मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोण कोण मॅच बघताहेत? (भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल)

गवि · · काथ्याकूट
सुरुवात अतिशय बेकार झाल्यावर न्यूझीलंड जरा अंमळ स्थिरावतंय की काय? मुळात टॉस आणि त्यांची पहिली बॅटिंग, इथेच मूड गेला. पण एका बातमीनुसार याच मैदानावर छत्तीस (तीस सहा) वर्षांपूर्वी विश्व कप सेमीफायनललाच इंग्लंड आपल्याविरुद्ध टॉस जिंकला, त्यांनी प्रथम ब्याटिंग घेतली आणि तरी आपण ती मॅच घेतली हे वाचलं. त्यामुळे जरा धीर आलाय. पॉप कॉर्न घेऊन बसलेल्या लोक्सनी इथे लाईव्ह चर्चा आणि अपडेट्स करा. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना लाईव्ह स्कोर खूप ठिकाणी कळेल, पण मिपा स्टाईल टिप्पणीसहित प्रतिक्रिया गुगलही देऊ शकणार नाही. तेव्हा इच्छुकांसाठी हा धागा सुरु केल्या गेला आहे. आत्ता 125/2 34 षटके न्यूझीलंड फायनल स्कोर वधारेत वधारे अंदाज 225. कसे?

वाचने 72622 वाचनखूण प्रतिक्रिया 133

गविसेठ, विश्वचषक क्रिकेट चालू आणि मिपावर धागा नाही याचं आश्यर्च वाटलं होतं. पण आपण धागा सुरु केला आभार. तीन बाद १३६ मला वाटतं. न्यूझीलंड २५७ करतील. -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

गवि Tue, 07/09/2019 - 17:43
ते तर झालंच, पण आत्तापर्यंत झालेल्या विजयांप्रमाणे एकतर्फी आणि विनाचुरस सामना होणार की नखे कुरतडत बघावा लागणार हे महत्त्वाचे.

होणार हे निश्चित, संध्याकाळी नियमित कोट्यापेक्षा जास्त मद्य घेऊन क्रिकेट पाहणा-यांनी आज टेंशन घेऊ नये. अशी सुचना द्यावी वाटते. १४९/३-३८.४ -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

*वर्ल्डकप क्रिकेट अपडेट्स* भारत न्युझीलंड उपांत्य सामना सध्या पावसामुळे सामना थांबलेला आहे, जर पाऊस थोड्या वेळात थांबला व न्यूझीलंड पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही तर, भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार 4 ओव्हर कमी होणार आहेत. तसेच, जर सामना 20 षटकांचा झाला तर भारतासमोर 148 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडनं 4.5 च्या रनरेटनं धावा केल्या आहेत. त्यामुळं भारताला 6 च्या रनरेटनं धावा कराव्या लागणार आहेत.  आणि जर पाऊसामुळे आज सामना झालाच नाही तर बुधवारी सामना आजच्या स्थितीतच उद्या पुढे सुरू होईल. आणि जर उद्याही पाऊसामुळे सामना झालाच नाही तर गुण जास्त असल्यामुळे भारत थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.(चोप्य पस्ते) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Tue, 07/09/2019 - 20:31
भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे.
ऑ? 46 ओव्हर्समधे फक्त 211 केल्यात ना त्यांनी? मग भारताला 46 ओव्हर्समधेच 237 टार्गेट कशापायी?

