Skip to main content

आत्मा की आवाज

लेखक झपाटलेला फिलॉसॉफर यांनी मंगळवार, 30/08/2016 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एका अध्यात्मिक मार्गातील सद्गॄहस्थांची भेट झाली .हे सद्गॄहस्थ बाबा किंवा बुवा यांच्या नादी लागणारे नसून स्वतन्त्र विचारांचे आहेत आणि एक छन्द म्हणून अध्यात्माचा अभ्यास करतात तर त्यांच्या चर्चेचा रोख असा होता की आजकाल विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / नको त्या वयात सेक्स शी ओळख होणे / लफडी / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट इत्यादी सर्वच गोष्टींमुळे भारतीय / हिन्दु / मराठी समाजाचा एस क्यु ( स्पिरिच्युअल कोशंट ) कमी होत आहे . त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे. हे सर्व बदलणे अग्रक्रमाने क्रमप्राप्त असून त्यासाठी धर्म-संस्कार अन इतिहासाचा आदर करणारे आणि उच्चतम जीवनमूल्ये बाळगणारी नवीन पिढी घडविणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. हे कसे घडविता येइल ? याबद्दल आपली मते जाणून घेण्यास आवडेल . आगावू धन्यवाद

वाचने 11559
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत
गेले उडत. नका येवू म्हणाव. आमचे आम्ही तयार करु.

गेले उडत. नका येवू म्हणाव. आमचे आम्ही तयार करु.
एवढं सोप्पं नसतंय राव ते नायतर आय वी एफ साठी फर्टिलिटी सेन्टर समोर रांगा नसत्या लागल्या

In reply to by झपाटलेला फिलॉसॉफर

अहो फर्टिलिटी सेन्टर मध्ये आत्मे मिळतात काय ? फातफा उच्च कोटीच्या आत्म्यांचे शुक्राणु मिळतील

जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . --- जन्म नाही घेतील तितके बरे आहे. आमचे आम्ही बघू घेऊ. कोण बरे हे गृहस्थ ?

अतिशय योग्य मुद्दा मांडलाय हे मिपा वर लिहिण्याचे धाडस दाखवल्या बद्दल झपा फिपॉ यांचे हबिणन्दण आता त्सुनामी येईल तयार रहा म्हणजे झाले तूर्तास पॉपकॉर्न घेवून बसत आहे

In reply to by संदीप डांगे

झपाटलेला शिक्षक : गण्या सांग पाहू, "विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट" इज इनडायरेकटली प्रपोर्शनल टू, "भारतीय हिन्दु स्पिरिच्युअल कोशंट" . अँड डेरफोर अफ़ेकटस, लिनिअर रेट ऑफ चेंज इन, मास क्वाटींटी इंफ्लॅक्स ऑफ "पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर" आत्माज डिसायर, टू इन्स्टानशीएट ऑन धिस डाटम.... तर माझं वय काय ? गण्या: सर ५० वर्ष .... शिक्षक: अरे वा बरोबर, कसं ओळखलं गण्या ? गण्या: सर आमच्या आळीत एकजण आहे त्याचं वय २५ आहे.... सुज्ञ मिपाकरांना समजलेच असेल की तो २५ वर्षीय हाल्फ** होता म्हणून.

In reply to by पगला गजोधर

ha dhagach bhari majesheer ahe! :)

त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत .
असे असेल तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् याला काय अर्थ आहे

In reply to by नेत्रेश

मग समस्या कोठे आहे? भगवंताने जन्म घ्यावा अशीच व्यवस्था निर्माण होत आहे ना? डोन्ट यु वान्ट टू सी हिम हीअर?

In reply to by संदीप डांगे

भगवंतांचा अवतार या जन्मी पहायला मिळायची शक्यता कमी आहे. आणी पुढचा जन्म माणसाचाच मिळेल याची गॅरेंटी नाही :) :)

In reply to by नेत्रेश

काय अशक्य आहे त्यात, ते वरचे स्वतंत्र विचारवाले बुवा जो विचार करतायत त्याच्या बरोब्बर उलटा विचार करायचा. अगदी नालायक, हरामी पिढी घडवायची, अनागोंदी माजवायची, मग भगवंतांनी कबूल केल्याप्रमाणे त्यांना यायला लागेलच. आणि हो, वाईटाचा प्रसार चांगल्यापेक्षा कैक पटीने होतो म्हणतात, ट्राय करायला हरकत नै...

