मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी - भाग १५

गॅरी ट्रुमन · · काथ्याकूट
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा. तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकूल रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच असंतुष्ट होते अशा बातम्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर भारत अगदी पूर्ण स्वीप केला होता. अनेक राज्यांपैकी सगळ्या जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये त्यात वाढ होणे नाही आणि होईल ते नुकसानच होईल. त्यामुळे पूर्वापार कधीच शिरकाव करता न आलेल्या राज्यांमध्ये (बंगाल, ओरिसा, तामिळनाडू इत्यादी) बर्‍यापैकी जागा जिंकून इतरत्र पडझड झाल्यास ती भरून काढण्याकडे भाजपचा कल असेलच. त्या दृष्टीने मुकूल रॉय यांचा भाजप प्रवेश ही पक्षासाठी उत्साहवर्धक घडामोड आहे.

वाचने 45076 वाचनखूण प्रतिक्रिया 212

mayu4u 03/11/2017 - 21:15
भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास रॉय यांना भाजपात घेणार नाही असे म्हटले जात होते. क्लीन चिट मिळाली का? ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांनाच पक्षात किंवा रालोआत प्रवेश द्यायचा असा चुकीचा पायंडा पडल्याचे दिसत आहे. भाजप मतदारांना गृहीत धरत आहे असं वाटू लागलंय.

In reply to by mayu4u

गॅरी ट्रुमन 03/11/2017 - 21:46
भाजप मतदारांना गृहीत धरत आहे असं वाटू लागलंय.
हे तर होतच आहे. म्हणूनच मध्याच्या उजवीकडे भाजपला एखादा पर्याय असावा असे नेहमी वाटत असते.

गॅरी ट्रुमन 04/11/2017 - 10:10
२०१३ पासूनच राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार अशा प्रकारच्या बातम्या कित्येक वेळा आल्या होत्या. यावेळी मात्र दिवाळीनंतर लवकरच काँग्रेस पक्षात हे स्थित्यंतर होणार असे म्हटले जात होते. दिवाळी संपून १५ दिवस झाले तरी त्या दृष्टीने काहीही हालचाल अजून तरी झालेली दिसत नाही. एक गोष्ट समजत नाही. जर गुजरातमध्ये निवडणुक जिंकायची बर्‍यापैकी खात्री असती तर राहुल गांधींना अध्यक्ष बनवून गुजरातमधील विजय हा त्यांचे नेतृत्व लोकांनी मान्य केले असा संदेश पसरवायची संधी काँग्रेसने नक्कीच व्यर्थ दवडली नसती. पण अजून तरी असे कोणतेही स्थित्यंतर काँग्रेसमध्ये झालेले नाही. याचा काय अर्थ घ्यावा? काँग्रेसला गुजरातमध्ये विजय मिळायची खात्री दिसत नाही हा का? कारण आता गुजरात निवडणुकांच्या तोंडावर असे स्थित्यंतर केले आणि पराभव झाला तर मात्र तो अगदीच प्रथमग्रासे मक्षिकापातः होईल. तसे काँग्रेसला नक्कीच होऊ द्यायचे नसणार असे वाटते. अजून गुजरात निवडणुकांना एक महिना आहे. तोपर्यंत राहुल गांधींना पदोन्नत्ती मिळते का हे बघू.

In reply to by गॅरी ट्रुमन

तेजस आठवले 04/11/2017 - 20:45
भाजपाला एखादा दणका मिळाला तरच ते जमिनीवर येतील. सध्या पाय हवेत आहेत. घोडचूक टाळण्यासाठी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावे लागण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे. गुजरात निवडणुकीत आपटले तर पुढे अधिक जोमाने २०१९ साठी उतरतील. देशाचे चांगले व्हायला पाहिजे, सरकार कोणाचेही असो. २०१९ मध्ये निसटता विजय भाजपाला मिळेल कदाचित, पण मग निर्णय घेण्याची धडाडी दाखवता येणार नाही कारण बहुमत नसेल. त्यामुळे ज्याला कोणाला २०१९ सत्ता मिळेल, ती भरपूर बहुमताने मिळावी असे वाटते.
जाहिरातींवर उधळपट्टी संतापजनक राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारकडून कोट्यवधींच्या जाहिराती सुरू आहेत. मंत्रालयाच्या तळमजल्यावर लावलेल्या अशाच एका जाहिरातीत चक्क बॅंकॉकमधील छायाचित्र वापरण्यात आले आहे विकासकामांना कात्री लावून न केलेल्या कामांच्या जाहिरातीवर सरकार कोट्यवधींचा खर्च करत आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांना कोट्यवधींची कंत्राटे दिली जात आहेत. राज्य कर्जाच्या ओझ्याखाली बदलेले असताना अशा तऱ्हेची उधळपट्टी संतापजनक आहे, अमेरिकेतल्या रस्त्यापेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले आहेत, असा जावईशोध मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लावलाच आहे, त्यामुळे भाजपच्या नेत्यांना खोटे बोलण्याचा आजार जडला असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही आपले काय मत आहे गुजरात निवडणुकी बद्दल ? कोण बाजुने बाजी मारणार गुजरात मध्ये ?

In reply to by tusharmk

श्रीगुरुजी 04/11/2017 - 12:40
आपले काय मत आहे गुजरात निवडणुकी बद्दल ? कोण बाजुने बाजी मारणार गुजरात मध्ये ? भाजप

In reply to by श्रीगुरुजी

@ गुरुजी : किती फरक असेल जागा मध्ये २०१२ च्या तुलनेने ? Gujarat Legislative Assembly Election in 2012 Party Wise Party Name Seats Bharatiya Janta Party (BJP) 119 (८०) Gujartat Parivartan Party (GPP) 2 Independent (IND) 1 Indian National Congress (INC) 57 ( ८०)