In reply to by गवि

प्रचेतस Tue, 07/09/2019 - 21:07
When overs are lost, setting an adjusted target for the team batting second is not as simple as reducing the run target proportionally to the loss in overs, because a team with ten wickets in hand and 25 overs to bat can play more aggressively than if they had ten wickets and a full 50 overs, for example, and can consequently achieve a higher run rate. The DLS method is an attempt to set a statistically fair target for the second team's innings, which is the same difficulty as the original target. The basic principle is that each team in a limited-overs match has two resources available with which to score runs (overs to play and wickets remaining), and the target is adjusted proportionally to the change in the combination of these two resources

इरामयी Tue, 07/09/2019 - 22:13
थोडंसं पुरुष मंडळींंना जळवण्यासाठी whatsapp वरून चोप्यपस्तेः *आज भारत वि.न्युझीलंड हा उपांत्य सामना असल्याने स्त्रियांनी घ्यावयाची काळजी....* पती १) सायंकाळी आपल्या नेहमीच्या मालिका लावण्याचा आग्रह अजिबात धरु नये... पती २) अधुनमधुन पतीदेवांना पाणी व चहा आणुन द्यावा.... पती ३) संघाची स्थिती वाईट असल्यास पतीस धीर द्यावा... पती ४) संघ उत्तम स्थितीत असल्यास पतीच्या आनंदात सहभागी व्हावे... पती ५) पती सातत्याने चिडचिड करु लागल्यास शांतता बाळगावी... पती ६) तुम्ही नेहमी जरी नवऱ्याला रिमोटली कंन्ट्रोल करत असल्यात तरीही टि.व्ही चा रिमोट आज मात्र त्याच्याकडेच द्यावा... पती ७) "भारतच जिंकेल" हे सातत्याने म्हणावे.... हे सगळं करताना तुमची घुसमट झाली तरी काळजी नको. तुम्हाला त्याचा वचपा काढायची एक खूप चांगली संधी वारंवार मिळेल आणि तेसुद्धा आजच. तिचा जरूर लाभ घ्या: पत्नी १) सामना सुरू असताना तुमचा नवरा जेंव्हा केंव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या सुंदर बायकांकडे डोळे भरून पहात असेल तेंव्हा खुशाल टिव्ही आणि त्याच्या मधोमध (त्याला टीव्ही दिसुच शकणार नाही असं) उभं राहून त्याच्या नजरेला नजर भिडवून पण अतिशय प्रेमाने हे सगळे प्रश्न विचारा: स्कोर काय झाला? आत्ता कोण बॅटिंग करतंय? या बॉलरचं नाव काय? किती ओव्हर झाल्या? रन रेट काय आहे? कोण चांगला स्पिनर आहे? विकेट कीपरच नाव काय? मग टिव्हीवरची मॅच कोणीही जिंको... तुम्हाला निर्मळ आनंदाची अनुभूती येईल.

In reply to by इरामयी

पण शेवटचा उतारा नव्हता. छान. अवांतर : आमच्याकडे अजुनही सचिन तेंडुलकर टीम मधे असतो. धन्यवाद. ;) -दिलीप बिरुटे

ज्या देशात पाऊस असतो तिकडे ठेवतातच कशाला हे सामने. असो, आज काय वेदर रिपोर्ट ? राहिलेल्या चार षटकात ४० धावा जरी आल्या तरी दोनशे एक्कावनच्या पुढे ते जात नै. आणि ते आव्हान आपण लीलया पेलू शकतो. आपल्या संघाचं एक वैशिष्ट्य की आपण त्या त्या संघाच्या लेवलवर जाऊन खेळतो म्हणून दोनशे एक्कावनचं टारगेट साठी चार पाच फलंदाज कामी येतील असे वाटते. भारतीय संघाला शुभेच्छा आहेतच. अवांतर : धागा लेखकांनी वरचवर अपडेट टाकले पाहिजे. आग्रह नाही पण धाग्याचा रंगमंचं हलता ठेवला पाहिजे असे वाटते. -दिलीप बिरुटे (मिपा फलंदाज)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Wed, 07/10/2019 - 10:32
ते डकवर्थ लुईस नियमानुसार जास्तीचे टार्गेट येणार होते तो मानसिक लोड उतरला. त्या नियमांचं लॉजिक काही पटलं नाही पूर्णपणे. अमुक परिस्थितीत संघ अधिक आक्रमक खेळला असता, तमुक इतकी षटके असती तर तो रिलॅक्स खेळला असता वगैरे इतका तपशीलवार विचार करुन वाढीव टार्गेट ठरवायचं तर मग आणखी बऱ्याच बाजू निसटल्या असं म्हणता येतं. पाऊस पडू शकतो याची जाणीव असतानाही एक संघ तुलनेत स्लो खेळला, तर हे हेतुपुरस्सर असण्याची शक्यता आहे असं म्हटलं तर? त्याबद्दल त्यांना पेनल्टी द्यावी की फायदा? असो. बाकी मिपाकर रंगमंच हलता ठेवतीलच.

