अठ्ठावीस लक्ष रुपये .......यनावाला
"पैशांचा पाऊस ! भोंदू बाबाने व्यावसायिकाला अठ्ठावीस लाख रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी पुणे म.टा.(31-01-2017) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:-
मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७ वर्षे, विठ्ठलनगर, सिंहगड मार्ग, पुणे) यांचा शिरवळ येथे कारखाना आहे. ते श्रद्धाळू आहेत. त्यांच्याकडे बुवा-बाबा-स्वामींचे येणे- जाणे असते. सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "अडथळे आहेत. ते दूर झाल्याशिवाय कुंभातून धन येणार नाही. पूजा करावी लागेल. " अशी बतावणी करून चाळीस हजार रुपये घेतले.
त्यानंतर सागरनाथ कुंभ घेऊन आला. त्यांतून शंभर रुपयांच्या कांही नोटा पाडून दाखविल्या. अधिक नोटा पडेनात. "तुमच्यावर कोणी करणी केली आहे. आता स्मशानात जाऊन मोठा विधी करायला हवा. त्यासाठी बारा लाख रु.लागतील. मग नोटांचा पाऊसच पडेल." अशी आशा दाखवली. "पैसे न दिल्यास बारा भूतांचा कोप होईल" .अशी भीतीही घातली. वैद्यांनी मुदत ठेवी मोडून १२ लाख रु.दिले. त्यानंतर सागरनाथने आणखी पाच लाख रु.मागितले. वैद्यांनी तीही रक्कम सुपूर्द केली.
नंतर मंदार वैद्यांना सागरनाथच्या मुलाचा फोन आला. "करणी वडिलांवर उलटली आहे. ती परत उलटविण्यासाठी १० लाख रु.पाठवावे. नाहीतर वडिलांचा मृत्यू होईल. मग त्यांचे प्रेत आणून मी ते तुमच्या दारासमोर टाकीन. " वैद्य घाबरले. त्यांनी दहा लाख रु.पाठविले.
कांही दिवसांनी आणखी पैशांची मागणी आली. इतके पैसे गेल्यावर आतां मंदार वैद्यांना शंका आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा. मग त्यांनी बुवाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी सागरनाथ मीठानाथ परमार आणि चंदुलाल सागरनाथ परमार यांच्यावर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास चालू आहे.
....या प्रकरणावरून काय दिसते ?
मंदार वैद्य हे व्यावसायिक आहेत. त्यांनी भोंदू बाबाला २८लाख रु. दिले. त्याअर्थी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. म्हणजे ते आपला व्यवसाय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळत होते. यावरून ते व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, होते. कारखान्याचे व्यवस्थापन चांगले असणार. म्हणजे मंदार वैद्य बुद्धिमान आहेत. त्यांचे वय ४७ वर्षे आहे. म्हणजे ते अनुभवी आहेत. अशा या व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, सक्षम, बुद्धिमान, अनुभवी व्यावसायिकाचे २८ लक्ष रुपये एक फडतूस, ढोंगी बाबा लुबाडतो याचे महदाश्चर्य वाटते. या बुवाने चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. वैद्य यांनी त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि हातावर लाखो रु. ठेवले. कोणताही लेखी व्यवहार केला नाही. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडले हे सत्य आहे.
असे घडण्याचे कारण काय ? यावर विचार करता एकच कारण संभवते. ते म्हणजे देव-धर्म आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर मंदार वैद्य यांची असलेली श्रद्धा. अपरंपार श्रद्धेविना असे घडणे असंभवनीय आहे. श्रद्धा ही एक मनोभावना आहे. मन आणि बुद्धी यांचे उत्पत्तीस्थान मेंदूच आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, श्रद्धा, मद, मत्सर, काम अशा अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे मन. माणसाचे मन श्रद्धा भावनेने लिप्त झाले की त्याची बुद्धी लुळी पडते. बुद्धीपेक्षा मन प्रबळ बनते. बुद्धी निष्प्रभ होते. बुद्धीची विचारक्षमता नष्ट होते. मेंदूवर श्रद्धेचे नियंत्रण येते. त्यामुळे सर्व निर्णय श्रद्धे अनुसार होतात. विवेक, चिकित्सा हे बुद्धीचे घटक मागे पडतात. मग व्यवहारज्ञान, क्षमता, बुद्धिमत्ता, अनुभव यांचा कांही उपयोग होत नाही.
श्रद्धेचे चार प्रकार आहेत. ते सोदाहरण असे:-
१) पारंपरिक श्रद्धा. (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.लालबागचा राजा नवसाला पावतो.)
३)आशावती श्रद्धा. ( उदा.श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.मृताचे धार्मिक अंत्यसंस्कार केले नाहीत तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो.)
