्शन बंद होणार नाही. - पेन्शन बिल ओआरओपी नंतर खूप वाढले आहे. पेन्शन पण भरभक्कम असते. - जग भर पेन्शन बिल कमी करण्याची भरपूर मॉडेल्स आहेत. - हे दूरगामी आहे. व त्याचा असर काही वर्षानी मिळेल. - आपल्याकडे निवृत्त हा शब्द आला की 60 वर्ष व निकामी असा समज असतो. - 4 वर्षानंतर निवृत्त नाही तर दुसरी नोकरी असे म्हणता येईल. - 18 ते 21 .. 23 जे तरूण आहे जे 10 किंवा 12 ड्रॉपआऊट असताता (असे बरेच असतात) त्यांना सगळ्यांनाच 30000 महिन्याची नोकरी लागत नाही... व एकदा का ते 30 पुर्ण झाले की त्यांची एम्पॉयेबलीटी कमी होत जाते. पण ह्याच काळात जर अग्नीवीर झाले तर ते नविन स्किल शिकतील, एम्पॉयीबिलीटी वाढेल. - स्टारटप चा अर्थ युनिकॉर्न नाही. कोणताही छोटा व्यापार किंवा धंदा - कोणीही सुरू करावा की. करतात. पण जर 10 - 12 लाखाचे भांडवल असेल तर सुरू करूच शकतात.

In reply to by रणजित चितळे

जुनी कायमस्वरूपी भरती बंद होणार का? दरवर्षी फक्त २५% इतकीच कायम भरती का करत नाही? ७५% तरुणांवरिल खर्च वाचवून तो पेन्शनसाठी वापरता येईल.

In reply to by आग्या१९९०

- पिरॅमीड मध्ये बेस मोठा असतो व लागतो. सैन्याची नोकरी पिरॅमीड टाईप आहे हे सर्वज्ञात आहे. दर वर्षी लागणारे हात २५ टक्के नाही तर खूप जास्त लागतात. पण पूढे प्रोमोशन साठी सगळे आले तर कित्येकांना प्रोमोशनाला मुकावे लागते. - त्या मुळे फक्त २५ टक्के घेण बरोबर नाही. ह्या मुळे पदोन्नती मधे जास्त लोक समाधानी होतात. - दर वर्षी जनरल रिजर्व साठी जास्त तरूण लागतात. पण पूढे एवढे लागत नाहीत.

सर्व आयएएस,आयपीएस,पुढारी,आता जे सैन्य अधिकारी निवृत्त झालेले आहेत त्यांना करोडो रुपये मिळाले आहेत त्यांची पेन्शन पहिली बंद करावी. ते करोडो वापरून स्टार्ट अप उघडतील,नवीन उद्योग करतील. हा प्रयोग सरकार नी करावा. Mr रणजित चितळे ह्यांनी स्वतः पासून च त्याची सुरुवात करावी .

केंद्र सरकारने या पुढे कोणतीही नविन योजना आणली, मग ती लोकांच्या हिताची असो की नसो त्याला, मोदीद्वेष्ठांकडून विरोधच होणार हे आता सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. तेंव्हा मोदी सरकारने विकास, नविन योजना वगैरे बाजूला ठेऊन ऊठसुट विरोधाच्या नावावर दंगे करणार्‍या व राष्ट्रीय संपत्तीची जाळपोळ व नुकसान करणार्‍या दंगेखोरांना ठोकून काढायला एक नविन कडक कायदा आणावा व तो तितक्याच कठोरपणे देशभर लागू करावा.

In reply to by प्रसाद_१९८२

मोदी सरकार नी काय काय करायचे. काही तरी जबादारी तुम्ही पण घ्या..कुठे असाल तेथून निघून बिहार,यूपी मध्ये जा आणि दोनतीन आंदोलन कारी लोकांना झोडपून kadha. स्वतः काही तरी करा. फक्त सल्ले देवू नका.

In reply to by प्रसाद_१९८२

मोदी सरकार नी काय काय करायचे. काही तरी जबादारी तुम्ही पण घ्या..कुठे असाल तेथून निघून बिहार,यूपी मध्ये जा आणि दोनतीन आंदोलन कारी लोकांना झोडपून kadha. स्वतः काही तरी करा. फक्त सल्ले देवू नका.

स्वातंत्र्योत्तर काळात सात,नऊ वर्षानंतर कलर सर्व्हीस करून सैनिक परत आपली दुसरी पारी सुरवात करत होते. तेव्हा विना पेन्शन घरी येत होते. आमच्या गावात कित्येक भूतपूर्व सैनिक पुढील शिक्षण घेऊन बॅक मॅनेजर,डि वाय एस पी पदावरून निवृत्त झाले. ज्यांच्याकडे शेती होती ते आज प्रगतीशील शेतकरी आहेत. आजही बरोबरचे नायक हवालदार महाराष्ट्र पोलीस रेल्वे सुरक्षा बल आणी अन्य जागी कार्यरत आहेत. कदाचित आजच्या युवा पिढीत आत्मविश्वास कमी झालाय का काय शंका येते.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलसाहेब, तुमची कळकळ समजतेय. राहवत नाही, बोलून बघतो, विनंती अशी की तुम्ही नका या वादविवादात फार खोल उतरु आणि समजावत बसू. आपापली आणि इतरांची मते बदलणे जवळपास अशक्य असते. तुमच्यावर वैयक्तिक रोख ठेवून मूळ विषयाला बगल देणे हीच शक्यता इथे (किंवा जगात कुठेही) जास्त असते. हेच श्री. चितळे आणि डॉ खरेंनाही सांगावेसे वाटते. तुम्ही सर्वजण सन्माननीय आहात, भारतीय लष्कराच्या विविध शाखांशी संबंधित आहात. तुमचे सर्वांचे मत तुम्ही उत्तमरित्या मांडलं आहेत. त्यात तुमचे एकमत आहे या गोष्टीला कोणतेही वजन न देता लोक तुम्हाला भक्त वगैरे असे लेबल लावतील किंवा अक्कल काढतील तर बघून वाईट वाटेल.