In reply to by गवि

प्रचेतस Wed, 07/10/2019 - 11:02
डकवर्थ लुईस पद्धतीमध्ये काही सुधारणा करुन २०१४ पासून डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धत वापरात आहे.

In reply to by गवि

mayu4u Wed, 07/10/2019 - 15:43
The Duckworth-Lewis method of resolving rain-affected games has divided the cricketing fraternity into those who do not understand it and those who pretend they do. Rumour has it that it involves calculus, astrology, quantum mechanics and the use of dice. Either way , the teams get screwed.

गवि Wed, 07/10/2019 - 13:23
https://m.maharashtratimes.com/sports/cricket-news/ndia-vs-new-zealand-semi-final-match-will-resume-today-know-about-manchester-weather-forecast/articleshow/70154247.cms अरे देवा..
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही हा अर्धवट राहिलेला सामना पूर्ण होईल का याचीही शक्यता धूसर असल्याचेच दिसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गवि Wed, 07/10/2019 - 14:18
अजिबात होऊ न शकल्यास ते ठीक. पण पावसाच्या अधेमधे अर्धवट काहीतरी सामना होऊन डकवर्थ लुईस पद्धतीने टार्गेट वाढवून मिळून उगीच पराभवाची भानगड नको.

गवि Wed, 07/10/2019 - 15:15
भारतीय इनिंगच्या वेळी अँपायरच्या दोन्ही खिशांत फेविकॉल भरुन ठेवावे. हात खिशाबाहेर निघायला नकोत. हवे तर पीडिलाईटची स्पॉन्सरशिप घ्यावी.

चौकटराजा Wed, 07/10/2019 - 15:55
भारत हहा सामना जिंको वा हिरो सध्याची टीम ही विनर टीम नाही हे मी पहिल्या सामन्या पासून सांगत आहे ! ३ ४ ५ ६ ची बोंबी आहे व त्या खाली क्लब स्टॅंडर्ड ची ही फलंदाज नाहीत !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौरा काका म्हणतात त्यात तथ्य आहे. इथपर्यंत केवळ नशिबाने पोचलो आहोत. आज न्युझीलंड प्रयत्नांची पराकाष्ठा करणार. माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल. पैजारबुवा,

खिलजि Wed, 07/10/2019 - 16:17
आहे ना सर ,, पण आधी सर्वजण १०८ वेळा भारतमाता कि जय बोलले का ?

उगा काहितरीच Wed, 07/10/2019 - 17:08
घरी लवकर जाऊन सामना बघायची इच्छाच गेली राव. शेवटी क्रिकेटमधे शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल हे नाही सांगता येत पण आशा सोडून दिली आहे. :-(

गवि Wed, 07/10/2019 - 17:14
टीव्ही अनुपलब्ध. एक मेडन गेली की काय? असो. जास्त चेंडू आणि कमी रन हव्यात इथून आता चेंडू आणि आवश्यक रन्स समसमान झाल्या. आता गणित अधिकाधिक उलट होऊ नये बस्स.

In reply to by प्रीत-मोहर

गवि Wed, 07/10/2019 - 17:18
मी पाठीशी शिल्लक आहे, असा दिलासा देऊन काहीसा मानसिक ताण कमी करण्यासाठी धोनी मागे राहिला असेल.

