मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

द काश्मीर फाइल्स

निनाद · · काथ्याकूट
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे. हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्‍यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे. ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत. या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे. या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.

वाचने 94092 वाचनखूण प्रतिक्रिया 327

In reply to by प्रदीप

तर्कवादी 17/03/2022 - 20:43
धन्यवाद प्रदीप जी
ह्यांतील एकानेही, आपण खाली दिलेल्या श्रेणीक्रमांतील १- ३ च्या वर (४ आणि/ अथवा ५) प्रतिक्रिया दिलेली नाही
वाचून बरं वाटलं.
आताही ह्यांतून हिंदू- मुस्लिम दुफळी निर्माण होण्याइतका हिंदू समाज बावळट नाही
बस.. हीच अपेक्षा आहे.. सर्वांनी ह्याच सुज्ञ विचारसरणीची कास धरावी ..

मुक्त विहारि 15/03/2022 - 12:13
The Kashmir Files : ‘देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून…’ काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे भाजपावर टीकास्त्र https://www.loksatta.com/manoranjan/the-kashmir-files-congress-criticizes-bjp-over-kashmiri-pandits-pvp-97-2840274/lite/ कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, हे हिंदू हितवादी नाहीत, असेच माझे वैयक्तिक मत, अधिक दृढ होत चालले आहे ....

In reply to by मुक्त विहारि

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 15/03/2022 - 12:40
पंडीतांनी काश्मिरमधे कधी जायचे ते सरकारला विचारवे - सचिन सावंत अतिशय निर्लज्ज विधान. दुसर्‍या महायुध्दानंतर ज्युंच्या वंशविच्छेदानंतर इस्त्राइल जसा बनला तसे सोल्युशन काँग्रेसी बगलबच्चांना चालेल का. साधे रोपटे पण एका कुंडीतून उपटून दुसर्‍या कुंडीत घातले की नेहमीच तग धरत नाही. भाड्याचे घर बदलताना पण जरी शेजारच्या इमारतीत जायचे असेल तरी किती तांरांबळ उड्ते इकडे काश्मिरी कितीतरी कुटुंबे विस्थापित झाली त्यात काहींचे बाप, भाऊ वगैरे मारले गेले होते, त्यांचे अंत्यसंस्कार तरी झाले होते का देव जाणे. त्यांना फक्त काश्मिरमधे जागा दिली की झाले असे ज्यांना वाटते त्यांचा धिक्कार. थू तुमच्या आयुष्यावर.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मुक्त विहारि 15/03/2022 - 12:51
आणि काश्मीरचा प्रश्र्न युनोत का नेला? ते पण जाऊ दे 1965 आणि 1972 मध्ये, काश्मीर स्वतंत्र करता आले असते, ते का केले नाही? आजही, CAA आणि NRCला विरोध करून, कॉंग्रेस हिंदू हितवादी नाही, हेच सिद्ध होत आहे.... कॉंग्रेसची धोरणे, तेंव्हाही हिंदू हितवादी न्हवती आणि आज देखील नाहीत...

In reply to by मुक्त विहारि

सुखीमाणूस 15/03/2022 - 23:22
३७० कलम रद्द करायला जमले नाही सत्तेवर असताना कौन्ग्रेस् ला. आता याना त्रास होतोय काश्मिर फाइल्स प्रदर्शित झाला म्हणुन..

In reply to by मुक्त विहारि

दिगोचि 16/03/2022 - 08:03
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, हे हिंदू हितवादी नाहीत मला असे गेली अनेक वर्शे वाटत आहे. लोकसत्ताचे सम्पादक कुबेर हे नेहेमी भाजप विरोधी राहिले आहेत. तुम्ही दिलेल्या लोकसत्तेच्या सदरातले "सरकार जुन्या जखमा कोरून त्या भळभळत राहतील हे पाहते" हे वाक्य घेतले तर पन्डिताना जखम झाली हे कबुल करताना त्यानी मोदीसरकारला देशविरोधी हे विशेशण लावले आहे.

सुखीमाणूस 15/03/2022 - 12:34
https://thenationaltelegraph.com/culture/the-kashmir-files-bringing-a-politically-incorrect-genocide-to-light आणि आरती टिक्कु सिन्ग यान्ची मुलाखत. बरीच मोठी आहे पण महितीपुर्ण आहे. https://www.youtube.com/watch?v=CNl3WRCa8OA
The Kashmir Files : पुण्यातील 'हॉटेल खान्देश'चा देशप्रेमी तडका,'द कश्मीर फाइल्स'चे तिकीट दाखवा अन्... https://marathi.abplive.com/news/pune/hotel-khandesh-in-pune-collect-tickets-for-the-kashmir-files-and-get-discounts-1041450 उत्तम निर्णय...

sunil kachure 15/03/2022 - 13:06
कोणतेही मत बनवायच्या अगोदर थोडा विचार करायलाच हवा पण माणूस बुद्धिमान आहे असे वाटत असले तरी तो उथळ विचाराचा आहे . हे अनेकदा सिद्ध झाले आहे. जेव्हा कोणत्याही समाज कडून ( ह्या मध्ये सर्व गट आले,धार्मिक,जातीय,प्रांतीय,भाषिक) हिंसक प्रतिक्रिया उठते . तेव्हा ते असे हिंसक का झाले ह्याला मोठी पार्श्वभूमी असते. समाज एकत्र होवून हिंसक कारवाया करण्यास लगेच तयार होत नाही त्या साठी तसे प्रयत्न किती तरी वर्ष काही लोक करत असतात. चंद्रकुमार ह्यांनी उल्लेख केल्या प्रमाणे स्फोटक तेल निर्माण करावे लागते. मग ठिणगी टाकली की आज लागणार च.. केंद्रात जे सत्तेवर असतात त्यांची एक निती असते विरोधी पक्षांची राज्य सरकार अडचणीत आणणे..त्या साठी राज्यपाल हा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता त्या साठी वापरला जातो. (राज्यपाल हे पद राजकीय व्यक्ती लं असू च नये.) इंदिरा गांधी ची वृत्ती पण तशीच होती विरोधी पक्षांची राज्य सरकार काही ही योग्य कारण नसताना फक्त राजकीय हेतू साठी बरखास्त करणे. चंद्र सूर्य कुमार ह्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. राज्यसरकार ही राज्याचं प्रतिनिधित्व करतात राज्यातील लोकांच्या भावना राज्य सरकार शी जुळेल्ल्या असतात. केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षाने राजकीय हेतू नी राज्य सरकार बरखास्त केले किंवा अडचणीत आणले की त्या राज्यातील जनता अस्वस्थ होते त्यांना असुरक्षित वाटते. काश्मीर मधील सरकार केंद्रातील काँग्रेस नी बरखास्त केले आणि जगमोहन हे राज्यपाल होते त्या काळात. चंद्रकुमार ह्यांची पोस्ट. आणि नंतर असलेल्या vp sing सरकार नी त्या जगमोहन ह्यांना च राज्यपाल म्हणून नेमणूक केली .इथेच हिंसाचार ची बीज आहेत काश्मीर मध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत म्हणून त्याला धार्मिक रंग आहे. पण तो संघर्ष स्थानिक जनता विरुद्ध बाहेरचे असाच आहे.. हिंदुस्थान सरकार म्हणजे हिंदू चे सरकार. म्हणजे आमच्या अधिकारावर गदा आणणारे . म्हणून हिंदू विरुद्ध तेथील जनता एक झाली आणि पुढे हिंसाचार झाला. माझ्या मते हेच कारण आहे .त्या मध्ये संधी बघून धर्म वेडे सहभागी झाले असतील पण बोट घालण्यास जागा दिल्ली मधील राजकीय लोकांनीच निर्माण केली. आज पण मोदी सरकार बंगाल ,महारष्ट्र मध्ये त्यांच्या अधिकाराचा गैर वापर करत आहे. दोन्ही राज्यातील जनता त्या मुळे केंद्र सरकार वर नाराज आहे. हे स्फोटक तेल च आहे पण जास्त ज्वालाग्राही अजून तरी नाही.

जेम्स वांड 15/03/2022 - 13:30
भाजप संसदीय समिती बैठकीत द काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाचे कौतूक केले आहे पंतप्रधान महोदयांनी ह्या प्रसंगी प्रत्येकाने पहावा असे वर्णन काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाचे केले आहे.

sunil kachure 15/03/2022 - 13:35
काश्मिरी हिंदू चे पुनर्वसन कसे करणार ह्या वर देशाच्या पंतप्रधान असलेल्या व्यक्ती नी बोलले पाहिजे. पण ते काम खूप अवघड आहे ,त्या साठी कष्ट आहेत. सर्वात सोप हिंदू मुस्लिम मध्ये दरी निर्माण करून राजकीय फायदा करणे . आणि सत्ता मिळवणे.

sunil kachure 15/03/2022 - 13:47
राज्यपाल हे सरळ त्या राज्यातील लोकांच्या मतदान नी सरळ निवडून आला पाहिजे.. हे पद अनेक समस्या चे कारण आहे .यूपी ची राज्यपाल आनंदी बाई पटेल. Bjp पक्षाची गुजरात ची माजी मुख्य मंत्री जोक आहे मोठा. महाराष्ट्राचे राज्यपाल bjp चे कार्यकर्ते rss शी संबंधित .ही लोक निरपेक्ष निर्णय घेवूचं शकत नाहीत
युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष, निवडणुकीत गैरप्रकार झालाय? https://www.tv9marathi.com/maharashtra/nagpur/youth-congress-election-tousif-khan-nagpur-city-president-the-election-was-rigged-662209.html वसीम खान, अक्षय घाटोळे यांच्या म्हणण्यानुसार, तौसिफ खानवर गुन्हे दाखल आहेत. शिवाय वय पस्तीस वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं तौसिफ खान युवक काँग्रेसची निवडणूक लढू शकत नाहीत. शीलजरत्न पांडे समर्थकांनी आक्षेप घेतला की, सर्वाधिक मते घेणारे तीन उमेदवार निवडणुकीसाठी पात्र नाहीत.....

In reply to by मुक्त विहारि

जेम्स वांड 15/03/2022 - 14:33
हा प्रतिसाद ताज्या घडामोडी धाग्यावर चपखल बसेल असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी तुम्ही म्हणाल ते प्रमाण, नाहीतरी आपण मिपावर अमरपट्टा घेऊनच वावरता आम्ही मर्त्य उगा आपलं आदराने काहीतरी सुचवायचं म्हणून बोललो हो :)
https://marathi.abplive.com/entertainment/the-kashmir-files-film-imdb-rating-dropped-due-to-reported-unusual-voting-activity-1041419/amp रेटिंग कितीही असो, ज्याला सिनेमा बघायचा आहे, तो बघणारच ...

Trump 15/03/2022 - 14:33
किती घाण करणार!!!
‘द काश्मीर फाईल्स’मुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न, गृहमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता या चित्रपटाच्या आडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे, अशी चिंता दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील नेमकं काय म्हणाले? काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराशी संबधित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला करमाफी देण्याची मागणी भाजप सदस्यांनी केली होती. मात्र हा चित्रपट संपला की चित्रपटगृहाच्या बाहेर लोकांना एकत्र करुन हिंदू जनजागृती विशेष संवादाच्या माध्यमातून धर्म प्रसार केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता झुंड चित्रपटाचे मोफत खेळ दाखविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील म्हणाले. https://www.loksatta.com/manoranjan/home-minister-dilip-walse-patil-concern-over-the-kashmir-files-movie-attempt-to-endanger-law-and-order-in-the-state-nrp-97-2841874/

चंद्रसूर्यकुमार 15/03/2022 - 14:52
एक गोष्ट लक्षात आली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून समस्त जमात-ए-पुरोगामी चवताळून त्या चित्रपटावर हल्ला करायला लागले आहेत- जणू काही हा चित्रपट म्हणजे त्यांच्याच जीवनमरणाचा प्रश्न आहे. पण आता ते लोक असे का करत आहेत त्याचे कारण समजले. हा चित्रपट खरोखरच त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. इतकी वर्षे समाजकार्य किंवा अन्य दुसरे कोणते लेबल लाऊन हिंदूविरोध हाच अजेंडा हे लोक राबवत होते. इतकी वर्षे ही गोष्ट हिंदूंच्या लक्षात आली नाही म्हणून किंवा बरेच लोक बावळट होते म्हणून ती गोष्ट कळूनही त्याला पाठीशी घातले गेले. पण आता या चित्रपटाच्या निमित्ताने हे लोक नक्की कोणाचे समर्थन करत होते हे आता सामान्यांना समजले आहे. मग हळूहळू लोक इतर प्रश्नही विचारायला सुरवात करत आहेत. उदाहरणार्थ अरूंधती रॉय आणि यासीन मलिकचे नक्की काय साटेलोटे होते की त्याच्याबरोबर अगदी खिदळत होती? roy इंडिया टुडेने यासिन मलिकला त्यांच्या इंडीया टुडे कॉनक्लेव्हमध्ये पण बोलावले होते. अशी इतर उदाहरणेही असतीलच. काश्मीरमधून हिंदूंचे विस्थापन झाले हे सगळ्यांना माहित असली तरी परिस्थिती नक्की किती भयानक होती याची कल्पना सगळ्यांना नसते. ती कल्पना सगळ्यांना या चित्रपटामुळे मिळाली आहे. आपसूकच इतकी वर्षे हे जमात-ए-पुरोगामी नक्की कोणाची बाजू घेत होते हे समजले की मग त्यांनी जी डावी इकोसिस्टीम उभी केली आहे त्याच्या विश्वासार्हतेला तडा जाऊन त्यांच्या अस्तित्वावरच घाला येईल हे त्यांना समजले नसेल असे अजिबात नाही. एका अर्थी हा चित्रपट आणि त्याला मिळणारा उदंड प्रतिसाद या जमात-ए-पुरोगामीच्या अस्तित्वावरच प्रहार करायची क्षमता बाळगून आहे. मग ते चवताळून उठले नाहीत तरच नवल.