In reply to by संदीप डांगे

हा हा हा. हे भारीय , आणि सोपं सुध्दा (डोळा मारलेली स्मायली) :) म्हणजे तिकड अफगाणीस्तान, पाकीस्तानात लवकरच भगवंत अवतार घेण्याची शक्यता निर्माण होइल.

In reply to by राजाभाउ

नै हो, ते भगवंताला अवतार घ्यायला 'कंडिशन अप्लाय' आहे. "यदा यदा हि धर्म्य ग्लानिर्भवति भारत" बोलेतो फकस्त भारत, बाकी कुठेही काहीही झाले तर आमच्या भगोंताला अवतार घ्यायची पावर नाय.

शुद्ध उदात्त हेतूने, कळकळीने भारतमातेच्या सुपुत्रांच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी कटिबद्ध असलेल्या, धर्म-संस्कार अन इतिहासाचा आदर करणारी आणि उच्चतम जीवनमूल्ये बाळगणारी नवीन पिढी घडविणे हेच जिच्या पवित्रतम जीवनाचे इतिकर्तव्य आहे, अश्या खर्‍या अध्यात्मिक वृत्तीच्या थोर व्यक्तीबद्दल मिपाकरांचे औदासिन्य हा अतिशय चिंतेचा विषय आहे. धागाकर्त्याने "हे कसे घडविता येइल ? याबद्दल आपली मते जाणून घेण्यास आवडेल" अशी जी पृच्छा केली आहे, त्याचे उत्तर खरेतर अगदी सोपे आहे, ते असे: एकादा आत्मा त्याच्या आधीच्या देहाच्या समाप्तीनंतर दुसरा एकादा देह गर्भावस्थेत असताना त्यात प्रवेश करतो, त्यानंतर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, विचार, ज्ञान, धर्मप्रेम इ.इ. प्रकट व्हायला सुमारे वीस-पंचवीस वर्षांचा तरी कालावधि लागतो. आपल्या प्रिय मातृभूमीस असा कालापव्यय करणे कदापि परवडण्यासारखे नाही, आपल्या लोकांचा एस क्यू झपाट्याने वाढणे अत्यंत तातडीचे आहे, त्यामुळे हा वेळकाढू मार्ग आपल्या कामाचा नाही. त्याऐवजी जे पुण्यवान / ज्ञानी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांनी आता निराश न होता ताबडतोब कोंबडी, बकरे, मासे, बैल वगैरेचे जन्म घ्यावेत. असे झाले की ते आत्मे चिकन, फिश, बीफ, मटन वगैरे खाणार्‍या हिंसक, असूरी प्रवृत्तीच्या मनुष्यांमधे आपसूकच प्रवेश करतील आणि त्यांना अल्पावधीत पुण्यवान / ज्ञानी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी बनवतील. इकडे चिकन, बीफ, फिश, मटन शिजत आहे, तोवर ताबडतोब त्या आत्म्यांनी पुन्हा पुन्हा असेच जन्म घेत रहायचे. या युक्तीद्वारे बघता बघता भारतातील सर्व मासाहारी दुष्ट प्रवृत्तीच्या पिढ्याच्या पिढ्या परिवर्तित होतील, भ्रष्टाचार विलयास जाऊन खरोखर अच्छे दिन येतील आणि आपली प्रिय मातृभूमि पुन्हा एकदा कोटि कोटि प्रणिपाताच्या लायक होईल. धागाकर्त्यास सादर विनंती की त्यांनी ही मंत्रणा त्यांच्या अध्यात्मिक मार्गातील सद्गॄहस्थांना सत्वर द्यावी, जेणेकरून ते सद्गॄहस्थ भूतलावर जन्म घेवू इच्छिणार्‍या पुण्यवान / ज्ञानी/ धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्म्यांना ही मंत्रणा देतील आणि त्या आत्म्यांना ती तातडीने कार्यान्वित करता येईल. जय भारत.

In reply to by चित्रगुप्त

पण हे तरी कसे घडायचे ...? यात बायोलॉजी जेनेटिक्स याचा आधार घ्यावा लागेल. मग त्यासाठी मार्गदर्शक म्हणून डोक्टर लोक्स लागतील. सबब डॉ खरे, आनंदी गोपाळ, अजया, डो म्हात्रे याना पाचरण करावे... तसेच त्या आत्म्याना कोंबडी चा जन्म घेण्यात पुण्य कसे आहे हे पटविण्यासाठी संक्षी ना संधी मिळण्याची गरज आहे .सबब कोणताही आय्डी घेऊन या पण या असे पाचारण करावे लागेल..... पण हे घडेल का...... ?