In reply to by प्रीत-मोहर

जॉनविक्क Wed, 07/10/2019 - 17:21
अजून धोनी आउट व्हायचा आहे हा विचार मनाला जास्त आश्वस्थ करतो म्हणूनच तो खालच्या नंबरवर आहे, अन्यथा जिथे रथी महारथी कोसळले तिथे आम्ही काय टिकणार अशीही ओरड होऊन जाते

चौकटराजा Wed, 07/10/2019 - 17:18
अगदी कमी देशात खेळला जाणारा हा " विचित्र" खेळ मी १९६६ पासून म्हणजे क्लाइव्ह लॉईड १९ वर्षांचा असल्यापासून पाहात आहे .इथे शेवटाचा चेंडू पडेपर्यंत काहीही होऊ शकते. पण ५ बाद झाल्यावर चमत्कार करणारे लान्स क्लूस्नर आज आपल्या संघात नाहीत . १७५ वाला कपिल देव नाही .पाकिस्तान मध्ये बॉलर्स जसे किलिंग इन्स्टीकट ने फलंदाजी करतात ती बॉलर्स ची परंपराच आपल्याकडे फारशी नाही, हार्दिक व पंड्या ना अनुभव कमी आहे ,धोनी २०१६ पासून मंदावला आहे. दिनेश कार्तिक चांगला खेळाडू असेलही पण आता यावेळी त्याची निवड चुकीचीच आहे .इंग्लंडात फिरकीला फारसा वाव नसतोच . धावा रोखल्या तरी विकेट मिळणे दुरापास्त असते. हे लक्षात घेऊन विजेता स्वप्न पाहावे.

खिलजि Wed, 07/10/2019 - 18:46
अरे मी इथे मंत्रपाठ करतोय म्हणून चांगली दशा सुरु झाली आहे .. मला तुमचेही पाठबळ हवे आहे .. त्या जडेजाला मी मंत्र फुंकुनच मैदानावर उतरवले आहे आता तुम्ही त्या धोनीला पाठबळ द्या

धर्मराजमुटके Wed, 07/10/2019 - 19:11
अपेक्षांना अंत नाही ! पाकीस्तान बरोबर खेळताना चषक नाही जिंकला चालेल पण पाकीस्तानला हरवावे असे वाटते. आज इथपर्यंत आलोय तर जिंकूनच यावे असे वाटते. भारत जिंकणार ! टेंशन नक्को !

In reply to by यशोधरा

चौकटराजा Wed, 07/10/2019 - 19:36
भुवनेश्वर कुमार व चहल पूर्ण ५० ओव्हर्स देखील खेळले नाही . अशावेळी मी जे किलिंग इन्स्टिन्क्त आपल्या ७ नंतरच्या खेळाडूंच्या अंगात नाही असे म्हणालो ते किती उचित आहे ते पहा !

In reply to by यशोधरा

चौकटराजा Wed, 07/10/2019 - 20:03
२०२३ मध्ये मी सत्तरी ओलांडून जाईन . मग तर माझे कुणीच ऐकणार नाही ! माझा मुद्दा एवढाच टीम चान्गली खेळली पण १९८३ इतके टीमवर्क नव्हते !

चौकटराजा Wed, 07/10/2019 - 19:28
निकाल काहीही असू दे खालील बाबी सिद्ध आहेत. १) जर धोनीने निवृत्त होऊन पंत मधला पोरकट पणा काढला तर पंत एक उत्तम खेळाडू होऊ शकतो. २) हार्दिक पंड्या हा खेळाडू फक्त आय पी एल च्या लायकीचा खेळाडू आहे . त्याला इतर भवितव्य नाही. ३) रवींद्र जडेजा व अश्विन हे अजूनही पोटेन्शियल असलेले खेळाडू आहेत . ४) २०१६ पासून धोनीच्या फटाक्यातला दणका हरवला आहे त्याने निवृत्त होणे उचित . ५) विजय शंकर चा अशोक मंकड ( फक्त इंडिया हिरो ) होण्याची शक्यता अधिक .