बापूसाहेब 15/03/2022 - 23:26
चित्रपट पाहायचा आहे पण 2.5 वर्षाचा मुलाला सोबत घेऊन जाता येईल का ?? घरी सांभाळणारे कोणी नाही ... त्याला एकट्याला सोडून जाता देखील येणार नाही... त्यामुळे कसे करावे ते समजत नाही.. कोणी लहान मुलाला घेऊन हा चित्रपट पाहिला आहे का. थेटर मध्ये सोडतात का?

In reply to by बापूसाहेब

Trump 16/03/2022 - 16:10
माझा सल्ला: लहान मुलांना असल्या ठिकाणी घेउन जाउन नये. मुले रडल्यामुळे इतरांना त्रास होतो. मुलांना तत्सम चित्रपटातील भयवहता पाहुन त्रास होतो.

सुखीमाणूस 15/03/2022 - 23:58
या नावाखाली हिन्दु जाती जातीन्मधे तेढ निर्माण करायची. आणि राज्य करायचे. या पुरोगाम्याना हिन्दु उच्च जातिन्चा राग का? एक कारण पैसाआहे. तेलामुळे मुस्लिम् देशान्कडे पैसा आहे. आणि पाश्चात्य देशान्कडे भरपुर पैसा आहे. मग परदेशी मदत मिळवायची तर हिन्दु धर्म आणि त्यातल्या उच्च जाती याना बदनाम करणे सोपे आहे. यात परत जिवाला धोका नाही. आणि३.५ की ४.५ टक्के लोकान्ची भीती दाखवुन उरलेला समाज ताब्यात ठेवणे सोपे तस पाहिल तर कुळ कायदा करुन शेतीचे कुळाना वाट्प, आरक्शण, ईतक्या वर्षाचे कौन्ग्रेस्स सरकार, आम्बेडकरान्ची घटना, असे असताना देश सुजलाम सुफलाम व्ह्यायला हवा होता,एकदम धरतीवरचा स्वर्ग... काश्मिर फाइल्स च्या निमित्ताने समाज ढवळुन निघतो आहे हे खुप चान्गले आहे. सगळ्या बाजु समोर येतायत हे देखिल चान्गले आहे. वैचारिक बदल होताना त्रास तर होणारच. बर्याच युरोप मधील देशाना मुस्लिम बहुसन्ख्य झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे भारताने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुखीमाणूस

Trump 16/03/2022 - 16:12
या पुरोगाम्याना हिन्दु उच्च जातिन्चा राग का?
बनावटी पुरोगामी लोकांना हिंदुमध्ये जातीद्वेष पसरवायला आवडतो.
बर्याच युरोप मधील देशाना मुस्लिम बहुसन्ख्य झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागतो आहे.
कोणत्या युरोपियन देशांत मुस्लिम बहुसंख्य झाले आहेत?

In reply to by Trump

सुखीमाणूस 16/03/2022 - 22:20
https://www.sundayguardianlive.com/world/europe-struggling-problem-islamist-extremists https://www.europarl.europa.eu/doceo/document/E-9-2020-004329_EN.html https://eclj.org/religious-freedom/pace/le-conseil-de-leurope-sinquite-grandement-de-lapplication-de-la-charia-en-europe https://www.i24news.tv/en/news/international/europe/1568920086-poll-46-of-french-muslims-believe-sharia-law-should-be-applied-in-country https://www.cfr.org/backgrounder/understanding-sharia-intersection-islam-and-law

In reply to by सुखीमाणूस

बहुसंख्य होणे आणि लोकसंख्या वाढणे ह्यात फरक आहे. कृपया मुस्लीम बहुसंख्य झालेल्या युरोपियन देशांची नावे द्यावीत.

In reply to by Trump

सुखीमाणूस 16/03/2022 - 22:48
युरोपमधे मुस्लिम बहुसन्ख्य होउ घातल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागेल अशी चिन्ता व्यक्त होते आहे असे म्हणायचे आहे. चुक लक्शात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

हणमंतअण्णा शंक… 16/03/2022 - 00:45
खऱ्या काश्मीर फाइल्स/स्टोऱ्या पाहायच्या असतील तर खालील ३ व्हिडीओ पहा. प्रोपोगंडा नाही. म्हणजे यांचाही नाही आणि त्यांचाही नाही. काश्मिरी पंडितांचे शिरकाण करणाऱ्या मुस्लिम अतिरेक्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती ऐकून काटा आला. १. मुस्लिम अतिरेक्यांची मानसिकता, अतिशय प्रतिगामी इस्लामी कट्टरता ( डार्विनला विरोध, आधुनिक शिक्षणाला विरोध, स्त्री समानतेचा विरोध ) काय चीज आहे हे अतिशय थोडक्यात पण परिणामकारकरित्या कळते. सॅम हॅरिस म्हणतो की "(धार्मिक) मूलतत्ववाद हा वाईट नसतो जर धर्माची मूलतत्त्वेच चांगली असतील तर. उदा. एखादा जैन जितका कट्टर होत जाईल तितका तो समाजावर उपकारक, अहिंसक आणि चांगला होत जाईल. इतका की पडलेली फळं खाऊन पोट भरेल, चालताना मुंगी देखील चिरडणार नाही, बोलताना तोंड झाकून घेईल. म्हणून इस्लामी मूलतत्ववादी आणि जैन मूलतत्ववादी यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे." अर्थात व्यवहारात सगळ्याच धर्माची मूलतत्त्वे तितकी साधी सरळ आणि सोपी मात्र नाहीत हे ही तितकेच खरे आहे. आणि असली तरी अनुयायी त्यांचे वेगवेगळे अर्थ लावून असंख्य प्रथा परंपरा रूढी निर्माण करतातच. अशा गोष्टींवर बळावरच आधुनिक समाज चालवणे, त्यासाठी कायदे करणे हे शेवटी समाजाला मागासच करणार आहे. आता व्हिडीओत दाखवलेल्या इस्लामी मागण्या (डार्विनला विरोध, आधुनिक शिक्षणाला विरोध, स्त्री समानतेचा विरोध ) ह्या कमी अधिक फरकाने हिंदुत्ववादीही तेही समाज प्रबोधनाच्या नावाने करतच आहेत. ( उदा. आपले लाडके कॉमेडी कीर्तनकार). आणि मूळ विषय म्हणजे पंडितांचे विस्थापन, त्यांच्या हत्या. त्यांचे समर्थन डोके ताळ्यावर असलेला कुणीही माणूस करूच शकत नाही. संतोष शिवनच्या चित्रपटात भुतासारखा हिंडणारा काश्मिरी पंडित बघून, भीषण सिंग चे हे श्रीनगरचे चित्र पाहून वेदना होतात. २. दुसरा व्हिडीओ: अभाविप आणि तत्सम संघटनांनी केलेले आंदोलने (एकता यात्रा) हा मुख्य विषय. गमंत म्हणजे आपले लाडके विश्वगुरु तेव्हाही तितकेच थापाडे होते हेही लक्षात येईल. साक्षात आदरणीय अटल बिहारी देखील त त प प करताना पाहून मला धक्का बसला. ( परंतु निदान पत्रकारांना सामोरं गेले हे सुद्धा पुरेसे आहे ) ३. तिसरा व्हिडीओ: दुराईस्वामी अपहरण, त्यांचा स्टॉकहोम सिन्ड्रोम, मस्त गुल ह्या पाकिस्तानी अतिरेक्याची मुलाखत असा आहे. हा पण अतिशय धक्कादायक. असो. काश्मीर फाईल्स पाहण्यापूर्वी पूर्वतयारी केली आहे. या वीकांताला पाहण्याचा प्लॅन आहे.

डाम्बिस बोका 16/03/2022 - 03:01
सॅम हॅरिस म्हणतो की "(धार्मिक) मूलतत्ववाद हा वाईट नसतो जर धर्माची मूलतत्त्वेच चांगली असतील तर. उदा. एखादा जैन जितका कट्टर होत जाईल तितका तो समाजावर उपकारक, अहिंसक आणि चांगला होत जाईल. इतका की पडलेली फळं खाऊन पोट भरेल, चालताना मुंगी देखील चिरडणार नाही, बोलताना तोंड झाकून घेईल. म्हणून इस्लामी मूलतत्ववादी आणि जैन मूलतत्ववादी यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे." हा मुद्दा नाही पटला कुठलाही धर्म जेव्हा कट्टरते कडे झुकतो तेव्हा त्याचे दोष दिसू लागतात. स्वतःला शांतताप्रेमी म्हणून मिरवणारे जैन धर्मीय जेव्हा मांसाहारी मराठी लोकांना सोसायटी मधून हाकलून देतात किंवा मुंबई मध्ये आसुन घर द्यायला नकार देतात, तेव्हा धर्म शेवटी कुठे घेऊन जातो ते कळते

In reply to by डाम्बिस बोका

शाम भागवत 16/03/2022 - 09:10
कुठलाही धर्म जेव्हा कट्टरते कडे झुकतो तेव्हा त्याचे दोष दिसू लागतात. स्वतःला शांतताप्रेमी म्हणून मिरवणारे जैन धर्मीय जेव्हा मांसाहारी मराठी लोकांना सोसायटी मधून हाकलून देतात किंवा मुंबई मध्ये आसुन घर द्यायला नकार देतात, तेव्हा धर्म शेवटी कुठे घेऊन जातो ते कळते
तुम्ही चुकीचे अजिबात बोलला नाही आहात. अति सर्वत्र वर्जयेत पण. मी माझे घर कोणाला द्यायचे याचा अधिकार मला असणे मी योग्य समजतो. मी मासे खात नाही. त्याचा वासही मला सहन होत नाही. असे असताना मी का बरे मासे खाणार्‍या माणसांना माझ्या घरात जागा देऊ? अगदी त्याच पध्दतीने साधारणतः माझ्या विचारांची जवळीक असलेला शेजार असेल तर तो मला भावतो. इथे कोणत्या धर्माचा वगैरे प्रश्न नसून ही साधारणतः मानसिकता असते. त्या बद्दल बोलतोय. कट्टर जैन कसे वागतात याच्या समर्थनार्थ मी हे बोलत नाही आहे. पण ते असो. जैन कितीही कट्टर झाला तरीही ते दोषपूर्ण वर्तवणूक करतात म्हणजे ते बलात्कार, खून, जाळपोळ वगैरे करत नाहीत. किंवा "जैन धर्म स्विकारा किंवा मरा" अशा अटीही लादत नाहीत. एवढे तरी मान्य करू शकाल का? "काश्मिर फाईल्स" हा धाग्याचा विषय आहे म्हणून विचारतोय. तरीही काश्मीर फाईल्स मधली कट्टरता व जैन कट्टरता ही एकाच प्रकारची आहे. त्यात डावे उजवे असे काहीही करता येत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर मात्र माझा पास.

In reply to by शाम भागवत

जेम्स वांड 16/03/2022 - 10:01
जैन कितीही कट्टर झाला तरीही ते दोषपूर्ण वर्तवणूक करतात म्हणजे ते बलात्कार, खून, जाळपोळ वगैरे करत नाहीत.
हे फारच धाडसी विधान झाले काका. बलात्कार खून जाळपोळ हे फक्त धार्मिक सेंटिमेंट्स मधूनच होतात असे नाही ना हो. म्हणजे वरील गुन्हे करायला आर्थिक, सामाजिक व इतरही कारणे असू शकतात ना,

In reply to by जेम्स वांड

शाम भागवत 16/03/2022 - 11:48
म्हणजे वरील गुन्हे करायला आर्थिक, सामाजिक व इतरही कारणे असू शकतात ना,
धाग्याचा विषय आहे काश्मीर फाईल्स. मी धागा विषयाच्या संदर्भात बोलतोय. काश्मीर फाईल्स मधे आर्थिक व सामाजिक तसेच इतरही कारणे असून धार्मिक कारणे ही त्यामुळे फारशी महत्वाची ठरत नाहीत असे तुम्हाला म्हणावयाचे असेल तर माझा पास.

In reply to by शाम भागवत

जेम्स वांड 17/03/2022 - 14:52
फक्त "जैन असे करत नाहीत" ह्या क्लीनचिटला माझा आक्षेप होता, किंबहुना काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कर घुसले त्या क्षणापासून ते धर्मयुद्ध होतेच की, त्याबाबतीत वादच नाही माझा काही. मुद्दा अजून सुलभ करता, जैन अजिबातच हिंसक गुन्हे करत नाहीत असे नाही इतके मात्र मी म्हणतोय.

In reply to by जेम्स वांड

शाम भागवत 17/03/2022 - 16:09
मला जे काही म्हणावयाचे आहे ती मी म्हटले आहे. तुम्ही जो काही खुलासा करायचा आहे तो केला आहे. मिपाकर सुज्ञ आहेत. ते योग्य तो बोध त्यातून घेतीलच.

In reply to by शाम भागवत

रात्रीचे चांदणे 16/03/2022 - 10:03
मराठी माणसाला बऱ्याच गुजराती सोसायटीमध्ये घर भाड्याने सोडा पण विकतही घेता येत नाही. घराचे उदाहरण सोडल्यास जैन वगैरे लोक कितीही कट्टर वागले तरीही त्यांचा मात्र होईल आस वाटत नाही.

In reply to by शाम भागवत

डाम्बिस बोका 16/03/2022 - 18:48
थोडे अवांतर होते आहे. विषय वेगळा आहे म्हणून हा मुद्दा आटोपता घेऊया. बाकी चर्चा खूप चांगलीं चालली आहे. बरीच नव्याने माहिती मिळाली.

निनाद 16/03/2022 - 06:32
हिंदू एक असला पाहिजे. आपल्या बांधवांवर कुणी हल्ल्ला करत असेल तो परतवण्यासाठी हे आवश्यक आहे. आज वर आपल्याला कसा धार्मिक छळ भोगावा लागला याचे रेकॉर्ड्स जपले पाहिजेत. त्या चुकातून शिकले पाहिजे. पण चित्र काय आहे? हिंदूंचा छळ हे एक विकिपिडिया चे पान सुद्ध आपण पाहिले तर पूर्ण झालेले नाही. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9B%E0%A4%B3 यात लाल रेघा असलेले प्रत्येक पान हिंदूंनी तयार केले पाहिजे! जितका छळ आपला हिंदूंचा झाला आहे तेव्हढा कोणत्याही धर्माचा या भूतलावर झालेला नाही. मग प्रत्येक छळाचा प्रकार येथे नोंदलेला हवा. तुम्ही चांगली चित्रे काढता? मग काढा या छळाची चित्रे आणि डकवा येथे! अगदी साठी लाईन आर्ट पण चालतील पण त्यातून काय भोगले ते कळले पाहिजे पुढील पीढीला. हे एक गोष्ट लक्षात ठेवा इंग्रजी विकि हा डाव्यांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे तिकडे जाण्यात अर्थच राहिलेला नाही! मग कोण कोण येतंय?