प्रस्तुत प्रकरणात मंदार वैद्य यांची आशावती श्रद्धा दिसते. आपण इतकी वर्षे, अनेक धार्मिक कार्ये निष्ठापूर्वक केली आहेत. आता देव माझ्यावर कृपा करणार. तो कुणाच्या रूपाने, कसा -कधी येईल हे सांगता येणार नाही. पण तो येईल हे निश्चित. तो येणार. मला कृपाप्रसाद देणार. असे त्यांना मनोमन वाटत होते. ते देवाची प्रतीक्षा करीत होते. वैद्य अनेक बुवा-बाबांना भेटत होते. शेवटी सागरनाथबाबा न बोलावता, त्यांच्या घरी आला. कांही न विचारता , "तुम्हांला अक्षय धनाचा कुंभ देतो." असे आपण होऊन म्हणाला. वैद्यांना क्षणैक साक्षात्कार झाला असावा की या बाबाला देवानेच पाठविले आहे. त्याने नऊ हजार रु. मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. पुढे तो वारंवार पैसे मागू लागला. वैद्यांना वाटले देव आपल्या श्रद्धेची परीक्षा पाहतो आहे. आपण कमी पडता नये. देवाच्या कसोटीला उतरलेच पाहिजे. या विचाराने ते पैसे देत राहिले. त्यांना वाटले "मी कुणाला कधी फसवले नाही. कुणाचे कधी वाईट केले नाही. वाईट चिंतिलेसुद्धा नाही. मग माझे कशाला काही वाईट होईल ? देव आहे. देवाला डोळे असतात ना ? तो पहातो आहे ना ? माझे भलेच होणार. देवाने पाठविलेला हा बाबा मला फसवणे शक्य नाही. अंतीं तो माझे कल्याणच करील." असे त्यांना सारखे वाटत राहिले असणार.
शेवटी २८ लाख रुपये गेले तरी काहीच चांगले घडले नाही. हे ध्यानी आल्यावर ते श्रद्धेच्या ग्लानीतून थोडे बाहेर आले. "म्हणजे बुवा-बाबा श्रद्धाळू लोकांना लुबाडतात असे अंनिसवाले सांगतात ते खरे असते की काय ? " अशी पुसटशी शंका त्यांच्या मनात तरळली असावी. मग त्यांनी सागरनाथबाबा वि्रुद्ध पोलीसांत तक्रार दिली. पोलीसांनी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. पुढे काय झाले याची बातमी अद्याप वाचली नाही. नेहमीप्रमाणे पोलीसतपास चालू असेल.
व्यवसाय-धंद्यात प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करून योग्य निर्णय घेणारी बुद्धी श्रद्धा-क्षेत्रात चालेनाशी झाली. कारण मन श्रद्धेने ओतप्रोत भरले होते. त्यामुळे बुद्धीने कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली नाही. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बुद्धी बाजूला पडली. किंबहुना श्रद्धेने तिला बाजूला सारले. आणि सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. श्रद्धा भावनेमुळे प्रबळ झालेल्या मनाने मेंदुद्वारे निर्णय घेतले. कर्मेंद्रियाने (हातांनी) ते कार्यवाहीत आणले. भोंदूबाबाने मागितले तेवढे पैसे त्या्ला दिले. शेवटी माणूस म्हणजे त्याचा मेंदू. तो मेंदू श्रद्धाभावनेच्या आहारी गेला म्हणजे अशी फसवणूक होणारच. याची अनेक उदाहरणे आहेत. श्रद्धाळू लोकांचा निरुपाय असतो. श्रद्धेपुढे त्यांचा मेंदू हतबल होतो. श्रद्धेच्या गुंगीतून बाहेर आल्यावर "मी त्या बाबाला इतके पैसे दिले तरी कसे? " याचे आश्चर्य स्वत: वैद्यांनाच वाटले असेल. श्रद्धेची झिंग ही अशी असते. श्रद्धाळूंची फसवणूक होणे अपरिहार्य असते. त्यावर एकच उपाय तो म्हणजे श्रद्धेचे
प्रयत्नपूर्वक विसर्जन करणे.
श्रद्धा ठेवणे हे दास्य (गुलामगिरी) पत्करल्याचे लक्षण आहे. मंदार वैद्यांनी भोंदूबाबावर श्रद्धा ठेवली म्हणजे त्यांनी आपली बुद्धी त्याच्याकडे गहाण टाकली. म्हणजे त्यांच्या बुद्धीचे नियंत्रण बाबाकडे गेले. त्यामुळे तो बुवा सांगेल ते सत्य मानून वैद्य त्याच्या आज्ञा पाळत गेले. दासाला स्वामीच्या आज्ञा पाळाव्याच लागतात. मग फसवणूक अटळ असते. महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रतिष्ठित दैनिकात छापून आलेली ही सत्य घटना आहे. श्रद्धावंतांनी यावर स्वबुद्धीने विचार करावा. "आमचे महाराज अशी बुवाबाजी करणारे नव्हेतच." अशा भ्रमात राहू नये.