In reply to by गवि

गवि साहेब, कर्नल तपस्वी, खरे साहेब, रणजीत साहेब यांना बोलू द्या. त्यांच्यामुळे खरी माहिती पुढे येत असते. माझ्यासारख्या अनेकांना त्यामुळे मत बनवणे शक्य असते. मिपावर वाचकांची संख्या खूप मोठी आहे. त्यातले सुज्ञ लोकांची संख्याही मोठी आहे. त्यांना योग्य ते घ्यायचे व बाकीचे धाग्यात तसेच ठेवायचे हे चांगले कळते. वरील प्रत्यक्ष अनुभवी लोकांनी भाग न घेतल्यास अशा सुज्ञ लोकांची उपासमार होईल.

In reply to by शाम भागवत

अहो त्यांना बोलू न देणारा मी कोण? उलट त्यांनी उत्तम मांडणी केली आहे हेच उल्लेखिले आहे. फक्त वादात पडणे आणि कोणाचा प्रतिवाद करत समजूत पटवत बसणे यासाठी तसे सुचवले. त्याने इच्छित बदल होण्याची शक्यता दिसत नसल्याने.

वीस वर्ष नोकरी झाल्या नंतर जो पगार मिळतो.त्या पेक्षा जास्त लाभ तेव्हा नोकरी सोडण्यात असतो. विविध निवृत्ती नंतर मिळणारे लाभ म्हणून जी रक्कम मिळते तो खूप मोठी असते,त्याचे व्याज आणि पेन्शन हे एकत्र केले तर नोकरी करून मिळणाऱ्या पगार पेक्षा जास्त होते. आणि घरी येवून शेती किंवा बाकी व्यवसाय पण करता येतो. चार वर्ष सेवा आणि त्या नंतर त्या मधील 75% बाहेर. हे 75% बाहेर काढणार त्याचे काय निकष असतील हा विषय पण महत्वाचा ह्या विषयी निश्चित असे नियम असावेत..कोणत्या अधिकाऱ्याच्या मर्जी वर असू नये. खासगी उद्योगात जे बघायला मिळते तसे घडू शकते. शोषण,चमचे गिरी. सैन्य मध्ये पण माणसं च असतात. सर्व चांगले वाईट गुण तिथे पण असतात. जेवणाच्या दर्जा,राहण्याची सोय,बाकी आवशक्या सुविधा,स्वसंरक्षण करणारी उपकरण,साहित्य . हे पुरवले गेले नाही तरी नोकरी पुढे पण टिकावी म्हणून त्या मुलांना गुलामी करायला लागू नये. जेवणाचा दर्जा नीट राखला जात नाही हे सैन्यातील अनेक मित्रांनी सांगितले आहे. पण शिस्ती च्या नावाखाली नोकरी जाईल म्हणून जाहीर पने कोणी बोलत नाही.तिथे पण सर्व गैर प्रकार चालतात जे बाहेर उद्योगात चालतात. पण नोकरी वरून काढून टाकणे इतके सोपे नसते. पण ह्या अग्निविरं मुलांना तसे नोकरीची शाश्वती देणारे कवच कुंडल असणार नाहीत. हा पॉइंट पण महत्वाचा आहे. .

१७-२३ म्हणजे पदवीधर होण्याच्या वयात आहे. हेच २१-२५ असे वय असते तर पदवीधर मुलांना अग्नीबीर होऊन सेवा देता आली असती व नंतर रेग्युलर जॉब साठी पदवी हातात असते

एबीपी माझा वाहिनीवर अग्नीपथ या योजनेवर चर्चा सुरू आहे. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, एकर व्हाईस मार्शल नितीन वैद्य व मेजर जनरल शशिकांत पित्रे हे निवृत्त सेनाधिकारी चर्चेत सहभागी आहेत. या तीनही सेनाधिकाऱ्यांनी या योजनेचे जोरदार समर्थन केलंय.

In reply to by श्रीगुरुजी

समर्थनच करतात. काही सावधतेचे मुद्देही मांडतील तर बरे. ---- आता कितीही विरोध केला तरी प्रचंड रांगा लागतील भरतीसाठी याची खात्री आहे. ---------- १८३९ मध्ये पंजाब हरला ब्रिटिशांविरुद्ध. पण १८५७ च्या उठावावेळी ब्रिटिशांनी धूर्त खेळी केली. तुमच्या लोकांविरुद्ध लढण्यासाठी तुमचेच लोक वापरायचे ठरवले. तगडे जवान पाहिजेत जाहिरात केल्यावर पंजाबातून बरेच तरुण भरती झाले सैन्यासाठी. त्या तुकड्या मुस्लीम सैन्याविरुद्ध वापरल्या. (गोरखा तुकड्या हिंदू सैनिकांविरुद्ध लढवल्या). मोहिमा यशस्वी झाल्यावर संध्याकाळी उत्तम दारू बाटल्या दिल्या जायच्या.

अग्नीपथ योजनेला विरोध करणारे राजकीय पक्ष हळुहळ्रु उघडे पडत आहेत . सरकारच्या योजनांचा विरोध करण्यासाठी टुलकीटचा वापर ह्या योजनेच्या विरोधातही वापरण्यात आला असल्याचे समोर आलेले आहे .

सर्वश्री शाम भागवत यांच्याशी सहमत आहे. माहिती आभावी युवावर्गाचा गैरसमज व गैरफायदा घेतला जाऊ शकतो. गवि,सौंदर्य आपल्यावर इतर वाचकांचा सेनेवर विश्वास पाहून खुप आनंद वाटला. ज. शेकटकर सर व ज पित्रे सर यांना ओळखतो. कमालीचे हुशार व व्हिजनरी अधिकारी आहेत. शेकटकर कमिटीने सुचवलेले सुझाव महत्त्वपूर्ण आहेत व सरकारने त्याची विशेष दखल घेतली आहे. अग्निपथ योजनेबाबतीत सांगताना खालील मुद्दे मांडलेत त्यावरून याचे फायदे आपल्या सहज लक्षात येतील. सेनेत रॅक स्ट्रक्चर महत्त्वपूर्ण असून ते चिंचोळे होत जाते. पन्नास टक्के विस वर्षे नोकरीनंतर सेवानिवृत्त होतात. तेंव्हा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढलेल्या आसतात. पुन्हा नोकरीच्या संध्या कमी झालेल्या आसतात. पेन्शन व एकभुक्त रक्कम कमी वाटू लागते. अग्निवीर बावीसाव्या वर्षी बारावीचे प्रमाणपत्र, गाठीला पैशे व जवळपास कौटुंबिक जबाबदारी नाही किवा तुलनात्मक कमी. पुन्हा एक नवीन नोकरीची,शिक्षणाची संधी.उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल. विचारपूर्वक काढलेली योजना युवावर्गाला फायदेशीर आहे पण परिस्थितीचे आव्हान स्वीकारण्याची तयारी हवी ज्याकरता सेनेतील प्रशिक्षण आणी अनुभव कामास येईल.