आग्या१९९० 16/03/2022 - 08:05
हिंदू एक असला पाहिजे. आपल्या बांधवांवर कुणी हल्ल्ला करत असेल तो परतवण्यासाठी हे आवश्यक आहे. नक्की काय करायला हवे?

In reply to by आग्या१९९०

https://www.esakal.com/manoranjan/kashmir-files-is-tax-free-in-bjp-ruling-states-shk99 हिंदू हितवादी भाजपने तर करून दाखवले... आता स्वयंघोषित हिंदू हितवादी शिवसेना काय निर्णय घेते? हे बघणे रोचक ठरेल...

In reply to by आग्या१९९०

sunil kachure 16/03/2022 - 08:51
हिंदूंनi एकत्र व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे? २)एकत्र येवून नॉन पॉलिटिकल संस्था स्थापन करायच्या आणि जेव्हा असे धार्मिक हल्ले होतील तेव्हा एकजूट होवून प्रतिकार करायचा. २) हिंदू च्या उन्नती साठी सामूहिक प्रयत्न करायचे. ३) की हिंदू वादी म्हणून स्वतःला प्रमोट करणाऱ्या राजकीय पक्षांना मत द्यायचे. ४) की कोणत्या ही योग्य राजकीय पक्षांना मत द्यायचे पण त्यांना मुस्लिम धर्माचे वेगळे लाड करून द्यायचे नाहीत. नक्की काय करायचे. हिंदुवादी म्हणून स्वतःला प्रोमोट करणाऱ्या राजकीय पक्षांना मत देणे सोडून बाकी सर्व हिंदू नी केले तर . त्याला हिंदू नी एकत्र येणे समजले जाईल का? की फक्त आणि फक्त हिंदुत्व वादी पक्षांना निवडणुकीत मत देणे म्हणजे हिंदू नी एकत्र येणे अशी एका वाक्यात व्याख्या आहे.
मुळांत, हे तिन्ही सिनेमे, सत्य घटनेवर आधारित आहेत... सकारात्मक विचारसरणी असलेले लोक काय करू शकतात? हे झूंड दाखवतो तर, इतरांना धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणारे आणि इतर धर्मियांना त्रास देणारे, काय करू शकतात? हे काश्मीर फाइल्स दाखवतो. पावनखिंड हा उत्कृष्ट नेता असेल तर, सामान्य जनता देखील, त्या नेत्याच्या पाठीमागे कशी उभी राहते? हेच दाखवतो ...

दिगोचि 16/03/2022 - 08:33
येथे लिहिणार्या अनेकाना हे ठाउक नसावे की कुराणात अनेक ठिकाणी असेच सान्गितले आहे. कि जे मुस्लिम नाहीत त्यानी मुस्लिम धर्म स्वीकारावा नाहीतर मरायला तयार रहावे. उदा" Muster against them all the men and cavalry at your disposal so that you can strike terror into the enemies of Allah and of the believers and others besides them who may be unknown to you, though Allah knows them. अजुनहि मुस्लिम्स तेच करत आहेत कारण कुराणच्या विरुद्ध कोणीहि बोलु शकत नाही कारण तो अल्लाह चा शब्द आहे. (रच्याकने अल्ला या शब्दाचा अर्थ आई असाआहे)

sunil kachure 16/03/2022 - 14:12
काश्मीर मध्ये जे घडले ते अचानक घडले नाही. त्याची तयारी ,संघटन ,योजना निर्माण करण्यास दीन चार वर्ष गेली असतील .भारत सरकार कडे अनेक एजन्सी आहेत ..भारत सरकार ल काश्मीर मध्ये काय घडतं आहे ह्याची माहिती नक्कीच असणार .घटना घडली तेव्हा केंद्र सरकार मध्ये हिंदू वादी BJP होती..जगात कोणत्याच देशात नाहीत इतके प्रचंड अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्र पती ह्यांना भारतात घटनेने दिले आहेत... देशाच्या हद्दीत हत्याकांड होते ह्याला जबाबदार फक्त त्या वेळ चे भारत सरकार आहे. सशक्त केंद्रीय दल,सशक्त लष्कर असणाऱ्या देशाच्या हद्दीत हे घडलेच कसें.ह्याचे फक्त एकच..कारण राजकीय फायदा घेण्याची राजकीय पक्षांची वृत्ती. कोणाला ही न विचारता आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्र पती ना आहे. का नाही त्याचा वापर केलं

उपयोजक 16/03/2022 - 21:27
हा माणूस नक्कीच विचारवंत असणार. कारण असल्या लोकांना समोर दिसत असते ते बघायचे नसते. त्यातही बळी पडणार्‍यांमध्ये हिंदू असले तर त्याकडे कानाडोळा करायचा हा या लोकांचा शिरस्ता असतो. निखिल वागळ्यानंही हीच आकडेवारी त्याच्या वॉलवर लावलीय फेबुवर

उपयोजक 16/03/2022 - 21:30
द काश्मीर फाईल्सचा विषय देशभर तापलेला असताना, देशाच्या, समाजाच्या दुर्दैवाने, काही लोकांनी विविध नॅरेटिव्ह विनाकारण सेट करायला घेतले आहेत. काश्मिरी पंडितांबद्दल एवढं वाटतं - पण गोध्राबद्दल, खैरलांजीबद्दल, दलितांवरील अत्याचारांबद्दल काहीच वाटत नाही का? : हा असाच एक नॅरेटिव्ह. जणूकाही काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांवर भरभरून लिहिणाऱ्यांना "इतर" प्रकरणांचं काहीच वाटत नाही! वास्तव फार वेगळं आहे. गोध्रा, खैरलांजी, हजारो वर्षांपूर्वी झालेले दलितांवरील अत्याचार - सर्वांवर भरपूर लिहिलं, बोललं जातं. सहवेदना व्यक्त केली जाते. सैराट, झुंड, जय भीम - मनापासून उचलून धरले जातात. गोध्रा दंगलीचा निषेध समाजातील सर्व स्तरांमधील लोकांकडून वेळोवेळी झाला आहे. गुन्हेगारांवर न्यायालयात केसेस दाखल झाल्या, त्यांचे निकाल देखील लागून झालेत. नरेंद्र मोदी गोध्रास जबाबदार आहेत असं वाटणारे देखील काही कमी नाहीत. त्यांनी आजपर्यंत तो मुद्दा वेळोवेळी उचलून धरलाय आणि त्याची मेनस्ट्रीम मीडियामध्ये न भूतो न भविष्यती चर्चा देखील झाली आहे. खैरलांजी वा इतरही अनेक दलित अत्याचार देखील "अज्ञात, अचर्चित, दुर्लक्षित" अजिबात नाहीत. असूच नयेत. परंतु काश्मिरी पंडितांची झालेली दैना मात्र आजपर्यंत माध्यमांमध्ये चर्चिलीच गेली नव्हती. काश्मीर फाईल्स गाजतोय तो हा "लपवला गेलेला इतिहास" एकदम उघड झाल्यामुळे. १९९० साली २५-३० वर्षांचे असतील असे कित्येक ज्येष्ठ नागरिक आज थियेटर बाहेर पडताना हताशपणे "हे इतकं घडून गेलं आणि आम्हाला काहीच कसं माहिती नाही?!" हा विषाद व्यक्त करतात. मुद्दा हाच आणि इतकाच आहे. मोदींनी गोध्रा घडवलं - हे ओरडून ओडून सांगता आलं अनेकांना. देशाच्या कानाकोपऱ्यात तो आवाज पसरवता आला. त्यांना त्यांचं म्हणणं व्यक्त करता आलं - तो हक्क बजावता आला. हा हक्क फार महत्वाचा आहे. न्याय होणं - हा भाग नंतरचा. पंडितांना सुद्धा न्याय मिळणं तर सोडाच - आवाज उचलण्याचा हक्क देखील नाकारला गेला होता. हेच वास्तव बहुतेकांना बेचैन करून सोडतंय. तुम्हाला हेही मान्य का होऊ नये? इतरांना ते जाणवतंय तर तुम्हाला ते इतकं जड का जावं? कश्मिरी पंडित "विरुद्ध" इतर सर्व : असा अजून एक नॅरेटिव्ह बेमालूम पसरवला जातोय. अन्याय - मग तो कुठल्या का जात, धर्म, भाषा, पंथावर का झालेला असेना - वाईटच. भारतातील सामान्य नागरिक जात धर्म बघून अत्याचारावर प्रतिक्रिया देण्याचा क्षुद्र विचार करत नाही. काश्मिरी "पंडितांवर" झालेल्या अत्याचाराचा विषय मात्र काही क्षुद्र लोक आम्ही "विरुद्ध" तुम्ही - असा घेत आहेत. हा "विरुद्ध" केल्याचा दोष कुणाचा? चित्रपट निर्मात्यांचा, चित्रपट उचलून धरणाऱ्यांचा - की - हे इकडचे विरुद्ध तिकडचे अशी मांडणी करणाऱ्यांचा? अजून एक. त्यावेळी सत्तेत कोण होतं - याची एक यादी फिरतीये सर्वत्र. महत्वाची यादी आहे ती. "जबाबदार कोण" हा प्रश्न म्हत्वाचाच आहे. पण मग फक्त यादी पसरवून कसं चालेल? ज्यांनी वास्तवात जीव घेतले - त्यांचं काय? ज्यांनी जाणीवपूर्वक जीव घेणाऱ्यांना पाठीशी घातलं त्यांचं काय? त्यांच्या प्रेरणा काय होत्या - त्या अभ्यासाचं, त्या मूळ विषयाचं काय? हे सगळं स्पष्टपणे बोलणारे थेट कम्युनल आणि विनाकारण "पंडित विरुद्ध इतर" असं मांडणारे तुम्ही सेक्युलर?! काश्मीर फाईल्स राजकीय हेतूने प्रेरित आहे - हा शेवटचा टिपिकल नॅरेटिव्ह. आहेच. हा चित्रपट राजकीय हेतूने प्रेरित आहेच. वादच नाही. ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नाही. चित्रपट तयार करणाऱ्यांनी ते नाकारलं असेल तर असुदेत - समर्थन करणारे अनेक राजकीय हेतूने करताहेत हे मान्य करायला हरकत नाहीच. गंमत त्या पुढे आहे. "त्या" बाजूला तुम्ही हा विषय अजेंडा म्हणून का मिळू देता? तुम्हीसुद्धा काश्मिरी पंडितांच्या बाजूने का बोलत नाही? सहवेदना व्यक्त करणं तुम्हाला का जड जातं? काश्मिरी पंडितांचं हत्याकांड - हा विषय इकडच्या "किंवा" तिकडच्या लोकांनी उचलायला हवा - असं "आयदर ऑर" समीकरण तुम्हीच का रुजवताय? हा अजेंडा काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय "समोर" आणला जाणे : हाच आणि इतकाच असावा. त्यात राजकीय अँगल येऊ नं देणं तुमच्या आमच्याच हातात आहे. नाहीये का? फक्त कल्पना करा. काँग्रेस, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी या विषयावर भरभरून लिहिलं तर काय होईल? सहवेदना व्यक्त केली तर काय होईल? पुरोगाम्यांच्या अख्ख्या इकोसिस्टिमने हे हत्याकांड कसं झालंच नव्हतं - हे पटवण्यासाठी चालवलेले प्रयत्न थांबवून, तीच ऊर्जा काश्मिरी पंडितांबरोबर आहोत, यापुढेही असू - असं म्हणण्याकडे वळवली - तर काय होईल? तुमच्या मते कम्युनल असलेल्या लोकांना तुम्ही सहज निष्प्रभ कराल या मार्गाने. पण तुमचं काहीतरी भलतंच सुरु आहे! समजून घ्या - राजकीय मारामाऱ्यांच्या फंदात अजिबात नं पडणारे कितीतरी लोक काश्मीर फाईल्सवर भरभरून व्यक्त होताना दिसताहेत. हे भेसूर वास्तव इतके दिवस लपून होतं याबद्दल दुःख व्यक्त करताहेत. चित्रपट बघून धाय मोकलून रडणाऱ्यांचे व्हिडीओ बघून हताशपणे मान हलवताहेत. या सर्वांची खिल्ली उडवून, खोचक प्रतिप्रश्न विचारून तुम्ही या सर्वांना दूर ढकलताय. या विषयांवर असंबंद्ध उदाहरणांची यादी देऊन "तेव्हा कुठे होतात?" छाप प्रश्न विचारून नकळत या लोकांना देखील "तुम्ही आमचे नाही" असं ठरवून मोकळे होताय. काय साध्य करताय तुम्ही यातून? जाताजाता एकच. देशात कम्युनल टेन्शन वाढू नये असं प्रामाणिकपणे वाटत असेल तर कम्युनल टेन्शन वाढू शकतील असे विषय तुम्हीच आधी उचलून घेऊन, सहवेदना व्यक्त करून, पीडितांना हरप्रकारे आधार देऊन, समस्या निवारण करून त्या अन्यायाला कम्युनल कोन नं मिळण्याची खबरदारी घ्यायला हवी. जमत असेल तर बघा. नाहीतर आम्ही विरुद्ध तुम्ही - रोजची सर्कस आहेच आपली. ओंकार दाभाडकर

In reply to by उपयोजक

काश्मिरी हिंदू वर झालेल्या अत्याचार ची सर्वांना चीड आहे त्यांना न्याय अजून कसा मिळाला नाही ह्याचे आश्चर्य सर्वांना वाटत आहे.. त्या साठी असलेल्या लोकांना कडक शिक्षा व्हावी असे सर्व लोकांना वाटत इथे सर्व म्हणजे काश्मीर फाईल ह्या सिनेमा विरुद्ध लिहणारे ,सर्व च आले..सरकार नी त्या काश्मिरी हिंदू ना परत तिथे स्थापित करावे सरकार चे स्वागत आहे. त्यांना न्याय मिळवून द्यावा त्याचे स्वागत आहे ..विरोध फक्त ह्या साठी आहे की ह्या सिनेमाचा राजकीय प्रचार करण्यासाठी वापर केला जात आहे.