******************************************************************************
वर्गीकरण
वाचने
48960
प्रतिक्रिया
138
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखाची चिकित्सा न करता येत
श्रद्धा निर्मुलनाचे वर्ग ?
एखाद्या माणसाला तू फारच जाडा
अगदी सहमत आहे! सुबोधजी http:/
In reply to एखाद्या माणसाला तू फारच जाडा by सुबोध खरे
एखाद्या माणसाला तू फारच जाडा
आस्तिकांची जालीम नस
व्यापक स्वरूप...
In reply to आस्तिकांची जालीम नस by गामा पैलवान
गापै, पळपुटी कारणे आहेत ही.
सर्व चुकीचं?
In reply to गापै, पळपुटी कारणे आहेत ही. by तर्राट जोकर
संमिश्र भावना..
स्मशानात मोठा विधी करावयाचा
In reply to संमिश्र भावना.. by चौकटराजा
यनावालांच्या मते संत तुकाराम
In reply to स्मशानात मोठा विधी करावयाचा by nishapari
धार्मिक व आध्यात्मिक, यात आपण
In reply to यनावालांच्या मते संत तुकाराम by arunjoshi123
संत परंपरा ...
In reply to यनावालांच्या मते संत तुकाराम by arunjoshi123
साधू ....
In reply to स्मशानात मोठा विधी करावयाचा by nishapari
जगात केवल (अबसॉल्यूट) असं
In reply to संमिश्र भावना.. by चौकटराजा
मुळात अंधश्रद्धा असं काही
मुळात अंधश्रद्धा असं काही नाही. असते ती फक्त श्रद्धा.
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
एकमेव
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही नाही. असते ती फक्त श्रद्धा. by mayu4u
+१
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
आता प्रश्न असा आहे कि अशा
In reply to श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील by सुबोध खरे
हरेक मनुष्य दोन्हीचा संगम..
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
विश्वास-श्रद्धा-निष्ठा
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
यनावाला सर
In reply to विश्वास-श्रद्धा-निष्ठा by यनावाला
या सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचेइथेच तर सगळं स्पष्टीकरण फसलं. एखाद्या मानवाला मेंदू, फुफ्फुसं, हृदय ईई अवयव असतात तसं मन कुठे असतं हे कोणी दाखवू शकेल काय? मनाला वस्तुरूप अस्तित्व नसतं म्हणताय पण तरी ते मानायचं मग आत्म्यालाही वस्तुरूप अस्तित्व नसतं मग आत्मा का नाही मानायचा? सगळ्या मानवी भावना लिहिल्यात आणि श्रद्धा ही पण एक भावना आहे म्हणताय, मग सगळ्या माणसांत सगळ्या भावना सारख्याच प्रमाणात असाव्यात हा अट्टाहास का? एखादी व्यक्ती जशी सतत चिडकी असते तर काही आनंदी असतात. तसंच काही व्यक्ती श्रद्धाळू असतात हे का मान्य होत नाही? या सर्व भावना सतत कमी जास्त होत असतात. एखादी श्रद्धाळू व्यक्ती काही कारणाने अश्रद्ध होऊ शकते आणि उलटही होऊ शकतं. भलेभले डॉक्टर सुद्धा एखाद्या क्रिटिकल पेशंटसाठी सर्व प्रयत्न करून झाल्यावर आता सर्व देवाच्या हातात आहे म्हणतात. अश्या पेशंटचे आयुष्यभर देवाला नावं ठेवणारे वडील सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा देवापुढे हात जोडताना दिसतात. वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे अतिशय अडचणीत असताना देव माझ्या पाठीशी आहे ही भावनाच कित्येकांना विपरीत परिस्थितीतून तारून नेते. माझ्याकडे माझे स्वतःचे असे काही अनुभव आहेत की जे कुठल्याही स्पष्टीकरणापलीकडचे आहेत. दुर्दैवाने त्यावेळेला कॅमेरा असण्याएवढी ऐपत नसल्याने तुम्ही ज्याला प्रूफ मानाल असं काही नाहीये. पण अनुभव म्हणून सांगू शकतो. आणि हो त्यातले काही अनुभव जसे प्रूफ न दाखवता येण्यासारखे आहेत तसेच काही (सोय असती तर) प्रूफ दाखवता आले असते असे आहेत. वर तुम्ही ज्याचे उदाहरण दिले आहे त्यातला बाबा म्हणजे एक भामटा आहे आणि त्याला फासलेला एक लोभी मूर्ख मनुष्य आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे त्याने माणसावर श्रद्धा ठेवली आहे देवावर नव्हे. नेहमीप्रमाणे या प्रतिसादाला तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा नाही पण निदान वाचाल तरी अशी अपेक्षा ठेवतो.देव अस्तित्वात आहे...