मिल्टन 04/11/2017 - 19:38
इथे दिलेल्या बातमीमध्ये एका सर्वेक्षणाची माहिती आली आहे. सध्या तरूण आणि मध्यम वयात असलेल्या (मिलेनिअल्स) अमेरिकन लोकांपैकी ५०% जण समाजवादी किंवा कम्युनिस्ट व्यवस्थेत राहणे पसंत करतील. हे सर्वेक्षण कितपत प्रातिनिधिक आहे याची कल्पना नाही पण जर का ही गोष्ट खरी असेल तर ती खूपच धक्कादायक आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांनी एकदा एका भाषणात ते अध्यक्ष होण्यापूर्वीची एक गोष्ट सांगितली होती. त्यांना क्युबातील कॅस्ट्रोशाहीला कंटाळून अमेरिकेत पळून आलेला एक क्युबन शरणार्थी भेटला. तो शरणार्थी रेगनना म्हणाला--"ज्या देशात नागरिकांना त्यांना पाहिजे ते करायचे स्वातंत्र्य आहे अशा देशात जन्माला आलात आणि अशा देशात तुम्हाला राहायला मिळत आहे याबद्दल मला तुमचा हेवा वाटतो." त्यावर रेगन त्या क्युबन माणसाला म्हणाले,"तुला तुझा देश सोडून पळून जाण्यासाठी निदान कुठलातरी दुसरा देश होता याबद्दल मला तुझा हेवा वाटतो. नागरिकांची गळचेपी करणारी एखादी राजवट माझ्या देशात आली तर मला पळून जायला दुसरे कुठचे ठिकाणही नसेल". रॉनाल्ड रेगन खाली दिलेली गोष्ट नेहमी म्हणायचे. तसे काही निदान आपल्या जीवनकाळात तरी होणार नाही अशी अपेक्षा करू या. 1

In reply to by मिल्टन

तुषार काळभोर 04/11/2017 - 20:13
स्वातंत्र्य एका पिढीत नष्ट होऊ शकतं. आपण ते वारसाहक्काने पुढे देऊ शकत नाही. ते लढून मिळवावं लागतं, जपावं लागतं आणि तेच करण्यासाठी पुढच्या पिढीला द्यावं लागतं. नाहीतर एक दिवस असा येईल की आयुष्याच्या संध्याकाळी आपण आपल्या मुला-नातवंडांना सांगू, की कोणे एके काळी भारतात कशी स्थिती होती, जिथे सर्वजण स्वतंत्र होते! देव करो आणि आपल्या, आपल्या मुला-नातवंडांच्या आयुष्यात अशी संध्याकाळ न येवो.

In reply to by मिल्टन

तुषार काळभोर 04/11/2017 - 20:14
स्वातंत्र्य एका पिढीत नष्ट होऊ शकतं. आपण ते वारसाहक्काने पुढे देऊ शकत नाही. ते लढून मिळवावं लागतं, जपावं लागतं आणि तेच करण्यासाठी पुढच्या पिढीला द्यावं लागतं. नाहीतर एक दिवस असा येईल की आयुष्याच्या संध्याकाळी आपण आपल्या मुला-नातवंडांना सांगू, की कोणे एके काळी भारतात कशी स्थिती होती, जिथे सर्वजण स्वतंत्र होते! देव करो आणि आपल्या, आपल्या मुला-नातवंडांच्या आयुष्यात अशी संध्याकाळ न येवो.

तुषार काळभोर 04/11/2017 - 22:37
देशात सत्तेत आल्यास ‘जीएसटी’च्या रचनेत बदल करणार : राहुल गांधी हे चांगलं वाईट माहिती नाही. आश्वासन असल्याने पूर्ण होईल की नाही माहिती नाही. पण कित्येक वर्षांनी असं पाहायला मिळालं की विरोधी पक्ष केवळ 'तुमचं हे चुकतंय' एवढंच न सांगता 'आम्ही काय करू' हे सांगतोय.

In reply to by तुषार काळभोर

तुषार काळभोर 04/11/2017 - 22:38
देशात सत्तेत आल्यावर काय करणार ते विधानसभेच्या प्रचारात सांगून काय उपयोग?

In reply to by तुषार काळभोर

राघव 06/11/2017 - 19:44
त्यात काय बदल करू ह्याबद्दल एक अवाक्षर देखिल नाही. हुशार आहेत! :-)

In reply to by राघव

रामदास२९ 07/11/2017 - 11:18
काही नाही कळत त्यान्ना .. जी.एस.टी मधला .. गुजरातची जनता हुशार आहे .. त्यान्ना माहित आहे, चुकून सत्तेवर आले तर विरोधाला विरोध म्हणून सगळे प्रक्लप मोडीत काढतील हे साहेब ..

सचिन 05/11/2017 - 20:20
भा ज प जिंकणार हे निश्चित ! गुजरात मधे कोंग्रेस अजिबात इफेक्टिव नाही. कोणताही मुद्दा नाही ... म्हणून पटेल, दलित वगैरेंना पटवणे चालू आहे. राहूल गान्धी हा माणूस पक्षाच्या सम्पूर्ण विनाशासाठी सक्षम आहे.

तर्राट जोकर 05/11/2017 - 22:21
मुकूल रॉय च्या भाजपप्रवेशावर भजनीमंडळ मूग गिळून बसलंय? पवार, सेना बद्दल जरा काही झाले की गटारगंगा वाहणारे कुठे गेले?

In reply to by तर्राट जोकर

गटारगंगा वाहती ठेवण्याचे कात तुम्ही अगदी मन लाऊन,प्रामाणिकपणे कष्ट करुन साध्य करत आहात....तेंव्हा बाकीच्यांनी या ताजमहालासारख्या होणाऱ्या कामात ढवळाढवळ खपणार आहे का तुम्हाला ?तुम्ही तेवढ्या मनस्वी नक्कीच आहात !

तर्राट जोकर 05/11/2017 - 23:34
सारे भ्रष्टाचारी भाजपमध्ये येऊन पवित्र होत आहेत. ह्या पेक्षा काय महान काम असेल, तेव्हा कोण भक्त ह्या पवित्र कामात ढवळाढवल करणार? राणे, रॉय वगैरे प्रांतोप्रांतीचे अट्टल गुन्हेगार आले भाजपात आणि त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचे वरुन आले आदेश की इथलं भजनीमंडळ लाजकाज सोडून तेही करणार आहेतच. यावर तोंडं शिवलीत बघा भजनीमंडळींची. सेनेच्या आमदाराने चप्पल काय मारली तर कसे भडाभडा ओकत सुटले होते इथले वीर.... आता थोबाडीत खाल्ल्यासारखे गप्प बसून आहेत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय, पण आरतीचं ताट काही सोडवत नाही. आता बोलणार काय? मग ह्याला चोर म्हण त्याला भाडोत्री म्हण, त्याचा पगार विचार, हुल्लडबाजी करा, कंपुबाजी करा. हा हा हा हा. मिपावर भगतमंडळींची सर्कस जबराट सुरु आहे. विनातिकिट फुल्ल धम्माल आहे. तिकडे नेते मांडिला मांडी लावून मदिरा रिचवतात, पोरी नाचवतात, इथे हे भगत त्यांच्यासाठी रात्रंदिवस आपली बोटं झिजवतात. हा हा हा. लाईट चालू रखो, रात खतम नही हुई अबतक. तमाशा जारी है, हम सोये नही है अबतक.