In reply to by चित्रगुप्त

त्याऐवजी जे पुण्यवान / ज्ञानी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांनी आता निराश न होता ताबडतोब कोंबडी, बकरे, मासे, बैल वगैरेचे जन्म घ्यावेत. असे झाले की ते आत्मे चिकन, फिश, बीफ, मटन वगैरे खाणार्‍या हिंसक, असूरी प्रवृत्तीच्या मनुष्यांमधे आपसूकच प्रवेश करतील आणि त्यांना अल्पावधीत पुण्यवान / ज्ञानी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी बनवतील. पण चित्रगुप्त साहेब, ती चिकन, बकरे, मासे, बैल मेल्याशिवाय त्यांना शिजवत नाहीत. मग त्यात आत्मा असणार कुठून? ती नुसतीच निर्जीव शररीरे असणार. तीच आपण शिजवून खात असतो. मग, ज्यात आत्मा नाही त्या शरीराद्वारे आपल्या शरीरात आत्मे प्रवेश कसे करणार?

In reply to by बोका-ए-आझम

प्रिय हा मिलिंद असल्याने आत्मे येणारच न्हाईत. बसा तसेच गेइ छंद करत. ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

शांती किंवा यज्ञात याला ऊपाय आहे का ते सांगा? बिचारे ते पन्नाशीचे ग्रूहस्थ आपले ऋणी राहतील. नेमस्त नाखु

In reply to by अत्रुप्त आत्मा

धागा विनोदी आहे असं माझंही मत आहे. पण ओढूनताणून दरवेळी 'सनातन धर्म' या संकल्पनेची टिंगलटवाळी करण्यामागचा तुमचा उद्देश समजला नाही. धर्मावर, त्यातल्या चुकीच्या संकल्पनांवर टीकाटिप्पणी अवश्य करावी. धर्म प्रवाही असायला हवा, त्याने नवी मू्ल्ये, संकल्पना स्वीकारायला हव्यात, तो समतेचं मूल्य मानणारा हवा, तो सर्वसमावेशक हवा ... हे आहेच. जगातला कोणताही संघटित धर्म या अशी निकषांवर उतरत नाही. हे अर्थातच एखाद्या धर्मातल्या उणिवांचं समर्थन नाही. काहाी लोक मिपावर काय वाट्टेल ते लिहितात म्हणून संपूर्ण मिपालाच धारेवर धरण्यासारखं आहे हे. किंबहुना धर्म या संकल्पनेची गरज आहे का नाही - अशीही चर्चा होऊ शकते. सनातन धर्म या संकल्पनेचं विश्लेषण करणारा, त्यातले दोष दाखवणारा, सुधारणेचे मुद्दे सुचवणारा लेख अवश्य लिहा. मी तो नक्की वाचेन. त्यातून काही शिकण्याजोगं असेल ते अमलात आणेन. पण उगाच नुसती टिंगल करून काही कोणी धर्मसुधारक होत नाही हे विसरून काही लोक पुन्हापुन्हा त्याच प्रकारचे विनोद करतात तुमचा प्रतिसाद वाचून जाणवलं म्हणून लिहिलं.

In reply to by नाखु

प्रतिसाद तुम्हाला नाही, आत्मबंध यांच्या प्रतिसादाला आहे.

In reply to by आतिवास

मुद्दाम विरोधी मताला उकळी देणारा धागा आहे हा! म्हणून तसा उप रोधिक प्रतिसाद दिलाय.. एव्हढच.

In reply to by आतिवास

पण जगातील अनेक शोकांतिका - दंगली, युद्धं, honour killings - ह्या लोकांनी धर्माकडे गांभीर्याने आणि नको तितक्या गांभीर्याने पाहिलं म्हणून झालेल्या आहेत. माझ्या मते it's high time we stop taking religion seriously.