पाहिले सरकार मधील दोन टाळक्यांच्य डोक्यात काही तरी भारी कल्पना येते मग ते लगेच त्याचे योजनेत रुपांतर करतात. स्वतःच्या बुद्धीवर त्यांना प्रचंड फाजील विश्वास असतो. दुसऱ्या दिवशी योजना देशासमोर जाहीर केली जाते... ना कोणाशी चर्चा,ना कोणत्या तज्ञ लोकांकडून माहिती घेणे ना त्यांचे विचार ऐकणे. ना बाकी राजकीय पक्षांशी चर्चा करणे. ना पूर्ण विचार करणे. आली भारी कल्पना की बनव योजना. त्या मुळे ह्या सरकार ज्या काही योजना आणते. कोणाला म्हणजे कोणालाच काही कळत नाही ह्या मध्ये देश हीत काय आहे. ज्यांच्या साठी हे योजना आणतात त्या लाभार्थी ना त्यांचा काय फायदा होणार आहे हे कळत नाही. मग लोक प्रश्न विचारू लागले की ह्यांची एक एक tube हळू हळू पेटू लागते. मग सकाळी योजना जाहीर केली की दुपारी त्या मध्ये बदल करतात. जसे लोक योजने मधील फालतू पना दाखवतात तसे हे बदलत जातात. खरोखर लय भारी सरकार आहे. फक्त आयटी सेल,गोदी मीडिया आणि सरकार नी काही ही केले तरी पाठी जी जी रे जी करणारे पाठीराखे ह्या लोकांचं सरकार खूप बुध्दीमान वाटते.त्यांच्या योजना लय भारी वाटतात. बाकी कोणाला म्हणजे कोणालाच ह्या सरकार चे निर्णय बिलकुल कळतं नाहीत. कुठून आणत असतील ती दोन डोकी इतकी बुध्दीमत्ता.

Army Major went to consult a doctor. Army Major: Doctor, I think Amoxicillin is better than Ampiclllin. 3 doses 1-0-1 should be taken. Along with that antidepressants also. Then antacids and B Complex 1-1-1 for 3 days..... Doctor (laughing): I’ve done MBBS, MD, DM and practicing for last 28 years. You think you know better? Army Major : But I saw your tweet on HOW AGNIVEER SCHEME isn't good for army. Silence... !

"घटस्फोट का होतात?" . . "लग्न केल्यामुळे." ----------------- "घटस्फोट का होतात?" -गूगल सर्च. "We are coming to that through AI. WE have a new upcoming case. Coming to you soon." [ 'गूगलचा सहसंस्थापक घटस्फोटाच्या वाटेवर' -बातमी.]

गेल्या दोन वर्षात इतक्या योजनांच्या चुकीच्या लाँच व हाताळणीचा ईतिहास असताना सुद्धा केंद्र सरकारने पुन्हा तशीच चुक परत केलेली आहे. योजना लाँच करताना एलिमेंट ऑफ सरप्राईस ठेवत असताना योजनेच्या मसुद्यात कमीत कमी चुका असण अपेक्षीत होत. अशी फुल प्रुफ योजना आणली असती व त्या बद्दल सरकारच्या मंत्र्यांत आत्म विश्वास असता तर आता होणार्या विरोध प्रदर्शनांला सरकारला कडक पणे तोड देता आले असते. काही लोकांच्या विरोध प्रदर्शना नंतरच सरकारने वयोमर्यादा बदलली, मसुदाच बदलायला घेतलाय आणी बरेच बदल होतील ह्याचे सुतोवाच केलेले आहे.

काँग्रेस काळातील लष्कर भरती योजना अतिशय उत्तम आहे. अती प्रचंड बुद्धिमत्ता असलेल्या काँग्रेस नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील खरेच तज्ञ असलेल्या लोकांनी त्या बनवल्या आहेत. कोणालाच त्या मध्ये काहीच कमी जाणवत नाही. Bjp सरकार उगाच नको तिथे बदल करू नयेत. मुखिया झोळी उचलून हिमालयात जाईल आणि आणि ह्यांच्या योजनांची खरकटे भारतीय लोकांना उचलायला लागेल. अग्निपथ आणायचा हेतू काय हे कोणी तरी समर्थक नी सांगावे. Mipa वाचकांच्या ज्ञान मध्ये त्या मुळे भर पडेल. 11 लाख 23 लाख तो पर्यंत आम्ही मोजत बसतो.

जेव्हा फडणवीस ह्या राज्याचे मुख्य मंत्री होते आणि केंद्रात मोदी जी होते . तो काळ. केंद्र ,राज्य एकच पक्ष.. त्यांची सर्व काम पण हटके. केंद्र,राज्य सरकार योजना जाहीर करायचे.. त्या साठी लागणारी कागदपत्रे कोणती हवीत. योजनेची रूपरेषा काय..ती कोणासाठी राबवायची आहे. लाभार्थी कोण आहेत. ह्या माहिती चा आदेश सरकारी अधिकाऱ्यानं दिला जायचा. बिचारे सरकारी अधिकारी आदेश नुसार काम सुरू करायचे. लोकांकडून अर्ज मागवले जायचे. लागणारी कागद पत्र मागितली जायची. सर्व तयारी पूर्ण झाली रे झाली की. नवीनच सरकारी आदेश यायचा. कागद पत्रे दुसरीच गोळा करायला सांगितले जायचे. योजनेची रूपरेषा पण बदलली जायची. सरकारी अधिकारी लोकांचे सर्व कष्ट वाया जायचे,वेळ वाया जायची.लोकांच्या शिव्या वेगळ्याच मिळायच्या. से अनेक वेळा व्हायचे. त्या कोणतीच योजना पूर्ण होत नव्हती. हा किस्सा खरा आहे..सरकार चालवणे ह्यांना जमत नाही हे सत्य आहे.