In reply to by तर्राट जोकर

mayu4u 06/11/2017 - 09:09
राणे रालोआत आलेत, भाजपात नाही. आणि तरीही, दरेकर, राणे, रॉय वगैरे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंडळींना भाजपने दूरच ठेवावं असं मी मिपावर आणि अन्यत्रही म्हणत असतो. - (अभिमानी नमोभक्त) मयुरेश.

गॅरी ट्रुमन 06/11/2017 - 10:46
अमेरिकेत टेक्सस राज्यात सॅन अ‍ॅन्टोनियोपासून जवळ असलेल्या सदरलंड स्प्रिंग्ज्स या ठिकाणी एका चर्चमध्ये एका माथेफिरूने गोळीबार केला आणि त्यात २५ पेक्षा जास्त लोकांचा बळी पडला आहे. सी.एन.एन वर बघितले त्यावरून वाटत आहे की तो टेक्ससचा अगदी ग्रामीण भाग आहे. अशा ठिकाणीसुध्दा अशी भयंकर घटना होणे खरोखरच धक्कादायक आहे. पूर्वी अमेरिका हा खूप सुरक्षित वगैरे देश वाटायचा. पण गेल्या काही वर्षात बेछूट गोळीबाराच्या झालेल्या कित्येक घटना लक्षात घेता प्रत्यक्षात परिस्थिती तशी नक्कीच नाही असे दिसते.

रामदास२९ 06/11/2017 - 11:08
पॅराडाईज पेपर्स : जगभरातील अनेक बड्या नावांचा समावेश - राणी एलिझाबेथ, डोनाल्ड ट्रम्प, जस्टिन ट्रुडो अडचणीत http://www.loksatta.com/desh-videsh-news/paradise-papers-biggest-data-leak-us-president-donald-trump-wilbur-ross-queen-elizabeth-justin-trudeau-1581229/ http://www.loksatta.com/desh-videsh-news/paradise-papers-biggest-data-leak-reveals-trails-of-714-indian-corporates-secret-tax-havens-bermuda-law-firm-appleby-1581184/ http://indianexpress.com/article/india/paradise-papers-indian-corporates-black-money-4923999/

In reply to by रामदास२९

अनुप ढेरे 06/11/2017 - 11:16
भारतातील लोकाम्मध्ये केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा, सचीन पायलट, चिदंबरम लिंक्ड कंपन्या, अमिताभ बच्चन आदी लोकांची नावे आहेत. एक गंमतः जयंत सिन्हा ओमिद्यार नामक संस्थेत कामाला होते त्या कंपनीचं पण नाव आहे. स्क्रोल.इन ही (भारतीय लिब्रलांची आवडती साईट )साईट ओम्दियारने फंड केलेली आहे.

विशुमित 06/11/2017 - 12:07
काहीजण गमतीने काही पण बडबडत सुटतात. या बातमीची तुलना धरणातील मुताशी होणार ही भविष्यवाणी सत्य ठरते की नाय बघा..!! पण म्हणार नाहीत हे चुकीचे बोलले गेले आहे. http://www.lokmat.com/maharashtra/advice-give-names-women-alcohol-mahajans-remarks-protest-across-state/

In reply to by विशुमित

असं विधान विनापुरावा केलं होतं तुम्ही. त्याचं काय? शिवाय "XX मध्ये दगड" वगैरे भाषा तुम्ही वापरली होती, त्याचं काय? आणि ते नवीन इतिहास संशोध चालू आहे म्हणालेलात, ते कुठवर आलंय?

In reply to by mayu4u

गॅरी ट्रुमन 06/11/2017 - 13:16
"समर्थ रामदास आदिलशाहाचे हेर होते"
आदिलशहाचे की औरंगजेबाचे? मला वाटते की रामदास स्वामी औरंगजेबाचे हेर होते. पण ते हेरगिरीच्या कामात इतकी कमालीची गुप्तता पाळायचे की आपल्यासाठी रामदास स्वामी हेर म्हणून काम करतात हे खुद्द औरंगजेबालाही माहित नव्हते. हेच बघा ना--- 1 (आंतरजालावरून साभार)

In reply to by विशुमित

विशुमित 06/11/2017 - 14:32
चला बाबा उपरती आली म्हणायची लगेच.. http://www.loksatta.com/maharashtra-news/water-resources-minister-girish-mahajan-apologise-over-liquor-remark-says-dont-want-to-insult-women-1581320/

प्रसाद_१९८२ 06/11/2017 - 15:02
लोकसभेच्या ५४५ पैकी फक्त ६ जागा निवडुन येणार्‍या पक्षाचा अध्यक्ष, २०१९ मध्ये पंतप्रधान व्हायची स्वप्न पाहतोय ?
शरद पवार २०१९ मध्ये पंतप्रधान होऊ शकतात- प्रफुल्ल पटेल

In reply to by प्रसाद_१९८२

श्रीगुरुजी 06/11/2017 - 15:06
देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्या शब्दाला वजन असल्यामुळे सर्वत्र त्यांचा दबदबा आहे. ळोळ . . . . हहपुवा

In reply to by पुंबा

प्रसाद_१९८२ 06/11/2017 - 15:36
लालू, मुलायम, ममता वगैरे लोकांनी २०१९ पुर्वी एकादी महाआघाडी बनवून, शरद पवारांच्या नेतृत्वात निवडणुक लढवायची ठरवली तर एकादवेळी शरद पवारांचे पंतप्रधान बनणे शक्य आहे. मात्र लालू, मुलायम, ममता सारखे नेते, शरद पवारांसारख्या राजकारणातील शुल्लक नेत्याला नेतेपद देतील हे अश्विसनीय वाटतेय.