In reply to by बोका-ए-आझम

धर्म आणि त्याच्या चुकीच्या आशयांतराने (Interpretation) प्रभावित व्यक्ती चुकीच्या मार्गावर जातात आणि समस्या निर्माण होतात. धर्माला व्यावहारीक आणि तार्किक जोड असेल आणि भल्याबुर्‍याची जाण असेल तर दंगली, युद्धं, सन्मानासाठीच्या हत्या होणार नाहीत.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यातल्या बरोबर आणि चूक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष होणार यात काही आश्चर्य नाही. कुठल्याही गोष्टीचं महत्व हे त्याच्या अभावामुळे जे परिणाम होतात त्यावरून मोजतात. जर धर्म नसेल तर आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान याएवढा धर्म आवश्यक अजिबात नाही. मग तो गांभीर्याने घ्यायचा कशाला?

In reply to by बोका-ए-आझम

बोका-ए-आझम, धर्म नसेल तर आयुष्यात काय फरक पडणार आहे? मोठा खोल प्रश्न आहे. एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर धर्माशिवाय माणूस म्हणजे जनावर असतो. लांबलचक उत्तरही देतो. धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादांचा सुसंगत संगम. कुठल्या प्रसंगात काय कर्तव्य आहे याचा विचार म्हणजे धर्मविचार. जर कर्तव्ये पार पडायची नसतील तर माणूस आणि जनावर यांत फरक उरलाच कुठे? म्हणूनच धर्म हवाय. माझं कर्तव्य काय आहे आणि काय नाही याची सुस्पष्ट जाण हवी. आता परिस्थिती अशी आहे की कर्तव्यासंबंधी सर्वत्र पराकोटीचा गोंधळ दिसून येत आहे. हा वैचारिक गोंधळ निस्तरण्यासाठी अध्यात्मिक साधना करावी लागते. त्यामुळे विचार सुस्पष्ट होतात. हे झालं लांबलचक उत्तर. अर्थात, साधनेविना तुमचे विचार स्पष्ट असतील तर तुम्हाला साधनेची गरज नाही. तुम्ही बुद्धीजीवी आहात. मात्र बहुतांश लोकांना गरज पडते. म्हणून वैयक्तिक धर्मासोबत सामायिक धर्मही असावा लागतो. आ.न., -गा.पै.

नै नै थे जाऊ द्या.. पण ते आत्मे पृथीतलावरच्या कुठल्यातरी भूमीवर जन्म घेत असतीलच की..त्या भूमीचे नाव सांगा..आम्ही तिकडे स्थलांतरीत होतो..मिपावर पुण्यातून लॉगिन झाले काय किंवा उझबेकिस्तान वरून झाले काय आपल्या बापाचं काय जातं? कोणाच्याही बापाचं काय जातं म्हणतो मी..

In reply to by चिनार

चिनारभौ, ते फकस्त भारतात जन्म घेतेत, इतर ठिकाणी जन्म नै घेत. कारण ही भूमी पवित्र इत्यादी इत्यादी काय काय असते म्हणतात.

In reply to by संदीप डांगे

म्हंजे भारतात जन्म घेण्यासारखी परिस्थिती नसन तर काय भटकत र्ह्यायतेत का थे आत्मे ? माय काय म्हणणं हाय...का थे आत्मे असो का माणसं असो..त्याईनं ह्या दृष्ट लोकांचा नायनाट कराले काय हरकत हाय ?? आत्म्याच्या फॉरमॅट मध्ये राहून तर जास्त सोपं जाईन त्यांले..

In reply to by चिनार

वटणीवर आणायच म्हणजे काय करायच चोरया,मारया , खुन, भ्रष्टाचार, बलात्कार .... वगैरे असत तर ठीक हाय पण त्यांचा (पुण्यात्म्यांचा) हा प्रॉब्लेम हाय विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / नको त्या वयात सेक्स शी ओळख होणे / लफडी / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट याला कस वटणीवर आणायच.

In reply to by संदीप डांगे

हे बी खरंय राजा... माय जौदे..पण थुम्ही अकोल्यात राहून बी अपवित्र कसं काय ऱ्हायले? राजेश्वराच्या मंदिरात जात न्हवते काय ??

In reply to by चिनार

सब्बन पवित्र आत्मे आकोल्यात जन्माले येतात मंग ते जगाचा उद्धार कराले बाहेर पडतात हे आमचं शिक्रेट हाये. आमि का सांगावं? "they are among us"

In reply to by संदीप डांगे

थेच म्हनो मी..मले मालूम हाय ना थुमच शिक्रेट..पन साऱ्यासमोर आनायाचं व्हतं.. बाकी माये अकोल्यातले तीन वर्ष लयच गजब होते..त्याच्यावर लिहीन म्हंतो कधीतरी..