हत्यारं चालवण्यात कुशल, युद्धप्रसंगांचं व्यवस्थीत शिक्षण घेतलेला, खिशात १० लाख रोख रक्कम असलेला, साधारण पंचीवीशीतला तरुण समाजात येणार आणि तातडीने तोलामोलाचा रोजगार शोधणार. राजकीय पक्षांचे महत्वाकांक्षी नेतेमंडळी, गुन्हेगारी जगातले डॉन लोकं, नक्शलवादी, आतंकी संघटनांचे म्होरके.. इत्यादीना आयता रिसोर्स उपलब्ध करुन देण्याची शक्यता आहे या अग्नीपथ योजनेमुळे.

In reply to by अर्धवटराव

खिशात 10 लाख असलेला आणि लष्करी शिस्तीत 4 वर्ष घालवलेला तरुण कशाला आतंकवादी होईल? चांगलं काम कशावरून नाही करणार? म्हणजे विमानाचा अपघात होऊन सगळे प्रवासी मरतील ह्या भतीने सगळा विमान प्रवासच बंद करण्यासारखे आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

म्हणजे विमानाचा अपघात होऊन सगळे प्रवासी मरतील ह्या भतीने सगळा विमान प्रवासच बंद करण्यासारखे आहे.
सगळा विमान प्रवासच बंद करण्याबाबत कोण म्हणतय ? एक संभाव्य साईड इफेक्ट सांगितला. शिवाय संभाव्य रिकृटर्ससाठी लश्करी शिस्तीत तयार झालेला तरुण इतर १० तरुणांपेक्शा जास्त परिणामकारक 'अ‍ॅसेट' असेल...

In reply to by अर्धवटराव

सैन्यातून बाहेर पडलेले किती लोकं गुन्हेगारी जगातले डॉन लोकं, नक्शलवादी, आतंकी संघटनांचे म्होरके वगैरेंकडे काम करतात? वगैरे सारखा सांखिकीय विदा अभ्यासून ही शक्यता वर्तवली आहे का? ४ वर्षे सैनिकी ट्रेनिंग घेतल्यावर ते अग्निवीर देशद्रोही कारवायात खरच सहभागी होतील? त्यांचे देशप्रेम वाढलेले नसेल? भारतीय तरूणांत नितीमत्ता नसलेल्यांचीच बहुसंख्या असते असे तुम्हाला वाटते का? मला तरी असे वाटते की, तुम्ही वर्तवलेली शक्यता ही नियम अपवादाने सिध्द करता यावी इतपत असावी.

In reply to by शाम भागवत

काही जणांनी आतापर्यंत काढलेले निष्कर्ष - १) अग्निपथ योजनेतून तरूण भरती झाले की चीन, पाकिस्तान भारतावर हल्ला करून भारत ताब्यात घेणार. २) ४ वर्षांनंतर सेवासमाप्ती झालेले तरूण माफिया टोळी निर्माण करणार किंवा एखाद्या माफियाच्या टोळीत सामील होणार. ३) १७-२१ या वयात पदवी घ्यायची असते. पण या वयात सैन्यात जावे लागल्याने त्यांच्या शिक्षणाची वाट लागणार. ४) अर्धवट प्रशिक्षण दिलेले तरूण लष्करात भरती करून लष्कराची वाट लागणार. ५) या ४ वर्षात मिळालेल्या प्रशिक्षणाचा व अनुभवाचा सेवासमाप्तीनंतर काम मिळविण्यासाठी उपयोग नाही. ६) बेरोजगारी दूर करण्याचे नाटक करण्यासाठी व सैनिकांच्या निवृत्तीवेतनावरील खर्च कमी करण्यासाठी ही योजना आणली आहे. ७) आता संपूर्ण लष्करात कंत्राटी सैनिकांना घेणार. ८) यातील तरूणांच्या भरतीचे, प्रशिक्षणाचे कंत्राट मोदींच्या मित्रांना मिळणार. सैनिकांना ३०,००० तर मित्रांना ७०,००० मिळणार. ९) या मूर्ख निर्णयामुळे देशाचे अतोनात नुकसान होणार. १०) ही अत्यंत बिनडोक योजना आहे. ११) शहरातील गुंड टोळ्या, चीन व पाकिस्तानचे सैन्य केवळ काही तासात या प्रशिक्षण नसलेल्या, नोकरीची खात्री नसलेल्या सैन्याचा धुव्वा उडवतील. १२) ही योजना कोणाशीही चर्चा न करता दोन बिनडोकांनी आणली आहे. अजून काही निष्कर्ष असतील तर येऊ दे.

In reply to by श्रीगुरुजी

२) ४ वर्षांनंतर सेवासमाप्ती झालेले तरूण माफिया टोळी निर्माण करणार किंवा एखाद्या माफियाच्या टोळीत सामील होणार.
ह्या अंदाजावर मी ठाम आहे. ज्या प्रकारे तरुण लोकं रेल्वे पेटवुन देत आहेत जाळपोळ करत आहेत , त्यातील अगदी मोजके जरी अग्निवीर होऊन रिटायर झाल्यानंतर गुंड होण्याची शक्यता नक्कीच आहे. आणि आर.टी ओ आणि तत्सम वर्दीत असणार्‍या लोकांचा माज आणि सर्वसामान्य करदात्या नागरिकांना विनाकारण त्रास देण्याची मनोवृत्ती पाहता , हे रिटायर्ड अग्निवीर त्याच मार्गाला जाणार च नाहीत असे कोणीही ठाम पणे म्हणु शकत नाही. पॉवर (ऑर जस्ट अ डील्युजन ऑफ इट) मेक्स इव्हन द मोस्ट डीसेंट मेन क्रेझी .