रामदास२९ 07/11/2017 - 16:40
साहेबान्चे अद्रुष्य हात भा.ज.पा ला आहेत का शिवसेनेला .. सत्तेतून बाहेर पडायला साहेबान्ना का विचारायला लागत आहे .. का नेहमी प्रमाणे गूगली .. :) http://abpmajha.abplive.in/mumbai/uddhav-thackerays-meeting-with-sharad-pawar-latest-update-476711 http://abpmajha.abplive.in/mumbai/sharad-pawar-statement-on-with-uddhav-thackeray-meeting-476729

तर्राट जोकर 07/11/2017 - 17:19
विरोधात असतांना एक, सत्तेत असतांना दुसरंच. वाह रे भाजप. शेतकर्‍यांच्या भावनांना हात घालून स्वतःची पोळी भाजून घेतली, आणि ह्या मागण्यांना दिले वार्‍यावर सोडून. bjp

सुबोध खरे 07/11/2017 - 18:08
आता फक्त डांगे अण्णा यायचे राहिले आहेत. उद्या निश्चलनीकरणाला एक वर्ष पूर्ण होत आहे त्या पार्श्वभूमीवर तेच यशस्वी कलाकार.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 07/11/2017 - 22:43
ते आले की चार खांदेकरी पूर्ण होतील. नंतर खांदेपालट करण्याची वेळ आली तर अजून काही मिपाकर आहेतच.

In reply to by श्रीगुरुजी

मार्मिक गोडसे 07/11/2017 - 22:59
ते आले की चार खांदेकरी पूर्ण होतील. नंतर खांदेपालट करण्याची वेळ आली तर अजून काही मिपाकर आहेतच. तुमच्यापैकी कोण 'शहीद' होऊन बोहनी करणार ते ठरवा. धंद्याच्या टायमाला खोट नको.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 08/11/2017 - 10:25
दहाव्याला कावळा शिवणार होता. आता वर्षश्राद्ध आले तरी काही शोकाकुल मिपाकर लोक, कावळा येईल आणि काळ्या पैशाच्या पिंडाला शिवेल म्हणून वाट बघत बसलेत. पण कावळा काही केल्या शिवेना. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत...!!

In reply to by श्रीगुरुजी

मार्मिक गोडसे 07/11/2017 - 23:08
काळेधनधारकांसाठी वर्षश्राद्ध, इतरांसाठी वर्धापन दिन! नोटाबंदीमुळे काहींना खरोखर वर्षश्राद्ध घालावे लागणार आहे, ते सगळे काळे धनधारकच समजायचे का?

मार्मिक गोडसे 07/11/2017 - 18:42
नक्की कसला कार्यक्रम आहे ते सांगत नाही म्हणून म्हटले. 'जो तुम कहो' आमच्या म्हणण्याला इतकी किंमत कधीपासून?

सुबोध खरे 07/11/2017 - 19:04
तुम्हाला वर्धापन दिन साजरा करायचा आहे कि वर्षश्राद्ध हा तुमचा प्रश्न आहे. म्हणून "जो तुम कहो" आम्हाला काय घेणं देणं आहे?
काळ तिघांत एक खंबा घेतला तीन तीन पॅक येणार होते वाट्याला पण एक जण दोन पॅक मधेच आउट झाला आणि मग तो पॅक मला मिळाला होय मी लाभार्थी हे माझं सरकार हाय

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 08/11/2017 - 10:40
DM च्या खर्च लाभ विश्लेषण (cost benefit analaysis ) बाबत अजून कोणीच लेख पाडले मला दिसले नाहीत. माझा DM बद्दलचा पहिल्यापासून एकच सवाल आहे ज्याचे समाधानकारक उत्तर कोणताच लेख अद्याप तरी देऊ शकला नाही. DM चा "फायनल औटकॉम" काय असणार हे निर्णायकर्त्याने रोड मॅप बनवला होता का? त्यानुसार त्याचा फरक विश्लेषण (Variance Analysis) कोणी देऊ शकले तर योग्य ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

नितिन थत्ते 08/11/2017 - 15:21
सुरजित भल्ला हे आता मोदींच्या इकॉनॉमिक अ‍ॅदव्हायझरी कौन्सिलचे सदस्य आहेत. त्यांनी नोटबदल कार्यक्रमाची स्तुती न करणे अपेक्षित नाही.

In reply to by नितिन थत्ते

रामदास२९ 08/11/2017 - 15:30
हो ते तर आहेच .. मला वाटतय .. तटस्थ पणे पाहिला तर काही चान्ग्ल्या आणि वाईट गोष्टी आहेत .. http://indianexpress.com/article/opinion/columns/demonetisation-anniversary-narendra-modi-black-money-income-tax-money-laundering-arun-jaitley-4927165/

In reply to by नितिन थत्ते

पूर्वग्रहदुषीतपणाचा चष्मा घातला आहे हे लपून नसलेले गुपीत असले तरी असे उघड उघड अमान्य न करणेही अपेक्षित नाही.

सुबोध खरे 08/11/2017 - 11:57
http://www.livemint.com/Money/WTRdjKNoA2OCsI0cWquYxN/We-did-say-we-wanted-less-corruption.html हा एक वर्षांपूर्वीचा लेख आहे.
दिल्लीमध्ये प्रचंड बहुमत असल्यामुळे दिल्लीतील तीनही राज्यसभेच्या जागांवर आम आदमी पक्षाला आपले उमेदवार निवडून आणता येतील. राज्यसभेवर अराजकिय व्यक्तींना पाठवावे असे पक्षाचे मत आहे असे https://www.ndtv.com/india-news/raghuram-rajan-offered-rajya-sabha-seat-by-aap-sources-1772618 वर लिहिले आहे. आणि त्यात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव आघाडीवर आहे असेही लिहिले आहे. राज्यसभेवर अराजकीय व्यक्तींना पाठवायची कल्पना चांगलीच आहे. ज्यांना निवडणुकांचे राजकारण झेपणार नाही पण तरीही आपले योगदान देऊ शकतील अशा व्यक्तींना संसदेत जायला मिळावे यासाठी राज्यसभा या सभागृहाचे अस्तित्व ठेवावे यामागच्या कारणांपैकी एक कारण होते. पण गेल्या ६७ वर्षात नेहमीप्रमाणे आपल्या लोकांनी त्या चांगल्या कल्पनेचेच वाटोळे केले. जर कोणीही रघुराम राजन सारख्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. फक्त अपेक्षा ही की एकदा आआपचे उमेदवार म्हणून तिथे निवडून गेल्यावर स्वतःचा स्वतंत्र बाणा विसरून परत त्याच पक्षाची री ओढण्यात आली तर मात्र मुळातल्या कल्पनेलाच धक्का पोहोचेल. आणि मला स्वतःला आआपचा कमालीचा तिटकारा असल्यामुळे राजनसाहेबांनी परत आआपच्या माकडचाळ्यांचीच री ओढली तर मात्र त्यांच्याविषयीचा जो काही आदर आहे तो पूर्ण लयाला जाईल.