In reply to विश्वास-श्रद्धा-निष्ठा by यनावाला
यनावाला म्हणतातच श्रद्धा व
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
मराठीत आपण अंधश्रद्धा...
In reply to यनावाला म्हणतातच श्रद्धा व by प्रकाश घाटपांडे
अवांतर...
In reply to यनावाला म्हणतातच श्रद्धा व by प्रकाश घाटपांडे
तर्कबुद्धीला उगाच स्ट्रेच
In reply to अवांतर... by अर्धवटराव
भावना विश्व (इन्क्लुडींग
In reply to अवांतर... by अर्धवटराव
भावना विश्व (इन्क्लुडींग श्रद्धा) हे जगण्याचं मेकॅनीझम आहे व तर्कबुद्धी जगण्यातली चैन आहे.वाह ! जोरदार टाळ्या !!!इतके पैसे गेल्यावर आतां मंदार
एक वेगळी बाजु.............
dipak ji
In reply to एक वेगळी बाजु............. by दीपक११७७
श्रद्धाळू लोक हवाला व्यवहार
In reply to dipak ji by विशुमित
एकमत ...
In reply to dipak ji by विशुमित
सागरबुवाचं टॅलेंट कौतुकास्पद
बिंगो!
In reply to सागरबुवाचं टॅलेंट कौतुकास्पद by मालोजीराव
हा हा.
In reply to बिंगो! by चांदणे संदीप
यनावाला यांना एक प्रश्न
नाही. पुनर्जन्मावर माझा
In reply to यनावाला यांना एक प्रश्न by गामा पैलवान
पुनर्जन्माची आठवण असलेली बालकं
In reply to नाही. पुनर्जन्मावर माझा by यनावाला
जर एखादी घटना
In reply to पुनर्जन्माची आठवण असलेली बालकं by गामा पैलवान
घटना स्वयंसिद्ध असली तरी दिसली पाहिजे ना.
In reply to जर एखादी घटना by अनन्त्_यात्री
लेखातल्या काही गोष्टी पाटल्या
कधी भुरळ तर कधी अज्ञात
In reply to लेखातल्या काही गोष्टी पाटल्या by वीणा३
इथे यनावाला आणि अनेक वाचकांनी
मिपावरील विडंबनकारांना आवाहन
+१
In reply to मिपावरील विडंबनकारांना आवाहन by धर्मराजमुटके
इंटर सब्जेक्टीव रियालिटी
अंग आश्शी...
In reply to इंटर सब्जेक्टीव रियालिटी by स्वधर्म
स्वधर्म सहमत आहे. आमचे मित्र
In reply to इंटर सब्जेक्टीव रियालिटी by स्वधर्म
+१००
१) पारंपरिक श्रद्धा. (उदा.
| Duishen जी ..
In reply to १) पारंपरिक श्रद्धा. (उदा. by Duishen
धर्म आणि उपासना
इतर क्षेत्रांतल्या...
In reply to धर्म आणि उपासना by गामा पैलवान
एक साधा सरळ विचार आहे, तो
In reply to इतर क्षेत्रांतल्या... by Duishen
जो गुरू आपले
In reply to एक साधा सरळ विचार आहे, तो by आनन्दा
जो गुरू आपले फोटो स्वतः विकतो
विभाजक
मला वाटल यासाठी चिकित्सा
In reply to विभाजक by गामा पैलवान
खरा वैज्ञानिक कोण व
In reply to मला वाटल यासाठी चिकित्सा by प्रकाश घाटपांडे
खरा वैज्ञानिक कोण व छद्मवैज्ञानिक कोण हे ओळखता आलच पाहिजे+१०० छद्मवैज्ञानिकी म्हणजे वैज्ञानिक बुरख्याआडची बुवाबाजीच !छद्मवैज्ञानिकी नक्की काय ?
In reply to खरा वैज्ञानिक कोण व by डॉ सुहास म्हात्रे
मी छद्मविज्ञान शब्द
In reply to छद्मवैज्ञानिकी नक्की काय ? by गामा पैलवान
सायंटॉलॉजी
श्रद्धा आणि विश्वास याचं उत्तम विश्लेषण
खरे साहेब यांचि प्रतिक्रिया