In reply to by शाम भागवत

तिन ते चार लाख काश्मिरी पंडीतांना अतिरेक्यांच्या धाकाने नेसत्या वस्त्रांनीशी रहात्या घरातुन पळुन जाव लागल. त्यांना त्यांच्या आया बहीणीच्या ईज्जतीवर पा णी सोडताना पहाव लागल, तरी एका काश्मिरी पंडीताने आपल्या हातात बंदुक ऊचलली नाही. आणी तरी सुद्धा ह्यांना आपल्यातीलच वयात आल्याला मुलांची खात्री नाही. जिहाद करण्यासाठी कोणत्याही दुसर्या मोटीव्हेशनची गरज नसते त्यामुळे जिहाद करणारे ४ वर्ष सैन्यात काढुन मग जिहाद करायला जाणार नाहीत.

In reply to by डँबिस००७

पण जिहाद प्लान करणारी मंडळी आपल्या पोरांना या ४ वर्षाच्या नोकरीत मुद्दाम घुसवुन त्यांना ट्रेन करुन घेणे, सेवानिवृत्ताना जास्त मोठं आमिष दाखवणे वगैरे प्रकार करतीलच ना. साधी गोष्ट आहे... लश्करी वातावरणात तयार झालेला ऐन तारुण्याच्या भरातला युवक जेंव्हा नागरी समाजात परतेल तेंव्हा त्याच्या पोटेन्शीअलची व्हॅल्यु समजणारे सर्वच सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती त्याला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतील. त्यातले किती सफल होतील हा भाग वेगळा. राहिला मुद्दा काश्मिरी पंडीतांनी हत्यार न उचलण्याचा.. तर त्यामागे पंडीतांचा चांगुलपणा, अहिंसावाद, क्षमावृत्ती, परिपक्वता वगैरे सद्गुण केवळ आहेत असं वाटतं का तुम्हाला ?

In reply to by अर्धवटराव

पण जिहाद प्लान करणारी मंडळी आपल्या पोरांना या ४ वर्षाच्या नोकरीत मुद्दाम घुसवुन त्यांना ट्रेन करुन घेणे, सेवानिवृत्ताना जास्त मोठं आमिष दाखवणे वगैरे प्रकार करतीलच ना. जिहाद प्लॅन करणारी मंडळी आपल्या पोरांना नियमित आर्मीत व मुद्दाम घुसवत असतील की? बंदच केली पाहिजे आर्मी,उगाच अतिरेक्यांच्या हातात पूर्णपणे तयार झालेला सैनिक मिळत असेल. हीच गोष्ट पोलिसांच्या बाबतीतही आहे मग बंद करायला पाहिजे पोलिस दल ही. आजकाल च्या अतिरेक्यांना त्यांचे नेटवर्क चालवण्यासाठी कॉम्पुटर क्षेत्रातील ज्ञान असलेली मुलंही पाहिजे असतीलचकी, चार वर्षात डिग्री घेतली की मोठा aaset त्यांना मिळेल म्हणून भारताने IT क्षेत्रही बंद केले पाहिजे. एखादा दहशतवादी हल्ला करून दहशतवादी चांगल्या रस्त्याने पळून जाणार म्हणून गडकरींनी चांगले रस्ते बांधणे आदी बंद केले पाहिजे

In reply to by रात्रीचे चांदणे

हे सगळं बंद करण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. त्याकरता अग्नीवीरांची पहिली बँच रिटायर व्हायची वाट बघूया

In reply to by शाम भागवत

आतंकी/नक्शल आणि इतर तत्सम संघटना तसंही तरुणांवर जाळं फेकतच असतात. आता त्यांची नजर या अग्नीवीरांवरही असेल. हजारातनं एक जरी मिळाला तरी त्यांच्यासाठी तो लाखमोलाचा असणार.