In reply to by गॅरी ट्रुमन

रामदास२९ 08/11/2017 - 12:39
रघुराम राजन भारताचे नागरिक आहेत.. का अनिवासी नागरिक आहेत .. मला वाटतय कुमार विश्वास सारख्या पक्षान्तर्गत प्रतिस्पर्ध्यान्ना सम्पविण्याची केजरीवाल खेळी आहे ..

In reply to by रामदास२९

गॅरी ट्रुमन 08/11/2017 - 13:47
मला वाटतय कुमार विश्वास सारख्या पक्षान्तर्गत प्रतिस्पर्ध्यान्ना सम्पविण्याची केजरीवाल खेळी आहे ..
हो तसेच वाटते आहे. राज्यसभेच्या तीन जागांवर आशुतोष, आशिष खैतान आणि कुमार विश्वास यांचा डोळा आहे हे उघड आहे. कविराजांशी केजरीवालांचे जमत नाही. तेव्हा त्यांचा पत्ता कापायचा इरादा केजरीवालांनी केलाच असेल. पण त्याबरोबरच आशिष खैतान आणि आशुतोषही दुखावले जातील ही शक्यता आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीमधून पक्षाने उमेदवारी दिलेल्या ७ नेत्यांपैकी राजमोहन गांधी वृध्द झाले आहेत आणि जरनेल सिंग स्वतःच्या कर्माने पंजाबमध्ये निवडणुक लढवायला जाऊन राजौरी गार्डनमधील विधानसभेची जागा गमावून बसले. आनंद कुमार या तिसर्‍या नेत्याचे नक्की काय झाले हे माहित नाही. पण राखी बिर्ला आणि देविंदर सेहरावत यांना २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेत प्रवेश मिळाला (आणि सेहरावत यांचे केजरीवालांशी बिनसले सुध्दा). उरलेल्या उमेदवारांपैकी आशुतोष आणि आशिष खैतान या दोन मिडिया सॅव्ही उमेदवारांना मात्र त्यानंतर आमदार/खासदार पदे मिळालेली नाहीत. त्यातल्या त्यात आशिष खैतानना दिल्ली डायलॉग कमिशनचे अध्यक्षपद (आणि मंत्र्याचा दर्जा) मिळाला पण त्या माणसाची महत्वाकांक्षा जास्त असावी असे वरकरणी वाटते. तेव्हा कुमार विश्वासचा पत्ता कापायच्या या भानगडीत इतरही नेते दुखावले जायची शक्यता आहे.

In reply to by पुंबा

गॅरी ट्रुमन 08/11/2017 - 14:12
खैतान, आशुतोष आणि तो कवडा कुमार विश्वास तिघेही डोक्यात जातात, ह्यांच्यापेक्षा कुणीही परवडेल.
मला पंजाबमधील फुलका, कमांडो सुरिंदरसिंग इत्यादी सोडून आआपशी संबंधित असलेला प्रत्येक माणूस डोक्यात जातो. अजून एक चांगला माणूस डॉ. धरमवीर गांधी यांना केजरीवालांनी पक्षातून काढले. त्यामुळे आआपशी संबधित असूनही डोक्यात न जाणार्‍या लोकांच्या यादीत फार लोक राहिलेले नाहीत :)

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन 08/11/2017 - 12:59
त्यातही एक अडचण येऊ शकेल असे वाटते . एखाद्या राज्यातून राज्यसभेवर निवडून पाठवायचे असेल तर तो मनुष्य त्या राज्यात १५ वर्षांपासूनचा रहिवासी आहे हे सिध्द करावे लागते. अनेक नेते (उदाहरणार्थ मनमोहनसिंग आसाममधून, पर्रीकर उत्तर प्रदेशातून, चिदंबरम महाराष्ट्रातून इत्यादी) ते रहिवासी नसलेल्या राज्यातून राज्यसभेवर वेळोवेळी निवडून गेले आहेत. पण हे सगळे नेते १५ वर्षांपासून भारतातच वास्तव्य करत होते. तेव्हा ही १५ वर्षांसाठीची अट पूर्ण करायला खोट्या भाड्याच्या पावत्या वगैरे बनविल्या जातात हे जगजाहिर असले तरी या पावत्या खोट्या आहेत हे सिध्द करता येणे सोपे नसल्यामुळे अशा नेत्यांची निवड न्यायालयाकडून अवैध सिध्द करता येणे कठिण होते. पण रघुराम राजन यांची गोष्ट तशी नाही. ते गेल्या १५ वर्षांपासून (खरं तर जास्तच) भारताबाहेर राहात आहेत हे त्यांच्या पासपोर्टवरील नोंदींवरून सिध्द करता येईलच. तेव्हा राजन १५ वर्षांपासून दिल्लीमध्ये वास्तव्य करून आहेत हे सिध्द कसे करणार? कारण भाड्याच्या पावत्या खोट्या दिल्या तरी राजन तिथे राहात नव्हते हे अगदीच उघड होईल. राजन यांच्याऐवजी कोणी लो प्रोफाईल अगदी ग्रीन कार्ड असलेला मनुष्य राज्यसभेवर पाठवायचा असेल तर त्यात फार अडचण येणार नाही. पण राजन यांची गोष्ट वेगळीच असेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

रामदास२९ 08/11/2017 - 15:47
मला वाटतय राज्यसभेतून निवडून जाण्यासाठी
राजन यांच्याऐवजी कोणी लो प्रोफाईल अगदी ग्रीन कार्ड असलेला मनुष्य राज्यसभेवर पाठवायचा असेल
तसा झाला तर इतर पक्ष कोर्टात जातील आणि मग उपराष्ट्रपती (राज्यसभा अध्यक्ष) वेन्कय्या नायडू त्यावर निर्णय घेतील. सुप्रीम कोर्ट पण राज्यसभा अध्यक्ष्यान्च्या अधिकारात हस्तक्षेप नाही करणार मला तरी वाटतय केजरीवालान्ना काही जरी वाटला तरी राजन राज्यसभेवर जायला तयार पाहिजेत कारण सदस्य बनायचा असेल तर सम्पत्ती जाहिर करण आला आणि मग त्याचे स्त्रोत जगजाहिर होणार .. त्यापेक्षा ते नोबेल साठीच्या रान्गेत उभा राहण पसन्त करतील. पुन्हा मधून मधून मीडीया, कोन्ग्रेस, आआप त्यान्चा सरकार विरुध्द वापर करून घेईल , जे पक्षाचा शिक्का लागल्याने राज्यसभा सदस्य म्हणून त्यान्ना करणे अवघड जाईल ..

