मी हिंदू असूनही हिंदू धर्माची बाजू का घेतो... बरीच कारणे...
नमस्कार...
कालच मी इथे "
मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो? -- 4 कारणे"
ह्या नावाचा लेख (?) वाचला... हिंदू धर्माचा, हिंदू इतिहासाचा, काडीचाही अभ्यास नसताना उगाच आपण कोणी खूप थोर विचारवंत वगैरे आहोत आणि माझ्या मताने हा देश बदलणार आहे असा सूर वाटला (अर्थात मी चुकीचा असेनही). त्या संदर्भात हे माझे चिंतन...
"मला असं वाटतं कि धर्मनिरपेक्षता ही अत्यंत निरर्थक गोष्ट आहे जी कधीच वास्तवात उतरू शकत नाही... कधीच नाही" हे वाक्य मी खूप जबाबदारीने बोलत वा लिहीत आहे. मुळात पूर्ण जगात धर्मनिरपेक्ष व्यवस्था कोठे असेल का ही माझ्या मनात शंका आहे.. सर्व शक्तिमान राष्ट्रेसुद्धा स्वतःला ख्रिश्चनराष्ट्रे म्हणवतात. हिंसक राष्ट्रे आणि तेलकट राष्ट्रे स्वतःला इस्लामी राष्ट्रे म्हणवतात. उरलो नेपाळ आणि आपण. नेपाळ आपल्या महाराष्ट्रापेक्षाही छोटा.. बाकी ते बाली आणि मौरिशस आहेत पण ते लिंबूटिम्बु.... उरलो आपणच... आपल्यालाच का सेक्युलर व्हायची घाई? मुळात सेक्युलर हाही शब्द मूळ घटनेत नाही... नंतर टाकला गेला (४२ वी घटनादुरुस्ती). मुळात मलातरी सध्याच्या परिस्थितीत सेक्युलर हा शब्द हिंदूंविरोधीही असाच घेतला जातो असं वाटतं. म्हणून मी ह्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे (कोण्याही धर्माच्या नाही)
तरी बरं धर्मनिरपेक्षता आणि विकास ह्याचा काडीचाही संबंध नाही... (असल्यास उदाहरणासहित दाखवावा) म्हणून मला हिंदू धर्माची बाजू घ्यावी वाटते... कारण नं १
१९४७ नंतर बाबासाहेबांना हिंदू कोड बिल आणायचं होतं, जे फक्त हिंदूंनाच लागू होणार होतं.. (म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, शीख वगैरे वगैरे). सर्वांनी विरोध केला... कारण फक्त हिंदूच का... सर्वांनाच लागू करा... पण बाबासाहेबांना फक्त हिंदू समाजाची काळजी होती, (मुस्लिमांची नव्हती बहुतेक). बाबासाहेब एव्हढे आग्रही होते ह्या बिलाबद्दल कि त्यांनी स्वतः ह्या बिलाबद्दल असं म्हटलं होतं कि, जर कोणी त्यांना विचारलं कि त्यांचं भारत देशाप्रती त्यांचं सगळ्यात स्पृहणीय कार्य कुठलं तर मी सांगेन कि हिंदू कोड बिल म्हणून... पण राजेंद्रप्रसादांनी विरोध केला, राजीनामा द्यायची धमकी दिली. नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं उगी राजकीय अस्थिरता नको म्हणून नेहरूंनी ते पुढे ढकललं... नंतरच्य निवडणुकीत पुन्हा अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच आलं. आणि नंतरच्या काळात हे हिंदू कोड बिल चार भागात विभागून लागू करण्यात आलं. १.हिंदू मॅरेज ऍक्ट २. हिंदू मायनॉरिटी अँड गार्डीयनशिप ऍक्ट ३. हिंदू एडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट आणि ४.