In reply to by उपयोजक

सुखीमाणूस 16/03/2022 - 22:37
टोकाचा विरोध करुन उलट चित्रपटाला जास्त प्रसिद्धी मिळते आहे. Helmed by Vivek Agnihotri, TKF is made on a moderate budget of 20 crores. It's really low when compared to the costs of normal Bollywood flicks that are being made nowadays. With such a sizeable investment, the film is doing wonders which even big-budget movies fail to do. https://www.koimoi.com/box-office/the-kashmir-files-box-office-continues-its-out-of-this-world-run-with-already-201-returns-in-kitty/

चंद्रसूर्यकुमार 16/03/2022 - 23:20
टाईम्स नाऊवर गेली दोन-तीन दिवस धक्कादायक बातमी दाखवली जात आहे. नरसिंहरावांच्या काँग्रेस सरकारने काश्मीरमधून हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले त्यामुळे त्यांना 'व्हिक्टीम' मानता येणार नाही अशाप्रकारचे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सादर केले होते. ते पुढील व्हिडिओत बघता येईल. हे खरोखरच धक्कादायक आहे. इतके दिवस नरसिंहरावांविषयी ते काँग्रेसमध्ये असले तरी आदर वाटायचा. जर राजीव गांधी, इंदिरा गांधी, नेहरू इतकेच काय मोरारजी देसाई यांच्यासारख्यांना भारतरत्न दिले जाऊ शकते तर मग नरसिंहरावांना का नाही हा प्रश्न नेहमी पडायचा. पण आता तो आदर पूर्णपणे संपुष्टात आला. असल्या माणसाला भारतरत्न दिले नाही ते चांगलेच झाले. अर्थातच नरसिंहराव हे काँग्रेसच्या सगळ्या पंतप्रधानांपैकी त्यातल्या त्यात चांगले होते- म्हणजे इतरांपेक्षा बरे होते. आणि नरसिंहराव असे असतील तर इतर काँग्रेसी पंतप्रधान कसे असतील/होते याची कल्पनाच केलेली बरी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Trump 16/03/2022 - 23:53
नरसिंहरावांच्या काँग्रेस सरकारने काश्मीरमधून हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले त्यामुळे त्यांना 'व्हिक्टीम' मानता येणार नाही अशाप्रकारचे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सादर केले होते.
श्री नरसिंहरावांचा काळ धामधुमीचा होता, जवळपास दिवाळखोर अर्थव्यवस्था, बाबरी मशीद प्रकरण, नुकतीच झालेली राजीव गांधीची हत्या, मंडल आयोग आंदोलने, धगधगता पंजाब आणि स्वतःचे अबहुमतातील सरकार अश्या बर्‍याच आघाड्या होत्या. मंत्रीमंडळातील बरेचसे निर्णय पंतप्रधान स्वतः घेत नाही, तर ते सर्व संमतीने घेतात आणि आताची तातडीची निकड कोणती ह्यावर पंतप्रधान आपली उर्जा खर्च करतात. इतर गोष्टी जर ठिक नसतील तर इच्छा असुन देखील काही गोष्टी करता येत नाहीत. श्री नरसिंहरावांच्या प्रमाणपत्राच्या वेळी असेच काही तरी झाले असण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रमाणपत्र कायदेशीरदृष्या बरोबरच आहे. फक्त हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले ह्याच्या व्याख्येवर सगळे अवलंबुन आहे. अतिरेक्याच्या भितीने झालेले स्थलांतर म्हणजे स्वेच्छेने झालेले स्थलांतर नव्हे.

In reply to by Trump

चंद्रसूर्यकुमार 17/03/2022 - 09:05
नाही. नरसिंहराव सरकारने दुसरे प्रतिज्ञापत्र सादर केले ते ६ मे १९९६ रोजी. याची टाईमलाईन नक्की लक्षात येते आहे का? १९९६ च्या लोकसभा निवडणुकांसाठी ३ फेर्‍यात मतदान झाले होते त्यापैकी तिसरी फेरी ७ मे रोजी होती. आणि यानंतर १० दिवसात म्हणजे १६ मे रोजी अटलबिहारी वाजपेयींनी १३ दिवसांचे सरकार स्थापन केले होते. म्हणजेच हे दुसरे प्रतिज्ञापत्र नरसिंहराव सरकारच्या कार्यकाळाच्या अगदी शेवटी सादर केले गेले होते. त्यावेळेस या सगळ्या समस्या मागे पडल्या होत्या.
फक्त हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले ह्याच्या व्याख्येवर सगळे अवलंबुन आहे. अतिरेक्याच्या भितीने झालेले स्थलांतर म्हणजे स्वेच्छेने झालेले स्थलांतर नव्हे.
तोच तर मुद्दा आहे. उत्तर प्रदेश-बिहारमधून हजारो लोक मुंबईत येतात ते मुंबईत आपल्याला अधिक चांगले पैसे मिळू शकतील या अपेक्षेने. असे लोक स्वेच्छेने मुंबईत येतात आणि त्यांना त्यांच्या गावी 'मरा/धर्मांतर करा किंवा जा' असे तीन पर्याय ठेवत नसते. काश्मीरी हिंदूंचे असे स्वेच्छेने स्थलांतर झाले होते का? आपल्या मालकीच्या चांगल्या सफरचंदाच्या बागा सोडून त्यातील अनेक लोक नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडले होते ते उगीच का? पण नरसिंहराव सरकारने तसे प्रतिज्ञापत्र सादर केले होते हे धक्कादायक आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आपल्या मालकीच्या चांगल्या सफरचंदाच्या बागा सोडून त्यातील अनेक लोक नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडले होते ते उगीच का? पण नरसिंहराव सरकारने तसे प्रतिज्ञापत्र सादर केले होते हे धक्कादायक आहे.
तुमचा मुद्दा मान्य आहे. मी वरतीही तसेच लिहीले आहे. फक्त श्री नरसिंहराव यांच्यावर पुर्ण दोष देण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसमध्ये मुस्लिम लांगुलचालनाचा परंपरा आहे, त्यामुळे त्यांना तो विरोध मोडुन काढणे जमले नसावे किंवा तत्सम कारणे असावीत. माझ्या मते त्यांना संशयाचा फायदा (benefit of doubt) मिळायला हवा.

In reply to by Trump

सुबोध खरे 22/03/2022 - 10:44
त्यांना संशयाचा फायदा (benefit of doubt) मिळायला हवा. असा असेल तर आर्थिक उदारतेचं धोरण सुद्धा त्यांनी ( आणि डॉ मनमोहन सिंहांनी) एकट्याने राबवलेलं नव्हतं. मग त्यांना एकट्याना (आणि डॉ मनमोहन सिंहांना ) श्रेय कशाला द्यायचं? किंवा गोध्रा मध्ये कारसेवक हिंदूंना जाळून मारल्यामुले गुजरातेत दंगल झाली त्याचा दोष श्री मोदींना कसा द्यायचा? असं मुळमुळीत लिखाण उपयोगी नाही. नेता/ राज्यकर्ता किंवा पंतप्रधान यांनी आपण केलेल्या कृत्याची संपूर्ण जबाबदारी घेतलीच पाहिजे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कॉमी 17/03/2022 - 08:09
देशांतर्गत विस्थापित असे क्लासिफाय केल्यास आंतरराष्ट्रीय संस्थांना ढवळाढवळ करता येईल म्हणून केले गेले नाही. असे न्यूजलॉन्ड्रीच्या व्हिडिओत होते.

In reply to by कॉमी

चंद्रसूर्यकुमार 17/03/2022 - 09:16
देशांतर्गत विस्थापित असे क्लासिफाय केल्यास आंतरराष्ट्रीय संस्थांना ढवळाढवळ करता येईल म्हणून केले गेले नाही.
बोंबला. म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची जाहिर कबुली नरसिंहराव सरकारने दिली नव्हती का? बरं एकीकडे म्हणायचे की काश्मीरमध्ये युध्दबंदी करा या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाला ८-९ महिने फाट्यावर मारत आम्ही युध्द सुरूच ठेवले आणि जेव्हा घुसखोरांना एका मर्यादेपलीकडे पिटाळणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर १ जानेवारी १९४९ रोजी युध्दबंदी केली. दुसरे म्हणजे १९७१ च्या युध्दाच्या वेळेस पूर्ण अमेरिकेच्या वेस्टर्न ब्लॉकला आपण अंगावर घेतले होते. याचाच अर्थ आपण १९४८ आणि १९७१ मध्येही जगातील महासत्तांना वाटाण्याच्या अक्षता लाऊ शकत होतो. असे असताना १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय संस्थांना (देशांनाही नाही) घाबरायचे काय कारण होते? म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची कबुली दिल्यासारखे नाही का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बोंबला. म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची जाहिर कबुली नरसिंहराव सरकारने दिली नव्हती का?
हो. आणि खरोखरच कणाहीन होतो. कश्याच्या जिवावर कणा दाखवायचा? तेलासाठी अरब देश हवेत आणि पैश्याच्यासाठी युरोपियन हवेत.
असे असताना १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय संस्थांना (देशांनाही नाही) घाबरायचे काय कारण होते?
कारण अर्थव्यवस्था आणि सोव्हीयत संघाचे विसर्जन झाल्यानंतर भारताला कोणाचाही पाठींबा नव्हता. रशियाची आर्थिक परिस्थितीसुध्दा योग्य नव्हती. (सध्याच्या युक्रेनच्या युध्दाची कारणे त्यात आहेत). ती कारणे १९९१ च्या आधी नव्हती.

सौन्दर्य 16/03/2022 - 23:42
आजच 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट पाहिला. १९९० साली काश्मीर खोऱ्यामधून काश्मिरी पंडितांना जुलूम - जबरदस्तीने हाकलून लावले, विस्थापित केले त्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या अगदी सुरवातीलाच ह्या चित्रपटात दाखवलेल्या घटना, प्रसंग, हत्याकांड वगैरे हे स्वतंत्र्यरित्या सत्यापित (independently verified) केले आहे हे पडद्यावर दाखवले जाते त्यामुळे ह्यातील घटना जवळजवळ ९५% सत्य असाव्यात असे धरून चालायला हरकत नसावी. काश्मीर खोऱ्यातील स्थानीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या चिथावणीवरून काश्मिरी पंडितांवर जे अनन्वित अत्याचार केले त्याचे चित्रण ह्या चित्रपटात आहे. कितीतरी अश्या क्रूर घटना ह्या चित्रपटात दाखविल्या आहेत की त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते, माणूस इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो हे मनाला पटतच नाही. आज ह्या घटनेला ३२ वर्षे झाली पण काही तुरळक बातम्या सोडल्या तर काश्मिरी पंडितांवर इतके अत्याचार झाले हे निदान मला तरी त्यावेळी समजले नव्हते. १९९० मध्ये माझी गुजरातला बदली झाली आणि त्याच वेळी अडवाणींनींची रथयात्रा सुरु झाली. ह्या रथयात्रेमुळे गुजरातभर हिंदू-मुसलमान दंगे उसळले व त्याचे लोण हळूहळू देशभर पसरले. त्यावेळी ह्या बातम्या तेव्हढ्याच तीव्रतेने दाखविल्या गेल्याचे मला आठवत नाही. का हे सर्व काही राजकीय स्वार्थासाठी टोपलीखाली झाकून ठेवले गेले ? पण एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे आणि ती म्हणजे कोणताही नागरिक आपल्या मूळ स्थानापासून कोणी फक्त "येथून निघून जा" म्हणाले म्हणजे जाणार नाही. ज्यावेळी स्व:ताच्या आणि कुटुंबियांच्या जिवाची सुरक्षा नाहीशी होते, अमानुष अत्याचार झेलावे लागतात त्याच वेळी माणूस परागंदा होतो किंवा त्याला व्हावे लागते. त्यामुळे ह्या कश्मिरी पंडितांवर अत्याचार झालेच नाहीत, ते स्व:ताहून खोऱ्यातून निघून गेले हा प्रचार खोटाच आहे. मग हे ज्यावेळी घडले त्यावेळच्या राज्यकर्त्यांने हे विस्थापन, पलायन थांबविण्यासाठी काय केले ? ह्यातील दोषींना काय शिक्षा केली ? ह्याची उत्तरे आजही अनुत्तरितच आहेत असे म्हणावे लागेल ? जरी हा हिंदू-मुस्लिम संघर्ष होता, तरी काश्मीर खोऱ्यातून सगळेच हिंदू परागंदा झाले असही नाही, तेथील डोग्रा समाज बहुतांशी तेथेच राहिला. ह्या हत्याकांडात उदारमतवादी मुस्लिम देखील भरडले गेले, मग फक्त काश्मिरी पंडितांनाच का तेथून पळून निघावे लागले ? ह्या चित्रपटातील संदर्भ जर खरा मानला तर त्यात, 'दोन टक्के काश्मिरी पंडितांनी संपूर्ण प्रशासनावर कबजा मिळवला व इतरांना वर येऊ दिले नाही, त्यांच्यावर अन्याय केला,' हा मूळ मुद्दा होता. ह्यातील काय खरं? काय खोटं ? हे कसे कळणार ? ह्या घटनेनंतर आज ३२ वर्षांनी ३७० कलम रद्द करण्यात आले आहे. आता कोणताही भारतीय नागरिक काश्मीरमध्ये जाऊन राहू शकतो, स्थावरजंगम मालमता, जमीन वगैरे खरेदी करू शकतो, नोकरी धंदा करू शकतो. काश्मिरी पंडितही जाऊन आपल्या मूळ स्थानी राहू शकतात, पण प्रश्न असा आहे की अजूनही त्यांना जी अभिप्रेत किंवा अपेक्षित आहे ती सुरक्षा तेथे आहे का ? आणि जरी असली, तरी ते पुन्हा आपल्या मूळ स्थानी जाण्यास किती उत्सुक असतील ? आणि ते तेथे जाऊन करणार काय ? मग काश्मीरच्या खोऱ्यातील विस्थापित पंडितांना किंवा भारताच्या इतर नागरिकांना तेथे जाऊन राहावेसे कधी वाटेल ? ह्याचं उत्तर आहे ज्यावेळी काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित होईल, सर्वांगीण प्रगती, विकास घडून येईल, नवीन संधी उपलब्ध होतील, रोजगार निर्माण होईल. वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये उपलब्ध होतील, त्यावेळीच काश्मिरी पंडित व इतर भारतीय नागरिक काश्मीर खोऱ्यात जाऊन स्थाईक होण्याचा विचार व कृती करू शकतील. पण ज्यावेळी हे असे घडून येईल त्यावेळी काश्मीर खोऱ्यातील मूळ नागरिक अश्या 'उपऱ्यांना' खुल्या मनाने स्वीकारतील का आमच्या भूमीवर हे परकीय लोक नकोत म्हणून एक वेगळेच आंदोलन सुरु होईल ? सध्या फोफावलेला प्रांतवाद, भाषावाद, वंशवाद पाहता ही शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by सौन्दर्य

आनन्दा 17/03/2022 - 06:17
बाकी सगळं चालू द्या.. फक्त एका मुद्द्यावर बोलतो दोन टक्के काश्मिरी पंडितांनी संपूर्ण प्रशासनावर कबजा मिळवला व इतरांना वर येऊ दिले नाही, त्यांच्यावर अन्याय केला,' स्वातंत्र्य मिळाले तेव्हा valley मध्ये हिंदू 20 टक्के होते. प्रशासनावर कबजा मिळवून 2 टक्क्यांवर आले असतील तर मग मजाच आहे. डावी इकॉसिस्टम कसा narrative सेट करतेय याचे हे उत्तम उदाहरण आहे. हाच narrative आपल्याकडे ब्राह्मणांविरुद्ध पण बेमालूम सेट केला जातो आणि लोक विश्वास पण ठेवतात.