In reply to by रामदास२९

गॅरी ट्रुमन 08/11/2017 - 16:47
हो बरोबर. कुणाही एन.आर.आय ला राज्यसभेवर पाठवायचे असेल तर ही अडचण येईलच. त्यातल्या त्यात फारसा परिचित नसलेला चेहरा असेल तर कदाचित तितक्या प्रमाणात बारकाईने छाननी होणार नाही. पण राजनसाहेबांच्या बाबतीत त्यांनी कधी काय केले आणि ते कधी कुठे होते ही 'खुली किताब' असल्यामुळे नक्कीच छाननी होईल.
मला तरी वाटतय केजरीवालान्ना काही जरी वाटला तरी राजन राज्यसभेवर जायला तयार पाहिजेत कारण सदस्य बनायचा असेल तर सम्पत्ती जाहिर करण आला आणि मग त्याचे स्त्रोत जगजाहिर होणार
हो राजन केजरीवाल आणि आम आदमी पक्ष या सर्कशीत कुठल्याही अ‍ॅन्गलने फिट बसणारे नाहीत. तसेच आआपचे अमुक फुकट देऊ, तमुक अर्ध्या किंमतीत देऊ हे प्रकार राजन सारख्यांना मान्य असतील असे वाटत नाही. पण मनमोहनसिंगांनी विद्वत्ता असूनही राजकारणासाठी स्वतःचा वापर करून दिला त्याप्रमाणे राजन यांना वाटत असले तर गोष्ट वेगळी.

In reply to by गॅरी ट्रुमन

इरसाल 09/11/2017 - 10:40
हे म्हणजे असं होईल, प्रसिद्ध तलवारबाजाला युद्धासाठी न वापरता स्वयंपाकघरात तलवारीने भाजी चिरायला ठेवण्यासारखे आहे.

In reply to by रामदास२९

गॅरी ट्रुमन 09/11/2017 - 11:04
हे इथे पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. राजन यांच्या उंचीच्या प्राध्यापकाला युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोसारखे त्यांच्या कामाला पोषक वातावरण सोडून राज्यसभेत यावेसे वाटले नाही तर ते अगदी समजण्यासारखे आहे. तरीही मनमोहन सिंग यांचे उदाहरण बघून अशी विद्वान मंडळी कसा विचार करत असतील असे आपल्याला वाटते त्याप्रमाणेच प्रत्यक्षात ते तसाच विचार करत असतील याची खात्री वाटत नाही. तसेच मणीशंकर अय्यर, कपिल सिब्बल, पी.चिदंबरम अशी हुषार मंडळीही आपल्या बुध्दीचा वापर एकाच कुटुंबाची री ओढायला (किंवा बहुदा काही गैरकारभार करायलाही) करत असतील तर अशी खात्री अजूनच कमी होते. विद्वान मंडळी केवळ आपल्याच प्राध्यापकी पेशाशी आणि आपल्या कामाशीच इमान राखून असतात आणि ते सोडून त्यांना इतर कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी महत्वाकांक्षा नसतात हे नेहमीच खरे नसते. याविषयी कधीतरी लिहायचे आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

रामदास२९ 09/11/2017 - 12:07
सत्तेपुढे विद्वत्ता गहाण टाकली कि वरील मन्डलीन्प्रमाणे होता ..
विद्वान मंडळी केवळ आपल्याच प्राध्यापकी पेशाशी आणि आपल्या कामाशीच इमान राखून असतात आणि ते सोडून त्यांना इतर कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी महत्वाकांक्षा नसतात
तत्कालीन नेर्तुत्वामुळेच ह्या लोकान्ना किम्मत होती.

रामदास२९ 08/11/2017 - 17:45
मनमोहनसिंगांनी विद्वत्ता असूनही राजकारणासाठी स्वतःचा वापर करून दिला त्याप्रमाणे राजन यांना वाटत असले तर गोष्ट वेगळी
मनमोहन हे अत्यन्त हुशार माणूस जर धोरणी माणसाच्या ( नरसिन्ह राव) सम्पर्कात आला तर काय चमत्कार करू शकतो (१९९१ आठवा) आणि जर मुर्खान्ना शरण गेल तर कसा हतबलतेने पगारी नोकरासारखा घोटाळ्यान्ना सामोरे जातो त्याचे उत्तम उदाहरण आहे. असो भारतातले मुरब्बी राजकारणी आणि मुजोर नोकरशाही हुशार लोकान्ची पण वासलात लावतात .. उ.दा. राजा रामण्णा, श्रीकान्त जिचकार, शशी थरूर , अशी बरीच ..