माझा ह्या स्कीमला निःसंदिग्ध विरोध आहे, त्यासाठी माझे राजकीय बेअरिंग किंवा आवडता/ नावडता पक्ष हे कारण नसून माझी कारणे खालीलप्रमाणे आहेत, ज्यांना पटले त्यांना पटले ज्यांना नाही पटले त्यांना आमचा सादर जयहिंद :) १. ज्यांच्याकडून तुम्ही तुमच्या संरक्षणाची अपेक्षा करताय त्यांनाच तुम्ही त्यांच्या स्वतःच्या भवितव्य आणि आयुष्य दोन्हींबाबत असुरक्षित करताय चार वर्षांनंतर पुढं काय ? हा प्रश्न लेजिट आहे २. सैनिकाची नोकरी टेम्पररी करणे अपीलिंग वाटत नाही, एखाद्या नॉर्मल नोकरी प्रमाणे मेहनत (शारीरिक/ मानसिक) अन तिचा मासिक मोबादला इतकी सोपी मांडणी ह्या सोशल हेड नोकऱ्यांची नसते. तिथे कित्येक भावना इन्व्हॉल्व असतात कायम, नसत्या तर आजरोजी सगळ्या सर्व्हिंग अन रिटायर्ड अधिकाऱ्यांना जो मान अन प्रेम समाजाकडून मिळते ते का मिळते !. एकंदरीत चार वर्षे तुमच्या आमच्या सुरक्षितता राखण्याचे काम केल्यावर अगदीच एकविशीला असलेल्या पोरांना थोडे पैसे देऊन रस्त्यावर सोडणे इनह्युमन नाही म्हणलं तरी फार शहाणपणाचे वाटत नाही. जीसी (जंटलमन कॅडेट) संकल्पना एकदम कॉन्ट्रॅक्ट मर्सिनरीज अन प्रायव्हेट आर्मी जवळ पोचल्यासारखे मला तरी वाटले, कदाचित मी चूक असेन पण हे माझे प्रामाणिकपणे क्रियेट झालेले परसेप्शन आहे. अमेरिकेत एरीक प्रिन्सची ब्लॅक वॉटर (आता अकॅडमी) वगैरे कंत्राटदार मंडळीला देतात इराकमध्ये सिक्युरिटीचे कंत्राट, भारत सरकारला तसे करायचे आहे काय ? परवडेल का ते आपल्याला ? सध्याचे इन्फलेशन रेट्स पाहता चार वर्षांनी बिझनेस कुठला सुरू करता येईल किंवा एकरभर रान तरी येईल का नाही सांगता येत नाही. केला अन चालला तरी अग्निवीर मधून येऊन धंदा इस्टेबलिश करून धो धो नाही तरी बऱ्यापैकी चालल्याचे उदाहरण १०० अग्निवीरात फारतर ५ पोरांचे असेल, आपण विचार करतोय उरलेल्या ९५चा. अग्निवीर तर दूरच, रिटायर व्हेटरन लोकांकडे पाहायला कैक जिल्ह्यात अजूनही पूर्णवेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नेमलेले नाहीत. मागच्या आजी माजी सगळ्या सरकारांनी. किमान काही बाबींचा खुलासा लगेचच करायला हवा होता 1. थेट सैनिकभरती सुरू रहाणार की नाही ? 2. रेग्युलर सैनिकांना आत्तासारखी पेन्शन आणि इतर सोयी सवलती मिळणार की नाही ? अग्निवीर वगैरे अग्निपथ सारख्या स्कीम मधून आलेली उमेदवार सरळ टेरिटोरियल आर्मी मध्ये घुसवले आणि त्यातून सैनिक भरतीत 10 टक्के आणि सीएपीएफ भरतीत 10 टक्के कोटा ठेवला तर ? अमेरिकेचे एक हायपोथॅसिस आहे माझ्याकडे, पण डेटा नाही, हा पूर्ण परिच्छेद एक हायपोथॅसिस आहे चुकीचे असल्यास कृपया सुधारावेत अशी अमेरिका एक्सपर्ट अन अमेरिकेत आज राहणाऱ्या मंडळींना विनंती. व्हिएतनाम युद्ध सुरू झाले, अमेरिका इरेला पेटली, जवळपास पूर्ण अमेरिकन सैन्य तिथे आलटून पालटून लढलं, ते तरी रेग्युलर सैन्य होतं, इमर्जन्सी ड्राफ्ट होता का ते माझ्या माहितीत नाही , युद्ध संपेपर्यंत अमेरिकेत अँटी वॉर विचार बलशाली झाले, पीटीएसडी ग्रस्त, आपण नेमकं लढलोच कश्यासाठी हे न कळलेले व्हेट्स अन त्यांनी युद्ध केले म्हणून त्यांना बोलणारा समाज ह्यातून पुढे किती शूटआऊट झाले असतील किंवा क्राईम रेट्स वाढले असतील ? आता वळा भारताकडे, काही सिनेरियो.... पोरगं वय वर्षे २१, स्टेटस सैन्यातून रिटायर्ड, एक्सपर्ट शूटर, अनआर्म कॉमबॅट ट्रेंड, हातात अकरा लाख रुपये, पुढे काय करायचे ते माहिती नाही कारण पर्मनंट होणाऱ्या २५% मध्ये नंबर लागलेला नाही, घरी परत येतो, वडील अन काकांची भांडणे सुरू आहेत जमिनीवरून एका, सीन कुठं वळतोय इमॅजिन होतंय का ? पोरगं वय वर्षे २१, स्टेटस सैन्यातून रिटायर्ड, एक्सपर्ट शूटर, अनआर्म कॉमबॅट ट्रेंड, हातात अकरा लाख रुपये, पुढे काय करायचे ते माहिती नाही कारण पर्मनंट होणाऱ्या २५% मध्ये नंबर लागलेला नाही, घरी परत येतो, थोरला भाऊ गावच्या राजकारणात, हा भडक माथ्याचा जवान पोरगा, सीन कुठं वळतोय इमॅजिन होतंय का ? पोरगं वय वर्षे २१, स्टेटस सैन्यातून रिटायर्ड, एक्सपर्ट शूटर, अनआर्म कॉमबॅट ट्रेंड, हातात अकरा लाख रुपये, पुढे काय करायचे ते माहिती नाही कारण पर्मनंट होणाऱ्या २५% मध्ये नंबर लागलेला नाही, घरी परत येतो, घरचे वातावरण देवभोळे पोरगे स्थानिक धार्मिक बाबीत बसू घुसू लागले आपले मंदिर- आपली मशीद लेव्हलला पोचले, सीन कुठं वळतोय इमॅजिन होतंय का ? नॉन ऑफिसर कॅडरला भर्ती होणारी मॅक्स पोरे ही ग्रामीण भागातून आलेली असतात, गावबाहेरचे जग बघण्याचे दोनच रस्ते पहिले भर्तीची रॅली दुसरी नोकरीतली भ्रमंती. गावातील, कंझर्व्हेटिव्ह थॉट्स, परसेप्शन्स, धारणा अवधारणा सगळ्या डोक्यात बसलेल्या, हयात जाते फौजेत रुजून इमान पलटणीच्या चरणी वाहायला, इथं चार वर्षात बॅक टू पॅव्हेलीयन, रिफ्लक्स आला तर ? ह्या प्रश्नासाहित इथेच थांबतो, कारण परत पहिले पाढे पंचावन्न आम्ही काही फौजी नाही त्यामुळे कदाचित आम्ही मुर्खच ठरणार काही स्पष्टीकरणे :- १. अमेरिकेची उदाहरणे कारण किमान डेमोक्रॅटिक व्हर्च्युने तरी भारत अमेरिका रिलेटेबल वाटले मला तरी. २. भारतासारख्या बहुआयामी देशात रेजिमेंटेड मेंटलिटीत कसेबसे ऍडजस्ट होऊ लागलेली तरुण मुले तितक्याच वेगाने बाहेर पडली त्या वातावरणातून तर त्याचे असर खराब पडू शकतात असे मला वाटते. ३. माझी वरील गृहीतके चूक ठरवणारे तर्कपूर्ण मांडणीचे खंडन आले तर माझे विचार बदलण्याची माझी तयारी असेल आनंदाने ४. माझे माझ्या देशावर आणि त्याच्या सैन्यावर प्रेम अन आदर आहेच, तरीही त्यावर किंवा इतर मोटिव्ह वर शंका न घेता मांडलेले लेखन मी आवर्जून वाचेनच आभार.