In reply to by आनन्दा

अहो पण मूळ प्रतिसादकर्त्याने "या चित्रपटातला संदर्भ" असे लिहिले आहे. आता यात कुठून आली डावी इकोसिस्टीम !?

In reply to by आनन्दा

सौन्दर्य 17/03/2022 - 18:34
सिनेमात अगदी सुरवातीलाच ह्यातील घटना, प्रसंग, आकडे हे independently verified केले गेले आहेत असे लिहुन येते. ह्या सिनेमातील इतर घटना आपण सत्य म्हणून पाहणार असू तर ह्याच सिनेमात हे 'दोन टक्क्यांचे' वाक्य आहे ते कसे डाव्या इकोसिस्टिमचे झाले ? आपल्यापैकी कोणीच काश्मिरी पंडित नाहीत किंवा त्यावेळेच्या घटनेचे साक्षीदार नाहीत. तत्कालीन सरकारने देखील ही वंशहत्या लपवून ठेवली असा बहुतेकांचा आक्षेप असताना सिलेक्टिव्ह स्वीकारणे बरोबर नाही असे मला वाटते.

गामा पैलवान 17/03/2022 - 00:46
लोकहो, दहशतवाद्यांचा रागराग करून उपयोग नाही. भारत सरकार गप्प का बसलं होतं, याची जास्त चीड आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आग्या१९९० 17/03/2022 - 01:04
मागील सरकारच्या चुका सध्याचे सरकारही करत आहे. पंतप्रधान सिनेमाचे कौतुक करत आहे आणि लोकांना बघायचा आग्रही करत आहेत. त्यापेक्षा सरकार प्रत्यक्ष कृती का करत नाही?

In reply to by आग्या१९९०

प्रश्न तत्वतः बरोबर आहे. मात्र मला वाटते, मोदी सरकारला ह्या विशिष्ट बाबीबद्दल कसलीही कृती करतांना अतिशय जपून पाउले टाकावी लागतील. असे पहा: जेव्हा हे प्रत्यक्ष घडून आले, तेव्हा तत्कालिन सरकारने, सदर स्थलांतर देशांतर्गत विस्थापित असे क्लासिफाय केल्यास आंतरराष्ट्रीय संस्थांना ढवळाढवळ करता येईल असे सांगून (म्हणे), त्याकडे काणाडोळा केला. नंतरच्या अनेक सरकारांनेही असेच केले. खरे तर, वर्षांनूवर्षे हे प्रकरण दडपले गेले, असे काही झालेच नव्हते, असे जनता समजू लागली. ह्याचा परिपाक असा, की त्या कालखंडानंतर जन्मलेल्यांना तर हे असे काही भीषण घडले होते, ह्याविषयी कल्पनाही नाही. वास्तविक मोदी सरकारने काही कामे अतिशय धडाडीने केली-- जसे ३७० कलम, सी.ए.ए. ची तरतूद वगैरे. ह्यांतील प्रत्येक वेळी, समाजातील ठराविक घटकांकडून ह्यांना प्रचंड विरोध करण्यात आला. ह्यांत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारे, आंतर्देशिय पक्ष; स्वतः प्रादेशिक असले, तरी स्वतःला आंतर्देशिय समजणारे पक्ष वगैरे होतेच, पण जागातिक पातळीवरून मदत घेऊन 'आंदोलन घडवून आणणारे' अनेक अ‍ॅक्टिव्हिस्ट व त्यांची एको- व ईकोसिस्टीम्सही होत्या. तेव्हा, आता गेल्या काही वर्षांत देशांतील समाजांत दुही पसरवण्याचे, व ती रूजवण्याचे काम, काही संस्थांकडून व पक्षांक्डून रीतसर सुरू झालेले आहे. साधे, हिजाबच्या शाळेतील वापरावरील बंदीचे उदाहरण घ्या. शाळेच्या युनिफॉर्ममधे जे बसत नाही, ते विद्यार्थ्यांना वर्गांत घालता येणार नाही, इतका सरळ विषय होता, त्याला मुद्दाम धार्मिक रंग देण्यात आला. आताच केवळ ह्या चित्रपटाविषयी सुरू असलेल्या चर्चा आपण ऐकल्य/ पाहिल्या/वाचल्या असतीलच. 'हे असे काही फारसे झालेले नाही' इथपासून, 'झाले असेल, पण आता हे कशाला मुद्द्दाम उकरून काढायचे?' असे अनेक सूर आपण ऐकतो आहोत. कालच एका प्रतिष्ठित चॅनेलच्या चर्चेत, एक स्वत:ला 'काश्मिरी पंडीत म्हणवून घेणारी स्त्री 'सुमारे १०० मारले गेले, गेला बाजार आपण ५००-- अगदी १,००० पंडित मारले गेले -- असे समजले तरीही ह्याला जेनोसाईड म्हणता येणार नाही', असा वाद घालत होती. (बाईला कुणीतरी तिथल्या तिथे जेनोसाईड ह्या शब्दाची डिक्शनरीतील व्याख्या दाखवली असती तर तिची पुंगी बंद झाली असती). मुल्लांच्या इशार्‍यावर नाचणार्‍या समाजाचे सोडाच, पण अगदी हिंदू समाजांतूनही ह्याविषयीचे प्रबोधन अद्यापि झालेले नाही, अशी वस्तुस्थिती आहे. आता कुठे ह्या चित्रपटाच्या निमीत्ताने, निदान काही चर्चा तरी होते आहे. ओंकार दाभाडकरने म्हटल्याप्रमाणे, हा चित्रपट राजकीय हेतूने बनवला गेला असावा. आता थोडेफार मैदान तयार झाल्यावर, निदान चार अलिप्त ('आम्हाला काय त्याचे?') टाळक्यांत तरी वस्तुस्थितीचा थोडाफार प्रकाश पडल्यावर, मोदी सरकार काही पाऊले उचलू शकेल. अर्थात, सद्य परिस्थितीत, देशांतील मुद्दाम निर्माण केले गेलेले वातावरण, व त्याची अतिशय एकांगी चर्चा करणारी पाश्चिमत्य माध्यमे, तेथील राजकीय पक्ष व लॉबीज हे सर्व ध्यानांत घेऊनच मोदी सरकारला सदर विषयाच्या संदर्भांत पाऊले उचलावी लागतील. अगोदरच्या अनेक सरकारांच्या जाणूनबुजून अथवा नि:ष्काळजीने केलेल्या हेळसांडीचे भूत आता मोदी सरकारच्या माथ्यावर येऊन बसले आहे. त्याला उतरवणे, वाटते तितके सोपे नाही.

In reply to by प्रदीप

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/03/2022 - 17:56
भाजपाचा आता एकूण सत्तेतील पंधरा पेक्षा अधिक वर्षाचा काळ झालेला आहे, जनता पक्ष, व्हीपीसिंग, वाजपेयी, आणि सध्याची शेठची आठ वर्ष. आता काश्मीरी पंडितांच्या विषयांवर राजकारण करण्यापेक्षा, चर्चा वाढविण्यापेक्षा, जात-धर्मातील दरी वाढविण्यापेक्षा, इतर पक्षांनी काहीच केले नाही हेही जवळ-जवळ आता आपल्याला समजलेले आहे, आता सर्वच वाईट गोष्टींचे खापर इतर पक्षावर फोडण्यापेक्षा, गप्पा कमी करून दमदार पाऊले टाकून सद्य सरकारने पंडितांचे पुनर्वसन केले पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्त विहारि 21/03/2022 - 20:00
पण, 370 हटवण्या बाबत, CAA and NRC बाबत, स्वतःला हिंदू हितवादी समजणारी, शिवसेना कुंपणावरच बसली... शिवसेना आणि भाजप, एकत्र येणे ही, काश्मीर साठी अतिशय योग्य गोष्ट ठरेल ... राज्यात भांडा पण काश्मीरसाठी तरी एकत्र या ....

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रदीप 22/03/2022 - 19:20
तुमच्या ह्या व ह्या संदर्भांतल्या इतरस्त्र दिलेल्या प्रतिसादांवरून, मला वाटते, तुम्ही व मी वेगवेगळ्या ग्रहांवर रहात असूं. असो.

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 22/03/2022 - 10:48
प्रत्यक्ष कृती का करत नाही? म्हणजे नक्की काय करायचं? जरा स्पष्ट पणे लिहा बरं. आपण नेहमीच तोंडची वाफ दवडण्यापेक्षा एकदा काश्मीरला जाऊन या म्हणजे असे फालतू प्रतिसाद येणार नाहीत

कर्नलतपस्वी 17/03/2022 - 06:38
दोन टक्के काश्मिरी पंडितांनी संपूर्ण प्रशासनावर कबजा मिळवला व इतरांना वर येऊ दिले नाही, त्यांच्यावर अन्याय केला,' हा मूळ मुद्दा होता. ह्यातील काय खरं? काय खोटं ? हे कसे कळणार ? खुप मोठा इतिहास आहे.रजनीकांत पुराणिक यांनी आपल्या नेहरंवर लिहीलेल्या पुस्तकात सोप्या भाषेत समजावून सांगीतले आहे. पुस्तक आंतरजालावर उपलब्ध आहे. त्यावेळी काश्मीर खोऱ्यातील मूळ नागरिक अश्या 'उपऱ्यांना' खुल्या मनाने स्वीकारतील का आमच्या भूमीवर हे परकीय लोक नकोत म्हणून एक वेगळेच आंदोलन सुरु होईल ? सध्या फोफावलेला प्रांतवाद, भाषावाद, वंशवाद पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. शंका रास्त आहे,

आग्या१९९० 17/03/2022 - 07:56
काही लोकं सिनेमाचं तिकीट काढून सिनेमा बघायला जाणार नाहीत ,कारण त्यांना निर्मात्याची काळजी. हीच लोकं जास्तीत जास्त नाकरिकांनी हा सिनेमा बघायला मिळावा म्हणून अमूक राज्यसरकारने ह्या सिनेमावरील करमणूक कर माफ करावा म्हणून आग्रही आहेत. सगळे भावनेच्या भरात चालू आहे. कुठेतरी एका चित्रपटगृहात हाऊस फूलचा बोर्ड लावलेला आणि आत फक्त ३०% प्रेक्षक होते. लोकांनी झापले त्याच्या मालकाला. शक्यता दोन असू शकतात. १) निर्मात्याची काळजी घेणाऱ्यांनी तिकिटे घेतल्यासातील २) सिनेमा विरोधींनी तिकिटे हडप करून प्रेक्षकांना दूर ठेवले असेल.
https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/why-kashmir-files-is-not-screening-on-nashik-malegaon-bjp/amp_articleshow/90250116.cms स्वयंघोषित हिंदू हितवादी शिवसेना, आता काय Action घेते? हे बघणे रोचक ठरेल ....
द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करण्यास राज्य सरकारचा नकार, अजित पवार म्हणाले “केंद्र सरकारनेच…” https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-government-denied-to-declare-kashmir-files-as-tax-free-said-ajit-pawar-prd-96-2844312/ इतर राज्यांनी, केंद्राकडे बोट दाखवले नाही ... आलं अंगावर तर ढकल केंद्रावर, ही वृत्ती, ह्या राजवटीत जास्त बघायला मिळत आहे ....
द काश्मिर फाईल्स' चित्रपटावर बंदी घाला; खासदाराची मागणी https://www.esakal.com/desh/mp-badruddin-ajmal-has-demanded-a-ban-on-the-film-the-kashmir-files-ss01 खरा इतिहास दाखवला तर, बंदी का घालायची?

शाम भागवत 17/03/2022 - 09:20
https://youtu.be/w5UkmK2DhBI हा व्हिडिओ भाऊ तोरसेकरांचा आहे हे मुद्दामहून लिहितोय. त्यामुळे मिपाकरांना ही लिंक उघडायची की नाही हे अगोदरच ठरवता येऊ शकेल. मी ही लिंक इथे दिलीय त्याचे कारण म्हणजे त्यांनी केलेली भविष्यवाणी. त्यांचे म्हणणे असे आहे की काय बॉलीवूडवर राज्य करण्याची सद्दी हा चित्रपट संपवेल व खऱ्या अन्यायाच्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या चित्रपटांची आता त्सुनामी यायला लागेल व त्यात आत्ताचे बॉलीवूड सत्ताधारी वाहून जातील. बघूया, भविष्यात काय दडलाय ते. :)

In reply to by शाम भागवत

मुक्त विहारि 17/03/2022 - 09:40
कारण, हिंदू स्त्रीया जास्त उदारमतवादी आहेत ... “मुस्लीम नाही तर काय झालं, नमाज पठण…”, लहान मुलीचे बोल ऐकून पल्लवी जोशीला बसला धक्का .....(https://www.loksatta.com/manoranjan/the-kashmir-files-actress-pallavi-joshi-recalls-how-a-little-girl-asked-her-to-do-namaz-irrespective-of-religion-and-said-one-must-do-it-dcp-98-2843577/lite/) हिंदू इतके कट्टर नाहीत....