हिंदू सकशेशन ऍक्ट असे ते चार ऍक्टस... हिंदू समाज खूप सुधारला. त्यातल्यात्यात हिंदू स्त्रियांच्या परिस्थितीत खूप चांगला आणि अमूलाग्र बदल घडवला ह्या बिलाने.... ह्यात कुठलाच वाद नाही... अगदी मान्य... पण फक्त हिंदू समाजच का? आणि इतर समाजासाठी तरतूद केल्यासारखी दाखवणे म्हणजे कलम ४४, भारतीय राज्यघटनेचे (वादग्रस्त युनिफॉर्म सिव्हिल कोड)... पुढच्या सरकारांवर ही जबाबदारी टाकली गेली... खरंतर आधीच ते शक्य होतं... कारण एकतर काँग्रेस ला पर्याय नव्हता... आणि बरेच कट्टर आणि धर्मान्ध मुस्लिम जिनांमागे पाकिस्तानात गेले होते... तेंव्हाच जर मुस्लिमांसाठी सुद्धा हे बिल लागू केलं असतं तर??? त्यांचं वाईट झालं असतं? ते तसं नं करण्यामुळे त्त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढली. आणि आज त्यांच्या खर्चाचा बोजा आपण टॅक्स भरून उचलत आहोत... तेंव्हा हे बिल सर्व धर्मांना नं लागू करून त्यावेळेसच्या सरकारनं ह्या देशाचं सर्वार्थानं आणि अपरिमित, कधीही भरून नं निघणारं नुकसान केलं आहे. दरवेळेस सुधारण्याचा आणि इतरांची घाण काढण्याचा मक्ता हिंदूंनीच का घ्या बुवा??? कारण नं २
मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर.... कारण नं ३
भारताच्या घटनेत कलम २९ आणि ३० मायनॉरिटीला काही विशेष अधिकार देतात त्यांची संस्कृती अबाधित आणि जपली जावी म्हणून. तोच न्याय जर जगाला लावला तर हिंदू हेही अल्पसंख्यांकच आहेत.. तर आम्ही जर आमची संस्कृती जपायला सुरु केलं तर इतरांच्या पोटात का दुखावं?? आणि सेक्युलरीझमच्या नावाखाली हिंदुधर्माचा (अर्थात कोणत्याही धर्माचा) बळी देणे चुकीचे आहे असं मला वाटतं. कारण ४
मी जर माझ्याच घरावर टीका करत असेन, सतत इतरांच्या घराकडे दुर्लक्ष करत आणि तीच जर कसोटी असेल माझ्या निरपेक्षतेची तर ह्या असल्या निरपेक्षतेला आपण मधलं बोट दाखवतो, आणि तेही शेणात बुडवून... हिंदूंच्या बाबतीत हे असंच होत आलेलं आहे. हिंदूंवर टीका करणारे इतर धर्माच्या बाबतीत सोयीस्कर मौन पाळतात.. (अर्थात जे मुळात चुकीचं आहे त्याचं कधीच समर्थन होत नाही, कितीही प्रयत्न केला तरीही) निरपेक्ष लोकांनी सर्व बाजू लक्षात घ्याव्यात.. तसं नं करता उठसुठ हिंदू धर्माचं पायपुसणं करण्याच्या आपण विरोधात आहे. कारण ५
दहशतवाद आणि इस्लाम ह्यात काहीच संबंध नाही. दहशतवादाला धर्म नसतो असे म्हणणाऱयांनीच "हिंदू दहशतवाद" किंवा "भगवा दहशतवाद" ही संज्ञा रूढ केली, कुठलाही पुरावा नसताना. आजही ते प्रकरण खितपत पडलंय.. आणि ना शेंडा ना बुडखा... काही कुत्र्यांच्या छत्र्या "भगव्या दहशतवादाच्या" नावानं बॉम्ब मारत आपल्या पोळ्या शेकून घेत असतात.. आणि त्यांचा टी आर पी वाढवून घेत असतात. कारण ६
माझ्या धर्माने कधीही धर्मप्रसारासाठी कोणावर आक्रमण वा अत्याचार केल्याचे ऐकिवात नाही. कोणी ह्याच्यामागची कितीही कारणे द्यावीत तरी होय माझा धर्म सर्वात सहिष्णू आहे. मग माझ्या ह्या धर्मावर कोणी कसलीही माहिती नसताना किंवा अगदीच जुजबी माहिती असताना टीका केल्यावर माझं रक्त पेटतं... कारण ७
