Skip to main content

कोण कोण मॅच बघताहेत? (भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल)

लेखक गवि यांनी मंगळवार, 09/07/2019 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवात अतिशय बेकार झाल्यावर न्यूझीलंड जरा अंमळ स्थिरावतंय की काय? मुळात टॉस आणि त्यांची पहिली बॅटिंग, इथेच मूड गेला. पण एका बातमीनुसार याच मैदानावर छत्तीस (तीस सहा) वर्षांपूर्वी विश्व कप सेमीफायनललाच इंग्लंड आपल्याविरुद्ध टॉस जिंकला, त्यांनी प्रथम ब्याटिंग घेतली आणि तरी आपण ती मॅच घेतली हे वाचलं. त्यामुळे जरा धीर आलाय. पॉप कॉर्न घेऊन बसलेल्या लोक्सनी इथे लाईव्ह चर्चा आणि अपडेट्स करा. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना लाईव्ह स्कोर खूप ठिकाणी कळेल, पण मिपा स्टाईल टिप्पणीसहित प्रतिक्रिया गुगलही देऊ शकणार नाही. तेव्हा इच्छुकांसाठी हा धागा सुरु केल्या गेला आहे. आत्ता 125/2 34 षटके न्यूझीलंड फायनल स्कोर वधारेत वधारे अंदाज 225. कसे?

वाचने 72647
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

भारत हहा सामना जिंको वा हिरो सध्याची टीम ही विनर टीम नाही हे मी पहिल्या सामन्या पासून सांगत आहे ! ३ ४ ५ ६ ची बोंबी आहे व त्या खाली क्लब स्टॅंडर्ड ची ही फलंदाज नाहीत !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौरा काका म्हणतात त्यात तथ्य आहे. इथपर्यंत केवळ नशिबाने पोचलो आहोत. आज न्युझीलंड प्रयत्नांची पराकाष्ठा करणार. माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल. पैजारबुवा,

मधल्या फळीच्या फलंदाजांना -- पन्त आणि कार्थिक -- आता आपापलं कर्तृत्त्व दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली आहे.

आहे ना सर ,, पण आधी सर्वजण १०८ वेळा भारतमाता कि जय बोलले का ?

२४ वर ४ बाय ऑल. परिस्थिति सुधारली तर येईल. धागा आला नस्ता तर जिंकलो असतो. ;) -दिलीप बिरुटे

कार्तिक खपला पैजारबुवा,

घरी लवकर जाऊन सामना बघायची इच्छाच गेली राव. शेवटी क्रिकेटमधे शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल हे नाही सांगता येत पण आशा सोडून दिली आहे. :-(

१८० बॉल आणि १७० रन्स हव्यात. भरवश्याच्या आणखी दोन तीन जास्त विकेट्स हाती असत्या तर हे समीकरण पाहायला निवांत वाटलं असतं एरवी.

टीव्ही अनुपलब्ध. एक मेडन गेली की काय? असो. जास्त चेंडू आणि कमी रन हव्यात इथून आता चेंडू आणि आवश्यक रन्स समसमान झाल्या. आता गणित अधिकाधिक उलट होऊ नये बस्स.

In reply to by प्रीत-मोहर

मी पाठीशी शिल्लक आहे, असा दिलासा देऊन काहीसा मानसिक ताण कमी करण्यासाठी धोनी मागे राहिला असेल.

In reply to by प्रीत-मोहर

अजून धोनी आउट व्हायचा आहे हा विचार मनाला जास्त आश्वस्थ करतो म्हणूनच तो खालच्या नंबरवर आहे, अन्यथा जिथे रथी महारथी कोसळले तिथे आम्ही काय टिकणार अशीही ओरड होऊन जाते

अगदी कमी देशात खेळला जाणारा हा " विचित्र" खेळ मी १९६६ पासून म्हणजे क्लाइव्ह लॉईड १९ वर्षांचा असल्यापासून पाहात आहे .इथे शेवटाचा चेंडू पडेपर्यंत काहीही होऊ शकते. पण ५ बाद झाल्यावर चमत्कार करणारे लान्स क्लूस्नर आज आपल्या संघात नाहीत . १७५ वाला कपिल देव नाही .पाकिस्तान मध्ये बॉलर्स जसे किलिंग इन्स्टीकट ने फलंदाजी करतात ती बॉलर्स ची परंपराच आपल्याकडे फारशी नाही, हार्दिक व पंड्या ना अनुभव कमी आहे ,धोनी २०१६ पासून मंदावला आहे. दिनेश कार्तिक चांगला खेळाडू असेलही पण आता यावेळी त्याची निवड चुकीचीच आहे .इंग्लंडात फिरकीला फारसा वाव नसतोच . धावा रोखल्या तरी विकेट मिळणे दुरापास्त असते. हे लक्षात घेऊन विजेता स्वप्न पाहावे.

धोनी जाडेजा जोडी कौतुकास्पद. स्थिर वाटतंय आता. सिक्स फोर वगैरे अधेमध्ये चालू. चौदा एक्स्ट्रा रन्स. थिंक पॉझिटिव्ह.

अरे मी इथे मंत्रपाठ करतोय म्हणून चांगली दशा सुरु झाली आहे .. मला तुमचेही पाठबळ हवे आहे .. त्या जडेजाला मी मंत्र फुंकुनच मैदानावर उतरवले आहे आता तुम्ही त्या धोनीला पाठबळ द्या

अपेक्षांना अंत नाही ! पाकीस्तान बरोबर खेळताना चषक नाही जिंकला चालेल पण पाकीस्तानला हरवावे असे वाटते. आज इथपर्यंत आलोय तर जिंकूनच यावे असे वाटते. भारत जिंकणार ! टेंशन नक्को !