In reply to by मुक्त विहारि

sunil kachure 17/03/2022 - 12:07
हिंदू इतके कट्टर नाहीत ह्या वाक्याशी पूर्ण सहमत. देशातील फक्त एका राज्यात मुस्लिम बहुसंख्य आणि हिंदू अल्प संख्याक आहेत . त्याच परिणाम म्हणून तेथील मुस्लिम लोकांनी ते राज्य च हिंदू मुक्त केले. पण देशातील बाकी राज्यात हिंदू 80% पेक्ष जास्त आहेत. तिथे मुस्लिम अगदी आनंदात त्यांचे जीवन जगत आहेत. बहुसंख्य हिंदू त्यांच्या वर कोणताच दबाव आणत नाहीत. आणि हे जगातील एकमेव उदाहरण असावे .हिंदू हे उदारमतवादी च आहेत.
‘द कश्मीर फाइल’ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ दोन अटींवर मिळणार ‘हाफ डे’; मुख्यमंत्र्यांची घोषणा https://www.loksatta.com/desh-videsh/half-day-for-assam-government-employees-to-watch-the-kashmir-files-scsg-91-2844001/

sunil kachure 17/03/2022 - 12:16
ह्या सिनेमा मुळे दीन गोष्टी स्पष्ट झाल्या. Main stream media पण कसा एजेंडा चालवतो. काश्मीर मध्ये इतके काही होत होते तरी त्याची दखल देशातील main stream media ni घेतली नाही जगापासून ते ठरवून लपवले काश्मिरी हिंदू वर जे काही अत्याचार होत होते त्याच्या बातम्या काश्मीर मधील स्थानिक मीडिया मध्येच येत होत्या. Main stream media नी पूर्ण दुर्लक्ष त्या घटनेकडे. खूप भयंकर आहे है. Bjp नी दोन वेळा केंद्रात सत्ता स्थापन केली अनेक state मध्ये सत्ता स्थापन केली. त्या मुळे एक गोष्ट स्पष्ट झाली भारतात जिंकून येण्यासाठी अल्पसंख्याक लोकांचे फुकट लाड करण्याची गरज नाही ह्या दोन चांगल्या गोष्ट ह्या दोन घटनेतून घडल्या.

In reply to by शाम भागवत

चंद्रसूर्यकुमार 17/03/2022 - 19:17
ऐसीवर असा लेख वाचल्यावर भांगेच्या शेतात अचानक तुळस उगवलेली बघितल्यावर जसे वाटेल तसे वाटले :)

In reply to by उपयोजक

Trump 17/03/2022 - 19:44
कदाचित लोक, तिकिट घेउन बघण्याची हिम्मत नसल्याने बघत नसतील. कोणताही चित्रपटगृह मालक का म्हणुन आणि किती दिवस हाऊसफुलचा बोर्ड लावेल?

उपयोजक 17/03/2022 - 19:12
बघून हिंदूंना राग आला आणि त्यातून पेटून कोणी ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून दररोज भोंगे लावून ५ वेळा ऐकू येणारी नमाज जरी बंद केली तरी भरुन पावलं. होणारेय का हे? मुस्लिम भोंगे काढा म्हटलं की जथ्था घेऊन येऊन दादागिरी करतात. हिंदूंना जमणारेय का हे?

In reply to by उपयोजक

मुक्त विहारि 17/03/2022 - 19:30
हिंदू मंदिरांनी, एक वर्षभर जरी ध्वनी प्रदूषण बंद केले तरी मग इतर धर्मियांना पण ध्वनी प्रदूषण बंद करावेच लागेल .. दुर्दैवाने, आमच्या डोंबोलीत तरी, मंदिरे देखील, राजकीय पक्षांनी वाटून घेतली आहेत, असेच वाटते... पुर्वी डोंबिवलीत, इतके ध्वनी प्रदूषण होत न्हवते. आता काही विचारू नका, गणपती असो की नवरात्र, गोंगाट केल्या शिवाय, एक सण साजरा होत नाही. सध्या एक नवीन फॅड आले आहे, दहीहंडी रात्री फोडायची. सकाळ पासून ते रात्री पर्यंत, डीजे सूरूच... दहीहंडी पण राजकीय पक्षांनी, वाटून घेतली आहे की काय? असा संशय येतो ... स्वतः ला सुशिक्षित समजणार्या, पण सार्वजनिक ठिकाणी अशिक्षिता सारखे वागणार्या, डोंबिवलीत ही तर्हा असेल तर, इतर गावी तर धुमाकूळच असेल ...

In reply to by मुक्त विहारि

Trump 17/03/2022 - 19:33
हिंदू मंदिरांनी, एक वर्षभर जरी ध्वनी प्रदूषण बंद केले तरी मग इतर धर्मियांना पण ध्वनी प्रदूषण बंद करावेच लागेल ..
+१

मुक्त विहारि 17/03/2022 - 21:34
चित्रपटात खोटी कहाणी, 'द कश्मीर फाइल्स' Tax Free करणार नाही https://www.loksatta.com/desh-videsh/asaduddin-owaisi-slams-modi-govt-on-the-kashmir-files-movie-hrc-97-2845652/ खरा इतिहासच जर, स्वीकारला जात नसेल तर, काय बोलणार? गंमत अशी की, अशा नेत्यांच्या बरोबर, "शिवसेना" युती करते.... कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, हे हिंदू हितवादी कधीच न्हवते, त्यामुळे, त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही... पण, शिवसेनेची आधीची धोरणे आणि आत्ताची वागणूक, ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.... इंद्राय स्वाः, तक्षकाय स्वाः, असेच म्हणायची वेळ, आता आली आहे...

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि 17/03/2022 - 21:46
श्रीनगरमध्ये आलात तर संपवल्याशिवाय राहणार नाही! https://www.esakal.com/manoranjan/bollywood-film-the-kashmir-files-vivek-agnihotri-share-letter-photo-death-threats-yst88 पुरावा असेल तर, इतिहास नाकारण्यात अर्थ नाही...
काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या त्या १५०० हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार?” The Kashmir Files वरुन ओवेसींचा मोदी सरकारला सवाल https://www.loksatta.com/desh-videsh/asaduddin-owaisi-slams-modi-govt-on-the-kashmir-files-movie-hrc-97-2845652/ ह्यांच्याच पक्षातील नेत्याने, 100 कोटी गैर मुस्लिम जनतेला ठार मारण्याची धमकी दिली होती ..... https://youtu.be/krdym7gFVvA

मुक्त विहारि 17/03/2022 - 21:42
The Kashmir Files वरुन संतापल्या मेहबूबा मुफ्ती; मोदी सरकारवर टीका करत म्हणाल्या, “ज्या पद्धतीने…” इतके जर, काश्मीरी पंडितांवर खरोखर प्रेम आहे तर, त्यांच्या वंशजांना, त्यांच्या जमिनी परत द्या...

कपिलमुनी 18/03/2022 - 03:12
१९४८ जळीत फाईल्स जेव्हा हिंदूनीच हिंदू ची घरे जाळली होती,काही जणांना मारले होते, १९८४ शीख फाईल्स जेव्हा शीख लोकांना मारले होते (हे आकडे भयावह आहेत) .. लई पिक्चर स्टोऱ्या बाकी आहेत..

In reply to by कपिलमुनी

मुक्त विहारि 18/03/2022 - 07:20
आणि काश्मीर हे कटकारस्थान आहे रागाच्या भरांत मारलेली चपराक आणि ठरवून केलेली मारहाण, ह्यांत फरक असतो... पटत असेल तर बघा, नाहीतर सोडून द्या... बाय द वे, 1948ची झळ, आमच्या काही पुर्वजांना देखील लागली पण तो उद्रेक होता आणि अशावेळी माफ करणेच उत्तम ... पण, त्याच बरोबर, दुसर्या आजोळी अख्खा गांव, आमच्या घराचे संरक्षण करायला जमला होता ... उद्रेकाच्या, चांगल्या आणि वाईट, दोन्ही बाजू बघीतल्या आहेत.....

दिगोचि 18/03/2022 - 08:27
महाविकास आघाडीत 'शिवसेने'ला काळ कुत्र देखील विचारत नाही. सर्व अधिकार भ्रष्टवादी कॉंग्रेसच्या हातात आहेत >>>> माझ्यामते सर्व अधिकार काकान्च्या हाती आहेत. राज्यात २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीचे निर्माते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे प्रतिआव्हान त्यांनी केले. त्यासाठी आज त्यानी एक सभा घेऊन पुढच्या निवडणुकीत भाजपला कसे पराभूत करायचे याचा सल्ला आलेल्या तरुण कार्यक्र्त्याना दिला आहे.

दिगोचि 18/03/2022 - 08:58
मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला सारख्या अनेक लोकानी जनतेकडून गडगन्ज सम्पत्ती कमावली आहे. त्यामुळे त्यान्चा या सिनेमावर आक्षेप असणारच. त्यानी ना मुस्लिमासाठी ना हिन्दून्साठी काही केले फक्त आणि फक्त पैसे कमावले. असे माझे मत आहे. तसे नसते तर काश्मीर मधे आज शान्तता असती.

sunil kachure 18/03/2022 - 08:59
ब्रिटिश सोडून गेले आणि भारतीय लोकात राज्य करण्याची कुवत नसल्या मुळे एका मागोमाग एक हिंसाचार उसळले. स्वार्थी वृत्ती ही भारतीय नेत्यांमध्ये खूप आहे हे मान्य च करावे लागेल. तरी ब्रिटिश आले त्यांनी एकसंघ भारत निर्माण केला.ह्या एकसंघ भू भाग नियंत्रित करण्यासाठी प्रशासन व्यवस्था निर्माण कायदे निर्माण केले,न्याय व्यवस्था निर्माण केली. ,सैन्य ,पोलिस यंत्रणा निर्माण केली. रेल्वे चालू केली. सर्व काही व्यवस्थित करून भारतीय राज्य कर्त्याना देश सोपवला. पण काय झाले . लगेच पाकिस्तान वेगळा,हिंसाचार,आणि फक्त सावळा गोंधळ. ब्रिटिश नसते आले तर आज भारताचा भू भाग एकच केंद्रीय सत्तेच्या अमलात आहे तो असता का? काही तरी वेगळाच भूगोल असता.
https://www.esakal.com/desh/omar-abdulla-false-things-in-the-kashmir-files-movie-shk99 -------- किती खोटे बोलणार? ------ ‘ट्रकमध्ये सीटच्या मागे लपून पळालो होतो’; The Kashmir Files पाहून अभिनेत्रीने सांगितला मन हेलावणारा अनुभव https://www.tv9marathi.com/entertainment/bollywood/the-kashmir-files-is-literally-my-own-story-actress-sandeepa-dhar-recalls-how-her-family-fled-valley-664843.html
'द काश्मीर फाइल्स' सिनेमा सुरू असताना 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या दिल्या गेल्या घोषणा https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/the-kashmir-files-vivek-agnihotri-anupam-kher-in-telangana-pakistan-zindabad-slogans-anti-hindu-muslim/articleshow/90321679.cms?minitv=true हा सिनेमा म्हणजे एक समुद्रमंथन आहे ... सगळे मूखवटे गळून पडत आहेत ....

In reply to by मुक्त विहारि

निनाद 21/03/2022 - 04:00
सिनेमात एक वाक्य आहे - सरकार उनकी है तो क्या - सिस्टिम तो हमारी है! याचा प्रत्यय असा येत राहतो.

sunil kachure 19/03/2022 - 19:10
काश्मीर प्रश्न ,कश्मिर मधील हिंदू ना सुरक्षित वाटत नसेल. प्रश्न आहे तसाच राहतं असेल तर असल्या सिनेमाची काही गरज नाही काश्मीर मध्ये काय घडले किंवा आता घडतं आहे ह्याची सर्व माहिती भारत सरकार ल आहे. अनेक पक्ष केंद्रात येवून गेले . कोणीच काश्मीर चे प्रश्न सोडवले नाहीत. फक्त एक दुसऱ्या वर आरोप करण्या वतिरुक्त काही घडले नाही. त्या मुळे कोणत्याच राजकीय पक्ष नी स्वतःला निरपराध समजू नये.. हा सिनेमा जर देशात दोन धर्मात द्वेष निर्माण करून राजकीय पोळी भाजण्यासाठी असेल तर ..हा खूप मोठा प्रश्न आहे.
“बाळासाहेब ठाकरेंमुळे आम्ही शिकलो, अन्यथा…”, काश्मिरी पंडितांनी आभार मानल्याचा व्हिडीओ शिवसेना खासदाराने केला शेअर https://www.loksatta.com/trending/kashiri-pandit-students-thanks-to-balasaheb-thackeray-video-share-shivsena-mp-rmt-84-2840800/lite/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS तेंव्हा, बाळासाहेब ठाकरे यांनी, मदत केली आहे वाचनांत आले होते आणि त्यामुळेच शिवसेने कडून अपेक्षा होत्या...आज देखील शिवसेनेने, हेच धोरण ठेवले तर उत्तम...
The Kashmir Files: काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पाकिस्तानला जबाबदार धरलं; जम्मू-काश्मीरमध्ये जे झालं ते… https://www.loksatta.com/desh-videsh/pakistan-responsible-for-ghulam-nabi-azad-amid-the-kashmir-files-row-vsk-98-2850040/ समाज एकत्र राहायला हवा. जात आणि धर्म न पाहता प्रत्येकाला न्याय मिळायला हवा, असं मत आझाद यांनी व्यक्त केलं आहे. -------- आझाद मैदान दंगल प्रकरणा बाबतीत, हे काही बोलले होते का? मुजफ्फरनगर दंगल प्रकरणा बाबतीत हे काही बोलले होते का? ते सोडा, नुकत्याच झालेल्या अमरावती दंगल प्रकरणाबाबतीत हे काही बोलले आहेत का? --------- बाकी , बांगलादेश आणि पाकिस्तान मधील हिंदू मंदिराच्या तोडाफोडी बद्दल काही बोलले होते का?
The Kashmir Files: “मुस्लिमांना लाज वाटली पाहिजे…”, काश्मिरी लेखकाने काश्मिरी पंडितांची माफी मागत सांगितले सत्य https://www.loksatta.com/manoranjan/the-kashmir-files-kashmiri-writer-javed-beigh-apolgies-to-kashmiri-pandit-community-dcp-98-2849664/ आणि अजूनही काही लोकांना वाटते की, सिनेमा अतिरंजित आहे...
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'वर न्यूझीलंडमध्ये बंदी, माजी उपपंतप्रधानांकडून निषेध https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/the-kashmir-files-film-another-attack-on-the-freedom-of-new-zealanders-informs-winston-peters-1043082 न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सेन्सॉर करणे म्हणजे न्यूझीलंडमधील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणे होय. विन्स्टन पीटर्स यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांचे मत व्यक्त केले आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाला सेन्सॉर करणे म्हणजे न्यूझीलंडमधील 15 मार्चच्या अत्याचाराची माहिती सेन्सॉर करणे होय.