In reply to by रामदास२९

राघव 08/11/2017 - 18:27
सहमत. मनमोहन सुद्धा स्वतःची विश्वासार्हता गमावून बसलेत की काय इथपर्यंत शंका येतेय. त्यांच्या अर्थकारणावरील मतांकडे अजूनही बारकाईनं बघावंच लागतं.. पण तरीही ते फक्त काँग्रेसला समर्थन करण्यासाठी काहीही बोलतील असंही वाटतं. बाकी रघुराम राजन राज्यसभेवर जातील असं काही वाटत नाही. त्यांचं नाव पुढं करून स्वतःची टी.आर.पी. ची पोळी फुकट भाजून घ्यायची चाल आहे असं दिसतंय! ;-)

In reply to by रामदास२९

सुबोध खरे 08/11/2017 - 18:30
केवळ राजकारण्यांच्या आहारी जाऊन डॉ मनमोहन सिंह यांनी निश्चलनीकरण म्हणजे Organised loot, legalised plunder (संघटित दरोडा आणि कायदेशीर लुबाडणूक) आहे असे म्हटले आहे. निश्चलनीकरणाचा निर्णय त्यांच्या मते चुकला असेल (तो चूक कि बरोबर हे ठरवण्याची माझी कुवत किंवा लायकी नाही) आणि त्यावर टीका करणे हे हि समजू शकतो. पण संघटित दरोडा आणि कायदेशीर लुबाडणूक असे म्हणणे हे मात्र पटले नाही.यात कुणाच्या अधिकृत उत्पन्नावर दरोडा पडला किंवा चोरी झाली आहे. दरोडा कुणावर आणि लुबाडणूक कुणाची झाली आणि त्यात फायदा कुणाचा झाला? एक वर्षपूर्वी असेच म्हणाले इतपतही मान्य करता येईल पण काल परत तेच म्हणाले आणि जर सरकारने हा संघटीत दरोडा काळ्या किंवा भ्रष्टाचाराच्या पैशावर टाकला असेल आणि तो मनमोहन सिंहांना मान्य नसेल तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या/ अवैध संपत्तीला त्यांची मान्यता आहे असाच अर्थ निघतो. किन्वा केवळ "बोलवित्या धन्याची" री ओढणे चालू आहे. जे काही असेल ते असो. पण या वाक्यांमुळे डॉ. मनमोहनसिंहांबद्दल असलेल्या आदराला एकंदर उतरती कळा लागली आहे असेच म्हणतो.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 08/11/2017 - 19:59
सिंगांनी स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी व एका कुटुंबाची सेवा करण्यासाठी देशहिताचा बळी दिला. आता तेच सिंग, नोटाबंदी म्हणजे संघटित लूट व कायदेशीर लुबाडणूक, असे आरोप असलेली भाषणे वाचून दाखवित आहेत. ते हाडाचे राजकारणी नाहीत असे मत असलेल्यांचे हसू येते कारण ते अत्यंत धूर्त राजकारणी आहेत. त्यांचा साळसूद व केविलवाणा चेहरा हा फक्त मुखवटा आहे. Manmohan Singh has been a highly overrated economist and highly underrated shrewd politician.

In reply to by श्रीगुरुजी

रामदास२९ 08/11/2017 - 20:55
@श्रीगुरुजी -
highly overrated economist and highly underrated shrewd politician
खरे आहे .. तसे नसते तर .. कोन्ग्रेस च्या प्रणव मुखर्जी, अर्जुन सिन्ह, नटवर सिन्ह, नारायणदत्त तिवारी यान्ना बाजूला सारून पन्तप्रधान झाले नसते .. पध्दतशीर पणे एकेकाला त्यान्नी बाजूला केले आणि घराण्यावरची निष्ठा वाढवली .. जो माणूस स्वतः सूरू केलेल्या प्रकल्पान्ना नावा ठेऊ शकतो.. त्याला काय म्हणावा .. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bullet-train-project-an-exercise-in-vanity-manmohan-singh/articleshow/61545765.cms

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा 09/11/2017 - 14:35
मोदींच्या बाबतीत खालील वाक्य नक्कीच सूट होईल. Narendra Modi has been a highly overrated administrator and highly underrated malefactor, and correctly rated exaggerator.

In reply to by सुबोध खरे

रामदास२९ 08/11/2017 - 20:42
@सुबोध खरे - खर आहे .. निश्चलनीकरणाबाबत डॉ. मनमोहनसिन्ह यान्ना आक्षेप असतीलही किन्वा ते राबविण्यात सरकारी यन्त्रणा कमी पडली असेलही पण
Organised loot, legalised plunder (संघटित दरोडा आणि कायदेशीर लुबाडणूक) आहे असे म्हटले आहे.
हे धादान्त खोटे आहे आणि मनमोहनसिन्ह यान्ना ते शोभत नाही ..
पण या वाक्यांमुळे डॉ. मनमोहनसिंहांबद्दल असलेल्या आदराला एकंदर उतरती कळा लागली आहे असेच म्हणतो.
सत्तेपुढे बुध्दी गहाण टाकली कि असा होता ..

तर्राट जोकर 08/11/2017 - 21:05
डॉ. खरे, पंतप्रधानपदासारख्या घटनात्मक पदावरुन सातत्याने धादांत खोटे बोलणार्‍या, बनवाबनवी करणार्‍या, भ्रष्टाचार्‍यांना सामिल असणार्‍या, निवडणुका जिंकण्यासाठी सैनिकांच्या बलिदानाचा अक्षम्य राजकिय वापर करणार्‍या माणसाबद्दल मात्र तुमच्या मनात अपरंपार श्रद्धा आहे. ती कशी काय?

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान 08/11/2017 - 22:12
तजो, हे नरेंद्र मोदींना उद्देशून आहे का? तसं असल्यास कृपया खालीलप्रमाणे विदा देणे : १. सातत्याने धादांत खोटे बोलणे २. बनवाबनवी करणे ३. भ्रष्टाचार्‍यांना सामिल असणे ४. निवडणुका जिंकण्यासाठी सैनिकांच्या बलिदानाचा अक्षम्य राजकिय वापर करणे आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर 09/11/2017 - 01:06
पहले का, दुसरे का, तिसरे का, चौथे का, सबका जवाब देगा रे तेरा जोकर. =)) पुराव्यांसाठी डिश कोणती हवी तेही सांगून ठेवा. नाहीतर हे चॅनल असेच, तो माणूस तसाच, ढमकी वेबसाईट अ‍ॅन्टीमोदी वगैरे नखरे चालणार नाही. काय की टंकायला फार श्रम लागतात. आणि कुणाकडून आम्हाला त्यासाठी पैसे मिळत नाहीत. :-)

In reply to by तर्राट जोकर

ही जळजळ आहे होय? ठीकाय मग. आणि गा पै ना टंकायला पैसे मिळतात ही माहिती कुठून मिळ्वळीत ते ही सांगा. नै, मलाही माझ्या फावल्या वेळेचा अर्थार्जनासाठी सदुपयोग करता येईल.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे 09/11/2017 - 11:46
जोकर बुवा मी फक्त डॉ. मनमोहन सिंहांबद्दल बोलत होतो. येथे श्री मोदी याना आणण्याचे कारण समजले नाही. त्यांच्याबद्दल असे गलिच्छ आरोप करण्याचे इथे प्रयोजन काय आणि का आहे? चष्मा घातलाय हे मी जे म्हणत होतो ते हेच. आपण जे आरोप करताय त्या सर्व आरोपांबद्दल आपण नक्की आणि ठाम पुरावा द्याल अशी अपेक्षा करतो.