माझ्या धर्मात काही अनिष्ट रूढी, प्रथा आहेत. त्यांचं समर्थन मी अजिब्बात करत नाही. त्या नक्कीच काढून टाकल्या पाहिजेत. पण त्या काढून टाकताना हिंदू समाज विचारात घेतला जावा. हिंदू धर्म नाही. कारण धर्म हा रूढी आणि परंपरा ह्यापासून बर्याचदा वेगळा असतो. त्या काढून टाकल्यामुळे हिंदू धर्माला काहीच अडचण नसते. कायदा हा लवचिकच असावा. त्याप्रमाणे धर्म पण लवचिकच असावा ह्या मताचा मी आहे. काळानुसार बदल व्हावेच. ज्याप्रमाणे आपल्या घटनेमध्ये आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त वेळा घटनादुरुस्ती झालीये. पण ती करताना कधीही घटनेवर टीका करत झालेली नाही. हिंदू धर्माच्या बाबतीत मात्र असे होताना दिसत नाही. काही अनिष्ट प्रथेमुळे पूर्ण हिंदू धर्माला जाणूनबुजून लांच्छन दिले जाते. ते पूर्णपणे चुकीचे आहे. कारण ८
सध्यातरी एव्हढीच कारणे... अजून सापडल्यास टाकेन अजून...
बाकी तथाकथित पुरोगाम्यांचे स्वागत...
वाचने
21548
वाचनखूण
प्रतिक्रिया
101
सुन्दर!!
...
In reply to ... by chitraa
वा
In reply to ... by chitraa
कुठल्याही देशात कायदा हा
In reply to कुठल्याही देशात कायदा हा by औरंगजेब
चित्रा ताई मोड ऑन:
In reply to चित्रा ताई मोड ऑन: by चिनार
...
In reply to ... by chitraa
काहीही हं
In reply to ... by chitraa
मुस्लिम पर्सनल लॉचे पुस्तक
In reply to मुस्लिम पर्सनल लॉचे पुस्तक by वटवट
अवांतराबद्दल पुरावे देऊ शकाल
In reply to अवांतराबद्दल पुरावे देऊ शकाल by पुंबा
नक्किच....
In reply to ... by chitraa
मोगा खान
In reply to मोगा खान by सुबोध खरे
...
In reply to ... by chitraa
मुद्द्याला फाटे फोडू नका.
In reply to मुद्द्याला फाटे फोडू नका. by सुबोध खरे
पुन्हा तेच
In reply to पुन्हा तेच by chitraa
हे पहा गरुडपुराण
In reply to मोगा खान by सुबोध खरे
भारतीय संविधान
संपूर्ण
अर्थहीन यांना धन्यवाद.
एकच सांगणे
In reply to एकच सांगणे by amit१२३
> गोष्टी मागील (शास्त्रीय )
आता काही फुरोगामी याला
आता काही फुरोगामी याला अंधश्रद्धा म्हणतील ज्याचा त्याचा प्रश्नपुरोगामी ऐकले होते. ढोंगी पुरोगामी ऐकले होते, दाढ्या कुरवाळणारे पुरोगामी देखिल ऐकले होते. मात्र हा "फुरोगामी" नामक प्रकार नवीनच वाटतोय.In reply to आता काही फुरोगामी याला by प्रसाद_१९८२
अहो पुरोगामी म्हणजे "फुसके
In reply to आता काही फुरोगामी याला by प्रसाद_१९८२
आदर्श लिबरल्स.
In reply to आता काही फुरोगामी याला by प्रसाद_१९८२
पुरोगामी मूळ शब्दाचा अर्थ
> "मला असं वाटतं कि
आज हिंदू म्हणून मी ख्रिस्ती
गाडगे बाबा वाचलेयत? वाचा.
जत्रा मे फत्रा बिठाया, तिरथ
In reply to जत्रा मे फत्रा बिठाया, तिरथ by सचु कुळकर्णी
मंग बोले तो गाडगेबाबा
....