In reply to by मुक्त विहारि

चंद्रसूर्यकुमार 21/03/2022 - 11:46
तीन वर्षांपूर्वी ख्राईस्टचर्चमध्ये मशीदीवर एका ख्रिस्ती कट्टरतावाद्याने हल्ला केला होता आणि पन्नासेक लोकांना मारले होते. त्यानंतर त्या देशाची पंतप्रधान जेसिंडा आर्डन स्वतः हिजाब घालून वावरत होती. ओबामानेही न्यू यॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या-- ग्राऊंड झीरोच्या जवळ मशीद बांधायला पाठिंबा दिला होता. ज्या देशांचे नेते असतील त्या देशांकडून काय अपेक्षा ठेवणार? हा पोलिटिकल करेक्टपणा पूर्ण जगाला- खरं तर मानवजातीलाच धोक्यात आणत आहे. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुक्त विहारि 21/03/2022 - 12:14
सौदीत काम करत असतांना, एक पाकिस्तानी मुस्लिम, भारतीय मुस्लिमाला म्हणाला होता की, हम नें 60 साल में, पाकिस्तान को मुस्लिम राष्ट्र बनाया, बांगलादेश में भी ऐसा ही है, आप हिंदूस्थानी मुस्लिमों ने क्या किया? अगर हम सब साथ मिल जाएँ तो दुनिया को मुस्लिम बना सकते हैं ... भारतीय मुस्लिमाने काही उत्तर दिले नाही, पण नंतर तो एकांतात मला म्हणाला की, ये सच बोल रहा हैं. हमारे कौम में भी ऐसे सोचने वाले लोग हैं... ------- माझा उदारमतवादी पणा, त्या दिवशी विरघळून गेला...

In reply to by मुक्त विहारि

sunil kachure 22/03/2022 - 12:27
सौदी सारख्या मुस्लिम देशात तुमच्या सारख्या स्वाभिमानी हिंदू नी नोकरी करायला जायला च नव्हते पाहिजे होते. एका मुस्लिम देशाच्या विकासासाठी तुम्ही तुमच्या बुद्धी चा वापर केला. हा हिंदू द्रोह च आहे. फक्त मुक्त विहिरी ह्यांच्या साठी.

In reply to by मुक्त विहारि

sunil kachure 22/03/2022 - 12:27
सौदी सारख्या मुस्लिम देशात तुमच्या सारख्या स्वाभिमानी हिंदू नी नोकरी करायला जायला च नव्हते पाहिजे होते. एका मुस्लिम देशाच्या विकासासाठी तुम्ही तुमच्या बुद्धी चा वापर केला. हा हिंदू द्रोह च आहे. फक्त मुक्त विहिरी ह्यांच्या साठी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

1) कट्टर धर्म वेडे ह्या मध्ये मुस्लिम धर्मीय ह्यांचे योगदान जास्त आहे. २) आर्थिक क्षेत्र काही लोकांनी ठरवून घेवून बाकी लोकांस कंगाल करणारे. आर्थिक क्षेत्रातील अतिरेकी. ३) काहीच लोकांच्या हितासाठी सरकार चालवणारे सत्ता वेडे सत्ता धारी. ही पण लिस्ट मोठी आहे आणि हे सर्व घटक मानव जाती साठी विनाशक च आहेत. फक्त धर्मवीर मानव जाती साठी विनाश कारी नाहीत. उलट विनाशकारी घटकांच्या यादीत धर्म वेडे शेवटच्या स्थानावर आहे. बाकी सर्व महा भयंकर आहेत.

sunil kachure 22/03/2022 - 12:45
धर्मवीर ह्या शब्द ऐवजी धर्म वेडे असे वाचावे. १) जर्मनी नी महाभयंकर युद्ध चालू त्या पाठी कारण धर्मांध पना हे नव्हते. २) अमेरिका नी जपान वर अनु बॉम्ब टाकून जगातील सर्वात मोठा विनाश घडवला त्याला कारण धर्मांध पना नव्हतं आर्थिक आणि जागतिक सत्ता होण्याचे वेड हे कारण होते. आफ्रिका सारखे देश गरिबीत जीवन जगत आहेत पण तिथे स्वार्थी आर्थिक लालची त्यांच्या majburi च फायदा घेवून त्यांची लूट करत आहेत. इथे धर्मांध लोकांचा संबंध नाही. आज रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे प्रचंड विनाश होत आहे पैसा आणि आर्थिक अतिरेकी पना ह्या साठी सर्व चालू आहे. जगाला धर्म वेड्या लोकांपेक्षा पांढरपेशा आर्थिक हवस असणाऱ्या स्वार्थी लोक पासून जास्त धोका आहे.. भारतात पण धर्माची भीती दाखवून देशातील सर्व नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे षडयंत्र चालू अशें

डँबिस००७ 22/03/2022 - 17:54
दि काश्मिर फाईल्स चित्रपटाने लिब्रांडुंची दातखिळ बसवली आहे. दि काश्मिर फाईल्स हा चित्रपट नसुन डॉक्युमेंट्री आहे. मुळात घटना जश्या घडल्या तश्या पेक्षा दि काश्मिर फाईल्स चित्रपटात टोन डाउन केलेल्या आहेत. ओरीजीनल घटनाक्रम दाखवला असता तर बघवला नसता हा चित्रपट. ज्या लोकांनी हे सगळ केल, त्यांना फक्त हैवानांची उपमा देता येईल. आपल्या समाजात आपल्या आजुबाजुला असे हैवान वावरत असतात व वेळ पडली तर ते त्यांचा मूखवटा फेकुन हैवानांची कृत्य करतात ह्याची जाणिव समाजाला होईल अशी आशा आहे. गिरीजा टिक्कुला जम्मु मधुन परत बोलवणारा तीच्या कॉलेज मधलाच असिस्टंट प्रोफेसर होता. बर्याच केसेस मध्ये २०-३० वर्षांच्या शेजार्यांनीच हिंदुंना गोळ्या घातल्या व त्यांची मालमत्ता हडप केली. AK47 हाताशी असताना चिनार वृक्ष कापणासाठी वापरल्या जाणार्या मोठ्या करवतीने जिवंत पणे गिरीजाला कापणारे नराधमच असु शकतात. फक्त काफीर असण गुन्हा असेल तर त्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला ड्रायव्हर, शाळेतला शिपाई किंवा प्रोफेसर कोणीही सहज नराधम बनु शकतो. दि काश्मिर फाईल्स चित्रपटाने हिंदुंचे डोळे उघडावेत अशी आशा आहे !!
काश्मिर फाई्ल्स चित्रपट म्हणजे...' माकप नेते सीताराम येचुरींचं गंभीर विधान https://www.esakal.com/amp/manoranjan/bollywood-movie-the-kashmir-files-cpi-leader-sitaram-yechury-comment-viral-yst88 समुद्र मंथन....
द कश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर दोन गटात हाणामारी, 15 जणांना अटक https://marathi.abplive.com/news/maharashtra/two-groups-clash-in-amaravati-over-the-film-the-kashmir-files-raises-slogans-1043526 मिळालेल्या माहितीनुसार, 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहून परतणाऱ्या एका गटाने रस्त्यावर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावरूनच दुसरा गट आणि चित्रपट पाहून आलेल्या या गटात जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की या दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.... --------- हा चित्रपट, सगळे मुखवटे बाहेर काढत आहे... मध्यंतरी, अमरावती शहरांत दंगल झाली होती....
https://www.lokmat.com/movies/the-kashmir-files-pallavi-joshi-man-cut-into-pieces-vivek-agnihotri-film-anupam-kher-four-year-research-interview-a720/ आणि तरीही, काही लोकांना, हा सिनेमा अतिरंजित वाटतो ...
चित्रपट करमुक्त करून मोदी सरकार आमच्या…”; The Kashmir filesवर फारुख अब्दुल्लांची टीका https://www.loksatta.com/desh-videsh/farooq-abdullah-reaction-on-the-kashmir-files-movie-hrc-97-2853004/ काय बोलणार?

मुक्त विहारि 23/03/2022 - 19:35
https://www.loksatta.com/manoranjan/mns-to-show-the-kashmir-files-film-for-free-tweets-sandeep-deshpande-scsg-91-2854676/ मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. कश्मीर फाइल्स या हॅशटॅगसहीत संदीप देशपांडेंनी एक फोटो पोस्ट केलाय. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा विशेष मोफत शो दाखवला जाणार आहे. २४ मार्च २०२२ मध्ये संध्याकाळी सव्वा सात वाजता माहीममधील एल. जे. रोडवरील सिटी लाईट चित्रपटगृहामध्ये हा शो दाखवला जाणार आहे,” असं या फोटोमध्ये म्हटलं आहे.... ------ उत्तम निर्णय ...
संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी, कारण ठरला The Kashmir Files; भाजपा झाली आक्रमक https://www.loksatta.com/desh-videsh/the-kashmir-files-uproar-in-rajasthan-assembly-over-imposing-section-144-in-kota-scsg-91-2854259/ ही एक प्रकारची दंडेलशाही आहे ...
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/women-denied-entry-due-to-wearing-saffron-shawl-during-kashmir-files-show-in-nashik/613613 आता, स्वयंघोषित, हिंदूत्ववादी शिवसेना, काय Action घेते? हे बघणे रोचक ठरेल ....
आता, आमची सौ म्हणते की, ह्यापुढे, मुस्लिम अभिनेत्यांचे सिनेमे पैसे खर्च करून बघणार नाही. मी तर, मुस्लिम अभिनेत्यांचे सिनेमे टाॅकीज मध्ये बघणे, कधीच सोडून दिले आहे.

In reply to by कॉमी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 25/03/2022 - 10:06
वा, काय ती देशभक्ती, किती हा त्याग.
खरंय....!
डोळे पाणावले.
माझे सुद्धा...! =)) -दिलीप बिरुटे

In reply to by मुक्त विहारि

अर्धवटराव 24/03/2022 - 21:01
हि एक विचित्रच मेण्टॅलिटी डेव्हलप होताना दिसतेय हल्ली. पठाण फ्लॉप करा, लालसींग चड्ढा बुडवा.. का? तर ते शहारुख, आमीरचे चित्रपट आहेत म्हणुन. (कप्पाळ बडवणारी स्माईली कशी द्यायची...)

In reply to by अर्धवटराव

आग्या१९९० 24/03/2022 - 21:26
हि एक विचित्रच मेण्टॅलिटी डेव्हलप होताना दिसतेय हल्ली. हे तर काहीच नाही,काही महाभाग ह्या सिनेमाचे तिकीट काढून थिएटर मध्ये बघायला जाणार नाहीत. जनतेनी हा सिनेमा बघण्याचा पंतप्रधान आग्रह करत आहेत. सर्वांना निर्मात्याच्या कमाईची काळजी. निर्मात्याचा पैसा वसूल झाला आहे, पण कोणीच त्याला मोफत यू ट्यूबवर टाकायला सांगत नाहीत. राज्यांनी करमणूक कर माफ करावा असल्या फालतू गोष्टी सांगायला लाजही वाटत नाही काहींना.

In reply to by आग्या१९९०

प्रदीप 24/03/2022 - 22:50
निर्मात्याचा पैसा वसूल झाला आहे, पण कोणीच त्याला मोफत यू ट्यूबवर टाकायला सांगत नाहीत.
का? ह्यांतून जो नफा मिळेल, त्यावर त्याला पुढील निर्मीती कमी खर्चीक जावी, ना? तसेच स्वतःसाठी नफा हवाच की. त्याने काही विषयाने भारून जाऊन, त्यावर रीसर्च केला व चित्रपट बनवला. तेव्हा मग त्याने तो यूट्यूबवर फुकट का करावा? ही खास मेंटॅलिटी मलातरी समजत नाही. एकतर, कुणाला जगण्यासाठी किती पैसा लागतो, हे त्या व्यक्तिने स्वतः ठरवावे. जोंवर त्या व्यक्तिचे, तिच्या कुटुंबियांची लाईफ स्टाईल, संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करत नाही, तोपर्यंत इतरांना त्याबद्त्दल काहीही टीका करण्याची जरूर नाही. हेच आर्गुमेंट काही सुप्रसिद्ध मराठी कलाकारांविषयी पूर्वी केले गेलेले ऐकून मी थक्क झालो आहे. असो, तो वादाचा एक वेगळा मुद्दा झाला.
राज्यांनी करमणूक कर माफ करावा असल्या फालतू गोष्टी सांगायला लाजही वाटत नाही काहींना.
खुद्द निर्मात्याने असे सांगितले नाही. दुसरे, ह्यांतून निर्मात्याला काहीच थेट लाभ नाही. कर कमी केल्याने, जास्त जनता तो चित्रपट पहाण्यास उद्युक्त होईल, इतकाच ह्या 'काहींची' ह्या मागणीमागे हेतू आहे. आणि असे झाल्याने, काश्मिरांतील हिंदूंवर तीन द्शकांपूर्वी, जे प्रचंड अत्याचार झाले होते, ते परागंदा झाले होते, व ज्याविषयी आतापर्यंतची सर्व सरकारे, मीडीया इत्यादी सर्वच मूग गिळून बसले होते, ते सर्व जास्त लोकांच्या नजरेत येईल, ह्यांत 'लाज वाटण्यासारखे' नेमके काय आहे?