In reply to by जेम्स वांड

> व्हिएतनाम युद्ध सुरू झाले, अमेरिका इरेला पेटली, जवळपास पूर्ण अमेरिकन सैन्य तिथे आलटून पालटून लढलं, ते तरी रेग्युलर सैन्य होतं, इमर्जन्सी ड्राफ्ट होता का ते माझ्या माहितीत नाही , युद्ध संपेपर्यंत अमेरिकेत अँटी वॉर विचार बलशाली झाले, पीटीएसडी ग्रस्त, आपण नेमकं लढलोच कश्यासाठी हे न कळलेले व्हेट्स अन त्यांनी युद्ध केले म्हणून त्यांना बोलणारा समाज ह्यातून पुढे किती शूटआऊट झाले असतील किंवा क्राईम रेट्स वाढले असतील ? व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अमेरिकेत draft होता म्हणजे तरुणांना जबरदस्तीने सैन्यात घुसवले जायचे. साधारण १९४० मध्ये सुरु झालेला draft व्हिएतनाम युद्धाच्या नंतर १९७३ साली बंद झाला. व्हिएतनाम युद्धाचे परिणाम म्हणजे अमेरिकन समाजाचा युद्ध विरोध, काही प्रमाणात आताचे "woke" प्रकाराचा पाया त्याच काळी घातला गेला. व्हिएतनाम युद्धातील सैनिक जेंव्हा समाजांत पुन्हा आले तेंव्हा काही प्रमाणात काही लोकांनी त्यांना शिव्या दिल्या असतील पण ते प्रमाण काळाच्या ओघांत जवळ जवळ शून्य झाले. PTSD हे ओघाने आलेच. पण व्हिएतनाम युद्धाचा सर्वांत खतरनाक दुष्प्रभाव म्हणजे अमेरिकन पोलिसांचे सैनिकीकरण. ज्याचे वाईट परिणाम आज सुद्धा अमेरिकेंत आम्हाला भोगावे लागतात. अमेरिकन पोलीस संकल्पना हि ब्रिटिश पोलिसांच्या परंपरेतून आली आहे. (तुलनेने भारतीय पोलीस व्यवस्था हि कॉलोनीयल आहे, ब्रिटिश परंपरेची नाही). ह्याचा मुख्य पाय म्हणजे पोलीस/शेरीफ हे नेहमी स्थानिक असतात. लोकांच्या ओळखीचे असतात. आणि अगदी छोट्याश्या भागावर त्यांचे नियंत्रण असते. त्यामुळे आपल्या शहरांत नक्की काय चालू आहे ह्याची माहिती त्यांना असते आणि ते आपुलकीने गुन्ह्याला आळा घालतात. पण अमेरिकन शहरे जशी वाढली तसे गुन्हे वाढले. एके काली LA मध्ये दर तासाला एक बँक लुटली जायची. म्हणजे वर्षाला साधारण ८००० बँक दरोडे. व्हिएतनाम युद्धांतील युद्ध गुन्हे केलेले किंवा प्रचंड हिंसा केलेले सैनिक पोलिसांत रुजू झाले तेंव्हा त्यांनी आपली आर्मीची हिंसा पोलीस व्यवस्थेत आणली. हि प्रक्रिया खरे तर त्याआधीच फिलिपिन्स मधील सैनिकांनी सुरु केली होती. LA पोलिसांनी SWAT हि संकल्पना आणली जी अक्षरशः माजी सैनिकांना घेऊन व्हिएतनाम/कोरियन युद्धातील टॅक्टिकस अमेरिकन लोकांवर वापरण्यासाठी होती. अश्यांत पुढे "वॉर व ड्रग" हा महाभयंकर प्रकार अमेरिकेत सुरु झाला ज्याने विनाकारण असंख्य बळी घेतले वरून ड्रग्स समस्या अगदीच हाताबाहेर गेली. https://thediplomat.com/2020/06/how-americas-wars-in-asia-militarized-t… माजी सैनिक परत येऊन गुन्हेगार बनतात का ? तर ह्यावर सुद्धा अमेरिकेत अभ्यास झाला आहे. जे सैनिक प्रत्यक्ष युद्धांत भाग घेतात त्यातील कृष्णवर्णीय सैनिक जास्तकरून गुन्ह्यात अडकतात, तर गोरे सैनिक घटस्फोट किंवा पारिवारिक हिंसा ह्यांत अडकतात. ह्याचे एक प्रमुख कारण PTSD हे आहे. पण भारतीय सैन्य चुकून मोठ्या युध्दांत भाग घेते किना प्रचंड हिंसा असलेल्या भागांत प्रदीर्घ सेवा भारतीय सैनिकांची जास्त असत नाही त्यामुळे ह्या गोष्टी भारताला लागू होती कसे नाही. अमेरिकन संस्थांचे अनुभव भारतीयांना लागी होतीलच असे नाही. जे पोरटे स्वतःला आर्मी भरती इच्छुक म्हणून सध्या आग लावत आहेत त्यांचे वर्तन आणि वागणूक पाहिल्यास हि मंडळी सतरंजी उचलायच्या लायकीची सुद्धा आहे असे वाटत नाही. आर्मी ह्यांना घेऊन चार वर्षांत माणसाळू शकली तर हाच भला मोठा फायदा आहे. ४ वर्षांनी जे सैनिक आर्मी सोडून येतील त्यातील बहुतेकांना कॉम्बॅट अनुभव असण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे. हे सर्व जावं म्हणजे अगदी खालच्या स्तरावरील लोक असतील त्यामुळे हि मंडळी पोलीस अधिकार वगैरे बनेल असे वाटत नाही. आर्मी मध्ये सेवा केलेल्या लोकांचे मत इथे जास्त ग्राह्य असायला पाहिजे.

1) फक्त काही हजार लोक च एक प्रयोग म्हणून भरती करा. २) ह्या मधील कोणालाच लष्करात कायम स्वरुपी सेवेत घेवू नका. ३) चार वर्ष झाली की सेवा संपली. ४) त्या मुळे अनिश्चितता संपेल आणि ज्यांना चार वर्षात काही पैसे मिळतील आणि त्यांना त्या पैशाची गरज आहे तेच अग्निपथ योजनेतून भरती होतील. ५) बाकी लष्कर भरती जुन्या पद्धतीची असेल त्या मध्ये काही फरक होणार नाही. वर्षाला जे काही ६० हजार लोक कायम स्वरुपी सेवेत घेतली जातात ते तसेच पुढे चालू राहील. ६)आताच्या सर्वात धोकादायक बाब. १०० भरती झालेल्या मुलांपैकी २५ टक्के कायम स्वरुपी सेवेत घेतले जाईल.हे गाजर. ह्या गाजर साठी अधिकारी लोकांची मर्जी राहावी त्या मधून चापलुसी करावी लागेल. अधिकारी लोक ह्याचा फायदा घेवून त्या मुलांची पिळवणूक पण करू शकतात. आणि ज्यांना चार वर्ष सेवेत जायचेच नाही ते पण २५% मध्ये नंबर लागेल ह्या आशेने जातील. आणि नंबर नाही लागला तर .निराशा,राग,तिरस्कार आणि हातात हत्यार अशी सुड घेण्यासाठी योग्य स्थिती निर्माण होईल. सैन्यात हे राग नी लाल झालेले,निराशेने ग्रासलेली मुल. सैन्यातील च लोकांना यमसदनी पाठवतील. अशा घटना सैन्यात अनेक वेळा घडल्या आहेत. त्या मुळे 25% कायम स्वरुपी सेवेत घेणार ही अट पहिली काढून टाकावी एकाला पण कायम स्वरुपी सेवेत घेणार नाही असे स्पष्ट असावे.

अग्निपथ ह्या योजनेतील सर्वात मोठी त्रुटी माझ्या मते ही आहे. 25% लोकांना कायम स्वरुपी सेवेत घेणार हे गाजर ह्या योजनेतील सर्वात मोठी त्रुटी आहे . (आता ही त्रुटी चुकून निर्माण केली आहे की बानिया डोकं आहे हे स्वतचं ठरवा) ह्या गाजर मुळेच विरोध जास्त होत आहे. २५ % टक्के लोक अग्निपथ योजनेतून कायम स्वरुपी सेवेत घेणार ह्याचा अर्थ काय निघतो. जुनी लष्कर भरती पद्धत हळू हळू बंद करणारं. हळू हळू सैन्यातील निवृत्ती वेतन बंद करणार

सरकार बिनडोक आहे किंवा उगाचच वेड्याचे सोंग घेत आहे .असे त्या मुळे मी माझ्या प्रतेक प्रतिसाद तशा प्रकारच्या भावना व्यक्त करतं असतो. अग्निपथ लं रस्त्यावर येवून तीव्र विरोध का होत आहे ह्याचे कारण पण सरकार लं समजत नसेल तर हे सरकार देशाचा कारभार काय दर्जा चा करत असेल. विरोध होण्याचे कारण वेगळेच.. आणि सरकारचे भलतेच चालू आहे... 11 लाख देवू आणि 23 लाख देवू. 11 लाख आणि 23 लाख हे विरोधाचे कारण च नाही .

कचरे बुवा तुमच्या विचार करणाऱ्या मेंदूचा आणि टंकणाऱ्या हाताचा काहीही समबंध नाही हे तुम्ही वारंवार सिद्ध केलेलंच आहे पण जिथे तिथे असंबद्ध प्रतिसाद टाकून चांगल्या चर्चेचा बट्याबोळ करण्याचे काय कारण आहे ? आपले प्रतिसाद म्हणजे नुसती बेताल बडबड आहे.

अग्निपथ योजना का आणली त्याची गरज काय. ह्याचे उत्तर सरकार पण देणार नाही आणि समर्थक पण. राजनाथ सिंग ह्यांच्या देह बोलीवरून त्यांना पण ही योजना पसंत नाही असेच जाणवत आहे Mr खरे . अग्निपथ ह्या योजनेतून 25% टक्के मुलांना कायम स्वरुपी सेवेत घेतले जाईल हा नियम बदलत आहे. चार वर्ष झाली की कोणालाच त्याच योजनेतून कायम स्वरुपी सेवेत घेतले जाणार नाही. कायम स्वरुपी सेवेत घेण्याची जुनीच भरती प्रक्रिया असेल असे सरकार नी जाहीर करावे एका दिवसात आंदोलन थांबेल. तुम्ही खरेच फौजेत तरी होता का ,हा पण प्रश्न मला नेहमी पडतो.

सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे असते दुर्दैवाने सद्य केंद्रसरकार जेव्हा जेव्हा एक मोठा निर्णय घेते तेव्हा तेव्हा त्यात अनेक त्रुटी दिसून येतात. प्रत्येकवेळी जनतेची तीव्र नाराजी केंद्र सरकार जेव्हा जेव्हा निर्णय घेते तेव्हा तेव्हा जनता त्या योजनांना कायद्यांना विरोध करतांना दिसते. कृषिकायदे, भूसंपादन कायद्यात सपशेल माघार घ्यावी लागली. आता अग्निपथच्या निमित्ताने देशभर तरुणांचा वाढता विरोध पाहता आता वयोमर्यादेत वाढ आणि आत्ता सैन्यदलात या अग्निविरांना १० % आरक्षण देण्यात येईल अशी घोषणा काल करावी लागली. अजुन या योजनेत काय काय बदल होतील ते पुढे दिसून येतीलच. पण जनता जेव्हा जेव्हा विरोध करते तेव्हा निर्णय बदलले जातात. निर्णय घेण्यापूर्वीच ही योजना जनता किती उचलेल किती सकारात्मक प्रतिसाद मिळेल याचा विचार करायला हवा. पण काहीही करून ज्याला हात लावतील त्या प्रत्येक व्यवस्थेची मातीच करायची ठरवल्यावर आपल्या हातात तरी काय असते म्हणा. सरकारला सुबुद्धी लाभों इतकीच प्रार्थना. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या मते तुमच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे आहे. हात लावेन त्याची माती करेन ही ताकत येण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत.. आणि त्या ह्या सरकार मध्ये आहेत. अद्वितीय ,अतिशय हुशार,देश प्रेमी सरकार तर आहेच. पण बाजूच्या देशांना आपल्या फौजे मुळे त्रास होवू नये,त्यांचे मन स्वस्थ बिघडू नये. म्हणून स्वतःची फौज कमजोर करण्याचा मनाचा मोठेपणा पण ह्या सरकार कडे आहे... .शक्यतो इतक्या मोठ्या मनाची सरकार जगात दिसणार नाहीत. काही च देशांच्या नशिबात असे सरकार मिळण्याचे परम भाग्य असते.