माझ्या गुरूंच्या मतानुसार आजकाल केवळ संभोगसुख हेच खरे मानून त्यातूनच अपत्ये जन्माला घातली जातात... अशा आईबापाच्या पोटी ज्ञानोबा, तुकोबा जन्मास येणे कधी तरी शक्य आहे का? मी कामसुखास मुळीच कमी लेखत नाही... ते पण आयुष्यातील एक सर्वोच्च सुख आहे... पण केवळ अनैतिक संबंधातून जन्मणारी संतती, की जिच्या जन्माने आईबाप दोघेही चिंतीत व दुःखी होतात, अशी संतती समाजमित्र होईल की समाजशत्रु? ज्या अपत्याचे आईबाप त्याचे parenting नाकारतात तो व्यक्ती काय संस्कार घेऊन मोठा होईल? समाजाविषयी किती प्रेम आपुलकी असेल ? असा समाज भलेही सामाजिक आर्थिक प्रगती साध्य करूही शकेल पण... पण... पण... एकं सत् विप्र बहुधा वदन्ति सारखे स्वानुभवी तत्वज्ञान तो मांडू शकेल का?

In reply to by संदीप डांगे

गंडेला म्हणजे काय पारच गंडेलाय मला पण ते लाघवी बिघवि बरच काय काय आठवतंय. जौ दे. उगी कशाला त्या आठवणी.

In reply to by अभ्या..

नंतर परत विचार केला तर साहेबांना पाश्चात्त्य जीवनशैलीवर निशाना साधायचा तर नाहीना असं वाटून गेलं...

In reply to by संन्यस्त खड्ग

तुमच्या गुरूंना म्हणावं उर्ध्वरेतन पद्धतीचा प्रसार करा. साला ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी.

In reply to by संन्यस्त खड्ग

तुमच्या गुरूंना म्हणावं उर्ध्वरेतन पद्धतीचा प्रसार करा. साला ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी.

In reply to by संदीप डांगे

ते नदीपात्रातील रेती उचलायची पध्दत असते. मग नदीपात्रात खड्डे पडतात. पात्र बदलते. एकूणच प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. सध्या बंदीय सरकारकडून. तरीही काही लोक करतात. ;)

In reply to by अभ्या..

झालं का? आता प्रतिसाद परत कळफलकात घ्या. म्हणजे तुम्ही कसे बुद्धीमान, तेजपुंज वगैरे राहाल.

In reply to by संन्यस्त खड्ग

माझ्या गुरूंच्या मतानुसार आजकाल केवळ संभोगसुख हेच खरे मानून त्यातूनच अपत्ये जन्माला घातली जातात... अशा आईबापाच्या पोटी ज्ञानोबा, तुकोबा जन्मास येणे कधी तरी शक्य आहे का? मी कामसुखास मुळीच कमी लेखत नाही... ते पण आयुष्यातील एक सर्वोच्च सुख आहे... पण केवळ अनैतिक संबंधातून जन्मणारी संतती, की जिच्या जन्माने आईबाप दोघेही चिंतीत व दुःखी होतात, अशी संतती समाजमित्र होईल की समाजशत्रु?
अरेरे शकुंतलेच्या पोटचा भरत, कुंतीच्या पोटचे धर्म/अर्जुन/भीम .... सर्व संभोगसुखाच्या पोटी जन्मलेले लोकं समाजमित्र की समाजशत्रु ???

In reply to by संन्यस्त खड्ग

हे संभोगातूनच जन्मलेले आहेत. आजकाल या शब्दांना काय अर्थ आहे? पूर्वीच्या काळी asexual reproduction व्हायचं की काय माणसांमध्ये?

भारतीय / हिन्दु / मराठी समाजाचा......
मराठी समाज हा हिन्दु / भारतीय पेक्षा वेगळा आहे का ?

गंभीरपणे काही विचार लिहायचे होते, पण इथले प्रतिसाद वाचून अशक्य हसायला येतंय, काय लिहायचं होतं तेही इसरलंय, आपण कसे घडलोत, म्हणजे ते पुण्यवान, ज्ञानी इ. असे आपण आहोत का, असल्यास नवीन पिढीला तसेच घडवायचे, तसे नसल्यास आपण जसे घडलो त्याच्या बरोबर उलटया पद्धतीने घडवायचे, सिंपल !!