In reply to by प्रदीप

आग्या१९९० 24/03/2022 - 23:11
ज्याविषयी आतापर्यंतची सर्व सरकारे, मीडीया इत्यादी सर्वच मूग गिळून बसले होते, ते सर्व जास्त लोकांच्या नजरेत येईल पुढे काय? आणि टॅक्स फ्री करावे असे कोण मागणी करतेय ते पण बघा. राज्यांनी का आपल्या महसुलावर पाणी सोडावे? मुळात हा प्रश्न सामाजिक जागृती करून सोडविण्यासारखा नाही. जे काही करायचे आहे ते केंद्र सरकारने करायचे आहे. पंतप्रधानांनी हा सिनेमा बघितला आहे, त्यांना काश्मीरी जनतेच्या वेदना,व्यथा नीट समजल्या असतील तर त्यांनी करावे सरकारी पातळीवर प्रयत्न. जनतेकडून काय अपेक्षा आहेत पंतप्रधानांची?

In reply to by आग्या१९९०

आणि राज्यात सत्तेवर मुस्लिम फेवरिसम वाले आणि केन्द्रात हतबल नेत्रुत्व असलेले सरकार असले तर काय होउ शकते हे हा चित्रपट दाखवतो. काश्मिरची स्वायत्तता काढुन घेतली आहे पण तिथे अजुन बरेच काम करायला हवे आहे. तसेच समान नागरी कायदा आणायचा तर जनमानस त्याद्रुष्टिने तयार करणे आवश्यक आहे. हा चित्रपट त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करतोय. आणि हिन्दु मुळात सहिष्णु असल्यामुळे या चित्रपटामुळे दन्गे उसळु नयेत ही अपेक्शा. मुठभर लोक अतिरेकी विचाराने वागतात आणि वाइट काम करतात आणि बहुसंख्य त्यांच्यापुढे मन झुकवतात. हिंदू मध्ये दुफळी असल्यामुळे हिंदूंची धार्मिक कट्टरता आपलेच लोक कंट्रोल करतात. तसे मुस्लिम नाही करत. त्यामुळेच तर काश्मिर मधे एवढे मुस्लिम देखिल (खखोदेजा) अतिरेकी लोकान्कडुन मारले गेले तरी कोणी आवाज उठवला नाही. आणि बरेच हिन्दु मात्र या सिनेमामुळे दुफळी माजेल या काळजीत आहेत.

In reply to by आग्या१९९०

चौकस२१२ 25/03/2022 - 06:49
पंतप्रधानांच माहित नाही पण सर्वसामान्य माणसाची , जनेते कडून हि अपेक्षा ठेवली तर चालेल का साहेब? १) केंद्र सरकार या बाबत ठोस भूमिका घेत असेल तर राजकीय मते बाजूला ठेवून त्यास निंदण या बाबतीत तरी साथ देणे २) अशी साथ देताना अप्लाय आवडीचा ( भाजप सोडून) पक्ष जर " काड्या" घालायला लागला तर त्यांना "तुम्ही सध्या तरी चूप बसा " हे ठणकावून सांगणे अर्हताःत हे होणे नाही ... येथे जर काश्मिरी हिंदूंना न्याय द्यायला कोणी लागले तर " हे इस्लामोफोबिक " आहे म्हणून "आग " लावयायाला लावयायला लोक तयारच आहेत ,

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे 25/03/2022 - 10:17
इथे बरेच लोक टमरेल गॅंगचे आहेत. म्हणजे श्री मोदींची स्वच्छ भारत योजना निकामी होण्यासाठी रस्त्यावर टमरेल घेऊन बसणारे. या लोकांना काश्मिरी हिंदू जनतेबद्दल सहनुभूती आहे परंतु त्यातून श्री मोदींना अंशभर जरी क्रेडिट मिळाले तरी यांचे बद्धकोष्ठ आणि कपाळशूल उठलाच असे समजा. नवरा मेळा तरी चालेल पण सावंत रंडकी व्हायला पाहिजे हि विचारसरणी.

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 26/03/2022 - 07:47
या लोकांना काश्मिरी हिंदू जनतेबद्दल सहनुभूती आहे ( कदाचित असावी !)परंतु त्यातून श्री मोदींना अंशभर जरी क्रेडिट मिळाले तरी यांचे बद्धकोष्ठ आणि कपाळशूल उठलाच असे समजा. नवरा मेळा तरी चालेल पण सावंत रंडकी व्हायला पाहिजे हि विचारसरणी. १००%

In reply to by आग्या१९९०

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 25/03/2022 - 11:08
>>>मुळात हा प्रश्न सामाजिक जागृती करून सोडविण्यासारखा नाही. जे काही करायचे आहे ते केंद्र सरकारने करायचे आहे. पंतप्रधानांनी हा सिनेमा बघितला आहे, त्यांना काश्मीरी जनतेच्या वेदना,व्यथा नीट समजल्या असतील तर त्यांनी करावे सरकारी पातळीवर प्रयत्न. जनतेकडून काय अपेक्षा आहेत पंतप्रधानांची ? सामाजिक जागृती, वोट बँकेची करायची आहे. वादविवाद,तंटे, द्वेष उभा करणे हाच ज्या पक्षाचा अजेंडा आहे, त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाही. कोणत्याही विषयावरुन वाद कसा करायचा याचे 'चिंतन' मुख्यकेंद्र महाराष्ट्रातील 'संत्री' जिथून मिळते तिथून हे सुरु होते. समाजात दुफळी कशी निर्माण होईल त्याचा सातत्याने प्रयत्न इथे होतांना दिसतो. चित्रपटात जे घडले ते घडलेच आहे, कमी जास्त प्रमाणात. अधिक-उणे अशा कलाकृतीत असू शकते. तो संवेदनशील विषय आहे. त्याचं राजकारण करण्याचा विषय नाही. असे म्हणतात की 'अर्धे सत्य सांगणे हे खोटे सांगण्यापेक्षा मोठे पाप आहे' अर्धे सत्य सांगून जनतेला धुसमुसत ठेवण्याचा पडद्याआडून एक तो प्रयत्न आहे. काश्मिरी पंडितांची जी ससेहोलपट झाली त्याचं दु:ख मोठं आहे. कोणत्याही विस्थापिताचे दुखाची कल्पना फक्त सोसणा-यालाच माहिती असते. काश्मिरी पंडित जेव्हा विस्थापित होत होते, त्यांच्यावर अत्याचार होत होते, तेव्हा सरकारचा पाठींबा काढून घेतला नाही, सत्तेचा मोह भयंकर असतो, तो त्यांना सुटला नाही. आजही सुटत नाही. आज बत्तीस वर्षात पंडितांच्या पुनवर्सनासाठी किती प्रयत्न केले. किती पंडितांचे पुनवर्सन केले, हा मुख्य प्रश्न असतो. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. अश्वत्थाम्या सारखी काश्मी्री पंडितांची जखम केवळ भळभळत ठेवली जाते. आज रात आठ बजेसे सब बंद रहेगा. असे म्हणून लाखो हातावर पोट भरणा-या मजुरांना क्षणात विस्थापित केले गेले. कितीक मेले, किती जगले याचा हिशेब नाही. अनवाणी पुरुष, गरोदर स्त्रीया मरणप्राय वेदना सहन करीत कितीतरी किलोमिटरचा प्रवास घरापर्यंत करत, काही घरी, पोहोचले, काही पोहोचलेच नाही. हे सर्व विसरुन जाऊ, कारण त्याचा मतांवर फार परिणाम होणार नाही. पण, 'आज रात आठबजह से सभी पंडितोकी एक सुची बनाकर सभी को अपने घर मिल्ट्री के द्वारा घर घर छोडा जायेगा' असा निर्णय घेणारी छाती छप्पन्न इंचाची नव्हे तर, असा निर्णय घेणारी निधड्या छातीची या पंडितांना गरज आहे. सिनेमा पाहा असे म्हणून पंडितांचे पुनवर्सन होणार नाही. राजकारणातील रक्तपिपासू जळु हे इतक्या लवकर होऊ देणार नाहीत, हेही माहिती आहे. बाकी, जनतेकडून त्यांची अपेक्षा फ़क्त मतांची असते. दुसरं काही नाही. जय हिंद जय भारत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 25/03/2022 - 19:58
बिरुटे सर तुम्हाला तोंडघशी पडायची सवयच लागली आहे. कारण आपला अभ्यास कमी पडतो आहे. The minister said that the government provides Rs 13,000 per month to the families of 44,000 Kashmiri Pandits who have relief cards Government's 2022 J&K plan: Resettlement of Kashmiri Pandits, 25,000 jobs, train link Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/80899281.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst आणि हा २०२१ चा दुवा आहे. नाही तर परत म्हणाल कि आता सिनेमा आला म्हणून श्री मोदी ( तुमच्या भाषेत फेकूशेठ नाहीं तर तुम्हाला समजणार नाही कोण ते) यांनी हि योजना चालू केली. आणि हा दुवा एकदा नीट वाचूनही घ्या त्यात काय काय लिहिलंय ते.

In reply to by सुबोध खरे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 25/03/2022 - 21:58
आपला अभ्यास मला माहिती आहे. करोना काळात तो अनुभव घेतला आहे. आपल्या अभ्यासाबद्दल एकच प्रतिसाद टाकला आहे. देऊ का दुवा. बाकी, व्यक्तीगत टीका करण्यात मला इंट्रेष्ट नाही. हं तर, मोदीशेठ. निवडणूकीपूर्वी असे म्हणाले होते की आम्ही सर्व पंडितांचे पूनर्वसन करु. आज आठवर्ष झाली काय दिवे लावले शेठने. नुसत्या थापा. काँग्रेसनेही विषयावर काही कमी थापा मारल्या नाहीत. त्यांनीही आश्वासने भरपूर दिली होती. पण, राहिला आर्थिक मदतीचा विषय. पंतप्रधान पॅकेज काही तुमच्या शेठने आत्ताच सुरु केलेली योजना नाही. काँग्रेसने एक गोष्ट केली. जम्मूमधे विस्थापितांसाठी कायमस्वरुपी छावण्या वसवल्या आणि पीएमपॅकेज त्यांनी आणले. माहिती नसेल तर शोधा. माहिती मिळेल. २००८ मधे, मनमोहनसिंग सरकारच्या काळात पीएम पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं. त्याचबरोबर त्या योजनेअंतर्गत काश्मीरमधील विस्थापितांसाठी नौक-याही देण्यात आल्या होत्या. या योजनेअंतर्गत २००८ आणि २०१५ मधे काश्मिरी पंडितांसासह विविध वर्गातील लोकांसाठी ६००० हजार नौक-या जाहीर करण्यात आल्या होत्या. आज काही हजार विस्थापित लोक नौक-या करीत आहेत. पण, काश्मीरमधे बांधलेल्या ट्रान्झिट हाऊसमधे त्यांना राहावे लागते. (ट्रान्झिट हाऊस सतत वाद आणि चर्चेत राहीले) दुवा. काश्मिरी पंडितांचे म्हणने असे होते की, आम्हाला नौक-या दिल्या पण म्हणून याकडे पुनर्वसन योजना म्हणून बघीतल्या जाऊ नये. म्हणजे, काश्मीरमधे त्यांचं वडिलोपार्जीत घरे सोडावी लागली आणि ते जम्मूत राहण्यासाठी आले. सरकारने अशा विस्थापितांना काश्मीरमधे नौकरी करायला लावली. पण घरे दिली नाहीत. १९९० पासून काश्मीर खोरे सोडलेल्या सर्वच विस्थापितांना पीएम पॅकेज अंतर्गत रोजगाराव्यतिरीक्त ज्या कुटुंबांना मुळ ठीकाणी स्थायिक व्हायचं आहे, अशांना आर्थिक मदतीची तरतुद आहे. तसंच काश्मिरी स्थलातंरितांना रोख मदतही दिल्या जाते. मनमोहनसिंग सरकारनेही विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मदत आणि पुनर्वसनाची घोषणा केली. तेव्हा काश्मिरी पंडित संघर्ष समितीनेही विस्थापित नसलेल्या पंडितांसाठी वाटा मागितला होता. पुढे विस्थापित उच्च न्यायालयात गेले निर्णय फक्त विस्थापितांसाठी असा निर्णयही आला. (चर्चा दुवा )सध्या काश्मिरी खो-यात परतणे आणी पुनर्वसन हीच महत्वाची गोष्टा राहीलेली आहे. आपल्या शेठने सिनेमा पाहा असा सल्ला देण्याऐवजी. पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा. थापा बंद कराव्यात. अब कुछ करनेका वक्त है. मन की बाते करने का नही. एवढे बोलून थांबतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकस२१२ 26/03/2022 - 07:17
आपल्या शेठने सिनेमा पाहा असा सल्ला देण्याऐवजी. पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा. थापा बंद कराव्यात. अब कुछ ३२- ७ सध्याचे - ५ - -३ इतरांचे = काँग्रेस चे १७ नरसिंह राव शेठ आणि मनमोहन सेठ यांनीही तर काय दिवे लावले? आणि आता खरंच काँग्रेस ला काश्मिरी हिंदूंच्या बद्दल पुळका असले तर मग या एवढीं नाकारात्मकता का हो? ( हो हिंदूच त्यांची जात महत्वाची नाही) चित्रपट हे निमित्त आहे मूळ प्रश्नाला वाचा फोडणे हा मूळ हेतूआहे ,काँग्रेस च्या काळात यावर "दुर्लक्ष कर किंवा बंदी आणली असती हिंदूंचे दुख्ख ते दुख्ख नाही ? त्यासाठी मग मेणबत्यांचं मोर्चह काढायला वेळ नसणार देशभर आणि जगभर लोकांना हिंदूंवर हा अत्याचार झाले होते हे कळले यामुळे जळफळाट होतोय असं दिसतंय !