क्रिकेट हा सांघिक खेळ असला त्यात सुरुवातीचे फलंदाज जवाबदार असले तरी प्रत्येक वेळी त्यांनी शतकं ठोकली पाहिजेत. मग हा महातारा धोनी टुचुटुचु खेळून आपला बीपी वाढवतो या xx ला अगोदर बलजबरीने निवृत्त करा. बस दुसरं काही नको. धन्यवाद. -दिलीप बिरुटे (जडेजाबरोबर टुचुटुचु खेळल्यामुळे म्हाता-या धोनीवर संतापलेला)

In reply to by यशोधरा

स्क्यूज् मी काकु, आयपीएलला हा म्हातारा धोनी जीवावर उदार होऊन खेळतो. आजच्या सामन्यात त्याने जड़ेजाबरोबर एक बाजू लावून धरली पण चेंडू किती खाल्लेत. कसलं टुचु टुचु खेळतो. अरे प्रसंग काय, तू काय खेळतो काय ? वय किती, खेळतो किती ? च्यायला, मला त्याचं तोंड बघायची इच्छा नै. काकू तुम्ही त्याची बाजू घेऊन माझं ब्लडप्रेशर वाढवू नका. अगोदरच मला खुप कामाचा लोड आहे. बस आपल्याला त्याला रिटायर करायचंय. या गोष्टीसाठी,आपल्याला मिपावर एक ह्याशटॅग सुरु करायचंय. #''धोनीने निवृत्त व्हायलाच पाहिजे'' # धन्यवाद. -दिलीप बिरुटे

न्यूझीलंड आणि इंग्लण्ड या दोन्ही संघांनी विश्वचषक क्रिकेट अंतिम फेरीत धड़क मारली आणि कोण जिंकेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. इंग्लण्ड जिंकेल तर छुपा न्यूझीलंड बाजी मारेल असे वाटले. नाणेफेक ( टॉस) जिंकून न्यूझीलंडने पहिली बाजी मारली असे वाटले पण ठराविक धावसंखेच्या आणि ठराविक अंतराने बाद होणा-या संघाने फार मोठी धावसंख्या उभारली नव्हती. २४१ हे आव्हान समोर ठेवून उतरलेल्या रॉय रुट च्या बळावर इंग्लण्ड सहज जिंकेल असे वाटले होते पण चार फलंदाज बाद झाल्यानंतर सामना न्यूझीलंडकड़े फिरला होता. परंतु सामना शेवटच्या षटकापर्यन्त जाऊन टाय झाला. सुपर ओव्हर मधेही सामना टाय झाला. सामन्यात अधिक चौकार ज्याने मारले असतील तो संघ विजयी या मुर्ख नियमामुळे इंगलंडला विश्वविजेता ठरविण्यात आले. एका रोमहर्षक सामन्याचा असा शेवट पाहुन न्यूझीलंडचा समर्थक म्हणून आम्ही हळहळन्याशिवाय काय करू शकणार होतो. इंग्लण्डचं अभिनंदन. -दिलीप बिरुटे

In reply to by फुटूवाला

पूर्ण कालच्या सामन्यात आणि सुपर ओव्हर्स मधे इंग्लडने एकूण २४ चौकार ठोकले तर न्यूझीलंडने १६ चौकार ठोकले. -दिलीप बिरुटे

माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल. पण सामना इतका अटीतटीचा होइल असे वाटले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना बर्‍याच कळापर्यंत लक्षात राहिल. दोनही संघांनी जिगरबाज खेळ केला त्यात इंग्लंड थोडे जास्त नशिबवान ठरले. पैजारबुवा,

माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल. पण सामना इतका अटीतटीचा होइल असे वाटले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना बर्‍याच कळापर्यंत लक्षात राहिल. दोनही संघांनी जिगरबाज खेळ केला त्यात इंग्लंड थोडे जास्त नशिबवान ठरले. पैजारबुवा,