In reply to .... by chitraa
फेसबुक पोस्टवाल्याला विचारले
In reply to फेसबुक पोस्टवाल्याला विचारले by यशोधरा
...
माझ्या धर्माने कधीही
In reply to माझ्या धर्माने कधीही by सतिश गावडे
हे वाचून मला पु.लं. चं
In reply to माझ्या धर्माने कधीही by सतिश गावडे
सतीशजी... धर्म सहिष्णू असणे
In reply to माझ्या धर्माने कधीही by सतिश गावडे
अतिपूर्वेकडील इंडोचायना
In reply to अतिपूर्वेकडील इंडोचायना by कैलासवासी सोन्याबापु
हो ना !
In reply to अतिपूर्वेकडील इंडोचायना by कैलासवासी सोन्याबापु
हिंदू करायचे म्हणजे काय
In reply to हिंदू करायचे म्हणजे काय by प्रचेतस
...
In reply to ... by chitraa
मुस्लिम, क्रिस्टीयन किंवा
In reply to मुस्लिम, क्रिस्टीयन किंवा by प्रचेतस
...
In reply to ... by chitraa
मी काही कुणाची टक्केवारी काढत
In reply to मी काही कुणाची टक्केवारी काढत by प्रचेतस
सहमत!
In reply to हिंदू करायचे म्हणजे काय by प्रचेतस
बोर्निओ बेटाबद्दल एक लेख वाचला प्रचेतसभौ.
In reply to बोर्निओ बेटाबद्दल एक लेख वाचला प्रचेतसभौ. by बोका-ए-आझम
Hindu Javanese Invaders बद्दल
In reply to Hindu Javanese Invaders बद्दल by प्रचेतस
बोर्निओ बेटावरील लोकांबद्दल.
In reply to बोर्निओ बेटावरील लोकांबद्दल. by बोका-ए-आझम
Hindu Javanese invaders
Hindu Javanese invadersहाहाहा ! हा वाकप्रचार "प्रचलित व्यवस्थेत प्रबळ असणारे आपला भलेपणा, नीतिमत्ता व वरचढपणा दाखविण्यासाठी" नेहमी वापरतात. :) ;) भारतातून हिंदू लोक दक्षिणपूर्व आशियात इसवीसनपूर्वकालात पोचले होते. केवळ आताच्या मलेशिया, इंडोनेशिया नव्हे तर मध्य व दक्षिण व्हिएतनाममध्ये त्यांची राज्ये व साम्राज्ये होती. सद्या उपलब्ध असलेल्या संस्कृत व स्थानिक भाषेतील ग्रंथांत त्यांच्या राजधान्यांची व राजवंशातील लोकांची व सरदारांची नावे संस्कृतमध्ये आहेत. या राज्ये-साम्राज्यांचे बरेच मोठे अवशेष त्या सर्व भागांत विखुरलेले आहेत. कंबोडियातले अंगकोर वट हे जगप्रसिद्ध झाले, पण त्या भागात १०० मोठी देवळे आहेत. त्यातली दहा-बारा मंदिरे आजच्या कालातही प्रचंड म्हणावी अश्या आकाराची आहेत. दक्षिणपूर्व आशियातील देशांतील इतर ठिकाणांच्या अवशेषांचा इतिहास व पर्यटनाच्या दृष्टीने जिर्णोद्धार केला जात आहे. १३ व्या शतकात भारत व श्रीलंकेतून बौद्ध धर्म तेथे पसरू लागला. अनेक साम्राज्ये हिंदू --> बौद्ध --> हिंदू --> बौद्ध अश्या स्थित्यंतरांतून गेली आहेत. त्यामुळे एकाच देवळात बुद्ध आणि हिंदू देवता बाजूबाजूला नांदताना दिसतात. अंगकोर वट हे जगातले सर्वात मोठे हिंदू मंदीर (किंबहुना जगातले सर्वात मोठे धार्मिक संकुल) कंबोडियात आहे आणि जगातला सर्वात मोठा बौद्ध स्तूप इंडोनेशियाच्या जावा बेटावरील बोरोबुदुर येथे आहे. बोरोबुदुरजवळ मोठे मंदीर्समुहही आहेत. अरबी व्यापार्यांनी तेथे इस्लाम नेला. चौदाव्या शतकात मलाक्काच्या (आताच्या मलेशियातले एक राज्य) परमेश्वर नावाच्या राजाने इस्लामचा स्विकार केला व आजूबाजूला त्याचा प्रसार केला. मलेशियानंतर काही कालाने इंडिनेशियाच्या हिंदू/बौद्ध महापहित साम्राज्यातल्या एका सम्राटाने मुस्लीम धर्माचा स्विकार केला व तेथे इस्लामी सत्ता स्थापन झाली. त्या सम्राटाच्या एका भावाला धर्मांतर मान्य नव्हते. त्यामुळे तो बाली बेटावर स्थलांतरीत झाला. बालीतील ९२ टक्के लोक अजूनही हिंदू धर्मिय आहेत. काही शतके इस्लामी झाल्यावरही मलेशिया व इंडोनेशियामध्ये लेखन-नाट्य-कलांमध्ये आणि रुढी-परंपरांमध्ये रामायण व महभारताचा ठसा अजूनही दिसतो. थोडक्यात, मुस्लिम हा त्या भागात सर्वात शेवटी पोहोचलेल्या धर्माने इतर धर्मांशी जुळवून न घेता, नेहमीप्रमाणेच त्याच्या ताब्यात असलेल्या भूभागातील बहुतेक सर्वांना आपला धर्म स्विकारणे भाग पाडले आहे. मुख्य म्हणजे भारतियांना बहुदा अपरिचित असलेला हा इतिहास स्थानिक गाईड्स अभिमानाने सांगतान दिसले ! त्या प्रदेशांतली डोळ्यांनी पाहिलेली सचित्र माहिती खालील दुव्यांत सापडेल : http://www.misalpav.com/node/27096 http://www.misalpav.com/node/26163 http://www.misalpav.com/node/28079In reply to Hindu Javanese invaders by डॉ सुहास म्हात्रे
माहितीबद्दल खूप धन्यवाद...
In reply to Hindu Javanese invaders by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद एक्काकाका!
In reply to धन्यवाद एक्काकाका! by बोका-ए-आझम
दक्षिणपूर्व आशियामधिल
२. बोरोबुदुरचा स्तूप : https://en.wikipedia.org/wiki/Borobudur
In reply to दक्षिणपूर्व आशियामधिल by डॉ सुहास म्हात्रे
सर्वच प्रतिसाद आवडले काका.
In reply to दक्षिणपूर्व आशियामधिल by डॉ सुहास म्हात्रे
...
In reply to ... by chitraa
व्यापार व राज्य बळकट होणे या
व्यापार व राज्य बळकट होणे या हेतूने राजाने स्वतःच इस्लामचा स्वीकार केला, तर त्यात इस्लामचा काय दोष?असा दावा कोणीही केलेला नाही. प्रतिसादात एक साधे विधान (स्टेटमेंट) आहे आरोप (अॅलिगेशन) नाही, हे डोळे उघडून वाचल्यास कोणाही सर्वसामान्य बुद्धी असलेल्या माणसाला समजेल. इतर सर्वांना ते समजले आहे असेच दिसते. सगळीकडे केवळ कांगावा करायची सवय लागलेल्या कोणाच्या काकदृष्टीला काही इतर दिसले तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)In reply to व्यापार व राज्य बळकट होणे या by डॉ सुहास म्हात्रे
...
In reply to ... by chitraa
त्याला त्या व्यापार्याच्या
In reply to त्याला त्या व्यापार्याच्या by डॉ सुहास म्हात्रे
आणि हो. आता तुम्ही विचारले
In reply to आणि हो. आता तुम्ही विचारले by डॉ सुहास म्हात्रे
....