मार्मिक गोडसे 09/11/2017 - 07:35
सहमत. आणि तोंडावर आपटले की वैयक्तीक टिप्पणी करून ही ही ही करून दात काढायला आख्खा कंपू हजर असतो.

In reply to by श्रीगुरुजी

मार्मिक गोडसे 09/11/2017 - 15:42
जाऊद्या हो , कशाला सांत्वन करता त्यांचे. अस्पृश्यता पाळन्याची परंपरा अजून ते विसरले नाहीत.

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी 11/11/2017 - 14:09
जाऊद्या हो , कशाला सांत्वन करता त्यांचे. अस्पृश्यता पाळन्याची परंपरा अजून ते विसरले नाहीत. इथे कोण अस्पृश्यता पाळतो/ते/तात ते सांगाल का?

In reply to by श्रीगुरुजी

मार्मिक गोडसे 09/11/2017 - 15:29
भाट धारातीर्थी पडायाला लागले मग त्यांना योग्य त्या ठिकाणी पोचवायला कोणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा ना?

In reply to by mayu4u

मार्मिक गोडसे 09/11/2017 - 16:15
तो आला तर तुमची पानपट्टी झाकली जाईल की?एकतर तुमच्या गिऱ्हाईकांची तोंडे आपटून लाल झाली त्यामुळे तुमचा धंदा कमी त्यात हा भलामोठा ट्रक उभा राहिल्यावर अजुनच प्रोब्लेम होईल.

In reply to by मार्मिक गोडसे

शेवटचा मुद्दांना धरुन असणारा प्रतिसाद कधी दिला होता वगैरे काही अंधुकसं आठवतंय का प्रयत्न करुन बघा ना.

विशुमित 09/11/2017 - 12:52
टेलिकॉम कंपनीना फेका फेकीचा रोग लागलेला दिसतोय. ४ जी देतो म्हणून प्रत्येक्षात २ जी किंवा काही प्रमाणात ३ जी च नेटवर्क पुरवत आहेत. कसा काय होयचा देश डिजिटॅलिज? https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/no-four-g-service-roole-out-in-india/articleshow/61568254.cms

विशुमित 09/11/2017 - 16:11
या पक्षातील बहुतेक जणांना खोट्या डिग्र्या घायचा छंद जडला का काय ते समजत नाही. मी म्हणतो १२ वी नापास तर १२ वी नापास, त्यात काय एवढे ? इलेक्शनला उभे राहायला आणि निवूडून यायला शैक्षणिक पात्रतेची अट नसताना असले उद्योग कशासाठी करतात देव जाणे? https://www.loksatta.com/pune-news/high-court-rejected-anticipatory-bail-in-pimpri-chinchwad-corporator-1583022/

पुंबा 09/11/2017 - 17:18
ताज्या घडामोडी या धाग्यात बहुतेक वेळी राजकिय झंगाडपाखाडच चालू असते. खेळाडुही तेच तेच आणि वादाचे मुद्देदेखिल तेच तेच. हट्टाने स्वतःच्या हळदकुंकुचुडाछाप निष्ठा कवटाळून विरोधकाला चोची मारीत बसलेले असतात. याचा कंटाळा येतो(आम्हाला, ते मजेत चालू असतात). अराजकिय घडामोडींसाठी वेगळा धागा काढल्यास ह्या धाग्यातील स्पेस झंगाडपखाडप्रेमी लोकांसाठी मोकळा सोडता येईल. अर्थात ही केवळ सुचनाच. कुणी वैयक्तिक घेऊ नये.

In reply to by पुंबा

तर्राट जोकर 09/11/2017 - 17:24
ताज्या घडामोडी हा प्रकारच एकूण भाजपचा प्रचार आणि इतर पक्षांवर आगपाखड यासाठी सुरु केलेला प्रकार आहे. बाकी सगळं उघड आहेच. नॉन-राजकिय चालू घडामोडींसाठी तुम्हीच नवीन प्रकार सुरु करा. पण त्याला रिस्पॉन्स मिळणार नाही हे आधीच सांगून ठेवतो. :-)

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 09/11/2017 - 18:06
तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही नसणार तर आम्ही नसणार. . . . न्युटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन

In reply to by तर्राट जोकर

जे जे उजवे आहे त्याची आम्हाला अॕलर्जी सांगितली आहे. एखादीच्या रुपाचे कौतुक करताना 'ती रुपाने उजवी आहे' म्हणन्याऐवजी 'ती रुपाने डावी आहे' असे का म्हणत नाही म्हणून आमच्मेयाकडे गाबायटी प्रतिसाद मिळतील. टीप*- आम्ही सगळे सोपस्कार डाव्या बाजूनेच पार पाडतो.असे का वगैरे प्रश्न विचारले तर तुम्ही मनुवादी फॕसिस्ट.

रामदास२९ 09/11/2017 - 20:17
दिल्ली धूर्धुक्याने ( smog ला पर्यायी मराठी शब्द) चोन्दली .. आपण विनाशकारी विकासाच्या कडून 'शाश्वत विकासा' कडे केव्हा जाणार .. आज दिल्ली जात्यात आहे आणि बाकी शहरे सुपात आहेत .. उद्या सगळी शहरे याच मार्गाने जाणार .. खरच राजकारणावर आणि राजकारण्यान्वर अति चर्चा करण्यापेक्षा ह्यावर बोलू कारण पर्यावरणाचा विनाश केला आणि पर्यायी मार्ग काढला नाही तर माणूस आणि बाकी सर्व प्रजाति नामशेष होतील ..
हिमाचल प्रदेशात आज विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडले. एकूण ७४% मतदान झाले. हिमाचलमध्ये ७०% पेक्षा जास्त मतदान यापूर्वीही झाले आहे. २०१२ मध्ये ७३.६% तर २००७ मध्ये ७१.६% मतदान झाले होते. मतमोजणी १८ डिसेंबरला होईल.