In reply to by यशोधरा

भुवनेश्वर कुमार व चहल पूर्ण ५० ओव्हर्स देखील खेळले नाही . अशावेळी मी जे किलिंग इन्स्टिन्क्त आपल्या ७ नंतरच्या खेळाडूंच्या अंगात नाही असे म्हणालो ते किती उचित आहे ते पहा !

In reply to by यशोधरा

२०२३ मध्ये मी सत्तरी ओलांडून जाईन . मग तर माझे कुणीच ऐकणार नाही ! माझा मुद्दा एवढाच टीम चान्गली खेळली पण १९८३ इतके टीमवर्क नव्हते !

आता नेटकरी अनुष्काची ऑनलाईन धुलाई करतील बहुतेक !

निकाल काहीही असू दे खालील बाबी सिद्ध आहेत. १) जर धोनीने निवृत्त होऊन पंत मधला पोरकट पणा काढला तर पंत एक उत्तम खेळाडू होऊ शकतो. २) हार्दिक पंड्या हा खेळाडू फक्त आय पी एल च्या लायकीचा खेळाडू आहे . त्याला इतर भवितव्य नाही. ३) रवींद्र जडेजा व अश्विन हे अजूनही पोटेन्शियल असलेले खेळाडू आहेत . ४) २०१६ पासून धोनीच्या फटाक्यातला दणका हरवला आहे त्याने निवृत्त होणे उचित . ५) विजय शंकर चा अशोक मंकड ( फक्त इंडिया हिरो ) होण्याची शक्यता अधिक .

ज्या पाकिस्तानने किवींचा पराभव केला त्या किविंना आपण हरवू शकलो नाही. असो वेल प्लेड इंडिया.

क्रिकेट हा सांघिक खेळ असला त्यात सुरुवातीचे फलंदाज जवाबदार असले तरी प्रत्येक वेळी त्यांनी शतकं ठोकली पाहिजेत. मग हा महातारा धोनी टुचुटुचु खेळून आपला बीपी वाढवतो या xx ला अगोदर बलजबरीने निवृत्त करा. बस दुसरं काही नको. धन्यवाद. -दिलीप बिरुटे (जडेजाबरोबर टुचुटुचु खेळल्यामुळे म्हाता-या धोनीवर संतापलेला)

In reply to by यशोधरा

स्क्यूज् मी काकु, आयपीएलला हा म्हातारा धोनी जीवावर उदार होऊन खेळतो. आजच्या सामन्यात त्याने जड़ेजाबरोबर एक बाजू लावून धरली पण चेंडू किती खाल्लेत. कसलं टुचु टुचु खेळतो. अरे प्रसंग काय, तू काय खेळतो काय ? वय किती, खेळतो किती ? च्यायला, मला त्याचं तोंड बघायची इच्छा नै. काकू तुम्ही त्याची बाजू घेऊन माझं ब्लडप्रेशर वाढवू नका. अगोदरच मला खुप कामाचा लोड आहे. बस आपल्याला त्याला रिटायर करायचंय. या गोष्टीसाठी,आपल्याला मिपावर एक ह्याशटॅग सुरु करायचंय. #''धोनीने निवृत्त व्हायलाच पाहिजे'' # धन्यवाद. -दिलीप बिरुटे

सेमिफायनलमधे match fixing चालले नाही.

न्यूझीलंड आणि इंग्लण्ड या दोन्ही संघांनी विश्वचषक क्रिकेट अंतिम फेरीत धड़क मारली आणि कोण जिंकेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. इंग्लण्ड जिंकेल तर छुपा न्यूझीलंड बाजी मारेल असे वाटले. नाणेफेक ( टॉस) जिंकून न्यूझीलंडने पहिली बाजी मारली असे वाटले पण ठराविक धावसंखेच्या आणि ठराविक अंतराने बाद होणा-या संघाने फार मोठी धावसंख्या उभारली नव्हती. २४१ हे आव्हान समोर ठेवून उतरलेल्या रॉय रुट च्या बळावर इंग्लण्ड सहज जिंकेल असे वाटले होते पण चार फलंदाज बाद झाल्यानंतर सामना न्यूझीलंडकड़े फिरला होता. परंतु सामना शेवटच्या षटकापर्यन्त जाऊन टाय झाला. सुपर ओव्हर मधेही सामना टाय झाला. सामन्यात अधिक चौकार ज्याने मारले असतील तो संघ विजयी या मुर्ख नियमामुळे इंगलंडला विश्वविजेता ठरविण्यात आले. एका रोमहर्षक सामन्याचा असा शेवट पाहुन न्यूझीलंडचा समर्थक म्हणून आम्ही हळहळन्याशिवाय काय करू शकणार होतो. इंग्लण्डचं अभिनंदन. -दिलीप बिरुटे

In reply to by फुटूवाला

पूर्ण कालच्या सामन्यात आणि सुपर ओव्हर्स मधे इंग्लडने एकूण २४ चौकार ठोकले तर न्यूझीलंडने १६ चौकार ठोकले. -दिलीप बिरुटे

माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल. पण सामना इतका अटीतटीचा होइल असे वाटले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना बर्‍याच कळापर्यंत लक्षात राहिल. दोनही संघांनी जिगरबाज खेळ केला त्यात इंग्लंड थोडे जास्त नशिबवान ठरले. पैजारबुवा,

माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल. पण सामना इतका अटीतटीचा होइल असे वाटले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना बर्‍याच कळापर्यंत लक्षात राहिल. दोनही संघांनी जिगरबाज खेळ केला त्यात इंग्लंड थोडे जास्त नशिबवान ठरले. पैजारबुवा,