In reply to .... by chitraa
पालथ्या घड्यावर पाणी !!! =))
In reply to आणि हो. आता तुम्ही विचारले by डॉ सुहास म्हात्रे
डॉक्टर... दगडावर डोके जेव्हढे
In reply to त्याला त्या व्यापार्याच्या by डॉ सुहास म्हात्रे
...
In reply to ... by chitraa
तेव्हाचे जौदे
In reply to ... by chitraa
पालथ्या घड्यावर पाणी !!! =))
In reply to अतिपूर्वेकडील इंडोचायना by कैलासवासी सोन्याबापु
याबद्दल काही कल्पना नाही. ते
In reply to याबद्दल काही कल्पना नाही. ते by सतिश गावडे
..
In reply to अतिपूर्वेकडील इंडोचायना by कैलासवासी सोन्याबापु
अंगकोर साम्राज्य त्याच्या
In reply to अतिपूर्वेकडील इंडोचायना by कैलासवासी सोन्याबापु
साम्राज्यविस्तार आणि
...
In reply to ... by chitraa
काही तुरळक "रक्त पेटण्याची"
In reply to काही तुरळक "रक्त पेटण्याची" by सतिश गावडे
मी त्या
मै कूच बोलू क्या? ;)
In reply to मै कूच बोलू क्या? ;) by संदीप डांगे
तुमचं स्वागत आहे
In reply to तुमचं स्वागत आहे by अर्थहीन
अर्थहीनभाऊ,
In reply to अर्थहीनभाऊ, by संदीप डांगे
तुम्हा पुरोगाम्यांना हेच हवं
In reply to तुम्हा पुरोगाम्यांना हेच हवं by सतिश गावडे
प्रसिद्धी ची भूक हो फक्त!
माणूस
In reply to माणूस by तिमा
जात आणि धर्म हवेतच कशाला.
In reply to जात आणि धर्म हवेतच कशाला. by सतिश गावडे
=))
In reply to जात आणि धर्म हवेतच कशाला. by सतिश गावडे
बाSSSSSबोSSSSS
In reply to बाSSSSSबोSSSSS by वटवट
जगातील सर्व मानव समूहाचा
संदीप डांगे,
या विषयावरील दोन धागे बघून
In reply to या विषयावरील दोन धागे बघून by श्रीगुरुजी
काढा.
हॅट लेको, मांझ्या प्रतिसादाला
In reply to हॅट लेको, मांझ्या प्रतिसादाला by संदीप डांगे
सोप्पेय ते
In reply to सोप्पेय ते by शाम भागवत
एक लक्षात आलं का ....
In reply to एक लक्षात आलं का .... by गामा पैलवान
तत्सम
तुम्ही हिंदू धर्म नाही हे
मि हिंदु आहे आणी त्यातील दलित
In reply to मि हिंदु आहे आणी त्यातील दलित by प्रतापराव
आता मी जर ह्यावर स्पष्टीकरण
In reply to आता मी जर ह्यावर स्पष्टीकरण by वटवट
... असा कसा अर्थ काढणार ?
In reply to ... असा कसा अर्थ काढणार ? by chitraa
जाउ द्या हो chitraa.आम्हाला
दलितेतर हिंदु म्हणजे
आम्हिही हिंदु आहोत जरी
In reply to आम्हिही हिंदु आहोत जरी by प्रतापराव
मला विषय भरकटवायचा नाही ...
आजून एक कारण ....
In reply to आजून एक कारण .... by गामा पैलवान
लेखक महोदयांनी विषय भरकटवू
In reply to लेखक महोदयांनी विषय भरकटवू by संदीप डांगे
तुमच्या प्रतिसादाचे मुद्देसूद खंडन ....
In reply to तुमच्या प्रतिसादाचे मुद्देसूद खंडन .... by गामा पैलवान
गरजा? सध्या फक्त लेखविषयाशी
In reply to गरजा? सध्या फक्त लेखविषयाशी by संदीप डांगे
कुणाच्या घाटावर कुणाचे धुणे
In reply to कुणाच्या घाटावर कुणाचे धुणे by गामा पैलवान
असो.
पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न